सोमवार, १२ जुलै, २०२१

भक्ती म्हणजे काय?

 *भक्ती म्हणजे*


किती साधी सोपी सरळ

  व्याख्या आहे पहा➖


भक्ती जेंव्हा *"अन्नात"* शिरते तेंव्हा तीला *"प्रसाद"*

म्हणतात

आणि भक्ती जेंव्हा *"भुकेत"* शिरते तेंव्हा तीला *"उपवास"* असे म्हणतात


भक्ती जेंव्हा पाण्यात शिरते तेंव्हा तीला *"तीर्थ"* म्हणतात

आणि भक्ती जेंव्हा *"प्रवासाला"* निघते तेंव्हा तीला *"यात्रा"* असे म्हणतात


भक्ती जर का *"संगीतात"* शिरली तर तीला  *"भजन / कीर्तन"* म्हणतात

आणि हीच भक्ती जर का   लोकसंगीतात  शिरली तर तीला  *"भारूड"* असे म्हणतात


भक्ती जेंव्हा *"माणसात"* प्रकटते तेंव्हा *"माणूसकी"* निर्माण

होत

आणि हीच भक्ती जर *"घरात"* शिरली तर त्या घराचे *"मंदिर"* होते 


भक्ती जर का शांतपणे *"मनाच्या गाभाऱ्यात"* शिरली तर त्याला *"ध्यान"* म्हणतात

 आणि भक्ती जर का *"कृतीत"* उतरली तर तिला *"सेवा"* असे म्हणतात

11 जुलै प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🌻🦢🛕🦢🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *प्रथम*,पुष्य नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार - ११ जुलै  २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *वर्षा के समय सारे पक्षी आश्रय की तलाश करते है किन्तु बाज़ बादलों के ऊपर उड़कर वर्षा की ही उपेक्षा कर देता है। समस्याए सबकी सामान्यतः एक जैसी ही है, लेकिन हमारा दृष्टिकोण ही इनमें भेद उतपन्न करता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस

 ********************************

*११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिवस*

********************************


आज ११ जुलै..! 

जागतिक लोकसंख्या दिवस !


झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न,वस्त्र,निवारा,दारिद्रय़,बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्या ही बाब अडसर ठरत आहे. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी हेच संकल्प करणे उचित ठरेल.


जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.


लोकसंख्या ही समस्या उग्र रुप धारण करीत असल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत आहे. मुलगाच हवा यासाठी तीन-चार अपत्यांना जन्म दिला जातो. अशिक्षित महिला असलेल्या कुटुंबात लोकसंख्या वाढीची बीजे दिसून येतात. हे सर्वे क्षणात दिसून आले आहे. यासाठी हे रोखणे गरजेचे आहे.


आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे गाडी,बंगला अशी एैशोआरामाची जीवनपध्दती तर दुसरीकडे दारिद्रय़,एक वेळची भूक भागविण्याची धडपड,असे आजचे चित्र दिसते.ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


१९५० साली जगाची लोकसंख्या २५० कोटी होती. ११ जुलै १९७८ साली युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या ५०० कोटी झाली.तेव्हापासून ११ जुलै हा दिवस 'जागतिक लोकसंख्या दिन' म्हणून पाळता जातो. जॉन ग्रँट यांना लोकसंख्याशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते.तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते.


  देशात ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी प्रथम लोकसंख्या वाढ आटोक्यात आणणे आवश्क आहे. लोकसंख्या वाढीचा सर्व बाबींवर परिणाम होत असून यामुळे विकासास खीळ बसते. लोकसंखवाढीमुळे सर्वाना मूलभूत गरजा पुरविणेही अवघड बनले आहे. 


देशात १३५ कोटी लोकसंख्या वास्तव करते.आज जगात भारत हा लोकसंख्येबाबात अव्वल क्रमांकावर आहे.चीनला देखील भारत मागे टाकण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहे.मात्र ही बाब खूप चिंताजनक आहे.ही लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

******************************

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *द्वितीय*,अश्लेषा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, १२ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"विपत्ति काल में ईश्वर को दोष नही देना चाहिए, अपितु यह समझना चाहिए कि यह कर्मो का फल है। हम जैसा कर्म करते है, वही हमें भोगना पडता है। उसमें ईश्वर हस्तक्षेप नहीं करता। किन्तु उसके स्मरण से दुःख का अनुभव कम अवश्य हो जाता है। कष्ट देकर वह हमारे धैर्य की परीक्षा लेता है। साथ ही परम-प्रभु हमें सचेत करता है कि शुभ कर्म करो ।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*श्री जगन्नाथ जी रथ यात्रा*



एक आठवण शिवरायांची 12 जुलै1660 वीर शिवा काशीद

 *🚩एक आठवण शिवरायांची🚩*

*१२  जुलै इ.स.१६६०* 

*"वीर शिवा काशिद बलिदान दिन"* 

पन्हाळगडाला "सिद्दी मसूद" याने घातलेल्या वेढ्यातून निसटण्यासाठी "शिवा काशिद" नावाचा मावळा हा छत्रपती शिवरायांचा पेहराव करून पालखीतून निघाला.पण तो पकडला गेला आणि ठार झाला. नावाने "शिवा काशिद" असणारा हा मावळा मरताना "शिवाजी राजा" म्हणून मारला गेला.

यासारखं मोठ भाग्य ते काय!

धन्य तो *"वीर शिवा काशिद".*

१२ जुलै १६६० ची रात्र होती. 

दोन पालख्या तयार केल्या. शिवा काशीद निर्धाराने एका पालखीत आणि शिवराय दुसऱ्या पालखीत बसले. शिवरायांची पालखी अडचणीच्या वाटेने निघाली आणि शिवा काशीदची पालखी पन्हाळगडाच्या मुख्य दाराने निघाली.

शिवराय निसटले,अशी ओरड होताच जौहरच्या सैनिकांनी रातोरात शोधाशोध सुरू केली. त्यांना एक पालखी पळविताना दिसली. त्या पालखीला पकडले व पडदा बाजूला केला..शिवा काशीद हा हुबेहुब शिवरायासारखा दिसत होता. त्यामुळे सिद्दि जोहरला वाटले कि हाच शिवाजी ! म्हणुन त्याने व त्याच्या सरदारांनी शिवा काशीदला पकडले व हे शिवराय नाहीत असे कळताच जोहर म्हणतो कसा ‘शिवा काशीद आता तु मरणाला तयार हो’.ते ऐकुन शिवा काशीद म्हणाला ‘शिवाजीराजे आता सुखरुप् वेढयातुन सुटले असतील.आता मी सुखाने मरण्यास तयार आहे’.तसेच शिवरायासाठी हजारदा मरण्यास मी सुखाने तयार आहे’. हे ऐकुन जोहरने त्याचे शिर कापुन टाकले आत शिवा काशीद पालखीचा गोंडा धरून रुबाबात बसलेला. मात्र, ते शिवराय नसून शिवा काशीद आहे हे लक्षात येताच सिद्दी जौहरने शिवा काशीदच्या छातीत समशेर खुपसली. स्वराज्यासाठी शिवा काशीद यांनी असे अतुलनीय बलिदान केले. वीर शिवाजी काशीद यांना त्रिवार मानाचा मुजरा...

*********************************

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

शनिवार, १० जुलै, २०२१

10 जुलै शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांचा आज जन्मदिन

 *१० जुलै - शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांचा जन्मदिन*

***********************************

📠📠📠📠📠📠📠📠📠📠

*जन्म - १० जुलै १८५६* 

*स्मृतीदिन - ७ जानेवारी १९४३* (न्यूयॉर्क)

💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡

निकोला टेस्ला (Nikola Tesla) हा मूळचा सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ,संशोधक, विद्युत अभियंता होता.अनेक शास्त्रज्ञांच्या मते हा जगातील सर्वश्रेष्ठ अश्या वैज्ञानिकांपैकी एक होता. त्याच्या शोध आणि शोधनिबंधात एसी विद्युत, एसी मोटर, पॉलिफेज विद्युत पारेषण या आता मूलभुत समजल्या जाण्याऱ्या वस्तूंचा समावेश आहे.


मोबाइलची 'एसएमएस' सेवा ही आजच्या काळातील गरज मानली जात असली तरी त्याबाबतची कल्पना शंभर वर्षांपूर्वीच मांडली गेली होती.संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ आणि विद्युत अभियंता निकोला टेसला यांनी १९०९ साली 'पॉप्युलर मेकॅनिक्‍स' नावाच्या तंत्रज्ञानविषयक मासिकात लिहिलेल्या लेखात 'एसएमएस' सारखी सेवा भविष्यात अस्तित्वात येईल,असे भाकीत वर्तविले होते.


आजच्या जगात जीवनावश्‍यक बाब बनलेली मोबाइल सारखी जलद आणि निर्दोष असणारी संदेशवहन सेवा अस्तित्वात येईल, असे शंभर वर्षांपूर्वी कोणालाही वाटले नसेल;पण अमेरिकेतील निकोला यांनी भविष्याचा वेध घेत छोट्या बिनतारी यंत्राची कल्पना केली होती. 


विद्युत अभियंता टेसला यांच्या नावाने आजही टेसला इलेक्‍ट्रिक मोटार कंपनी आहे. इलेक्‍ट्रिकमध्ये बिनतारी ऊर्जा असते हे पहिल्यांदा टेसला यांनी ओळखले होते.त्यांनी लेखात नमूद केले होते की, जगात सर्वत्र वापरली जाणारी आणि हाताळण्यास सोपी असणारी संदेशवहन करणारी छोटी बिनतारी यंत्रणा अस्तित्वात येऊ शकते आणि एक दिवस या तंत्रातून प्रत्येकाला आपल्या नातेवाइकांशी,मित्रांशी सहज संवाद साधणे शक्‍य होऊ शकेल. या यंत्राच्या माध्यमातून नव्या युगाची सुरवात होईल. 


निकोला टेसला यांच्या शोधनिबंधात एसी विद्युत, एसी मोटार, पॉलिफेज विद्युत पारेषणचा समावेश आहे.                *🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन-)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

जेष्ठ मास,कृष्ण पक्ष, *अमावस्या*,पुनर्वसु नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, १० जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


जीवन में समस्याएँ चाहे जितनी हो-


*"चिंता" करने से और अधिक होती है,*

*"शान्त" रहने से बिलकुल कम,*

*"धैर्य" रखने से समाप्त हो जाती है,*

*तथा ईश्वर को हर परिस्थिति में धन्यवाद करने से प्रसन्नता मे बदल सकती है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शुक्रवार, ९ जुलै, २०२१

एलियस हाँवे शिवणकाम मशीनसंशोधक

 *👔👔👔एलियस हाॅवे👔👔👔*

🧵🧵🧵🧵🧵🧵🧵🧵🧵🧵

*शिवणयंत्राचे संशोधन*

🧵🧵🧵🧵🧵🧵🧵🧵🧵🧵

*जन्मदिन - ९ जुलै १८१९*


एलियस हाॅवे हा एक अमेरिकन संशोधक आहे. त्याने उत्तम आधुनिक शिवणकामाच्या यंत्राचा शोध लावला.सिलाई मशीनच्या संकल्पनेची कल्पना होवेने प्रथम केली नव्हती.त्याच्या आधी अशा बर्‍याच जणांनी अशा मशीनची कल्पना तयार केली होती, एक म्हणजे १७९० च्या आधीची, आणि काहींनी त्यांच्या डिझाईन्स पेटंट करून कामकाजाच्या मशीन्स तयार केल्या,तथापि,हाॅवेने पूर्ववर्तींच्या डिझाइनच्या संकल्पनांमध्ये लक्षणीय बदल केले आणि १० सप्टेंबर १८४६ रोजी लॉकस्टीच डिझाइन वापरुन शिवणकामासाठी त्याला अमेरिकेचा पहिला पेटंट ( यूएस पेटंट ४,७५०) देण्यात आला . त्याच्या मशीनमध्ये आधुनिक मशीन्ससाठी असलेले तीन अत्यावश्यक वैशिष्ट्ये आहेत:


१. सुईची अचुक जागा

२. लॉक टाके तयार करण्यासाठी कपड्याच्या खाली कार्यरत एक शटल.

३. स्वयंचलित फीड


*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

जेष्ठ मास,कृष्ण पक्ष, *अमावस्या*,आद्रा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ०९ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


एकान्तेन हि विश्वासः 

               कृत्स्नो धर्मार्थनाशकः।

अविश्वासश्च सर्वत्र 

               मृत्युना च विशिष्यते।।


*भावार्थः- "किसी पर अत्यधिक विश्वास करना, धर्म और अर्थ दोनों का नाश करने वाला होता है और सर्वत्र अविश्वास भी मृत्यु से बढ़कर है। अर्थात अत्यधिक विश्वास एवं अविश्वास दोनों ही हानिकारक है। सावधानी आवश्यक है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


गुरुवार, ८ जुलै, २०२१

पिटर लिओ निवोडिच कपिझा भौतिकशास्त्र

 *पीटर लिओ निवोडिच कपिझा*

🗻🌋🏔️🗻🌋🏔️🗻🌋🏔️🗻🌋

*👨‍🔬👨‍🔬भौतिकशास्त्रज्ञ👨‍🔬👨‍🔬*

🗻🏔️⛰️🌋🗻🏔️⛰️🌋🗻🏔️⛰️

 *जन्मदिन -   ८ जुलै  १८९४*

 *मृत्यू दिन -  ८ एप्रिल १९८४*

पीटर लिओ निडोविच कपिझा ( रशियन : Пётр Леони́дович Капи́ца);

     

      एक रशियन भौतिकशास्त्रज्ञ होता. १९७८  मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.


त्यांचा जन्म ८ जुलै १८९४ रोजी क्रोन्स्टॅटमध्ये झाला होता.त्यांचे प्रारंभिक शिक्षण पेट्रोग्राडमध्ये झाले.त्यानंतर , ते केंब्रिजमधील लॉर्ड रदरफोर्डचे विद्यार्थी होते आणि अणु विघटन संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत प्रबळ चुंबकीय क्षेत्र निर्मितीच्या तांत्रिक प्रणालीच्या विकासात ते खास होते. १९२४ मध्ये , ते कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत चुंबकीय संशोधन सहाय्यक संचालक म्हणून नियुक्त झाले आणि १९३२ पर्यंत ते या पदावर राहिले. १९३० ते १९३५ पर्यंत ते रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवडले गेले आणि १९४२ मध्ये त्यांना फॅराडे मेडल देण्यात आले. याव्यतिरिक्त, त्यांना भौतिकशास्त्रात १९४१ मध्ये आणि पुन्हा १९४१ मध्ये स्टालिन पुरस्कार प्राप्त झाला. १९४३ आणि १९४४ मध्ये तुम्हाला ऑर्डर ऑफ लेनिन ही पदवी देखील देण्यात आली.


१९३४ मध्ये जेव्हा ते रजेवर (रशिया) घरी गेलात तेव्हा सोव्हिएत सरकारने त्यांना पुन्हा देश सोडण्याची परवानगी दिली नाही. त्यानंतर मॉस्कोच्या भौतिक समस्यांबद्दलचे संचालक कपिझाची लवकरच नियुक्ती केली गेली, .


त्यांचे मुख्य कार्य ' मॅग्नेटिझम ' आणि क्रायोजेनिक्स (अत्यंत थंड उष्णता) शी संबंधित आहे . ते ३० टेस्लापर्यंत चुंबकीय क्षेत्रे तयार करण्यात यशस्वी झाले आणि हायड्रोजन आणि हीलियम लिक्विंक्शन प्लांटची यशस्वी रचना देखील दिली.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 ⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳

🚩🦚🌹🐌🐄🐌🌹🦚🚩

जेष्ठ मास,कृष्ण पक्ष, *चतुर्दशी*,मृगशिरा नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, ०८ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"जीवन के प्रति जिस व्यक्ति की कम से कम आपत्तियां हैं, वह व्यक्ति संसार में अन्य लोगों की अपेक्षा अधिक सुखी है। यह बात सदैव स्मरण रहनी चाहिए कि अधिक महत्वाकांक्षाएं समस्याओं को जन्म देती है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बुधवार, ७ जुलै, २०२१

ओटो फ्रेडरिक रोहोवेडर

 *ओटो फ्रेडरिक रोहवेडर*

👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭👨‍🏭

*स्वयंचलित ब्रेड - स्लाइसिंग मशीन तयार केली*

👨‍🔧👨‍🏭👨‍🔧👨‍🏭👨‍🔧👨‍🏭👨‍🔧👨‍🏭👨‍🔧👨‍🏭👨‍🔧

*जन्मदिन - ७ जुलै १८८०*


ओट्टो फ्रेडरिक रोहवेडर हे अमेरिकन शोधक आणि अभियंता होते ज्यांनी व्यावसायिक वापरासाठी प्रथम स्वयंचलित ब्रेड - स्लाइसिंग मशीन तयार केली . याचा प्रथम वापर चिलीकोथे बेकिंग कंपनीने केला होता.


रोहवेडरने प्रथम एक ज्वेलर होता. ते सेंट जोसेफमधील तीन दागिन्यांच्या दुकानांचे मालक झाले. ब्रेड स्लाइसिंग मशीन विकसित करता येईल ही अपेक्षा ठेवून त्याने दागिन्यांची दुकानं मशीन तयार करण्यासाठी विकली. १९१७ मध्ये रोहवेडर आपले मशीन तयार करत असलेल्या कारखान्यात भीषण आग लागली. त्याचा प्रोटोटाइप आणि ब्लूप्रिंट नष्ट झाले. पुन्हा निधी मिळण्याची गरज असताना, ब्रेड स्लाइसर बाजारात आणण्यात रोहवेडरला कित्येक वर्षे उशीर झाला.


१९२७ मध्ये रोहवेडरने एक मशीन यशस्वीरीत्या तयार केली ज्याने फक्त ब्रेड कापलेच नाही तर ते कापुन त्याची पॅकिंग देखील होत होती. त्याने आपल्या शोधाच्या पेटंटसाठी अर्ज केला आणि १९२८ मध्ये चिलीकोथे, मिसुरी येथील चिलीकोथे बेकिंग कंपनी येथे स्थापित केलेल्या बेकर फ्रँक बेंच यांना प्रथम मशीन विकली. स्लाईस्ड ब्रेडची पहिले उत्पादन ७ जुलै १९२८ रोजी व्यावसायिकपणे विकले गेले. इतर बेकरींकडे मशीनची विक्री वाढली आणि स्लाइस्ड् ब्रेड देशभर उपलब्ध झाले.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

जेष्ठ मास,कृष्ण पक्ष, *त्रियोदशी*,रोहिणी नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, ०७ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"महानता कभी न गिरने में नहीं अपितु प्रत्येक बार गिरकर उठ जाने में है। यदि हम समय पर अपनी त्रुटियों को स्वीकार नहीं करते है, तो हम एक और त्रुटि कर बैठते है। हम अपनी त्रुटियों से तभी सीख सकते है, जब हम अपनी त्रुटियों को सहज एवं प्रसन्न मन से स्वीकार करते है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



मंगळवार, ६ जुलै, २०२१

आपण बोलतो कसे


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📙 *आपण बोलतो कसे ?*


लहानपणापासून आपण बोलत असतो, बोललेले ऐकता असतो. हे इतके सवयीचे झालेले असते, की आपण काही विशेष वेगळी क्रिया करत आहोत हे जाणवतही नाही. पण ज्या वेळेस आवाज बसतो त्यावेळेस बोलण्याची क्रिया कशी होत असेल, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल.


आवाजाच्या निर्मितीत पोटाचे स्नायू, छाती व पोट यांच्यामधील पडदा, फुफ्फुस, स्वरयंत्र, घसा, नाक, तोंड या अवयवांचा सहभाग असतो. यातही स्वरयंत्राचे काम महत्त्वाचे असते. उत्क्रांतीमध्ये स्वरयंत्राचा विकास होऊन बोलणे हे कार्य मानवात स्वरयंत्र करू लागले. 


बोलण्याच्या क्रियेत सर्वप्रथम मेंदूतील वाचा केंद्रातून आज्ञा येते. त्यानुसार स्वरयंत्रातील स्वरतंतुची हालचाल होऊन आपण बोलावयास लागतो. फुफ्फुसातील हवेचा वापर यासाठी केला जातो. तसेच वर सांगितल्या प्रमाणे घसा, टाळू, दात, ओठ, नाक, जिभेच्या सहाय्याने वेगवेगळ्या शब्दांची निर्मिती केली जाते.जसे कंठ्य शब्द क,ख, ग, इ; तालव्य शब्द ट, ठ, ड;  दंत्त्य शब्द त, थ, द; ओष्ठ्य शब्द प, फ आणि अनुनासिक शब्द ञ वैगरे. अशा प्रकारे आपण बोलतो. वरील पैकी कशात बिघाड झाला म्हणजे वाचा केंद्र आज्ञावहन करणारे चेतातंतू स्वरयंत्रातील स्वरतंतू आणि घसा, जीभ वगैरे अवयव यात बिघाड झाल्यास वा या ठिकाणी व्याधी झाल्यास बोलण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊन आवाज पूर्णपणे बंद होणे, अडखळत बोलणे अशी लक्षणे निर्माण होतात.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

 

भौतिक, गणितज्ञ

 *👨‍🔬👨‍🔬गेऑर्ग झिमॉन ओहम👨‍🔬👨‍🔬*

👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬

*बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ*

📐📏📐📏📐📏📐📏📐📏

*स्मृतिदिन - जुलै ६, इ.स. १८५४*


गेऑर्ग झिमॉन ओहम (आंग्लीकरणातून उद्भवलेला मराठी नामभेद: जॉर्ज सायमन ओहम ; जर्मन: Georg Simon Ohm) 

    १६ मार्च  इ.स. १७८९ 

     ०६ जुलै इ.स. १८५४

       हा बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ होता. याने शाळेत शिक्षकी पेशा करताना अलेस्सांद्रो व्होल्टा या इटालियन आविष्कारकाने बनवलेल्या विद्युतरासायनिक घटावर अधिक संशोधन करण्यास आरंभ केला.या संशोधनातून घडवलेल्या स्वनिर्मित उपकरणाद्वारे याने संवाहकाच्या दोन टोकांतील विभवांतर आणि संवाहकातून वाहणारी विद्युतधारा यांच्यामधील परस्परसंबंध सिद्ध केला. हा संबंध "ओहमचा नियम" म्हणून प्रसिद्ध आहे.


ओहमचा नियम

संवाहकाच्या दोन टोकांत वाहणारी विद्युतधारा,त्या दोन टोकांमधील विभवांतराच्या समानुपाती असते.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

जेष्ठ मास,कृष्ण पक्ष, *द्वादशी*,कृतिका नक्षत्र,सूर्य उत्तरायण,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, ०६ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"दूर से देखने पर हमें आगे के सभी मार्ग बंद दिखाई देते हैं, क्योंकि सफलता के मार्ग हमारे लिए तभी खुलते है, जब हम उसके बिल्कुल निकट पहुँच जाते है। सफलता पहले से निर्मित कोई वस्तु नहीं है। ये हमारे ही के कर्म, विश्वास और दृढ़-निश्चय से ही आती है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


सोमवार, ५ जुलै, २०२१

बिनधास्त जगा

 *बिनधास्त जगा मित्रांनो*

●एकदा का *चाळिशी* पार केली की "जास्त शिकलेला" आणि "कमी शिकलेला" दोघेही सारखेच ...

(कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल)


● *पन्नाशी* नंतर तर "सुंदर" आणि "कुरूप" हा भेदभावच नष्ट होतो....दोन्ही सारखेच 

(कोण कितीका सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही )


● *साठी* नंतर तर "मोठी पोस्ट" आणि "लहान पोस्ट" असेही काही उरत नाही....दोन्ही सारखेच

(निवृत्तीनंतर तर ऑफीसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.)


● *सत्तरी* पार केल्यानंतर "मोठे घर" आणि "लहान घर" असा विचार सुद्धा मनात येत नाही....दोन्ही सारखेच

(सांधेदु:खी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले कि बसण्यापूर्ती जागा असली तरी पूरे.)


● *ऐंशी* नंतर गाठीशी "भरपूर पैसा" असला काय अन् नसला काय.... दोन्ही सारखेच

(जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न ऊरतोच )


●नशीबाने *नव्वदी* पार केली (अभिनंदन) तर "झोपणे" आणि "उठणे" यांत सुद्धा फरक राहत नाही...दोन्ही सारखेच

(कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच)


अजुन *शंभरी* पार करायची ईच्छा आहे का ?


*जीवन साधे-सरळ-सोपे आहे.आनंदाने जगा...!*


उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आइन्स्टाइनचा आव आणि भाव आणू नका.

मानसा पेक्षा सावली 

मोठी दिसली की,

     "समजावे"

संध्याकाळ जवळ

आली आहे.


*एक लक्षात ठेवा...!*


*लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, हसा.*


 *स्वतःसाठी काही वेळ तरी जगायला शिका, कारण......* 


 *मनुष्य जन्म पुन्हा नाही.*

 *आयुष्य खुप सुंदर आहे.*

*आनंदी राहा आनंदी जगा.*


*सुंदर दिवसाच्या आनंदी शुभेच्छा.*

लेखन, गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 



आषाढि पोर्णिमा बुध्दाचा उपदेश

 *आषाढी पोर्णिमा,वर्षावास आणि तथागत बुद्धाचा उपदेश* 


🔹 *धम्मचक्क पवत्तन सुत्त*🔹


👉 *खरा गुरु तोच आहे जो जगाच्या कल्याणाचा विचार करतो.दुस-याचे दुःख निवारण्यासाठी आयुष्य समर्पित करतो.तथागत गौतम बुद्ध संपुर्ण विश्वाची विरासत आहे.आज आषाढी पोर्णिमा वाराणशीजवळ सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनात तथागत भगवान बुद्धांनी २६०० वर्षांपुर्वी धम्मचक्र प्रथम गतिमान केले.तो पवित्र स्मरणीय दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा आणि याच आषाढ पौर्णिमेला बुद्धांनी कौंडीण्य,भद्दिय,महानाम,वप्प, आणि अश्वजित यांना प्रथम धम्मोपदेश दिला. हे पाच परिव्राजक तथागताचे पंचवग्गीय भिक्खू म्हणुन बुद्धमय जगाच्या इतिहासात अजरामर झालेत.!तथागतांनी प्रथम धम्मोपदेश केला.ज्याला' धम्मचक्क पवत्तन सुत्त असे म्हणतात.तथागतांनी पंचवर्गीय संन्याशांना आपला अष्टांगिक मार्ग, प्रतीत्य समुत्पाद, चार आर्यसत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले. इसिपतन वन (आधुनिक सारनाथ), वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले. आश्विन पौर्णिमेला एकसष्ठ अर्हत भिक्षुंच्या समवेत धम्मचक्राची घोषणा केली.जेव्हापासून तथागतांनी आषाढी पौर्णिमेला भिक्षु समवेत प्रथम वर्षावास इसिपतन मध्ये केला,तेव्हापासून भिक्खू वर्षावास प्रारंभ करतात.*


🔹 *वर्षावास* 🔹


👉 *वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील तीन महिने अर्थात आश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्ध विहारात व्यतीत करणे. या काळात भिक्खू विनयात कमीपणा आला असेल त्यांनी ज्येष्ठ भिक्खुंद्वारा पूर्तता करणे, ध्यान - साधना करणे, बौद्ध उपासक उपासिकांना धम्म शिकविणे, उपासकांकडून अष्ट पुरस्कारांचे धम्मदान स्वीकारणे व उर्वरीत नऊ महिने धम्म - प्रचार - प्रसाराला घालविणे हे भिक्खुंचे कार्य असते.भगवान बुद्धाच्या काळात बुद्धांनी सर्व भिक्षूंना धम्माचा प्रसार करण्याचे आदेश दिले आणि सर्व बौद्ध भिख्खू या कामात गुंतले होते, परंतु असे केल्याने त्यांना बर्‍याच संकटांना आणि विशेषत: पावसाळ्यात नद्यांमध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागे. पुरामुळे बौद्ध भिक्खू वाहून जात आणि त्यांच्या चालण्याने शेतातील पिकांचे नुकसान होत त्यांनी हे तथागतांना सांगितले,बुद्धांनी आदेश दिला की आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत सर्व भिक्षूंनी एकाच ठिकाणी रहावे, भिक्षासाठी गावात जाऊ नये. ऐकाच ठिकाणी राहून धम्मचा पठण अध्ययन करावे जर गरज पडली तर भिक्षू आपल्या गुरूंकडून जास्तीत जास्त एका आठवड्याचा वेळ घेऊन विहारातून बाहेर जाऊ शकतात, भगवान बुद्ध काळापासून वर्षावास अस्तित्वात आहे. भगवान बुद्धांनी पहिला वर्षावास इ.स.पू. ५२७ मध्ये सारनाथच्या इसिपटन मध्ये केला आणि त्यानंतर ४५ वर्षावास त्यांनी श्रावस्ती, जेतावन, वैशाली, राजगृह इत्यादी ठिकाणी केले.* 


🔹 *उपासकांनी पाळावयाची तत्वे.*🔹


🔸 *पंचशील:* 🔸


👉१) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. 

👉२) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. 

👉३) कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी' अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. 

👉४) मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. 

👉५) सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणार्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.


🔹 *अष्टांगिक मार्ग :*🔹


👉१) सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे. 

👉२) सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार. 

👉३) सम्यक् वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे. 

👉४) सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे. 

👉५) सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे. 

👉६) सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे. 

👉७) सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे. 

👉८) सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.


🔹 *दहा पारमिता :*🔹


👉१) शील शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.

👉२) दान स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्‍याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.

👉३) उपेक्षा निरपेक्षतेने सतत प्रयत्‍न करीत राहणे.

👉४) नैष्क्रिम्य ऐहिक सुखाचा त्याग करणे.

👉५) वीर्य हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.

👉६) शांती शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.

👉७) सत्य सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.

👉८) अधिष्ठान ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.

👉९) करुणा मानवासकट सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता.

👉१०) मैत्री मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.


*आषाढी पोर्णिमेनिमीत्त सर्वाना मंगलकामना*

संकलन गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 






 



       


आपण झोपतो का

 📙 *आपण झोपतो म्हणजे काय ?* 📙 


झोप झाल्यावर माणूस ताजातवाना होतो. रोज आपण दिवसभराच्या परिश्रमानंतर झोपी जातो व सकाळी उठून परत कामाला लागतो. 

झोप न मिळाल्यास काय होते हे तुम्ही आहे अनुभवले असेल. आपण चिडचिडे होतो, कामात लक्ष लागत नाही, डुलक्या येतात, कधी कधी चक्कर येते यावरून झोप घेणे ही अपरिहार्य गोष्ट आहे हे आपल्या लक्षात येईल. लहान मुले १६ ते १८ तास झोपतात या काळात अपचयाचा दर कमी असतो व मुलांची वाढ होते. हळूहळू झोप कमी होते. तरुण व्यक्तींना सात ते आठ तास झोप आवश्यक असते. वृद्धावस्थेत मात्र पाच ते सहा तास झोपही पुरते. सहसा दुपारी झोपू नये.

नुसते पडून राहणे म्हणजे झोप नव्हे हे तुम्हाला माहित आहे. झोपेचे इलेक्ट्रो एनकेफॅलोग्रॅम वा मेंदूच्या कार्याच्या आलेखाद्वारे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की या काळात मेंदूच्या येणाऱ्या लहरी कमी होतात; पण त्यांची उंची वाढते. नंतरच्या अवस्थेत डोळ्यांच्या जलद हालचाली होतात व मेंदूतून येणाऱ्या लहरींची संख्या वाढते. या लहरींची उंची कमी असते. झोपेच्या एका चक्रात डोळ्यांची जलद हालचाल न होणारी झोप व डोळ्यांची जलद हालचाल होणारी झोप अशा दोन अवस्था असतात. एकदा प्रौढ माणूस झोपल्यावर अशी चार ते पाच चक्र त्यात असतात. या प्रत्येक चक्राचा कालावधी दीड तासांचा असतो. झोप ही लंबमज्जेतील चेतातंतूंवर अवलंबून असते. त्यामुळे या भागाला इजा झाल्यास वा त्यावर परिणाम झाल्यास खूप झोप येते वा येतच नाही. हे जरी खरे असले तरी सामान्यतः जास्त झोप हा सवयीचा परिणाम असतो. त्यामुळे योग्य सवय लागल्यास झोप कमी होते. 

झोप ही जीवनासाठी आवश्यक असते कारण या काळात शरीराला विश्रांती मिळते. श्वसन व रक्ताभिसरणाचे कार्य मंदावते.  अशी ही झोप जास्त झाली तर मात्र झोपाळूपणाचा आरोप येतो आणि खूप कमी झाली तरी चिंता वाटते.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन* 


संकलन गजानन गोपेवाड 



मद्यप्राशन केल्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतो?


══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📙 *मद्यपानामुळे काय दुष्परिणाम होतात ?* 


'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' हे खरे असले तरी बोलताना व चालताना सारखेच अडखळणाऱ्या दारुड्याच्या बाबतीत मात्र हे सपशेल खोटे ठरते. मद्यपान करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तरुण वयातच या दारूचे व्यसन लागते. पिक्चरमधील हिरोचे अनुकरण, मित्रांचा प्रभाव, कुतूहल, नाविन्याची आवड, साहसी वृत्ती, मानसिक अस्थिरता अशा अनेक कारणांमुळे लोक मद्यपानाला सुरुवात करतात. एकदा सुरुवात केली कि मग त्याला मर्यादा राहत नाही.


 आरोग्यावर मद्यपानाचे अनेक दुष्परिणाम होतात. यात यकृताचा कर्करोग, मधुमेहासारखा रोग लवकर होणे, रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होऊन हृदयाला रक्त पुरवठा होण्यात अडथळा निर्माण होणे व हृदयविकाराचा झटका येणे हे रोग दिसून येतात. मद्यपान केलेल्या व्यक्तीचे स्वत:वर नियंत्रण नसते. त्यामुळे असे लोक अपघातात सापडतात व मृत्युमुखीही पडतात.

 

 मद्यपानाचे आरोग्याखेरीच सामाजिक व आर्थिक परिणामही फार होतात. घरे उद्ध्वस्त होतात. नातीगोती तुटतात. आर्थिक विपन्नावस्था येते. दारू पिऊन व्यक्ती पत्नीला मुलांना मारहाण करते. घराकडे त्या व्यक्तीचे दुर्लक्ष झाल्याने मुलांचे शिक्षण नीट होत नाही. साहजिकच मुले अशिक्षित राहतात. समाजात बेरोजगारी वाढते व गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ होते. 

 

दारूमुळे यकृत खराब होते आता पायांवर सूज येते पोटात पाणी होते. मेंदूवर परिणाम होऊन मानसिक रोग होतात. अशी ही सर्वनाशक दारू. आधी माणूस दारू पितो व नंतर हळूहळू ती त्याला त्याच्या घरादाराला पिऊन टाकते (संपवते); हे म्हणतात, ते खरेच आहे. त्यामुळे मद्यपानाच्या सवयीपासून दूर राहिलेले चांगले.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

संकलन गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून



Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...