जागतिक जलदिन,
मार्च 22, 2021.
*"वाचवाल तर वाचाल, अन्यथा नष्ट व्हाल! "*
काय वाचवाल,
पाणी,
(Water)
______________
या वर्षाच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्तची जलदिनाची मध्यवर्ती विषय -संकल्पना आहे, *" पाण्याचे मोल म्हणजेच पाण्याला मोल देणे "*
( Valuing Water) होय.
22 मार्च 1993 रोजी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने पहिला *"जागतिक जलदिन "* साजरा केला. तेंव्हापासून दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची पध्दत रूढ झाली आहे. 2020 ची संकल्पना होती, *" पाणी आणि हवामान बदल "*. कारण हवामान बदलांविरूध्द लढण्यासाठी पाण्याची मदत होऊ शकते. जलदिनानिमित्त सर्वांनी जलसाक्षर होऊन जलसंवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. कारण ' जल है तो कल है और कल है तो हम है!'
पिण्यायोग्य म्हणजेच गोड्या पाण्याचे निसर्गातील प्रमाण अत्यल्प आहे. त्याचा वापर काटकसरीने करणे, स्त्रोतांचे संवर्धन करणे अगत्याचे ठरते.
पिण्यायोग्य पाण्याची कमतरता यासाठी की पृथ्वीवर पाण्याचा साठा पुष्कळ आहे. तो सर्वच साठा मानवासाठी उपयोगाचा नाही. पृथ्वीवरील पाण्यापैकी सुमारे 97 टक्के पाणी सागरी पाण्याच्या स्वरूपात आहे. म्हणजेच ते पाणी क्षारयुक्त आहे. केवळ 2 टक्के पाणी धृव प्रदेशातील बर्फ रूपात आहे. तर उरलेले 1 टक्का जेमतेम पाणी नद्या, नाले, विहिरी, तलाव, सरोवरे व भूगर्भात गोड्या पाण्याच्या स्वरूपात आहे. याच 1 टक्का पाण्यावर मानवाचे भौतिक, संस्कृतीमधील सर्व चलनवलन अवलंबून आहे. या पाण्याशिवाय मानवाच्या भौतिक प्रगतीचे एकही पाऊल पुढे पडू शकत नाही. तथापि, मानवी जीवनास व प्रगतीस आवश्यक असलेले हे पाणी झपाट्याने प्रदूषित होत आहे. पृथ्वीवरील सर्व प्रकारचे जलप्रदूषण हीच मानवाची मोठी, औद्योगिक व सांस्कृतिक समस्या म्हणून उभी राहिली आहे.
ग्रीक तत्ववेत्ता थेलीस म्हणतो, " सगळे पाण्यातून येते आणि पुन्हा पाण्याशीच एकरूप होऊन जाते. " अन्न, वस्त्र व निवारा या उपभोग्य वस्तूंची निर्मिती जलस्त्रोतांवर अवलंबून असते. तर उपभोगांतून निर्माण होणारे उत्सर्जित पदार्थ वाहून नेण्याचे कामही पाण्यालाच करावे लागते.
यंदा कडक उन्हाळ्यामुळे आपल्यांपुढे पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे, लिकेज, नासाडी थांबवणे अत्यावश्यक आहे.
नेमकी गरजेपुरतेच आवश्यक पाणी वापरून, बचत व संवर्धन केले तरी खूप काही साध्य होईल. जागतिक तज्ञांच्या मते तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, म्हणून पाणी हे जीवन हे जाणून त्याचे जतन व काटकसरीने वापर हा रामबाण उपाय होय.
पाणी पंचायत या जागतिक संकल्पनेचे अध्वर्यू तथा थोर तत्वज्ञ, पाणी शास्त्रज्ञ, भारतातील प्रथम व्यक्तीमत्व म्हणून जगद्विख्यात असलेले कै विलासराव साळुंखेजी! जे आम्हांस पूज्य दैवत व स्फूर्ती, प्रेरणादायी असून त्यांचे यांतील महान् कार्याचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही.
श्री विलासराव साळुंखे यांनी 1972 ते 2002 या तीन तपांच्या सातत्यपूर्ण अनेक प्रयोग व शोध करून, पाण्याचे समन्यायी वाटप ही संकल्पना सर्व जगमान्य केली. जलसंपत्ती ही समाजाची सामुहिक संपत्ती आहे, आणि पाण्याचे वाटप हे सर्वांना समन्यायानं व्हावं यासाठी त्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.
जगाचे नाक असलेल्या, हेरिटेज संस्था गव्हमेंट काँलेज आँफ इंजिनियरिंग, पुणे ची प्रोफेसरशीपचा 1972 च्या देशव्यापी भयंकर दुष्काळात, मोठ्या पदाची नोकरीचा त्याग करून, मानव जातींसाठी अनन्यसाधारण आदर्श प्रस्थापित केला.
आज तोच त्यांचा वारसा त्यांच्या सहचारिणी कल्पनाताई साळुंखेजी, ग्रामगौरव प्रतिष्ठान तथा पाणी पंचायतच्या माध्यमातून अविरतपणे सर्वदूर पोहोचवत आहेत. सेंद्रिय शेती हा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्यावरही एकाग्रतेने कृतीशील असून, राज्यातील, देशातील हजारो लाभार्थी शेतकर्यांच्या त्या अधिकार वाणीने मार्गदर्शक म्हणून वंदनीय आहेत.
हेच आजचे जागतिक जलदिनाचे संक्षिप्त चिंतन ठरावे!
गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा