सुखी व्हायचंय ? मग चांगला विचार करा
थॉमस अल्वा एडिसन यांचा बहुतेक वेळ प्रयोग शाळेत व्यतीत व्हायचा ,त्यांच्याप्रयोग शाळेत संशोधनाच्या वस्तू असत .एके दिवशी त्यांच्या प्रयोग शाळेला आग लागली .त्यांची कित्येक वर्षाची संशोधनाची मेहनत जळून राख झाली .हे दृश्य ते डोळ्यानी पाहत होते ,परंतु आश्चर्य म्हणजे इतक्या कठीणप्रसंगी देखील एडिसन निराश झाले नाहीत .आपल्या मुलाला जवळ बोलावून ते म्हणाले "जा "तुझ्या आईला येथे बोलावून आण ,कितीही पैसे खर्च केले तरी पुन्हा तिला असे दृश्य पाहता येणार नाही ,त्यांची पत्नी घटनास्थळी पोहोचली तेंव्हा एडिसन तिला म्हणाले ,बघ परमेश्वराने आपल्या सर्व चुका जाळून टाकल्या ,आता मला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे .तेंव्हा मी तिचा पुरेपुर फायदा घेईन .एडिसनने एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतर निराश न होता आशावादी दृष्टीकोनठेवून अनेक महत्वाचे शोध लावले आहेत .
गजानन गोपेवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा