बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

मधमाशा गुंजराव का करतात


══════════════════════

   संकलन ,,गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🐝 *मधमाशा गुंजारव का करतात ?* 🐝 

***********************************

मधमाशा अवतीभवती घोंघावयाला लागल्या की त्यांचा गूं गूं असा आवाज येत राहतो. इंग्रजीत यालाच 'बझिंग साऊंड' असं म्हणतात. जणू त्या तोंडानेच तसा आवाज करत राहतात, असं आपल्याला वाटतं. पक्षीही तोंडांनं आवाज करतात. प्रत्येक पक्ष्याचा आवाज वेगवेगळा असतो. त्या आवाजावरून पक्ष्याची ओळखही पटते; आणि तसा आवाज पक्षी का काढतात, याचीही माहिती आता मिळालेली आहे. एकमेकांशी दळणवळण साधण्यासाठी, संवादासाठी पक्षी आवाज काढतात. मधमाशाही तसाच एकमेकींशी संवाद साधण्यासाठी हा गुंजारव करत असतील, अशीच समजूत झाल्यास मग नवल नाही.


 प्रत्यक्षात मात्र मधमाशांचा हा आवाज त्यांच्या तोंडातून येत नाही. तो त्यांच्या पंखांचा फडफडाट असतो. त्या एकाच जागी स्थिर असताना, मोहोळात राहुन आपापलं काम करत असताना हा गुंजारव आपल्याला ऐकू येत नाही. त्या जेव्हा मोहोळातून बाहेर पडून उडायला लागतात तेव्हाच त्यांचा गुंजारव ऐकू येतो. त्यावरून हा त्यांच्या पंखांचा फडफडाट असावा, हे ध्यानात यायला हवं. 

 

उडणाऱ्या सर्वच कीटकांना आपले पंख फडफडावे लागतात. त्यामुळे तिथल्या हवेत कंपनं सुरू होतात. हवेच्या कंपन्यांमुळेच ध्वनी निर्माण होत असल्याने पंखांच्या या फडफडाटाचं रुपांतर आवाजात होत असतं. मात्र, तो आवाज आपल्याला ऐकू येणं हे त्या कंपनांच्या वेगावर आणि त्यात असलेल्या ऊर्जेवर अवलंबून असतं. निरनिराळ्या कीटकांच्या पंखांच्या फडफडण्याचा वेग मात्र वेगवेगळा असतो. फुलपाखरंही उडताना आपले पंख फडफडवत असतात. मात्र त्यांचा वेग मंद असतो. एका सेकंदाला फार फार तर सहा ते दहा वेळा त्यांचे पंख फडफडतात. त्यामुळे होणाऱ्या हवेच्या कंपनापोटी आपल्याला ऐकू येईल एवढा आवाज निर्माण होत नाही. डासांच्या पंखांचं फडफडणं मात्र वेगात होतं; पण ते अतिशय लहान असल्यामुळे त्यापोटी निर्माण होणाऱ्या हवेच्या कंपनांचा आवाज जर ते डास आपल्या कानाच्या अगदी जवळ असतील तरच ऐकू येतो. मधमाश्यांचे पंख त्या मानाने मोठे असतात आणि त्यांच्या फडफडण्याचा वेगही जास्त असतो. एका सेकंदात ३०० ते ४०० वेळा हे पंख फडफडतात. साहजिकच त्यापोटी हवेत उठणारी कंपनंही जोमदार असतात. त्यांचाच आवाज गुंजारवाच्या स्वरूपात आपल्या कानी पडतो.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

  

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

मृगजळ का दिसतात


══════════════════════

   *संकलन 

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *मृगजळ का दिसत ?*  

*****************************

मृगजळ म्हणजे एक चमत्कार, अशी सर्वसाधारण समजूत असली तरी तो आहे केवळ एक प्रकाशीय अविष्कार. प्रकाशाच्या एका गुणधर्मापोटी तो साकार होतो. प्रकाशकिरणांचा वेग निरनिराळ्या माध्यमांमध्ये निरनिराळा असतो. घन माध्यमांमध्ये तो कमी असतो. विरळ माध्यमात तो जास्त असतो. निर्वात पोकळीत तो सर्वात जास्त असतो. माळरानावर आपण सुसाट धावू शकतो; पण घनदाट जंगलातून आपल्याला त्याच वेगाने पळता येत नाही. आपला वेग आपोआपच कमी होतो. त्यातलाच हा प्रकार.


 त्यामुळेच एका माध्यमातुन दुसऱ्या माध्यमात शिरताना प्रकाशकिरणांची दिशा बदलते. ते वागतात. कमी वेग असलेल्या माध्यमाच्या दिशेने ते वळतात. यालाच प्रकाशाचे वक्रीभवन किंवा अपवर्तन असे म्हणतात. माध्यमांच्या घनतेनुसार या वक्रीभवनाची मात्राही वेगवेगळी असते.

मृगजळ आपल्याला दिसते ते सहसा अतिशय तापलेल्या रस्त्यावरून जाताना. त्या रस्त्यावर दूरवर एखादे पाण्याने भरलेले तळे असल्यासारखे आपल्याला दिसते. पण त्याच्या जवळ जावे, ते तळे आहे असे वाटते. तिथे पोहोचले तर ते तळे गायब होते. तिथे तसाच तापलेला डांबरी रस्ता असल्याचे आपल्याला दिसते.


 जेव्हा तो रस्ता अतिशय तापलेला असतो तेव्हा त्या रस्त्याच्या निकट असलेल्या हवेच्या थराचं तापमानही चढतं. हवा तापली की विरळ होते. त्याच्यावर असलेल्या तुलनेने थंड असलेल्या हवेच्या थराची घनता जास्त असते. ती दाट असते. त्यामुळे आकाशातून आलेल्या सूर्याप्रकाशाचा किरण प्रथम त्या हवेच्या दाट थरातून जातो. तिथून जेव्हा तो खालच्या तापलेल्या विरळ थरात जातो तेव्हा त्याचा वेग अर्थातच वाढतो आणि त्याची व त्याची दिशा बदलते. ती वरच्या दाट थराच्या म्हणजे कमी वेग असलेल्या माध्यमांच्या दिशेने वळते. तो किरण आपल्या डोळ्यांना भिडतो तेव्हा त्या रस्त्याची प्रतिमा आपल्या डोळ्यात न उमटता वर असलेल्या आकाशाची प्रतिमा तिथे साकार होते. आकाश तर वरच्या बाजूला आहे. मग ते आपल्याला कसे दिसेल, असे वाटल्याने ते त्याचे प्रतिबिंब आहे असा आपला समज होतो. तसे ते प्रतिबिंब जर तिथे पाणी असेल तरच आपल्याला दिसेल, अशा समजुतीने प्रकाशकिरणांचे वक्रीभवन जिथुन झाले त्या ठिकाणी पाण्याचा साठा असल्याचा भास आपल्याला होतो. अशा प्रकारच्या हवेच्या निरनिराळ्या थरात जेव्हा घनता वेगवेगळी असते तेव्हा तेव्हा हा वक्रीभवनाचा खेळ साकार होतो. त्यापायीच समुद्राजवळच्या एखाद्या डोंगराच्या कड्यावर आपण उभे असतो तेव्हाही आपल्याला आकाशात होडी चालल्यासारखी दिसते. वास्तविक ती होडी समुद्राच्या पाण्यात विहरत असते; पण वक्रीभवनापायी तिची ती आभासी प्रतिमा उमटते आकाशाच्या पडद्यावर. तेही मृगजळच.

 

*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

विश्वनाथन चा स्थिरांक


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________संकलन, गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : विश्वनाथचा स्थिरांक*


गणितात भर घालणारी कल्पना अगदी प्राथमिकही असू शकते. पण त्यामुळे मिळणारी अंतिम रचना एकदम वेगळे लक्षणीय रूप घेऊ शकते. उदाहरणार्थ विविध युक्लिडेतर भूमितींची रचना, ज्या भूमिती, युक्लिडच्या भूमितीमधील पाचव्या गृहीतकात थोडे बदल करून एकोणिसाव्या शतकात मिळाल्या. या संदर्भात एक अलीकडचे उदाहरण बघू.


१, १, २, ३, ५, ८, १३,… ही फिबोनासी क्रमिका सुपरिचित आहे. या क्रमिकेत तिसऱ्या संख्येपासून पुढची प्रत्येक संख्या आधीच्या दोन संख्यांच्या बेरजेइतकी आहे जशी की ५ = ३ + २; १३ = ८ + ५.  गणिती भाषेत ही क्रमिका सन = सन-१ + सन-२ (न २ पेक्षा मोठा आहे) या नियमाने तयार होते. सनच्या केवल मूल्याचे (अ‍ॅबसोल्युट व्हॅल्यू) ‘न’वे मूळ काढत गेल्यास ते १.६१८०३. या संख्येजवळ जाते ज्याला ‘सुवर्ण गुणोत्तर’ म्हणतात. दिवाकर विश्वनाथ या गणितज्ञाने १९९८मध्ये सदर क्रमिका रचण्याच्या नियमात एक छोटा बदल केला. तो म्हणजे क्रमिका तिसऱ्या संख्येपासून वन = थ् वन-१ थ् वन-२ (न २ पेक्षा मोठा आहे) या नियमाने तयार करायची जिथे + किंवा – हे चिन्ह यादृच्छिक पद्धतीने ठरवायचे जसे की नाणेफेक करून. म्हणजे छाप आला तर + आणि काटा आला तर -. त्यामुळे कदाचित १, १, -२, -३, -१, ४, -३,. अशी क्रमिका मिळू शकेल किंवा वेगवेगळ्या क्रमिका मिळू शकतील. 


संगणकाच्या मदतीने विश्वनाथ यांनी अशा एक लक्षहून अधिक संख्या असलेल्या अनेक क्रमिका रचल्या आणि वनच्या केवल मूल्याचे (अ‍ॅबसोल्युट व्हॅल्यू) ‘न’वे मूळ ते काढत गेले. त्यांना असे आढळले की जसजसे न वाढत जाते, जसे की दशलक्षापर्यंत, या मुळाचे मूल्य नेहमी १.१३१९८८२४. या संख्येजवळ जाण्याची संभाव्यता एक असते. (चौकट पाहा). हे घडण्याची सिद्धता त्यांनी यादृच्छिक सारणीच्या गुणाकाराचा सिद्धान्त, वास्तव संख्येबाबत उपलब्ध स्टर्न-ब्रोकोट निष्कर्ष, आणि संगणकगणन यातील स्थूलांकन दोष विश्लेषण अशा प्रगत गणिताच्या आधाराने दिली.


विश्वनाथ यांचे हे संशोधन सन २०००मध्ये आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आणि तेव्हापासून १.१३१९८८२४. या संख्येला ‘विश्वनाथचा स्थिरांक’ आणि वरील वन क्रमिका ही ‘विबोनासी क्रमिका’ म्हणून ओळखली जाते. विश्वनाथ यांनी आयआयटी मुंबईमधून संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयात बी.टेक. (१९९२) आणि अमेरिकेतील कोर्नेल विद्यापीठातून पीएच.डी. या पदव्या प्राप्त केल्या (१९९८). सध्या ते अमेरिकेत मिशिगन विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक आहेत.


 – डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

~==========================~

प्रत्येक माणसाच्या शरीरात

 *प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचे वैद्यकीय क्रमांक*

 1. रक्तदाब: 120/80

 2. नाडी: 70 - 100

 3. तापमान: 36.8 - 37

 4. श्वसन: 12-16

 5. हिमोग्लोबिन: पुरुष (13.50-18)

  महिला ( 11.50 - 16 )

 6. कोलेस्टेरॉल: 130 - 200

 7. पोटॅशियम: 3.50 - 5

 8. सोडियम: 135 - 145

 9. ट्रायग्लिसराइड्स: 220

 10. शरीरातील रक्ताचे प्रमाण: 5-6 लिटर

 11. साखर: मुलांसाठी (70-130)

  प्रौढ: 70 - 115

 12. लोह: 8-15 मिग्रॅ

 13. पांढऱ्या रक्त पेशी: 4000 - 11000

 14. प्लेटलेट्स: 150,000 - 400,000

 15. लाल रक्तपेशी: 4.50 - 6 दशलक्ष..

 16. कॅल्शियम: 8.6 - 10.3 mg/dL

 17. व्हिटॅमिन डी3: 20 - 50 एनजी/मिली (नॅनोग्राम प्रति मिलीलीटर)

 18. व्हिटॅमिन बी12: 200 - 900 pg/ml


 *जे खालील नमूद वय ओलांडले आहेत त्यांच्यासाठी टिप्स:*

    *40*

    *50*

    *60*

  आणि वर,

  *देव तुम्हाला आज्ञापालन, आरोग्य आणि निरोगीपणा देवो..*


             *पहिली सूचना:*

  तुम्हाला आजारी वाटत नसताना किंवा कोणताही आजार नसला तरीही तुम्हाला दरवर्षी कपिंग करावे लागते.

  ?

 (कपिंग म्हणजे काय?

 कपिंग ही एक प्राचीन उपचार पद्धती आहे जी काही लोक वेदना कमी करण्यासाठी वापरतात.  प्रदाता तुमच्या पाठीवर, पोटावर, हातावर, पायांवर किंवा तुमच्या शरीराच्या इतर भागांवर कप ठेवतो.  कपच्या आत, व्हॅक्यूम किंवा सक्शन फोर्स त्वचेला वर खेचते.

         कपिंग हे पारंपारिक चीनी आणि मध्य पूर्व औषधांचा एक प्रकार आहे.  लोकांनी हजारो वर्षांपासून कपिंग थेरपीचा सराव केला आहे.)


          *दुसरी सूचना:*

  तुम्हाला तहान लागली नाही किंवा गरज नसली तरीही नेहमी पाणी प्या... आरोग्याच्या सर्वात मोठ्या समस्या आणि त्यापैकी बहुतेक शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे आहेत.


           *तिसरी टीप:*

  तुम्ही तुमच्या व्यस्ततेच्या शीर्षस्थानी असतानाही खेळ खेळा... शरीराला हालचाल करणे आवश्यक आहे, जरी फक्त चालणे... किंवा पोहणे... किंवा कोणत्याही प्रकारचे खेळ.


  *चौथी टीप*

 जेवण कमी करा...


  जास्त अन्नाची लालसा सोडा...कारण ते कधीही चांगले आणत नाही.  *स्वतःला वंचित ठेवू नका, पण प्रमाण कमी करा.*


          *पाचवी टीप*

  शक्य तितके, अगदी आवश्यक असल्याशिवाय कार वापरू नका... तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुमच्या पायावर पोहोचण्याचा प्रयत्न करा *(किराणा, एखाद्याला भेटणे...) किंवा कोणतेही ध्येय*.


           *सहावी टीप*

  राग सोडा...

  राग सोडा...

  राग सोडा...

  काळजी सोडून द्या... गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा...

 गडबडीच्या परिस्थितीत स्वतःला गुंतवू नका... ते सर्व आरोग्य कमी करतात आणि आत्म्याचे वैभव काढून घेतात.  तुम्हाला आरामदायक वाटणारी दाई निवडा.


          *सातवी टीप*

  म्हटल्याप्रमाणे..तुमचे पैसे उन्हात सोडा..आणि सावलीत बसा..स्वत:ला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मर्यादित करू नका..पैसा त्याच्यासाठी जगण्यासाठी बनवला आहे, जगण्यासाठी नाही.


  *आठवी टीप*

  स्वतःला कोणाबद्दल वाईट वाटून घेऊ नका,

  किंवा ज्या गोष्टीवर तुम्ही साध्य करू शकत नाही,

   किंवा तुमच्या मालकीची नसलेली कोणतीही गोष्ट.

  त्याकडे दुर्लक्ष करा, विसरा;


          *नववी टीप*

 नम्रता..मग नम्रता..पैसा,प्रतिष्ठा,सत्ता आणि प्रभावासाठी..त्या सर्व गोष्टी अहंकाराने आणि अहंकाराने भ्रष्ट झालेल्या आहेत.

  नम्रता ही लोकांना प्रेमाने तुमच्या जवळ आणते.


           *दहावी टीप*

  जर तुमचे केस राखाडी झाले तर याचा अर्थ आयुष्याचा अंत होत नाही.  चांगले जीवन सुरू झाल्याचा तो पुरावा आहे.  आशावादी, आठवणीने जगा, प्रवास करा, स्वतःचा आनंद घ्या.


*शेवटचा आणि सर्वात महत्वाचा सल्ला स्वतःची काळजी घ्या.*

...गजानन गोपेवाड 

ज्ञान विज्ञान पदार्थांची अँलर्जी का होते


══════════════════════

    संकलन गजानन गोपेवाड 

  

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *पदार्थांचीच अॅलर्जी का होते आणि निरनिराळ्या व्यक्तींना निरनिराळ्या अॅलर्जी का होतात?* 

************************************

आपल्या अवतीभवती आपल्या आरोग्याला बाधा आणू शकतील असे एवढे सूक्ष्मजीव वावरत असतात, की आपण जीवाणू, विषाणू, कवक अशा सूक्ष्मजीवांच्या महासागरातच पोहत असतो, असं एका वैज्ञानिकांनी म्हणून ठेवलं आहे. याएवढ्या आणि डोळ्यांनाच काय, पण शक्तिशाली सूक्ष्मदर्शकांची मदत घेतल्यानंतरही दिसून शकणाऱ्या रोगजंतूंशी सामना करायचा म्हणजे तुकोबांनी म्हटलं आहे तसा रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'; पण अशा कठीण प्रसंगातही आपलीच जीत व्हावी अशी चोख व्यवस्थाही निसर्गानं केलेली आहे. त्यानं आपल्याला एक अशी सुनियोजित, सुबद्ध आणि कार्यक्षम संरक्षणयंत्रणा बहाल केली आहे, की जणू ती आपली कवचकुंडलंच! या संरक्षणयंत्रणेच्या, इम्युन सिस्टिमच्या पाईक असतात आपल्या रक्तातल्या लिम्फपेशी. निरनिराळ्या लिम्फग्रंथींच्या रूपात यांच्या तुकड्या शरीरात सगळीकडे पसरलेल्या असतात. जिथून जिथून म्हणून रोगजंतूंचा शिरकाव शरीरात होऊ शकतो, अशा सर्व ठिकाणी त्यांचं बस्तान असतं. शिवाय रक्तातल्या पेशींच्या रूपात शरीरभर त्यांची गस्त चालूच असते.


या लिम्फपेशींच्या अंगी आपला कोण आणि परका कोण, याची ओळख पटवण्याची क्षमता असते. प्रत्येक रेणूच्या पृष्ठभागावर त्याची निर्विवाद ओळख पटवणारं विशिष्ट अणूंच्या रचनेच्या रूपातलं ओळखपत्र वाचून लिम्फपेशी आगंतुक पाहुणा मित्र आहे की शत्रू आहे, याचा निवाडा करतात. त्याला पिटाळून लावण्यासाठी काही विवक्षित प्रथिनांची प्रतिपिंडांची निर्मिती व्हायला लागते. ही प्रतिपिंडं त्या त्या ओळखपत्राला प्रतिसाद देणारीच असतात. ती त्या अणूंच्या रचनेला मरणमिठीच मारतात. त्यायोगे तो रेणू तर निकामी होतोच; पण ज्या सजीवाच्या अंगावर तो असतो, त्याचंही मरण ओढवतं.


या साऱ्या प्रकारात काही वेळा काही रेणूंच्या बाबतीत काही लिम्फपेशी अतिउत्साही होतात. त्या रेणूच्या विरोधात त्या जोमदार प्रतिक्रिया करतात. ती गोष्ट आठवते ना! एका राजानं, आपण झोपलेले असताना आपल्याला त्रास होऊ नये म्हणून एक माकडाला नेमलं. त्याच्या हाती तलवार दिली. एक माशी नाकावर घोंघावत राजाला त्रास देऊ लागली. कितीही वेळा हाकललं तरी ती जाईना. एकदा ती अशीच नेमकी नाकाच्या शेंड्यावर बसलेली असताना माकडानं तिचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी तलवारीचा घाव घातला आणि... तशीच अवस्था या अतिउत्साही लिम्फपेशींची असते. काही विशिष्ट पदार्थांपासून आपलं संरक्षण करण्यासाठीच त्या कार्यरत होतात; पण उत्साहाच्या भरात त्या अशा काही रसायनांची निर्मिती करतात, की आपल्या श्वासनलिका, रक्तवाहिन्या चोंदून जातात. आपल्याला श्वासोच्छ्वास करणं कठीण होऊन बसतं. रक्तप्रवाहातही अडथळा येतो. हृदयाच्या कामावरही अनिष्ट परिणाम होतो.


ज्याचं संरक्षण करायचं त्या शरीराच्या मुळावरच उठल्यासारखी परिस्थिती होते. यालाच हायपरसेन्सिटिव्हिटी रिअॅक्शन किंवा अॅलर्जी असं म्हणतात. अॅलर्जी का होते, हे जरी आज आपल्याला समजलं असलं, तरी काही पदार्थांची अॅलर्जी का असते, हे गूढ मात्र अजूनही उकललेलं नाही.


*-डाॅ.बाळ फोंडके 

कुतुहल ब्रुनचा स्थिरांक


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : ब्रुनचा स्थिरांक*


मूळ किंवा अविभाज्य (प्राइम) संख्या (२, ३, ५, …) यांचे विविध पैलू या सदरात वेळोवेळी सादर केलेले आहेत. एका मूळ संख्येनंतर एक संख्या सोडून लगेच येणारी संख्याही मूळ संख्या असेल तर त्या दोन संख्यांना जुळ्या (ट्विन) मूळ संख्या म्हटले जाते. जसे की, ३ व ५, ५ व ७, ११ व १३. मूळ संख्या अनंत आहेत हे सिद्ध झालेले आहे, तर जुळ्या मूळ संख्यादेखील अनंत असतील असा कयास आहे पण त्याची सिद्धता झालेली नाही. ती अद्याप अटकळच आहे. जुळ्या मूळ संख्यांची पहिली जोडी म्हणजे ३ व ५ वगळता, आत्तापर्यंत सापडलेल्या सर्व जुळ्या मूळ संख्या (६न – १, ६न +१) अशा स्वरूपाच्या आहेत, जिथे न ही नैसर्गिक संख्या आहे.


सर्व मूळ संख्यांचा व्यस्त घेतला आणि त्यांची बेरीज, म्हणजे १/२ + १/३ + १/५ + १/७ + . केली तर ती अनंताकडे अपसृत (डायव्हर्ज) होते. तसेच जुळ्या मूळ संख्यांच्या बाबतीतही घडेल असे स्वाभाविकपणे वाटते. म्हणजे १/३ + १/५ + १/७ + १/११ + १/१३ + . ही बेरीजदेखील अनंताकडे अपसृत होईल. नवल म्हणजे तसे घडत नाही. नॉर्वे देशवासीय गणितज्ञ व्हिगो ब्रुन यांनी १९१९ साली एका शोधलेखाद्वारे सिद्ध केले की ती बेरीज एका सान्त मूल्याच्या जवळपास म्हणजे १.९०२१६०. अशी येते. या संख्येला ब्रुनचा स्थिरांक असे संबोधले जाते आणि ‘बी२’ या चिन्हाने दर्शवले जाते. या स्थिरांकाचे अधिकाधिक अचूक मूल्य काढण्याचे प्रयत्न चालू असून ते सध्या १.९०२१६०५८३१०४. असे आहे. १९२० साली गोल्डबाखच्या अटकळीसंबंधी प्रसिद्ध झालेले ब्रुनचे प्रमेयही उल्लेखनीय आहे.


दोन जुळ्या मूळ संख्यांची जोडी, ज्यांच्या पहिल्या जोडीतील शेवटच्या आणि दुसऱ्या जोडीतील पहिल्या संख्येतील अंतर चार आहे, त्यांना चतुष्क (क्वाड्रुप्लेट) मूळ संख्या म्हणतात, उदा. (५, ७, ११, १३), (११, १३, १७, १९), (१०१, १०३, १०७, १०९). त्यांचा व्यस्त घेऊन बेरीज केल्यास आणखी एक स्थिरांक मिळतो. त्याला ब्रुनचा स्थिरांक ‘बी४’ असे म्हणतात. त्याचे मूल्य जवळपास ०.८७०८५८३८००. इतके आहे. अशा प्रकारे विविध मूळ संख्यांच्या जोड्या घेऊन त्यांच्या व्यस्तांची बेरीज करून नव्या स्थिरांकांचा तपास गणितज्ञ करत आहेत. तुम्हीही याचप्रमाणे वेगवेगळ्या संख्यांचे व्यस्त घेऊन असा अभ्यास सहज हाती घेऊ शकता.


– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

~==========================~

पृथ्वी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

              *१३ डिसेंबर २००१*

♟♟♟♟♟♟♟♟♟♟♟♟♟♟♟♟♟


      *भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी.*

 

"पृथ्वी" हे भारतीय सैन्याचे "पृष्ठभाग ते पृष्ठभाग" (Surface to Surface) निम्न पल्ला प्रक्षेपास्त्र (Short Range Ballistic Missile) आहे. हे प्रक्षेपास्त्र भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने "एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमा" अंतर्गत विकसित केले आहे.

विकास आणि इतिहास

भारत सरकारने वेगवेगळी युद्ध क्षेपणास्त्रे व पृष्ठभाग ते आकाश या मालिकेतील क्षेपणास्त्रांवरील स्वावलंबनासाठी १९८३ साली "एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम" सुरू केला. या अंतर्गत विकसित केलेले पृथ्वी हे पहिले प्रक्षेपास्त्र आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने याआधी "प्रोजेक्ट डेव्हिल" अंतर्गत सोविएत रशियाच्या एसए-२ पृष्ठभाग ते आकाश या क्षेपणास्त्राची उलट अभियांत्रिकी केली होती. "पृथ्वी"ची प्रणोदन प्राद्योगिकी (Propulsion Technology) ही एसए-२ पासुन उत्पादित केली असल्याचे मानले जाते. या प्रक्षेपास्त्राच्या प्रारूपांमध्ये स्थायू अथवा द्रव, अथवा या दोन्ही प्रकारची इंधने वापरली जातात. युद्धभूमीवरील वापरासाठी विकसित केलेले हे प्रक्षेपास्त्र सामरिक उपयोगासाठी स्फोटक शीर्षावर अण्वस्त्रेसुद्धा वाहून नेऊ शकते.


प्रारूपे

पृथ्वी प्रक्षेपास्त्र प्रकल्पामध्ये भारतीय सेना, नौसेना व वायु सेना या तिन्ही दलांसाठी असलेली "पृथ्वी"ची प्रारूपे अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. सुरुवातीच्या एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या प्रकल्पामध्ये पृथ्वी प्रक्षेपास्त्राच्या संरचना रूपरेषेत खालील प्रारूपे अंतर्भूत आहेत.


पृथ्वी - १ (एसएस- १५०) - भारतीय सेनेसाठी (१,००० किलो च्या स्फोटक शिर्षासह १५० किलोमीटर लांबीचा पल्ला)


पृथ्वी - २ (एसएस- २५०) - भारतीय वायुसेनेसाठी (५०० किलो च्या स्फोटक शिर्षासह २५० किलोमीटर लांबीचा पल्ला)


पृथ्वी - ३ (एसएस- ३५०) - भारतीय नौसेनेसाठी (५०० किलो च्या स्फोटक शिर्षासह ३५० किलोमीटर लांबीचा पल्ला)

धनुष - बातमीनुसार धनुष हे भारतीय नौसेनेसाठीचे युद्धनौकेवरून डागण्यात येऊ शकणारे प्रारूप आहे. काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार धनुष ही संतुलित मंच असलेली अशी रचना आहे की ज्यावरून पृथ्वी - २ व पृथ्वी - ३ अशी दोन्ही प्रक्षेपास्त्रे युद्धनौकेवरून डागण्यात येऊ शकतील. तर काही सूत्रांच्या मते धनुष हे पृथ्वी - २ या प्रक्षेपास्त्राचे प्रारूप आहे.

वर्षानुवर्षे ही वैशिष्ठ्ये अनेक बदलांमधून गेली. भारताने लष्करी वापराकरिता तयार केलेल्या या वर्गातील कुठल्याही क्षेपणास्त्राला पृथ्वी या कूटनामाने ओळखले जाते. मात्र नंतरच्या विकसनशील प्रारूपांना पृथ्वी-२ आणि पृथ्वी-३ या नावाने ओळखले जाते.


वर्णन


पृथ्वी १

पृथ्वी १ हे १००० किलो स्फोटक शिर्षाची क्षमता व १५० किलोमीटर चा पल्ला असलेले भूपृष्ठ ते भूपृष्ठ क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची अचूकता १०-५० मीटर असून हे ऊर्ध्व परीवाहक पट्ट्यावरून डागण्यात येऊ शकते. या वर्गातील पृथ्वी क्षेपणास्त्र भारतीय सेनेत १९९४ साली नियुक्त करण्यात आले.


पृथ्वी २

पृथ्वी २ हे प्रक्षेपास्त्र २५० किलोमीटर च्या वाढीव पल्ल्यासह १००० किलोचे स्फोटक शीर्ष असलेले क्षेपणास्त्र आहे. पृथ्वी २ हे एकस्तरीय द्रव इंधन वापरणारे क्षेपणास्त्र आहे व त्याची लांबी- ९ मीटर व्यास- १.१० मीटर, वजन-४००० ते ४६०० किलो आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय वायु दलाच्या प्रार्थमिक वापराकरिता तयार केले गेले. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी २७ जानेवारी १९९६ रोजी केली गेली व याच्या विकसित आवृत्त्या २००४ मध्ये पूर्ण करण्यात आल्या. सध्या पृथ्वी २ या क्षेपणास्त्राची भारतीय वायु दलातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सध्याच घेण्यात आलेल्या एका चाचणीत हे क्षेपणास्त्र ३५० किलोमीटरच्या वाढीव पल्ल्यासह व सुधारित 'जडत्व परिभ्रमण सहाय्यता प्राप्त' सह डागण्यात आले. या प्रक्षेपास्त्रामध्ये प्रक्षेपास्त्र-विरोधी क्षेपणास्त्रांना चकवण्याची वैशिष्ठ्ये आहेत. बातम्यांच्या अनुसार या प्रक्षेपास्त्रच पल्ला आता ३५० km पर्यंत वाढवण्यात आला आहे.


पृथ्वी ३

पृथ्वी ३ वर्ग (कूट नाम "धनुष") हे द्विस्तरीय नौका ते पृष्ठभाग प्रक्षेपास्त्र आहे. पहिला स्तर १६ मेट्रीक टन बल (१५७ kN) जोर मोटरचा असून त्यात स्थायुरूपी इंधन वापरले जाते. दुसऱ्या स्तरामध्ये द्रवरूपी इंधन वापरले जाते. प्रक्षेपास्त्र १००० किलोचे स्फोटक शीर्ष ३५० किमी पर्यंत, ५०० किलोचे स्फोटक शीर्ष ६०० किमी पर्यंत आणि २५० किलोचे स्फोटक शीर्ष ७५० km पर्यंत वाहून नेऊ शकते. धनुष प्रणालीमध्ये संतुलित मंच (धनुष्य) आणि प्रक्षेपास्त्र (बाण) हे घटक अंतर्भूत आहेत. अंदाजानुसार धनुष हे पृथ्वी प्रक्षेपास्त्राचेच एक सागरी वापरासाठीच्या योग्यतेचे एक विशिष्ट रूप आहे. "धनुष" डागण्यासाठी जलस्थिर मंचाची आवश्यकता आहे. याचा छोटा पल्ला याच्या गुणांविरुद्ध असल्याकारणाने हे प्रक्षेपास्त्र फक्त शत्रूच्या विमानवाहू नौकेविरोधात अथवा बंदराविरोधात वापरता येते. या प्रक्षेपास्त्राची पृष्ठीय नौकांवरून अनेक वेळा चाचणी घेण्यात आली आहे.

पृथ्वी ३ हे प्रक्षेपास्त्राची चाचणी सर्वप्रथम सुकन्या वर्गीय गस्ती नौकेच्या आय.एन.एस. सुभद्रा वरून २००० साली घेण्यात आली.या नौकेच्या सुधारित, अधिक मजबूत केलेल्या Helicopter deck वरून या प्रक्षेपास्त्राची चाचणी घेण्यात आली. २५० किमी पल्ला असलेल्या प्रारूपाची पहिली चाचणी अंशतः यशस्वी झाली. याची पूर्ण सामरिक चाचणी सन २००४ मध्ये पूर्ण झाली. नंतरच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आय.एन.एस. राजपूत वरून याच प्रक्षेपास्त्राच्या ३५० km पल्ला असलेल्या प्रारूपाची भूपृष्ठावरील लक्ष्य अचूकपणे साधून यशस्वी चाचणी घेण्यात आली. याच प्रक्षेपास्त्राची चाचणी पुन्हा एकदा १३ डिसेंबर २००९ रोजी आय.एन.एस. सुभद्रावरून चांदीपूरच्या एकल परीक्षण क्षेत्रापासून ३५ km लांब समुद्रात उभी करून यशस्वीरीत्या घेण्यात आली. ही या प्रक्षेपास्त्राची सहावी चाचणी होती .

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीर्ष मास,शुक्ल पक्ष,*दशमी*,रेवती नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, १३ डिसेंबर  २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"यह सत्य है कि हमारे हृदय में यदि किसी के लिए प्रेम है एवं विचार सकारात्मक हैं तो अमुक व्यक्ति में कोई दोष दिखाई नही देगा। .. और यदि किसी के लिए ईर्ष्या अथवा घृणा है, तो उसके गुण भी हमे दोष दिखने लगते हैं। अतः मनोस्थिति बदलो और बिना लाभ हानि के प्रेम करना सीखो, ईश्वरीय आनंद की अनुभूति होगी।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

गाथा बलिदानाची हुतात्मा बाबु गेन

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

           *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

            

            *हुतात्मा बाबू गेनू सैद*

        (भारतीय स्वतंत्रता कार्यकर्ता)


               *जन्म : १९०८*

         (महालुंगे, आंबेगाव, पुणे)


     *मृत्यू : १२ डिसेंबर १९३०*

                      (उम्र २२)

                        (मुंबई)


बाबू गेनू सैद  भारत के स्वतंत्रता-संग्राम सेनानी एवं क्रांतिकारी थे। उन्हें भारत में स्वदेशी के लिये बलिदान होने वाला पहला व्यक्ति माना जाता है।


१९३० में महात्मा गांधी ने नमक सत्याग्रह आरम्भ किया | भारतीय स्वतंत्रता संग्राम में इसका विशेष महत्व है | सम्पूर्ण भारत के लोग अबाल-वृद्ध , शिक्षित-अशिक्षित , ग्रामीण नागरिक सबने उसमे भाग लिया | शराब की दुकानों के आगे धरना दिया और विदेशी कपड़ो की होली जलाई , जुलुस निकाले और घरो ने नमक बनाकर नमक कानून को तोड़ा | सरकार ने जनता पर असीम अत्याचार किये | कई लोगो को बंदी बनाया गया , लाठीचार्ज किया गया और बंदूके भी चलाई गयी | इस प्रकार से अत्याचार से विदेशी शासन के विरुद्ध आक्रोश फ़ैल गया |


पुणे जिले के महांनगुले गाँव में ज्ञानोबा आब्टे का पुत्र बाबू गेन,  २२ वर्ष का था वह भी सत्याग्रहियों में सम्मलित था | वह केवल चौथी कक्षा तक पढ़ा हुआ था | बाबू के माता-पिता उससे बहुत प्रेम करते थे | उसके अध्यापक गोपीनाथ पंत उसको रामायण , महाभारत और छत्रपति शिवाजी की कहानिया सुनाते थे | बाबू दस वर्ष का भी नही हुआ था कि उसके पिता की मृत्यु हो गयी और परिवार का भार उसकी माँ के कन्धो पर आ गया | वह भी उसकी सहायता करता था |


माँ उसका जल्दी से जल्दी विवाह करना चाहती थी परन्तु वह भारत माँ की सेवा करना चाहता था इसलिए उसने विवाह करने से मना कर दिया और वह मुम्बई चला गया | वह तानाजी “पाठक” के दल में सम्मिलित हो गया | वह वडाला के नमक पर छापा मारने वाले स्वयंसेवकों के साथ हो गया | वह पकड़ा गया और उसको कठोर कारावास का दंड दिया गया | वह जब यरवदा जेल से छुटा तो माँ से मिलने गया जो लोगो से उसके वीर पुत्र की प्रशंशा सुनकर बहुत प्रसन्न थी |


माँ की आज्ञा लेकर वह फिर मुम्बई अपने दल में जा मिला | उसको विदेशी कपड़ो के बाहर धरना देने का काम सौंपा गया जो उसने बखूबी निभाया | धरना देने वाले सत्याग्रहियों से न्यायाधीश ने पूछा कि क्या तुम विदेशी कपड़ो से भरे ट्रक के सामने लेट सकते हो ? बाबू ने इस चुनौती को मन ही मन स्वीकार कर लिया और यह भी निश्चय कर लिया कि आवश्यक होने पर वह अपना बलिदान भी दे सकता है | १२ दिसम्बर १९३० को ब्रिटिश एजेंटों के कहने से विदेशी कपड़ो के व्यापारियों ने एक ट्रक भरकर उसको सड़क पर निकाला | ट्रक के सामने एक के बाद एक ३० स्वयंसेवक लेट गये और ट्रक को रोकना चाहा | पुलिस ने उसको हटाकर ट्रक को निकलने दिया |


बाबू गेनू  ने ओर कोई ट्रक वहां से न निकलने का निश्चय कर लिया और वह सड़क पर लेट गया | ट्रक उस पर होकर निकल गया और वह अचेत हो गया | उसको अस्पताल ले गये जहा उसकी मृत्यु हो गयी | ट्रक ड्राईवर और पुलिस की क्रूरता से शहीद हो गया किन्तु वह लोकप्रिय हो गया | उसका नाम भारत के घर घर में पहुच गया और बाबू गेनू  अमर रहे के नारे गूंजने लगे | महानुगले गाँव में उसकी मूर्ति लगाई गयी जहा वह शहीद हुआ था | उस गली का नाम गेनू स्ट्रीट रखा गया | कस्तूरबा गांधी उसके घर गयी और उसकी माँ को पुरे देश की तरफ से सांत्वना दी | एक साधारण मजदूर के द्वारा दी गयी शहादत को यह देश कभी नही भूल सकता है |

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद*🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीर्ष मास,शुक्ल पक्ष,*नवमी*,उ.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, १२ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *तन की अस्वस्थता उतनी घातक नहीं होती, जितनी मन की अस्वस्थता घातक होती है। तन से अस्वस्थ व्यक्ति केवल स्वयं को अथवा अधिक से अधिक अपने परिजनों को ही दुख देता है, किन्तु मन से अस्वस्थ व्यक्ति स्वयं को, परिवार को, समाज को और अपने सम्पर्क में आने वाले सभी को कष्ट देता है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

केस कुरळे का होतात


══════════════════════

    @ संकलन 

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *केस कुरळे का होतात ?* 📒

******************************

आपले केस केरटीन या प्रथिनाचे बनलेले असतात. त्यातले काही सरळसोट का राहतात, तर इतर वेडीवाकडी वळणे घेत कुरळे का बनतात, याचं इंगीत प्रथिनांच्या रचनेतच सामवले आहे. प्रथिने ही अमिनो आम्लांची बहुवारिक साखळीच असते. प्रथिनांमध्ये एकूण २० वेगवेगळ्या प्रकारची अमिनो आम्ल असतात. त्यातल्या प्रत्येकाच्या रेणूची अंतर्गत तसंच त्रिमिती रचना वेगवेगळी असली तरी प्रत्येक अमिनो आम्लाच्या एका टोकाला आम्लधर्मीय कार्बोक्सील हा रेणूंचा गट असतो, तर दुसर्या टोकाला अल्कलीधर्मीय अमिनो गट असतो. साखळी गुंफण्यासाठी जेव्हा एका अमिनो आम्लाचा रेणू शेजारच्या दुसर्या अमिनो आम्लाशी जोडला जातो तेव्हा हे अमिनो आणि कार्बोक्सील रेणू एकमेकांशी पेप्टाइड बंध तयार करतात. अशा रीतीने प्रथिनांची प्राथमिक रचना असणारी हि सरळसोट साखळी तयार होते. 


या अमिनो आम्लांवर इतर अणुही असतात. ते टोकाला नसून मधल्या अंगाच्या दोन्ही बाजूंना पसरलेले असतात. ते जराशा दूरवर असलेल्या अमिनो आम्लावरच्या दुसर्या रेणूशी संधान बांधून इतर बंध तयार करतात. त्यामुळे मग या साखळ्या सरळसुत न राहता त्यांच्यामध्ये वेटोळी किंवा मोड तयार होतात. प्रथिनांची द्वितीय स्तरावरची रचना तयार होऊ लागते.


या प्रकारच्या बंधामध्ये सल्फरचे अणुही सहभागी होतात. कित्येक अमिनो अम्लांच्या मध्यभागावर सल्फरचे अणु असतात. त्यांचा संपर्क दुसर्या कोणत्यातरी साखळीत त्यांच्यापासून दूरवर असणाऱ्या अमिनो आम्लाच्या अंगावरच्या सल्फरच्याच अणुशी आला, कि त्यांच्यामध्ये एक पूल तयार होतो. त्याला डायसल्फाईड ब्रिज असे म्हणतात. या पुलांमुळे मग त्या प्रथिनांच्या सरळ असलेल्या साखळीला बाक येतो. त्याची वेटोळी बनतात. केसांमध्ये अशा सल्फरच्या पुलांची संख्या वाढली तर ते कुरळे होतात. जर त्यांची संख्या कमी झाली तर ते सरळ राहतात. केसांमध्ये किती पाणी आहे, यावरही त्यांच्या या रचनेत काही बदल होतात; पण ते कायमचे नसतात. केस कोरडे झाले कि परत आपले मूळ रूप धारण करतात.


काही जण केसांवर काही प्रक्रिया करून त्याचे स्वरूप बदलू पाहतात. सरळ केस असलेली व्यक्ती आपले केस कुरळे करून घेते. तसे करताना ती त्यांच्यातल्या सल्फर पुलांची संख्या वाढवत असते; पण हि स्थिती तात्पुरतीच असते. कारण नव्याने वाढलेले केस परत सरळच राहतात. कालांतराने मग सरळ वळण देण्याच्या प्रयत्नांची होते. काही दिवसांनी ते आपले मुळचे कुरळेपण परत मिरवू लागतात.



आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस

 *⛰️⛰️⛰️११ डिसेंबर⛰️⛰️⛰️*

***********************************

🏔️🏔️ *अंतराष्ट्रीय पर्वत दिवस*🏔️🏔️

)))))))))))))))))))))))))))))))))))))))))))

  अंतराष्ट्रीय पर्वत दिवस २०१९: वर्तमान थीम, इतिहास और मुख्य तथ्य

पहाड़ों के महत्व के बारे में जागरूकता बढ़ाने,अवसरों पर ध्यान केंद्रित करने और पहाड़ों के विकास पर ज़ोर डालने के लिए हर साल ११ दिसंबर को अंतराष्ट्रीय पर्वतीय दिवस (International Mountain Day (IMD) मनाया जाता है.


यह दिन पर्यावरण में पहाड़ों की भूमिका और जीवन पर इसके प्रभाव को समझने के लिए लोगों को शिक्षित करता है. अंतराष्ट्रीय पर्वतीय दिवस हर साल एक विशेष थीम के साथ मनाया जाता है.


अंतराष्ट्रीय पर्वत दिवस २०१९ का थीम "Mountains matter for Youth" है. यह थीम युवाओं पर केंद्रित है ताकि वे परिवर्तन के सक्रिय एजेंटों के रूप में और कल के भविष्य के नेतृत्व के रूप में आगे आ सकें. बच्चों और लोगों को पहाड़ों के बारे में शिक्षित करना आवश्यक है क्योंकि पहाड़ ताजा पानी, स्वच्छ ऊर्जा, भोजन, इत्यादि प्रदान करते हैं.


आइये अंतराष्ट्रीय पर्वत दिवस (IMD) के इतिहास के बारे में जानते हैं.


अंतराष्ट्रीय पर्वत दिवस का गठन १९९२ में तब हुआ जब एजेंडा २१ के अध्याय १३ के "Managing Fragile Ecosystems: Sustainable Mountain Development" को पर्यावरण और विकास पर संयुक्त राष्ट्र सम्मेलन में अपनाया गया. इसमें कोई शक नहीं, इसने पहाड़ों के विकास के इतिहास को एक नया रूप दिया. पहाड़ के महत्व की ओर बढ़ते हुए ध्यान को देखते हुए, संयुक्त राष्ट्र महासभा ने २००२ को संयुक्त राष्ट्र अंतराष्ट्रीय पर्वत वर्ष घोषित किया और ११ दिसंबर को २००३ से अंतराष्ट्रीय पर्वत दिवस के रूप में नामित किया. इसलिए हम कह सकते हैं कि पहली बार अंतराष्ट्रीय पर्वत दिवस ११ दिसंबर २००३ को मनाया गया था. हर साल यह एक विशेष थीम के साथ मनाया जाता है.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीर्ष मास,शुक्ल पक्ष, *अष्टमी*,पू.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ११ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"हम कितने भी पवित्र शब्द, वाक्य, ग्रन्थ, उपनिषद पढ़ लें अथवा बोल लें..., वो तब तक हमारा भला नहीं करेंगे, जब तक हम उन्हें व्यवहारिक जीवन में प्रयोग में नहीं लाते"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कुतुहल भरती आहोटि गणित


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : भरती-ओहोटीचे गणित*


भरतीचा आणि चंद्राचा संबंध समुद्रकिनारी राहणाऱ्या सर्वांनाच माहीत असतो. ते तिथीवरून ढोबळमानाने आज भरती केव्हा येईल आणि ओहोटी केव्हा हे सांगू शकतात. पण ही माहिती पुरेशी नसते. मोठमोठी जहाजे जेव्हा एखाद्या उथळ पाण्याच्या भागातून जाणार असतील तेव्हा भरतीची वेळ आणि त्या वेळेला पाणी किती ‘चढेल’ याची बिनचूक माहिती असणे आवश्यक असते. या गणितात चूक झाली तर जहाज चिखलात रुतून बसू शकते किंवा त्याचा तळ खडकावर फाटू शकतो. आणि हे गणित अतिशय गुंतागुंतीचे असते.


न्यूटनने सतराव्या शतकात फक्त चंद्राचाच नाही तर सूर्याचाही भरती-ओहोटीवर परिणाम होतो हे सिद्ध केले आणि त्या दोहोंचा तुलनात्मक प्रभाव किती असेल याचेही गणित मांडले. हे गणित शास्त्रीय सिद्धांतांवर आधारित असले, तरी त्यात सुधारणेला खूप वाव होता. यात लाप्लासने अनेक सुधारणा केल्या. हळूहळू भरती-ओहोटीला कारणीभूत असलेले अनेक घटक शास्त्रज्ञांना मिळायला लागले. यात पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याने निर्माण होणारी केंद्रगामी प्रेरणा, सूर्याभोवतीच्या लंबवर्तुळाकार मार्गामुळे कमीजास्त अंतर आणि त्यामुळे बदलणारे गरुत्वाकर्षण, पृथ्वीचा झुकलेला अक्ष, चंद्राच्या कक्षेचा पृथ्वीच्या कक्षेशी असणारा कल, चंद्राची अनियमित वेगाने होणारी वाटचाल असे अनेक घटक हाती लागू लागले. याशिवाय इतर ग्रहांचे गुरुत्वाकर्षण, स्थानिक भूप्रदेशाची भौगोलिक ठेवण, पाण्याची खोली असे अतिरिक्त घटक आढळून येऊ लागल्यामुळे भरती-ओहोटीचे गणित अधिकाधिक क्लिष्ट होऊ लागले. यातले बहुतेक घटक हे नियमितपणे बदलणारे असल्यामुळे वेगवेगळेपणाने लहरींच्या स्वरूपात त्यांचे भाकीत करणे शक्य होते, पण अशा २० किंवा ३० घटकांचा एकत्रपणे विचार करणे आणि त्यांचा प्रभाव कोणत्या वेळी किती पडेल हे सांगणे सुमारे १५० वर्षांपूर्वी अशक्यप्राय वाटत होते.


अशा परिस्थितीत काही संशोधकांनी हा प्रश्न यांत्रिक पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला. यात पृथ्वीचे मार्गक्रमण, चंद्राची कक्षा अशा प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्व करणारी चाके किंवा कप्प्या वापरून त्या सर्वांच्या हालचालींची दोरीच्या किंवा तरफांच्या मदतीने एकमेकांशी बेरीज-वजावाकी करून एखाद्या वेळी भरतीची उंची किती असेल याचे भाकीत करण्याची यंत्रे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बनवण्यात आली. ते अगदी प्राथमिक अवस्थेतले संगणकच म्हणावे लागतील. आजमितीस चंद्राच्या भ्रमणाचा कालावधी पायाभूत मानून १९ वर्षांचे चक्र गृहीत धरून हे हिशेब संगणकाच्या मदतीने केले जातात. त्यात मिनिटे आणि सेंटिमीटर्सपर्यंत अचूक अंदाज करता येतात.


– कॅप्टन सुनील सुळे 

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

~==========================~


तोंडाला पाणी का सुटत


══════════════════════

    @ संकलन गजानन गोपेवाड 


══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *तोंडाला पाणी का सुटतं ?* 📒

******************************

आपल्या तोंडात लाळग्रंथी असतात. यांचं काम तोंडात लाळेचा स्राव करण्याचं असतं. लाळेमध्ये असलेले काही पाचक पदार्थ व विकरं अन्नाच्या पचनात मोलाची भुमिका बजावत असतात. त्यामुळे जेव्हा आपण अन्नाचा घास तोंडात घेतो तेव्हा या ग्रंथींमधुन आपोआप लाळेचा पाझर व्हायला सुरुवात होते. त्या घासाचे दातांकडुन तुकडे पडत असताना त्यात लाळ मिसळुन त्यातल्या विकरांमुळे म्हणजेच रासायनिक कातर्‍यांमुळे त्यातील रसायनांच्या रेणुंचे तुकडे व्हायला सुरुवात होते. पचन व्हायला तिथुनच सुरुवात होते. या ग्रंथी काहीवेळा अधिकच उत्साह दाखवतात. त्यामुळे घास प्रत्यक्षात तोंडात पडण्यापुर्वी त्याच्या येण्याची वाट न पाहताच त्या कामाला लागतात. आपण अन्नाची चव जशी जिभेनं घेत असतो तशीच ती नाकानेही घेत असतो. खरं तर अन्नाचा स्वाद आणि सुगंध या दोन्हींचा एकसमयावच्छेदेकरुन वापर करुन आपण अन्नाची चव चाखत असतो. त्यामुळे आवडत्या किंवा मसालेदार पदार्थांचा सुगंध वातावरणात दरवळु लागला की त्या वासानंच आपली भुक चाळवली जाते. सहाजिकच तो पदार्थ आपल्या तोंडात कधी पडतो, याचीच वाट आपण पाहु लागतो. त्या भावनेपोटी मग आपल्या मेंदुतील विवक्षित मज्जापेशी उत्तेजित होतात. त्या आपलं काम करायला सुरुवात करतात आणि लाळग्रंथींना संदेश पाठवु लागतात. त्यांना प्रतिसाद देत मग त्या ग्रंथी कार्यान्वित होतात. त्यांच्यामधुन लाळेचा पाझर होऊ लागतो. यालच आपण पाणी सुटणं असं म्हणतो. काही वेळा अन्नाला तसा सुवास नसतो. पण तो पदार्थ पाहुनही मज्जापेशी चाळवल्या जातात आणि लाळग्रंथींना आदेश मिळतो. तोंडाला पाणी सुटतं ते यामुळेच. अशारितीनं ती एक प्रतिक्षिप्त म्हणजेच आपोआप होणारी घटना आहे.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

  

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

            *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿


        *चक्रवर्ती राजगोपालाचारी*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*प्रथम भारतीय गवर्नर जनरल*


 *जन्म : १० दिसम्बर १८७८* 


(थोरापल्ली,कृष्णागिरी,तामिलनाडू)


   *मृत्यु : २८ दिसम्बर १९७२* 

                (उम्र ९४)

            (मद्रास, भारत)


राजनैतिक पार्टी : स्वतंत्र पार्टी 

                    (१९५९–१९७२)

अन्य राजनैतिक सहबद्धताएं : भारतीय राष्ट्रीय कांग्रेस 

                      (१९५७ से पहले)

इंडियन नेशनल डेमोक्रेटिक कांग्रेस      

                     (१९५७–१९५९)

जीवन संगी : अलामेलु मंगम्मा  

                    (१८९७–१९१६)

विद्या अर्जन : सेंट्रल कॉलेज

             प्रेसीडेंसी कालिज, मद्रास

पेशा : वकील, लेखक, राजनेता


चक्रवर्ती राजगोपालाचारी  राजाजी नाम से भी जाने जाते हैं। वे वकील, लेखक, राजनीतिज्ञ और दार्शनिक थे। वे स्वतन्त्र भारत के द्वितीय गवर्नर जनरल और प्रथम भारतीय गवर्नर जनरल थे। १० अप्रैल १९५२ से १३ अप्रैल १९५४ तक वे मद्रास प्रांत के मुख्यमंत्री रहे। वे दक्षिण भारत के कांग्रेस के प्रमुख नेता थे, किन्तु बाद में वे कांग्रेस के प्रखर विरोधी बन गए तथा स्वतंत्र पार्टी की स्थापना की। वे गांधीजी के समधी थे। (राजाजी की पुत्री लक्ष्मी का विवाह गांधीजी के सबसे छोटे पुत्र देवदास गांधी से हुआ था।) उन्होंने दक्षिण भारत में हिन्दी के प्रचार-प्रसार के लिए बहुत कार्य किया।


💁‍♂ *आरम्भिक जीवन*


उनका जन्म दक्षिण भारत के सलेम जिले में थोरापल्ली नामक गांव में हुआ था। राजाजी तत्कालीन सलेम जनपद के थोरापल्ली नामक एक छोटे से गांव में एक तमिल ब्राह्मण परिवार (श्री वैष्णव) में जन्मे थे। आजकल थोरापली कृष्णागिरि जनपद में है। उनकी आरम्भिक शिक्षा होसूर में हुई। कालेज की शिक्षा मद्रास (चेन्नई) एवं बंगलुरू में हुई।


✴ *मुख्यमंत्री*


सन १९३७ में हुए काँसिलो के चुनावों में चक्रवर्ती के नेतृत्व में कांग्रेस ने मद्रास प्रांत में विजय प्राप्त की। उन्हें मद्रास का मुख्यमंत्री बनाया गया। १९३९ में ब्रिटिश सरकार और कांग्रेस के बीच मतभेद के चलते कांग्रेस की सभी सरकारें भंग कर दी गयी थीं। चक्रवर्ती ने भी अपने पद से त्यागपत्र दे दिया। इसी समय दूसरे विश्व युद्ध का आरम्भ हुआ, कांग्रेस और चक्रवर्ती के बीच पुन: ठन गयी। इस बार वह गांधी जी के भी विरोध में खड़े थे। गांधी जी का विचार था कि ब्रिटिश सरकार को इस युद्ध में मात्र नैतिक समर्थन दिया जाए, वहीं राजा जी का कहना था कि भारत को पूर्ण स्वतंत्रता देने की शर्त पर ब्रिटिश सरकार को हर प्रकार का सहयोग दिया जाए। यह मतभेद इतने बढ़ गये कि राजा जी ने कांग्रेस की कार्यकारिणी की सदस्यता से त्यागपत्र दे दिया। इसके बाद १९४२ में 'भारत छोड़ो' आन्दोलन प्रारम्भ हुआ, तब भी वह अन्य कांग्रेसी नेताओं के साथ गिरफ्तार होकर जेल नहीं गये। इस का अर्थ यह नहीं कि वह देश के स्वतंत्रता संग्राम या कांग्रेस से विमुख हो गये थे। अपने सिद्धांतों और कार्यशैली के अनुसार वह इन दोनों से निरंतर जुड़े रहे। उनकी राजनीति पर गहरी पकड़ थी। १९४२ के इलाहाबाद कांग्रेस अधिवेशन में उन्होंने देश के विभाजन को स्पष्ट सहमति प्रदान की। यद्यपि अपने इस मत पर उन्हें आम जनता और कांग्रेस का बहुत विरोध सहना पड़ा, किंतु उन्होंने इसकी चिंता नहीं की। इतिहास गवाह है कि १९४२ में उन्होंने देश के विभाजन को सभी के विरोध के बाद भी स्वीकार किया, सन १९४७ में वही हुआ। यही कारण है कि कांग्रेस के सभी नेता उनकी दूरदर्शिता और बुद्धिमत्ता का लोहा मानते रहे। कांग्रेस से अलग होने पर भी यह अनुभव नहीं किया गया कि वह उससे अलग हैं।


✳ *राज्यपाल*


१९४६ में देश की अंतरिम सरकार बनी। उन्हें केन्द्र सरकार में उद्योग मंत्री बनाया गया। १९४७ में देश के पूर्ण स्वतंत्र होने पर उन्हें बंगाल का राज्यपाल नियुक्त किया गया। इसके अगले ही वर्ष वह स्वतंत्र भारत के प्रथम 'गवर्नर जनरल' जैसे अति महत्त्वपूर्ण पद पर नियुक्त किए गये। सन १९५० में वे पुन: केन्द्रीय मंत्रिमंडल में ले लिए गये। इसी वर्ष सरदार वल्लभ भाई पटेल की मृत्यु होने पर वे केन्द्रीय गृह मंत्री बनाये गये। सन १९५२ के आम चुनावों में वह लोकसभा सदस्य बने और मद्रास के मुख्यमंत्री निर्वाचित हुए। इसके कुछ वर्षों के बाद ही कांग्रेस की तत्कालीन नीतियों के विरोध में उन्होंने मुख्यमंत्री पद और कांग्रेस दोनों को ही छोड़ दिया और अपनी पृथक स्वतंत्र पार्टी की स्थापना की।


🎖 *सम्मान*


१९५४ में भारतीय राजनीति के चाणक्य कहे जाने वाले राजा जी को भारत रत्न से सम्मानित किया गया। भारत रत्न पाने वाले वे पहले व्यक्ति थे। वह विद्वान और अद्भुत लेखन प्रतिभा के धनी थे। जो गहराई और तीखापन उनके बुद्धिचातुर्य में था, वही उनकी लेखनी में भी था। वह तमिल और अंग्रेज़ी के बहुत अच्छे लेखक थे। 'गीता' और 'उपनिषदों' पर उनकी टीकाएं प्रसिद्ध हैं। इनके द्वारा रचित चक्रवर्ति तिरुमगन, जो गद्य में रामायण कथा है, के लिये उन्हें सन् १९५८ में साहित्य अकादमी पुरस्कार (तमिल) से सम्मानित किया गया। उनकी लिखी अनेक कहानियाँ उच्च स्तरीय थीं। 'स्वराज्य' नामक पत्र उनके लेख निरंतर प्रकाशित होते रहते थे। इसके अतिरिक्त नशाबंदी और स्वदेशी वस्तुओं विशेषकर खादी के प्रचार प्रसार में उनका योगदान महत्त्वपूर्ण माना जाता है।


⏳ *निधन*


अपनी वेशभूषा से भी भारतीयता के दर्शन कराने वाले इस महापुरुष का २८ दिसम्बर १९७२ को निधन हो गया।

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद*🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

आल्फेड नोबल

 *👨‍🔬👨‍🔬👨‍🔬आल्फ्रेड नोबेल👨‍🔬👨‍🔬👨‍🔬*

*********************************

              *स्वीडिश शास्त्रज्ञ*

)))))))))))))))))))))))))))))))))))))))))

*स्मृतिदिन - १० डिसेंबर १८९६*

 

आल्फ्रेड नोबेल (ऑक्टोबर २१, १८३३: स्टॉकहोम - डिसेंबर १०, १८९६) हा स्वीडिश शास्त्रज्ञ होता.

नोबेलचा जन्म २१ ऑक्टोबर १८३३ रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वतः शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले. यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी आल्फ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरीस वडील बंधुचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर आल्फ्रेडने स्वतःला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे डायनामायटाचा शोध लावला.

डायनामायटामुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले व नोबेलने गडगंज संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वतः इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते. त्याकारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख स्वीडिश क्रोनरांचे विश्वस्त मंडळ स्थापले व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देणे आरंभले. हे पारितोषिक म्हणजेच नोबेल पारितोषिक होय.

इ.स. १९५८ साली १०२ अणुक्रमांकाचे मूलद्रव्य प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या बनवण्यात आले; तेव्हा त्याला नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेलियम असे नाव देण्यात आले.

१० डिसेंबर १८९६ रोजी नोबेलचा मृत्यू झाला.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

मार्गशीर्ष मास,शुक्ल पक्ष,*सप्तमी*,शतभिषा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु, युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, १० डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *"सच्चे सम्बन्ध, शहद से अधिक मीठे एवं धन से अधिक मूल्यवान, रेशम से अधिक कोमल एवं दूध से अधिक उज्जवल(श्वेत), किसी भी मीनार से ऊँचे एवं किसी भी शक्ति स्रोत से अधिक शक्तिशाली होते हैं। अतः रिश्तों का मूल्य समझे एवं उन्हें सहेज एवं सम्भालकर कर रखें"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

ज्ञान विज्ञान विजेचा धक्का का बसतो ?*


══════════════════════

    संकलन गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *विजेचा धक्का का बसतो ?* 📒 

************************************

साधा दिवा लावायला जावं किंवा गरम पाण्यासाठी गिझर चालू करायला जावं आणि विजेचा धक्का बसावा, असा अनुभव कित्येक वेळा आलेला असतो. वास्तविक ही उपकरणे चालू करण्यासाठी असलेली बटनं इन्शुलेटेड केलेली असतात. म्हणजेच त्यांच्या बाह्यांगामधून विजेचा प्रवाह खेळणार नाही, अशी व्यवस्था केलेली असते. पण कधी कधी या व्यवस्थेला कुठेतरी तडा जातो आणि केवळ अंतरंगातूनच खेळणारी वीज या बाह्यांगातही प्रवेश करते. तिच्याशी आपला संपर्क आला की मग आपल्याला विजेचा धक्का बसतो. हे असं का होतं ? असा सवाल त्या धक्क्यानं गांगरुन गेल्यावरही आपल्या डोक्यात धुमाकूळ चालत राहतो.


 विद्युतबल हे विश्वाच्या जन्मापासून अस्तित्वात असलेलं मूलभूत बल आहे. विश्वाचा गाडा सुरळीत चालू राहण्यात ते महत्त्वाची भूमिका वठवत असतं. विद्युतबलामध्ये ऋण आणि धन असे दोन विद्युतभार असतात. सामान विद्युतभार एकमेकांना दूर लोटतात, तर विषम विद्युतभार एकमेकांकडे आकर्षित होतात; पण अशा एकमेकांकडे ओढ असणाऱ्या एक धन आणि दुसरा ऋण अशा विद्युतभारांना आपण एकमेकांपासून काही अंतरावर ठेऊ शकतो. त्यापोटी मग त्या दोन भारांमध्ये स्थितीजन्य ऊर्जा निर्माण होते. यालाच आपण विद्युत पोटेन्शियल म्हणतो. जर ते दोन टोकांवरचे भार एकत्र आले तर ही ऊर्जा व्होल्टेजच्या रूपात मोकळी होते. दूरवर राहूनही त्यांना एकत्र आणण्याचं काम ज्यांच्यामधून विद्युतभार सहजगत्या वाहू शकतो असे विद्युतवाहक करतात. तांब्याची तार किंवा साधं पाणी सुद्धा चांगले विद्युतवाहक आहेत. अशा तारेनं जर ते विद्युत भार जोडले गेले तर त्या वाहकातून म्हणजेच तारेतून विद्युतप्रवाह वाहू लागतो. याउलट लाकूड किंवा पोर्सेलीन यांच्यामधून विद्युतप्रवाह सहजगत्या वाहू शकत नाही. हे पदार्थ त्या प्रवाहाला विरोध करतात. त्यामुळे ते विद्युतरोधक बनतात. प्रवाहापासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी अशा विद्युतरोधकांचा वापर केला जातो.

 आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपले शरीरही चांगलं विद्युतवाहक असतं. त्यामुळे एका टोकाच्या विद्युतभाराशी आपल्या शरीराचा संपर्क आला तर शरीरातून विद्युतप्रवाह वाहू लागतो. त्यापोटी उद्भवणाऱ्या व्होल्टेजपोटी अनेक शरीरक्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात. होल्टेजचं प्रमाण जास्त असेल तर या अडथळ्यांची मात्राही जास्त असते. जोरदार धक्का बसल्यासारखी परिस्थिती निर्माण होते.

 

विद्युतप्रवाह नेहमी धन विद्युतभाराकडून ऋण विद्युतभाराकडे वाहत असतो. आपला संपर्क धन विद्युतभार असलेल्या टोकाशी झाला की विद्युतप्रवाह दुसऱ्या टोकाला असलेल्या ऋण विद्युतभाराकडे वाहू लागतो. अर्थात दुसऱ्या टोकाला असा ऋण विद्युतभार असण्याची आवश्यकता असते. जेव्हा आपण जमिनीवर उभे असतो तेव्हा तसा तो असतो; पण आपण लाकडावर जर उभे राहिलो तर दुसऱ्या टोकाला असा विद्युतरोधक असल्यामुळे विद्युतप्रवाह वाहू शकत नाही. त्यामुळे धक्का बसण्यापासून आपली सुटका होते.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 


गाथा बलिदानाची राजा राव तुलाराम सिंह*

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

            *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿


         *राजा राव तुलाराम सिंह*

      (अहीरवाल नरेश,रेवाडी नरेश)

            भारतीय क्रांतिकारी 


१८५७ का प्रथम भारतीय स्वतंत्रता,संग्राम के मुख्य नेता


    *जन्म : ९ दिसम्बर १८२५*

       (रामपुरा,रेवाड़ी, हरियाणा)


  *निधन : २३ सितम्बर १८६३*

                   (उम्र ३७)

        (काबुल,अफ़ग़ानिस्तान)


शासनावधि : १८३७ -१८५७

पूर्ववर्ती : राव पूरन सिंह

उत्तरवर्ती : ब्रिटिश इंडिया सरकार       

                 १८५७-१८७७

   राव युधिष्ठिर सिंह १८७७ के बाद


प्यार का नाम : तुला राम

उपाधि : राव बहादुर

घराना : रेवाडी अहीरवाल राजवंश

पिता : राव पूरन सिंह

माता : रानी ज्ञान कुँवर

धर्म : हिंदू


राव तुलाराम सिंह १८५७ का प्रथम भारतीय स्वतंत्रता संग्राम के प्रमुख नेताओं में से एक थे। उन्हे हरियाणा राज्य में " राज नायक" माना जाता है। विद्रोह काल मे, हरियाणा के दक्षिण-पश्चिम इलाके से सम्पूर्ण बिटिश हुकूमत को अस्थायी रूप से उखाड़ फेंकने तथा दिल्ली के ऐतिहासिक शहर में विद्रोही सैनिको की, सैन्य बल, धन व युद्ध सामाग्री से सहता प्रदान करने का श्रेय राव तुलाराम को जाता है।


अंग्रेजों से भारत को मुक्त कराने के उद्देश्य से एक युद्ध लड़ने के लिए मदद लेने के लिए उन्होंने भारत छोड़ा तथा ईरान और अफगानिस्तान के शासकों से मुलाकात की, रूस के ज़ार के साथ सम्पर्क स्थापित करने की उनकी योजनाएँ थीं। इसी मध्य ३७ वर्ष की आयु में २३ सितंबर १८६३ को काबुल में पेचिश से उनकी मृत्यु हो गई।


💁‍♂ *प्रारम्भिक जीवन*


इनका जन्म हरियाणा राज्य के रेवाड़ी शहर में एक अहीर परिवार में ९ दिसम्बर १८२५ को हुआ। इनके पिता का नाम राव पूरन सिंह  तथा माता जी का नाम ज्ञान कुँवर था। इनके दादा का नाम राव तेज सिंह था।


💥 *१८५७ की क्रांति*


१८५६ की क्रांति में राव तुलाराम ने खुद को स्वतंत्र घोषित करते हुये राजा की उपाधि धारण कर ली थी। उन्होने नसीबपुर- नारनौल के मैदान में अंग्रेजों से युद्ध किया जिसमें उनके पाँच हजार से अधिक क्रन्तिकारी सैनिक मारे गए थे। उन्होने दिल्ली के क्रांतिकारियों को भी सहयोग दिया व १६ नवम्बर १८५७ को, स्वयं ब्रिटिश सेना से नसीबपुर- नारनौल में युद्ध किया, और ब्रिटिश सेना को कड़ी टक्कर दी तथा ब्रिटिश सेना के कमांडर जेरार्ड और कप्तान वालेस को मौत के घाट उतर दिया , परंतु अंत में उनके सभी क्रन्तिकारी  साथी मारे गए राव तुलाराम को घायल  अवस्था में युद्ध क्षेत्र से हटना पड़ा ,वह पराजित हुये पर हिम्मत नहीं हारी । आगे की लड़ाई की रणनीति तय करने हेतु वह तात्या टोपे से मिलने गए, परंतु १८६२ में तात्या टोपे के बंदी बना लिए जाने के कारण सैनिक सहायता मांगने ईरान व अफगानिस्तान चले गए जहाँ अल्पायु में उनकी मृत्यु हो गयी। १८५७ की क्रांति में भागीदारी के कारण ब्रिटिश हुकूमत ने १ मे, राव तुलाराम की रियासत को जब्त कर लिया था। परंतु उनकी दोनों पत्नियों का संपत्ति पर अधिकार कायम रखा गया था। १८७७ में उनकी उपाधि उनके पुत्र 'राव युधिष्ठिर सिंह' को अहिरवाल का मुखिया पदस्थ करके लौटा दी गयी।


♻ *विरासत*


२३ सितम्बर २००१, को भारत सरकार ने महाराजा राव तुलाराम की स्मृति में डाक टिकेट जारी किया। उनके सम्मान में बने, जफरपुर कलाँ का "राव तुलाराम मेमोरियल चिकित्सालय, महाराजा राव तुलाराम मार्ग पर स्थित 'रक्षा अध्ययन व विश्लेषण संस्थान' व महाराजा राव तुलाराम पोलिटेक्निक, वजीरपुर चिराग दिल्ली प्रमुख है।


🏥 *राव तुलाराम चिकित्सालय*


राव तुलाराम चिकित्सालय दिल्ली में DHANSA रोड के रावता मोड के निकट जफरपुर पुलिस स्टेशन के पास स्थित है।

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद*🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...