शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

हँपी बर्थ डे गुगल

 ************************************

*४ सप्टेंबर - हॅप्पी बर्थडे गुगल* 

************************************


स्थापना - ४ सप्टेंबर १९९८


इंटरनेटवरील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारा आपला मित्र म्हणजे गुगल. वास्तविक गुगलची स्थापना ४ सप्टेंबर १९९८ ला झाली आहे. गुगल कंपनीच्या स्थापनेपासून २००४ पर्यंत गुगल आपला ४ सप्टेंबर या दिवशी वाढदिवस साजरा करत होती. परंतु २००५ पासून गुगलने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला. या पाठीमागचे कारण म्हणजे २७ सप्टेंबर रोजी सर्वात अधिक पेज व्हू मिळाल्याची घोषणा करण्यात आली होती आणि याच दिवशी आपला वाढदिवस साजरा करण्यात यावा असा गुगलचा अट्टाहास होता, तेव्हापासून गुगलचा वाढदिवस २७ सप्टेंबर रोजी करण्यास सुरुवात झाली.


४ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आलं होतं. मेन्लो पार्कमधील सुसान वोजसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज आणि सर्गे ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली होती. खरंतर ‘Google’चं नाव ठेवायचं होतं ‘Googol’. पण स्पेलिंग मिस्टेकमुळे ‘Google’ असं झालं आणि तेच नाव पुढे प्रसिद्ध झालं. त्याआधीही पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवलेलं. मात्र, त्यानंतर गूगल असं नाव करण्यात आले.


१९९७ साली कंपनीने डोमेन रजिस्टर केलं आणि अधिकृतपणे गुगल असे नाव ठेवण्यात आले. गुगल ही जगातील एक मोठी कंपनी असून, केवळ भूतकाळात समाधान मानणारी नाही. त्यांनी त्यांच्या मुख्य शोधयंत्रात सुधारणा केली असून, इतर अनेक उपकरणांवर त्याचा वापर कसा वाढवता येईल याचा विचार केला आहे. १९९८ मध्ये गुगलने तंत्रज्ञानाचे जग नाटय़मयरीत्या बदलून टाकले व सर्च इंजिन म्हणजे शोधयंत्र कायमचे सुधारून टाकले. गुगलने जग बदलले, अब्जावधी लोक ऑनलाइन आले. इंटरनेटची विक्रमी वाढ झाली. आता तुम्ही तुमच्या खिशातील छोटय़ाशा मोबाइलवर असलेल्या गुगलने कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधू शकता. एवढेच नव्हे. गुगल आपल्या डुडल साठीही प्रसिद्ध आहे. २००२ साली गुगलने पहिल्यांदा डुडल तयार केलं. जगप्रसिद्ध व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी, महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाचे वर्धापनदिन इत्यादींसाठी गुगल आपल्या होमपेजवर डुडलद्वारे प्रसिद्ध करते.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

***********************************

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची🇮🇳🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

     *भारतीय राजकारणातील* 

                 *भीष्माचार्य*

      *पितामह दादाभाई नौरोजी*      

                      *दोर्डी* 

      *जन्म : ४ सप्टेंबर १८२५*

     (वर्सोवा,मुंबई,महाराष्ट्र,भारत)

           मृत्यू : ३० जून १९१७    

         (महालक्ष्मी,मुंबई,भारत)

दादाभाई नौरोजी : *ब्रिटनमधील खासदार*

कार्यकाळ : १८९२ – १८९५

मागील : फ्रेडरिक थॉमस पेंटोन

पुढील : विल्यम फ्रेडरिक बार्टन 

             मस्से-मेंवरिंग


राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

आई : माणकबाई नौरोजी दोर्डी

वडील : नौरोजी पालनजी दोर्डी

पत्नी : गुलबाई

निवास : लंडन युनायटेड किंग्डम

व्यवसाय : बॅरिस्टर

धर्म : पारशी


हे पारशी विचारवंत,शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.


दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक. जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाउस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे ते पहिले भारतीय. भारताच्या लुटीच्या सिद्धान्ताचे जनक. १८८३ साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला.


मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय. ते रा.गो. भांडारकर यांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. महंमद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते.


➡ *रस्ता*


मुंबईच्या गिरगांव भागात जेथे दादाभाई रहात होते त्या रस्त्याला नौरोजी स्ट्रीट म्हणतात. याच रस्त्यावर स्टुडंट्स लिटररी सायंटिफिक सोसायटीची कमळाबाईंची शाळा आहे.


💁‍♂ *जीवन प्रवास*


१८४५ - स्टुडंट्स लिटररी सायंटिफिक सोसायटी ही संस्था स्थापन करण्यात सहभाग. १८८५ - भारतीय राष्ट्रीय कॉ्ंग्रेसचे संस्थापक सदस्य. १८८६, १८९३ व १९०६ - भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्षपद. ज्ञान प्रसारक मंडळींची स्थापना,बॉम्बे असोसिएशन ची स्थापना, लंडन इंडियन असोशिएशन , आणि ईस्ट इंडिया असोशिएशन ची स्थापना.


💎 *बाह्य दुवे*


"डॉ. दादाभाई नौरोजी, 'द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया', वोहुमन.ऑर्ग - दादाभाई नौरोजींचा समग्र जीवनपट" (इंग्रजी मजकूर).


📚 *दादाभाई नौरोजींवरील पुस्तके*


दादाभाई नौरोजी (चरित्र, गंगाधर गाडगीळ)

दादाभाई नौरोजी : भारतीय राजकारणातील भीष्माचार्य (व्यक्तिचित्रण, निंबाजीराव पवार)

नवरोजी ते नेहरू (गोविंद तळवलकर)

भारताचा स्वातंत्र्य संघर्ष (बिपीनचंद्र)

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,कृष्ण पक्ष, *द्वादशी*,पुष्य नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ०४ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"मनुष्य के लिए सुख और आनंद का भंडार भीतर ही है। उसकी झलक बाहर भी दिखाई देती है, पर वह केवल झलक ही है। शास्त्र का कथन ठीक ही है कि यदि सत्य वस्तु, ब्रह्म या परमात्मा का रूप जानना हो, तो हमें अपने चित्त को क्षण भर के लिए स्थिर बनाना पड़ेगा। इसे साधना-धर्म का अंग कहते हैं। इसलिए स्थायी सुख-प्राप्ति के लिए हमें धर्म का आश्रय लेना पड़ेगा। धर्म ही हमें वर्तमान मुहूर्त के क्षणिक सुख के बदले भविष्य में होने वाले अक्षय सुख का मार्ग बताता है। "*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

लहान मुले माती का खातात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *लहान मुले माती का खातात ?* 📕


नवीनच रांगायला शिकलेली मुले जे दिसेल ते तोंडात घालतात. काही मुले माती खातात, पेन्सिल खातात.

हयाचे कारण काय ते आता पाहू. आहारात लोह व कॅल्शियम या क्षारांची कमतरता असल्यास, मुलाला वरचे अन्न सुरू न केल्यास, अॅनेमिया वा रक्तक्षय (कोणत्याही कारणामुळे) असल्यास मुले माती खातात. काही मुलांमध्ये, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही ही भावना वाढीस लागल्यानेही ते माती, पेन्सिली बगैरे खाऊन सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचा प्रयत्न करतात. कृमींची लागण झालेली मुलेही माती खातात. माती खाल्ल्याने कृमींची लागण होऊ शकते. मुलाला लोहक्षार जास्त प्रमाणात दिल्याने मुले माती खाणे बंद करतात. तसे न झाल्यास मानसिक कारणांचा शोध घ्यावा लागतो. माती खाणाऱ्या मुलाच्या पाठीत धपाटा मारताना मातेने या कारणांकडे थोडे लक्ष दिल्यास त्याचे माती खाणे थांबू शकेल.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

बहिरे मुल मुकेही असतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *बहिरे मूल मुकेही असते का?* 📕


बहिरेपणा म्हणजे कमी अधिक प्रमाणात ऐकू न येणे, हे तुम्हाला माहीत असेलच. आपल्या कानाचे बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे तीन भाग असतात. या तीन भागांपैकी एकात जरी दोष असला, तरी बहिरेपणा येऊ शकतो. याखेरीज मेंदूपासून निघणारी आठवी नस किंवा मेंदूचा ध्वनिज्ञानकेंद्राचा भाग यांपैकी कोठेही दोष असेल, तरीही ऐकू येत नाही.


काही मुले जन्मताच मूकबधिर असतात. म्हणजे त्यांना ऐकूही येत नाही व बोलताही येत नाही. ही एक जन्मजात अशी बरी न होणारी व्याधी आहे. ऐकणे आणि बोलणे यांचा जवळचा संबंध आहे. आपण बोलायला कसे शिकतो, ते आता पाहू, लहान बाळाला आवाज आल्यास ते तिकडे वळून पाहायला लागते. येणारा आवाज आणि त्यासोबत होणाऱ्या तोंडाच्या, ओठांच्या हालचाली यावर बालकाचे बारीक लक्ष असते! आपले अनुकरण करतच ते पहिल्यांदा "बाऽऽऽवा", "ताऽऽता" असे शब्द बोलते. ऐकू न आल्यास साहजिकच त्याला बोलता येत नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ऐकू न आल्याने सभोवतालच्या परिस्थितीचे त्याला पुरेसे आकलनही होत नाही. त्यामुळे मुलाला भोवतालच्या गोष्टींबाबत रस वाटत नाही व त्याचा एकूणच विकास नीट होत नाही. यावरून बहिरे मूल बऱ्याचदा मुके असल्याचे तुम्हाला आढळेल किंबहुना बहिरे

असल्यानेच ते मुकेही असते.


लहान बाळाने आवाजाला प्रतिसाद दिला नाही, तर तात्काळ त्याच्या कानांची तपासणी करून घ्यावी. बहिरेपणाचे निदान झाल्यास बोलण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण मुलाला द्यावे लागते. अर्थात असे शिक्षण देणाऱ्या संस्था संख्येने फार कमी आहेत. मात्र असे शिक्षण दिल्यास मूकबधिर मुले काही प्रमाणात स्वावलंबी बनू शकतात.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

  

कार्ल डेव्हिड जन्मदिवस

 *************************************

*३ सप्टेंबर - कार्ल डेव्हिड अँडरसन जन्मदिन*

*************************************


*जन्म - ३ सप्टेंबर १९०५*     (न्यूयॉर्क)

स्मृती - ११ जानेवारी १९९१ (कॅलिफोर्निया)


अँडरसन, कार्ल डेव्हिड अमेरिकन भौतिकी विज्ञ १९३६च्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये अध्ययन करून १९२७ मध्ये बी. एस्. आणि १९३० मध्ये पीएच्. डी. या पदव्या त्यांनी मिळविल्या. १९३० नंतर आजपावेतो ते कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सदस्य आहेत. १९३९ मध्ये त्यांची प्राध्यापकपदावर नेमणूक झाली.


१९३० मध्ये त्यांनी विश्वकिरणांमुळे (बाह्य अवकाशातून पृथ्वीकडे येणाऱ्या अतिशय भेदक किरणांमुळे) वातावरणात निर्माण होणाऱ्या आयनीकारक (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट निर्माण करणाऱ्या) कणांचा तीव्र चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या बाष्पकोठीच्या [कण अभिज्ञातक] साहाय्याने अभ्यास करण्यास सुरुवात केली.


आयनकारक कणांमुळे बाष्पकोठीत तयार झालेल्या मार्गांचे चुंबकीय क्षेत्रामुळे होणाऱ्या विचलनाच्या (बदलाच्या) दिशेचे निरीक्षण करून अँडरसन यांना त्या कणावरील विद्युत् भाराचे चिन्ह ठरविणे शक्य झाले. १९३२ च्या सुमारास त्यांना विश्व किरणांमध्ये नेहमीच्या (ऋण विद्युत् भारित) इलेक्ट्रॉनाशिवाय धन विद्युत् भारित इलेक्ट्रॉन असतात, याचा निर्णायक पुरावा मिळाला. या नवीन कणाला ‘पॉझिट्रॉन’ असे नाव देण्यात आले. 


डिरॅक यांनी आपल्या इलेक्ट्रॉन-सिद्धांतामध्ये या प्रकारच्या कणाचे भाकीत केलेले होते, परंतु प्रत्यक्षात यापूर्वी या कणांचे निरीक्षण झालेले नव्हते. या शोधाकरिता अँडरसन यांना १९३६ मध्ये व्हिक्टर हेस या विश्वकिरणांसंबंधी मूलभूत संशोधन केलेल्या दुसऱ्या शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. १९३७ मध्ये विश्वकिरणांसंबंधी संशोधन करीत असताना त्यांनी व नेडरमेयर यांनी मेसॉन या मूलकणाचा शोध लावण्यात यश मिळविले .

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

**********************************

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,कृष्ण पक्ष, *एकादशी*,पुनर्वसु नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ०३ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


          *"एक दिन हम सबको इस कारण से खो देंगे, कि कोई हमे याद नही करता तो हम किसी को याद क्यों करें। रिश्ते अनमोल होते हैं, उनका सम्मान कीजिये। ये वो अनमोल रत्न है, जो बाजार में नही बिकते।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची🇮🇳🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

       🇮🇳 🛐☮👳🏻☮🛐🇮🇳


    *शिख समुदायाचे चौथे गुरु*

              *गुरु राम दास*


     जन्म : २४ सप्टेंबर १५३४

(चुना मंडी, लाहोर , पंजाब , मोगल साम्राज्य (सध्याचा पाकिस्तान )


*निधन : ०१ सप्टेंबर, १५८१* 

               (वय ४६)

(गोइंदवाल , मोगल साम्राज्य (सध्याचा भारत )


धर्म : शीख धर्म

जोडीदार : बीबी भानी

मुले : बाबा पृथ्वी चंद, बाबा महान देव, आणि गुरु अर्जन

पालक : हरी दास आणि 

             माता दया  कौर

साठी प्रसिद्ध : अमृतसर शहराचे 

                      संस्थापक 

जन्मनाव : जेठा

इतर नावे : चौथा गुरु

व्यवसाय : गुरू

धार्मिक कारकीर्द

पूर्ववर्ती : गुरु अमर दास

उत्तराधिकारी : गुरु अर्जन


            वयाच्या १२ व्या वर्षी भाई जेठा आणि त्याची आजी गोईंदवळला गेले आणि तेथे त्यांनी गुरु अमर दास यांची भेट घेतली. त्यानंतर त्या मुलाने गुरु अमर दास यांना आपले गुरू म्हणून स्वीकारले आणि त्यांची सेवा केली. गुरू अमर दास यांच्या कन्येने भाऊ जेठाशी लग्न केले आणि त्यामुळे ते गुरु अमर दास यांच्या कुटूंबाचा भाग बनले. शीख धर्माच्या पहिल्या दोन गुरूंप्रमाणेच गुरु अमर दास यांनी स्वतःची मुले निवडण्याऐवजी भाई जेठाला त्याचा उत्तराधिकारी म्हणून निवडले आणि त्याचे नाव राम दास किंवा "देवाचा सेवक किंवा गुलाम" असे ठेवले. 


१५७४  मध्ये राम दास शीख धर्माचे गुरू बनले आणि १५८१ मध्ये मृत्यू होईपर्यंत शीख नेते म्हणून काम केले. अमर दासच्या मुलांकडून त्याला शत्रुत्वाचा सामना करावा लागला, गुरू-चाक म्हणून ओळखल्या जाणा-या अमर दासांनी त्यांची अधिकृत जागा स्थलांतरित केली. हे नव्याने प्रस्थापित शहर रामदासपूर हे नाव असून ते पुढे विकसित झाले व त्याचे नाव बदलून अमृतसर - शीख धर्माचे सर्वात पवित्र शहर असे नाव पडले. शीख चळवळीतील धार्मिक व आर्थिकदृष्ट्या पाठिंबा देण्यासाठी लिपिक नेमणुका आणि देणगी संकलनासाठी मांजी संघटनेचा विस्तार केल्याबद्दल शिख परंपरेतही त्यांचे स्मरण आहे. त्याने स्वत:च्या मुलाला त्याचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले आणि वंशजांशी संबंधित नसलेल्या पहिल्या चार गुरूंच्या विपरीत, दहाव्या शीख गुरुंपैकी पाचवे रामदासांचे थेट वंशज होते.


*चरित्र*

गुरु राम दास यांचा जन्म लाहोर (आता पाकिस्तानचा भाग) चूना मंडी येथील सोधी खत्री कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील हरी दास आणि आई दया करबोथ होते. त्यापैकी त्यांचे वडील सात वर्षांचे असताना निधन झाले. त्याच्या आजीनेच त्याचे पालनपोषन केले. त्याने अमर दासची धाकटी मुलगी बीबी भानीशी लग्न केले. त्यांना पृथ्वी चांद, महादेव आणि गुरु अर्जन हे तीन मुलगे होते.


*मृत्यू आणि वारसा*


गुरु राम दास यांचे ०१ सप्टेंबर १५८१ रोजी पंजाबच्या गोविंदवल शहरात निधन झाले . 

त्याच्या तीन मुलांपैकी, राम दासांनी पाचवा शीख गुरु म्हणून त्याच्यानंतर सर्वात धाकटा अर्जन याला निवडले. उत्तराधिकारी म्हणून निवड केल्यामुळे शीख गुरूच्या उत्तरादाखल बहुतेक इतिहासात शिखांमध्ये वाद आणि अंतर्गत मतभेद निर्माण झाले. राम दास यांचा मोठा मुलगा पृथ्वी चंद हे सिख परंपरेत जबरदस्तीने अर्जनला विरोध म्हणून ओळखले जाते आणि यामुळे एक गटातील शीख समाज निर्माण झाला ज्यास अर्जनच्या अनुयायी शिखांनी मिनास (शब्दशः "घोटाळे") म्हणून संबोधले आणि त्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तरुण हरगोबिंद यांची हत्या करणे . तथापि, पृथ्वी चंद यांनी लिहिलेल्या वैकल्पिक प्रतिस्पर्धी ग्रंथांमुळे शीख गटाने वेगळीच कथा मांडली, हरगोबिंद यांच्या जीवनावरील या स्पष्टीकरणाला विरोध केला आणि रामदासांचा मोठा मुलगा त्याच्या धाकट्या भावाच्या अर्जनला समर्पित केले. प्रतिस्पर्धी ग्रंथ मतभेद मान्य करतात आणि पृथ्वी चंद यांचे वर्णन गुरु अर्जुन देव यांच्या शहादत नंतर साहिब गुरु झाल्याचे आणि रामदास यांचे नातू गुरु हरगोबिंद यांच्या उत्तरादाखल विवादास्पद होते.


*प्रभाव*


राम दास यांना शीख परंपरेने पवित्र अमृतसर शहर स्थापण्याचे श्रेय दिले जाते. राम दास ज्या भूमीत स्थायिक झाले त्या भूमिकेविषयी कथा दोन आवृत्त्या आहेत. एका गॅझेटियर रेकॉर्डवर आधारित, तुंग गावच्या मालकांकडून ही जमीन शीख देणगीने खरेदी केली गेली.


शीख ऐतिहासिक अभिलेखानुसार, राम अमरदास यांनी या जागेची निवड केली आणि त्याला गुरु दा चाक म्हटले, कारण त्याने मध्यभागी असलेल्या माणसाने तलाव असलेले नवीन शहर सुरू करण्यासाठी जमीन शोधण्यास सांगितले. सन १५७४ मध्ये आपला राज्याभिषेक, आणि  रामदासपूर म्हणून गावाची स्थापना केली. त्याने तलाव पूर्ण करून आणि त्याचे नवीन अधिकृत गुरू केंद्र आणि त्याच्या शेजारी घर बनवून सुरुवात केली. त्यांनी भारतातील इतर भागांतील व्यापारी आणि कारागीरांना आपल्याबरोबर नवीन शहरात स्थायिक होण्यासाठी आमंत्रित केले. देणग्याद्वारे वित्तपुरवठा व ऐच्छिक कार्याद्वारे बांधण्यात आलेल्या अर्जनाच्या काळात शहराचा विस्तार झाला. हे शहर अमृतसर शहर बनू लागले आणि त्याच्या पुत्राने गुरुद्वारा हरमंदिर साहिब बांधल्यानंतर आणि १६०४ मध्ये नवीन मंदिरात शीख धर्माची स्थापना केल्यावर तलावाचे क्षेत्र मंदिराच्या आवारात वाढले.

 दरम्यानच्या बांधकामात क्रियाकलाप महिमा प्रकाश वर्तक , मध्ये लिहिलेला अर्ध-ऐतिहासिक शीख हागीग्राफी आणि सर्व दहा गुरूंच्या जीवनाशी संबंधित सर्वात प्राचीन दस्तऐवजात वर्णन केलेला आहे.


*शास्त्र स्तोत्र*

राम दास यांनी गुरु ग्रंथ साहिबमध्ये ६३ स्तोत्र किंवा सुमारे दहा टक्के स्तोत्रांची रचना केली . ते एक प्रख्यात कवी होते आणि त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्राचीन रागांमध्ये त्यांची रचना केली.

यात अनेक विषयांचा समावेश आहे:

जो स्वतःला गुरूचा शिष्य म्हणवितो त्याने सकाळ होण्यापूर्वी उठून परमेश्वराच्या नावाचा अभ्यास केला पाहिजे. पहाटेच्या वेळी, त्याने उठून स्नान केले पाहिजे आणि अमृत पाण्याच्या टाकीमध्ये आपला आत्मा स्वच्छ केला पाहिजे. या प्रक्रियेद्वारे तो खरोखरच आपल्या आत्म्याची पापे धुवून घेतो. 


देवाच्या नावाने माझे हृदय आनंदाने भरले. देवाच्या नावाचे चिंतन करणे हे माझे मोठे भविष्य आहे. देवाच्या नावाचा चमत्कार परिपूर्ण गुरुद्वारे प्राप्त होतो, परंतु केवळ एक दुर्मिळ आत्मा गुरुच्या शहाणपणाच्या प्रकाशात चालतो.


ओ मनुष्य! अभिमानाचे विष, तुला ठार मारत आहे आणि तुला देवाकडे डोळे देईल. आपले शरीर, सोन्याचा रंग, स्वार्थाने खराब झाला आहे आणि त्यास अस्पष्ट केले आहे. ग्रेडरचे भ्रम काळा होतात, परंतु अहंकार-वेड त्यांच्याशी जोडलेले आहे. 


-  गुरु ग्रंथ साहिब, जी.एस. मानसुखानी यांनी अनुवादित केले 


 शीख धर्माच्या हरिमंदिर साहिब ( सुवर्ण मंदिर ) मध्ये दररोज त्याच्या रचना गायल्या जातात . 


*विवाह भजन*


राम दास यांनी आपल्याच मुलीच्या लग्नासाठी लग्नगीत तयार केले होते. राम दास यांनी केलेल्या लावण स्तोत्रातील प्रथम श्लोक म्हणजे गुरुचे वचन मार्गदर्शक म्हणून स्वीकारणे, ईश्वरी नामाचे स्मरण करणे हा गृहस्थांच्या जीवनातील कर्तव्याचा संदर्भ आहे. दुसरा श्लोक आणि वर्तुळ एकवचनी सर्वत्र आणि स्वत: च्या खोलीत आढळतो याची आठवण करून देतो. तिसरा दिव्य प्रेमाबद्दल बोलतो. चौथे स्मरण करून देतो की दोघांचे मिलन म्हणजे असीम असलेल्या व्यक्तीचे मिलन होय. 


*मसंद सिस्टम*

मसंद यांनी गुरूपासून दूर राहणाऱ्या शिख नेते व  लांबच्या मंडळी, त्यांच्यात आपसी संवाद व्हावा व शीख उपक्रम आणि मंदिर इमारत निधी गोळा करण्यासाठी काम केले. या संस्थात्मक संघटनेने नंतरच्या दशकांमध्ये शीख धर्म वाढण्यास प्रसिद्धी दिली, परंतु नंतरच्या गुरूंच्या काळात, भ्रष्टाचार आणि वारसदारांच्या वादांच्या वेळी प्रतिस्पर्धी शीख चळवळींना वित्तपुरवठा करण्याच्या गैरवापरांमुळे ती बदनाम झाली. 🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,कृष्ण पक्ष, *दशमी*,मृगशिरा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, ०१ सप्टेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


*सबकी अपनी अपनी सोच है...*


   *कुछ लोग रावण में भी गुण देख लेते हैं, और कुछ राम में भी दोष ढूंढ लेते हैं।*


        *दोष किसी का भी नही है, ये तो मात्र इस बात पर निर्भर है कि हमारे माता ने हमें क्या संस्कार दिए हैं अर्थात हमारा लालन-पालन किस वातावरण और संस्कारों के बीच हुआ है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

बाळाची वाढ व विकास


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *बाळाची वाढ व विकास व्यवस्थित आहे वा नाही, हे कसे ओळखावे ?* 


बन्याचदा आईवडिलांना आपल्या मुलाच्या वाढीविषयी चिंता वाटत असते तो नीट खात नाही वा अमुकच करतो, अशा तक्रारी ते करत असतात. मुलाची वाढ व विकास व्यवस्थित आहे वा नाही, हे कसे ओळखायचे? हा पालकांपुढील महत्त्वाचा प्रश्न असतो. ५ वर्षापर्यंतच्या वयाच्या मुलाच्या वाढीचा त्याचे वजन हा उत्तम निदर्शक असतो. "Road to health" नावाचे तक्ते उपलब्ध असतात. यात दर महिन्याला मुलाचे वजन नोंदवण्याची सोय असते. मुलांच्या अपेक्षित वजनाच्या हिशोबाने तक्त्यावर एक 'आरोग्य पथ' दाखवलेला असतो. आपल्या बाळाचे वजन त्या आरोग्य पथावर असेल तर मुलाची वाढ चांगली आहे, असे समजावे. हा तक्ता असा असतो.


मुलाचा विकास योग्य आहे वा नाही, हे खालील निकषांवरून तपासून पाहता येईल. 


तीन महिने - आईकडे बघून ओळखीचे हसते.


चार महिने - मान पूर्णपणे सावरू शकते.


सहा-सात महिने - बसायला लागते.


नऊ ते दहा महिने - रांगायला लागते.


पंधरा महिने - बाबा, दादा असे बोलू लागते.


अडीच वर्षे - स्वतंत्रपणे चालू लागते. संडासवर नियंत्रण येते.


दोन ते अडीच वर्षे - छोटी वाक्य बोलते.


तीन ते साडेतीन वर्षे - लघवीवर नियंत्रण येते.


या विकासाच्या टप्यांवरून मूल योग्य प्रकारे वाढते आहे वा नाही, हे तपासता येईल. अर्थात वाढ व विकास यात मुलामुलांमध्ये थोडाफार फरक पडू शकतो, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या मुलामध्ये विकासाचे सर्वच


टप्पे उशीरा गाठले जात असतील, तर मात्र संपूर्ण तपासण्या करून घेणे गरजेचे आहे.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

  

कान का? खाजतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *कान का खाजतात ?* 📕


सार्वजनिक ठिकाणी कानात बोट घालून कान गदागदा हलवणारे किंवा कानात काड्या घालून तल्लीन कान कोरणारे महाभाग तुम्ही पाहिले असतील. कान कोरडा पडला २ थोडीफार खाज येऊ शकते. ही खाज आपोआपच कमी होते; परंतु कानाच्या रोगांमध्ये मात्र खाज सारखीच येत राहते व उपचार केल्याशिवाय कमी होत नाही. पावसाळ्यात, दमट वातावरणात किंवा पोहणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्णपथात (Auditory canal) बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. अॅस्परजीलस, नायगर व कँडीडा अल्बीकन्स या बुरशींमुळे होणाऱ्या संसर्गात कान खाजतात व बहिरेपणाही येतो. कानाची तपासणी केल्यास कर्णपथात काळपट वा विटकरी काळपट रंगाची घाण जमा झालेली दिसते. ओल्या वर्तमानपत्राच्या बोळ्यासारखा रंग त्या घाणीला येतो.


कानातील घाण वारंवार काढून टाकणे, पुसून घेणे, सॅलीसिलिक अॅसिड कर्णपथात लावणे, निस्टॅटीनसारखे बुरशीनाशक वापरणे अशा विविध उपायांनी हा रोग पूर्णपणे आटोक्यात येतो. कानावर अॅलर्जीमुळे किंवा जंतूसंसर्गामुळे फोड आले, तरीही कान सुरुवातीच्या काळात अथवा फोड फुटून खपली येण्याच्या काळात खाजतात. यावर अॅलर्जी व जंतुसंसर्गावरील उपचार करावे लागतात.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

ताराबाई मोडक यांची पुण्यतिथी

 ***********************************

*३१ ऑगस्ट - बालशिक्षणाची माता ताराबाई मोडक यांची पुण्यतिथी*

***********************************

📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝

जन्म - १९ एप्रिल १८९२ (मुंबई)

*स्मृती - ३१ ऑगस्ट १९७३*


बालशिक्षणाची माता ताराबाई मोडक यांची आज पुण्यतिथी.


ताराबाई मोडक या माहेरच्या ताराबाई केळकर.

आपल्या भारतभूमीत बालशिक्षणाची माता म्हणवून घेण्याचा गौरव पद्मभूषण स्व.ताराबाई मोडक यांनी प्राप्त केला. १९२३ मध्ये गिजुभाई बधेका यांच्या साहाय्याने भावनगर येथे montysarichya तत्वावर आधारलेली शिक्षणपद्धती त्यांनी निश्चित केली. 


मुलांच्या बालवयातच शिक्षणाचा खरा पाया घातला जाण्याची शक्यता व आवश्यकता  असते. यादृष्टीने त्यांनी पूर्वप्राथमिक विभागात शिक्षणात नवीन पाऊल टाकले. १९२६ साली नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. या संस्थेने पुढे पूर्व प्राथमिक अध्यापन मंदिर सुरु केले. यातून मराठी आणि गुजराती दोन्ही भाषांच्या हजाराहून अधिक शिक्षक शिक्षकांचे प्रशिक्षण केले. मराठी शिक्षणपत्रिका त्यांनीच सुरु केली. 


ताराबाईनी १९३३ जूनचा शिक्षणपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित केला. तत्पूर्वी त्या गुजराती शिक्षण पत्रिकेत १० वर्षे लिहित होत्या. बालकांसाठी त्यांनी विपुल लेखन लिहिले. परंतु पालक शिक्षक यांच्या साठीही विपुल लिहिले.१९४५ मध्ये ताराबाईनी बोर्डी (जि.ठाणे) येथे ग्राम बाल शिक्षा केंद्र स्थापिले. आदिवासी मुलांच्या अडचणी लक्षात घेवून त्यांनी १९५३ मध्ये नवीन उपक्रम सुरु केला. 


१९५७ मध्ये बोर्डी येथील ग्राम बालशिक्षा केंद्र कोसबाड येथे  हलविण्यात आले. येथे आदिवासी मुलांसाठी कुरणशाळा, रात्रीची शाळा ,व्यवसाय शिक्षण हे पूरक प्रकार प्राथमिक स्वरुपात सुरु करण्यात आले. १९६२ मध्ये त्यांना भारत सरकारने त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल पद्मभूषण हा किताब देवून गौरविले. आजही महाराष्ट्रात त्यांचे कार्य ग्राम शिक्षा केंद्र विकासवाडी, कोसबाडहिल जि.ठाणे येथे चालू आहे. ताराबाईच्या पश्चात स्व. अनुताई वाघ यांनी कार्य प्रज्वलित ठेवले. 


मा.ताराबाई मोडक यांचे निधन ३१ ऑगस्ट १९७३ रोजी झाले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

***********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,कृष्ण पक्ष, *नवमी*,रोहिणी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, ३१ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अष्टौ गुणा: पुरुषं दीपयन्ति

           प्रज्ञासुशीलत्वदमौ श्रुतं च,

 पराक्रमश्चा बहुभाषिता च

          दानं यथाशक्ति कृतज्ञता च॥


*भावार्थः - आठ गुण पुरुष को सुशोभित करते हैं - तीक्ष्ण बुद्धि, उत्कृष्ट चरित्र, आत्म-नियंत्रण, शास्त्र-अध्ययन, साहस, कई भाषाओं का ज्ञान, यथाशक्ति दान और कृतज्ञता।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

बाळाची वाढ


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 



══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *बाळाची वाढ व विकास व्यवस्थित आहे वा नाही, हे कसे ओळखावे ?* 


बन्याचदा आईवडिलांना आपल्या मुलाच्या वाढीविषयी चिंता वाटत असते तो नीट खात नाही वा अमुकच करतो, अशा तक्रारी ते करत असतात. मुलाची वाढ व विकास व्यवस्थित आहे वा नाही, हे कसे ओळखायचे? हा पालकांपुढील महत्त्वाचा प्रश्न असतो. ५ वर्षापर्यंतच्या वयाच्या मुलाच्या वाढीचा त्याचे वजन हा उत्तम निदर्शक असतो. "Road to health" नावाचे तक्ते उपलब्ध असतात. यात दर महिन्याला मुलाचे वजन नोंदवण्याची सोय असते. मुलांच्या अपेक्षित वजनाच्या हिशोबाने तक्त्यावर एक 'आरोग्य पथ' दाखवलेला असतो. आपल्या बाळाचे वजन त्या आरोग्य पथावर असेल तर मुलाची वाढ चांगली आहे, असे समजावे. हा तक्ता असा असतो.


मुलाचा विकास योग्य आहे वा नाही, हे खालील निकषांवरून तपासून पाहता येईल. 


तीन महिने - आईकडे बघून ओळखीचे हसते.


चार महिने - मान पूर्णपणे सावरू शकते.


सहा-सात महिने - बसायला लागते.


नऊ ते दहा महिने - रांगायला लागते.


पंधरा महिने - बाबा, दादा असे बोलू लागते.


अडीच वर्षे - स्वतंत्रपणे चालू लागते. संडासवर नियंत्रण येते.


दोन ते अडीच वर्षे - छोटी वाक्य बोलते.


तीन ते साडेतीन वर्षे - लघवीवर नियंत्रण येते.


या विकासाच्या टप्यांवरून मूल योग्य प्रकारे वाढते आहे वा नाही, हे तपासता येईल. अर्थात वाढ व विकास यात मुलामुलांमध्ये थोडाफार फरक पडू शकतो, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या मुलामध्ये विकासाचे सर्वच


टप्पे उशीरा गाठले जात असतील, तर मात्र संपूर्ण तपासण्या करून घेणे गरजेचे आहे.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

 

सिझेरीयन म्हणजे काय?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *सिझेरियन म्हणजे काय* 📕


"सिझेरीयन झाले शेवटी", "सिझेरीयनशिवाय गत्यंतर नाही, असे डॉक्टर म्हणाले" अशी वाक्ये मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये वारंवार ऐकू येतात. बाळंतपणासाठी गेलेली स्त्री सात-आठ दिवस बिछान्यावर पडून असते. नंतर टाके काढल्यानंतर तिला घरी जाऊ देतात. एकूण सिझेरीयन व बाळंतपण यांचा संबंध आहे, हे आपल्या लक्षात आले असेल.


९५% प्रसूती नैसर्गिकरित्या होतात. म्हणजेच मातेच्या योनीमार्गातून बाळ बाहेर येते. काही वेळा मात्र योनीमार्गातून बाळ बाहेर येणे शक्य नसते. बाळाचे डोके मोठे असते वा मातेच्या कमरेच्या हाडांच्या ज्या पोकळीतून बाळ बाहेर येते ती पोकळी खूप लहान असते. कधी माता बाळंतपणाच्या कळा घेऊ शकत नाही. कधी तिचे पूर्वी सिझेरीयन झालेले असते. या सर्व कारणांमुळे योनीमार्गातून मुलाचा नैसर्गिकरित्या जन्म न होता ते पोटातून काढावे लागते. प्रथम ओटीपोटीवर छेद घेऊन नंतर गर्भाशयाचा छेद घेतल्यानंतर काही क्षणांतच बाळ बाहेर काढले जाते. एकदा मूल बाहेर आले की, मग त्याची काळजी नैसर्गिकरित्या जन्माला आलेल्या मुलाप्रमाणेच घेतली जाते.


आजकाल सिझेरीयनचे प्रमाण वाढत चाललेले दिसते. डॉक्टरी व्यवसायातील धंदेवाईकपणा, हे याचे एक कारण असले तरी, वेदना सहन न करण्याकडे असलेला आधुनिक स्त्रियांचा कल, पूर्वीसारखी घरगुती कामे (बसून कपडे धुणे, सारवणे आणि बरीच इतर शारीरिक कष्टाची कामे) करावी न लागल्याने कमी होऊ लागलेली गर्भाशयाच्या स्नायूंची शक्ती ही कारणे देखील दुर्लक्षण्याजोगी नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा स्त्रिया स्वतः होऊनच सिझेरीयन करायची विनंती डॉक्टरांना करतात. वेदनेशिवाय, कळांशिवाय मातृत्व ही कल्पनाच करणे योग्य नाही. सिझेरीयनचे दुष्परिणामही होऊ शकतात. ही शस्त्रक्रिया असल्याने भूल देण्यातील धोके, शस्त्रक्रियेत होणारे उपद्रव, जंतु संसर्गाची भीती असतेच. शिवाय साध्या बाळंतपणापेक्षा खर्चही ५-६ पट अधिक येतो.


बाळाला दूध पाजणेही ४-६ तास (स्त्री शुद्धीवर येईपर्यंत) उशीरा सुरू होते. तसेच एकदा सिझेरीयन झाले की, बरेचदा पुढच्या बाळाच्या वेळीही सिझेरीयनच करावे लागते. या सर्व बाबी लक्षात घेता मातांनी सहनशीलता दाखवून, सिझेरीयन टाळता येईल तेवढे टाळण्याचा प्रयत्न करावा.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

  

लाँर्ड माउंटबँटन यांची आज स्मृतिदिन

 *************************************

*२७ ऑगस्ट - लॉर्ड माउंटबॅटन स्मृतिदिन*

**************************************


जन्म - २५ जून १९०० (UK)

*स्मृती - २७ ऑगस्ट १९७९* (आयर्लंड)


लॉर्ड माउंटबॅटनच्या कार्यकाळादरम्यान १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पुढील एक वर्ष तो भारतीय अधिराज्याचा पहिला गव्हर्नर-जनरल होता.


लॉर्ड  माउंटबॅटन हा भारतातील शेवटचा ब्रिटिश व्हॉइसरॉय आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. त्यांचे पूर्ण नाव लूई फ्रान्सिस ॲल्बर्ट व्हिक्टर निकोलस ऑफ बॅटनबर्ग.


लॉर्ड माउंटबॅटन हा प्रिन्स लूई ऑफ बॅटनबर्ग (१८५१–१९२४) यांचा धाकटा मुलगा. प्रिन्स लूई १८६२ पासून ब्रिटिश नौदलामध्ये होते. स्वकर्तृत्वावर त्यांनी डिसेंबर १९१२ मध्ये ब्रिटिश नौदलामध्ये प्रमुखपद मिळविले पहिल्या महायुद्धाला तोंड फुटल्यानंतर ब्रिटिश नौदलाला पुरेसे यश मिळविता आले नाही. त्यामुळे प्रिन्स लूई यांच्यावर टीका होऊ लागली. बॅटनबर्ग ह्या जर्मन नावामुळे आणि लहानपण ऑस्ट्रियामध्ये गेलेले असल्यामुळे त्यांच्या राष्ट्रप्रेमा विषयी शंका घेतली जाऊ लागली. म्हणून ऑक्टोबर १९१४ मध्ये त्यांना नौदलप्रमुखपद सोडावे लागले. जर्मन द्वेषाची ही लाट पुढेही टिकून राहिल्याने राजाने आणि राजघराण्याशी संबंधितांनी आपली जर्मन नावे बदलावीत, असे शासनाने १९१७ मध्ये सुचविले. प्रिन्स लूई यांनी व्हिक्टोरिया राणीच्या नातीशी विवाह केल्यामुळे १९१७ मध्ये ते माउंटबॅटन बनले.


लूई (डिकी) माउंटबॅटन वयाच्या तेराव्या वर्षीच ऑझ्‌बर्न येथील रॉयल नेव्हल कॉलेजात दाखल झाले. जुलै १९१६ मध्ये त्यांनी प्रत्यक्ष नौदलात कॅडेट म्हणून प्रवेश केला. पुढे नौदलात त्यांना जे जे पद मिळाले, त्यावर आपल्या स्वकर्तृत्वाचा ठसा उमटविला. मुख्यतः नौदलातील संदेशवहन आणि दूरसंदेश ह्यांचा त्यांनी विशेष अभ्यास केला. दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा ‘केली’ (Kelly) ह्या जहाजाचा कॅप्टन म्हणून माउंटबॅटन काम पहात असत. युद्धात ते जहाज निकामी झाल्यानंतर काही काळ त्यांनी इलस्ट्रियस ही विमानवाहू नौका सांभाळली. येथून पुढे त्यांच्या उत्कर्षाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.


पंतप्रधान विन्स्टन चर्चिल ह्यांनी १९४१ मध्ये तिन्ही सेनादलांच्या संयुक्त हालचालींचे सूत्रधार म्हणून माउंटबॅटनना नेमले. ह्या काळात यूरोपातील त्यांच्या कर्तृत्वाचा आणि संघटना-कौशल्याचा प्रभाव अमेरिकेचे अध्यक्ष फ्रॅन्क्लिन रुझव्हेल्ट यांच्यावर पडला. त्यामुळेच पुढे १९४३ मध्ये दक्षिणपूर्व (आग्नेय) आशियामधील दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने सुप्रीम कमांडर म्हणून माउंटबॅटन यांची नेमणूक केली. 


आग्नेय आशियामध्ये दोस्त राष्ट्रांचे सैन्य सगळीकडे पराभूत होत होते. त्यावेळी माउंटबॅटननी सैन्यामध्ये विश्वास निर्माण करून त्याचे धैर्य वाढविले. त्याच प्रमाणे भर पावसाळ्यात ब्रह्मदेशात जपानच्या सैन्याशी मुकाबला करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबविली. त्यामुळे आग्नेय आशियातील दोस्त राष्ट्रांच्या सैन्याची प्रतिमा खूपच उंचावली. मात्र ह्या युद्धात निर्णायक विजय मिळविण्याची त्यांची योजना पूर्ण झाली नाही कारण दोस्त राष्ट्रांनी अणुबॉम्बचा वापर करून युद्ध संपविण्याचा निर्णय घेतला. तरीही सिंगापूरमध्ये जपानी सैन्याची शरणागती माउंटबॅटननीच स्वीकारली. 


यशस्वी सेनानी म्हणून त्यांनी स्वतःचा ठसा उमटविला. त्याचबरोबर बह्मदेश, सिंगापूर आणि इतर प्रदेशांच्या रहिवाशांशीही त्यांनी चांगले संबंध निर्माण केले. पश्चिमी साम्राज्यशाहीखाली असलेल्या देशांमध्ये युद्धानंतर राष्ट्रवादाला निर्णायक रूप आले आणि तेथील राष्ट्रवादी चळवळी प्रखर बनल्या. या चळवळींकडे पाहण्याचा माउंटबॅटन यांचा दृष्टिकोन उदार आणि समंजस होता. १९२० ते १९४५ या कालखंडात भारतात राष्ट्रवादी आंदोलन देशव्यापी झाले.


माउंटबॅटन यांच्या या उदार दृष्टिकोणामुळे महायुद्धानंतर निवडून आलेल्या क्लेमंट ॲटलींच्या मजूर पक्षाच्या शासनाने माउंटबॅटनना भारताचे व्हाइसरॉय म्हणून पाठविण्याचा निर्णय १९४७ मध्ये घेतला. सेनानी म्हणून यशस्वी ठरलेल्या माउंटबॅटनवर शासनप्रमुख होण्याची आणि भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणण्याची जबाबदारी पडली. 


मार्च १९४७ मध्ये माउंटबॅटन भारतात आले. ह्यावेळेस भारतातील परिस्थिती अत्यंत स्फोटक होती. हिंदु-मुस्लिम तणावांनी अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले होते. नौदलाचे बंड (१९४६), भारत छोडो आंदोलन आणि दुसऱ्या महायुद्धाचा ब्रिटनला बसलेला फटका यांमुळे भारतावर फार काळ नियंत्रण ठेवणे शक्य नाही, ह्याची जाणीव मजूर पक्षाच्या शासनाला झाली होती. म्हणूनच स्टॅफर्ड क्रिप्स-योजना व त्रिमंत्रि-योजना अयशस्वी झाल्यानंतरही ब्रिटिशांनी भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. माउंटबॅटन यांनी भारतातील जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ॲटलींच्या मागे लागून जून १९४८ पूर्वी स्वातंत्र्य देण्यात येईल, अशी घोषणा करवून घेतली.


प्रत्यक्षात स्टॅफर्ड क्रिप्स यांची आणि नंतरची त्रिमंत्रि-योजना ह्यांच्यावरील चर्चेतून काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र येणे अशक्य आहे, हे स्पष्ट झाले होते आणि फाळणीची अपरिहार्यता बहुतेक काँग्रेसने स्वीकारली होती. माउंटबॅटन यांनी प्रत्येक नेत्याशी स्वतंत्रपणे प्रदीर्घ चर्चा करून जवळजवळ सर्वच नेत्यांचा विश्वास संपादन केला. 


आकर्षक व्यक्तिमत्त्व, थंड डोक्याने युक्तिवाद करण्याची शैली, भारताच्या प्रश्नाबद्दलची कळकळ आणि इतर कोणत्याही व्हॉइसरॉयच्या तुलनेने माउंटबॅटन यांना मिळालेले विशेष अधिकार, यांमुळे त्यांना झटपट निर्णय घेणे शक्य झाले. 


भारतातील चिघळणारी परिस्थिती लक्षात घेऊन ३ जून १९४७ रोजी त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. इतक्या अल्प-मुदतीचे दडपण आल्याने काँग्रेस आणि लीगच्या नेत्यांना फाळणीच्या योजनेबद्दल शब्द फिरविता येणार नाही, अशी त्यांची अटकळ होती. फाळणी अटळ आहे, असे मत बनल्यानंतर अत्यंत धूर्तपणे, मुत्सद्देगिरीने आणि कार्यक्षम रीतीने त्यांनी संपूर्ण योजना राबवून १४ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र पाकिस्तान आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारत जाहीर करून सत्तांतर घडवून आणले. हे करीत असतानाच दोन्ही स्वतंत्र राष्ट्रे ब्रिटिश राष्ट्रकुलातच रहावीत, ह्यासाठी त्यांनी यशस्वीपणे प्रयत्न केले.


काँग्रेस नेत्यांचा त्यांनी एवढा विश्वास संपादन केला, की स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून काम पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकली गेली (ऑगस्ट १९४७ - जून १९४८). भारताच्या फाळणीबद्दल माउंटबॅटन ह्यांची भूमिका नंतर वादाचा विषय झाली असली, तरी त्यांचे भारताविषयीचे प्रेम वादातीत होते. प्रत्यक्ष फाळणीचा अप्रिय निर्णय त्यांनी अत्यंत कौशल्याने राबविला. तो राबवीत असताना ब्रिटिशांच्या हितसंबंधांना संरक्षण देण्याचे धोरणही त्यांनी कटाक्षाने पाळले.


भारतातून परत गेल्यानंतर १९४८ च्या जूनमध्ये ते पुन्हा नौदलाच्या सेवेत रुजू झाले. १९५२ ते १९५५ ह्या काळात ते भूमध्य समुद्राच्या क्षेत्रातील नाटोच्या नौदलाचे कमांडर इन्-चीफ होते. १९५५ मध्ये ते ब्रिटिश नौदलाचे प्रमुख (फर्स्ट सी लॉर्ड) बनले. १९५९ ते १९६५ पर्यंत संरक्षण विभागाचे प्रमुख (चीन ऑफ डिफेन्स स्टाफ) ह्या नात्याने तिन्ही सैन्य दलांच्या सुसूत्रीकरणाची फार महत्त्वाची कामगिरी त्यांनी पार पाडली आणि मग ते सेवानिवृत्त झाले.


माउंटबॅटन यांना राजघराण्याशी असलेल्या आपल्या नात्याचा फार अभिमान होता. देखण्या व्यक्तिमत्त्वाच्या माउंटबॅटन ह्यांचा विवाह १९२२ मध्ये एड्‌विना ॲश्ली (१९०१-६०) ह्या श्रीमंत आणि सौंदर्यसंपन्न युवतीबरोबर झाला होता. माउंटबॅटन आणि एड्‌विना दोघेही त्याकाळी त्यांच्या उदार, काहीशा डावीकडे झुकलेल्या विचारांबद्दल प्रसिद्ध होते. प्रत्यक्षात त्यांचा विचार आणि कार्य दोन्ही जहाल किंवा समाजवादी नव्हे तर मानवतावादी स्वरूपाचे होते. 


माउंटबॅटन दांपत्य आणि पाट्रिशिया व पॅमेला ह्या त्यांच्या मुली. ह्यांनी भारतीय जनतेला आपलेसे करून टाकले होते. सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचा त्यांचा गुण हेच त्याचे मुख्य कारण. भारतात असताना लेडी एड्‌विना माउंटबॅटन व जवाहरलाल नेहरू यांच्यात अत्यंत उत्कट प्रेमसंबंध निर्माण झाला. माउंटबॅटन यांच्या चरित्रात या प्रणयाचा निर्देश सापडतो. 


पत्नीच्या मृत्यूनंतर आणि निवृत्तीनंतर काहीसे शांत आणि एकाकी जीवन कंठणाऱ्या माउंटबॅटनंना आयर्लंडमधील त्यांच्या डोनेगल उपसागरातील घराजवळ मासेमारी बोटीमध्ये आयरिश दहतशतवाद्यांनी ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटामध्ये मृत्यू आला.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

*************************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,कृष्ण पक्ष, *पँचमी*,अश्विनी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, २७ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"कोई आहार में विष घोल दे तो उसका उपचार सम्भव है, किन्तु कोई विचार में विष घोल दे तो उसका उपचार सम्भव नहीं।*

*वातावरण में प्रदूषण का उपचार सम्भव है किंतु वैचारिक प्रदूषण का कोई उपचार नही।*

*अतः जहाँ भी कुत्सित अथवा दूषित विचारधारा दिखाई दे, उस स्थान एवं व्यक्ति से दूरी ही श्रेष्ठ है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

जेम्स वँटस संशोधक

*************************************

*२५ ऑगस्ट - संशोधक जेम्स वॅट स्मृतिदिन*

*************************************

🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂

जन्म - ३० जानेवारी १७३६

स्मृती - २५ ऑगस्ट १८१९


*वाफेवर चालणार्‍या आगगाडीचा जनक*

🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂

जेम्स वॅट हे स्कॉटिश संशोधक व उपकरणनिर्माते होते. त्‍यांच्या वडिलांचा जहाजबांधणीचा व बांधकामाचा व्यवसाय होता आणि त्यांची एक कार्यशाळा होती. जेम्स अशक्त असल्याने त्याचे आधीचे शिक्षण घरीच झाले. नंतर शाळेत जाऊन त्यांनी लॅटिन, ग्रीक व गणित या विषयांचे अध्ययन केले.


त्यांना यंत्रोपकरणात विशेष रुची असल्याने त्यांचे खरे शिक्षण वडिलांच्या कार्यशाळेत झाले. तेथे त्यांनी स्वतः यारीसारख्या यंत्राच्या प्रतिकृती बनविल्या; तसेच जहाजावरच्या उपकरणांची माहिती करून घेतली. आधीच्या इजिनात मूलभूत स्वरूपाच्या सुधारणा करून त्यांनी बनविलेले वाफेचे इंजिन हे शक्तिनिर्माणाचे साधन म्हणून सर्वत्र वापरले जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातील हे सर्वांत महत्त्वाचे साधन ठरले.


वॅट यांनी त्यानंतर ग्लासगो व लंडन येथे वैज्ञानिक (गणितीय) उपकरणांच्या निर्मितीविषयीचे प्रशिक्षण घेतले. त्या काळी मुख्यतः सर्वेक्षण व मार्गनिर्देशन यांकरिता लागणारी उपकरणे बनवीत असत. १७५७ साली ग्लासगोला परत आल्यावर वैज्ञानिक उपकरणनिर्माते म्हणून त्यांनी ग्लासगो विद्यापीठात काम करण्यास सुरुवात केली. तेथे असताना त्यांनी चतुर्थ यंत्र, होकायंत्र, दाबमापक इत्यादी उपकरणे तयार केली. या काळात त्यांचा अनेक वैज्ञानिकांशी परिचय झाला. पैकी जोसेफ ब्लॅक यांच्याबरोबर त्यांची मैत्री जमली व त्या मैत्रीचा त्यांना वाफेच्या इंजिनात सुधारणा करण्याच्या दृष्टीने खूप उपयोग झाला.


वाफेवर चालणार्‍या आगगाडीचा जनक म्हणून जेम्स वॅट यांना ओळखले जाते. जेम्स वॅट लहानपणी अतिशय आळशी होता, असे त्याच्या न बोलण्यामुळे तरी वाटत होते. तो स्वयंपाकघरात त्याच्या आत्या बरोबर बसलेला असताना, विस्तवावर एका किटलीमध्ये पाणी उकळत होते. त्या पाण्याची वाफ किटलीच्या तोंडातून बाहेर पडत होती. जेम्स त्या वाफेवर एकदा कप व एकदा चमचा धरत होता व तो कप व चमचा वाफेच्या जोराने कसा खालीवर होतो, याचे निरीक्षण करत होता. 


त्याच्या आळशीपणाबद्दल त्याची आत्या नेहमीच कानउघाडणी करत असे. एकदा योगायोगाने जेम्सच्या कॉलेजच्या प्रयोगशाळेतील न्यूमनचे मॉडेल इंजिन जेम्सकडे दुरुस्तीला आले. इंजिन दुरुस्त करताना जेम्सच्या लक्षात आले, की हे इंजिन फक्त थोडाच वेळ काम देण्याच्या योग्यतेचे आहे. विचार केल्यावर त्याच्या ध्यानात आले, की न्यूमनचा बॉयलर फार लहान आहे. ज्यात दट्ट्या असतो त्या सिलिंडराच्या घनफळाच्या ३-४ पट वाफ असली, तरच तिच्यामार्फत दट्ट्या सिलिंडराच्या टोकापर्यंत लोटला जाऊ शकेल, असे त्यांना दिसून आले. अशा रीतीने या इंजिनात वाफ मोठ्या प्रमाणात वाया जाते, हे त्यांच्या लक्षात आले. 


न्यूमनच्या इंजिनमधील खाली-वर होणारा दांडा (दट्ट्या) जेव्हा खाली ओढला जाई, तेव्हा त्या सिलिंडरमधील पंपरॉड (दांडा) वर उचलला जाई. जेम्सने एका सिलिंडरमधील वाफ पंपाने दुसर्‍या सिलिंडरमध्ये नेऊन त्या सिलिंडरवर गार पाण्याचा मारा केला व त्या वाफेचे बाष्पीभवन करून, पोकळी निर्माण करायची असे ठरवले. त्यामुळे खर्च व वेळ वाचला. दोन सिलिंडरमध्ये त्याने एअरपंप बसवला. पुढे जेम्सने या इंजिनमध्ये पुष्कळ सुधारणा केल्या.


न्यूमनच्या इंजिनातील दोषांवर उपाय शोधताना जेम्सला अचानकपणे इंजिनाला स्वतंत्र असा संघनक (वाफेचे द्रवात-पाण्यात-रूपांतर करणारे साधन) जोडण्याची कल्पना सुचली व हा त्यांचा पहिला व सर्वांत महत्त्वाचा शोध ठरला. सिलिंडरात वाफेचे पाण्यात रूपांतर होताना जी सुप्त उष्णता लागते ती वाया जाणे हा न्यूमन इंजिनाचा सर्वांत मोठा दोष असल्याचे त्यांच्या ध्यानी आले होते. म्हणून वाफेच्या संघननाचे काम सिलिंडराऐवजी त्याला जोडलेल्या पण त्यापासून अलग असलेल्या कक्षात करण्याचे त्यांनी ठरविले. 


सिलिंडरातून बाहेर पडणारी वाफ सिलिंडरात नेऊन तेथे तिचे संघनन होते. यामुळे सिलिंडरात पाण्याच्या फवार्‍याने संघनन करताना सिलिंडर व दट्ट्या थंड होत असे आणि ते परत तापविण्याकरिता वारंवार जादा उष्णता लागते असे. संघनकामुळे ही उष्णता वाचते. याशिवाय सिलिंडर व दट्ट्या गरम राहण्यासाठी त्यांनी सिलिंडराभोवती आवेष्टन घालून त्यात वाफ सोडण्याची व्यवस्था केली. यामुळे उष्णतेची व पर्यायाने इंधनाची बचत होऊन इंजिन अधिक कार्यक्षम झाले. अशा रीतीने त्यांनी वाफ एंजिनात मूलभूत सुधारणा केल्या. मात्र वाफ एंजिनाचा शोध त्यांनी लावला हा लोकप्रिय (प्रचलित) समज चुकीचा आहे. कारण त्यांच्या जन्माच्या वेळीही वाफ एंजिने खाणीतील पाणी उपसण्यासाठी वापरात होती. 


वॅट यांच्या सुधारणांमुळे वाफ इंजिन चालवायला सोपे झाले; ते अधिक खात्रीशीर रीतीने वापरता येऊ लागले व अधिक शक्तिशाली वाफ इंजिने बनविता येऊ लागली. यामुळे कागद गिरण्या, कापड गिरण्या, पिठाच्या गिरण्या, लोखंडाचे कारखाने, भट्‌ट्या, पाणीपुरवठा इ. असंख्य ठिकाणी त्याचा उपयोग होऊ लागला. व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या या इंजिनाचे औद्योगिक क्रांतीला चांगलीच चालना मिळाली.


वॅट यांनी जॉन रोबक यांच्याबरोबर वाफेची इंजिने बनविण्याचा व्यवसाय भागीदारीत सुरू केला (१७६८) आणि १७६९ साली त्यांनी या एंजिनाचे पेटंट घेतले. मात्र या धंद्यात त्यांना विशेष यश मिळाले नाही. दरम्यान अर्थार्जनासाठी त्यांनी चष्म्याच्या व्यापाऱ्या कडील नोकरी, कालव्यांचे सर्वेक्षण व खोदकाम, बंदरांतील सुधारणा वगैरे कामे केली. या कामांना कंटाळून ते १७७४ साली बर्मिगहॅमला गेले व तेथे त्यांनी मॅथ्यू बोल्टन यांच्या भागीदारीत नव्याने वाफ एंजिने बनविण्याचा उद्योग सुरू केला. त्यांची ही भागीदारी २५ वर्षे टिकली व उद्योग भरभराटीला आला. १७७६ साली त्यांनी दोन वाफ एंजिने उभारली. पैकी एक दगडी कोळशाच्या खाणीत व दुसरे लोखंडाच्या कारखान्यात उभारले. यामुळे वाफ एंजिनांना मागणी वाढली व धंद्याला ऊर्जितावस्था प्राप्त झाली.


पुढील पाच वर्षे म्हणजे १७८१ सालापर्यंत त्यांनी तांब्याच्या व कथिलाच्या खाणीतील पाणी उपसण्यासाठी असंख्य वाफ एंजिने उभारून त्यांच्या देखभालीचे काम केले. खाणव्यवस्थापकांना इंधनाच्या खर्चात बचत व्हावी असे वाटत होते. तसेच अन्य क्षेत्रांतूनही या एंजिनाला मोठी मागणी येण्याची चिन्हे दिसू लागली होती. म्हणून बोल्टन यांनी वॉट यांना एंजिनातील दट्ट्याच्या पश्चाग्र (पुढे-मागे होणार्‍या) गतीचे भुजादंडाच्या परिभ्रमी म्हणजे फिरत्या गतीत परिवर्तन करण्याची विनंती केली. वॉट यांनी हे काम १७८१ साली यशस्वीपणे साध्य केले. त्याकरिता त्यांनी तथाकथित ‘सूर्य व ग्रह दंतचक्र’ ही योजना केली. त्यामुळे एंजिनाच्या एका आवर्तनात भुजादंडाचे दोन फेरे होतात. १७८२ साली त्यांनी द्विक्रिय एंजिनाचे पेटंट घेतले. या एंजिनात दांडा रेटला व ओढलाही जातो. यासाठी दंड व दट्ट्या नव्या पद्धतीने दृढपणे जोडले जाणे आवश्यक होते. ही समस्या त्यांनी १७८४ साली समांतर गतीचा आपला शोध वापरून सोडविली. या दट्ट्याचा दांडा लंब दिशेत हालेल अशा रीतीने संयोगदांड्यांची मांडणी केली. बोल्टन यांच्या सूचनेवरून १७८८ साली वॉट यांनी एंजिनाची गती स्वयंचलितपणे नियंत्रित करणारा केंद्रोत्सारी गतिनियंता शोधून काढला व १७९० साली त्यांनी दाबमापक शोधला. यामुळे वॅट एंजिन जवळजवळ परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचले होते.


एंजिनाची शक्ती मोजण्यासाठी त्यांनी त्याची घोड्याच्या शक्तीशी तुलना केली. अशा प्रकारे हॉर्स पॉवर (अश्वशक्ती) ही संज्ञा प्रचारात आली. त्यानंतर एक अश्वशक्ती म्हणजे १ मिनिटात ३३,००० पौंड वजन १ फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती हे मूल्य निश्चित केले. दाबमापकाने एंजिनाची अश्वशक्ती मोजीत व अश्वशक्तीनुसार एंजिनाची किंमत ठरवीत.


वाफ एंजिनाशिवाय अभियांत्रिकी व रसायनशास्त्र या विषयांतही त्यांनी संशोधन केले होते आणि त्यांना भाषा व संगीत यांतही रस होता. त्यांचे काही महत्त्वाचे संशोधन पुढीलप्रमाणे आहे. 


आपले कार्यालय उबदार ठेवण्यासाठी त्यांनी वाफेच्या वेटोळ्यांचा वापर केला होता (१७८४). इंधनाची बचत करणारी भट्टी, दाब देऊन मजकुराच्या प्रती काढावयाचे यंत्र व प्रतिलिपी शाई, शिल्पाची (पुतळ्याची) पुनःनिर्मिती करणारे यंत्र, अम्लतेची चाचणी घेणारे दर्शक, नियामक झडप, क्लोरीनचा वापर करून विरंजन (रंग घालविण्याची क्रिया) करण्याचे तंत्र वगैरे त्यांचे शोध महत्त्वाचे आहेत. शिवाय पाणी हे मूलद्रव्य नसून संयुग आहे, असे सुचविणारे ते एक पहिले संशोधक होते. ग्लासगो वॉटर कंपनीचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले होते. विज्ञान व कला यांचा प्रसार करणार्‍या लूनर सोसायटीचे ते सदस्य होते.


वॅट यांना त्यांच्या संशोधनकार्याबद्दल पुढील अनेक मानसन्मान मिळाले होते. एडिंबरो व लंडन (१७८५) येथील रॉयल सोसायटीचे सदस्यत्व, ग्लासगो विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी (१८०६), फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सदस्यत्व वगैरे. त्यांना जहागिरी देऊ करण्यात आली होती; पण ती त्यांनी स्वीकारली नाही. त्यांच्या सन्मानार्थ शक्तीच्या एककाला वॉट (वॅट) हे नाव देण्यात आले असून वेस्ट मिन्स्टर ॲबे येथे त्यांचा पुतळा उभारला आहे. त्यांचा एक मुलगा (जेम्स) सागरी अभियंता होता व त्याने जहाजाकरिता वाफ एंजिनाचा वापर केला होता.


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

***********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,कृष्ण पक्ष, *तृतीय*,उ.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २५ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"धर्म में ही भारत की जीवन शक्ति निहित है और जब तक यह हिन्दू जाति अपने पूर्वजों की इस विरासत को नही भूलती, तब तक विश्व की कोई भी  शक्ति इसका विनाश नहीं कर सकती।”*


              *- स्वामी विवेकानन्द*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

HIV म्हणजे काय


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री.गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *एड्स म्हणजे काय ?* 📕


एड्स हा शब्द गेल्या काही वर्षांत वारंवार कानावर पडू लागलेला आहे. हा शब्द उच्चारताच एक भयंकर आजार, ज्याचा अंत केवळ मरणात आहे, आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. एड्स हा एक रोग आहे, हे तर आपल्यापैकी बऱ्याचजणांना एव्हाना माहीत झाले असेल. एड्सबद्दल आपण जास्त माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण आज नाही तरी अजून ५-१० वर्षांत आपल्या देशात भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांमध्ये एड्सचा समावेश नक्कीच झालेला असेल.


एड्स म्हणजे (AIDS) अॅक्वायर्ड अम्यूनो डेफिशियन्सी सिन्ड्रोम सर्वप्रथम १९८१ मध्ये अमेरिकेत ह्या रोगाचे निदान झाले. भारतात हा रोग १९८६ मध्ये आढळून आला. २००० पर्यंत भारतात एड्सचे काही हजार रुग्ण आहेत. एड्स हा विषाणूंमुळे होणार आजार आहे. या विषाणूंचे वैशिष्ट्य म्हणजे ते शरीराच्या रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने अनेक बुरशी संवर्गातील परजीवी जंतू, काही विषाणू व काही सामान्यतः मनुष्याला रोग न करणारे जिवाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात व रोग होतात. या रोगांना संधीसाधू सांसर्गिक रोग असे म्हणतात.


एड्सचे विषाणू शरीरात शिरल्यापासून एड्स होईपर्यंत अनेक वर्षे लोटतात. एड्सचे निदान करणाऱ्या एलाइझासारख्या तपासण्या एड्स विषाणूच्या शरीरात प्रवेशानंतर शरीराने दिलेल्या अँटीबॉडीजरूपी प्रतिसादावर अवलंबून असतात. त्यामुळे एच.आय.व्ही. पॉझिटीव्ह (शरीरात एड्सचे जंतू असलेली) व्यक्ती एड्सचा रुग्ण होईल वा नाही, वा केव्हा होईल, हे नक्की सांगता येत नाही. एड्सच्या लक्षणांत महिन्याभराहून जास्त काळ खोकला, शरीरभर लिंफ ग्रंथीची वाढ, त्वचेचे दाह, महिन्याभराहून जास्त काळ ताप, जुलाब, तसेच वजनात दहा टक्क्यांहून जास्त घट इत्यादींचा समावेश होतो.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...