*हिटलर आणि ग्लोबल्सनीती*
जर्मनीचा हुकूमशहा एडाल्फ हिटलर याचा 30 एप्रिल 1945 आणि ग्लोबल्स चा 1 मे 1945 मृत्यूदिन! दोघानीही एक दिवसाच्या फरकाने आत्महत्या केली.हिटलरने केलेल्या जर्मनीतील 70 लाख निरपराध ज्यूंचा नरसंहारात हिटलर एवढाच त्याचा सहकारी गोबल्स हासुद्धा जबाबदार होता.ग्लोबल्स हा हिटलरच्या प्रचार-प्रसार तंत्राचा जनक.ग्लोबल्सच्या प्रचार-प्रसार तंत्रामुळेच हिटलर सत्तेवर आला.ग्लोबल्स हा *'डेर अग्रोफ'* या वृत्तपत्राचा संस्थापक व सम्पादक होता.हिटलरने त्याला आपल्या नाझी पक्षाचा प्रचार-प्रसारक सोबत युद्धमंत्री,जर्मनीचा एक दिवसाचा चॉन्सलर सुद्धा बनवले होते.ज्यूवर होणारे अत्याचार,छळछावण्या आणि एकंदर त्यांच्याविरुद्धचा हिटलरचा-ग्लोबल्सचा द्वेष उघड होता.तसेच ते ज्यूना जर्मनीतील इतर लोकांच्या तुलनेत तुच्छ समजायचे.जर्मनीला लागलेली उतरती कळा ही ज्यूमुळेच लागली असे ते लोकांत प्रचार करायचे. पहिल्या महायुद्धात झालेली पिछेहाट ही ज्यूमुळेच झाली.असाही ते प्रचार करायचे.*प्रपोगंडा व सेन्सरशीप* ही दोन साधन वापरून या दोघानी आपल्या नाझी पक्षाच्या साह्याने लोकांचे ब्रेन वॉश केले.सभांमधून ते "आम्हीच जर्मनीच वैभव वापस आनु शकतो"असा प्रचार
करायचे.त्यामुळेच त्यांना सत्ताही प्राप्त झाली.1934 ला हिटलर सत्तेवर आल्यावर हिटलरने ग्लोबल्स ला "Ministry of Enlightenment and propaganda" चा कारभार दिला.त्यामधून त्यानी नाझीविचारांच्या कला साहित्य मनोरंजन(चित्रपट)ला परवानगी दिली.नाझी विचारांना सोडून त्यांनी कोणत्याच विचारांना मान्यता दिली नाही.त्यांनी ज्यू धर्मसमर्थक तसेच 2500 समाजवादी,शांततावादी,
साम्यवादी विचारांची जवळपास 2000 पुस्तकांची होळी केली.
आर्यनवंश हा सर्वात शुद्ध आहे.ज्यू अशुद्ध आहेत.त्यामुळे ते राष्ट्रद्रोही आहेत अशा संदेशाचा मारा जर्मन लोकांवर केला.त्यांनी ज्यू पत्रकांवर बंदि घातली.प्रत्येक बातमी वृत्तपत्रात नाझी अधिकार्यांची मान्यता दिल्यानंतरच ती छापली जायची.1939 पर्यंत जर्मनीत असलेल्या वृत्तपत्रांपैकी जवळपास 70% वर्तमानपत्र ही नाझीच्याच मालकीची होती.हल्लीचे सोशल मीडिया,टीव्ही चॅनल त्यावेळेस उपलब्ध नव्हते.अत्यल्प दरात प्रत्येकाला रेडिओ उपलब्ध होईल याची काळजी त्यांनी घेतली.त्यावेळी अंदाजे 95 लाख रेडिओ जर्मन लोकांना स्वस्त दरात विकण्यात आले होते. रेडिओवर हिटलर व ग्लोबल्स ची भाषणे जर्मन लोक घराघरात,रस्त्यावर,शैक्षणिक संस्थात,बगिच्यात,बार-रेस्टॉरंटमध्ये लाऊडस्पीकर लावून ऐकायचे.नाझी विचार ऐकण्यासाठी हिटलरच्या वाढदिवशी सम्पूर्ण जर्मनीत मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जायचे.1936 ला बर्लिनमध्ये आलम्पिक स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.या आलम्पिकमध्ये हॉकी खेळात जर्मनला भारताकडून फार मोठा पराभव पत्करावा लागला होता.जर्मन फायनलमध्ये भारताविरुद्ध फार मोठया फरकाने म्हणजे 8-1 नी हरली.ही मॅच पाहण्यासाठी स्वतः हिटलर हजर होता.हा पराभव हिटलर पचवू शकला नाही.फायनलमध्ये भारतीय हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांनी ऐनवेळी तीन शानदार गोल करून भारताला विजयी केले होते.मेजर ध्यानचंदच्या खेळावर हिटलर इतका प्रभावित झाला की त्यांनी मेजर ध्यानचंद ला जवळ बोलावून," ध्यानचंद नी जर्मनीचे नागरिकत्व स्विकारावे"बदल्यात त्याला जर्मन फौजमध्ये मोठे पद पण बहाल करण्यात येईल.अशी ऑफर सुद्धा देण्यात आली.परंतु मेजर ध्यानचंद च्या स्वदेशप्रेम समोर ती ऑफर कुचकामी ठरली आणि त्यानी हिटलरला स्पष्ट शब्दात सांगितले की,"माझ्या मनगटात जोपर्यंत ताकत आहे तोपर्यंत मी माझ्या देशाकडूनच खेळत राहीन".त्यावेळी हे देशप्रेम जगाणी पाहिलं होतं.यातच हिटलरची हार झाली होती.
या आलम्पिकमधून हिटलर-ग्लोबल्सनी प्रसार माध्यमातून जर्मन सरकार लष्कर सैन्य कस यशस्वी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला होता.*आर्ट गैलरीच्या माध्यमातून 6500 चित्र काढण्याचा आदेश देण्यात आले.त्यात आर्यन वंशाच्या विर योध्यांची ,सैनिकांची चित्रे काढण्यास प्रोत्साहन दिले जाऊ लागले.जर्मन सैनिक तसेच लष्कर किती शक्तिशाली आहे हे दाखविणाऱ्या कलाकारांना विशेष प्रोत्साहन दिले जाऊ लागले.हिटलरला स्थापत्य कलेत विशेष रस होता.आपण अशा वस्तूंची निर्मिती करायची कि ज्यातून जर्मन साम्राज्याची शक्ती आणि समृद्धी दिसुन येईल.
नाझी पक्ष सत्तेवर येण्यापूर्वी सामान्य जर्मन नागरिक व ज्यूलोकांमध्ये सलोख्याचे सम्बन्ध होते.पण नाझी सरकार सत्तेवर आल्यावर मात्र जर्मन नागरिक ज्यू लोकांकडे संशयाने बघू लागले.जर आपण ज्यूशी सम्बन्ध ठेवले तर आपण अडचणीत येऊ अशी भीती जर्मन आर्यन वंशाचा लोकांमध्ये बळावल्यामुळे त्यांनी आपली नाती ज्यू पासून तोडली.
हिटलरप्रति असलेल्या श्रद्धेमुळे ग्लोबल्स हिटलरचा अत्यन्त विश्वासू बनला.1944 ला दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी त्याला हिटलरने युद्धमंत्री बनविले.जर्मन युद्ध हरणार हे समजल्यावरही ग्लोबल्सनी हिटलरला साथ दिली.रशियाच्या फौजा जर्मनीत घुसल्यावर हिटलरने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.त्यापूर्वी हिटलरने ग्लोबल्सला जर्मनीचा चॉन्सलर म्हणून घोषित केले. आणि हिटलरने आत्महत्या केली.तो दिवस होता 30 एप्रिल 1945.आणि एक दिवसासाठी चॉन्सलर बनलेल्या ग्लोबल्सनी सुद्धा आत्महत्या केली. तो दिवस होता 1मे 1945.
हिटलरसोबत ग्लोबल्सच्या मृत्यूला 75 वर्ष लोटलीत.पण ग्लोबल्सनीती हा शब्दप्रयोग नेहमी ऐकायला मिळतो. एखादा राजकीय नेता खोटा प्रचार करायला निघाला की लोक म्हणतात हा नेता ग्लोबल्स प्रचारतंत्र वापरतोय.कारण सोपं आहे आणि सिद्धही झालेलं आहे,
*-एकच गोष्ट वारंवार सांगितल्याने असत्यदेखील सत्य वाटायला लागतं.आणि हेच ग्लोबल्स नीतीचा सार होय.*
संकलन गजानन गोपेवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा