बुधवार, ७ एप्रिल, २०२१

जादुई चौरसांच्या ईतिहास

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*


          🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *_जादूई चौरसांचा इतिहास_*

***************************

_‘जादूचे बेरीज चौरस’ या संकल्पनेबाबत चिनी संस्कृतीतील आख्यायिका अशी : इ.स.पूर्व काळात यलो नदीच्या पुरामुळे विवंचनेत असलेल्या राजा यू लिंगला पाठीवर १ ते ९ ठिपक्यांची रांगोळी असलेले शुभशकुनी कासव दिसले. सहज चाळा म्हणून त्याने अंकांची बेरीज केली. गंमत म्हणजे, तिन्ही स्तंभ, तिन्ही रांगा आणि दोन्ही कर्ण यांतल्या अंकांची बेरीज १५ अशी होती. या चौरसाला त्याने ‘लो-शू’ (नदीवरचे भूर्जपत्र) असे नाव दिले. मात्र इसवी सन पूर्व काळातीलच चीनच्या फू-ही यांच्याकडे जादूच्या चौरसांच्या शोधाचे जनकत्व जाते. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील ‘दा-दाई-लिजी’ या पुस्तकात जादूच्या चौरसांचा उल्लेख आढळतो. या चौरसांचा प्रवास चीनमधून भारत, अरब देश, युरोप, जपान असा झाला असावा._

     _भारतात इसवी सनाच्या पहिल्या शतकात ४ x ४ चा बेरीज चौरस नागार्जुन यांनी बनवलेला आढळतो. खजुराहोच्या पार्श्वनाथ मंदिरातल्या शिलालेखातील चौरस (बेरीज ३४) जगप्रसिद्ध आहे. वराहमिहिरांच्या ‘बृहत्संहिते’मध्ये, तर वृंद यांच्या ‘सिद्धयोग’ ग्रंथात यांचा उपयोग आढळतो. परंतु भारतात गणिताच्या पुस्तकात जादूच्या चौरसांच्या रीती देण्याचे श्रेय ठक्कुरा फेरू (इ.स. १३१५) यांना जाते. नारायण पंडितांनी ‘गणितकौमुदी’ ग्रंथात (इ.स. १३५६) जादूच्या चौरसांचे अभ्यासपूर्ण विवेचन करताना अंकगणिती श्रेढी आणि जादूचा चौरस यांमधला संबंधही मांडला._

     _अरब देशांमध्ये नवव्या-दहाव्या शतकात गणिताच्या माध्यमातून हे चौरस जन्मकुंडल्या बनविण्यासाठी उगम पावले. पुढे इस्लामी गणितींनी यांची नियमावलीच तयार केली. युरोपमध्ये चौदाव्या शतकात मॉस्कोप्युलसने ४ ७ ४ जादूचा चौरस बनवण्याची सोपी युक्ती शोधली. पुढे जर्मन डॉ. कॉर्नेलिअस अग्रिप्पा यांनी ग्रहांशी संबंध असलेले सात चौरस बनवले. सन १५१४ मध्ये शिल्पकार अलब्रेख्त ड्यूररने ‘मेलॅन्कोलिया’ या जगप्रसिद्ध शिल्पात ४ ७ ४ बेरजेचा चौरस कोरला. सन १७३६ मध्ये बेंजामिन फ्रँकलिन यांनी १६ ७ १६ चौरस निर्माण केला. १९ व्या शतकात फ्रॉस्ट या ब्रिटिश मिशनऱ्याने एका चौरसाला ‘नाशिक चौरस’ असे नाव दिले. विसाव्या शतकात ली सालो यांनी बरेच मनोरंजक चौरस तयार केले. हेन्री डुडेनी यांनी १ खेरीज इतर मूळ संख्या घेऊन सर्वात कमी १११ बेरजेचा चौरस तयार केला._

     _सध्याही मोठ्या प्रमाणावर संशोधन होत असलेल्या या जादूई चौरसांचे जनमानसावर गारूड होते आणि ते कायम राहील._


🖊 *_नीलिमा मोकाशी_*

office@mavipamumbai.org

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- १५ मार्च २०२१_*

घसा का बसतो, ?

 *_आजची माहिती_*


*_📙घसा का बसतो?📙_*

**********************


_आधी शिंका येतात, मग नाक गळते, घसा खवखवतो, खोकला येतो, घसा दुखतो व तापही येतो. असे तुम्हालाही याच क्रमाने बऱ्याचदा झाले असेल. यालाच आपण सर्दी-पडसे म्हणतो. विषाणूंच्या संसर्गान सुरुवातीला सर्दी-पडसे होते. त्यानंतर पेशींची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने जिवाणूंचा संसर्ग होतो व बसा खवखवणे, ताप अशी लक्षणे दिसतात. जिवाणूंच्या दुष्परिणामामुळे घशाला सूज येते. साहजिकच गिळायला वास होतो, गिळताना दुखते. जिवाणूंचा संसर्ग जेव्हा स्वरयंत्रापर्यंत जाऊन पोहोचतो, तेव्हा तेथेही सूज येते. स्वरतंतूवरहीं (Vocal Cords) परिणाम होतो._

     _आवाज निर्माण होण्यासाठी स्वरतंतू, स्वरयंत्र, घसा, जीभ हे सर्व निरोगी अवस्थेत असणे आवश्यक असते. जिवाणू संसर्गाने त्यांच्यावर सूज येते व साहजिकच आवाज बदलतो._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

संप्रेरके वा हार्मोन्स म्हणजे काय?

 *_आजची माहिती_*


📙 *_संप्रेरके वा हार्मोन्स म्हणजे काय ?_* 📙

*************************************

_शरीरात अनेक ग्रंथी असतात. काही ग्रंथींचा स्राव नलिकेद्वारे बाहेर सोडला जातो. (जसे अश्रु निर्माण करणारी ग्रंथी) तर काहींचा स्राव मात्र रक्तात सोडला जातो. दुसर्‍या प्रकारच्या ग्रंथींना अंत:स्रावी ग्रंथी असे म्हणतात. या ग्रंथींच्या स्रावावर मज्जासंस्था व रक्तातील रासायनिक घडामोडी यांचे नियंत्रण अवलंबुन असते. अंत:स्रावी ग्रंथींमधुन संप्रेरके वा हार्मोन्स रक्तात सोडली जातात. त्यामुळे या संप्रेरकांचा परिणाम संपुर्ण शरीरभर दिसुन येतो. संप्रेरके म्हणजे विशिष्ट प्रकारचे कार्य करणारे रासायनिक पदार्थ होत. संप्रेरकाची रक्तातील पातळी ठराविक प्रमाणातच असावी लागते. अन्यथा शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. काही संप्रेरकांविषयी आता माहिती घेऊ._

     _मेंदुतील पिट्युटरी ग्रंथीपासुन वाढीसाठी आवश्यक असलेला संप्रेरक रक्तात सोडला जातो. या संप्रेरकामुळे शरीराची वाढ होते, शिवाय इतर संप्रेरक ग्रंथीवर नियंत्रणही ठेवले जाते. गलग्रंथीतुन थायलाॅक्झीन नावाचे संप्रेरक तयार होते. हेही वाढीसाठी आवश्यक असते, तसेच ते शरीरातील रासायनिक घडामोडींवर नियंत्रण ठेवते. मुत्रपिंडावरील अॅड्रेनल ग्रंथीतुन स्टेराॅइड संप्रेरके तयार होतात. ही संप्रेरके रासायनिक घडामोडींवर नियंत्रण करतात व अचानक हालचालीसाठी शरीराला तयार करतात. स्वादुपिंडात तयार होणारे इन्सुलिन ग्लुकोजच्या ज्वलनासाठी तसेच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असते. बीजांडातुन स्रवणार्‍या स्त्री व पुरुष संप्रेरकामुळे व्यक्तीत स्त्री व पुरुष याची विशिष्ट लक्षणे आढळुन येतात. यांच्या प्रभावाखालीच शुक्राणुंची निर्मिती होते. तसेच मासिक पाळीची सुरुवात होते. गर्भधारणेसाठीही ही संप्रेरके आवश्यक असतात. अशी अनंत महत्वाची कामे करणार्‍या या संप्रेरकांचे रक्तातील  प्रमाण खूपच अल्प म्हणजे १०० मि.ली.ला १ मि.ग्रॅ. १००० चा भाग वा त्याहूनही खूप कमी असते. त्यामुळे 'मूर्ती लहान, पण किर्ती महान' ही उक्ती संप्रेरकांना तंतोतंत लागू पडते._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

स्वासोच्छवास कसा चालतो

 *_आजची माहिती_*


📙 *_श्वासोच्छवास कसा चालतो ?_* 📙 

*********************************


_श्वासोच्छ्वास बंद झाला म्हणजे माणूस मरतो श्वास घेणे व तो सोडणे हे कार्य व्यक्ती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अव्याहतपणे चालू असते. श्वास घेतल्याने हवा नाकावाटे फुप्फुसात जाते. तेथे हवेतील प्राणवायू रक्तात मिसळला जातो व रक्तातील कार्बन डायऑक्साइड वायू हवेत सोडला जातो. याखेरीज पाण्याची वाफ, अल्कोहोलसारखे विषारी पदार्थ देखील हवेत टाकले जातात. श्वास सोडल्यावर ही हवा नाकावाटे बाहेर सोडली जाते._

     _श्वास घेताना छातीच्या खाली असलेल्या पडद्यावजा स्नायूने फुप्फुसे खालच्या बाजूला ओढली जातात. तसेच फासळ्यांच्या व मानेच्या स्नायूंमुळे ती बाजूंनी व वरच्या दिशेने ताणली जातात. त्यामुळे आतमध्ये दाब कमी होऊन नाकावाटे हवा फुप्फुसात ओढली जाते. तेथे श्वसनाचे कार्य पूर्ण झाल्यावर पडदा फुफ्फुसांना वर ढकलतो, तर फासळ्यांमधील स्नायू व मानेचे स्नायू फुप्फुसांवर दाब आणतात. त्यामुळे फुप्फुसातील हवा आतील दाब वाढल्याने नाकावाटे बाहेर सोडली जाते. रक्तातील प्राणवायू व कार्बन डायऑक्साईड वायूंच्या प्रमाणावर श्वसनाचे नियंत्रण होत असते. मेंदूतील श्वसनाचे केंद्र या क्रियांवर नियंत्रण करते. श्वसनावर काही प्रमाणात ऐच्छिक नियंत्रणही असते. त्यामुळेच आपण स्वतःहून श्वास काही काळ रोखून ठेऊ शकतो; पण कालांतराने स्वयंप्रेरित नियंत्रणाच्या आधारे श्वसन आपोआप चालु होते. पडद्याचे वर खाली होणे जन्माला येण्याच्या क्षणापासून अखेरपर्यंत चालू राहते !सात मिनिटांच्या वर श्वासोच्छ्वास बंद पडल्याने व्यक्ती मरण पावते._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

पिकावरील किटक नाशकांची फवारणी

 *_☘ फवारणिचे महत्व ☘_*


*_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

_जमिनिमध्ये कितीही प्रमुख द्रव्ये (N P K) दुय्यम अन्नद्रव्ये (ca, mg, s) आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये (Fe, Zn, Mn, Cl, Mo, Cu, B) घातली असली  तरी त्यांच्या परस्परातील स्पर्धा आंतरक्रिया (inter action) घडत असतात. उदा. नायट्रोजन वाढवले तर कलशियमची कमतरता होते. फास्फरस वाढविले तर झिंक, लोह याची कमतरता होते. बोरोन, मोलिब्डेन यांचे प्रमाण थोड़े जरी जास्त झाले तरी अनिष्ट परिणाम होतो. अशा गुंतागुंतीमुळे जमिनीत भरपूर खते देऊनसुध्दा ती लागू होत नाहित. त्यात जमीनी आसिडिक व अल्कलाईन असल्या तर समस्या वाढतात. ऊसाची संख्या मिळत नाही. अशा परिस्थितीत ही प्रमुख अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये, सुक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे दिली तर फार चांगला परिणाम होतो._

     _ऊसाच्या कांड्याची संख्या, पेराची जाड़ी, लांबी वाढविली आणि फुटवे मरण्याचे प्रमाण कमी केले तर टनेज चांगले वाढू शकते. फ़वारणीद्वारे पोषन द्रव्याची पुर्तता करण्याबरोबरच त्या सोबत संजिवके दिली तर हे काम अपेक्षे प्रमाणे घडू शकते. जिबरेलिन या संजिवकामुळे कांड्याची लांबी, संख्या वाढते. इंडोलब्युटेरिक आसिड( IBA ) किंवा ( NAA ) मुळे लांबी, जाडीसुध्दा वाढते. सायटोकायनिन (सिक्स बीए) मुळे जाडी, संख्या वाढते. ट्रायकंटेनाल मुळे सगळी पोषण द्रव्ये, संजिवाके यांचा प्रभाव वाढतो. जिबरेलिन आणि सिक्स बीएच्या मिश्रणाला 'प्रोमालिन' म्हणतात. प्रोमालिन व अन्नद्रव्याच्या मिश्रणाच्या फवारणीमुळे जमिनीत घातलेल्या अन्नद्रव्यांचे जलद शोषण होते. फोटोसिंथेसिस वाढते. आयबीए व सिक्स बीएच्या मिश्रणाच्या फवारणीमुळे मुळाकडून शेंडयाकडे अन्नद्रव्य व पाणी यांचे वहन करुन नेणाऱ्या नलिका (झायलेम) आणि पानातले तयार झालेले अन्न शरीरात सर्वत्र पोचविणार्या नलिका (फ्लोएम) चांगल्या बांदल्या जातात. भुद्रावन (soil solution) वेगाने खेचले जाते. मुळ्यांची वाढ चांगली होते. काण्ड्याची संख्या, जाड़ी, लांबी, चांगली वाढते. रिकव्हरी वाढते._

संकलन ::गजानन गोपेवाड 

*✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️*

अशा आहे शेळ्यांच्या जाती

 *_🐏अशा आहेत शेळ्यांच्या जाती🦙_*


*_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*


*_📌देशातील जाती_*


*_१) हिमालयीन पर्वत रांगा :_* _(जम्मू-काश्मीडर, हिमाचल प्रदेश आणि उत्तरांचल) जाती : गुड्डी, चेगू आणि चांगाथांगी इ._

*_२) उत्तर-पश्चिमविभाग :_* _(हरियाना, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाचे उत्तर पश्चिंम भाग) जाती : बिटाल, कच्छी, झालवाडी, सुरती, मेहसाणा, गोहिलवाडी, मारवाडी, सिरोही, जखराना, बारबरी, जमनापारी इ._

*_३) दक्षिण विभाग :_* _(महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि मध्य प्रदेशाचे काही भाग) जाती : उस्मानाबादी, कन्नी अडू, मलबारी, संगमनेरी इ._

*_४) पूर्व विभाग :_* _(बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि भारताचा उत्तर-पूर्व विभाग) जाती : काळी बंगाली, गंजाम इ._


*_🎯आकारमानानुसार वर्गीकरण_*

*_१) मोठ्या आकाराच्या शेळ्या :_* _जमुनापारी, बिटाल, जखराना, झालवाडी, सिरोही इ._

*_२) मध्यम आकाराच्या शेळ्या :_* _मारवाडी, कच्छी, सुरती, बारबरी, मेहसाणा, गोहीलवाडी, कन्नीअडू, मलबारी, संगमनेरी, उस्मानाबादी, गंजाम, चांगाथांगी, चेगू आणि गुड्डी इ._

*_३) लहान आकाराची शेळी :_* _काळी बंगाली_


*_🔖शेळ्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनानुसार शेळ्यांचे प्रकार_*


*_१) दूध व मांस (दुहेरी उद्देश) :_* _जखराना, जमुनापारी, बिटाल, झालवाडी, गोहीलवाडी, मेहसाणा, कच्छी, सिरोही, बारबरी, संगमनेरी, मारवाडी इ._

*_२) मांसोत्पादनासाठी :_* _काळी बंगाली, उस्मानाबादी, गंजाम, मलबारी, कन्नीअडू इ._

*_३) मांस व लोकर उत्पादनासाठी :_* _चांगाथांगी, चेगू, गुड्डी इ.राज्यांत संगमनेरी व उस्मानाबादी या जाती प्रचलित असल्या तरी खानदेशातील काठेवाडी, खानदेशी, कोकणातील कन्याळ, पाटण तालुक्याउतील कुई या जाती दूध व मांसासाठी उत्तम असूनही त्यांचे गुणधर्म निश्चिूत झालेले नाहीत. भारतात केल, खागणी, बिरारी, चोरखा, दख्खनी, जौनपुरी, कन्नी, वेलाडू, कोदीवली, मालकणगिरी, नागमेसेहिल, ओरिसा ब्राऊन, पंतजा, पर्बतसर, रामधन, शेखावती, शिंगारी यांसारख्या कितीतरी जाती दुर्लक्षित राहिल्या आहेत._


*_📣शेळ्यांची वैशिष्ट्ये_*

*_अ)_* _या जाती कोणत्याही प्रकारच्या हवामानात तग धरू शकतात._

*_ब)_* _मुख्य पिकांपासून मिळणाऱ्या उपप्रकारच्या उत्पादनावर शेळ्या सहजगत्या तग धरू शकतात._

*_क)_* _निकृष्ट प्रकारच्या खाद्याचे, गवताचे आणि अपारंपरिक खाद्याचे दूध, मांस आणि कातडीमध्ये रूपांतर उत्तम पद्धतीने करतात._

*_ड)_* _शेळ्या सेंद्रिय पद्धतीने पालनास उपयुक्त असून, सर्वसाधारण रोगांना सहजासहजी बळी पडत नाहीत._

*_इ)_* _शेळ्या दूरवर रानात, डोंगरकपाऱ्यांत चरण्यास जाऊ शकतात, तसेच कमीत कमी भांडवली गुंतवणुकीत व्यवस्थापन करणे सहज शक्ये असते. कोणत्याही वातावरणाशी समरस होण्याची नैसर्गिक क्षमता असल्यामुळे कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या निवाऱ्याची गरज नसते._

संकलन::गजानन गोपेवाड 

*✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️*

कुजने आणि सडने या दोघात फरक

 *_कुजणे आणि सडणे या दोन्हींत काय फरक आहे_* 


🌱🌱🌱👳‍♂👳🏻‍♂️👳‍♂🌱🌱🌱


*१)* _कुजणे हे चांगल्या सुक्ष्मजीवांचं काम आहे तर सडणे हे वाईट सुक्ष्मजीवांचं_

*२)* _ऑक्सिजन उपलब्ध असला तरच कुजण्याची प्रक्रिया घडते, तर ऑक्सिजन उपलब्ध नसल्यास सडण्याची प्रक्रिया घडते._


_मुळं श्वसन करत असतात. ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायॉक्साईड सोडतात. माती जर घट्ट असेल तर अशा वेळी मातीत कार्बन डायॉक्साईड साचत जाईल. परिणामी मुळं घुसमटून मरतील. म्हणूनच माती भुसभुशीत ठेवण्याकडे आपला कल असावा. नैसर्गिकरित्या हे काम गांडुळं व सूक्ष्मजीव करत असतात._


*_कोणत्याही झाडाला फुलं येण्याची मुख्य कारणे_*

_◆झाड मरेल असे वाटते तेव्हा_

_◆झाडात अन्नाचा भरपूर व समतोल साठा असेल तेव्हा ( म्हणजेच झाडात पुरेसे कर्ब असल्यावर)_


_याचा अर्थ असा की फुलं येण्यासाठी जास्त औषधं फवारून आपण झाडाला आतून खिळखिळे बनवत असतो. त्याऐवजी जर त्याला आपण योग्य प्रमाणात अन्न देण्यावर भर दिला तर झाडाचं आयुष्यमान वाढण्यात मदत होईल._


 _♦️बालपणात (अगदी लहान असताना) झाडाची वाढ जमिनीखाली होत असते. मुळं तयार होतात. साहजिकच खोड व पान यांच्या वाढीकडे झाड त्या काळात दुर्लक्ष करत असतं. म्हणूनच बालपणाच्या काळात पानांची वाढ नाही म्हणून चिंता करायची नसते. तेव्हा पानं कमीच येतात आणि खोडही छोटे असते._

*➖➖➖♦️♦️➖➖➖*

संकलन गजानन गोपेवाड 

जादु बेरीज चौरसाची

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*

           *_🤔 कुतूहल 🤔_*


🎯 *_निर्मिती जादूच्या बेरीज चौरसांची_*

*********************************


_या लेखात जादूचे बेरीज चौरस बनविण्याच्या खास रीती पाहूया. प्रथम पाहू विषम घरांचे जादूचे चौरस, उदा. ३७३ चौरस बनविण्याची पायरी पद्धत, जिला सायमन द ला लुबेरे पद्धत असेही नाव आहे._

     _प्रथम आपण क्रमवार १ ते ९ नैसर्गिक संख्यांचा जादूचा चौरस तयार करू. याकरिता मधला अंक ५ घ्यावा. सर्वांत लहान संख्या १ मधल्या स्तंभाच्या वरच्या घरात भरा. नंतर उजवीकडे वर जाणारा तिरका बाण वापरावा. १ च्या उजवीकडे वर जाणारा बाण तिसऱ्या स्तंभाच्या वर जातो, म्हणून तिसऱ्या स्तंभातील शेवटच्या घरात २ भरा. पुन्हा खालून उजवीकडे गेल्यास बाण दुसऱ्या रांगेत जातो म्हणून त्याच दुसऱ्या ओळीत शेवटच्या घरात ३ भरा. त्यापुढचा बाण १ ने भरलेल्या घरात जाईल म्हणून ४ ही संख्या ३ च्या खालच्या घरात भरा. अशा रीतीने बाकीचे अंक आकृती १ मध्ये दाखवलेल्या बाणांच्या दिशांप्रमाणे भरा. (स्वामी भारतीकृष्ण तीर्थजी यांच्या वैदिक गणितात या पद्धतीसाठी ‘परावत्र्य योजयेत्’ असे सूत्र आहे.) समान फरक असलेल्या कोणत्याही ९ परिमेय संख्या घेऊनही असा चौरस बनवता येईल. काही चौरस लगतच्या दोन संख्यांमध्ये समान फरक नसूनही तयार होतात. १५,१६,१७,२२,२३,२४,_


*_२९,३०,३१ या नऊ संख्या घेऊन जादूचा चौरस बनवता येतो का पाहा._*

_सम घरांचे जादूचे चौरस उदाहरणार्थ, ४७४ चौरस करण्याची कॉन्स्टॅन्टिनोपलच्या मॉस्कोपुलस यांची सुधारित सोपी पुढील रीत लोकप्रिय आहे._

     _१ ते १६ संख्या क्रमाने घेऊन एक चौरस (आकृती २-अ) दिला आहे. या चौरसातला मुख्य चौरस आणि मधला चौरस यांच्या कर्णांच्या टोकांशी असलेल्या संख्यांची फक्त अदलाबदल करावयाची इतकेच!  कसे ते बाणांच्या साहाय्याने दाखवले आहे. (आकृती २-ब) आता आपल्याला ३४ बेरजेचा जादूचा चौरस मिळेल. (आकृती २-क) याशिवाय ठिपक्यांच्या रांगोळीची पद्धत, बुद्धिबळातील घोडा, उंट, हत्ती यांच्या चालींचे मिश्रण करून केलेली पद्धत, भारतीय ठक्कुरा फेरू यांची अनोखी मनोरंजक पद्धत अशा कितीतरी पद्धती आहेत._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- १६ मार्च २०२१_*

शरीराला दुखापत झाल्याने सुज का येतो?

 *_आजची माहिती_*


*_📙शरीराला दुखापत झाल्यास सूज का येते📙_*

****************************************


_खेळताना तुम्ही पडता. कधी कधी डोक्यावर काहीतरी आपटते. कधी मारामारीत हातापायाला लागते. कालांतराने लक्षात येते की ज्या ठिकाणी लागले आहे तेथे सूज आलेली असते. त्या भागाला हात लावला तर गरम लागते. त्या जागी दुखते, त्या भागात हालचाली व्यवस्थित करता येत नाहीत व ती जागा लालसर होते. त्यालाच इन्फ्लेमेशन किंवा दाह असे म्हणतात. लॅटिन 'इन्फ्लॅमेर' 'जळणे' या शब्दांपासून इन्फ्लॅमेशन हा शब्द आला आहे. कोणत्याही उतींना (पेशींचा समूह) इजा झाली, तर शरीर एका विशिष्ट पद्धतीने प्रतिसाद देते. यात उतींमधील पेशी, रक्तवाहिन्या, रक्तातील पेशी या सर्वांच्या एकत्रित सुसंघटित क्रियांमुळे झालेली इजा भरून येण्यासाठी मदत होते._

     _जखम व इजा झालेल्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात व त्या भागातील रक्तपुरवठा वाढतो. परिणामी तो भाग लालसर दिसतो व तेथील तापमानही वाढते. प्रसरण पावलेल्या रक्तवाहिन्यांच्या आवरणातून रक्तातील द्रव, प्रथिने व पांढऱ्या पेशी जखम झालेल्या ठिकाणी सोडल्या जातात. त्यामुळे त्या भागात सूज येते. जखम झाल्यावर त्या भागातील पेशीतून बाहेर पडलेल्या रासायनिक पदार्थाच्या क्रियेमुळे तसेच सूज आल्याने त्या भागाच्या उतींवर येणार्या दाबामुळे वेदना होतात. सूज आल्याने व वेदना होत असल्याने त्या भागाच्या हालचाली आपोआपच कमी केल्या जातात._

     _जखम व मार सोडून जीवाणू, विषाणू संसर्ग तसेच जंतूंनी शरीरात सोडलेल्या विषांच्या परिणामामुळेही दाहाची प्रक्रिया होते. अॅलर्जीमुळे तसेच उष्णता, थंडी अशा गोष्टींमुळेही दाह होतो. दाह होणे ही शरीराची संरक्षक अशी प्रतिसादात्मक क्रिया आहे. दाहाच्या प्रक्रियेत जंतूंचा नायनाट केला जातो. मृतपेशींचे पचन केले जाते व जखम भरून येण्याला मदत होते. जखम झाल्यावर सूज का येते, हे तुमच्या लक्षात आले असेलच._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

गेआँर्ग ओहम

 *_🎧आजचे शास्त्रज्ञ 🎧_*


*_गेऑर्ग झिमॉन ओहम_*


*_बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ_*


*_जन्मदिन - मार्च १६, इ.स. १७८९_*

****************************

_गेऑर्ग झिमॉन ओम[१] (आंग्लीकरणातून उद्भवलेला मराठी नामभेद: जॉर्ज सायमन ओह्म ; जर्मन: Georg Simon Ohm) (मार्च १६, इ.स. १७८९ - जुलै ६, इ.स. १८५४) हा बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ होता. याने शाळेत शिक्षकी पेशा करताना अलेस्सांद्रो व्होल्टा या इटालियन आविष्कारकाने बनवलेल्या विद्युतरासायनिक घटावर अधिक संशोधन करण्यास आरंभ केला. या संशोधनातून घडवलेल्या स्वनिर्मित उपकरणाद्वारे याने संवाहकाच्या दोन टोकांतील विभवांतर आणि संवाहकातून वाहणारी विद्युतधारा यांच्यामधील परस्परसंबंध सिद्ध केला. हा संबंध "ओमचा नियम" म्हणून प्रसिद्ध आहे._


*_ओमचा नियम_*

_संवाहकाच्या दोन टोकांत वाहणारी विद्युतधारा, त्या दोन टोकांमधील विभवांतराच्या समानुपाती असते._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड


_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

लाय डिटेक्टर

 *_आजची माहिती_*


📙 *_लाय डिटेक्टर_* 📙

********************


_नेहमीच्या जीवनात सकारण वा अकारण अनेकदा आपण खोटे बोलत असतो. काहीतरी दडवण्यासाठीही हे खोटेपण असते. पण दडवादडवी करताना मनावर एक प्रकारचा ताण असतोच. छोटेसे उदाहरण घ्या. गृहपाठ झाला नाही म्हणून शिक्षक रागावताना म्हणतात, 'टीव्हीवर सिनेमा बघितला असेल, म्हणून वेळ झाला नाही,' सिनेमा तर बघितलेला असतो, म्हणूनच वेळही झालेला असतो. पण हे कबूल करायला मात्र मन राजी होत नाही. मग उत्तर येते, 'नाही नाही घरी मला काम होते म्हणून गृहपाठ झाला नाही'. हे उत्तर देताना कुठेतरी हातपाय थरथरतात, डोळ्याला डोळा भिडणे चुकवले जाते, एखादाच खोल श्वास घेतला जातो. क्वचित हृदयाचा एखादा ठोकाही चुकतो._

     _या होणाऱ्या बारीकसारीक शारीरिक बदलांची जाणीव बोलणाऱ्याला असते; पण बघणाऱ्याला होतेच, असे मात्र नाही. ही जाणीव सहज करून देणारे यंत्र म्हणजे लाय डिटेक्टर. या यंत्राचा शोध खरे म्हणजे फार पूर्वी म्हणजे १९२१ सालीच लागला. जॉन लार्सन यांनी अमेरिकेत हा शोध लावला. त्याला पॉलिग्राफ अशी तांत्रिक संज्ञा दिली जाते. वर्गात खोटे बोलणे, घरी फसवाफसवी करणे हे एक वेळ क्षम्य आहे; पण जर एखादा गुन्हेगार गंभीर गुन्हा करूनही कबुली द्यायचा नाकारत असेल, तर ? कोणीही साक्षीदार नसेल, तर यावेळी पॉलिग्राफ मशीन वापरण्याची सोय आहे. गुन्हेगार व साक्षीदाराच्या शारीरिक बदलांची कॉन्टॅक्ट लीडद्वारे पूर्ण नोंद करून हे यंत्र तो खरे बोलत आहे वा खोटे, याचा निवाडा करते. कायदेशीरदृष्ट्या या यंत्राचा निर्णय काही देशात पूर्ण प्रमाण मानला जातो, तर काही देशांत तो सहाय्यभूत मानला जातो._

     _श्वसनाचा वेग, नाडीचे ठोके, रक्तदाब, त्वचेवरील येणारे घर्मबिंदू, जीभ कोरडी पडणे, अंगावरचे केस उभे राहणे, हातापायांना कंप, दृष्टीची स्थिरता अशा कित्येक गोष्टींची नोंद हे यंत्र करते व मग हा निर्णय दिला जातो. अर्थात अत्यंत निर्ढावलेला गुन्हेगार किंवा पूर्ण प्रशिक्षित तरबेज गुप्तहेर या चाचणीतूनही सहज सुटू शकतो. हे शास्त्रज्ञांनाही मान्य आहे. पण ही दोन्ही उदाहरणे फारच क्वचित सापडतात; कारण निर्ढावलेला गुन्हेगार हा ज्ञात असतो व गुप्तहेराच्या स्वरूपाचा पत्ता आधीच लागलेला असतो._

     _लाय डिटेक्टरचा भारतात वापर अजून सरसकट केला जात नाही. ही यंत्रे आपल्या देशात थोडीच आहेत, हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. 'सच का सामना' या रिअॅलिटी शोसाठी २००९ साली टीव्हीवर या मशिनचा सर्रास वापर आपण पाहिला आहे._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन

 [4/7, 3:18 PM] मंगेश मांडोले आर्णी, यवतमाळ: *_आज_*


*_विश्व आरोग्य (स्वास्थ्य) संस्था_*


*_📒जागतिक आरोग्य दिन 📒_*


*_स्थापना - ७ एप्रिल, इ.स. १९४८_*

****************************


_जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 1948 साली झाली असली तरी त्याच्या जवळपास शंभर वर्ष आधीपासूनच वेगवेगळ्या देशांनी आरोग्याच्या मुद्द्यांवर एकत्र येण्यास सुरुवात केली होती. 1851 साली पॅरिसमध्ये पहिल्या इंटरनॅशनल सॅनिटरी कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं. 1938 पर्यंत या कॉन्फरन्सची चौदा अधिवेशनं झाली._


_त्यावेळी जगासमोरची मोठी आव्हानं होती कॉलरा, प्लेग आणि यलो फिव्हर. या साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी 1892 आणि 1903 मध्ये करार झाले. आजच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांची पाळंमुळं या करारांमध्ये सापडतात. गेल्या सात दशकांत सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील सुधारणांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचाही वाटा आहे. कुठल्याही नव्या आजाराची माहिती मिळवणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं, आजारांच्या साथी पसरत असतील तर त्याविषयी देशांना सावध करणं, लस आणि उपचारांविषयी संशोधन, आरोग्यासाठी निधी जमा करणं आणि तो गरज असेल तिथे पोहोचवणं अशी कामं ही संघटना करते._


_WHOच्या प्रयत्नांमुळे देवी रोगाचं उच्चाटन, पोलियो सारख्या रोगांवर नियंत्रण शक्य झालं. इबोलावरची लस तयार करण्यातही WHOनं महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या HIV-एड्स, इबोला, मलेरिया, टीबी अशा संसर्गजन्य आजारांबरोबरच, कॅन्सर आणि हृदयविकार तसंच पोषक आहार, अन्नसुरक्षा, मानसिक आरोग्य, नशामुक्ती अशा क्षेत्रांतही WHO काम करते आहे. विविध देशांबरोबरच खासगी देणगीदारांनी दिलेल्या पैशातून या संघटनेचं काम चालतं. स्वित्झर्लंडच्या जीनिव्हामध्ये या जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे._


_संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेले सर्व देश या संघटनेचे सदस्य आहेत. पण मग त्या देशांचं काय, जे संयुक्त राष्ट्रांचे सदस्य नाहीत?_

    *_७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन_*

********************************


७ एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ही जागतिक संस्था मराठीत ‘जागतिक आरोग्य संस्था’ या नावाने ओळखली जाते. ७ एप्रिल १९४८ रोजी स्वित्झर्लंडलंड मधील जिनेव्हा येथे ही संस्था स्थापन झाली. म्हणून हा दिवस "जागतिक आरोग्य दिवस" म्हणून जगभरात साजरा केला जातो. ही संस्था आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात दिशादर्शक ठरणे, जागतिक स्तरावरील महत्वाच्या आरोग्य विषयक संस्थांमध्ये समन्वय राखणे, त्यांचे व्यवस्थापन करणे, जागतिक आरोग्य सेवा बळकट करणे, नैसर्गिक आपत्कालीन काळात पिडीतांना आवश्यक ती मदत करणे, जागतिक स्तरावर पोषण, निवारा, स्वच्छता, मनोरंजन, पर्यावरण स्वच्छता आदी गोष्टींना प्रोत्साहन देवून आवश्यक ते सहकार्य करणे, जागतिक स्तरावर आरोग्य विषयक नियमावली, करार आणि नियम मांडणे यांसारखी महत्त्वाची कार्ये ही जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर करीत असते.


*जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने -*


आपण दैनंदिन जीवनात आपल्या आरोग्याची किती काळजी घेतो; याचा आज आपण विचार करायलाच हवा, अर्थात आजच्या या पोस्टमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करतोय.


●आपले आरोग्य टिकविण्यासाठी आपण शुध्द (गावराणी- अर्थात शक्य असेल तरच) अन्न-पदार्थ खाण्यावर भर द्यावा. म्हणजेच आजच्या या रासायनिक अन्न प्रणालीतही आपण सेंद्रिय अन्न खाण्याचा प्रयत्न करा.

●जे खाल ते घरगुती आणि ताजे खा.

●ब्रेड-बिस्कीट पासून ते तेल, गहू, तांदूळ यांच्या packing वरही expiry date पाहिल्याशिवाय खरेदी करु नका.

●मिठाई सारखे पदार्थ फक्त २४ तासांच्या आत खायचे असतात. मिठाईचे पदार्थ विकत घेतांना भेसळयुक्त मावा वापरणाऱ्या दुकानांवरुन घेण्यापेक्षा (अशी शंका असणाऱ्या दुकानांवरुन) Quality जपणाऱ्या दुकानांवरुनच मिठाईची खरेदी व्हावी.

●मिठाई सुध्दा जर नजरेला ओलसर व मऊ दिसली तरच घ्यावी कारण जूनाट मिठाई ओलसर व मऊ न दिसता कडकपणा दर्शविणारी आणि मिठाई एकसंध न दिसता भेगाळलेली असते.

●चायनीजचे पदार्थ आजकाल जास्त आवडीने खाल्ले जातात. या चायनीज पदार्थांमध्ये "अजिनोमोटो" हा मीठ किंवा साखरेसारखा दिसणारा स्फटिकी पदार्थ अतिप्रमाणात चायनीज फूडस् च्या सेंटर्सवर वापरला जातो, म्हणून चायनीज फूडस् सेंटर्सवर आपण अजिनामोटो टाकला जावूच नये याबाबतीत आग्रही रहा अथवा असे पदार्थ घरीच बनविलेले अधिक योग्य असतात.

●भाजीपाला खरेदी करतांनाही मिठाई खरेदी बाबत करतांना जी काळजी घेतात तशीच घ्यावी लागते.

●भाजीपाल्याच्या नुसत्या अवस्थेवरुनही ताजा आणि जून भाजीपाला केवळ नजरेने ओळखता येतो.

●मात्र खासकरुन फळभाजी घेतांना उदा. गवार, वांगी, कारले, गिलके-दोडके (शिरोळे-घोसाळे) अथवा इतर यांची नेहेमीप्रमाणे जी उंची असते त्यापेक्षा अधिक उंचीचे दिसल्यास रासायनिक औषधे वा इंजेक्शन्स देवून त्यांना अत्यंत कमी कालावधीत भयानक वाढ देण्यात आलेली आहे हे निश्चितच समजावे. अशा अधिक प्रमाणातील रासायनिक पदार्थ वापरुन भाज्यांची केलेली कृत्रिम वाढसुध्दा आरोग्यास अत्यंत अपायकारक असते.

●सर्व प्रकारच्या भेसळयुक्त पदार्थांना टाळण्यासाठी, विविध अन्न-पदार्थांमध्ये कोणत्या पदार्थाची भेसळ असू शकते व ही भेसळ कशी ओळखावी या बाबत माहिती प्रत्येकाने घ्यायलाच हवी.

●कुठल्याही प्रकारच्या अन्न-पदार्थांमध्ये भेसळ असल्याची शंका आल्यास स्थानिक अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक कार्यालयाकडे त्वरीत तक्रार नोंदवावी.

●आता हे सर्व quality and fresh food बद्दल झाले. आरोग्याचा विषय इथेच थांबत नाही तर आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम, मैदानी खेळ, योगासने, योगाभ्यास आदि आवश्यक आहेच.

●शारिरीक, घराची व परिसराची स्वच्छता ही तेवढीच गरजेची आहे.

●शारिरीक तंदुरुस्तीसोबतच मानसिक आरोग्य जपणे आवश्यक आहे



 ********************************

*_०७ एप्रिल - जगातील पहिली काडेपेटी_*

********************************


७ एप्रिल १८२७


आजच्याच दिवशी १८२७ साली बाजारात आली जगातील पहिली काडेपेटी.


इवलीशी काडेपेटी आली कुठून माहितीय का? अग्नी पेटवण्यासाठी चकमक वापरण्याच्या किचकट मार्गातून सुटका करायला जॉन वॉकर या ब्रिटिश शास्त्रज्ञानं काड्यापेटीचा शोध लावला. माचिस बाजारात आली त्याला आज तब्बल १९२ वर्षं झाली. या मेणाच्या पृष्ठभागावर घासुन ज्वाला निर्माण करणारी काडेपेटी जॉन वॉकरने तयार केली, अन ७ एप्रिल १८२७ ला पहिली काडेपेटी जगाच्या बाजारात आली. दैनंदिन जीवनात गरजेची ठरलेल्या काडीपेटीचा जगभर वेगानं प्रसार झाला. आजही बहुतेकांच्या किचन ओट्यावर ती हाताशीच ठेवलेली असते. ८० च्या दशकात काडेपेटीच्या वैविध्यपूर्ण कव्हर्सचा संग्रह करायचा अनेक जणांना नाद होता. त्यातीलच एक मुलुंडच्या सज्जनवाडीत राहणाऱ्या नंदकुमार देशपांडे यांनी गेल्या ४० वर्षांपासून हा छंद जोपासलाय. त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या तब्बल सहा हजार काडेपेट्या जमवल्यात. त्यात आपल्याकडच्या सर्वात जुन्या 'अनिल' ब्रॅण्डसोबतच अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, अझरुद्दीन, श्रीदेवी यांची चित्र असलेल्या वैशिष्ठयपूर्ण माचिस आहेत. 


स्वीडन, इंडोनेशिया, पाकिस्तान, चीन, जपान, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रिया या देशातल्या त्रिकोणी, चौकोनी, आयताकृती अन लिपस्टिक, बॅटरी सेलच्या आकाराच्याही काडेपेट्या त्यांच्या संग्रहात आहेत. त्यातल्या रिकाम्या काड्यांतून आयफेल टॉवरची प्रतिकृती उभारून एका प्रदर्शनात त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं. आपल्याकडं शिवकाशीला काडेपेटी उत्पादनाचाही मोठा उद्योग आहे. केरळातल्या कोचि मध्येही हे कारखाने आहेत. हजारो लोकांचं पोट या उद्योगावर अवलंबून आहे. अलीकडच्या काही वर्षांत गॅस लायटर्सचं प्रस्थ बरंच वाढलं. धुम्रपानविरोधी मोहीम जगभर सुरू झालीय. त्याचा परिणाम काडेपेटी उद्योगांवर झालाय. वार्षिक तब्बल दीड हजार कोटींची उलाढाल असलेल्या या उद्योगात दहा वर्षांत पंचवीस टक्क्यांनी घट झालीय. माचीस बनवणारे ८ हजार कारखाने बंद पडलेत. पूर्वी आपण पाकिस्तान आणि आफ्रिकेतही माचिस निर्यात करायचो. आता पाकिस्तानमध्ये हा उद्योग सुरू झालाय. त्यांच्या स्वस्त दरामुळं आफ्रिकन देश त्यांच्याकडून काडेपेट्या आयात करतात.


आपल्याकडं 'विमको' ही काडेपेटी उत्पादन करणारी प्रमुख कंपनी. त्यांचे एम, आय नो, होम लाईट, शिप हे माचीस ब्रँड सर्वांनीच कधी ना कधी हाताळलेत यात शंकाच नाही.

संकलन गजानन गोपेवाड 





संदर्भ : इंटरनेट


********************************

पेनिसल इंजेक्शन बदल

 *_आजची माहिती_*


*_📕पेनिसिलीनचे इंजेक्शन देताना आधी काय तपासणी करतात?📕_*

***************************************


_पेनिसिलीन हे एक प्रभावी प्रतिजैविक आहे. अनेक जिवाणूंच्या विरोधात हे औषध उपयोगी पडते. पेनिसिलीनचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. तोंडाने घ्यावयाच्या गोळ्या, स्नायूत वा शिरेद्वारे द्यायचे इंजेक्शन अशा स्वरूपात ते मिळू शकते. डॉक्टर गरजेनुसार गोळ्या वा इंजेक्शनचा वापर करतात. तुमच्यावरही कधीतरी पेनिसिलीनचे इंजेक्शन घेण्याचा प्रसंग आला असेल. पेनिसिलीनचे इंजेक्शन देताना डॉक्टर आधी हातावर, कोपखच्या थोडे खाली पेनिसिनीनचे ०.१ मिली एवढे इंजेक्शन त्वचेखाली टोचतात. टोचलेल्या भागाभोबती ते बॉलपेनने वर्तुळ काढतात. ४५ मिनिटांनी त्या भागाची तपासणी करतात. त्यानुसार पेनिसिलीनचे इंजेक्शन আायचे की नाही ते ठरवतात. पेनिसिलीनची रिऑॅक्शन येते का हे पाहण्यासाठी वरील उपाय योजतात._

     _आता रिअॅक्शन म्हणजे काय ते पाहू, शरीरात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही वाहेरील पदार्थाच्या/घटकाच्या विरोधात शरीरातील पांढऱ्या पेशी, IgE नावाचे प्रतिदव्य, विशिष्ट प्रतिक्रिया घडवून आणतात. सामान्यतः ही प्रतिक्रिया वा रिअॅक्शन मर्यादित स्वरूपाची असते. काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र ही प्रतिक्रिया अवाजवी प्रमाणात जास्त असते. परिणामस्वरूप श्वासनलिका व श्वासमार्गातील लहान लहान नलिकांच्या स्नायुचे आकुंचन होऊन श्वास घ्यायला अडचण निर्माण होते, स्वरयंत्राला सूज येते, छातीत धडधड होते, हातापायाला कंप सुटतो, हातपाय गार पडतात, चक्कर येते. क्वचित श्वसन बंद पडून वा हृदयक्रिया बंद पडून मृत्यूही येऊ शकतो. असे होऊ नये म्हणून औषधाचा अत्यंत कमी प्रमाणात डोस देऊन रिअॅक्शन येते का ते आधी पाहतात. रिअंक्शन येणार असेल तर व्यक्तीला अर्ध्या तासात चक्कर यायला लागते, हातपाय गार पडतात. इंजेक्शन दिलेल्या जागी लालसरपणा येतो व सूज येते. असे जर घडले तर डॉक्टर पेनिसिलीनचे इंजेक्शन देत नाहीत. अशीच तपासणी शिरेवाटे द्यावयाच्या इतर औषधांसाठीही करता येते._

     _पेनिसिलीन वा इतर कोणत्या औषधाची रिअॅक्शन असणाऱ्या लोकांनी डॉक्टरांकडे गेल्यावर उपचार घेण्यापूर्वीच डॉक्टरांना त्याविषयी सांगावे. त्यामुळे डॉक्टर दुसरे औषध सुचवतील व रिऑक्शनमुळे होणारा शारीरिक त्रास किंवा क्वचित होणारा मृत्यू टाळता येईल._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

डोक्यावरचे केस पांढरे, काळे

 *_आजची माहिती_*


*_📕काहींचे केस काळे, तर काहींचे सोनेरी का असतात?📕_*

***************************************


_आपल्या देशामध्ये सामान्यत: काळे केस आढळतात. असे दिसते की उष्ण कटिबंधातील देशांमध्ये काळे केस असतात शीत प्रदेशातील लोकांचे केस सोनेरी असतात केसांचा रंग आनुवंशिकतेवरही अवलंबून असतो. रंग ठरवण्याची ही महत्त्वाची कारणे असली तरी त्याला कारणीभूत केसात असणारे रंगद्रव्य असते केसांचा उभा छेद घेतला असता त्याचे बाह्यस्तर मध्यस्तर बाह्यकवच असे भाग दिसतात. या बाह्यकवचामध्ये असलेल्या मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे केसांना रंग असतो. या रंगद्रव्याच्या प्रमाणावर केसांना काळा, तपकिरी, सोनेरी असे रंग येतात. मेलॅनिन रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असेल, तर केस काळे असतात. उष्ण कटिबंधातील व्यक्तींच्या त्वचेत, केसात हे रंगद्रव्य अधिक असल्याने केस काळे व त्वचेचा रंग काळा, गव्हाळ असा असतो._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

कुट्टुक

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*


           🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *कुट्टक*

**********


_सामान्यत: समीकरणांच्या संख्येपेक्षा जास्त चल असलेली समीकरणे अनिर्धार्य (इनडिटरमिनेट) असतात. ती सोडविण्याच्या पद्धतीला प्राचीन भारतीय गणितज्ञ ‘कुट्टक’ म्हणजे चूर्ण करण्याची क्रिया (पल्वरायझर) म्हणत. खगोलशास्त्रातील अक्ष + क = बय या समीकरणातील मोठमोठे आकडे असलेले अ, ब, क हे सहगुणक लहान करण्यासाठी ही प्रक्रिया शोधली गेली. कुट्टकात ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ हे ज्ञात, तर ‘क्ष’ आणि ‘य’ हे अज्ञात पूर्णांक असतात. उत्तर पूर्णांकी येण्यासाठी ‘अ’ आणि ‘ब’ यांच्या म. सा. वि.ने ‘क’ला नि:शेष भाग जायला हवा. या पद्धतीने सोडवलेले एक उदाहरण पाहू._


_‘केळ्यांच्या समान संख्येच्या ६३ ढिगांमध्ये ७ केळी मिळवली आणि २३ प्रवाशांमध्ये समान वाटली तेव्हा एकही केळे उरले नाही. तर प्रत्येक ढिगात किती केळी होती?’ (गणितसारसंग्रह, महावीराचार्य)_

     _येथे ६३क्ष + ७ = २३य हे समीकरण सोडविण्यासाठी म. सा. वि. काढण्याच्या भागाकार पद्धतीप्रमाणे १ बाकी येईपर्यंत भागाकार करावयाचे. यात २, १, २, १ ही भागाकारांची वल्ली (वेल). वल्लीच्या खाली क = ७ ही संख्या व त्याखाली शून्य लिहावे. नंतर शेवटून क्रमाने दोन संख्यांच्या गुणाकारात खालची संख्या मिळवून वरवर गेल्यास ७, २१, २८, ७७ ही उत्तरे येतात. (आकृतीतील शेवटचा स्तंभ) यापैकी ७७ ला ६३ ने भागून येणारी बाकी १४ ही य ची आणि २८ ला २३ ने भागून येणारी बाकी ५ ही क्ष ची किंमत. म्हणून प्रत्येक ढिगात कमीत कमी ५ केळी हे उत्तर. अन्य उत्तरे ५ मध्ये २३ मिळवून येणाऱ्या क्रमिकेतील २८, ५१, ७४… असतील._

     _या कोड्यात वल्लीतील संख्या चार म्हणजे सम आहेत. पण त्या विषम असतील असे कोडे भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’त आहे. ‘ज्या पूर्णांकास ६० ने गुणून त्यात १६ मिळवले आणि १३ ने भागले तर बाकी शून्य राहील असा पूर्णांक सांगा.’ येथे ६०क्ष + १६ = १३य. या कोड्यात वल्ली ५ संख्यांची येते. अशा वेळी वरील पद्धतीने आलेल्या ८ व २ या किमती भाज्य (६०) आणि भाजक (१३) यातून वजा कराव्या. म्हणजे क्ष = ११ व य = ५२ अशी उत्तरे मिळतात. अन्य उकली क्ष च्या किमतीत १३ मिळवून येणाऱ्या २४, ३७, ५०… असतील. क ची किंमत ऋण असलेल्या ६०क्ष -१६ = १३य या समीकरणाचे उत्तरही थोड्या बदलांनी काढता येते. कोड्याची काठिण्यपातळी वाढवली की बौद्धिक व्यायाम घडतो. या रीतींचे गणिती तर्क समजून घेणे हेही वेगळे आव्हान आहे!_


🖊 *_निशा पाटील_*

office@mavipamumbai.org

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- ०७ एप्रिल २०२१_*

7 एप्रिल जागतिक आरोग्य संघटना स्थापन दिवस

 *👨‍⚕️👩‍⚕️👨‍⚕️७ एप्रिल १९४८👨‍⚕️👩‍⚕️👨‍⚕️*

🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺

*जागतिक आरोग्य संघटना स्थापना*

🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥

जागतिक आरोग्य संघटना :

*(वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO)* 

      ही एक आंतरराष्ट्रीय सहकार्याने कार्य करणारी संस्था असून ती राष्ट्रसंघाच्या आरोग्य यंत्रणेचा व पॅरिस येथील ‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यालया’चा (Office Internationale d’hygiene Publique) वारसा पुढे चालवीत आहे. *‘आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रक कार्य करणे’* हे या संस्थेचे ध्येय आहे. असे प्रयत्न करणाऱ्या संस्था पूर्वीही होत्या.


   इतिहास : भयंकर साथीचे रोग संसर्गामुळे पसरतात आणि अशा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा विलग्नवास करण्याचे *(इतरांपासून अलग ठेवण्याचे, क्वारंटाइनाचे)* महत्त्व अगदी प्राचीन काळापासून लोकांना पटले होते. *चौदाव्या शतकात अशा विलग्नवासाची व्यवस्था भूमध्य समुद्रावरील बंदरात होती.*


विलग्नवासामुळे रोगांचा प्रसार नेहमी थांबेच असे नाही, कारण त्या काळी रोगप्रसाराच्या कारणांचे ज्ञानच अपुरे होते. निरनिराळ्या देशांतील बंदरांत विलग्नवास व्यवस्था निरनिराळी असे, तसेच त्याकरिता केलेले कायदेही एकाच प्रकारचे नसत त्यामुळे व्यापारउदीमाला बराच अडथळा येई. १८५२ पासून या कायद्यांच्या एकसूत्रीकरणाचे प्रयत्न झाले, परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सूक्ष्मजंतुशास्त्राची भक्कम पायावर स्थापना होऊन रोगप्रतिबंधाच्या मूलतत्त्वांबद्दल बरेचसे एकमत होईपर्यंत या कामी विशेष प्रगती झाली नाही. विलग्नवासविषयक नियमांमुळे साधारण एकसूत्रीपणा आल्यानंतर या कार्यासाठी एखादी आंतरराष्ट्रीय यंत्रणा असावी, असा विचार प्रबळ झाला. अशा यंत्रणेची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे असावीत हा विचारही पटू लागला.


*(१) स्‍वास्थ्यसंरक्षणविषयक आंतरराष्ट्रीय संकेतांचा अर्थ लावून त्यांत वेळोवेळी होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणे त्या संकेतांचा भंग होत असल्याच्या तक्रारीबद्दल अधिकृत मत प्रदर्शित करणे.*

 

*(२) रोगविज्ञानात होत असलेल्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी परिषदा भरवून त्यानुसार आंतरराष्ट्रीय संकेत व कायदे यांत बदल सुचविणे.*        


*(३) साथीच्या रोगांबद्दल जागतिक माहिती गोळा करून ती सर्व देशांना पुरविणे.*


   अशा माहितीच्या आधारावरच विलग्नवासविषयक नियम करण्यात येतात. १९०२ मध्ये या उद्दिष्टपूर्तीसाठी अखिल अमेरिकन आरोग्य संस्था स्थापण्यात आली. १९०९ मध्ये *पॅरिस* येथे *‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यालय’* स्थापण्यात आले. ही संस्थाच पहिली जागतिक स्वरूपाची संस्था असून ती १९४७ ते १९५० च्या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेत विलीन झाली.


   यापूर्वी कित्येक वर्षे आंतरराष्ट्रीय सहकार्याने सोडवण्यासारख्या अनेक प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधले गेले होते. उदा., औषधिद्रव्ये व रक्तरसापासून (रक्तातील घन पदार्थविरहित रक्तद्रवापासून) बनविलेल्या लसींचे प्रमाणीकरण, रोगांचे सर्वमान्य असे नामाभिधान ठरविणे, जन्ममृत्यूंची माहिती एकत्र करून पुरविणे व मादक पदार्थांविषयी (अफू, कोकेन वगैरेंविषयी) वैद्यकीय माहिती पुरविणे वगैरे. रोगासारख्या संकटाविरुद्ध आंतरराष्ट्रीय आघाडी उभारावयाची असेल, तर त्यासाठी प्रत्येक राष्ट्रातील जनतेची आरोग्यपातळी वाढविणे हाच एक कायमचा आणि खरा टिकाऊ उपाय आहे, याचीही जाणीव होऊ लागली. रोगसंसर्ग कमी होण्यासाठी राष्ट्राराष्ट्रांनी आपापसांत बांध उभे करणे हे प्रभावी साधन होऊ शकत नाही, हेही पटू लागले होते. पॅरिस येथील संस्थेच्या घटनेत अशा तऱ्हेच्या जागतिक प्रयत्नांना वाव नसल्यामुळे १९२१ मध्ये राष्ट्रसंघाने अशी जागतिक आरोग्य यंत्रणा उभी केली, ही एक सुदैवाचीच गोष्ट मानली पाहिजे.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

16। मार्च झिमँन ओहम

 *_🎧आजचे शास्त्रज्ञ 🎧_*


*_गेऑर्ग झिमॉन ओहम_*


*_बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ_*


*_जन्मदिन - मार्च १६, इ.स. १७८९_*

****************************

_गेऑर्ग झिमॉन ओम[१] (आंग्लीकरणातून उद्भवलेला मराठी नामभेद: जॉर्ज सायमन ओह्म ; जर्मन: Georg Simon Ohm) (मार्च १६, इ.स. १७८९ - जुलै ६, इ.स. १८५४) हा बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ होता. याने शाळेत शिक्षकी पेशा करताना अलेस्सांद्रो व्होल्टा या इटालियन आविष्कारकाने बनवलेल्या विद्युतरासायनिक घटावर अधिक संशोधन करण्यास आरंभ केला. या संशोधनातून घडवलेल्या स्वनिर्मित उपकरणाद्वारे याने संवाहकाच्या दोन टोकांतील विभवांतर आणि संवाहकातून वाहणारी विद्युतधारा यांच्यामधील परस्परसंबंध सिद्ध केला. हा संबंध "ओमचा नियम" म्हणून प्रसिद्ध आहे._


*_ओमचा नियम_*

_संवाहकाच्या दोन टोकांत वाहणारी विद्युतधारा, त्या दोन टोकांमधील विभवांतराच्या समानुपाती असते._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

16 मार्च बाबाराव दामोदर सावरकर स्मृती दिवस

 ********************************


*१६ मार्च - बाबाराव दामोदर सावरकर यांचा स्मृतीदिन*


********************************


जन्म - १३ जून १८७९ (नाशिक)

स्मृती - १६ मार्च १९४५


गणेश उर्फ (बाबाराव) दामोदर सावरकर यांचा आज स्मृतीदिन. त्यांचा जन्म १३ जून १८७९ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला.


बाबाराव यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान आहे. गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा.विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा.सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला. लहानपणी त्यांची प्रकृती नाजूक होती. सहाव्या वर्षापासून चौदाव्या वर्षापर्यंत त्यांना सुमारे दोनशे वेळा विंचूदंश झाले. पुढील क्रांतीकारी आयुष्यात यातना सहन करण्याची शक्तीो यावी, अशीच ही निसर्गाची योजना असावी. 


तरुण वयातही त्यांनी स्वत:च्या शरीरास मुद्दामहून खूप कष्ट दिले. कडक थंडीत देखील ते उघड्या अंगाने, पांघरूण न घेता घराबाहेर झोपत. त्यांच्या डोक्यात क्रांतीचेच विचार सतत घोळत असत. बलाढ्य ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध क्रांती करणे हे एकट्यादुकट्याचे काम नाही, तर त्यासाठी प्रबळ आणि कट्टर संघटना आवश्यक आहे, हे बाबारावांनी लहान वयातच हेरले. यासाठी 'मित्रमेळा' या संघटनेची स्थापना करण्यात आली. 


राष्ट्रगुरु रामदासस्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, नाना फडणवीस आदी थोर पुरुषांच्या जयंत्या जाहीर सभा घेऊन साजऱ्या करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे तरुणांत आणि जनतेत देशभक्ती जागृत होण्यास खूपच मदत झाली. या निमित्ताने लोकमान्य टिळक, 'काळ' या वर्तमानपत्राचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांची देशभक्तीगने रसरसलेली भाषणे नाशिककरांना ऐकण्याची संधी प्राप्त झाली. 


अभिनव भारत आणि मित्र मेळा या संघटनांचा कार्यभार त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळला. योगविद्या, वैद्यकाचा नाद असल्याने त्या अनुषंगाने त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले. ते स्वतः अनेक प्रकारची औषधेही तयार करीत असत. 


फलज्योतिष्य, शरीर सामुद्रिक, हस्त सामुद्रिक, मंत्रशास्त्र, योग, वेदान्त अशा शास्त्रांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. ते स्वतः चांगले गात असत तसेच तबला आणि सतार वाजवू शकत असत. त्यांच्या संग्रहात इतिहास, राजकारण, राज्यशासन, भाषा, सैन्यव्यवहार, धर्म, तत्त्वज्ञान, चरित्रे, संघटनशास्त्र, कला, इ. अनेक विषयांची हजारो पुस्तके होती, त्यांचा सखोल अभ्यास बाबारावांनी केला होता. 


बाबाराव सावरकर यांचे १६ मार्च १९४५ रोजी निधन झाले.

संकलन गजानन गोपेवाड


संदर्भ : इंटरनेट


********************************

करामती काकुरो कोडे

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*


          🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *_करामती काकुरो कोडे_*

***********************


_नियतकालिकांच्या सुरुवातीपासून सर्वसामान्य वाचकाच्या बुद्धीला चालना देणारा, शब्दसंग्रह वाढवणारा, जिव्हाळ्याचा स्तंभ म्हणजे- शब्दकोडे! गणिती ज्ञानाला आव्हान देणारी कोडीसुद्धा लोकप्रिय झाली. परंतु जनमानसाला आनंद देणारी, आकड्यांना खेळवणारी, सर्व गणितप्रेमींना हवीहवीशी वाटणारी दोन प्रमुख कोडी म्हणजे- सुडोकु आणि काकुरो! दोन्हींत १ ते ९ आकड्यांच्या रचना असल्या; तरी प्रमुख वेगळेपण म्हणजे सुडोकुमध्ये आकड्यांची मांडणी महत्त्वाची, तर🙅काकुरोत आकड्यांची बेरीज महत्त्वाची असते. काकुरो हा ‘कासान’(म्हणजे बेरीज)आणि ‘कुरोसु’ (म्हणजे आडवे-उभे) या २ जपानी शब्दांचा मिळून झालेला शब्द आहे. म्हणून काकुरो म्हणजे आडव्या-उभ्या बेरजेचे अंकांचे कोडे. हे कोडे ‘डेल’ या नियतकालिकातील एक कॅनेडियन कर्मचारी जेकब ई. फंक यांनी १९६६ च्या सुमारास तयार केले. त्या वेळी कोड्याला ‘उभे-आडवे गणित (क्रॉस सम)’ हे नाव दिले गेले होते. हे कोडे ‘उभ्या-आडव्या बेरजा (क्रॉस अ‍ॅडिशन)’ या नावानेसुद्धा ओळखले जाते. परंतु लोकप्रिय झाले ते काकुरो या नावाने!_

     _काकुरो कोडे बनते ८७८ चौरसांनी प्रत्येक चौरसाचे कर्णामुळे झालेले दोन भाग धरले, तर १६७१६ भागांनी, ज्यात काळे-पांढरे भाग असतात. नेहमीच्या काकुरो कोड्यात बेरजेचे आकडे लिहिलेले असतात. कोडे सोडवणे म्हणजे योग्य बेरजा येतील अशा अंकांनी सर्व रिकामे चौकोन भरणे. प्रथम सोप्या बेरजांचे चौकोन भरावे. उदाहरणार्थ, ४ म्हणजे १+३ किंवा ३+१, १७ म्हणजे ९+८ किंवा ८+९ इत्यादी. हे कोडे सोडवताना गणितातील क्रमपर्याय (पम्र्युटेशन) व संयोग (कॉम्बिनेशन) यांचा उपयोग करून एकच बेरीज येईल असे वेगवेगळे संच करता येतात. चौकोनात भरायची जागा साहचर्य नियम (असोसिएटिव्ह लॉ) आणि क्रमनिरपेक्षता नियम (कम्युटेटिव्ह लॉ) या गुणधर्मांनी ठरवता येते. उदाहरणार्थ, आकृतीतील कोड्यात ३० ही बेरीज असलेल्या उभ्या स्तंभात ९, ८, ७, ६ हे आकडे येऊ शकतात. त्यांपैकी ६ हाच अंक ७ च्या आडव्या ओळीत येऊ शकतो, कारण ७=६+१. तर १७\२४ हे घर उभी बेरीज १७ व आडवी बेरीज २४ सांगते._

     _काकुरोच्या दुसऱ्या प्रकारात संख्यांचा गुणाकार येतो. यात एकाच अंकाची पुनरावृत्ती होऊ शकते. काकुरोचे उत्तर प्रवर्तन संशोधनातील (ऑपरेशनल रिसर्च) संमिश्र पूर्णांक रेषीय प्रोग्रामिंग (मिक्स्ड इंटीजर लिनिअर प्रोग्रामिंग), बिटवाइज तर्क ही संगणकीय प्रणाली आणि नेटवर्क अ‍ॅनालिसिस या विविध गणिती पद्धतींचा वापर करून काढता येते. सुडोकु व काकुरो यांचे एकत्रित कोडेही करता येते. आता काकुरोचा उपयोग वेळापत्रक निर्मिती, संदेशवहन आणि गोपनीयता अशा क्षेत्रांत करतात

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- १९ मार्च २०२१_*

बस का लागते

 *_आजची माहिती_*


🚌 *_बस का लागते ?_* 🚌

**********************


_बसमध्ये प्रवास करण्यातला आनंद तुम्ही घेत असाल. काही जणांच्या नशिबात मात्र हे सुख नसते. गाडीत बसण्यापूर्वी 'एवोमीन' सारखी गोळी घेणे, प्रवासापूर्वी व प्रवासात काही न खाणे, जेवण केल्यावर प्रवास टाळणे, गाडीत सर्वात मागच्या सीटवर वा दारापाशी बसणे असे अनेक सोपस्कार त्यांना करावे लागतात. वारंवार तोंडाला रुमाल लावून बसणे आणि काही वेळा सारख्या उलटय़ा करणे, हे तुम्ही केव्हा ना केव्हा बघितलेच असेल. त्यामुळे बसमध्ये बसताना आपल्या शेजारी अशी 'संशयास्पद' व्यक्ती नाही, याची खात्री करूनच एखाद्या सीटवर आपण बसतो._

     _अंतर्कर्णामध्ये लॅबीरींथ नावाचा एक भाग असतो. चालताना, हालचाल करताना, दिशा बदलताना शरीराचा तोल सांभाळणे हे याचे कार्य असते. बसमध्ये सारख्या हादर्‍यांनी शरीर थरथरत असते, हलत असते. त्यामुळे या भागाला वारंवार संवेदना पोहोचतात व जास्तीचे काम करावे लागते. सामान्यपणे बऱ्याचशा लोकांचे लॅबीरींथ अशा बदलांशी जुळवून घेते; पण काही व्यक्तींमध्ये मात्र हादऱ्यामुळे व सततच्या वेड्यावाकड्या हालचालींमुळे लॅबीरींथच्या कार्य करण्यावर परिणाम होतो. त्यामुळे अप्रिय संवेदना मेंदूपर्यंत जातात. मेंदूतील उलटीचे नियंत्रण करणाऱ्या केंद्रावर या संवेदनांचा परिणाम होऊन व्यक्तीला उलटी होते. नंतर मानसिक ताण व आपल्याला उलटी होईल या भावनेनेही उलटी करण्याची प्रवृत्ती वाढते व जास्त उलट्या होतात. बोटीत देखील याच कारणामुळे काही जणांना उलट्या होतात. एवोमीनसारख्या औषधात उलटी थांबवणारा व झोप येणारा असा घटक असल्याने उलट्या थांबतात. अशा व्यक्तींनी गोळ्या जवळ बाळगाव्यात. प्रवासात खाद्यपदार्थ घेणे टाळावे. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी अर्धा तास आधी एवोमीनची गोळी घ्यावी._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन_

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...