गुरुवार, १० जून, २०२१

आदर्श जिवन जगण्याची उमेद

 *आदर्श जीवन जगण्यासाठी*


☞ (०१) चूक झाली तर मान्य करा.

☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या.

☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा.

☞ (०४) आभार मानायला विसरू नका.

☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.

☞ (०६) सतत हसतमुख रहा.

☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.

☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.

☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.

☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.

☞ (११) कृती पुर्व विचार करा.

☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.

☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा.

☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.

☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा.

☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या.

☞ (१७) विचार करून बोला.

☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.

☞ (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.

☞ (२०) कामापुर्ती मैत्री ठेउन खरी मैत्री गमाऊ नका.

कुटुंब  टिकवणे का महत्वाचे आहे ,,,,

आज परत एकदा नकळत

मुंगी तळ्यात पडली

स्वतःला वाचविण्यासाठी 

झाडाचं पान आणि कबुतराची

वाट पाहू लागली

 मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला 

झाडावरच बसून 

असहाय मुंगीला मरताना पाहू लागला

 कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली

 कबुतर आपल्याच विचारात मश्गुल

 मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली

कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं

 पारधी येणार हेच विसरून गेलं

पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला

कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. 

【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】

 *मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.*


_मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते.

अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते.


*सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा...🤝🏻*

*हा जन्म पुन्हा नाही...😊* 

विनाकारण कोणाला त्रास देऊ नका .आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका🙏🙏

कृपया वेळ काढून नक्की वाचा.

 *निसर्गाने* आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की ....


👉 आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि 

👉 स्वतःला लाथही मारू शकत नाही.

म्हणूनच.. माणसाच्या जीवनात

*"हितचिंतकांची"* आणि

*"निंदकांची"* आवश्यकता आहे....


आयुष्यात असे लोक जोडा,

जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........


कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.


🐾

👄बोलायच्या आधी….❕

👂ऐकायला शिका............❗

🎁खर्च करायच्या आधी….❕

💰कमवायला शिका.......❗

📝लिहायच्या आधी ……❕

😇 विचार करायला शिका....❗

हार मानण्याआधी.....❕

👉 प्रयत्न करायला शिका

आणि मरायच्या आधी .....❗

👉 जगायला शिका......❕


 👉 जीवनात एवढ्याही चुका करू नका,

कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल 

आणि .... रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.


🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे.....

     

आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ...


*" मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य"*


1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत

2:-"समाज" स्मशाना पर्यंत

3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत


      फक्त आणी फक्त  

              *"कर्म"*

        शेवट l पर्यंत


जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,*

आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.*

यातील वेलांटीचा फरक

म्हणजेच माणसाचे जीवन......


*नक्की वाचा*


*जन्म* : दूस-याने दिला ...

*नाव* : दूस-याने ठेवलं ...

*शिक्षण* : दूस-यांनी दिलं ...

*रोजगार* : दूस-यांनीे दिला ...

*इज़्ज़त* : दूस-यांनी दिली ...

*पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* :  दुसरेच घालणार ...

*मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ...

*आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार...


तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!!

 *दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक...

आपल्या माणसांना *आठवतात*.


*धन* इतकं दुर्दैवी आहे की

ज्याला मिळवून लोक नेहमी...

आपल्या माणसांना *विसरतात*.


किती विचित्र आहे ना...??


माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे, 

पण जखम झाली की रक्त येतं....

आणि

माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून 

हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.                            

चांगले मॅसेज नेहमी जास्तीत जास्त शेयर करा..

मनाला खुप वेगळा *आनंद* मिळेल.


💫💫 *खुपच सुंदर लेख आहे त्यामुळे मी तो तुमच्यापर्यंत पाठवला तुम्हीही इतर ग्रुप वर send करा* 💫💫

*

🙏🙏 आपलाच शुभचिंतक गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...