मंगळवार, १५ जून, २०२१

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

ज्येष्ठा मास,शुक्ल पक्ष, *षष्ठी*,मघा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, १६ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


         प्रगाढ़ सम्बंधों के लिए सुन्दर उपाय ...


१. यदि हम नहीं जानते हैं तो हमे पूछना चाहिये।

२. यदि हम किसी बात से सहमत नहीं है तो चर्चा करनी चाहिए।

३. यदि हमें कुछ प्रिय नहीं है तो बताइये।


किन्तु चुप रहकर किसी निर्णय अथवा निष्कर्ष पर नही पहुँचना चाहिए।

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*


  • ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आदर्श बोधकथा

 नक्की वाचा 👌🏻👌🏻१०१% आवडेल.


      एक खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले, 🏘 महागड्या गाड्या 🚘🏎🏍 त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे💳💰. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.🛌 सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.👹 तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे🕛. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५०💰 करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.👪 त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि म्हणाला मला काहीच संकेड द्या मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे. यावर यमराज म्हणाले हा लवकर लिहा जे लिहायचं आहे ते, त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेलं ते पत्र.


            *प्रिय मित्रहो..*

  *आज माझ्याकडे खुप पैसा आहे. मला कश्याचीच कमी नाही आहे. पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत. मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कामविण्यात घालवला. आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा मला देऊ नाही शकला. म्हणुन सांगतोय तुम्ही एन्जॉय करा. कुणी वेडा म्हटलं तरी चालेल पण आयुष्य बालपणासारख एन्जॉय करून जगा. शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली. जगा मनसोक्त जगा.*

          *मित्रानो माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत.*

 ➖➖➖➖➖➖➖

 *घरातून बाहेर पडताना आपल्या* *देवघरातील देवाला* *नमस्कार* *करूनच बाहेर पडा आणि घरी* *परत आल्यावरही देवाचं दर्शन* *घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी* *यायची वाट पहात असतो.* *आपल्या घरी असा नियम बनवा* *की जेव्हा कधी तुम्ही घरातून* *बाहेर पडता, तेव्हा देवासमोर* *क्षणभर थांबून 'हे परमेश्वरा* *तुम्हीही माझ्यासोबत चला' अस* *म्हणां कारण* *- तुमच्या* *हातामध्ये* *भलेही* *लाखांच* *घड्याळ* *असेल परंतू त्यावर दाखवणारी* *वेऴ* *ही फक्त त्या*  *भगवंताच्याच हातात आहे...*


आवडलं तर शेअर करायला विसरु नका




🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

बेंजामिन फ्रेकलीन आकाशातील वीज संशोधन

 *💥⚡💥१५ जून १७५२💥⚡💥*

⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡

*वैज्ञानिक बेंजामिन फ्रँकलिनने आकाशातील वीज ही वीज असल्याचे सिद्ध केले*

⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡

बेंजामिन फ्रैंकलिन हे संशोधक, वैज्ञानिक, राजकीय विचारक, राजकारणी, लेखक, व्यंगकार होते. बेंजामिन फ्रैंकलिन यांनी संयुक्त राष्ट्रांचे प्रारुप आणि संविधान बनविण्यासाठी सहाय्य केले. तसेच  वैज्ञानिक कार्यामध्ये  इलेक्ट्रिसिटी, गणित आणि नकाशे बनवणे सामील आहेत. बेंजामिन फ्रैंकलिन सारखे लेखक आपल्या बुद्धी आणि ज्ञानामुळे आळखले जातात. त्यांनी रिचड्स यांचे अल्मनैक प्रसिद्ध केले. त्यांनी बायोफोकल ग्लास चा शोध लावला आणि पहिली यशस्वी अमेरिकन लेंडींग लायब्ररी ची स्थापना केली.


अमेरिकन इतिहासातील एक मोठे मिथक म्हणून आजही ज्याची नोंद आहे, ते म्हणजे बेंजामिन फ्रॅंकलिन आणि त्यांचा  पतंग. शाळेच्या पुस्तकातून आपण वाचत आलो, की बेन्जामिन महाशय एकदा बाहेर पडले असतांना, अचानक आलेल्या भर वादळात त्यांनी आपला पतंग उडवला आणि त्या पतंगावर वीज कोसळली. अशा प्रकारे बेंजामिन यांनी अपघाताने का होईना, विजेचा शोध लावला.


जर ती वीज खरोखरच त्या पतंगावर पडली असती, तर आमचे बेंजामिन महाशय त्यानंतर झालेल्या अमेरिकेच्या ऐतिहासिक स्वातंत्र्य जाहीरनाम्यावर सही करण्यास उपस्थित राहू शकले नसते. एवढेच नव्हे १७३२ ते १७५८ या काळात दर वर्षी प्रसिद्ध होणारे Poor Richard’s Almanac हे बेंजामिन यांनी टोपण नावाने लिहिलेले पंचांगही निघाले नसते. स्पष्ट म्हणायचे झाले तर त्या वादळी हवामानात पतंग उडवण्यातून त्यांचा वेडेपणा दिसून आला असता.


गंमत म्हणजे अशा प्रकारचा विजेचा प्रयोग करू पाहाणारा बेंजामिन हे काही पहिलेच शोधक नव्हते. आणि या संबंधातील सत्य काय ते काळजीपूर्वक तपासले असता असे आढळून आले की बेंजामिन यांच्या कोणत्याही खासगी डायरीत आपल्या या पतंग उडवण्याच्या प्रयोगाची नोंद नाही. 


एक मात्र खरे की फ्रॅंकलिन यांनी एक ऑक्टोबर १७५२ रोजी लिहिलेल्या एका पत्रात पतंग कसा तयार करावा आणि वादळाच्या वेळी कसा उडवावा, याचा  बारीकसारीक तपशील दिलेला आहे. एक उत्तम शास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी असा कोणताही प्रयोग केल्याचे लिहून ठेवलेले नाही. आणि तसे त्यांनी केलेही नसते. त्यांनी जे काही तोंडी वर्णन केले, ते जोसेफ प्रिस्टले या तत्कालीन नावाजलेल्या संशोधकाने लिहून घेतले होते. ही नोंद इतिहासकारांना पुरेशी आहे.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

ज्येष्ठा मास,शुक्ल पक्ष, *पँचमी*,अश्लेशा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, १५ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"सच्ची साधना का अर्थ किसी को पकड़ना नहीं है, वरन् सारी पकड़ को एक साथ छोड़ना है। सारी अतियों से, सभी द्वंद्वों से ऊपर उठना-उबरना है। इस सच्ची साधना से जो अपनी चेतना की लौ को द्वंद्वों की आँधियों से मुक्त कर लेते हैं, वे उस कुंजी को पा लेते हैं, जिससे सत्य का द्वार खुलता है और तभी वह साधुता प्रकट होती है, जिसकी अलौकिक सुगंध से अनेकों दूसरी सुप्त और मुरझाई आत्माएँ भी जाग्रत् होकर मुस्कराने लगती हैं।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


सोमवार, १४ जून, २०२१

अरे अरे देवा कविता गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र


विषय : - बालदिनानिमित्त चित्र काव्यलेखण .

दि . १५ / ६ / २०२१ .


शिर्षक : - *अरे अरे दैवा ...* 


अरे अरे दैवा आमच्या

हातुन काय पाप घडले ?

नशिबी बालपणीच कष्ट

करण्याला भाग पडले .


श्रीमंताच्या या मुलांना

भारी गणवेश बुट असे

 उन्हाला कहार झालायं

अनवाणी पाय भाजतसे


शिक्षणाची ओढ फार

शिकावं वाटतं आम्हा

कुटूंबाच्या भाकरीचा

पडतोच प्रश्न हा पुन्हा


प्लास्टिक अणं भंगार

जमवण्याला भटकंती

चार पैसे मिळवता मग

वाटतेच मनाला शांती


हे विश्वंभरा कृपा करावी

प्रार्थना करतोत मनोमनी

दुःख असे कोणाच्याही

वाटयाला न येवो जिवनी .

कवि :)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

आर्यभट यांची आज जयंती निमित्त लेख

 #पृथ्वीस्वत:भोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा पहिला शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांची आज जयंती 

ते भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते . ११ ऑगस्ट इ.स. ५१९ चे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिल्याबद्दल आर्यभट्टाना  काही काळ बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. लोकांच्या अज्ञानामुळे आर्यभट्टास उपेक्षा भोगावी लागली.

आर्यभटानि  ० अंशापासून ते ९० अंशापर्यंत ३/१११ अंशाच्या फरकाने सर्व कोन घेऊन त्यांचे ज्यार्ध कसे काढावेत हे सांगितलेले आहे. तसेच पृथ्वी स्वत:भोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा पहिला शास्त्रज्ञ होय. वर्षाचे दिवस ३६५, घटी १५, पळे ३९, विपळे १५ इतक्या सूक्ष्म भागांपर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे. तसेच 'पाय' नावाची गणित संकल्पनेची किंमत ६३,८३२/२०,००० आहे असेही नोंदवले आहे सूर्य सिद्धान्तावर याने लिहिलेला एक टीका ग्रंथ 'सूर्य सिद्धान्त-प्रकाश ' या नावाने प्रसिद्ध आहे.

आर्यभट्ट यांना ग्रहणाची शास्त्रीय कारणमीमांसा ज्ञात होती. अमावस्येला सूर्यग्रहण व पौर्णिमेस चंद्रग्रहण यांचा संबंध चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी आहे, हे त्यांना माहीत होते. तसे त्यांनी नोंदवून ठेवले आहे. पहिला आर्यभट्ट याने सूत्रांचा उपयोग खगोलशास्त्र विषयक ग्रंथांत मोठ्या प्रमाणावर केला. अशा ग्रंथांत आकडेमोड द्यावी लागते परंतु मजकूर तर मुख्यत्वे काव्यमय व यमकात असतो. मग संख्या पद्यात बसवण्यासाठी त्या अक्षराने निर्दिष्ट करायच्या व ती अक्षरे वृत्तात बसवून श्लोकात लिहावयाची असा मार्ग आर्यभट्टाने अवलंबला. त्यामुळे अक्षरसंख्या कमी होते, शिवाय वृत्तबद्ध लिखाण होते. त्यावेळी लेखनाची साधने उपलब्ध नसल्याने त्या संख्या अशा प्रकारे लक्षात ठेवणेही सोपे जात असे. जसे --वर्गाक्षराणि वर्गेऽ वर्गेऽ वर्गाक्षराणि कात्‌ ङ मौ यः । खद्विनवके स्वरा नववर्गेऽ वर्गे नवान्त्यवर्गे वा ॥ (विकिपीडिया मधून )

आर्यभट्ट यंचे कालखंडा बाबत तसेच जन्मठिकाणा बद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही 

खाली आयुका मधील पुतळ्याचा फोटो "

संकलन :)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

**************************************


दुःखाचे खरे कारण??

 


*🌹👉दुःखाचे खरे कारणं -  अपेक्षा* 


समजा आपण  एखाद्या दिवशी दोनशे रुपयांचा माठ  आणि अडीचशे रुपयांचा पुष्पगुच्छ घेऊन आलो आणि  घरी आल्या आल्या माठ हातातून पडून फुटला  तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण माठ इतक्या लवकर फुटेल अशी अपेक्षाच आपण केलेली नसते.

त्याउलट 250 रुपयांचा पुष्पगुच्छ संध्याकाळपर्यंत सुकला तरी आपल्याला वाईट वाटत नाही त्याचे कारण फुले सुकणारच हे आपल्याला माहीत असते .

माठ इतक्या लवकर फुटेल असे वाटले नव्हते आणि फुटला त्यामुळे आपल्याला दुःख झाले.

परंतु फूलांकडून ती टवटवीत राहण्याची अपेक्षाच नव्हती त्यामुळे ती सुकली तरी त्याचे दुःख झाले नाही.


 👉मतितार्थ असा आहे  की,

ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त त्याच्याकडून तितके दुःख वाट्याला येते आणि ज्याच्या कडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख नाही यामुळे कोणाकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका आनंदी राहा मस्त रहा.

*🌹!! भवतु सब्ब मंगलम !!🌹*

👏👏🙏🙏💐💐🌹🌹

आपला दिवस ...

सुखमय , उल्हासवर्धक व आनंदी जाओ ...


*शुभेछूक :*

  गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 


आठवणीचा पाऊस कवी गजानन गोपेवाड

 🌹अवकाळी पाऊस 🌹


आज अचानक त्याच आगमन

मोठया झपाट्यानं झालं होत

गारीच,वादळाचआणि विजेचा चमकिन 

ढगाच ढोल वाजत आलं होत


असं कधी तो नेहमी याच

आज मात्र जरा वेगळं रूप पाहिलं

रागात असावा जणू काही

सार काही हानी हानी करून गेलं


आठवणीच ठरल तो पाऊस

सर्वांच्या मनी भीती दाटविणारा

काळ कसा येतो जणू

सार जीव घेऊ पाहणारा


त्याला आवर घालणार

कुणी तरी आहे का

त्याला शांत करण्याची

बळ कुणात नाहीका


हात जोडूनि मी विनवणी केली

तरी राग त्याच्या प्रत्येकावर होता

मानवाणीच केल सार काही

असा ओरडून सांगत होता


माझ्या जीवाला भावला

तो वेडा पिसा पाऊस जणू

त्याच्या रागभरात भावना

आणि काय मी जाणू

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 



व्यथा शेतकरी गजानन गोपेवाड

 *सप्तरंग काव्यस्पर्धा*

*वऱ्हाडी कविता -*

*शिर्षक - व्यथा शेतकऱ्याची*

काय सांगु तुले बा

व्यथा शेतकऱ्याची

अन कास्तकाराची

गाथा गरीबीची... !!

सरकी खत अन

 बी मायगाच

 मायगाच्या जमान्यात

 ससत कवा वायाच... !!

 मनामदी माह्या बाप

 एकच गिरवतो कित्ता

  मिरगाच्या पावसाची

  लागली चिंता... !!

 बंदयाच आवडात

सरकी का सोयाबिन

तूरच पेराव मनतो

साऱ्या वावरातीन... !!

अमदाच्या सालात

गराडान घातल थैमान

 मिरगाचा पावस

मावरच लई बैमान... !!

 म्या फाडतो आता

सारे पेरणी डोबणीले

येसीन त ये बा नायत

 येजो सरणाले.... !!

 जेथ पाव तेथ पैसा

 अदल्याचा बजार

  चोपणले वाई कराले

पुडल्या सालात दाहजार... !!

 अन्नाचा घास नाय

 भेटत जीवाले

अमदाच साल सारे

 पाये आभायाले.... !!

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 


कविता आठवणीचा पाऊस

 🌦️*आठवणीतला पाऊस*🌦️

🐛🍃☔☂️🌲🌱🐛

_________________________


  घोंगवणाऱ्या माट्यासह

सुसाटयाचा वारा

उंच उंच उडे गगनी

पाला आणि पाचोळा


वेग वाऱ्याचा

पडझड पानांची

घराकडे धाव

राबणाऱ्या पावलांची


अचानक गडगडाट

कडकडाट विजांचा

रिमझिम रिमझिम

पाऊस पडू लागे थेंबाचा


पावसाच्या थेंबानी

धरणी झाली चिंब

मातीच्या सुगंधाने

उन्मादला सांड


सुखावली वसुंधरा

बहरले सारे रान

वनराईत मयुर नाचे

पिसारा फुलवून छान


डराव डराव करी

बेडूक बिळात

बळीराजाची तिफन

चाले शेतात


आवासून चातकाने

पाहिलेली वाट

पहिला थेंब गिळून

सुरू झाली बरसात


चहूकडे बहरले रान

झाले पशु,पक्षी तृप्त

उन्हाची ल्हाई संपली

पडता पहिला नक्षत्र


सुगी झाली सुरू

जनमनाची लगाबगाई

पहिला पाऊस पडला

गड्या चाला घाई घाई


समज आली तेव्हाचा

हा आठवणीतला पाऊस

आली सर बिलगून

झाली भिजण्याची हाऊस

*🐸🪳🌱🪴🎋🌴🌳


कवि, गजानन गोपेवाड 



रविवार, १३ जून, २०२१

क्षय म्हणजे काय तो बरा होतो का


═════════════

   @ संकलन:गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

═════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📙 *क्षयरोग (टीबी) म्हणजे काय ?*

       *तो बरा होतो का ?* 📙 

       

क्षयरोग वा टीबी म्हटलं म्हणजे अजूनही काही जणांना भीती वाटत असेल. सुदैवाने आज क्षयरोग हा तेवढा भयंकर रोग राहिलेला नाही. १९४० पर्यंत क्षयरोगावर पुरेशी औषधे उपलब्ध नसल्याने हा रोग असाध्य असाच होता. माधवराव पेशवे हे क्षयरोगाने वारले. पंडित नेहरूंची पत्नी देखील क्षयरोगाने वारली. यावरून त्या काळातील क्षयरोगाची भयानकता लक्षात येईल. आज मात्र तो खात्रीने बरा होतो.


मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जंतूमुळे हा रोग होतो. हा रोग सामान्यतः फुप्फुसांना होतो. शरीरातील लिम्फग्रंथी मेंदू, मणके, हाडे, त्वचा, आतडे, यकृत अशा इतर अवयवांनाही क्षयरोग होऊ शकतो. फुप्फुसाचा क्षयरोग खूप महत्त्वाचा, यासाठी की तो एकापासून दुसऱ्याला होऊ शकतो. भारतात दर हजार लोकसंख्येमागे क्षयाचे चार ते पाच रोगी सांसर्गिक अर्थात रोग प्रसार करणारे असतात. क्षयरोगाच्या बेडक्यात क्षयाचे जंतू असतात. थुंकताना, खोकताना, बोलताना ते हवेत सोडले जातात. निरोगी व्यक्तीच्या श्वासाबरोबर हे जंतू फुप्फुसात प्रवेश करून त्या व्यक्तीला क्षयरोग होतो. शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवरच हा रोग होणे वा न होणे अवलंबून असते. क्षयाच्या रुग्णात खोकला व बेडका कधी कधी बेडक्यात रक्त पडणे, ताप येणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, दम लागणे, रात्री घाम येणे ही लक्षणे दिसून येतात. बेडक्याच्या तपासणीद्वारे या रोगाचे खात्रीने निदान होऊ शकते. काही वेळा क्ष-किरण तपासणी व रक्ताची तपासणी करतात. 


क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर तात्काळ उपचार सुरू केल्यास क्षयरोग सहा महिन्यांत बरा होतो. कधी कधी नऊ ते बारा महिने उपचार घ्यावे लागतात. क्षयरोगाची आपल्या देशातील कारणे पाहिल्यास त्याचे मूळ आपल्याला दारिद्र्य व पर्यावरण अस्वच्छतेत सापडेल. त्यामुळे जोपर्यंत देशाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही तोपर्यंत क्षयरोगावर कायम स्वरूपी तोडगा निघणे अशक्यच आहे. 

क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी लहान मुलांना बीसीजीची (क्षयरोग प्रतिबंध लस) लस देणे, पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला, बेडका, ताप असलेल्या रुग्णांच्या बेडक्याची तपासणी करून तात्काळ उपचार सुरू करणे; रुग्णांने खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे, इतस्तः बेडके न टाकणे; हे उपाय करणे आवश्यक ठरते.


 एड्स झालेल्या ७०% व्यक्तींना क्षयरोगाची लक्षणे दिसतात. त्यामुळे एड्सच्या वाढत्या प्रसाराबरोबर क्षयरोगही वाढत जाण्याची शक्यता आहे. क्षयरोग प्रतिबंध व एड्स प्रतिबंधाचे उपाय यासाठीच एकत्रितपणे राबवले के गेले पाहिजे. दरवर्षी देशात साडेसहा लाख लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी व्यक्ती, समाज व देश अशी सर्वच पातळ्यांवर भरीव प्रयत्न होणे गरजेचे आहे.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═════════════



विनायक पांडुरंग करमरकर स्मृतिदिन

 *विनायक पांडुरंग करमरकर,*

   ऊर्फ नानासाहेब करमरकर,

🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎

 *जन्म -) २ ऑक्टोबर  १८९१;* 

सासवणे,रायगड जिल्हा-महाराष्ट्र

 *मृत्यु -) १३ जून  १९६७*

🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎      

       हे मराठी शिल्पकार होते. मुंबईच्या सर जे.जे.कला विद्यालयात ते शिल्पकला शिकले.शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६२ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.


*कार्य*

भारतातील वास्तववादी शिल्पकारांमधील अग्रगण्य शिल्पकार म्हणून महाराष्ट्रातील नानासाहेब ऊर्फ विनायक पांडुरंग करमरकर ख्यातनाम आहेत. अश्र्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझमधील साडेतेरा फूट उंचीचा एकसंध पुतळा त्यांनी घडवला. अशा प्रकारचा पुतळा घडवणारे ते भारतातील पहिले शिल्पकार ठरले. सजीवता आणि सादृश्यता ही त्यांच्या शिल्पांतील वैशिष्ट्ये मानली जातात.


*जीवन*

करमरकरांचा जन्म इ.स. १८९१ साली महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सासवणे इथे झाला. समुद्रकिनारी वसलेल्या या गावातच त्यांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा उद्योग होता. त्यामुळे चित्र काढण्याचा नाद असलेल्या करमरकरांना मूर्ती घडवण्याचेही शिक्षण घरीच मिळाले. गावातील देवळाच्या भिंतीवर त्यांनी काढलेले शिवाजी महाराजांचे चित्र पाहून ऑटो रॉथफिल्ड या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याने पुढाकार घेऊन त्यांना मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल केले.


*व्यावसायिक कारकीर्द*

मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी कलकत्ता इथे स्टुडिओ थाटून व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्या काळात त्यांनी रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजनदास, महात्मा गांधी, पी.सी. रे प्रभृतींची व्यक्तिशिल्पे घडवली. त्यानंतर 'लंडन रॉयल अ‍ॅकेडमी'मध्ये पुढील शिक्षणासाठी गेल्यावर त्यांना इटली, फ्रान्स, स्वित्झरलंड या देशांमधील कलाकृतींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच ब्राँझ कटिंग, 'स्टोन क्रशिंग' ही तंत्रेही आत्मसात करून १९२३ साली ते कलकत्यास परतले.


*व्यावसायिक यश*

इ.स. १९२४ साली कलकत्यातील ईडन गार्डनमध्ये 'सोसायटी ऑफ आर्टिस्ट्‍स'च्या वतीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात करमरकरांची 'शंखध्वनी' ही कलाकृती प्रदर्शित झाली आणि त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे त्यांनी मुंबईत देवनारला स्टुडिओ उभारला. याच काळात पुण्यातील 'श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल' मधील शिवाजीचा अश्र्वारूढ एकसंध 'पुतळा' ब्रॉन्झमध्ये बनवायची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आणि त्यासाठी १९२५ साली ते मुंबईत आले. त्यानंतर मुंबईतच त्यांचे वास्तव्य कायम राहिले. 'एका पुतळयाची आत्मकथा' या आपल्या लेखात या अवाढव्य पुतळयाच्या निर्मितीची पूर्ण कहाणी करमरकरांनी वर्णन केली आहे. या आठ टन वजनाच्या आणि साडेतेरा फूट उंच पुतळयाच्या ओतकामाचे कार्य मुंबईतील माझगाव डॉकमध्ये झाले. आपले सगळे तांत्रिक कौशल्य, अध्ययनशीलता, आत्मविश्र्वास पणास लावून आणि सहकाऱ्यांसमवेत अथक परिश्रम करून त्यांनी ही शिल्पाकृती साकार केली, आणि इतका प्रचंड एकसंध पुतळा ब्रॉन्झमध्ये घडवणारे भारतातील समकालीन शिल्पकारांमधील ते पहिलेच शिल्पकार ठरले. हा पुतळा रेल्वे वॅगनमधून पुण्यात नेला गेला व १९२८ साली त्याची स्थापना झाली. पुतळा पुण्याला आणताना कमी उंचीचा बोगदा आला की आगगाडी थांबवून पुतळा थोडा तिरपा करत आणि गाडीने बोगदा पार केला की परत सरळ करीत. या स्मारकशिल्पामुळे करमरकरांची अग्रगण्य शिल्पकारांमध्ये गणना होऊ लागली.


या संस्मरणीय कामगिरीनंतर करमरकरांनी अनेक उत्तमोत्तम कलाकृती घडवल्या. विठ्ठलभाई पटेल, आचार्य कृपलानी, ऑटो रॉथफिल्ड यांच्या पुतळ्यांसह त्यांची 'मत्स्यगंधा', 'मोरू' ,'प्रवासी', नमस्ते' आदी शिल्पेही लक्षणीय ठरली. याव्यतिरिक्त करमरकरांनी भारतातील अनेक संस्थानिक व त्यांच्या घराण्यातील व्यक्तींचीही शिल्पे घडवली.


'नानासाहेब' या आदरार्थी संबोधनाने परिचित असलेल्या करमरकरांचे कौशल्य लक्षात घेऊन १९४९ साली त्यांना अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विश्र्वविद्यालयात प्रात्यक्षिकाकरिता निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या शिल्पकलेतील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने १९६२ साली त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले. तसेच १९६४ साली ललित कला अकादमीने त्यांना फेलोशिप देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.


१९३० च्या दशकात रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीजवळील वाघ्या कुत्र्याच्या पुतळाही करमरकरांनी बनवला होता.


या थोर शिल्पकाराचे १९६६ साली म्हणजे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.


*करमरकर शिल्पालय*

अलिबाग ते मांडवा रस्त्यावर आवास फाट्यापासून तीन किमी अंतरावर नानासाहेब करमरकर शिल्पालय आहे. हे सासवणे गावात आहे. येथे सुमारे दोनशे कलाकृती आहेत.


*करमरकरांचे चरित्र*

सुहास बहुळकर यांनी ‘शिल्पकार करमरकर‘ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

========================

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

संकलन :-गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

ज्येष्ठा मास,शुक्ल पक्ष, *तृतीया*,पुनर्वसु नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, १३ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"सत्य वह पूंजी है, जिसे पहले व्यय करना पड़ता है किन्तु जीवन भर आनंद की प्राप्ति होती है। जबकि असत्य  ऋण है, जिससे क्षणिक सुख प्राप्त तो हो जाता है किंतु आजीवन ब्याज सहित ऋण चुकाना पड़ता है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*श्री महाराणा प्रताप जयंती*


शनिवार, १२ जून, २०२१

पिठात किडे का पडत नाही

 *ब्रँडेड पिठ* 

पिठात किडे का होत नाहीत हे प्रश्न आपल्याला कधी न कधी पडला असेल परंतु पण या कडे जास्त लक्ष दिले नसेल.

                              आपण एक प्रयोग करा की गव्हाचे पीठ दळून आपण ते 2 महिन्यांपर्यंत संचयित करण्याचा प्रयत्न करा,

 पिठात किडे होणे नैसर्गिक आहे, आपण पीठ ठेवू शकणार नाही.

 मग हे मोठे ब्रँड पीठ ठेवण्यास सक्षम कसे आहेत?  ही विचार करण्यासारखी बाब आहे.

 एक रसायन आहे:

 बेंझोयल्पर ऑक्साईड, ज्याला 'फ्लोअर इंप्रूव्हर' म्हणून देखील ओळखले जाते.  त्याची परवानगी मर्यादा 4 मिलीग्राम आहे,

 परंतु पीठ तयार करणार्‍या कंपन्या 400 मिलीग्रामपर्यंत ढकलतात.(जसे मॅगी मध्ये प्रमाणापेक्षा जास्त सिसे नावाचे तत्व सापडले होते.)

 कारण काय आहे?  पीठ खराब होण्यापासून दीर्घकालीन संरक्षण.

 नक्कीच, ग्राहकाची मूत्रपिंड बँड वाजली पाहिजे.

 अशी व्यवस्था केली गेली आहे की रस्त्याच्या कोपऱ्यापासून शहरापर्यंत आपल्याला रक्त तपासणी प्रयोगशाळा मिळेल परंतु पीठ आणि दुधाची तपासणी करण्यासाठी तुम्हाला एकसुद्धा मिळणार नाही.

 प्रयत्न करा आणि थेट शेतकऱ्यांकडून गहू,दूध व इतर शेतमाल खरेदी करा आणि मात्र पीठ स्वतः घरी दळूनच खा.

 *ताजी खा आणि निरोगी रहा* 

 *आपलं कुटुंब सुरक्षित ठेवा* 

शास्त्रानुसार पीठ(आटा)वेळ

 थंड दिवसात 30-83 दिवस

 उन्हाळ्यात 20-22 दिवस

 पावसाळ्यात 15-25 दिवस नमूद केले गेले आहेत.


जैविक शेतकरी

श्रीधर आजगांवकर वैधकशास्त्र स्मृतिदिन

 *🕳️👳🏻‍♂️👳🏻‍♂️श्रीधर आजगावकर👳🏻‍♂️👳🏻‍♂️🕳️*

👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️

*👳🏻‍♂️👳🏻‍♂️👳🏻‍♂️वैद्यकशास्त्रज्ञ👳🏻‍♂️👳🏻‍♂️👳🏻‍♂️*

👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️

*स्मृतिदिन - १२ जुन १९९४*


डॉ. श्रीधर शांताराम आजगावकर यांचा जन्म, तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवणमध्ये झाले. इंटर सायन्सपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत व वैद्यकीय शिक्षण पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झाले. त्यांनी उच्च वैद्यकीय शिक्षण डब्लिन व विएन्ना येथे घेतले. त्यांनी ‘डोळ्यांचे विकार’ या विषयात प्रावीण्य मिळविले. त्यानंतर मालवणला येऊन त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. पण ढोबळ व्यवसायापेक्षा वाचन व संशोधन यांत त्यांना विशेष रस वाटे. मालवणला १५ वर्षे व्यवसाय करत असताना, त्या काळात त्यांचे काका व वडील मधुमेहाने वारले. त्या वेळी भारतात मधुमेहाविषयी खास माहिती नव्हती. रुग्णही फार कमी होते. त्यामुळे आजच्यासारखे खास मधुमेहतज्ज्ञही नव्हते. आपले काका व वडील मधुमेहाने वारल्यामुळे डॉ.आजगावकरांना मधुमेहाविषयी कुतूहल वाटले व नंतर जिद्दीने त्या रोगावर  काम करण्यासाठी ते मुंबईत आले.


मुंबईत आल्यावर ते ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयामधील वैद्यकशास्त्राचे तज्ज्ञ डॉ.रा.वि. साठे यांना भेटले. डॉ.साठेंमध्ये त्यांना गुरू भेटला. डॉ.साठेंनी त्यांना सांगितले, ‘‘पश्चिम महाराष्ट्रात मला आता मधुमेही दिसू लागले आहेत. पण त्यांच्यावर उपचार करायला कोणी डॉक्टर नाहीत. तुम्ही नेत्रविशारद म्हणून काम न करता, मधुमेहावर लक्ष केंद्रित करा. चाचण्या, उपचार शोधून काढा.’’ १९४५ साली आजगावकरांनी नेत्रविकारतज्ज्ञ म्हणून करत असलेला व्यवसाय थांबवला आणि मधुमेहावर काम सुरू केले. त्या काळी अशी ध्येयाने प्रेरित झालेली खूप माणसे असायची. डोळ्याचे मर्यादित क्षेत्र सोडून मधुमेहासारखे विशाल क्षेत्र संशोधनाला मिळाले म्हणून डॉ.आजगावकर खूप समाधानी होते. संशोधन चालू असताना त्यांच्या लक्षात आले, की दृक्पटलावर (रेटायना) काही बदल दिसून आले होते, ते रुग्णाला झालेल्या मधुमेहामुळे असावेत. जसे वाचन व संशोधन वाढले, तसे त्यांच्या लक्षात आले की मधुमेह हा सर्व शरीरव्यापी रोग आहे. त्याचा शरीरावर होणारा प्रसार वेळीच नियंत्रित केला पाहिजे. त्यासाठी ते आयुर्वेदाकडे वळले. आयुर्वेदाने मधुमेहाबद्दल काय विचार केला आहे, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. आयुर्वेदातील जसद भस्माच्या उपचारपद्धतीचा डॉक्टरांनी अ‍ॅलोपथीच्या पद्धतीने अभ्यास सुरू केला. हे सर्व प्रयोग त्यांनी डॉ.साठेंच्या मार्गदर्शनाखाली जे.जे. रुग्णालयात केले. १९४५ ते १९६० या कालावधीत डॉ.आजगावकर सातत्याने मधुमेहावर काम करत होते. १९४८ साली प्रायोगिक पद्धतीवर त्यांनी स्वत:चे केंद्र सुरू केले. १९६० साली जे.जे. रुग्णालयात मधुमेह उपचाराचे केंद्र सुरू झाले. डॉ.आजगावकरांनी डॉ.साठेंचे स्वप्न पुरे केले. या केंद्रामुळे मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर्स तयार झाले. डॉ.आजगावकरांच्या संशोधनास १९६० साली ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने मान्यता दिली.


आजगावकरांचे कार्य ‘रोग्यांवर फक्त उपचार करणे’ एवढ्यापुरते मर्यादित नव्हते. त्या काळी सामान्य लोकांना मधुमेहाविषयी काहीच माहिती नव्हती. लोकांना मधुमेहाची सबंध माहिती देऊन सज्ञान करणे आवश्यक होते. ते काम त्यांनी हातात घेतले. मधुमेहाची लक्षणे कोणती, त्याचे निदान पक्के करण्यासाठी काय चाचण्या करायच्या, औषधे कोणती व कधी घ्यायची, आहारावरील पथ्ये काय असावीत, व्यायाम कसा, केव्हा व किती करायचा, ही सर्व माहिती त्यांनी भाषणरुपात देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मुंबई आणि नंतर सबंध भारतात फिरुन ते भाषणे देत असत. त्यासाठी त्यांनी स्लाइड्स केल्या होत्या व स्वत:चा स्लाइड प्रोजेक्टर बरोबर घेऊन जात असत. भाषणे मराठी व इंग्रजीतून असत. विशेषत: वैद्यकीय महाविद्यालये, इंडियन मेडिकल कौन्सिल व सामाजिक संस्था यांमध्ये जाऊन त्या काळी नवीन असणाऱ्या या रोगाविषयी माहिती देणे त्यांना फार आवडे. जणू या प्रेषणकार्याचे त्यांनी व्रतच घेतले होते. या कार्यात मानधनाची अपेक्षा न करता, त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते.


त्यांनी तज्ज्ञांसाठी चर्चासत्रे आयोजित केली. या कार्याची व्याप्ती वाढल्यावर त्यांनी ‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीझ’ची स्थापना केली. या संस्थेत त्यांनी कार्यवाह, उपाध्यक्ष, अध्यक्ष अशा निरनिराळ्या पदांवर काम केले. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांत या संस्थेच्या ३२ शाखा काढल्या.


आजगावकरांनी मधुमेहावर मराठी व इंग्रजीत पुस्तके लिहिली. या पुस्तकांना पाठ्यपुस्तकांचे महत्त्व प्राप्त झाले. डॉक्टरांनी पुढाकार घेऊन मुंबईतील माहीम येथे खास मधुमेहींसाठी २०० खाटांचे अद्ययावत रहेजा रुग्णालय काढले.


‘आंतरराष्ट्रीय मधुमेह संस्थे’च्या कार्यकारिणीचे ते १९६४ सालापासून सभासद होते. त्यानंतरच्या २६ वर्षांमधील सर्व वार्षिक परिषदांना त्यांची उपस्थिती होती. त्यांच्या प्रयत्नाने १९७६ साली दिल्लीत आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद भरली होती. त्या परिषदेत आंतरराष्ट्रीय संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली व पुढे १९७९ साली अध्यक्ष म्हणूनही निवड झाली.


मराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेपासून (१९६६) ते परिषदेशी निगडित होते. कार्यकारिणी सभासदापासून विश्वस्त व सन्माननीय सदस्य अशी वेगवेगळी पदे त्यांनी भूषविली.


१९५२ साली आजगावकरांच्या पत्नीचा मृत्यू झाला.त्यानंतर त्यांनी मधुमेहाच्या संस्था, *‘मराठी विज्ञान परिषद’, ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’* इत्यादी संस्थांसाठी आयुष्य वेचले. - डॉ. शशिकांत प्रधान

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन-)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

ज्येष्ठा मास,शुक्ल पक्ष, *द्वितीय*,आद्रा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, १२ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"त्रुटियां कोई हो, किसी की हो किन्तु दूसरों को दोष देना, हमारा स्वभाव है। हम गिरने पर पत्थर को, डूबने पर पानी को, जलने पर आग और कुछ न कर पाने की स्थिति में भाग्य को दोष देते हैं। दूसरों को दोष देने का अर्थ है कि स्वयं की त्रुटियों को स्वीकार करने की सामर्थ्य न होना और अपने में सुधार की भावी संभावनाओं को स्वयं अपने हाथों से नष्ट कर देना।*

       *स्वयं के जीवन में दोष होने से भी ज्यादा घातक है, दूसरों को दोष देना। क्योंकि इसमें समय का अपव्यय व आत्मप्रवंचना दोनों होते हैं।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शुक्रवार, ११ जून, २०२१

बीरसा मुंडा गाथाबलीदानाची


➿➿➿➿➿➿➿➿➿

       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳

                 ▬ ❚❂❚❂❚ ▬

     संकलन ~ गजानन गोपेवाड 

➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  

🏇⚜️🔫🇮🇳👳‍♀️🇮🇳🔫⚜️🤺

                  

🏹 *जननायक बिरसा मुंडा* 🏹


     *जन्म : 15 नोव्हेंबर 1875*

            *(उलिहातू - झारखंड)*


 *वीरमरण : 9 जून 1900*

                    *(रांची तुरुंग)*

                     (वय - 24 वर्षे)


               सन १७८९ मध्य कंपनी सरकाने १२५०० चौ. मैल क्षेत्राचा छोटा नागपूर विभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. हा सारा डोंगराळ प्रदेश. त्यातले प्रमुख रहिवासी कोल जमातीचे आदिवासी. ते सारे शेती करीत व जंगलावर निर्भर राहात. त्यांच्या प्रत्येक गावच्या प्रमुखाला मुंडा असे म्हणत. या भागातील शेतीवरील व इतर कारांच्या वसुलीसाठी इंग्रजांनी  परप्रांतातील ठेकेदार आणले होते आणि मोगली सत्तेच्या करांच्या दुपटी-तिपटीने या लोकांवर कर लादले होते. हे ठेकेदार मनमानीपणे जादा कर वसूल करीत व ज्यांना कर भरता येत नसत, त्यांच्या जमिनी बळकावीत. त्यामुळे ते बड़े जमीनदार बनले होते. त्यामुळे हजारो आदिवासी भूमिहीन बनले व नगण्य मजुरीवर त्या जमिनदारांच्या जमिनीत मजुरी करू लागले. त्यामुळे ते अन्नाला मोताद झाले. शिवाय जमीनदारांना पालीतून वाहून नेणे, त्यांची सर्वतोपरी विनामूल्य सेवा करणे, त्यांचे चैनबाजीचे सर्व प्रकारचे खर्च भागविणे या आदिवासींना सक्तीचे होऊन बसले. त्यांच्या पूर्वापार न्यायपंचायतीची व्यवस्था इंग्रजांनी मोडून काढली व आपली न्यायदान पध्दती सुरू  केली . त्यासाठी वकील आले. मुकादम्यांचा खर्च लोकांना पेलवेनासा झाला. त्यामुळे हे लोक त्रस्त झाले व कंगाल बनले. तशात या भागात ख्रिस्ती मिशनरी आले. त्यांनी प्रलोभने दाखवून या लोकांना ख्रिस्ती बनविण्याचा सपाटा सुरू केला. जो कोणी ख्रिस्ती होई,  त्याला करात सूट मिळे व त्यांची जमीनही जप्त होत नसे. त्यामुळे हे हजारो आदिवासी ख्रिस्ती बनले. त्यांचा मूळचा धर्म बुडाला. परिणामतः अनेक आदिवासी बंडखोर बनले व त्यांनी राज अधिकान्यांशी, ठेकेदारांशी, नव्या जमीनदारांशी, ख्रिस्ती मिशन-यांशी अनेक वेळा लढे दिले. पण ते इंग्रजांच्या आधुनिक शस्त्र बळामुळे निष्प्रभ ठरले. हे लढे एकोणीसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत चालूच राहिले. शेवटचा सर्वात मोठा लढा दिला बिरसा मुंडाने.

               बिरसा मुंडा यांचा जन्म उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्याच्या बापाचे नाव सुगना मुंडा. त्यालाही आपल्या सगळ्या कुटुंबियांसह ख्रिस्ती धमांचा स्वीकार करावा लागला होता. त्यामुळेच बिरसाचे प्राथमिक शिक्षण बुर्जू येथील जर्मन मिशनच्या शाळेत सुरू झाले. त्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी चाईबासा येथील लूथरन मिशनच्या शाळेत दाखल झाला. तेथेच त्याला ख्रिस्ती मिशन-यांच्या कारवाया समजून आल्या. त्यामुळे त्याच्या मनात इंग्रज सरकारविषयी अत्यंत तिरस्कार निर्माण झाला. नंतर त्याने आपल्या सर्व कुटुंबियांसह त्या अन्यायी लोकांच्या ख्रिस्ती धर्माचा त्याग केला. पुढे तो तोडन ठाण्याअंतर्गत गोडबेडा येथील आनंद पांडे या गुरुंच्या संपर्कात आला. त्यांनी त्याला रामायण - महाभारतातील कथा शिकविल्या व आयुर्वेदाचेही ज्ञान दिले. त्यांच्यासमोर त्याने आपल्या धरतीला इंग्रजांच्या  जुलमी शासनाच्या जाचातून मुक्त करण्याची घोर प्रतिज्ञा केली. बिरसाच्या मनावर हिंदू धर्मातील आदर्श तत्वांचा प्रभाव पडला व  वैष्णव बनला. त्याने शिकार करणे सोडून दिले. आपल्या लोकांच्या मनात नैतिक गुण विकसित करण्यासाठी  त्याने गावोगावी दौरे सुरु केले. 

           बिरसाचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होते.  गोरापान,  अत्यंत तेजस्वी,  उंच तगडा, प्रसन्नमुख, डोक्याला फेटा, पायात खडावा असे त्याचे रूप सर्वांनाच आकर्षित करुन घ्यायचे. त्यामुळे त्याच्या समाजाचे लोक भराभर  त्याचे अनुयायी बनले. त्यांना तर तो'धरतीचा देवच'  वाटायचा. तो सुध्दा लोकांना सांगायचा, " देवपुरूष सिंगबोसाने मला स्वप्नात दर्शन देऊन दिव्य शक्ती दिली आहे. त्या शक्तीच्या बळावर मी आपल्या धरतीला  या इंग्रजांच्या व जमीनदारांच्या जुलमी शासनातून मुक्त करणार आहे. तेव्हा लोकांचा त्याच्यावर जागा त्याच्यावर दृढ विश्वास बसला. बिरसालाही वाटायचे,

 " मी माझ्या समाजाचा उदारकर्ता म्हणून जन्मास आलो आहे. त्याचे अनुयायी हजारोच्या संख्येने वाढू लागले. त्यांच्यामधून त्याने शेकडो चांगले लढवय्ये निवडून आपले सैन्य सज्ज केले. गया मुंडा या आपल्या जिवलग मित्राला त्याने आपला सेनापती म्हणून नियुक्त केले.

          सर्वांनी आपल्या समाजावर इंग्रज अधिका-यांकडून,  ख्रिस्ती मिशन-यांकडून, जमीनदारांकडून व ठेकेदाराकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मरेपर्यंत लढा देण्याची प्रतिज्ञा केली व  स्वराज्य स्थापन करण्याचे ठरविले. इंग्रज सरकारला त्यांच्या हालचालीचा सुगावा लागलाच होता. २४ जेगिस्ट १८९५ रोजी रांची जिल्ह्याच्या इंग्रज पोलिस इंस्पेक्टरने अनेक शिपायांसह रात्री बिरसाच्या घरावर छापा टाकून  झोपेत असतानाच त्याला आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली. बिरसा दोन वर्षांची  सक्तमजुरीची शिक्षा व ५० रु. दंड केला व त्याच्या साथीदाराला प्रत्येकी २०/२० रु. दंड केला.

            कैदेतून सुटून आल्यानंतर बिरसाने नव्या जोमाने संघर्ष सुरू केला. इंग्रजांच्या अनेक ठाण्यांवर त्याने हल्ले केले.  पराक्रमाची शर्थ केली.  पण इंग्रजांच्या  बंदूकांपुढे त्यांची परंपरागत हत्यारे निष्प्रभ ठरली.  शेकडो कोल जवान मृत्युमुखी पडले. एका लढाईत सेनापती गया मुंडा ठार झाला. बिरसाचा मुक्काम घनदाट जंगलातील टेकड्यांवर गुप्त ठिकाणी असे. त्यामुळे तो इंग्रजांच्या हाती लागणे अशक्यप्राय होते .

परतु घरभेद्यांकडून इंग्रजांना त्याचा सुगावा लागताच त्याला घेरून पकडण्यात आले. त्याच्याबरोबर त्याचे ८० अनुयायीसुद्धा जेरबंद झाले. तेव्हा रांचीच्या इंग्रज जिल्हाधिका-याने बिरसाला जमीनदारी देण्याची लालूच दाखवून त्याने आपला उद्योग सोडून द्यावा, असे सांगितले.  पण बिरसाने ते धुडकावले. अखेर तुरुंगात त्याचे फार हाल करण्यात आले आणि विष देऊन मारण्यात आले. बिरसा पटकीमुळे मेला, असे इंग्रज सरकारने खोटेच जाहीर केले. त्याच्या अनुयायांनाही जबर शिक्षा ठोठावण्यात आल्या व बिरसाने छोटा नागपूरमध्ये स्वातंत्र्यासाठी आरंभिलेला लढा चिरडून टाकण्यात आला.

                       अशारीतीने कोल समाजाचा हा  'धरतीचा देव ' बिरसा मुंडा जानेवारी १९०० मध्ये त्या धरतीच्या कुशीतच विसावले.

             बिरसा मुंडा हे आदिवासी क्रांतिकारक होते. बिरसा मुंडा यांना *जननायक* हा किताब लोकांनी बहाल केला. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले आहे. ते एकटेच क्रांतिकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने डाक तिकीट जारी केले असून झारखंड मधील रांची येथे स्मारक बांधण्यात आलेले आहे .

संदर्भ ~ महान भारतीय क्रांतिकारक 

सानेगुरुजी चा परिचय

 *साने गुरुजी यांचा अल्पपरिचय: –* 

         🦋

*नाव (Name) पांडुरंग सदाशिव साने*

*जन्म (Birth Date ) 24 डिसेंबर 1899*

*जन्मस्थान:- (Birthplace) पालगड जिल्हा रत्नागिरी*

*वडील (Father Name ) सदाशिव साने*

*आई (Mother Name) यशोदाबाई साने*

*चळवळ (Movement):- भारतीय स्वातंत्र्य लढा*

*मृत्यू (Death) 11 जून 1950*

 *साने गुरुजी यांचे जीवन – Sane Guruji History:-*

साने गुरुजींचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे 24 डिसेंबर 1899 ला  झाला.  साने गुरुजींच्या आजोबांच्या वेळी त्यांची परिस्थिती अत्यंत वैभवसंपन्न होती त्यांचे घराणे खोताचे काम करीत. पुढे वडील सदाशिवरावांच्या काळात मात्र आर्थिक परिस्थिती ढासळत गेली, एवढी की घरादारावरही जप्ती आली. त्यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा फार प्रभाव पडला. तिने केलेल्या संस्कारांमुळे साने गुरुजी घडले.


शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमळनेर इथं प्रताप विद्यालयात त्यांनी शिक्षकाची नौकरी स्वीकारली. याठिकाणी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सांभाळतांना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. सेवावृत्ती शिकवली, विद्यार्थ्यांचे ते सर्वाधिक आवडते शिक्षक झाले. अमळनेर या ठिकाणी साने गुरुजींनी प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं तत्वज्ञानाचा अभ्यास देखील केला.

1928 साली साने गुरुजींनी ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक सुरु केले. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार प्रभाव होता. स्वतःच्या जीवनात देखील ते खादी वस्त्रांचाच वापर करीत असत. समाजातील जातीभेदाला, अस्पृश्यतेला, अनिष्ट रूढी परंपरांना साने गुरुजींनी कायम विरोध केला. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या साने गुरुजींनी 1930 साली शिक्षकाची नौकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत उडी घेतली. 


1942 च्या चळवळीमधे भूमिगत राहून सानेगुरुजीनी स्वातंत्र्याचा प्रचार केला. स्वातंत्र्य समरातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. नाशिकला कारागृहात त्यांनी श्यामची आईचे लेखन पूर्ण केले, धुळे येथे कारागृहात असतांना साने गुरुजींनी विनोबा भावे यांनी सांगितलेली ‘गीताई’ लिहिली.

लहान मुलांच्या बाल मनावर चांगल्या संस्कारांची बीज पेरली जावीत म्हणून गुरुजींनी विपुल लेखन केलं. आपल्या आईवर त्याचं अत्यंत प्रेम होतं, हे त्यांनी लिहिलेल्या “श्यामची आई” या पुस्तकातून आपल्याला कळत, जाणवतं. श्यामची आई या पुस्तकातून त्यांनी आपल्या आईच्या सगळ्या आठवणी सांगितलेल्या आहेत.  साने गुरुजींचं मन अत्यंत भावनाप्रधान आणि संवेदनशील होतं त्यामुळे आईने ज्या सदभावना त्यांच्यात रुजवल्या त्याची वाढ त्यांच्यात वेगानं झाली.


अमळनेर, धुळे आणि नाशिक इथं काही काळ त्याचं वास्तव्य होतं. पुढे खान्देशला त्यांनी आपली कर्मभूमी बनविलं. प्रांताप्रांतातील भेदभाव दूर व्हावा आणि सर्वत्र बंधूप्रेमाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी साने गुरुजींनी आंतरभारती ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. साहित्य संमेलनात तशी इच्छा त्यांनी बोलून देखील दाखवली होती. त्याकरता त्यांनी पैसा गोळा केला होता, रवीन्द्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी आंतरभारती संस्था स्थापन करण्याचा त्यांचा मनोदय होता.


साने गुरुजींचे निधन – Sane Guruji Death

11 जून 1950 रोजी साने गुरुजींचे निधन झाले.


*बलसागर भारत होवो…विश्वात शोभूनी राहो*


*राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया हो…*


या साने गुरुजींनी लिहिलेल्या कवितेने त्यावेळी नागरिकांवर प्रभाव वाढला होता. त्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांच्या काव्यपंक्ती देखील जप्त केल्या होत्या.


*साने गुरुजींचे प्रकाशित साहित्य – Sane Guruji Books:-*

अमोल गोष्टी

कर्तव्याची हाक

कला म्हणजे काय

आपण सारे भाऊ भाऊ

आस्तिक

इस्लामी संस्कृती

कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य

क्रांती

गुरुजींच्या गोष्टी

गीताहृदय

कला आणि इतर निबंध

‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर

गोड गोष्टी

गोड शेवट

गोष्टीरूप विनोबाजी

श्यामची आई (Shyamchi Aai)

श्यामची पत्रे

सोनसाखळी व इतर कथा

स्वप्न आणि सत्य

स्वर्गातील माळ

सुंदर पत्रे

हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे

साधना – साप्ताहिक

सोन्या मारुती

रामाचा शेला

सती

संध्या

मानवजातीचा इतिहास

ते आपले घर

त्रिवेणी

धडपडणारी मुले

नामदार गोखले- चरित्र

विनोबाजी भावे

विश्राम

*अशा या महानायकाच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन*

     *@संकलन@*

*श्री गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

         ➖🙏➖

गुरुवार, १० जून, २०२१

आदर्श जिवन जगण्याची उमेद

 *आदर्श जीवन जगण्यासाठी*


☞ (०१) चूक झाली तर मान्य करा.

☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या.

☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा.

☞ (०४) आभार मानायला विसरू नका.

☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.

☞ (०६) सतत हसतमुख रहा.

☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.

☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.

☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.

☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.

☞ (११) कृती पुर्व विचार करा.

☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.

☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा.

☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.

☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा.

☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या.

☞ (१७) विचार करून बोला.

☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.

☞ (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.

☞ (२०) कामापुर्ती मैत्री ठेउन खरी मैत्री गमाऊ नका.

कुटुंब  टिकवणे का महत्वाचे आहे ,,,,

आज परत एकदा नकळत

मुंगी तळ्यात पडली

स्वतःला वाचविण्यासाठी 

झाडाचं पान आणि कबुतराची

वाट पाहू लागली

 मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला 

झाडावरच बसून 

असहाय मुंगीला मरताना पाहू लागला

 कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली

 कबुतर आपल्याच विचारात मश्गुल

 मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली

कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं

 पारधी येणार हेच विसरून गेलं

पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला

कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. 

【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】

 *मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.*


_मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते.

अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते.


*सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा...🤝🏻*

*हा जन्म पुन्हा नाही...😊* 

विनाकारण कोणाला त्रास देऊ नका .आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका🙏🙏

कृपया वेळ काढून नक्की वाचा.

 *निसर्गाने* आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की ....


👉 आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि 

👉 स्वतःला लाथही मारू शकत नाही.

म्हणूनच.. माणसाच्या जीवनात

*"हितचिंतकांची"* आणि

*"निंदकांची"* आवश्यकता आहे....


आयुष्यात असे लोक जोडा,

जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........


कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.


🐾

👄बोलायच्या आधी….❕

👂ऐकायला शिका............❗

🎁खर्च करायच्या आधी….❕

💰कमवायला शिका.......❗

📝लिहायच्या आधी ……❕

😇 विचार करायला शिका....❗

हार मानण्याआधी.....❕

👉 प्रयत्न करायला शिका

आणि मरायच्या आधी .....❗

👉 जगायला शिका......❕


 👉 जीवनात एवढ्याही चुका करू नका,

कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल 

आणि .... रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.


🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे.....

     

आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ...


*" मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य"*


1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत

2:-"समाज" स्मशाना पर्यंत

3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत


      फक्त आणी फक्त  

              *"कर्म"*

        शेवट l पर्यंत


जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,*

आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.*

यातील वेलांटीचा फरक

म्हणजेच माणसाचे जीवन......


*नक्की वाचा*


*जन्म* : दूस-याने दिला ...

*नाव* : दूस-याने ठेवलं ...

*शिक्षण* : दूस-यांनी दिलं ...

*रोजगार* : दूस-यांनीे दिला ...

*इज़्ज़त* : दूस-यांनी दिली ...

*पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* :  दुसरेच घालणार ...

*मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ...

*आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार...


तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!!

 *दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक...

आपल्या माणसांना *आठवतात*.


*धन* इतकं दुर्दैवी आहे की

ज्याला मिळवून लोक नेहमी...

आपल्या माणसांना *विसरतात*.


किती विचित्र आहे ना...??


माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे, 

पण जखम झाली की रक्त येतं....

आणि

माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून 

हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.                            

चांगले मॅसेज नेहमी जास्तीत जास्त शेयर करा..

मनाला खुप वेगळा *आनंद* मिळेल.


💫💫 *खुपच सुंदर लेख आहे त्यामुळे मी तो तुमच्यापर्यंत पाठवला तुम्हीही इतर ग्रुप वर send करा* 💫💫

*

🙏🙏 आपलाच शुभचिंतक गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

माणुस कविता गजानन गोपेवाड

 *तवा माणूस माणसात होता*

 घरात टि.व्ही चं खोकं नव्हतं...💐

मोबाईल मध्ये डोकं नव्हतं...💐

काचा कवड्याचा खेळ होता...💐

नणंद भावजईचा मेळ होता...💐

गुटक्यानं भिती रंगत नव्हत्या...💐

ब्युटी पार्लरमध्ये झिंगत नव्हत्या...💐

ओठांवर ओरीजनल लाली होती...💐

चंद्राची खळी गाली होती...💐

पोरी मोबाईलवर गात नव्हत्या...💐

शाळेतुन पळून जात नव्हत्या...💐

वाकडा भांग पाडत नव्हत्या...💐

तोंड बांधून हिंडत नव्हत्या...💐

वाघासारखा लेक होता...💐

तवा बाप माणसात होता...💐 

राजकारणात निष्ठा होती...💐

खरं बोलणाऱ्याची चेष्टा नव्हती...💐

पैशावर पुढारी फुटत नव्हतं...💐

तत्वाशिवाय गटत नव्हतं...💐

प्रेम-माया अटत नव्हती...💐

चांगली माणसं तुटत नव्हती...💐

चहा-चिवड्याला रडत नव्हती...💐

चोरुन पिल्याबिगर चढत नव्हती...💐

आडाणी नेता भानात होता...💐

तळातला कार्यकर्ता मनात होता...💐

सोसायटीचा चेअरमन रानात होता..

तवा माणुस माणसात होता...💐

गावा शेजारी बार नव्हता...💐

रस्त्यावर दारुड्याचा कार नव्हता...💐 

पाठीवर दफ्तराचा भार नव्हता...💐

अनवाणी पायाला रस्ता  गार होता.💐 

हातावर छडीचा मार होता...💐

शाळेचा मास्तर दिलदार होता...💐

तवा पैशाला किंमत नव्हती...💐

आयुष्य म्हणजे गंमत नव्हती...💐

घासाघासात कस होता...💐

माणसाच्या वागण्यात रस होता...💐

*तवा माणुस माणसात होता...*

        गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र ....💐💐

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...