शनिवार, ८ जानेवारी, २०२२

गुरूगोविंद सिंग शिखाचे 10 वे धर्मगुरू

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*शीखांचे दहावे धर्मगुरु गुरु गोविंद सिंह* 

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

जन्म -) ०९ जानेवारी १६६६

देहवसान -)  १७०८

शिखांचा सिख्ख धर्म हा भक्तीमार्ग शिकवतो. त्यात प्रेम आणि अहिंसा ही प्रमुख तत्त्वे आहेत. गुरुनानकांना बाबरने कारागृहात डांबले. तरीही पहिल्या ९ धर्मगुरूंनी त्यांच्या उपदेशात केवळ भक्ती अन् प्रेम यांचाच संदेश दिला. मुसलमानांचा प्रतिकार करावयास सांगितले नाही. शिखांचे ९ वे धर्मगुरु तेग बहाद्दूर यांनाही मोगलांनी हालहाल करून मारले. श्री गुरु गोविंद सिंह हे शीख धर्माचे दहावे गुरू होते. त्यांचा जन्म १६६६ मध्ये पाटना येथे गुजरीजी व श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या गरीब कुटुंबात झाला. त्यावेळी गुरु तेगबहादुरजी बंगालमध्ये होते. त्यांच्या म्हणण्यानुसार गुरुजी यांचे नाम गोविंद राय असे ठेवण्यात आले होते. नंतर १६९९ मध्ये बैसाखीच्या दिनी गुरु गोविंद राय हे गुरु गोविंद सिंह बनले होते. त्यांचे बालपणाचे पाच वर्ष पाटना येथेच गेले. १६७५ मध्ये कश्मीरच्या ब्राम्हणांच्या विनंतीला मान देऊन श्री गुरु तेगबहादुरजींनी दिल्ली येथील चांदणी चौकात देहत्याग केला होता. श्री गुरु गोविंद सिंहजी ११ नोव्हेंबर १६७५ रोजी गुरु गादीवर विराजमान झाले. धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंहजी यांनी १६९९ मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. ‘खालसा’ म्हणजे शुद्ध, पवित्र. खालसा पंथीय ही प्रार्थना करतात, ‘परमेश्वरा, मी योग्य कारणासाठीच लढीन. मी युद्धावर जातांना मला निर्भय बनव. ‘मी युद्धात जिंकेनच’, असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण कर. माझ्यात तुझ्या कीर्तनाची आवड निर्माण कर आणि मृत्यूसमयी तुझ्या चरणी विलीन करून घे.’ खालसा पंथ हा निरंकारी आहे. निरंकारी म्हणजे ईश्वराला निराकार मानणारा. याचा दुसरा अर्थ आहे ‘निरहंकार.’ ‘श्री’ हे देवीचे नाव आहे आणि भगवती म्हणजे तलवार. त्यांच्या योद्ध्यांना ‘संत-सिपाही’, असे म्हणतात. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्तापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावली. गुरु गोविंद सिंह यांना तीन पत्नी होत्या. माता जीतोजी, माता सुंदरीजी व माता साहिबकौरजी अशी त्यांची नावे होती. बाबा अजित सिंह, बाबा जुझार सिंह ही त्यांची मुले होती. ती चमकौरच्या युद्धात शौर्यमरण प्राप्त झाले होते. तर बाबा जोरावर सिंह व फतेह सिंह या लहान मुलांना सरहंदच्या नवाबने जिवंत भिंतींत पुरले होते. केसगड, फतेहगड, होलगड, आनंदगड व लोहगड हे किल्ले त्यांनी युद्धात जिंकले होते. गुरुजी दररोज गुरूवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना त्याचा सविस्तर अर्थही सांगत असत. तेव्हा त्यांचे लहान भाऊ मनी सिंहजी ते लिहीत असत. सलग पाच महिने लिहून गुरुवाणी पूर्ण झाली होती. गुरु गोविंद सिंहजी यांनी ४२ वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला होता. १७०८ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथील सचखंडमध्ये आपला देह त्यागला होता.

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...