बुधवार, १४ जुलै, २०२१

गोपाल गणेश आगकर

 *✒️🗒️🗞️गोपाळ गणेश आगरकर*

*(जन्म : टेंभू-सातारा, १४ जुलै १८५६; मृत्यू : १७ जून १८९५)*

         हे महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक होते.आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत गो.ग.आगरकर यांचे योगदान मोलाचे आहे.त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी,मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला.सामाजिक समता,स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌- निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती.मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला.असा लेख लिहिण्याचे धारिष्ट्य त्यापूर्वी कोणाचे नव्हते. बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव प्राधान्याने घ्यावी लागते महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.


गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ.स. १९३४साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.


*आरंभीचा काळ*

आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात,एका गरीब देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात झाला.घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले.कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी माधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कर्‍हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला.वर्तमानपत्रात लिखाण करणे,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे,शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करतांना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरु करायचे ठरवले होते.त्यात लोकमान्य टिळक,गोपाळ गणेश आगरकर,व विष्णुशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता.



*कारकीर्द*

आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.


पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना ते व लोकमान्य टिळक एकत्र आले. तोपर्यंत स्वदेशसेवेची प्रेरणा दोघांच्याही मनात जागी झाली होती. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.


पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले


*उल्लेखनीय कार्य*

१८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ स्थापली.१८८८ साली त्यांनी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र सुरू केले.


गोपाळ गणेश आगरकर हे, भौतिकता – ऐहिकता, बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ आगरकरांकडे जाते.



राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती.



आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथात वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे – अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला.


वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले


*पत्रकारिता*

१८८१ मध्ये ‘केसरी’ हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी १८८८ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून ‘केसरी’त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे ‘केसरी’ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासुन ‘केसरी’चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.


आगरकरांनी पुण्यातच सुधारक वृत्तपत्र सुरू केले.सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला.तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.

=========================

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *चतुर्थी*,पू.फा.नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, १४ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


कोऽतिभारः समर्थानां, 

            किं दूरं व्यवसायिनाम्। 

को विदेशः सुविद्यानां, 

            कः परः प्रियवादिनाम्।।"


*भावार्थः- समर्थ व्यक्ति के लिए कोई कार्य कठिन नहीं है, व्यवसायी के लिए कोई स्थान दूर नहीं है, विद्वान के लिए कोई देश विदेश नहीं है, प्रियवादी के लिए कोई व्यक्ति पराया नहीं है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मंगळवार, १३ जुलै, २०२१

बातमी

 *🔰अग्निपंख शैक्षणिक समुहातर्फे होळी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन*


         👇

 *◼️यवतमाळ ll* https://chandrapursaptarang.in/news/13368

एक आठवण शिवरायांची

 *🚩एक आठवण शिवरायांची🚩*

********************************

     *१३ जुलै इ.स.१६६०*

*बाजीप्रभू देशपांडे बलिदान दिन*

********************************


स्मृतिदिन - १३ जुलै १६६०


पावनखिंड ! लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे !


किल्ले पन्हाळगड १२ जुलै १६६०, आषाढ पौर्णिमा. गुरुवार रात्री १० वाजायच्या आसपास ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या संगे हिरडस मावळांतील सहाशे मावळे आणि सोबत बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे ठरलेल्या मार्गाने सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटण्यासाठी पन्हाळ्याहून हेरांनी शोधलेल्या मार्गाने निघाले. अंधारलेल्या मार्गाने हेर पुढे आणि त्या मागोमाग सर्व.सोबत एक पालखी होतीच.


ऐन वेढ्यात शिरताच सर्वाँचेच काळीज धडधडू लागले. वेढ्याची हद्द संपली अन पालखी झपाट्याने पुढे पुढे धावत होती.


अन् घात झाला ! जौहरच्या हेरांनी पाहिलेच !


पण मावळ्यांनी राजांची पालखी जोरात पळवायला सुरवात केली. काही अतंर पळाल्यावर मावळे थांबले. रिकामी पालखी पुढे आली. महाराजांप्रमाणेच पोशाख केलेला एक मावळा पुढे आला. त्या मर्द मावळ्याचे नाव 'शिवा काशिद' हा जातीने न्हावी होता.


नवी पालखी सरळ मार्गाने विशाळगडाकडे निघाली आणि खुद्द शिवाजी महाराजांची पालखी निवडक मावळ्यांसह आडरानात घूसली.


"शिवाजी भाग गया" ही बातमी सिद्दी जौहरच्या छावणीत धडकली. अन राजांचा पाठलाग सूरु झाला. विशालगडाकडे मसूदची फौज निघाली. बराच पाठलाग केल्यावर पंधरा वीस मावळे एक पालखी पळवीत असताना दिसले. पालखी अडवली गेली. पालखीत शिवाजीराजे सापडले.


मसूदला आनंद झाला. मसूद आनंदाने पालखीसह जौहरच्या छावणीत पोहोचला. पालखीतून राजे उतरले. जौहर निरखून राजांना पाहू लागला. अन् त्याची खात्री झाली, हा शिवाजी नाही.


राजांची चौकशी केल्यावर कळलं हा शिवाजी महाराजांसारखाच दिसणारा दुसराच 'शिवा' नावाचा न्हावी आहे.


चिडून संतापून मसूद पुन्हा राजांच्या पाठलागावर निघाला. एवढ्या वेळात महाराज बरेच दूर गेले होते. पहाट झाली होती.


आषाढ वद्य प्रतिपदा उगवली. दि. १३ जुलै १६६०. अजून पाच कोस जायचे होते. मावळे पालखी पळवायची शिकस्त करत होतेच. मावळे, बाजीप्रभू आणि महाराज गजापूरच्या खिंडीत पोहचले. आणि आलाच मसूद. आता क्षणभरही थांबणे घातक होते.


बाजींनी राजांना कळवळून विनविले, "तुम्ही थांबू नका. गनीम जवळ येतोय. मी इथे खिंडीत थांबतो. एकालाही खिंड चढू देणार नाही. तुम्ही जा ! गडावर जाताच तोफांचे आवाज करा ! तोंपावेतो गनिमाला येऊ देत नाही !"


'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' हि म्हण बहुधा तेव्हाच बनली असावी. निम्मे मावळे घेऊन राजे विशाळगडाकडे निघाले. खिंडीत बाजींसोबत मावळ्यांनी मसूदच्या फौजेला रोखले.


पन्हाळ्याहून निघून सात प्रहर म्हणजे २१ तास झाले होते. बाजींनी शौर्याने खिंड लढवित ठेवली. महाराजांनी विशाळगडाखालील जसवंत सिंह आणि सुर्यराव यांचा प्रतिकार मोडीत विशाळगडावर धाव घेतली.


घोडखिंडीत बाजीप्रभू , फूलाजीप्रभू आणि मावळे तोफांच्या आवाजाची वाट पाहत होते. एवढ्यात...


तोफांचा आवाज कडाडला. तीन तोफांचे आवाज झाले. एवढ्यांत घात झाला. बाजींवर शत्रूचा घाव पडला. घळकन् रक्ताचा लोंढा फुटला. बाजींची मुर्ती कोसळली


गजापूरची खिंड पावन झाली ! पावनखिंड !!


फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभूंना । 

तसा चित्तीं ध्यातो शिवा काशिदांना ॥

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

********************************

संकलन-)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *तृतीय*,मघा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, १३ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


दानं पूजा तपश्र्चौव 

              तीर्थसेवा श्रुतं तथा,

सर्वमेव वृथा तस्य 

              यस्य शुध्दं न मानसम्।।


*भावार्थः- यदि व्यक्ति का मन शुद्ध नही है, तो दान, पूजा, तपस्या, तीर्थ, सेवा, कथा सुनना, सब व्यर्थ है।।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, १२ जुलै, २०२१

औषध जेवना आधी घ्यावी की जेवणानंतर

 संकलन:) गजानन गोपेवाड 


══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

 *औषधे जेवणापूर्वी घ्यावी की जेवणानंतर ?*


जेवल्यानंतरच औषधे घ्यावी, असा एक समज समाजात आढळून येतो. गोळ्या गरम पडतात, उष्ण असतात आणि त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जेवण करून मगच औषध घ्यावे; असेही काही जणांना वाटत असते. औषधे केव्हा घेणे जास्त योग्य ते आता पाहू. एक मात्र नक्की की आजारी पडल्याखेरीज औषधे कधीही घेऊ नयेत! कारण आजकाल काही लोक स्वतःच स्वतःचे डॉक्टर बनतात आणि टिव्हीवरच्या जाहिराती पाहून तापाच्या स्मरणशक्ती वाढवण्याच्या किंवा शक्ती वाढवण्याच्या गोळ्या घेतात. अर्थात याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात.


काही औषधे उपाशीपोटी म्हणजे जेवणाच्या तासभर अगोदर घेतली, तर त्याचे रक्तात शोषण चांगले होते आणि त्यांचा परिणामही चांग घडून येतो. अशा औषधांमध्ये पेनिसिलीन, अॅम्पीसिलीन, रिफॅम्पीसीन, टेट्रासायक्लीन या जंतूनाशकांचा समावेश होतो. टेट्रासायक्लीन घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर तासभर तरी दूध पिऊ नये. अॅस्पीरिन, लोहयुक्त गोळ्या-औषधे, जीवनसत्त्वे, एरिथ्रोमायसीन, पॅराअमायनो सॅलीसिलीक अॅसीड आदी औषधे मात्र जेवणानंतर किंवा जेवताना घ्यावीत. औषधांमुळे जठराच्या आवरणावर दाह निर्माण होऊन आम्लनिर्मिती वाढते. त्यामुळे मळमळ, उलट्या आदी त्रास होण्याची शक्यता असते. जेल्यूसीलसारख्या गोळ्या पोट रिकामे असताना घेतल्यास त्यांचा चांगला परिणाम दिसून येतो.


औषधांबाबत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. प्रत्येक औषध प्रत्येक माणसाप्रमाणेच वेगळे असते. त्यामुळे ते केव्हा, कसे घ्यायचे याची डॉक्टरांकडून माहिती घ्यावी आणि मगच त्यांचा उपयोग करावा. कारण एक लक्षात ठेवा की, औषध आणि विष यांच्यात फक्त देणाऱ्याच्या हेतूचाच फरक असतो!


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

एनिमा म्हणजे काय


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *'एनिमा म्हणजे काय ?* 


शौचास होत नसेल, तर कधी रुग्णास शस्त्रक्रियेपूर्वी पोट साफ होण्यासाठी गुदद्वाराच्या मार्गाने काही औषधी मोठ्या आतड्यात सोडतात, यास 'एनिमा' असे म्हणतात. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नसल्यास व आहार समतोल नसल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होतो. कधी कधी मळाचे खडेही तयार होतात. लहान मुलांना संडास होत नसेल, तर कागदाची पुंगळी करून त्याला सावण लावून ती गुदद्वारात सारल्यास संडास होते किंवा गोडेतेल सोडल्यासही मळाचे खडे सुटतात व न दुखता संडास होते. संडास होत नसल्यास पोटातून औषध घेण्यापेक्षा गुदद्वारातून उपचार करणे सोयीचे ठरते. 


एनिमामध्ये पाव लिटर, अर्धा लिटर साबणाचे पाणी रबरी नळीच्या साहाय्याने व्यक्तीच्या गुदद्वारातून आत सोडतात. नंतर मळाचे खडे सुटून संडास होते. विष्ठा गोळा करण्यासाठी भांड्याची सोयसुद्धा असते. आयुर्वेद चिकित्सापद्धतीमध्ये गुदद्वारावाटे औषधी प्रविष्ट करून चिकित्सा केली जाते. हथा चिकित्सेस बस्ती चिकित्सा म्हणतात. मळास बाहेर काढणे याशिवाय इतर अनेक व्याधींची चिकित्सा, औषधी काढे व तेल गुदद्वारावाटे देऊन केली जाते. एनिमाचा वापर वारंवार करण्यापेक्षा आहारात योग्य ते बदल घडवून आणणेच आरोग्यपूर्ण जीवनाच्या दृष्टीने चांगले.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

  

सुक्ष्म दर्शक यंत्र कसे कार्य करते


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?* 🔬 


जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.

पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.


असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

भक्ती म्हणजे काय?

 *भक्ती म्हणजे*


किती साधी सोपी सरळ

  व्याख्या आहे पहा➖


भक्ती जेंव्हा *"अन्नात"* शिरते तेंव्हा तीला *"प्रसाद"*

म्हणतात

आणि भक्ती जेंव्हा *"भुकेत"* शिरते तेंव्हा तीला *"उपवास"* असे म्हणतात


भक्ती जेंव्हा पाण्यात शिरते तेंव्हा तीला *"तीर्थ"* म्हणतात

आणि भक्ती जेंव्हा *"प्रवासाला"* निघते तेंव्हा तीला *"यात्रा"* असे म्हणतात


भक्ती जर का *"संगीतात"* शिरली तर तीला  *"भजन / कीर्तन"* म्हणतात

आणि हीच भक्ती जर का   लोकसंगीतात  शिरली तर तीला  *"भारूड"* असे म्हणतात


भक्ती जेंव्हा *"माणसात"* प्रकटते तेंव्हा *"माणूसकी"* निर्माण

होत

आणि हीच भक्ती जर *"घरात"* शिरली तर त्या घराचे *"मंदिर"* होते 


भक्ती जर का शांतपणे *"मनाच्या गाभाऱ्यात"* शिरली तर त्याला *"ध्यान"* म्हणतात

 आणि भक्ती जर का *"कृतीत"* उतरली तर तिला *"सेवा"* असे म्हणतात

11 जुलै प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🌻🦢🛕🦢🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *प्रथम*,पुष्य नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार - ११ जुलै  २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *वर्षा के समय सारे पक्षी आश्रय की तलाश करते है किन्तु बाज़ बादलों के ऊपर उड़कर वर्षा की ही उपेक्षा कर देता है। समस्याए सबकी सामान्यतः एक जैसी ही है, लेकिन हमारा दृष्टिकोण ही इनमें भेद उतपन्न करता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस

 ********************************

*११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिवस*

********************************


आज ११ जुलै..! 

जागतिक लोकसंख्या दिवस !


झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न,वस्त्र,निवारा,दारिद्रय़,बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्या ही बाब अडसर ठरत आहे. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी हेच संकल्प करणे उचित ठरेल.


जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.


लोकसंख्या ही समस्या उग्र रुप धारण करीत असल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत आहे. मुलगाच हवा यासाठी तीन-चार अपत्यांना जन्म दिला जातो. अशिक्षित महिला असलेल्या कुटुंबात लोकसंख्या वाढीची बीजे दिसून येतात. हे सर्वे क्षणात दिसून आले आहे. यासाठी हे रोखणे गरजेचे आहे.


आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे गाडी,बंगला अशी एैशोआरामाची जीवनपध्दती तर दुसरीकडे दारिद्रय़,एक वेळची भूक भागविण्याची धडपड,असे आजचे चित्र दिसते.ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


१९५० साली जगाची लोकसंख्या २५० कोटी होती. ११ जुलै १९७८ साली युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या ५०० कोटी झाली.तेव्हापासून ११ जुलै हा दिवस 'जागतिक लोकसंख्या दिन' म्हणून पाळता जातो. जॉन ग्रँट यांना लोकसंख्याशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते.तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते.


  देशात ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी प्रथम लोकसंख्या वाढ आटोक्यात आणणे आवश्क आहे. लोकसंख्या वाढीचा सर्व बाबींवर परिणाम होत असून यामुळे विकासास खीळ बसते. लोकसंखवाढीमुळे सर्वाना मूलभूत गरजा पुरविणेही अवघड बनले आहे. 


देशात १३५ कोटी लोकसंख्या वास्तव करते.आज जगात भारत हा लोकसंख्येबाबात अव्वल क्रमांकावर आहे.चीनला देखील भारत मागे टाकण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहे.मात्र ही बाब खूप चिंताजनक आहे.ही लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

******************************

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *द्वितीय*,अश्लेषा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, १२ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"विपत्ति काल में ईश्वर को दोष नही देना चाहिए, अपितु यह समझना चाहिए कि यह कर्मो का फल है। हम जैसा कर्म करते है, वही हमें भोगना पडता है। उसमें ईश्वर हस्तक्षेप नहीं करता। किन्तु उसके स्मरण से दुःख का अनुभव कम अवश्य हो जाता है। कष्ट देकर वह हमारे धैर्य की परीक्षा लेता है। साथ ही परम-प्रभु हमें सचेत करता है कि शुभ कर्म करो ।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*श्री जगन्नाथ जी रथ यात्रा*



एक आठवण शिवरायांची 12 जुलै1660 वीर शिवा काशीद

 *🚩एक आठवण शिवरायांची🚩*

*१२  जुलै इ.स.१६६०* 

*"वीर शिवा काशिद बलिदान दिन"* 

पन्हाळगडाला "सिद्दी मसूद" याने घातलेल्या वेढ्यातून निसटण्यासाठी "शिवा काशिद" नावाचा मावळा हा छत्रपती शिवरायांचा पेहराव करून पालखीतून निघाला.पण तो पकडला गेला आणि ठार झाला. नावाने "शिवा काशिद" असणारा हा मावळा मरताना "शिवाजी राजा" म्हणून मारला गेला.

यासारखं मोठ भाग्य ते काय!

धन्य तो *"वीर शिवा काशिद".*

१२ जुलै १६६० ची रात्र होती. 

दोन पालख्या तयार केल्या. शिवा काशीद निर्धाराने एका पालखीत आणि शिवराय दुसऱ्या पालखीत बसले. शिवरायांची पालखी अडचणीच्या वाटेने निघाली आणि शिवा काशीदची पालखी पन्हाळगडाच्या मुख्य दाराने निघाली.

शिवराय निसटले,अशी ओरड होताच जौहरच्या सैनिकांनी रातोरात शोधाशोध सुरू केली. त्यांना एक पालखी पळविताना दिसली. त्या पालखीला पकडले व पडदा बाजूला केला..शिवा काशीद हा हुबेहुब शिवरायासारखा दिसत होता. त्यामुळे सिद्दि जोहरला वाटले कि हाच शिवाजी ! म्हणुन त्याने व त्याच्या सरदारांनी शिवा काशीदला पकडले व हे शिवराय नाहीत असे कळताच जोहर म्हणतो कसा ‘शिवा काशीद आता तु मरणाला तयार हो’.ते ऐकुन शिवा काशीद म्हणाला ‘शिवाजीराजे आता सुखरुप् वेढयातुन सुटले असतील.आता मी सुखाने मरण्यास तयार आहे’.तसेच शिवरायासाठी हजारदा मरण्यास मी सुखाने तयार आहे’. हे ऐकुन जोहरने त्याचे शिर कापुन टाकले आत शिवा काशीद पालखीचा गोंडा धरून रुबाबात बसलेला. मात्र, ते शिवराय नसून शिवा काशीद आहे हे लक्षात येताच सिद्दी जौहरने शिवा काशीदच्या छातीत समशेर खुपसली. स्वराज्यासाठी शिवा काशीद यांनी असे अतुलनीय बलिदान केले. वीर शिवाजी काशीद यांना त्रिवार मानाचा मुजरा...

*********************************

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

शनिवार, १० जुलै, २०२१

10 जुलै शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांचा आज जन्मदिन

 *१० जुलै - शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांचा जन्मदिन*

***********************************

📠📠📠📠📠📠📠📠📠📠

*जन्म - १० जुलै १८५६* 

*स्मृतीदिन - ७ जानेवारी १९४३* (न्यूयॉर्क)

💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡

निकोला टेस्ला (Nikola Tesla) हा मूळचा सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ,संशोधक, विद्युत अभियंता होता.अनेक शास्त्रज्ञांच्या मते हा जगातील सर्वश्रेष्ठ अश्या वैज्ञानिकांपैकी एक होता. त्याच्या शोध आणि शोधनिबंधात एसी विद्युत, एसी मोटर, पॉलिफेज विद्युत पारेषण या आता मूलभुत समजल्या जाण्याऱ्या वस्तूंचा समावेश आहे.


मोबाइलची 'एसएमएस' सेवा ही आजच्या काळातील गरज मानली जात असली तरी त्याबाबतची कल्पना शंभर वर्षांपूर्वीच मांडली गेली होती.संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ आणि विद्युत अभियंता निकोला टेसला यांनी १९०९ साली 'पॉप्युलर मेकॅनिक्‍स' नावाच्या तंत्रज्ञानविषयक मासिकात लिहिलेल्या लेखात 'एसएमएस' सारखी सेवा भविष्यात अस्तित्वात येईल,असे भाकीत वर्तविले होते.


आजच्या जगात जीवनावश्‍यक बाब बनलेली मोबाइल सारखी जलद आणि निर्दोष असणारी संदेशवहन सेवा अस्तित्वात येईल, असे शंभर वर्षांपूर्वी कोणालाही वाटले नसेल;पण अमेरिकेतील निकोला यांनी भविष्याचा वेध घेत छोट्या बिनतारी यंत्राची कल्पना केली होती. 


विद्युत अभियंता टेसला यांच्या नावाने आजही टेसला इलेक्‍ट्रिक मोटार कंपनी आहे. इलेक्‍ट्रिकमध्ये बिनतारी ऊर्जा असते हे पहिल्यांदा टेसला यांनी ओळखले होते.त्यांनी लेखात नमूद केले होते की, जगात सर्वत्र वापरली जाणारी आणि हाताळण्यास सोपी असणारी संदेशवहन करणारी छोटी बिनतारी यंत्रणा अस्तित्वात येऊ शकते आणि एक दिवस या तंत्रातून प्रत्येकाला आपल्या नातेवाइकांशी,मित्रांशी सहज संवाद साधणे शक्‍य होऊ शकेल. या यंत्राच्या माध्यमातून नव्या युगाची सुरवात होईल. 


निकोला टेसला यांच्या शोधनिबंधात एसी विद्युत, एसी मोटार, पॉलिफेज विद्युत पारेषणचा समावेश आहे.                *🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन-)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

जेष्ठ मास,कृष्ण पक्ष, *अमावस्या*,पुनर्वसु नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, १० जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


जीवन में समस्याएँ चाहे जितनी हो-


*"चिंता" करने से और अधिक होती है,*

*"शान्त" रहने से बिलकुल कम,*

*"धैर्य" रखने से समाप्त हो जाती है,*

*तथा ईश्वर को हर परिस्थिति में धन्यवाद करने से प्रसन्नता मे बदल सकती है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शुक्रवार, ९ जुलै, २०२१

एलियस हाँवे शिवणकाम मशीनसंशोधक

 *👔👔👔एलियस हाॅवे👔👔👔*

🧵🧵🧵🧵🧵🧵🧵🧵🧵🧵

*शिवणयंत्राचे संशोधन*

🧵🧵🧵🧵🧵🧵🧵🧵🧵🧵

*जन्मदिन - ९ जुलै १८१९*


एलियस हाॅवे हा एक अमेरिकन संशोधक आहे. त्याने उत्तम आधुनिक शिवणकामाच्या यंत्राचा शोध लावला.सिलाई मशीनच्या संकल्पनेची कल्पना होवेने प्रथम केली नव्हती.त्याच्या आधी अशा बर्‍याच जणांनी अशा मशीनची कल्पना तयार केली होती, एक म्हणजे १७९० च्या आधीची, आणि काहींनी त्यांच्या डिझाईन्स पेटंट करून कामकाजाच्या मशीन्स तयार केल्या,तथापि,हाॅवेने पूर्ववर्तींच्या डिझाइनच्या संकल्पनांमध्ये लक्षणीय बदल केले आणि १० सप्टेंबर १८४६ रोजी लॉकस्टीच डिझाइन वापरुन शिवणकामासाठी त्याला अमेरिकेचा पहिला पेटंट ( यूएस पेटंट ४,७५०) देण्यात आला . त्याच्या मशीनमध्ये आधुनिक मशीन्ससाठी असलेले तीन अत्यावश्यक वैशिष्ट्ये आहेत:


१. सुईची अचुक जागा

२. लॉक टाके तयार करण्यासाठी कपड्याच्या खाली कार्यरत एक शटल.

३. स्वयंचलित फीड


*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

जेष्ठ मास,कृष्ण पक्ष, *अमावस्या*,आद्रा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ०९ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


एकान्तेन हि विश्वासः 

               कृत्स्नो धर्मार्थनाशकः।

अविश्वासश्च सर्वत्र 

               मृत्युना च विशिष्यते।।


*भावार्थः- "किसी पर अत्यधिक विश्वास करना, धर्म और अर्थ दोनों का नाश करने वाला होता है और सर्वत्र अविश्वास भी मृत्यु से बढ़कर है। अर्थात अत्यधिक विश्वास एवं अविश्वास दोनों ही हानिकारक है। सावधानी आवश्यक है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


गुरुवार, ८ जुलै, २०२१

पिटर लिओ निवोडिच कपिझा भौतिकशास्त्र

 *पीटर लिओ निवोडिच कपिझा*

🗻🌋🏔️🗻🌋🏔️🗻🌋🏔️🗻🌋

*👨‍🔬👨‍🔬भौतिकशास्त्रज्ञ👨‍🔬👨‍🔬*

🗻🏔️⛰️🌋🗻🏔️⛰️🌋🗻🏔️⛰️

 *जन्मदिन -   ८ जुलै  १८९४*

 *मृत्यू दिन -  ८ एप्रिल १९८४*

पीटर लिओ निडोविच कपिझा ( रशियन : Пётр Леони́дович Капи́ца);

     

      एक रशियन भौतिकशास्त्रज्ञ होता. १९७८  मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.


त्यांचा जन्म ८ जुलै १८९४ रोजी क्रोन्स्टॅटमध्ये झाला होता.त्यांचे प्रारंभिक शिक्षण पेट्रोग्राडमध्ये झाले.त्यानंतर , ते केंब्रिजमधील लॉर्ड रदरफोर्डचे विद्यार्थी होते आणि अणु विघटन संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत प्रबळ चुंबकीय क्षेत्र निर्मितीच्या तांत्रिक प्रणालीच्या विकासात ते खास होते. १९२४ मध्ये , ते कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत चुंबकीय संशोधन सहाय्यक संचालक म्हणून नियुक्त झाले आणि १९३२ पर्यंत ते या पदावर राहिले. १९३० ते १९३५ पर्यंत ते रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवडले गेले आणि १९४२ मध्ये त्यांना फॅराडे मेडल देण्यात आले. याव्यतिरिक्त, त्यांना भौतिकशास्त्रात १९४१ मध्ये आणि पुन्हा १९४१ मध्ये स्टालिन पुरस्कार प्राप्त झाला. १९४३ आणि १९४४ मध्ये तुम्हाला ऑर्डर ऑफ लेनिन ही पदवी देखील देण्यात आली.


१९३४ मध्ये जेव्हा ते रजेवर (रशिया) घरी गेलात तेव्हा सोव्हिएत सरकारने त्यांना पुन्हा देश सोडण्याची परवानगी दिली नाही. त्यानंतर मॉस्कोच्या भौतिक समस्यांबद्दलचे संचालक कपिझाची लवकरच नियुक्ती केली गेली, .


त्यांचे मुख्य कार्य ' मॅग्नेटिझम ' आणि क्रायोजेनिक्स (अत्यंत थंड उष्णता) शी संबंधित आहे . ते ३० टेस्लापर्यंत चुंबकीय क्षेत्रे तयार करण्यात यशस्वी झाले आणि हायड्रोजन आणि हीलियम लिक्विंक्शन प्लांटची यशस्वी रचना देखील दिली.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 ⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳

🚩🦚🌹🐌🐄🐌🌹🦚🚩

जेष्ठ मास,कृष्ण पक्ष, *चतुर्दशी*,मृगशिरा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, ०८ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"जीवन के प्रति जिस व्यक्ति की कम से कम आपत्तियां हैं, वह व्यक्ति संसार में अन्य लोगों की अपेक्षा अधिक सुखी है। यह बात सदैव स्मरण रहनी चाहिए कि अधिक महत्वाकांक्षाएं समस्याओं को जन्म देती है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बुधवार, ७ जुलै, २०२१

ओटो फ्रेडरिक रोहोवेडर

 *ओटो फ्रेडरिक रोहवेडर*

👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭

*स्वयंचलित ब्रेड - स्लाइसिंग मशीन तयार केली*

👨‍🔧👨‍🏭👨‍🔧👨‍🏭👨‍🔧👨‍🏭👨‍🔧👨‍🏭👨‍🔧👨‍🏭👨‍🔧

*जन्मदिन - ७ जुलै १८८०*


ओट्टो फ्रेडरिक रोहवेडर हे अमेरिकन शोधक आणि अभियंता होते ज्यांनी व्यावसायिक वापरासाठी प्रथम स्वयंचलित ब्रेड - स्लाइसिंग मशीन तयार केली . याचा प्रथम वापर चिलीकोथे बेकिंग कंपनीने केला होता.


रोहवेडरने प्रथम एक ज्वेलर होता. ते सेंट जोसेफमधील तीन दागिन्यांच्या दुकानांचे मालक झाले. ब्रेड स्लाइसिंग मशीन विकसित करता येईल ही अपेक्षा ठेवून त्याने दागिन्यांची दुकानं मशीन तयार करण्यासाठी विकली. १९१७ मध्ये रोहवेडर आपले मशीन तयार करत असलेल्या कारखान्यात भीषण आग लागली. त्याचा प्रोटोटाइप आणि ब्लूप्रिंट नष्ट झाले. पुन्हा निधी मिळण्याची गरज असताना, ब्रेड स्लाइसर बाजारात आणण्यात रोहवेडरला कित्येक वर्षे उशीर झाला.


१९२७ मध्ये रोहवेडरने एक मशीन यशस्वीरीत्या तयार केली ज्याने फक्त ब्रेड कापलेच नाही तर ते कापुन त्याची पॅकिंग देखील होत होती. त्याने आपल्या शोधाच्या पेटंटसाठी अर्ज केला आणि १९२८ मध्ये चिलीकोथे, मिसुरी येथील चिलीकोथे बेकिंग कंपनी येथे स्थापित केलेल्या बेकर फ्रँक बेंच यांना प्रथम मशीन विकली. स्लाईस्ड ब्रेडची पहिले उत्पादन ७ जुलै १९२८ रोजी व्यावसायिकपणे विकले गेले. इतर बेकरींकडे मशीनची विक्री वाढली आणि स्लाइस्ड् ब्रेड देशभर उपलब्ध झाले.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...