#कर्माचा_सिद्धांत
कोणाची ही हाय लावून घेऊ नये, त्याचे भयंकर परीणाम भोगावे लागतात.
काही लोकांना नाही पटणार हा विषय,
पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणि त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल, ....
अनेकांनी अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ...
जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक,.....
अपमानास्पद वागणूक,...
कोणांचे मन दुखावले असू शकते....,कोणावर अन्याय केला गेलेला असतो, .....
कोणाची सामाजिक बदनामी केलेली असते,.....
छळ केलेला असेल, शारीरिक दुखापत केलेली असेल, .......
किंवा प्रेमात गैरफायदा घेतला गेलेला असेल, ......
त्रासाचे कुठलेही कारण असो...
वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खूप दु:खी होतो ,त्याचे मनोबल कमकुवत होत असते, पर्यायाने तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकतो,
जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल कां?
पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही,किंवा देव देखील शाप देत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमधे शोषली जाते,मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळटळाट असं म्हटलं जातं.,
मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचेही कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही, सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, अशा काहीही घटना घडू शकतात,....
आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे जगात फक्त दोनच व्यक्तिंना माहित असते,एक म्हणजे
"आंतरात्मा"
दुसरा
"परमात्मा"
समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परत फेड याच जन्मात करावी लागते.
तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा अगर नका ठेऊ तुम्ही अस्तिक असा किंवा नास्तिक,
चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो,
मी एका पुस्तकात वाचले होते,
राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले,
तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावं?
माझ्या सबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही,
की ज्याच्या परिणाम स्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दु:ख सोसणे माझ्या नशिबी यावे?
तेंव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व जन्म पाहाण्याची दिव्य दृष्टि दिली,
धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टिद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापुर्वी तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लाहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली, धृतराष्ट्र राजाची त्या वेळची ती क्रिया होती. त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले.
कर्म हे फल देऊनच शांत होते,
प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच,
हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे.
चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते, वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ पुढे मागे होऊ शकतो,
हाच कर्माचा सिद्धांत आहे,
आता आपण ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे,
"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥
क्षणिक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट".
संकलन) :-गजानन गोपेवाड
🙏धन्यवाद 🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा