▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬
═════════════
@ संकलन *
गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य
═════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📕 *तापमान जास्त असल्यास थकवा लवकर
*का येतो ?* 📕
शरीराचे तापमान वाढल्याने (ताप आल्यास) पेंशीच्या स्तरावर होणारा पायाभूत चयापचयाचा दर वाढतो. दर ०.५° इतक्या तापमानाच्या वाढीला चयापचयाचा हा दर ७ टक्क्यांनी वाढतो. वाढलेल्या तापमानामुळे शरीरात घडून येणाऱ्या सर्व रासायनिक प्रक्रियांचा वेग वाढतो. बऱ्याचदा प्रयोगशाळेत काही प्रयोग करत असताना परीक्षानळीतील घटकांना तापवल्यास रासायनिक क्रियांचा वेग वाढतो, हे आपण बघितले असेल. बाहेरील वातावरण थोड्या काळासाठी गरम झाले, तर शरीराच्या चयापचयावर फारसा परिणाम होत नाही. मात्र हे तापमान खूप काळ वाढलेले राहिले, तर शरीर चयापचयाचा दर कमी करते. सर्व परिस्थितीत म्हणजे थंडी, उष्णता इत्यादींमध्ये शरीर बाहेरील पर्यावरणाच्या बदलांना अनुरूप अशी स्थित्यंतरे घडवून आणते. थंडीच्या दिवसांत चयापचयाचा दर वाढून ऊर्जानिर्मिती वाढते व शरीराचे तापमान सामान्य पातळीवर राहण्यास मदत होते. याउलट उन्हाळ्यात घामाचे प्रमाण वाढते.
चयापचयाचा दर मंदावून ऊर्जानिर्मिती कमी केली जाते व शरीराचे तापमान योग्य त्या पातळीवर राखले जाते. त्वचेखालील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात व जास्त घाम येतो. या घामाच्या बाष्पीभवनाद्वारे शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाते. जर घामातून बाहेर पडणारे सोडियम व क्लोराइड यांची भरपाई करण्यात आली नाही, तर हातापायाला पेटके येतात. म्हणून पाणी व क्षार यांची भरपाई केल्यास हा थकवा कमी होतो. उन्हाळ्यात हेच काम वेगवेगळी सरबते, कैरीचे पन्हे करत असतात.
*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून
स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज
═══════════════════════
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा