शनिवार, १२ जून, २०२१

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

ज्येष्ठा मास,शुक्ल पक्ष, *द्वितीय*,आद्रा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, १२ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"त्रुटियां कोई हो, किसी की हो किन्तु दूसरों को दोष देना, हमारा स्वभाव है। हम गिरने पर पत्थर को, डूबने पर पानी को, जलने पर आग और कुछ न कर पाने की स्थिति में भाग्य को दोष देते हैं। दूसरों को दोष देने का अर्थ है कि स्वयं की त्रुटियों को स्वीकार करने की सामर्थ्य न होना और अपने में सुधार की भावी संभावनाओं को स्वयं अपने हाथों से नष्ट कर देना।*

       *स्वयं के जीवन में दोष होने से भी ज्यादा घातक है, दूसरों को दोष देना। क्योंकि इसमें समय का अपव्यय व आत्मप्रवंचना दोनों होते हैं।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शुक्रवार, ११ जून, २०२१

बीरसा मुंडा गाथाबलीदानाची


➿➿➿➿➿➿➿➿➿

       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳

                 ▬ ❚❂❚❂❚ ▬

     संकलन ~ गजानन गोपेवाड 

➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  

🏇⚜️🔫🇮🇳👳‍♀️🇮🇳🔫⚜️🤺

                  

🏹 *जननायक बिरसा मुंडा* 🏹


     *जन्म : 15 नोव्हेंबर 1875*

            *(उलिहातू - झारखंड)*


 *वीरमरण : 9 जून 1900*

                    *(रांची तुरुंग)*

                     (वय - 24 वर्षे)


               सन १७८९ मध्य कंपनी सरकाने १२५०० चौ. मैल क्षेत्राचा छोटा नागपूर विभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. हा सारा डोंगराळ प्रदेश. त्यातले प्रमुख रहिवासी कोल जमातीचे आदिवासी. ते सारे शेती करीत व जंगलावर निर्भर राहात. त्यांच्या प्रत्येक गावच्या प्रमुखाला मुंडा असे म्हणत. या भागातील शेतीवरील व इतर कारांच्या वसुलीसाठी इंग्रजांनी  परप्रांतातील ठेकेदार आणले होते आणि मोगली सत्तेच्या करांच्या दुपटी-तिपटीने या लोकांवर कर लादले होते. हे ठेकेदार मनमानीपणे जादा कर वसूल करीत व ज्यांना कर भरता येत नसत, त्यांच्या जमिनी बळकावीत. त्यामुळे ते बड़े जमीनदार बनले होते. त्यामुळे हजारो आदिवासी भूमिहीन बनले व नगण्य मजुरीवर त्या जमिनदारांच्या जमिनीत मजुरी करू लागले. त्यामुळे ते अन्नाला मोताद झाले. शिवाय जमीनदारांना पालीतून वाहून नेणे, त्यांची सर्वतोपरी विनामूल्य सेवा करणे, त्यांचे चैनबाजीचे सर्व प्रकारचे खर्च भागविणे या आदिवासींना सक्तीचे होऊन बसले. त्यांच्या पूर्वापार न्यायपंचायतीची व्यवस्था इंग्रजांनी मोडून काढली व आपली न्यायदान पध्दती सुरू  केली . त्यासाठी वकील आले. मुकादम्यांचा खर्च लोकांना पेलवेनासा झाला. त्यामुळे हे लोक त्रस्त झाले व कंगाल बनले. तशात या भागात ख्रिस्ती मिशनरी आले. त्यांनी प्रलोभने दाखवून या लोकांना ख्रिस्ती बनविण्याचा सपाटा सुरू केला. जो कोणी ख्रिस्ती होई,  त्याला करात सूट मिळे व त्यांची जमीनही जप्त होत नसे. त्यामुळे हे हजारो आदिवासी ख्रिस्ती बनले. त्यांचा मूळचा धर्म बुडाला. परिणामतः अनेक आदिवासी बंडखोर बनले व त्यांनी राज अधिकान्यांशी, ठेकेदारांशी, नव्या जमीनदारांशी, ख्रिस्ती मिशन-यांशी अनेक वेळा लढे दिले. पण ते इंग्रजांच्या आधुनिक शस्त्र बळामुळे निष्प्रभ ठरले. हे लढे एकोणीसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत चालूच राहिले. शेवटचा सर्वात मोठा लढा दिला बिरसा मुंडाने.

               बिरसा मुंडा यांचा जन्म उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्याच्या बापाचे नाव सुगना मुंडा. त्यालाही आपल्या सगळ्या कुटुंबियांसह ख्रिस्ती धमांचा स्वीकार करावा लागला होता. त्यामुळेच बिरसाचे प्राथमिक शिक्षण बुर्जू येथील जर्मन मिशनच्या शाळेत सुरू झाले. त्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी चाईबासा येथील लूथरन मिशनच्या शाळेत दाखल झाला. तेथेच त्याला ख्रिस्ती मिशन-यांच्या कारवाया समजून आल्या. त्यामुळे त्याच्या मनात इंग्रज सरकारविषयी अत्यंत तिरस्कार निर्माण झाला. नंतर त्याने आपल्या सर्व कुटुंबियांसह त्या अन्यायी लोकांच्या ख्रिस्ती धर्माचा त्याग केला. पुढे तो तोडन ठाण्याअंतर्गत गोडबेडा येथील आनंद पांडे या गुरुंच्या संपर्कात आला. त्यांनी त्याला रामायण - महाभारतातील कथा शिकविल्या व आयुर्वेदाचेही ज्ञान दिले. त्यांच्यासमोर त्याने आपल्या धरतीला इंग्रजांच्या  जुलमी शासनाच्या जाचातून मुक्त करण्याची घोर प्रतिज्ञा केली. बिरसाच्या मनावर हिंदू धर्मातील आदर्श तत्वांचा प्रभाव पडला व  वैष्णव बनला. त्याने शिकार करणे सोडून दिले. आपल्या लोकांच्या मनात नैतिक गुण विकसित करण्यासाठी  त्याने गावोगावी दौरे सुरु केले. 

           बिरसाचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होते.  गोरापान,  अत्यंत तेजस्वी,  उंच तगडा, प्रसन्नमुख, डोक्याला फेटा, पायात खडावा असे त्याचे रूप सर्वांनाच आकर्षित करुन घ्यायचे. त्यामुळे त्याच्या समाजाचे लोक भराभर  त्याचे अनुयायी बनले. त्यांना तर तो'धरतीचा देवच'  वाटायचा. तो सुध्दा लोकांना सांगायचा, " देवपुरूष सिंगबोसाने मला स्वप्नात दर्शन देऊन दिव्य शक्ती दिली आहे. त्या शक्तीच्या बळावर मी आपल्या धरतीला  या इंग्रजांच्या व जमीनदारांच्या जुलमी शासनातून मुक्त करणार आहे. तेव्हा लोकांचा त्याच्यावर जागा त्याच्यावर दृढ विश्वास बसला. बिरसालाही वाटायचे,

 " मी माझ्या समाजाचा उदारकर्ता म्हणून जन्मास आलो आहे. त्याचे अनुयायी हजारोच्या संख्येने वाढू लागले. त्यांच्यामधून त्याने शेकडो चांगले लढवय्ये निवडून आपले सैन्य सज्ज केले. गया मुंडा या आपल्या जिवलग मित्राला त्याने आपला सेनापती म्हणून नियुक्त केले.

          सर्वांनी आपल्या समाजावर इंग्रज अधिका-यांकडून,  ख्रिस्ती मिशन-यांकडून, जमीनदारांकडून व ठेकेदाराकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मरेपर्यंत लढा देण्याची प्रतिज्ञा केली व  स्वराज्य स्थापन करण्याचे ठरविले. इंग्रज सरकारला त्यांच्या हालचालीचा सुगावा लागलाच होता. २४ जेगिस्ट १८९५ रोजी रांची जिल्ह्याच्या इंग्रज पोलिस इंस्पेक्टरने अनेक शिपायांसह रात्री बिरसाच्या घरावर छापा टाकून  झोपेत असतानाच त्याला आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली. बिरसा दोन वर्षांची  सक्तमजुरीची शिक्षा व ५० रु. दंड केला व त्याच्या साथीदाराला प्रत्येकी २०/२० रु. दंड केला.

            कैदेतून सुटून आल्यानंतर बिरसाने नव्या जोमाने संघर्ष सुरू केला. इंग्रजांच्या अनेक ठाण्यांवर त्याने हल्ले केले.  पराक्रमाची शर्थ केली.  पण इंग्रजांच्या  बंदूकांपुढे त्यांची परंपरागत हत्यारे निष्प्रभ ठरली.  शेकडो कोल जवान मृत्युमुखी पडले. एका लढाईत सेनापती गया मुंडा ठार झाला. बिरसाचा मुक्काम घनदाट जंगलातील टेकड्यांवर गुप्त ठिकाणी असे. त्यामुळे तो इंग्रजांच्या हाती लागणे अशक्यप्राय होते .

परतु घरभेद्यांकडून इंग्रजांना त्याचा सुगावा लागताच त्याला घेरून पकडण्यात आले. त्याच्याबरोबर त्याचे ८० अनुयायीसुद्धा जेरबंद झाले. तेव्हा रांचीच्या इंग्रज जिल्हाधिका-याने बिरसाला जमीनदारी देण्याची लालूच दाखवून त्याने आपला उद्योग सोडून द्यावा, असे सांगितले.  पण बिरसाने ते धुडकावले. अखेर तुरुंगात त्याचे फार हाल करण्यात आले आणि विष देऊन मारण्यात आले. बिरसा पटकीमुळे मेला, असे इंग्रज सरकारने खोटेच जाहीर केले. त्याच्या अनुयायांनाही जबर शिक्षा ठोठावण्यात आल्या व बिरसाने छोटा नागपूरमध्ये स्वातंत्र्यासाठी आरंभिलेला लढा चिरडून टाकण्यात आला.

                       अशारीतीने कोल समाजाचा हा  'धरतीचा देव ' बिरसा मुंडा जानेवारी १९०० मध्ये त्या धरतीच्या कुशीतच विसावले.

             बिरसा मुंडा हे आदिवासी क्रांतिकारक होते. बिरसा मुंडा यांना *जननायक* हा किताब लोकांनी बहाल केला. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले आहे. ते एकटेच क्रांतिकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने डाक तिकीट जारी केले असून झारखंड मधील रांची येथे स्मारक बांधण्यात आलेले आहे .

संदर्भ ~ महान भारतीय क्रांतिकारक 

सानेगुरुजी चा परिचय

 *साने गुरुजी यांचा अल्पपरिचय: –* 

         🦋

*नाव (Name) पांडुरंग सदाशिव साने*

*जन्म (Birth Date ) 24 डिसेंबर 1899*

*जन्मस्थान:- (Birthplace) पालगड जिल्हा रत्नागिरी*

*वडील (Father Name ) सदाशिव साने*

*आई (Mother Name) यशोदाबाई साने*

*चळवळ (Movement):- भारतीय स्वातंत्र्य लढा*

*मृत्यू (Death) 11 जून 1950*

 *साने गुरुजी यांचे जीवन – Sane Guruji History:-*

साने गुरुजींचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे 24 डिसेंबर 1899 ला  झाला.  साने गुरुजींच्या आजोबांच्या वेळी त्यांची परिस्थिती अत्यंत वैभवसंपन्न होती त्यांचे घराणे खोताचे काम करीत. पुढे वडील सदाशिवरावांच्या काळात मात्र आर्थिक परिस्थिती ढासळत गेली, एवढी की घरादारावरही जप्ती आली. त्यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा फार प्रभाव पडला. तिने केलेल्या संस्कारांमुळे साने गुरुजी घडले.


शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमळनेर इथं प्रताप विद्यालयात त्यांनी शिक्षकाची नौकरी स्वीकारली. याठिकाणी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सांभाळतांना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. सेवावृत्ती शिकवली, विद्यार्थ्यांचे ते सर्वाधिक आवडते शिक्षक झाले. अमळनेर या ठिकाणी साने गुरुजींनी प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं तत्वज्ञानाचा अभ्यास देखील केला.

1928 साली साने गुरुजींनी ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक सुरु केले. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार प्रभाव होता. स्वतःच्या जीवनात देखील ते खादी वस्त्रांचाच वापर करीत असत. समाजातील जातीभेदाला, अस्पृश्यतेला, अनिष्ट रूढी परंपरांना साने गुरुजींनी कायम विरोध केला. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या साने गुरुजींनी 1930 साली शिक्षकाची नौकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत उडी घेतली. 


1942 च्या चळवळीमधे भूमिगत राहून सानेगुरुजीनी स्वातंत्र्याचा प्रचार केला. स्वातंत्र्य समरातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. नाशिकला कारागृहात त्यांनी श्यामची आईचे लेखन पूर्ण केले, धुळे येथे कारागृहात असतांना साने गुरुजींनी विनोबा भावे यांनी सांगितलेली ‘गीताई’ लिहिली.

लहान मुलांच्या बाल मनावर चांगल्या संस्कारांची बीज पेरली जावीत म्हणून गुरुजींनी विपुल लेखन केलं. आपल्या आईवर त्याचं अत्यंत प्रेम होतं, हे त्यांनी लिहिलेल्या “श्यामची आई” या पुस्तकातून आपल्याला कळत, जाणवतं. श्यामची आई या पुस्तकातून त्यांनी आपल्या आईच्या सगळ्या आठवणी सांगितलेल्या आहेत.  साने गुरुजींचं मन अत्यंत भावनाप्रधान आणि संवेदनशील होतं त्यामुळे आईने ज्या सदभावना त्यांच्यात रुजवल्या त्याची वाढ त्यांच्यात वेगानं झाली.


अमळनेर, धुळे आणि नाशिक इथं काही काळ त्याचं वास्तव्य होतं. पुढे खान्देशला त्यांनी आपली कर्मभूमी बनविलं. प्रांताप्रांतातील भेदभाव दूर व्हावा आणि सर्वत्र बंधूप्रेमाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी साने गुरुजींनी आंतरभारती ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. साहित्य संमेलनात तशी इच्छा त्यांनी बोलून देखील दाखवली होती. त्याकरता त्यांनी पैसा गोळा केला होता, रवीन्द्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी आंतरभारती संस्था स्थापन करण्याचा त्यांचा मनोदय होता.


साने गुरुजींचे निधन – Sane Guruji Death

11 जून 1950 रोजी साने गुरुजींचे निधन झाले.


*बलसागर भारत होवो…विश्वात शोभूनी राहो*


*राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया हो…*


या साने गुरुजींनी लिहिलेल्या कवितेने त्यावेळी नागरिकांवर प्रभाव वाढला होता. त्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांच्या काव्यपंक्ती देखील जप्त केल्या होत्या.


*साने गुरुजींचे प्रकाशित साहित्य – Sane Guruji Books:-*

अमोल गोष्टी

कर्तव्याची हाक

कला म्हणजे काय

आपण सारे भाऊ भाऊ

आस्तिक

इस्लामी संस्कृती

कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य

क्रांती

गुरुजींच्या गोष्टी

गीताहृदय

कला आणि इतर निबंध

‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर

गोड गोष्टी

गोड शेवट

गोष्टीरूप विनोबाजी

श्यामची आई (Shyamchi Aai)

श्यामची पत्रे

सोनसाखळी व इतर कथा

स्वप्न आणि सत्य

स्वर्गातील माळ

सुंदर पत्रे

हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे

साधना – साप्ताहिक

सोन्या मारुती

रामाचा शेला

सती

संध्या

मानवजातीचा इतिहास

ते आपले घर

त्रिवेणी

धडपडणारी मुले

नामदार गोखले- चरित्र

विनोबाजी भावे

विश्राम

*अशा या महानायकाच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन*

     *@संकलन@*

*श्री गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

         ➖🙏➖

गुरुवार, १० जून, २०२१

आदर्श जिवन जगण्याची उमेद

 *आदर्श जीवन जगण्यासाठी*


☞ (०१) चूक झाली तर मान्य करा.

☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या.

☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा.

☞ (०४) आभार मानायला विसरू नका.

☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.

☞ (०६) सतत हसतमुख रहा.

☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.

☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.

☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.

☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.

☞ (११) कृती पुर्व विचार करा.

☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.

☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा.

☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.

☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा.

☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या.

☞ (१७) विचार करून बोला.

☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.

☞ (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.

☞ (२०) कामापुर्ती मैत्री ठेउन खरी मैत्री गमाऊ नका.

कुटुंब  टिकवणे का महत्वाचे आहे ,,,,

आज परत एकदा नकळत

मुंगी तळ्यात पडली

स्वतःला वाचविण्यासाठी 

झाडाचं पान आणि कबुतराची

वाट पाहू लागली

 मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला 

झाडावरच बसून 

असहाय मुंगीला मरताना पाहू लागला

 कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली

 कबुतर आपल्याच विचारात मश्गुल

 मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली

कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं

 पारधी येणार हेच विसरून गेलं

पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला

कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. 

【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】

 *मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.*


_मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते.

अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते.


*सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा...🤝🏻*

*हा जन्म पुन्हा नाही...😊* 

विनाकारण कोणाला त्रास देऊ नका .आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका🙏🙏

कृपया वेळ काढून नक्की वाचा.

 *निसर्गाने* आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की ....


👉 आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि 

👉 स्वतःला लाथही मारू शकत नाही.

म्हणूनच.. माणसाच्या जीवनात

*"हितचिंतकांची"* आणि

*"निंदकांची"* आवश्यकता आहे....


आयुष्यात असे लोक जोडा,

जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........


कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.


🐾

👄बोलायच्या आधी….❕

👂ऐकायला शिका............❗

🎁खर्च करायच्या आधी….❕

💰कमवायला शिका.......❗

📝लिहायच्या आधी ……❕

😇 विचार करायला शिका....❗

हार मानण्याआधी.....❕

👉 प्रयत्न करायला शिका

आणि मरायच्या आधी .....❗

👉 जगायला शिका......❕


 👉 जीवनात एवढ्याही चुका करू नका,

कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल 

आणि .... रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.


🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे.....

     

आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ...


*" मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य"*


1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत

2:-"समाज" स्मशाना पर्यंत

3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत


      फक्त आणी फक्त  

              *"कर्म"*

        शेवट l पर्यंत


जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,*

आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.*

यातील वेलांटीचा फरक

म्हणजेच माणसाचे जीवन......


*नक्की वाचा*


*जन्म* : दूस-याने दिला ...

*नाव* : दूस-याने ठेवलं ...

*शिक्षण* : दूस-यांनी दिलं ...

*रोजगार* : दूस-यांनीे दिला ...

*इज़्ज़त* : दूस-यांनी दिली ...

*पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* :  दुसरेच घालणार ...

*मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ...

*आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार...


तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!!

 *दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक...

आपल्या माणसांना *आठवतात*.


*धन* इतकं दुर्दैवी आहे की

ज्याला मिळवून लोक नेहमी...

आपल्या माणसांना *विसरतात*.


किती विचित्र आहे ना...??


माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे, 

पण जखम झाली की रक्त येतं....

आणि

माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून 

हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.                            

चांगले मॅसेज नेहमी जास्तीत जास्त शेयर करा..

मनाला खुप वेगळा *आनंद* मिळेल.


💫💫 *खुपच सुंदर लेख आहे त्यामुळे मी तो तुमच्यापर्यंत पाठवला तुम्हीही इतर ग्रुप वर send करा* 💫💫

*

🙏🙏 आपलाच शुभचिंतक गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

माणुस कविता गजानन गोपेवाड

 *तवा माणूस माणसात होता*

 घरात टि.व्ही चं खोकं नव्हतं...💐

मोबाईल मध्ये डोकं नव्हतं...💐

काचा कवड्याचा खेळ होता...💐

नणंद भावजईचा मेळ होता...💐

गुटक्यानं भिती रंगत नव्हत्या...💐

ब्युटी पार्लरमध्ये झिंगत नव्हत्या...💐

ओठांवर ओरीजनल लाली होती...💐

चंद्राची खळी गाली होती...💐

पोरी मोबाईलवर गात नव्हत्या...💐

शाळेतुन पळून जात नव्हत्या...💐

वाकडा भांग पाडत नव्हत्या...💐

तोंड बांधून हिंडत नव्हत्या...💐

वाघासारखा लेक होता...💐

तवा बाप माणसात होता...💐 

राजकारणात निष्ठा होती...💐

खरं बोलणाऱ्याची चेष्टा नव्हती...💐

पैशावर पुढारी फुटत नव्हतं...💐

तत्वाशिवाय गटत नव्हतं...💐

प्रेम-माया अटत नव्हती...💐

चांगली माणसं तुटत नव्हती...💐

चहा-चिवड्याला रडत नव्हती...💐

चोरुन पिल्याबिगर चढत नव्हती...💐

आडाणी नेता भानात होता...💐

तळातला कार्यकर्ता मनात होता...💐

सोसायटीचा चेअरमन रानात होता..

तवा माणुस माणसात होता...💐

गावा शेजारी बार नव्हता...💐

रस्त्यावर दारुड्याचा कार नव्हता...💐 

पाठीवर दफ्तराचा भार नव्हता...💐

अनवाणी पायाला रस्ता  गार होता.💐 

हातावर छडीचा मार होता...💐

शाळेचा मास्तर दिलदार होता...💐

तवा पैशाला किंमत नव्हती...💐

आयुष्य म्हणजे गंमत नव्हती...💐

घासाघासात कस होता...💐

माणसाच्या वागण्यात रस होता...💐

*तवा माणुस माणसात होता...*

        गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र ....💐💐

विद्युत चुंबकीय शोध एँम्पीयर

 *⚡⚡⚡आंद्रे-मरी ॲंपियर⚡⚡⚡*

⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡

*विद्युत चुंबकीयत्वाचा शोध*

🧲🧲🧲🧲🧲🧲🧲🧲🧲🧲🧲

*स्मृतिदिन - १० जुन १८३६*


 जन्म -) २० जानेवारी १७७५ 

 मृत्यू  -)  १० जून  १८३६

   

      आंद्रे-मरी ॲंपियर हा फ्रांसचा भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होता.


  याने विद्युतचुंबकीयत्वाचा शोध लावला.सोलेनॉइडआणि इलेक्ट्रिकल टेलीग्राफ सारख्या असंख्य अनुप्रयोगांचे ते शोधक देखील आहेत. ॲंपियर हे फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य आणि इकोले पॉलीटेक्निक आणि कोलेज डे फ्रान्सचे प्रोफेसर होते. विद्युतप्रवाहाच्या एककाला याचे नाव (ॲंपियर) देण्यात आले आहे.


विद्युतप्रवाह तारेतून वाहत असताना तो मोजण्याचे माप म्हणजे अॅम्पिअर (Ampere) होय.हे मोजण्याच्या साधनाला अॅमिटर (Ammeter) असे म्हणतात.फ्रेंच शास्त्रज्ञ आंद्रे ऍम्पीअर याने वीजप्रवाह कसा मोजायचा,ते शोधून काढले. त्याच्याच नावाने हे मोजमाप मग प्रचलित झाले आहे.विद्युत प्रवाह वाहतो म्हणजे तारेतील इलेक्ट्रॉन एका दिशेने वाहत असतात.विजेचा दिवा लावला असताना त्याच्या तारेतून एका सेकंदाला तीन मिलियन मिलियन मिलियन इतके इलेक्ट्रॉन वाहतात.एक मिलियन म्हणजे एक दशलक्ष.आकडा बरोबर लिहिण्यासाठीसुद्धा मिनिटभर लागेल.मग हे सारे सोप्या शब्दात व्यक्त करण्यासाठी आपण विद्युतप्रवाह अँपिअरध्ये मोजतो.याचा उच्चार थोडक्यात अँप असाही करतात.एक अँपिअर म्हणजे दर सेकंदाला ६ मिलियन मिलियन मिलियन इलेक्ट्रॉनचा प्रवाह होय.

अॅमिटरने जेव्हा विद्युतप्रवाह मोजतात,तेव्हा हा अॅमिटर विजेच्या 'सर्किट'मध्ये जोडला जातो. त्यावरचा काटा किती वीजप्रवाह वापरला जात आहे,हे तात्काळ दर्शवतो.घरगुती वापरासाठी आपण अर्धा ते पाच अँपिअरचा वीजप्रवाह वापरत असतो.इस्त्री,विजेची शेगडी, पाणी तापवायचा गिझर यांन जास्त वीजप्रवाह लागतो.तर विजेचे दिवे,ट्यूबलाइट,पंखे यांना जेमतेम अर्धा ते एक अँपिअरचा प्रवाह लागतो.विजेचा प्रवाह जितका जास्त लागणार असेल तितकी विजेच्या तारांची जाडी वाढवावी लागते.एखाद्या कारखान्याच्या विजेच्या तारा घरातील तारांपेक्षा किती जाड असतात,ते लक्ष देऊन बघण्यासारखे असते.वीजप्रवाहाचा एक महत्त्वाचा गुणधर्म हा की त्यामुळे चुंबकसूची हलते म्हणजे चुंबक क्षेत्र निर्माण होते.दुसरा महत्त्वाचा गुणधर्म हा की वीजप्रवाहाने उष्णता निर्माण होते.जितका वीजप्रवाह जास्त तितकी त्याची उष्णता निर्माण करण्याची शक्ती वाढत जाते.वेल्डिंग मशीनमधील पन्नास ते तीनशे ॲम्पिअरचा प्रवाह धातु वितळवण्याइतकी सुद्धा उष्णता निर्माण करू शकतो.

संकलन -)

गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *अमावस्या*,रोहिणी नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, १० जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


श्लोकेन वा तदर्धेन

              तदर्धार्धाक्षरेण वा।

अबन्ध्यं दिवसं कुर्याद

              दान अध्ययन कर्मभिः॥


*भावार्थ:- एक भी दिन ऐसा व्यतीत नहीं होना चाहिए जिसमें एक श्लोक, आधा श्लोक, चौथाई श्लोक या श्लोक का केवल एक अक्षर भी नहीं सीखा गया हो तथा दान, अभ्यास या कोई पवित्र कार्य नहीं किया गया हो।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


आनंद प्राप्ती

 *आदर्श जीवन जगण्यासाठी*


☞ (०१) चूक झाली तर मान्य करा.

☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या.

☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा.

☞ (०४) आभार मानायला विसरू नका.

☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.

☞ (०६) सतत हसतमुख रहा.

☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.

☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.

☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.

☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.

☞ (११) कृती पुर्व विचार करा.

☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.

☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा.

☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.

☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा.

☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या.

☞ (१७) विचार करून बोला.

☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.

☞ (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.

☞ (२०) कामापुर्ती मैत्री ठेउन खरी मैत्री गमाऊ नका.

कुटुंब  टिकवणे का महत्वाचे आहे ,,,,

आज परत एकदा नकळत

मुंगी तळ्यात पडली

स्वतःला वाचविण्यासाठी 

झाडाचं पान आणि कबुतराची

वाट पाहू लागली

 मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला 

झाडावरच बसून 

असहाय मुंगीला मरताना पाहू लागला

 कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली

 कबुतर आपल्याच विचारात मश्गुल

 मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली

कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं

 पारधी येणार हेच विसरून गेलं

पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला

कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. 

【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】

 *मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.*


_मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते.

अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते.


*सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा...🤝🏻*

*हा जन्म पुन्हा नाही...😊* 

विनाकारण कोणाला त्रास देऊ नका .आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका🙏🙏

कृपया वेळ काढून नक्की वाचा.

 *निसर्गाने* आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की ....


👉 आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि 

👉 स्वतःला लाथही मारू शकत नाही.

म्हणूनच.. माणसाच्या जीवनात

*"हितचिंतकांची"* आणि

*"निंदकांची"* आवश्यकता आहे....


आयुष्यात असे लोक जोडा,

जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........


कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.


🐾

👄बोलायच्या आधी….❕

👂ऐकायला शिका............❗

🎁खर्च करायच्या आधी….❕

💰कमवायला शिका.......❗

📝लिहायच्या आधी ……❕

😇 विचार करायला शिका....❗

हार मानण्याआधी.....❕

👉 प्रयत्न करायला शिका

आणि मरायच्या आधी .....❗

👉 जगायला शिका......❕


 👉 जीवनात एवढ्याही चुका करू नका,

कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल 

आणि .... रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.


🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे.....

     

आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ...


*" मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य"*


1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत

2:-"समाज" स्मशाना पर्यंत

3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत


      फक्त आणी फक्त  

              *"कर्म"*

        शेवट l पर्यंत


जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,*

आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.*

यातील वेलांटीचा फरक

म्हणजेच माणसाचे जीवन......


*नक्की वाचा*


*जन्म* : दूस-याने दिला ...

*नाव* : दूस-याने ठेवलं ...

*शिक्षण* : दूस-यांनी दिलं ...

*रोजगार* : दूस-यांनीे दिला ...

*इज़्ज़त* : दूस-यांनी दिली ...

*पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* :  दुसरेच घालणार ...

*मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ...

*आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार...


तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!!

 *दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक...

आपल्या माणसांना *आठवतात*.


*धन* इतकं दुर्दैवी आहे की

ज्याला मिळवून लोक नेहमी...

आपल्या माणसांना *विसरतात*.


किती विचित्र आहे ना...??


माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे, 

पण जखम झाली की रक्त येतं....

आणि

माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून 

हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.                            

चांगले मॅसेज नेहमी जास्तीत जास्त शेयर करा..

मनाला खुप वेगळा *आनंद* मिळेल.


💫💫 *खुपच सुंदर लेख आहे त्यामुळे मी तो तुमच्यापर्यंत पाठवला तुम्हीही इतर ग्रुप वर send करा* 💫💫

*

🙏🙏 आपलाच शुभचिंक गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 🙏🙏



बुधवार, ९ जून, २०२१

जखमेतील विष तोंडाने सोषन केले तर विष ऊतरते का


══════════════════════

  संकलन गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *जखमेतील विष तोंडाने शोषून घेतले, तर विष उतरते का ?* 📕


अनेक चित्रपटात तुम्ही असे दृश्य बघितले असेल. विष शोषण्याचे 'पवित्र' काम कधी नायक, तर कधी नायिका करते एवढाच काय तो फरक ! चित्रपटातील अशी दृश्ये पाहून खरोखरच कोणी असे करायचा प्रयत्न केला, तर काय होईल बरे?


सापाच्या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी शरीरातील त्याचे प्रमाण जमेल त्या प्रकारे कमी करणे हिताचे ठरते. यात हात व पायाला हृदयाच्या बाजूला आवळपट्टी बांधणे, व्यक्तीस हालचाल करू न देणे, दंशाच्या जानी निर्जंतुक केलेल्या ब्लेडने छेद घेऊन तेथील रक्त काढणे व जखम साफ करणे अशा उपायांचा समावेश होतो. विष यांत्रिक पंपाच्या साहाय्याने शोषून घेता येते किंवा तोंडात जखम वा व्रण नसतील, तर तोंडानेही शोषून घेता येते, पण शोषून घेतल्याने केवळ २०% इतकेच विष शरीराच्या बाहेर येते. ते सुद्धा सर्पदंशानंतर ३० मिनिटांत विष शोषून घेतले तरच! शोषून घेण्यापूर्वी सर्पदंशाच्या जागी ब्लेडने छेद देणे अत्यंत आवश्यक असते. नुसत्या सर्पदंशाच्या जखमेतून विष तोंडाने शोषून घेता येत नाही. शरीराच्या ज्या भागावर आवळपट्टी बांधता येत नाही, तेथील विष काढून टाकण्यासाठी जखमेवर छेद घेऊन शोषण्याचा उपयोग होतो.


विष शोषून घेणाऱ्या व्यक्तीने त्याच्या तोंडाला जखम झालेली नाही, याची खात्री करून घ्यावी; नाहीतर त्याला विषबाधा होऊ शकेल. साप चावल्यानंतर सर्वोत्तम उपाय म्हणजे सर्पासाठीचे प्रतिविष देणे. बाकीचे उपाय करण्यात जास्त वेळ न दवडता तात्काळ अशा रुग्णाला दवाखान्यात न्यायला हवे.


एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच की, साप चावल्यानंतर आवळपट्टी बांधावी, जखमेवर शक्य असल्यास ब्लेडने छेद देऊन काही रक्त काढून टाकावे आणि रुग्णाला तात्काळ दवाखान्यात न्यावे. नायकांसारखे विष शोषून घेण्याचा पराक्रम अगदीच आवश्यकता असल्याशिवाय करू नये हेच बरे!

 

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═════════════

रेल्वे इंजिन चा जनक जाँर्ज स्टिफेनसन

 *🚂🚂🚂जार्ज स्टीफेन्सन🚂🚂🚂*

🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂

             *रेल्वे इंजिनचे जनक*

🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂

      *जन्मदिन - ९ जुन १७८१*


       जॉर्ज स्टीफेन्सन यांचा जन्म ९ जून,१७८१ रोजी बब्रिटनमध्ये विलेम शहरात झाला होता.

जॉर्ज स्टीफनसन  मेकॅनिकल अभियंता होता जो स्टीम लोकोमोटिव्हज शोधण्यासाठी ओळखला जात होता.त्याच्या शोधामुळे औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि प्रवाशांची वाहतूक संपूर्ण ठिकाणी झाली. त्याच्या शोधामुळे युरोपमध्ये एक चांगला बदल घडून आला.

जॉर्ज स्टीफनसन या ब्रिटिश इंजिनियरचा जन्म सन १७८१ मध्ये एका निरक्षर कुटुंबात झाला. त्याला लहानपणी शाळेत जायची संधी मिळाली नाही. 

वयाच्या अठराव्या वर्षी तो कोळशाच्या खाणीत मजूर म्हणून नोकरीला लागला. त्यानंतर त्याने रात्रीच्या शाळेत जाऊन शिक्षण घेतले, तसेच स्वतःच्या हुषारीने खाणींमधील सर्व यंत्रे कशी चालतात हे उत्तमरीत्या समजून घेऊन तो त्यांची दुरुस्ती करण्यात प्रवीण झाला आणि मालकांच्या मर्जीतला झाला. त्याला नवीन कामे करण्याची संधी मिळाली. त्या काळात नव्याने निघालेल्या वाफेच्या इंजिनांवरून प्रेरणा घेऊन त्याने सन १८१४ मध्ये प्रथम एका कोळशाच्या खाणीसाठी एक इंजिन तयार केले. त्यानंतर त्याने अनेक सुधारणा करून एकाहून एक वरचढ अशी नवनवी इंजिने तयार केली.  सन १८२५ मध्ये त्याने तयार केलेल्या लोकोमोशन नावाच्या इंजिनावर चालणारी जगातली पहिली सार्वजनिक रेल्वे सेवा सुरू झाली.  त्यानंतर त्याने सन १८३० मध्ये रॉकेट नावाचे इंजिन तयार केले, स्वतःची कंपनी सुरू केली आणि रेल्वे इंजिने पुरवायला तसेच रेल्वे लाइनी बांधायला सुरुवात केली. लवकरच इंग्लंडशिवाय युरोप आणि अमेरिकेतसुद्धा स्टीफनसनची इंजिने धावायला लागली.


यावरून असे दिसते की एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातले अनेक इंजिनियर वाफेवर चालणारे फिरते इंजिन तयार करण्याचा प्रयत्न करीत होते. रुळावरून चालणाऱ्या पण घोडे जुंपलेल्या गाड्या त्याच्याही आधीच सुरू झाल्या होत्या, पण त्या मुख्य करून खाणींमध्ये किंवा कारखान्यांमधले जड सामान वहाणाऱ्या मालगाड्या होत्या. घोड्यांच्या जागी वाफेवर चालणारे स्वयंचलित इंजिन लावले तर ते जास्त शक्तीशाली असेल, अधिक काम करेल आणि फायद्याचे ठरेल या विचाराने हे सगळे प्रयत्न चालले होते आणि त्यांना थोडे थोडे यश येतही होते.  जॉर्ज स्टीफनसन याने या इंजिनांमध्ये चांगले क्रांतिकारक बदल घडवून आणले. ती इंजिने आकाराने सुटसुटीत झाली, ती सुरळीत, सुरक्षित आणि खात्रीपूर्वक काम करायला लागली. त्यामुळे प्रवाशांना घेऊन जाणारी सार्वजनिक रेल्वे वाहतूक सुरू करणे शक्य झाले. पहिल्या अशा सेवेचे यश पाहून इंग्लंडमध्ये देशभर रेल्वे कंपन्या निघाल्या आणि पुढे लवकरच रेल्वेचे जाळे जगभर पसरले.  यामुळे जॉर्ज स्टीफनसन इतक्या मोठ्या प्रकाशझोतात आला की त्यानेच रेल्वे इंजिनाचा शोध लावला असे म्हणून त्याचेच नाव घेतले जाऊ लागले आणि आजही त्यालाच रेल्वेचा जनक मानले जाते.

*====================*

संकलन-)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन


 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *चतुर्दशी*,कृतिका नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, ०९ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


महाजनस्य संसर्गः 

                कस्य नोन्नतिकारकः।

पद्मपत्रस्थितं तोयं 

                धत्ते मुक्ताफलश्रियम्॥


*भावार्थ:- महान व्यक्तियों की संगति किसे उन्नति प्रदान नहीं करती? अर्थात जिस प्रकार कमल के फूल पर पड़ी पानी की बूंद भी मोती के समान दिखने लगती है, उसी प्रकार सज्जन व विद्वान व्यक्तियों की संगति से सर्वांगीण उन्नति होती है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मंगळवार, ८ जून, २०२१

चेहर्‍यावर सुरकत्या का पडतात


═════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📙 *म्हाताऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात ?* 📙 


वृद्धावस्था आली की माणसात अनेक बदल होतात. डोक्यावरचे केस गळायला लागतात व टक्कल पडते. तोंडातील दात हलायला लागतात व नंतर तोंडाचे बोळके होते. बोटांना कंप सुटतो, दृष्टी अधू होते, उत्साह कमी होतो. अशा या बदलांमुळे व्यक्ती चिडचिडी होते. त्यात भर म्हणजे विस्मरणही व्हायला लागते. त्यामुळे वृद्धत्व म्हणजे एक रोग असे वाटायला लागते.


चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात, याविषयी माहिती घेऊ. त्वचेखाली स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या दिशेने काटकोनात त्वचेची हालचाल होत असल्याने त्वचेच्या वारंवार घड्या पडतात. व तेथे नंतर सुरकुत्या पडतात. चेहऱ्याच्या त्वचेखाली इतर शरीराच्या त्वचेखाली असणारा जाडसर थर (deep fascia) नसतो व स्नायू व त्वचेचे थर एकमेकांत जखडलेले असतात. त्यामुळेही त्वचेवर जास्त ताण येतो व सुरकुत्या पडतात.


 दुसरे म्हणजे त्वचेखालील मेद पदार्थांचे प्रमाण कमी होते. साहजिकच त्वचा सैल व ढिली होते. तिसरे म्हणजे स्नायूंमधील ताण वयोमानानुसार कमी होतो. त्यामुळे त्वचेमध्ये खोवले जाणारे स्नायू शिथिल होतात व त्वचाही सैल होते. सर्व इंद्रियांवर त्वचेची जीवनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या त्वचेची लवचिकता कमी होऊन ती सैल पडते. या सर्व गोष्टींमुळे सैल पडलेल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात. तोंडातील दात पडल्याने जबड्याच्या हाडाची झीज झाल्याने चेहऱ्याचा आकारही बदलतो व त्वचा आणखीनच सैल होते. परिणामी वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. सुरकुत्या सर्व शरीरावर पडतात परंतु चेहऱ्यावर ती बाब जास्त प्रकर्षाने जाणवते.

 

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

संकलन गजानन गोपेवाड 


▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬


इंटरनेटचे जनक टिम बर्नर्स ली

 *📡📡📡टिम बर्नर्स ली📡📡📡*

📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡

*इंटरनेटचे जनक*

*विश्व व्यापी वेब (www) चे अविष्कारक*

📡📡📡📡📡📡📡📡📡📡📡

*जन्म: ८ जून, १९५५*


सर टीम बर्नर्स ली (जन्म: ८ जून १९५५-हयात) हे जागतिक माहितीजालाचे जनक आहेत. य़ुरोपीयन नाभिकीय सन्शोधन संस्थेत (सर्न) असताना त्यानी २५ डिसेम्बर १९९० रोजी क्लायन्ट सर्वर संवादाचा (जागतिक माहितीजालाच्या सुरळीत कार्यासाठी आवश्यक असणारा घटक) प्रयोग यशस्वी करून दाखविला. ते सध्या वर्ल्ड वाईड वेब कोन्सोर्टियमचे निर्देशक आणि एम आय टी संगणकशास्त्र आणि कृत्रिम बुद्धीमत्ता प्रयोगशाळेत ३ कौम संस्थापक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.


टिम बरनर्स् ली का जन्म ८ जून, १९५५ को इंगलैंड में हुआ था। माता पिता दोनो गणितज्ञ थे। कहा जाता है कि उन्होने टिम को गणित हर जगह, यहां तक कि खाने की मेज पर भी बतायी।

टिम ने अपनी उच्च शिक्षा क्वीनस् कॉलेज, ऑक्सफ़ोर्ड विश्वविद्यालय से पूरी की। विश्वविद्यालय में उन्हें अपने मित्र के साथ हैकिंग करते हुऐ पकड़ लिया गया था। इसलिये उन्हें विश्वविद्यालय कंप्यूटर का प्रयोग करने से मना कर दिया गया। १९७६ में, उन्होने विश्विद्यालय से भौतिक शास्त्र में डिग्री प्राप्त की।

वेब तकनीक - अविष्कार

सर्न (en:CERN) यूरोपियन देशों की नाभकीय प्रयोगशाला है। टिम १९८४ से वहीं फेलो के रूप में काम करने लग गये। वहां हर तरह के कंप्यूटर थे जिन पर अलग अलग के फॉरमैट पर सूचना रखी जाती थी। टिम का मुख्य काम था कि वे सूचनाये एक कंप्यूटर से दूसरे पर आसानी से जा सकें। उन्हे लगा कि क्या कोई तरीका हो सकता है कि इन सब सुचनाओं को इस तरह से पिरोया जाय कि ऐसा लगे कि वे एक जगह ही हैं। बस इसी का हल सोचते सोचते, उन्होने वेब तकनीक का अविष्कार किया और दुनिया का पहला वेब पेज ६ अगस्त १९९१ को सर्न में बना। निहःसन्देह यह तकनीक, २१ वीं शताब्दी की सबसे लोकप्रिय संपर्क साधन है।

टिम ने इस तकनीक का आविष्कार किया जब वे सर्न में काम कर रहे थे और यह सर्न की बौद्घिक संपदा थी। ३० अप्रैल १९९३ को, टिम के कहने पर सर्न ने इस तकनीक को मुक्त कर दिया। अब इसे दुनिया के लिए न केवल मुफ्त, पर मुक्त रूप से उपलब्ध है। इसके लिए किसी को, कोई भी फीस नहीं देनी पड़ती है। यह निर्णय न केवल महत्वपूर्ण था पर इंटरनेट के शुरवाती दौर के निर्णयो के अनुरूप था जो हर तकनीक को मुफ्त व मुक्त रूप से उपलब्ध कराने के लिये कटिबद्ध थे।

टिम, बाद में अमेरिका चले गये। १९९४ में उन्होने, मैसाचुसेटस् इंस्टिट्युट ऑफ टेकनॉलोजी में विश्व व्यापी वेब संघ (W3C) की स्थापना की। यह वेब के मानकीकरण में कार्यरत है।

सम्मान

टिम बरनर्स् ली को, २००१ में, रॉयल सोसायटी का सदस्य बनाया गया। २००४ में नाईटहुड की उपाधि दी गयी थी। १३ जून २००७ को, ऑर्डर ऑफ मेरिट, इंगलैंड के सबसे महत्वपूर्ण सम्मान से सम्मानित किया गया। यह सम्मान महारानी द्वारा कला, विज्ञान के क्षेत्र में महत्वपूर्ण योगदान के लिये दिया जाता है। इसी लिये टाइम पत्रिका ने उन्हें, २० वीं शताब्दी के १०० महान वैज्ञानिकों और विचारकों में चुना है।


संकलन -)गजानन गोपेवाड

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *त्रियोदशी*,भरणी नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, ०८ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


          *"ऐसे विश्वासों और सिद्धान्तों को अपनाइये जिनसे लोक कल्याण की दिशा में प्रगति होती हो। उन विश्वासों और सिद्धान्तों को हृदय के भीतरी कोने में गहराई तक उतार लीजिए। इतनी दृढ़ता से जमा लीजिए कि भ्रष्टाचार और प्रलोभन सामने उपस्थित होने पर भी आप उन पर दृढ़ रहें, परीक्षा देने एवं त्याग करने का अवसर आवे तब भी विचलित न हों। वे विश्वास श्रद्धास्पद होने चाहिए, प्राणों से अधिक प्यारे होने चाहिए।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~गजानन गोपेवाड 



ब्रह्मानंद म्हणजे काय?

 *" ब्रम्हानंद "* म्हणजे काय।


▪बाप  होण्यापेक्षाही... 

आजोबा/आजी  होण्याचा 

 *आनंद!*


▪नातवंडाच्या  कृपेने  अंगावरील  कपडे 

ओले  झाल्याचा 

 *वत्सल  आनंद* !


आणि


▪त्यांनी  केलेले  हट्ट  पुरविण्याचा  

*गोड  आनंद!*


▪सूनेने, न  मागता  आणून  दिलेल्या  चहाचा 

व  औषध  घेतले  का..? 

या  प्रेमळ  चौकशीचा  

*सात्त्विक आनंद!*


▪वाढदिवसाला,  मुलाने  दिलेल्या  शालीचा....

 *ऊबदार  आनंद* 


▪आपण  कुटुंबाला  हवे  आहोत......

या  भावनेचा  

 *सुप्त  आनंद* 


▪दुपारी  जेवणानंतर  पेपर  वाचता वाचता  

लागलेली  डुलकी ...

 *परमानंद. !*


▪रात्रीची निरव शांतता..

आराम खुर्चीवर डोळे मिटून

पहुडलेल्या क्षणी..

आपली आवडती गझल..

रेडिओने गुणगुणावी...

*स्वर्गीय आनंद!*


▪एखादा लेख किंवा कविता 

आपण पोस्ट करावी..

मित्रांनी त्याला भरभरुन 

दाद द्यावी...

*साहित्यानंद!*


▪मन अशांत असतांना....

देवघरातल्या भजनामुळे

निर्माण होणारा..

*कैवल्यानंद!*


 ▪भेटलेल्या  जुन्या  सवंगड्यांच्या भेटीमुळे होणारा... 

 *अपार  आनंद* 


▪नकारात्मक  विचार  सोडून  दिले  की  मिळणारा.... 

*निर्भेळ  "आनंद"!*


आणि  या  *सर्व  आनंदाची  बेरीज*  *करुन,* ती  मनाच्या  कप्प्यात  साठविली  की, पडल्यापडल्या  लागलेली  *शांत*  *झोप*  म्हणजेच... 

 *"ब्रह्मानंद" !!!*

गजानन गोपेवाड 


    🌹🌹🙏🌹🌹

सोमवार, ७ जून, २०२१

झाडे कविता

 *इवलंसं रोपटं मी*

*तू म्हणालास तर मरून जाईन,*


*ओंजळभर पाणी दे मला*

*आयुष्यभर तुझ्या कामी येईन,*


*दिलं जीवदान मला तर*

*तुला जगायला प्राणवायू देईन,*


*जगवलंस मला तर* 

*तुझ्या देवांसाठी फुलं देईन,*


*फुलवलंस मला तर*

*तुझ्या मुलांसाठी फळं देईन.*


*तळपत्या उन्हामध्ये* 

*तुझ्या कुटुंबाला सावली देईन,*


*तुझ्या सानुल्यांना खेळावया*

*माझ्या खांद्यावर झोका देईन,*


*तुझ्या आवडत्या पाखरांना*

*मायेचा मी खोपा देईन,*


*कधी पडला आजारी तर* 

*तुझ्या औषधाला कामी येईन,*


*झालो बेईमान जरी मी* 

*शेवटी तुझ्या सरणाला कामी येईन.*

        

             *🌿एक रोपटं🌿*


 *🌴🌴झाडे लावा झाडे जगवा*🌴🌴


अँलन ट्युरींग संगणक जनक

 *🖥️🖥️🖥️अॅलन ट्युरिंग🖥️🖥️🖥️*

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

*🖥️🖥️आधुनिक संगणकाचा जनक🖥️🖥️*

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

*स्मृतिदिन - ७ जुन १९५४*

⌨️🖱️⌨️🖱️⌨️🖱️⌨️🖱️⌨️🖱️⌨️

  आज आपण संगणक शास्त्राचा वापर करून जी काही तंत्रज्ञानामध्ये प्रगती करत आहोत,त्याचे सर्व श्रेय अॅलन ट्युरिंगकडे जाते.आधीच्या काळी, संगणक हा फक्त त्यामध्ये फिड करण्यात आलेल्या गोष्टी करण्यापुरताच मर्यादित होता. त्यासाठीदेखील खूप कष्ट घ्यावे लागत.‘त्या’ काळात अतिशय अशक्यप्राय समजली जाणारी गोष्ट म्हणजे मशीनला विचार करायला लावून,तिच्याकडून एखादे काम करवून घेणे.आणि यात अॅलन यशस्वी झाला होता. अॅलन ट्युरिंगच्या कामाचा,प्रोग्रामिंग भाषा तयार करण्यामध्ये मोठा प्रभाव आहे. एवढेच नव्हे तर आज ‘मानवनिर्मित बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence) ही जी संगणकीय शास्त्राची एक शाखा आहे, तिचादेखील अॅलन ट्युरिंगच जनक आहे.गूगलची ‘सेल्फ-ड्रायव्हिंग कार’, मायक्रोसॉफ्टचे ‘कोर्टाना’ (Cortana) आणि अॅपलची‘सिरी’ (Siri) हे वैयक्तिक सहाय्यक (PA) अॅप्, Cleverbot, … हे सर्व याच शाखेचे उपयोजनं आहेत.


अॅलन ट्युरिंगला लहानपासुनच गणित व विज्ञानाकडे नैसर्गिक ओढ होती आणि ‘शेर्बोर्ने पब्लिक स्कूल’मध्ये शिक्षकांचा भर हा साहित्यावर होता.अॅलन ट्युरिंगची गणित आणि विज्ञानाविषयी असलेली आवड हि अभ्यासाच्या बाहेरील होती.

तेव्हा तेथील शिक्षकांनी अॅलनच्या आईला बोलावून, *‘त्याला जर वैज्ञानिक क्षेत्रात कारकीर्द करायची असेल तर तो येथे त्याचा वेळ वाया घालवत आहे.’* असे स्पष्टपणे सांगितले होते.

लहानपणीच ‘कॅल्क्युलस’ (गणिताचा एक प्रकार) न शिकताच तो गणितातील अतिशय कठीण

प्रश्न सोडवत असे.वयाच्या १६व्या वर्षी,त्याची आईन्स्टाईनच्या कामाशी ओळख झाली.तेव्हा आईनस्टाईनच्या सर्व कामाचा स्वतःच अभ्यास करून, त्याने त्याच्या नोट्सदेखील बनवल्या होत्या. 


त्याने लिहिलेल्या प्रबंधाने संपूर्ण तंत्रज्ञान पूर्णपणे बदलणार होते. या प्रबंधामुळेच एक नवीन प्रकारच्या मशीन जन्मास आल्या, त्यांना आपण ‘ट्युरिंग मशीन’ (Turing Machine)

म्हणतो. हि एक काल्पनिक/थेरॉटिकल संगणकीय मशीन आहे कि ज्यामध्ये आधीपासूनच काही नियम सेट केलेले असतात, आणि त्या नियमांनुसार मशीनला दिलेल्या इनपुट पासून एक आउटपुट मिळते.थोडक्यात ‘ट्युरिंग मशीन’ हि एक अशी मशीन आहे ज्यामध्ये आधीपासूनच लॉजिक सेट केलेले असते आणि त्याचा वापर करून डेटा वाचू/लिहू शकतो.


संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

वैशाख मास,कृष्ण पक्ष, *द्वादशी*,भरणी नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, ०७ जून २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"आर्थिक युद्ध का एक सूत्र है कि किसी राष्ट्र को नष्ट करने का सुनिश्चित तरीका है कि उसकी मुद्रा को खोटा कर देना। और यह भी उतना ही सत्य है कि किसी राष्ट्र की संस्कृति और पहचान को नष्ट करने का सुनिश्चित तरीका है कि उसकी भाषा को ही हीन बना दिया जाए।*

     *यदि विचार भाषा को भ्रष्ट करते है तो भाषा भी विचारों को भ्रष्ट कर सकती है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बाळ का रडते

 ▬▬▬▬▬❚❂❚

═════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *बाळ का रडते ?* 📕


बाळाचे रडणे ऐकले की आपल्याला कसेसेच होते. लागलीच, ते का बरे रडत असेल याचा शोध सुरू होतो. ताईपासून माईपर्यंत आणि दाजीपासून आजीपर्यंत सारेच आपापल्या परीने उपाय सुचवायला लागतात. बाळाला बोलता येत नसल्याने तर हा प्रयत्न जास्तच गंभीर होतो. बाळाची आई नवखी असेल, तर मग विचरायलाच नको, तिची अगदी त्रेधातिरपीट उडून जाते. कधी दूध पाजल्यावर, कधी कडेवर घेतल्यावर, तर कधी थोपटल्यावर ते शांत होते व 'बघ मी सांगत होतो की नाही, असे अभिमानाचे उद्गारही ऐकायला मिळतात. गंमत म्हणजे हे उपाय मूल दुसऱ्यांदा रडल्यावरही वापरले जातात व त्याचा काही उपयोग होत नाही. यावरून एक लक्षात येईल की, मूल रडण्याची अनेक कारणे आहेत व सर्व प्रकारचे रडणे थांबवण्यासाठी कोणताही एकमेव असा रामबाण उपाय अस्तित्वात नाही.


रडणे ही एक नैसर्गिक क्रिया असून तिचा उपयोग लक्ष वेधून घेण्यासाठी, तक्रार करण्यासाठी, निषेध नोंदवण्यासाठी वा प्रतिकार करण्यासाठी होऊ शकतो. मूल रडण्याची विविध कारणे आहेत. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूक लागणे. उपाशी असलेले मूल रडते व दूध मिळताच गप्प बसते. चड्डीत शी वा शू केल्याने ओलेपणा जाणवतो व त्यामुळेही मूल रडते. अशा वेळी मुलाला कोरडे केल्यास ते रडायचे थांबते. वयाचदा माता दूध पाजल्यावर बाळाच्या पोटातील ढेकर काढत नाहीत. त्यामुळे पोटात हवा धरून बाळाचे पोट दुखते व ते रडते. यासाठी दूध पाजल्यावर बाळाला खांद्यावर घेऊन हलके हलके थोपटावे, म्हणजे ढेकर बाहेर पडेल. कधी कधी आजारामुळे वाळाला वेदना होतात व ते रडते. अशा वेळी त्या त्या आजारावर उपचार करणे अगत्याचे ठरते. खूप घट्ट कपडे घातल्याने बाळाला त्रास होतो व ते रडते.


९५ टक्के वेळा वाळ रडण्याचे कारण हे सामान्य स्वरूपाचे असते. त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही. रडण्यासोबत धाप लागत असेल, खोकला असेल, खूप ताप असेल, खूप संडास उलट्या होत असतील तर मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे अगत्याचे ठरेल. एक महत्त्वाची गोष्ट मूल रडण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याला जवळ घेऊन प्रेम द्यावे, ही त्याची अपेक्षा असते. साहजिकच आईचा नुसता उबदार स्पर्श झाला, तरी ते रडायचे थांवते!


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═════════════

संकलन गजानन गोपेवाड 

शनिवार, ५ जून, २०२१

डोके मोठी असणारी माणसे बुद्धिवान असतात का?


               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *डोके मोठे असणारी मुले जास्त बुद्धिमान असतात का ?* 📕


'उंच वाढला एरंड, तरी का होईल तो इक्षुदंड' ही म्हण आपल्या परिचयाची आहे. डोक्याची/आकार मोठा असला, तर साहजिकच त्या प्रमाणात मेंदूचा आकारही मोठा असेल. आपल्या बुद्धिमत्तेचा आधार म्हणजे मेंदू त्यामुळे बऱ्याच लोकांना असे वाटण्याची शक्यता आहे की, डोके मोठे असेल तर त्या मुलाला बुद्धीही जास्त असेल; पण खरेच असे असते का ? तुमच्या वर्गात पहिल्या पाचात येणाऱ्या मुलांची डोकी व सर्वात कमी गुण घेणाऱ्या मुलांची डोकी गंमत म्हणून पाहा.


मेंदूचे वजन मानवाच्या बाबतीत ठरावीकच असते. व्यक्ती व्यक्तीत थोडाफार फरक असतो; पण मेंदूचे भाग, त्याची कार्य करण्याची क्षमता, स्मरणशक्ती यांत गुणात्मकदृष्ट्या फरक नसतो. अनुभव, वाचन, पाठांतर, पंचज्ञानेंद्रियांतून प्राप्त केलेली माहिती, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे बुद्धिमत्ता मेंदूच्या रिकाम्या पोटी विविध मार्गाने तुम्ही जेवढी ज्ञानसंपत्ती आणून टाकाल तेवढे तुम्ही बुद्धिमान ! जन्मताच कोणी बुद्धिमान नसतो. ज्ञान प्राप्त केल्यानंतरच माणूस बुद्धिमान होतो. मेंदूच्या पेशी, त्यातील गोष्टी लक्षात ठेवायची क्षमता, तुम्हाला बुद्धिमान बनायला मदत


करायला नेहमीच तयार असतात. गरज फक्त तुमच्या प्रयत्नांचीच असते. असे म्हणतात की, जगातील अत्यंत विद्वान, ज्ञानी व्यक्ती त्यांच्या मेंदूच्या केवळ २ टक्के क्षमतेचा वापर करतात. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हीही खूप बुद्धिमान बनू शकता; फक्त अभ्यास करण्याची परिश्रम करण्याची तयारी पाहिजे. मेंदूच्या नुसत्या आकारावरच माणसाची बुद्धिमत्ता मुळीच अवलंबून नसते.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

संकलन ::गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...