▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬
▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬
@ संकलन @
*श्री. गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📕 *पाण्याच्या खाली जाताना पाणबुड्यांच्या*
*शरीरात काही बदल होतात का ?* 📕
समुद्र सपाटीच्या ठिकाणी वातावरणाचा दाव पायाच्या ७६० मि.मी. इतका असतो. माणूस नैसर्गिकपणे वातावरणाच्या या दावाशी जुळवून घेऊन कार्यरत असतो. समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे, तसतसे हवेचा वा वातावरणाचा दाब कमी होत जातो १,००,००० फूट उंचीवर हा दाव केवळ पायाच्या १० मि.मी. इतका असतो. याउलट जसजसे समुद्रसपाटीपासून खोलखोल जावे तसतसे वातावरणाचा दाब वाढत जातो. दर ३३ फुटाला हा दाव १ ने वाढतो. आजपर्यंत मानव ३३० फुटापर्यंत खोल गेलेला आहे. पाण्यात खाली जाताना पाणबुड्याला काही त्रास होतो का?
वातावरणाचा दाब वाढल्याने हवेतील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड व नायट्रोजन हे वायू रक्ता व उतींमध्ये दावाखाली विरघळले जातात. नायट्रोजनचे प्रमाण वाढल्याने मेंदूचे कार्य मंदावते व शुद्ध हरपते.. कार्बन डायऑक्साईडच्या वाढलेल्या प्रमाणामुळे मेंदूचे कार्य आणखीनच मंदावते. प्राणवायूचे प्रमाण अति वाढल्याने झटके येतात व मृत्यूही येऊ शकतो. जेव्हा पाणबुड्या समुद्राच्या पृष्ठभागावर येतो, तेव्हा हवेचा दाब कमी झाल्याने रक्तात विरघळलले हे वायू परत बाहेर पडतात. यामुळे हवेचे बुडबुडे रक्तात तयार होतात. परिणामस्वरूप फुफ्फुसे वा मेंदू यांच्या रक्तपुरवठ्यात कोठेतरी अडथळा निर्माण होऊन जीव दगावू शकतो. अशा प्रकारे पाणबुड्याच्या रक्तातील वायुमध्ये बदल घडत असतात.
*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून
स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज
═════════════
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा