*काय रे मेघराजा*
*काय रे मेघराजा,*
*असं शोभतं का तूला...*
*नेत्यासारखच तू पण,*
*राजकारणीच झाला....*
उमेदवारा सारखा तू पण,
लई जोशातच आलास...
तीनचार दिवस प्रचाराचा,
पाऊस पाडून गेलास....
गडगडाटाच भाषण ऐकून,
भोळा शेतकरी सुखावला....
तुझ्या आश्वासनात येऊन,
भुमित मतदान करुन गेला..
नेत्यासारखच तुझंही,
जल्लोषात स्वागत झालं...
इतका कोसळलास की,
तुला मोह आवरता नाही आलं...
विहीर ,बंधारे फोडून,
नदी, नाल्याला पूर आला...
कुठे बियाणे दडपून,
तर कुठे खरडूनच नेला...
मतदारा सारखीच
शेतकऱ्याची गत झाली..
मातीत जीव ओतूनही,
दूबार पेरणीची वेळ आली...
धरणीच पोट फाडून,
अंकुर हिम्मतीने वर आले...
आईच्या दुधा विना,
बळ मिळेल का रे त्याले...
जगवायचच झालं तर,
वरपाण्यावरही जगतं...
बाळ सध्दृढ होण्यासाठी,
आईचच दूध लागतं...
उद्योग, व्यापाऱ्याच्या मदतीने,
हे सरकार चालतही असंल...
पण अंगात बळ कुठून येईल
जर जगाचा पोशिंदाच नसंल...
*ढगाळ आश्वासने देऊन,*
*सांगना कुठे रे गेलास...*
*काय रे मेघराजा'', तू पण*
*राजकारणी झालास........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा