********************************
*२७ जून - बंकिमचंद्र चटर्जी जन्मदिन*
********************************
जन्म - २७ जून १८३८
मृत्यू - ८ एप्रिल १८९४
बंकिमचंद्र चटर्जी हे बंगाल साहित्याचे एक महान कवि आणि कादंबरीकार असण्याबरोबरच एक प्रसिद्ध पत्रकार देखील होते.
बंकिमचंद्र चटर्जींनी आधुनिक साहित्याची सुरवात बंगाली भाषेतच केली नाही तर त्या बंगाली भाषेतील साहित्याला विशिष्ट दर्जा मिळावा याकरता त्यांनी त्या साहित्याला उंच ठिकाणी नेण्याचं महत्वपूर्ण काम केलं आहे.
बंकिमचंद्र चटर्जी हे भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या "वंदे मातरम्" या गीताचे रचनाकार होते. १८७६ साली त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले.
'आनंदमठ' ही कादंबरी १८८२ साली प्रकाशित झाली आणि लवकरच हे गीत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणागीत बनले.
*कादंबऱ्या* :
दुर्गेशनंदिनी, कपालकुंडला, मृणालिनी, विषवृक्ष, इंदिरा, युगलांगुरीय, चंद्ररशेखर, राधारानी, रजनी, कृष्णकान्तेर उइल, राजसिंह, आनंदमठ, देवी चौधुरानी, सीताराम.
*निबंध* :
लोकरहस्य, विज्ञान रहस्य, कमलाकान्तेर दप्तर, विविध समालोचना, साम्य, कृष्णचरित्र, विविध प्रबंध (१ ला खंड, २रा खंड), धर्मतत्त्व अनुशीलन.
*पत्रकारिता :*
वंगदर्शन पत्रिका
********************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा