मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

कापलेले सफरचंद तपकीरी का पडत


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन *

  *श्री. गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🍎 *कापलेलं सफरचंद तपकिरी का होतं?* 

**********************************

सफरचंदासारख्या फळांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. लोखंडाचा हवेतल्या ऑक्सिजनशी संपर्क आला, की त्याचं लोखंडाच्या ऑक्साईडमध्ये रूपांतर होतं. म्हणजेच त्याला गंज चढतो. त्या गंजाचा तपकिरी रंग मग त्या कापलेल्या सफरचंदाच्या पृष्ठभागावर उतरतो, असं आपल्याला गितलं जातं; पण ते अर्धवटच खरं आहे. प्रत्यक्षात होणाऱ्या प्रक्रिया अधिक गुंतागुंतीच्या आहेत. हा तपकिरी रंगाचा डाग केवळ सफरचंदावरच पडतो असे नाही. पेअरवरही तो पडतो. बटाट्यावरही पडतो. तरीही तसा तो पडण्याचं कारण काय, हा प्रश्न उरतोच, सफरचंद जेव्हा आपण कापतो तेव्हा एक तर त्याचा अंतरंगावरचा पृष्ठभाग आपण उघडा करतो. त्याचा हवेशी संपर्क येऊ देतो. तसंच त्या पृष्ठभागावरच्या उतींना आणि त्यांचे घटक असणाऱ्या पेशींनाही काही इजा करतो. त्यामुळे त्या इजा झालेल्या पेशींमध्ये ऑक्सिजनचा शिरकाव होतो. या फळांमध्ये पॉलिफेनॉल ऑक्सिडेज नावाचं एक विकर असतं. जेव्हा पेशीमधलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं तेव्हा फळात मुळातच असलेल्या फेनॉलच्या संयुगांचं ओक्विनोन नावाच्या संयुगांमध्ये रूपांतर होतं. ही संयुगं रंगहीन असतात; पण तपकिरी रंगाच्या रसायनांची ती पूर्वसूरी असतात. म्हणजेच त्यांची प्रथिनांचे घटक असणाऱ्या अमिनो आम्लांशी प्रक्रिया झाली, की त्यातून तपकिरी रंगाची रसायनं तयार होतात. काही वेळा या ओक्विनोनच्या साखळ्या तयार होऊन त्यापासून बहुवारिक संयुगं तयार होतात. त्यांचाही रंग तपकिरी असतो.


सर्वच जातींच्या सफरचंदांमध्ये पॉलिफेनॉल ऑक्सिडेज हे विकर असत; पण त्याचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. तसंच त्याचा प्रभाव ज्यांच्यावर पडायचा ती फेनॉलची संयुगंही वेगवेगळ्या प्रमाणात उपस्थित असतात. त्या दोन्हींच्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये होणारी प्रक्रिया किती जोमदार आहे व तिच्यातून तयार होणाऱ्या ओक्विनोनचं प्रमाण किती असेल हे ठरतं. त्यामुळे काही जातींची सफरचंदं चटकन तपकिरी होताना दिसतात, तर काही त्या मानानं संथ गतीनं आणि कमी प्रमाणात तो रंग धारण करताना दिसतात. या प्रक्रियेतल्या दोन घटकांचं प्रमाण कमी-जास्त करणं तर शक्य नसतं; पण त्यांच्यामध्ये होणारी प्रक्रिया सहजासहजी होणार नाही, तिच्यामध्ये बाधा येईल अशी व्यवस्था करणं शक्य असतं. कापलेल्या फळांवर साखरेचा किंवा तिच्या पाकाचा लेप दिला तर हवेतल्या ऑक्सिजनचा पेशींमध्ये होणारा शिरकाव आपण टाळू शकतो. निदान त्याचं प्रमाण कमी करू शकतो. लिंबाच्या किंवा अननसाच्या रसामध्ये अॅन्टिऑक्सिडन्ट पदार्थ जास्त प्रमाणात असतात. तेही हवेतल्या ऑक्सिजनच्या शिरकावात अडथळा निर्माण करू शकतात. शिवाय ते दोन्ही पदार्थ आम्लधर्मी असल्यामुळं त्या विकराच्या प्रभावाला रोखू शकतात. तसं केल्यास कापलेल्या सफरचंदाचं 'गंजणं' आपण काही प्रमाणात कमी करू शकतो.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?'या पुस्तकातून*


स्टेनलेस स्टील ला गंज का चढत नाही


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *स्टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही ?* 

**********************************

साध्या पोलादाला गंज चढतो. तो त्या धातूला कुरतडत राहतो. कालांतरानं त्याचा भुगाच करतो. हे असं का होत ? हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्याची जी रासायनिक प्रक्रिया होते त्यातून तयार होणारी संयुगं साध्या लोखंडावर किंवा पोलादावर गंजाची पुटं चढायला कारणीभूत असतात. ही संयुगं पोलादाच्या पृष्ठभागावर एक परत तयार करतात. ही आयर्न ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईडची पुटं अस्थिर असतात. हवेतल्या, पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्यांचा सतत संपर्क येतच राहतो. एवढंच काय, पण या पुटांमधून शिरकाव करून घेत पुढं पुढं जात त्यांच्या खालच्या पोलादाशीही तो संधान साधतो. आणखी संयुगं तयार करतो. त्यामुळे इतर काही उपाययोजना केली नाही तर मग या पुटांची जाडी वाढत राहते. डोळ्यांना सहज दिसेल इतकी ती वाढते. यालाच आपण गंज म्हणतो. त्यातील संयुगांच्या तपकिरी रंगामुळं तर ती अधिकच सहजपणे दिसून येतात.

त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलादात क्रोमियम, सिलिकॉन, मँगेनीज, कार्बन हे धातू मिसळून त्यापासून मिश्रधातू तयार करण्यात येतो. यालाच स्टेनलेस स्टील म्हणतात. काही स्टेनलेस स्टीलमध्ये निकेल किंवा मॉलिब्डेनम हे धातूही मिसळलेले असतात. जेव्हा असं स्टेनलेस स्टील हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा त्याची प्रक्रिया त्या मिश्रधातूतल्या लोखंडाशी होण्याआधी क्रोमियम किंवा निकेल यांसारख्या धातूंबरोबर होते. त्यांच्या संयुगामुळंही गंजाची एक रेण्वीय जाडीची परत तयार होते पण ती स्थिर असते. तिच्यामधून शिरकाव करून घेत खालच्या लोहाशी प्रक्रिया करणं ऑक्सिजनला शक्य होत नाही. त्यामुळे लोहाची संयुगं तयार होत नाहीत. एवढंच नाही, तर जे काही थोडंफार क्रोमियम किंवा निकेल उरलं असेल त्याच्याशीही ऑक्सिजन प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे जे काही गंजाचं अतिशय पातळ पुट तयार झालं असेल, त्याची जाडीही वाढत नाही. ते अतिशय पातळ म्हणजे केवळ एका रेणूच्या जाडीएवढंच असल्यामुळं आणि त्याचा रंगही तपकिरी नसल्यामुळं डोळ्यांना ते दिसत नाही. म्हणजे स्टेनलेस स्टीललाही गंज चढतो पण तो अतिशय मामुली स्वरूपातला असल्यामुळं आणि त्याची वाढ होत नसल्यामुळं त्या धातूचं नुकसान मर्यादित राहतं. सतत वाढत जाऊन ते मूळ धातूला कुरतडत खाऊन टाकत नाही.

या सर्वात कळीची भूमिका बजावली जाते ती क्रोमियमकडून. त्यामुळेच इतर धातू असोत-नसोत, स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियमचा समावेश निश्चित असतो. किंबहुना, किमान दहा टक्के क्रोमियमचा अंतर्भाव केलेला असल्याशिवाय अशा धातूला स्टेनलेस स्टील असल्याचं प्रमाणपत्र दिलं जात नाही.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?'या पुस्तकातून*

═══════════════════════

नद्या वळणाकार का घेतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री.गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *नद्या नागमोडी वळणका घेतात ?* 📒

***********************************

नद्यांचा उगम डोंगरराजीमध्ये म्हणजेच उंचावर होतो. तिथून त्या उताराकडे वाहत जातात. जोवर हा उतार असतो तोवर त्यातील उंचवटे आणि सखल भाग यांच्या साथीनं त्या वाह । राहतात; पण जेव्हा त्या सपाट प्रदेशातून वाहू लागतात तेव्हा त्यांचा प्रवाह निर्धारित करणारे दुसरेच घटक प्रबळ होतात. यातल्या दोन प्रमुख घटकांचा प्रभाव प्रवाहाचं स्वरूप निश्चित करण्यात होतो. नद्याच्या वाहण्यामुळं पाण्याचं काठावरच्या तशाच तळाशी असलेल्या मातीशी घर्षण होतं. त्यामुळे मग त्या मातीची धूप होते. उलट काठावरचा गाळ नद्यांच्या तळाशी साचून राहतो. नदीचा प्रवाह जरी सलग भासला तरी सर्वच पाणी एकाच वेगानं वाहत नसतं. याला परत तळामध्ये तसंच काठावरच्या प्रदेशातील उंचवटे आणि सखल भाग कारणीभूत असतात. ज्या बाजूचा प्रवाह वेगानं वाहतो त्या बाजूकडची धूप होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तो भाग अधिक खोल बनतो. त्या बाजूच्या पाण्याला अधिक वेग येतो. त्यापायी धूप आणखीच वाढते. उलट ज्या बाजूच्या प्रवाहाचा वेग कमी असतो त्या बाजूकडे गाळ साचून राहण्याचं प्रमाण वाढीस लागतं. त्या बाजूचा तळ उथळ होतो. प्रवाहाच्या वेगाला अधिक अटकाव होतो. तो आणखी कमी होतो. जास्त गाळ साचून राहू लागतो. अशा रीतीनं नदीच्या तळाचा उतार वाढला, की ज्या बाजूला जास्त उतार आहे त्या बाजूला प्रवाह वळतो.


 सायकलीवरून जाताना जर गुळगुळीत रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवताळ भागात पुढचं चाक गेलं तर त्याचा वेग कमी होतो. सायकल त्या बाजूला झुकते, म्हणजेच दोन चाकांच्या वेगात फरक पडला, की सरळ वाट सायकल सोडून देते. तशातलीच नदीच्या प्रवाहाची गत होते. फरक इतकाच, की ज्या बाजूच्या प्रवाहाची गती जास्त झालेली असते त्या बाजूकडे प्रवाह झुकतो. कारण आता उतार त्या दिशेला वाढलेला असतो. तसा तो प्रवाह झुकला की विरुद्ध बाजूच्या पाण्याला तेवढ्याच वेळात जास्त अंतर काटावं लागतं. त्याचा वेग वाढतो. त्यापायी होणारी धूप वाढते. तशी ती वाढली की आता उताराची दिशाही बदलते. त्यामुळे मग प्रवाह विरुद्ध बाजूला झुकतो. वळण विरुद्ध बाजूकडे झुकतं. ज्या प्रदेशातून अशा वेळी नदी वाहत असते त्या प्रदेशात नैसर्गिक उतार नसल्यामुळे प्रवाहापोटी उद्भवणाऱ्या चढाव- उतारांमधील सततच्या दिशाबदलाची संगत करत नदी वाहत राहते. साहजिकच तिचा प्रवाह नागमोडी वळणं घेत राहतो.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?'या पुस्तकातून*

═══════════════════════


सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

धरणातील पहिला विद्युत जनित्र सुरू

 *💥🌊२६ आॕक्टोबर १९३६🌊💥*

🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊

*हूव्हर धरण मधील पहीला जलविद्युत जनित्र कार्यरत झाला*

🌊💥🌊💥🌊💥🌊💥🌊💥🌊

हूवर धरण (इंग्लिश: Hoover Dam) हे अमेरिकेच्या नेव्हाडा व अ‍ॅरिझोना राज्यांच्या सीमेवरून वाहणार्‍या कॉलोराडो नदीवरील एक धरण आहे. १९३६ साली बांधून पूर्ण केलेले हूवर धरण ३७९ मी लांब व २२१.४ मी उंच आहे.

नैऋत्य अमेरिकेतील दुष्काळी व वाळवंटी भागांत पाणी तसेच जलविद्युत निर्मितीसाठी हे धरण बांधले गेले. ह्या धरणामधून २०८० मेगावॉट विजनिर्मिती व ११,००० घनमीटर प्रतिसेकंद जलप्रवाह होऊ शकतो. लास व्हेगास शहराच्या ४० किमी आग्नेयेला असलेले हूवर धरण ह्या भागातील एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे.

वीज निर्मिती करणाऱ्या करणाऱ्या यंत्राला जनित्र असे म्हणतात. यात अनेक प्रकार असतात. पाण्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या यंत्राला जल विद्युत जनित्र. असे जनित्र वैतरणा येथील जल विद्युत प्रकल्पात आहे. असे तर कोळश्याच्या उष्णतेपासून वीज निर्मिती करणाऱ्या यंत्राला औष्णिक जनित्र असे म्हणतात. असे जनित्र एकलहरा, चंद्रपूर येथील औष्णिक वीज प्रकल्पां मध्ये आहे.

इतिहास

विद्युत जनित्राचा शोध मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने लावला.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अश्विन मास,कृष्ण पक्ष, *पँचमी*,आद्रा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, २६ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

           *भाषा हमारे सोचने के तरीके को स्वरूप प्रदान करती है और निर्धारित करती है कि हम क्या-क्या सोच सकते हैं । भाषा एक नगर है, जिसके निर्माण के लिए प्रत्ये़क व्यक्ति एक-एक पत्थर लाता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

पोलिस स्मृतिदिन

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳👮‍♂️पोलिस स्मृती दिन👮‍♂️🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

   आज भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन आहे. दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. या दिवशी शहीद पोलिस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.

     २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती.


देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन साजरा केला जातो.


२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यानंतरपासून २१ ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या २१ ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली जाते. जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये या निमित्ताने शहीद पोलिसांना अभिवादन करण्यात येते. यासोबतच विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येते.


२०१८ मध्ये, पोलिस स्मृतिदिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमध्ये पहिल्याच राष्ट्रीय पोलिस स्मारकाचे उद्घाटन केले. त्यांनी पोलिस दलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अभिवादन केले आणि देशातील लोकांना पोलिस म्यूझियम भेट देण्याचे आवाहन केले. आज राष्ट्रीय पोलिस मेमोरियलने १९४७ नंतरपासून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व केंद्रीय आणि राज्य पोलिस दलाच्या ३४,८४४ पोलिस कर्मचाऱ्यांचे स्मरण केले.


महाराष्ट्र पोलिसांकडून अभिवादन

आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आदरांजली वाहण्यात येते.

 'हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही.'  

शहिद पोलिस जवानांना भावपुर्ण अभिवादन.....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,कृष्ण पक्ष, *प्रथम*,अश्विनी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, २१ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


          *"संतुष्ट जीवन, सफल जीवन से सदैव श्रेष्ठ होता है क्योंकि सफलता का मापदण्ड सदैव दूसरों के द्वारा आंकलित एवं दूसरों पर ही निर्भर होता है जबकि संतुष्टि स्वयं के मन और मस्तिष्क द्वारा निर्धारित होती है"*


*गौधन, गजधन, बाजधन*

               *और रतन धन खान,*

*जब आवे सन्तोष धन,*

              *सब धन धूरी समान*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

शरदिनी अरूण डहाणूकर वैद्यकशास्त्र

 *शरदिनी अरुण डहाणूकर*


*वैद्यकशास्त्रज्ञ*


*जन्मदिन - १७ ऑक्टोबर १९४५*


        गोव्यात जन्मलेल्या शरदिनी पै-धुंगट यांचे शालेय शिक्षण मुंबई येथील सेंट कोलंबा विद्यालयात झाले. १९६२ साली माध्यमिक शालान्त परीक्षेत त्या जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्तीच्या मानकरी होत्या. एल्फिन्स्टन महाविद्यालयात इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शरदिनी डहाणूकरांनी सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि के.ई.एम. रुग्णालयातून एम.डी. व पीएच.डी. (औषधविज्ञानशास्त्र) या अत्युच्च पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर त्याच संस्थेत औषधविज्ञानशास्त्र विभागात तीस वर्षे अध्यापन व संशोधन केले. १९९५ साली त्यांनी विभागप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. विभागामध्ये मूलगामी बदल घडवून आणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर  या विभागाला महत्त्व प्राप्त करून दिले. २००१ साली टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई यमुनाबाई एल. नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्री म्हणून त्यांची निवड झाली. त्याच पदावर कार्यरत असताना त्यांचे अकाली निधन झाले.


आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पदवीधर असलेल्या डॉ.डहाणूकरांची आयुर्वेदाशी तोंडओळख झाली, ती वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी यांच्यामुळे. पुढे स्वत:च्या कुटुंबीयांवर उपचार करताना त्यांना आधुनिक वैद्यकाच्या त्रुटी प्रकर्षाने जाणवल्या, तसेच आयुर्वेद उपचारपद्धतीचे उत्तम अनुभव आले. त्यामुळे त्या आधुनिक चिकित्सक वृत्तीने आयुर्वेदशास्त्राचा वेध घेऊ लागल्या. त्यासाठी त्यांनी वैद्य वेणीमाधवशास्त्री यांच्याकडे आयुर्वेदाचा सखोल अभ्यास केला. त्यांच्याबरोबर झालेल्या विचारमंथनातून त्यांना आयुर्वेदाच्या बलस्थानांची जाणीव होऊ लागली. ही बलस्थाने प्राय: आयुर्वेदाची मूलतत्त्वे व संकल्पना आहेत हे लक्षात येताच त्यांनी ती आधुनिक विज्ञानाची परिभाषा वापरून सर्वमान्य शास्त्रीय कसोट्यांवर त्यांची चिकित्सा करून दाखवण्याचे प्रयत्न सुरू केले. आयुर्वेदाला पुरावाधिष्ठित शास्त्र म्हणून स्वदेशी व परदेशी मान्यता मिळवून देणे हेच त्यांनी आपले जीवितकार्य मानले.


त्यांच्या संशोधनाचे वेगळेपण म्हणजे आपल्या पूर्वसुरींप्रमाणे आयुर्वेदातील औषधी वनस्पतींच्या अर्काचे पृथक्करण करत एकाच घटकावर लक्ष केंद्रित न करता, त्यांनी आयुर्वेदीय संस्कार झालेली औषधे, आयुर्वेदिक तत्त्वे वापरून प्रयोगात वापरली. अशा अनेक सम्यक औषधींचे गुणधर्म त्यांनी आयुर्वेदात मांडलेल्या गुणधर्मांशी पडताळून पाहिले. उदाहरणार्थ, दम्यासाठी पिंपळी किंवा यकृतविकारासाठी कात. हे प्रयोग करताना त्यांनी आयुर्वेदातील ‘रसायन’ संकल्पनेवर अधिक भर देऊन रसायन द्रव्यौषधी या प्रामुख्याने रोगप्रतिकारक शक्तींचे संवर्धन करून मेंदू-प्रतिकारशक्ती-अवयवकार्य त्या साखळीद्वारे वेगवेगळ्या अवयवांना व शरीरसंस्थांना बळ प्राप्त करून देतात असा सिद्धान्त प्रथमच मांडला. त्यासाठी गुळवेल, आवळा, हिरडा, पिंपळी, अश्वगंधा, शतावरी अशा सहा रसायनांना निवडून त्यांचे पेशी व विविध प्राण्यांवर होणारे परिणाम शोधले. या प्रयोगाच्या निष्कर्षांनुसार गुळवेल या औषधीची त्यांनी निवड केली. त्यापुढची पायरी म्हणजे रुग्णांवर गुळवेलीची चाचणी करणे. जठरांत्र शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट यांच्या सहकार्याने त्यांनी अवरोधक काविळीचे रुग्ण, उरोऔषधतज्ज्ञ डॉ. महाशूर यांच्यासोबत क्षयरोगी व कर्करोगतज्ज्ञ डॉ. राजन बडवे यांच्या सहकार्याने कर्कविरोधी औषधे घेणारे रुग्ण यांच्यावर गुळवेलीच्या चाचण्या घेतल्या. या सर्व संशोधनाचा परिपाक म्हणजे गुळवेल ही एक उत्कृष्ट प्रतिकारशक्तिसंवर्धक (इम्युनोस्टिम्युलेटर) आहे हे सिद्ध झाले.


अत्यंत प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये आयुर्वेद व त्यातील वनस्पतींच्या गुणधर्मांबद्दल झालेल्या संशोधनास प्रसिद्धी मिळाली. या संशोधनास अगुस्तीनी त्रापानी हा इटलीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पुण्याच्या भारतीय चिकित्सा संस्थानचे सुवर्णपदक, भारतीय चिकित्सा राष्ट्रीय अकादमीची फेलोशिप व इतर अगणित पुरस्कार मिळून त्यांची यथोचित दखल घेतली गेली. मुख्य म्हणजे या संशोधनानंतर आधुनिक वैद्यकातील औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने प्रथमच गुळवेल हे आयुर्वेदिक औषध जनसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले.


डॉ. डहाणूकरांचे आयुर्वेदविषयक कार्य हे केवळ वनस्पतींच्या गुणधर्मांच्या शोधाबद्दल मर्यादित राहिले नाही. आयुर्वेदातील अनेक संकल्पनांचा उदा. प्रकृती, आम, भस्मनिर्मिती, पंचकर्म, स्वस्थवृत्त इत्यादींचा त्यांनी शास्त्रीय संशोधनाची जोड देऊन पाठपुरावा केला. त्यावर त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये सत्तरहून अधिक लेख लिहिले. प्रोफेसर वॅगनर या वनौषधितज्ज्ञाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात त्यांनी ‘आयुर्वेदीय रोगप्रतिकारसंवर्धक’ असा लेख लिहून आयुर्वेदातील प्रतिकारशक्तीबद्दलच्या संकल्पना व भारतातील अनेक संशोधकांनी त्यासंबंधी केलेले संशोधन याला जगप्रसिद्धी मिळवून दिली. अनेक आधुनिक विज्ञानांच्या संशोधकांना आयुर्वेदासंबंधी संशोधन करण्यास प्रेरित केले. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या भाषणांतून व लिखाणांतून आयुर्वेदाची तोंडओळख करून दिली. आयुर्वेद रिव्हिझिटेड व आयुर्वेद अनरॅव्हल्ड ही शास्त्रीय परिभाषेतील, तर जनसामान्यांवर स्वत:चे आरोग्यरक्षण स्वत: आयुर्वेदिक तत्त्वे समजावून घेऊन करावे म्हणून लिहिलेली सोप्या, सुगम भाषेतील वर्तमानपत्रीय सदरे व स्वास्थ्यवृत्त, तसेच ‘ए ड्रग इज बॉर्न’ ही पुस्तके त्याला साक्ष आहेत.


संशोधनात पुढील पिढीचे सातत्य कायम टिकावे म्हणून त्यांनी भारतातील पहिले आयुर्वेद संशोधन केंद्र, सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयासारख्या संस्थेत, १९८९ साली सुरू केले व नायर रुग्णालयात अधिष्ठात्रीचा पदभार स्वीकारताना आपल्या शिष्येकडे (डॉ. निर्मला रेगे) सुपूर्द केले. तसेच नायर या महापालिकेच्या रुग्णालयात आणखी एक आयुर्वेद संशोधन केंद्र सुरू केले, ज्याचे काम त्यांची शिष्या डॉ. ऊर्मिला थत्ते बघत आहेत.


आयुर्वेदाला अशास्त्रीय ठरवल्याबद्दल लंडनमध्ये लॉर्ड वॉल्टन यांच्या सिलेक्ट कमिटीपुढे आपले संशोधन मांडून कमिटीला आपला निर्णय बदलायला लावून डॉ.डहाणूकरांनी सर्व भारतीयांवर न फेडता येणारे उपकार करून ठेवले आहेत.


त्यांच्यातील संशोधकवृत्तीचा शोध घेतला, तर त्याचा उगम त्यांच्याकडे वारसाहक्काने आलेल्या निसर्गप्रेमात, त्या प्रेमाची जोपासना करणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांत व घरच्या सुजाण, संपन्न व अनुकुल वातावरणात दिसून येतो. निसर्ग, फुले, वृक्ष, पशुपक्षी, माणसे, खाद्यपदार्थ, देशविदेशांतील स्थळे यांना बघण्याची नजर, समजून घेण्याची संवेदना आणि शब्दरूप देण्याची शब्दकळा त्यांना अवगत होती. त्यांच्या लालित्यपूर्ण लिखाणाचा प्रत्यय ‘हिरवाई’, ‘फुलवा’, ‘वृक्षगान’, ‘मनस्मरणीचे मणी’, ‘पांचाळीची थाळी’, ‘सगेसोबती’, ‘नक्षत्रवृक्ष’, अशा अनेक पुस्तकांतून येतो. ही पुस्तके आजही शालेय मुलांपासून थोर समीक्षकांपर्यंत सर्वांनाच भावतात. त्यांपैकी काही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट साहित्याचे पुरस्कारही मिळाले आहेत.


उत्कृष्ट शिक्षक, दूरदृष्टी असणारी व्यवस्थापक, आदरणीय औषधविज्ञानशास्त्रज्ञ, चिकित्सक संशोधक, सर्वमान्य साहित्यिक, आतिथ्यशील गृहिणी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चराचरांमध्ये विलक्षण रस असलेली विलक्षण बुद्धीची व्यक्ती म्हणून त्यांची पुढील पिढ्यांना ओळख राहील.

                      —डॉ. रवी बापट

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 *🌄🌅भोर सुहानी🌅🌄*


*जीवन में केवल दो ही वास्तविक धन है...*


            *समय और सांसे*

 *और दोनों ही निश्चित और सीमित हैं...*


         *समझदारी से खर्च करें*

  *बाकी सब धूल है या तो आपकी भूल है !!*


    *🌹मंगलमय सु प्रभात🌹*

           


 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

विठ्ठल रामजी शिंदे

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

               *विठ्ठल रामजी शिंदे*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

    जन्म : २३ एप्रिल १८७३

                  जमखिंडी

    मृत्यू :  २ जानेवारी १९४४


*विठ्ठल रामजी शिंदे यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची मुंबईत स्थापना केली.*


 विठ्ठल रामजी शिंदे हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते. शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक होते. त्यांनी स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे तसा आचार सर्वत्र घडावा म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ते कर्मयोगी होते. विद्वत्ता, संयम व सेवावृत्ती या महान आदर्शाचे महामानव म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे होत. एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात.


मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून मानवी समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये केवळ शंभर रुपये मानधनावर प्रार्थना समाजाचे कार्य सुरू केले. भारतीय समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांना आळा बसावा व हिंदू धर्मात सुधारणा घडून यावी या उद्देशाने एकोणिसाव्या शतकात येथील काही समाजसुधारकांनी ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज व आर्य समाज यासारख्या संघटना स्थापन केल्या होत्या. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज यांच्या उदात्त तत्त्वांचे आकर्षण महर्षी शिंदे यांना वाटले. आपला समाज रूढी व परंपरा यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी, तसेच आपल्या लोकांमधील धार्मिक अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व कर्मकांडे आहेत. त्यांपासून त्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी वरील दोन्ही संघटनांच्या तत्त्वांना मान्यता देऊन त्या तत्त्वांचा प्रसार लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न केला. प्रार्थना समाजाचे कार्य करत असताना त्यांनी देशातील अनेक शहरांमध्ये दौरा करून एकेश्वरी धर्मपरिषद आयोजित केलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले


*जीवन -)*

शिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजात दाखल झाले. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘'डिप्रेस्ड क्लास मिशन’' या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली. अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची मुंबईत स्थापना केली. या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती : अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणॆ, अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणींचे निवारण करणे, अस्पृश्यांना खऱ्या धर्माची शिकवण देणे आणि त्यांचे शीलसंवर्धन घडून आणणे, इत्यादी. या संस्थेच्या माध्यमातून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांमध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू करणे, त्यांच्यासाठी वसतिगृहे उघडणे, शिवणकामाचे वर्ग चालवणे, प्रबोधनपर व्याख्याने कीर्तने आयोजित करणे, आजारी असणाऱ्या लोकांची सेवा करणे, इत्यादी गोष्टींचा समावेश या संस्थेच्या कार्यामध्ये होता. संस्थेच्या शाखा अकोला, अमरावती, इंदूर, कोल्हापूर, ठाणे, दापोली, पुणे, भावनगर, मद्रास, मालवण, मुंबई, सातारा, हुबळी, इत्यादी ठिकाणी उघडण्यात आल्या होत्या.


*लेखन -)*

शिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडांत रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना, मग १९०१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३० साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे. याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी 'ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर' नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.


पहिल्या तीन रोजनिशींचे संपादन १९७९ साली गो. मा. पवार यांचे असून 'ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर' या नावाच्या चौथ्या रोजनिशीचे संपादन रणधीर शिंदे यांचे आहे.


वि.रा. शिंदे यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात ’भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन’ हे लेखन आहे. दुसऱ्या खंडात महर्षी श‌िंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, 'माझ्या आठवणी व अनुभव' हे ३७५ पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत.


*ग्रंथसंपदा -)*

भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न -१९३३

Untouchable of India

History of Parihars

माझ्या आठवणी व अनुभव (Autobiography)

भागवत धर्माचा विकास (लेख)

मराठ्यांची पूर्वपीठिका (लेख)

कानडी - मराठी संबंध (लेख)

कोकणी - मराठी संबंध (लेख)

Thiestic directory

*आत्मचरित्र -)*

'माझ्या आठवणी व अनुभव' नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत विभागले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवनवृत्तान्त सांगितला आहे. तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन आहे. लहानपणी त्यांच्या घरी अनेकजण येत. त्यात साधू, रामदासी, संन्यासी व सिद्ध येत. त्यांचे लहानपणाचे अनुभव मोठे हृदयस्पर्शी आहेत. आपल्या वाड्यात सर्व शाळासोबती कसे जमत असत व त्यातून धांगडधिंग्याचा जिमखाना कसा बनत असे, हे ते सांगत. शेतकरी चळवळी व परिषदांचे वृत्तान्त या आत्मनिवेदनात आहेत.


*प्रवासवर्णने -)*

इंग्लंडमधील रोजनिशीत त्यांनी प्रथम त्यांच्या बोटीवरील प्रवासाबद्दल लिहिले आहे. तौलनिक धर्माचे अध्ययन करण्यासाठी ते ऑक्सफर्डला आले होते. ते पॅरिसला गेले व तेथील इमारतींचे कलासौंदर्य पाहून याबाबत फ्रेंचांची ग्रीकांशीच तुलना होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. मानवी ऐश्वर्य, सौंदर्य, स्वातंत्र्य व सुधारणा यांचा मिलाफ या राष्ट्रांत झाला आहे, असे त्यांस वाटले.


ब्राह्मो समाजास शंभर वर्षे झाली, त्यानिमित्ताने शिंदे यांनी पश्चिम बंगालची सफर केली. तेव्हा ते ब्राह्मो उपासना केंद्रे चालवणाऱ्या रवींद्रनाथांना भेटले. 'रवींद्रनाथांचा आवाज अलगुजासारखा कोमल व हृदयप्रवेशी होता. आणि त्या उपासनेत त्यांनी लोकाग्रहाखातर छोटे सुंदर पदही म्हटले, असे त्यांनी म्हटले आहे.


त्यानंतर शिंदे पूर्व बंगालमध्ये गेले. तेथे त्यांनी वेगवेगळ्या शहरांत व गावांत ब्राह्मो धर्मावर भाषणे दिली.


*शेतकरी चळवळ -)*

वि.रा. शिंदे यांनी इ.स. १९२० ते २६ या काळात शेतकरी चळवळ उभी केली. पण सरकारने तुकडे बंदीचे बिल मागे घेताच चळ‍वळीत वाद सुरू झाले, आणि चळवळ थांबली.


विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरील पुस्तके संपादन करा

एक उपेक्षित महात्मा : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (प्रा.डॉ. एन.डी. पाटील)

एक उपेक्षित महामानव : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (बा.ग. पवार)

दलितांचे कैवारी विठ्ठल रामजी शिंदे (डॉ. लीला दीक्षित)

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (संपादक - रा.ना. चव्हाण) (२ भाग)

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : चिकित्सक लेखसंग्रह (प्रा.डाॅ. भिमाजी नामदेव दहातोंडे)

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य (गो.मा. पवार)

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे धर्मविषयक विचार (अशोक चौसाळकर)

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या राजकीय व सामाजिक चळवळी (तानाजी ठोंबरे)

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना समजून घेताना (सुहास कुलकर्णी)

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : व्यक्ती आणि विचार (प्रा डॉ. भिमाजी नामदेव दहातोंडे)

महाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला संच : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (सुहास कुलकर्णी)

महाराष्ट्रातील समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (डॉ. नीला पांढरे)

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

संकलन -) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ 

कुतूहल संगणकाचे


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री.गजानन गोपेवाड _

~==========================~


*कुतूहल : संगणकाचे गणितीय बीज*


क्लिष्ट गणितीय समस्यांची अत्यल्प त्रुटी असलेली उकल जलद रीतीने मिळवण्याची आवश्यकता असल्याचे चार्ल्स बॅबेज या गणितज्ञाला प्रथम जाणवले. त्यातूनच संगणकाचा जन्म झाल्याने त्यांना संगणकाचे जनक संबोधले जाते. संगणकाचे प्रारंभीचे स्वरूप आणि कार्य बघितल्यावर हिशोब ठेवताना, आकडेमोड किंवा गणना करताना होणाऱ्या मानवी चुका टाळण्यासाठी मुळात संगणक निर्माण करून उपयोगात आणल्याचे लक्षात येते. संगणकाच्या केंद्रीय प्रक्रियकातील (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट) मुख्य घटक भाग, दिलेल्या आकडेवारीवर (डेटा) अंकगणित आणि तार्किक परिकर्मी यांच्या साहाय्याने तसेच गणितातील मूलभूत तत्त्वांच्या आणि नियमांच्या आधारे क्रिया-प्रक्रिया करतो. संगणक क्षेत्रात काम करण्यासाठी अमूर्त संकल्पनांचा बोध लावणे, गणितीय तर्कसंगती उपयोगात आणणे, वास्तविक जगाची शक्य तितकी अचूक प्रतिकृती तयार करणे या सगळ्याची पूर्वावश्यकता असते. त्याची दिशा गणिताच्या अभ्यासातून मिळते. तरी त्रिकोणमिती, द्विमान अंकगणित, संच सिद्धांत, बीजगणित, भूमिती यांच्या ज्ञानाबरोबरच, संगणकशास्त्रासाठी तर्कशक्तीची मजबूत जोड हवी.


संगणकाच्या प्रक्रियांची कार्यक्षमता वाढवण्यासाठीही गणितीय विचारसरणीचा उपयोग अनिवार्य ठरतो. संगणक जालव्यूह आणि सुरक्षा शिष्टाचार प्रणालीचे (प्रोटोकॉल) कार्यक्षम प्रारूप तयार करण्यासाठी गणितातील कलनशास्त्राचा उपयोग होतो. चित्रालेखाद्वारे आकृत्या आणि चित्रे रेखाटण्यासाठी भूमितीचे ज्ञान आवश्यक आहे. अल्गोरिदमचे प्रारूप तयार करताना विविक्त (डिस्क्रिट) गणिताचा उपयोग होतो. आज्ञावली लिहिणे म्हणजेच प्रोग्रॅमिंग हे संगणकशास्त्राचे उपयोजित पण अविभाज्य अंग समजले जाते. कार्यसाधक संगणक आज्ञावली तयार करताना फलन आणि पुनरावर्तनाचा वापर अनेकदा उपयुक्त ठरतो.


गेल्या काही दशकांमधली संगणकाची उत्क्रांती आणि विविध क्षेत्रांतले उपयोजन बघता निर्मितीच्या मूळ हेतूपासून दूर जाऊन संगणक अन्य क्षेत्रांत उपयोगी ठरत असले तरी अनेक गणितज्ञांनी संगणकशास्त्राची पायाभरणी केल्याचे सत्य आपण डोळ्याआड करू शकणार नाही. गणिताच्या आधारे तात्त्विकरीत्या जे सिद्ध केले जाते, त्यामागचा तर्क शोधून त्या प्रक्रिया स्वचालित करण्यासाठी संगणकशास्त्राची मदत होते. गणितातील उदाहरणे पद्धतशीरपणे सोडवूनही झालेल्या चुका स्वत:च शोधून सुधारण्यासाठी जसे प्रत्येक पायरी तपासत जावे लागते तसेच प्रोग्रॅममधील तांत्रिक आणि तार्किक दोष (बग्स) शोधून त्यांचे निराकरण करावे लागते. गणिती तर्कातूनच संगणकाची संकल्पना उगम पावल्याने संगणकशास्त्राची पाळेमुळे गणितातच आहेत हे विसरता कामा नये. 


गजानन गोपेवाड 

~========================

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

The great shivaji maharaj

 "जर  *शिवाजी महाराज* हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !"

           *-- लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.* 


"भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर एकच पर्याय आहे,  शिवाजी महाराजांप्रमाणे लढा !

        *-- नेताजी सुभाषचंद्र बोस.* 


"नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या  शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे !"

                   *-- अॅडॉल्फ हिटलर* .


"शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर  शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !"

                 *-- स्वामी विवेकानंद.* 


"जर  शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते !"

              *-- बराक ओबामा, अमेरिका.* 


"जर  शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !"

                  *-- इंग्रज गव्हर्नर.* 


"काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला  शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? *सिवा_भोसला* जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !"

              *-- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर)* 


"उस दिन *सिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी *सिवा भोसला* से मिलना नही चाहता !"

               *-- शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.* 


"क्या उस गद्दारे दख्खन से *सिवा* नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !"

               *-- बडी बेगम अलि आदिलशाह.* 


१७ व्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात *महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला होता !* 


वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच ! महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते !


ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी महाराज या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता ! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झाले ! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी महाराज या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता !


बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते !


दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा ! महाराजांनी याचा पराभव केला !


सिध्दी जौहर, सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते ! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं !


उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा ! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव ! (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकी एक ही मावळा गमावला नाही. ⛳⛳⛳⛳⛳ 


*छत्रपति शिवाजी राजे यांनी विदेशी मोगलाना भारतातून युध्द करुन पळवून लावले!भारतात जे मुस्लिम आहेत ते मोगल नाही!ते त्यांचा उद्योग करतात!दुरदुरपरतं त्याचा राजकारणाची संबध नसतो!पण त्यांच्यावर राजकारण करुन आपल्या हातात कायमस्वरूपी सत्ता राज्य आबादित ठेवण्यासाठी उपदव्याप करणारे आहेत!तर--छत्रपति यांच्या सैन्यात 35 टक्के भारतीय मुस्लिम होते!चीन युध्दाच्या वेळेस हैद्राबाद चा राजा यांनी आपले सगळे सोने पेसा आडका सैन्यखरेदी साठी तोफगोळा साहित्य खरेदीसाठी दिले होते!त्यामुळे भारताने चीनवर विजय मिळवला होता!*


अभिमान असेल तरच शेअर करा....... 🚩

 *वरील ज्वलन्त इतिहास नवीन पिढी पर्यन्त पोचवण्या साठी world record उपक्रम  घेत आहोत तरी जास्तीत जास्त शाळा आणि मूलां पर्यंत हा msg पोहचवा आणि या ऐतिहासिक सोहळ्यांचे साक्षीदार व्हावे ही विनंती 🙏*

शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

शरदिनी आरूण डहाणूकर वैद्यकशास्त्र

 *शरदिनी अरुण डहाणूकर*


*वैद्यकशास्त्रज्ञ*


*जन्मदिन - १७ ऑक्टोबर १९४५*


        गोव्यात जन्मलेल्या शरदिनी पै-धुंगट यांचे शालेय शिक्षण मुंबई येथील सेंट कोलंबा विद्यालयात झाले. १९६२ साली माध्यमिक शालान्त परीक्षेत त्या जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्तीच्या मानकरी होत्या. एल्फिन्स्टन महाविद्यालयात इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शरदिनी डहाणूकरांनी सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि के.ई.एम. रुग्णालयातून एम.डी. व पीएच.डी. (औषधविज्ञानशास्त्र) या अत्युच्च पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर त्याच संस्थेत औषधविज्ञानशास्त्र विभागात तीस वर्षे अध्यापन व संशोधन केले. १९९५ साली त्यांनी विभागप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. विभागामध्ये मूलगामी बदल घडवून आणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर  या विभागाला महत्त्व प्राप्त करून दिले. २००१ साली टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई यमुनाबाई एल. नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्री म्हणून त्यांची निवड झाली. त्याच पदावर कार्यरत असताना त्यांचे अकाली निधन झाले.


आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पदवीधर असलेल्या डॉ.डहाणूकरांची आयुर्वेदाशी तोंडओळख झाली, ती वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी यांच्यामुळे. पुढे स्वत:च्या कुटुंबीयांवर उपचार करताना त्यांना आधुनिक वैद्यकाच्या त्रुटी प्रकर्षाने जाणवल्या, तसेच आयुर्वेद उपचारपद्धतीचे उत्तम अनुभव आले. त्यामुळे त्या आधुनिक चिकित्सक वृत्तीने आयुर्वेदशास्त्राचा वेध घेऊ लागल्या. त्यासाठी त्यांनी वैद्य वेणीमाधवशास्त्री यांच्याकडे आयुर्वेदाचा सखोल अभ्यास केला. त्यांच्याबरोबर झालेल्या विचारमंथनातून त्यांना आयुर्वेदाच्या बलस्थानांची जाणीव होऊ लागली. ही बलस्थाने प्राय: आयुर्वेदाची मूलतत्त्वे व संकल्पना आहेत हे लक्षात येताच त्यांनी ती आधुनिक विज्ञानाची परिभाषा वापरून सर्वमान्य शास्त्रीय कसोट्यांवर त्यांची चिकित्सा करून दाखवण्याचे प्रयत्न सुरू केले. आयुर्वेदाला पुरावाधिष्ठित शास्त्र म्हणून स्वदेशी व परदेशी मान्यता मिळवून देणे हेच त्यांनी आपले जीवितकार्य मानले.


त्यांच्या संशोधनाचे वेगळेपण म्हणजे आपल्या पूर्वसुरींप्रमाणे आयुर्वेदातील औषधी वनस्पतींच्या अर्काचे पृथक्करण करत एकाच घटकावर लक्ष केंद्रित न करता, त्यांनी आयुर्वेदीय संस्कार झालेली औषधे, आयुर्वेदिक तत्त्वे वापरून प्रयोगात वापरली. अशा अनेक सम्यक औषधींचे गुणधर्म त्यांनी आयुर्वेदात मांडलेल्या गुणधर्मांशी पडताळून पाहिले. उदाहरणार्थ, दम्यासाठी पिंपळी किंवा यकृतविकारासाठी कात. हे प्रयोग करताना त्यांनी आयुर्वेदातील ‘रसायन’ संकल्पनेवर अधिक भर देऊन रसायन द्रव्यौषधी या प्रामुख्याने रोगप्रतिकारक शक्तींचे संवर्धन करून मेंदू-प्रतिकारशक्ती-अवयवकार्य त्या साखळीद्वारे वेगवेगळ्या अवयवांना व शरीरसंस्थांना बळ प्राप्त करून देतात असा सिद्धान्त प्रथमच मांडला. त्यासाठी गुळवेल, आवळा, हिरडा, पिंपळी, अश्वगंधा, शतावरी अशा सहा रसायनांना निवडून त्यांचे पेशी व विविध प्राण्यांवर होणारे परिणाम शोधले. या प्रयोगाच्या निष्कर्षांनुसार गुळवेल या औषधीची त्यांनी निवड केली. त्यापुढची पायरी म्हणजे रुग्णांवर गुळवेलीची चाचणी करणे. जठरांत्र शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट यांच्या सहकार्याने त्यांनी अवरोधक काविळीचे रुग्ण, उरोऔषधतज्ज्ञ डॉ. महाशूर यांच्यासोबत क्षयरोगी व कर्करोगतज्ज्ञ डॉ. राजन बडवे यांच्या सहकार्याने कर्कविरोधी औषधे घेणारे रुग्ण यांच्यावर गुळवेलीच्या चाचण्या घेतल्या. या सर्व संशोधनाचा परिपाक म्हणजे गुळवेल ही एक उत्कृष्ट प्रतिकारशक्तिसंवर्धक (इम्युनोस्टिम्युलेटर) आहे हे सिद्ध झाले.


अत्यंत प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये आयुर्वेद व त्यातील वनस्पतींच्या गुणधर्मांबद्दल झालेल्या संशोधनास प्रसिद्धी मिळाली. या संशोधनास अगुस्तीनी त्रापानी हा इटलीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पुण्याच्या भारतीय चिकित्सा संस्थानचे सुवर्णपदक, भारतीय चिकित्सा राष्ट्रीय अकादमीची फेलोशिप व इतर अगणित पुरस्कार मिळून त्यांची यथोचित दखल घेतली गेली. मुख्य म्हणजे या संशोधनानंतर आधुनिक वैद्यकातील औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने प्रथमच गुळवेल हे आयुर्वेदिक औषध जनसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले.


डॉ. डहाणूकरांचे आयुर्वेदविषयक कार्य हे केवळ वनस्पतींच्या गुणधर्मांच्या शोधाबद्दल मर्यादित राहिले नाही. आयुर्वेदातील अनेक संकल्पनांचा उदा. प्रकृती, आम, भस्मनिर्मिती, पंचकर्म, स्वस्थवृत्त इत्यादींचा त्यांनी शास्त्रीय संशोधनाची जोड देऊन पाठपुरावा केला. त्यावर त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये सत्तरहून अधिक लेख लिहिले. प्रोफेसर वॅगनर या वनौषधितज्ज्ञाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात त्यांनी ‘आयुर्वेदीय रोगप्रतिकारसंवर्धक’ असा लेख लिहून आयुर्वेदातील प्रतिकारशक्तीबद्दलच्या संकल्पना व भारतातील अनेक संशोधकांनी त्यासंबंधी केलेले संशोधन याला जगप्रसिद्धी मिळवून दिली. अनेक आधुनिक विज्ञानांच्या संशोधकांना आयुर्वेदासंबंधी संशोधन करण्यास प्रेरित केले. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या भाषणांतून व लिखाणांतून आयुर्वेदाची तोंडओळख करून दिली. आयुर्वेद रिव्हिझिटेड व आयुर्वेद अनरॅव्हल्ड ही शास्त्रीय परिभाषेतील, तर जनसामान्यांवर स्वत:चे आरोग्यरक्षण स्वत: आयुर्वेदिक तत्त्वे समजावून घेऊन करावे म्हणून लिहिलेली सोप्या, सुगम भाषेतील वर्तमानपत्रीय सदरे व स्वास्थ्यवृत्त, तसेच ‘ए ड्रग इज बॉर्न’ ही पुस्तके त्याला साक्ष आहेत.


संशोधनात पुढील पिढीचे सातत्य कायम टिकावे म्हणून त्यांनी भारतातील पहिले आयुर्वेद संशोधन केंद्र, सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयासारख्या संस्थेत, १९८९ साली सुरू केले व नायर रुग्णालयात अधिष्ठात्रीचा पदभार स्वीकारताना आपल्या शिष्येकडे (डॉ. निर्मला रेगे) सुपूर्द केले. तसेच नायर या महापालिकेच्या रुग्णालयात आणखी एक आयुर्वेद संशोधन केंद्र सुरू केले, ज्याचे काम त्यांची शिष्या डॉ. ऊर्मिला थत्ते बघत आहेत.


आयुर्वेदाला अशास्त्रीय ठरवल्याबद्दल लंडनमध्ये लॉर्ड वॉल्टन यांच्या सिलेक्ट कमिटीपुढे आपले संशोधन मांडून कमिटीला आपला निर्णय बदलायला लावून डॉ.डहाणूकरांनी सर्व भारतीयांवर न फेडता येणारे उपकार करून ठेवले आहेत.


त्यांच्यातील संशोधकवृत्तीचा शोध घेतला, तर त्याचा उगम त्यांच्याकडे वारसाहक्काने आलेल्या निसर्गप्रेमात, त्या प्रेमाची जोपासना करणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांत व घरच्या सुजाण, संपन्न व अनुकुल वातावरणात दिसून येतो. निसर्ग, फुले, वृक्ष, पशुपक्षी, माणसे, खाद्यपदार्थ, देशविदेशांतील स्थळे यांना बघण्याची नजर, समजून घेण्याची संवेदना आणि शब्दरूप देण्याची शब्दकळा त्यांना अवगत होती. त्यांच्या लालित्यपूर्ण लिखाणाचा प्रत्यय ‘हिरवाई’, ‘फुलवा’, ‘वृक्षगान’, ‘मनस्मरणीचे मणी’, ‘पांचाळीची थाळी’, ‘सगेसोबती’, ‘नक्षत्रवृक्ष’, अशा अनेक पुस्तकांतून येतो. ही पुस्तके आजही शालेय मुलांपासून थोर समीक्षकांपर्यंत सर्वांनाच भावतात. त्यांपैकी काही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट साहित्याचे पुरस्कारही मिळाले आहेत.


उत्कृष्ट शिक्षक, दूरदृष्टी असणारी व्यवस्थापक, आदरणीय औषधविज्ञानशास्त्रज्ञ, चिकित्सक संशोधक, सर्वमान्य साहित्यिक, आतिथ्यशील गृहिणी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चराचरांमध्ये विलक्षण रस असलेली विलक्षण बुद्धीची व्यक्ती म्हणून त्यांची पुढील पिढ्यांना ओळख राहील.

                      —डॉ. रवी बापट

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अश्विन मास,शुक्ल पक्ष, *द्वादशी*,शतमिषा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, १७ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


आत्मार्थं जीवलोकेऽस्मिन् 

               को न जीवति मानवः,

परं परोपकारार्थं 

               यो जीवति स जीवति।।


*भावार्थः-  इस जीवलोक में स्वयं के लिए कौन मानव नहीं जीता ? अर्थात अपने लिए तो सभी जीते है। किन्तु जो मनुष्य परोपकार के लिए जीता है, वही जीवन सच्चे अर्थ में जीवन है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

जागतिक अन्न दिवस

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अश्विन मास,शुक्ल पक्ष, *एकादशी*,धनिष्ठा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, १६ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


सुखमापतितं सेव्यं 

               दु:खमापतितं तथा,

चक्रवत् परिवर्तन्ते 

               दु:खानि च सुखानि च।।


*भावार्थः- जीवन में आने वाले सुख का भरपूर आनंद ले तथा दु:ख को भी सहर्ष स्वीकार करें। सुख और दु:ख तो एक के बाद एक चक्रवत् आते जाते रहते हैं, क्योंकि परिवर्तन संसार का नियम है।।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१

 *🚀🚀🚀मिसाईल मॕन🚀🚀🚀*

*🚀🚀ए.पी.जे. अब्दुल कलाम🚀*

🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀

*भारताचे प्रसिद्ध वैज्ञानिक*

 

*जन्म - १५ ऑक्टोबर १९३१*

 

अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम 

(जन्म -) १५ ऑक्टोबर १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.

कार्य

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. 

बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते.


राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख.


दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास आणि भाषाविकास यांसाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे.


दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या आणि ठाम आत्मविश्वास असणाऱ्या डॉ. कलामयांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. नितळ मन आणि दिलदार स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य होते. देशाच्या युवा पिढीला त्यांनी आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल, हा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता म्हणून पुढे येणार आहे, भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे हे त्यांनी सांगितले आहे. डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे. डॉ. कलाम नेहमी म्हणत असत की, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करण्यात येत आहे.


शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण होण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक आहे. अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. म्हणूनच वाचन प्रेरणा दिवसामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे. शाळांमध्ये दर आठवड्यातील एक तास अवांतर वाचनासाठी राखीव ठेवणे, शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये वाचन कट्टा तयार करणे यासारखे उपक्रमही यानिमित्ताने हाती घेण्यात येणार आहेत. या दिनाच्या निमित्ताने शाळांनी इनोवेटिव्ह फंडामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी पुस्तके खरेदी करून वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत. तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये वाचनाचे महत्व पटवून देण्यासाठी साहित्यिकांमार्फत मार्गदर्शन करण्यात यावे. वाचन दिनाच्या निमित्ताने त्या दिवसातील एक तास वाचनासाठी देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनच जणू या दिनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याशिवाय वाचन दिन अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी सोशल मिडीयाचा वापरही करण्यात यावा. तसेच साहित्यिक, मान्यवर व्यक्तींनी वाचनाचे महत्व सांगणारे ट्विट करावे, असे आवाहनही शालेय शिक्षण मंत्री यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तसेच हा दिवस आपण सर्वांनी मिळून ‘नो गॅझेट डे’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तकांचे वाचन या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहे. कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दूरदृष्टी, शक्तीशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करतील, या दृष्टीकोनातून वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केले जाणार आहे. मुळातच विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांमध्ये वाचनाची आवड, ओढ व प्रेरणा निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्त्व पटावे, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार ज्ञानसंपन्न आणि माहिती समृद्ध समाज घडण्यासाठी आणि भाषाविकास यासाठी आवश्यक आहे. मुळातच वाचन संस्कृती ही व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम करीत असते. म्हणून शाळा आणि महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.


वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने शाळेत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करणे, समाज सहभागातून या कट्ट्यासाठी पुस्तके गोळा करुन शाळेत पुस्तकपेढी तयार करणे, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करणे, एक व्यक्ती एक पुस्तक भेट हा उपक्रम राबविणे, प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी एका विद्यार्थ्याला किंवा शाळेला विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरुप होतील अशी पुस्तके भेट देणे, विद्यार्थ्यांना आनंदाने वाचन करता यावे म्हणून ‘वाचू आनंदे’ या तासिकेचे आयोजन करणे, चांगल्या पुस्तकांविषयी चर्चासत्रांचे आयोजन करणे, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांवर आधारित व्याख्यानाचे आयोजन करणे, परिसरातील लेखक, कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे, महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्कार याविषयीची माहिती देणे, पुस्तकांचे वाटप करुन ‘वाचक दिन’ आणि ‘अध्यापन दिन’ साजरा करणे, विद्यार्थ्यांचे गट करुन विविध पुस्तकांवर चर्चासत्रे घडवून आणणे, शाळांनी पुढाकार घेवून ‘पुस्तके तुमच्या भेटीला’ अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे, असे विविध उपक्रम आणि याव्यतिरिक्त देखील विविध उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत.


चला तर मग, काव्यवाचन, अभिवाचन, नो गॅझेट डे, वाचन कट्टा, समूह वाचन इत्यादी उपक्रमातून वाचक प्रेरणा दिन अधिकाधिक उत्सफूर्तपणे साजरा होण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी होऊया...

***********************************


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड


 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

डॉ कलाम सरांच्या जीवनावर आधारित काही जयंती निमित्त लेख,

*🚀🚀🚀मिसाईल मॕन🚀🚀🚀*

*🚀🚀ए.पी.जे. अब्दुल कलाम🚀*

🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀

*भारताचे प्रसिद्ध वैज्ञानिक*

 

*जन्म - १५ ऑक्टोबर १९३१*

 

अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम 

(जन्म -) १५ ऑक्टोबर १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.

कार्य

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. 

बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते.


राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख.


दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास आणि भाषाविकास यांसाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे.


दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या आणि ठाम आत्मविश्वास असणाऱ्या डॉ. कलामयांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. नितळ मन आणि दिलदार स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य होते. देशाच्या युवा पिढीला त्यांनी आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल, हा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता म्हणून पुढे येणार आहे, भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे हे त्यांनी सांगितले आहे. डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे. डॉ. कलाम नेहमी म्हणत असत की, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करण्यात येत आहे.


शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण होण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक आहे. अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. म्हणूनच वाचन प्रेरणा दिवसामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे. शाळांमध्ये दर आठवड्यातील एक तास अवांतर वाचनासाठी राखीव ठेवणे, शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये वाचन कट्टा तयार करणे यासारखे उपक्रमही यानिमित्ताने हाती घेण्यात येणार आहेत. या दिनाच्या निमित्ताने शाळांनी इनोवेटिव्ह फंडामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी पुस्तके खरेदी करून वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत. तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये वाचनाचे महत्व पटवून देण्यासाठी साहित्यिकांमार्फत मार्गदर्शन करण्यात यावे. वाचन दिनाच्या निमित्ताने त्या दिवसातील एक तास वाचनासाठी देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनच जणू या दिनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याशिवाय वाचन दिन अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी सोशल मिडीयाचा वापरही करण्यात यावा. तसेच साहित्यिक, मान्यवर व्यक्तींनी वाचनाचे महत्व सांगणारे ट्विट करावे, असे आवाहनही शालेय शिक्षण मंत्री यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तसेच हा दिवस आपण सर्वांनी मिळून ‘नो गॅझेट डे’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तकांचे वाचन या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहे. कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दूरदृष्टी, शक्तीशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करतील, या दृष्टीकोनातून वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केले जाणार आहे. मुळातच विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांमध्ये वाचनाची आवड, ओढ व प्रेरणा निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्त्व पटावे, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार ज्ञानसंपन्न आणि माहिती समृद्ध समाज घडण्यासाठी आणि भाषाविकास यासाठी आवश्यक आहे. मुळातच वाचन संस्कृती ही व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम करीत असते. म्हणून शाळा आणि महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.


वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने शाळेत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करणे, समाज सहभागातून या कट्ट्यासाठी पुस्तके गोळा करुन शाळेत पुस्तकपेढी तयार करणे, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करणे, एक व्यक्ती एक पुस्तक भेट हा उपक्रम राबविणे, प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी एका विद्यार्थ्याला किंवा शाळेला विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरुप होतील अशी पुस्तके भेट देणे, विद्यार्थ्यांना आनंदाने वाचन करता यावे म्हणून ‘वाचू आनंदे’ या तासिकेचे आयोजन करणे, चांगल्या पुस्तकांविषयी चर्चासत्रांचे आयोजन करणे, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांवर आधारित व्याख्यानाचे आयोजन करणे, परिसरातील लेखक, कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे, महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्कार याविषयीची माहिती देणे, पुस्तकांचे वाटप करुन ‘वाचक दिन’ आणि ‘अध्यापन दिन’ साजरा करणे, विद्यार्थ्यांचे गट करुन विविध पुस्तकांवर चर्चासत्रे घडवून आणणे, शाळांनी पुढाकार घेवून ‘पुस्तके तुमच्या भेटीला’ अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे, असे विविध उपक्रम आणि याव्यतिरिक्त देखील विविध उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत.


चला तर मग, काव्यवाचन, अभिवाचन, नो गॅझेट डे, वाचन कट्टा, समूह वाचन इत्यादी उपक्रमातून वाचक प्रेरणा दिन अधिकाधिक उत्सफूर्तपणे साजरा होण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी होऊया...

***********************************

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन ,विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अश्विन मास,शुक्ल पक्ष, *दशमी*,श्रवण नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, १५ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

            *"संगठन ही राष्ट्र की प्रमुख शक्ति होती है। संसार में कोई भी समस्या हल करनी है तो वह शक्ति के बल पर ही हल हो सकती है। शक्तिहीन राष्ट्र की कोई भी आकांक्षा कभी भी सफल नही होती। परन्तु सामर्थ्यशाली राष्ट्र जब चाहे तब कोई भी कार्य सफलतापूर्वक कर सकता है। शक्तिशाली की बात हर कोई सुनता है। जो शक्तिशाली है, विजय उसी की होती है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माँ भारती के आराधकों की साधना पीठिका, राष्ट्रीय व सनातन संस्कारों की सतत प्रवाहमान गंगोत्री, 'एक भारत, श्रेष्ठ भारत, अखंड भारत' के निर्माण के सुपथ पर गतिशील विश्व के विशालतम स्वयंसेवी संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के स्थापना दिवस पर सभी स्वयंसेवक बंधुओं को हार्दिक बधाई।


            भारत माता की जय....!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*☘️विजयदशमी पर्व की हार्दिक बधाई☘️*

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

पोटात कावळे का ओरडतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *पोटात कावळे का ओरडतात ?* 📒 

*********************************

'पोटात कावळे ओरडतात' ही अलंकारिक भाषा झाली. खरोखरच पोटात कोणतेही पक्षी वा प्राणी जाऊन बसत नाहीत. पोटात होणाऱ्या आवाजाला उद्देशून ही भाषा वापरली गेली आहे. भूक लागली म्हणजेच पोटात कावळे ओरडतात किंवा हे आवाज होतात हेही खरं नाही. वास्तविक हे आवाज नेहमीच होत असतात.


 आपली पचनसंस्था म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत पसरलेली एक लांबलचक पोकळ नळीच असते. तोंडातल्या घासावर दात आणि लाळ यांचा प्रभाव पडला की त्याचा एक लगदा तयार होतो. हा लगदा मग त्या नळीतून पुढे पुढे सरकू लागतो; पण तसं तो स्वतःच्या जीवावर करू शकत नाही. त्यासाठी त्याला तोंडातून अन्ननलिकेच्या मार्गानं जठरात उतरावं लागतं. तिथं त्याचं पचन होऊन तो आणखी पातळ होतो. तिथून तो मग आतड्यांच्या आणखी अरुंद नळीत उतरतो. या अरुंद नळ्यांमधला त्याचा प्रवास सुकर होतो. कारण त्या नळ्याही त्या प्रवासाला मदत करत असतात. आपल्या पायजम्याच्या नाड्यात एखादी पिन जेव्हा पुढे सरकवायची असते तेव्हा आपण ती पिन जिथे आहे तिथे दाब देऊन तो भाग आकसून घेतो. त्याच्या पुढचा भाग थोडासा पसरत असल्याने ती पुढे सरकते. तशी ती पुढे गेली की आता ती जिथे पोहोचली असेल त्या भागावर दाब देऊन तो आकसून घेतो.

 

पचनसंस्थेच्या नळ्यांमध्येही अशीच हालचाल होत असते. त्यासाठी त्या नळ्यांशी जोडलेले स्नायू आलटून पालटून आकसतात आणि प्रसरण पावतात. स्नायू आकसले की त्या नळीला चिमटा बसतो. तिथे असलेल्या लगद्यावर दाब पडतो. नळीच्या पुढच्या भागाचं त्याचवेळी प्रसरण झालेलं असल्यामुळे सहाजिकच तो लगदा पुढे त्या भागात ढकलला जातो तोवर तो भाग अाकसतो. अशा रीतीने त्या नळीतून एखादी लहर दौडत गेल्यासारखी होते. तो लगदा पुढे पुढे सरकत राहतो.


 पचनसंस्थेच्या या नळ्यांची ही हालचाल सतत होत असते. हृदयाची जशी सतत होते तशीच. हृदयाच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटी हृदयाची धडधड होते. त्याचा ठोका पडतो. त्या ठोक्याचा आवाज आपण स्टेथोस्कोपमधून ऐकू शकतो. आतड्याच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटीही असाच आवाज होतो. जेव्हा त्या नळ्यांमध्ये अन्नाचा गोळा असतो तेव्हा तो आवाज त्या लगद्यामध्ये जिरतो. तो घुमत नाही; पण जेव्हा त्या नळ्या मोकळ्या असतात तेव्हा तो शोषुन घेणे शक्य होत नाही. उलट तो घुमतो. मोठा होतो. आपल्याला सहज ऐकू येतो. कदाचित आपल्याला पोषणाची गरज आहे, हे सांगण्यासाठी मेंदू त्या नळ्यांशी जोडलेल्या स्नायूंना अधिकच जोरानं आकुंचन प्रसरण करण्याचा आदेश देत असावा. त्यामुळेही तो आवाज मोठा होतो. आपल्याला सहज ऐकू येतो. पोटातल्या कावळ्यांची कावकाव सुरू होते.

 

*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?'या पुस्तकातून*

═══════════════════════

  

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...