रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

15 August indipedent day

 *********************************

  *१५ ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्य दिन*

**********************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*माझ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा....!*


  स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस.ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरात बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.


जुलमी ब्रिटिश राजवटीमधून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करून आपले आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य वीरांना सलाम करण्याचा हा दिवस आहे.


स्वातंत्र्यासाठीचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे होते तरी त्यामागचे ध्येय एकच होते आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य!  


इतके खडतर प्रयत्न करून हे स्वातंत्र्य मिळाले आहे. देशाची ही अखंडता व सार्वभौमत्व टिकविण्यासाठी आपली एकता कायम अशीच ठेऊया. 


भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो !


Happy Independence Day


*इतिहास :*


इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २०व्या शतकात महात्मा गांधी ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने 'चले जाओ' आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात काँग्रेसने 'संपूर्ण स्वराज्या'ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी ही तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली काँग्रेसने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्यासाठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे मुख्य प्रवाहापासून वेगळे झाले व त्यांनी 'ऑल इंडिया मुस्लिम लीग'ची स्थापना केली.


दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला.


*स्वतंत्र भारत :*


स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले 'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले 'वन्दे मातरम्' हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले.


*स्वातंत्र्य दिनाचा उत्सव :*


भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी भाषण देतात. या दिवशी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्यादिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.

*🇮🇳Happy Independence Day🇮🇳*

संकलन -)gajanan gopewad 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

********************************

15आँगष्ट राष्ट्रीय उत्सव

 #स्वातंत्र्य_म्हणजे_काय?


"स्व" व "तंत्र" या दोन शब्दांपासुन "स्वतंत्र" किंवा "स्वातंत्र्य" हे भाषिक व्याकरणात्मक शब्द तयार होतात.जे भावनावाचक आहेत."स्वत:च्या तंत्राने वागणे जगणे अाहार विहार विचार करणे म्हणजे स्वातंत्र्य." असा ढोबळमानाने अर्थ घेतला जातो.


"स्वांतत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव."


"ज्यामुळे इतरांना इजा पोहोचत नाही असे काहीही करण्याचे सामर्थ्य म्हणजे स्वातंत्र्य."

—फ्रेच राज्यक्रांतीच्या 'मानवी हक्कांचा जाहिरनामा'


"लोकांना स्वत:चा अधिकाधिक विकास साध्य करण्याची संधी प्राप्त करुन देणारे वातावरण असणे म्हणजे स्वातंत्र्य होय."

—प्रा.हेराॅल्ड लास्की


"मानशिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य!"

—डाॅ.बाबासाहेब आंबेडकर


"Liberty" या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ "स्वातंत्र्य" आहे.

मुळात "Liber" हा शब्द लॅटिन असुन यापासुन "Liberty" हा शब्द जागतिक मान्यता प्राप्त इंग्रजी शब्दरुप आहे.तर "Liber" या शब्दाचा अर्थ "मुक्ती सुटका सोडवणुक" असा नामवाचक आहे.तसेच "Liberty" या भाववाचक शब्दाचा अर्थ "बंधनापासुन मुक्ती" असा होतो.


चेंबर्सच्या शब्दकोशात स्वातंत्र्य या शब्दाचे संज्ञावाचक व संकल्पनात्मक अनेक अर्थ आहेत."बंधन गुलामगिरी जुलूमशाहीचा अभाव स्वत:च्या इच्छेनूसार कार्यरत राहणे कर्म करणे किंवा नैसर्गिक हक्कांचा अमर्याद उपभोग घेणे" असे ते अर्थ आहेत.


समाजशास्र व मानवी जीवनाचा नैसर्गिक संबंध असल्यामुळे समाजशास्रीयदृष्टीनेही स्वातंत्र्य या बाबद अभ्यास केला गेला आहे.समाजशास्रानेही या संकल्पनेला विविध अंगाने माप लावले आहे."व्यक्तीने किंवा व्यक्तीसमुहाने स्वत्वाचा पुरस्कार करणे किंवा स्वाभिमान मानने होय" किंवा "मानवी विकासासाठी विकासात्मक वातावरण" असा अर्थ व्याख्या समाजशास्रीय आहेत.


थोडक्यात सांगायचे म्हणजे "पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर दाद न्याय कुणाकडे मागायचा? यासारख्या भावनात्मक प्रश्नातुन या स्वातंत्र्याचा जन्म होतो.तसेच विदेशी ब्राम्हणी वैदिक सनातनी हिंदु धर्मातील ग्रंथात अस सांगितल गेल आहे की "न स्री स्वातंत्र्यमर्हति".

म्हणजे स्री ही मानवी प्राणी असुनही सर्व प्रकारे गुलाम दास आहे.ती भारतीय ब्राम्हणी समाज व्यवस्थेत आधी पुरुषाची गुलाम नंतर परिवरातील वरिष्ठांची वर्णाची जातीची गुलाम आहे.असा या संस्कृत श्लोकाच्या वेच्याचा अर्थ आहे.पण या बंधनातुन तिने बंधन मुक्त होवुन इतरांनाही बंधन मुक्तीच दर्शन घडवणे म्हणजेच स्वातंत्र्य होय.


पण भारतीय विदेशी ब्राम्हणी समाजव्यवस्थेत गुलामी व स्वातंत्र्य हि जगातील गुलामी व स्वातंत्र्या पेक्षा खुप भयानक व वेगळ्या स्वरुपाचे आहेत.जगातील गुलामी हि वांशिक शारिरीक व वर्णात्मक आहे.पण भारतीय गुलामी हि "मानशिक" आहे.तेच तिच मुळ आहे.म्हणजेच भारतीय गुलामीचा आधार हा मुख्यात: मानशिक आहे.त्यामुळे नुसत स्वातंत्र्य काहीच कामाच नाही.


म्हणुन भारतीय ब्राम्हणी समाज व्यवस्थेतुन बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवायच असेल तर प्रथम मानशिक स्वातंत्र्य मिळवणे आवश्यक आहे.तरच भारतीय बहुजन खर्या अर्थाने स्वतंत्र होईल.


पण तरीही भारतीय संविधानातुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी ते स्वातंत्र्य मिळवुन देण्याची कायदेशिर व न्यायालयीन पुर्तता करुन ठेवली आहे.त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब केला तरच भारतीय मुलनिवासी बहुजन समाज विदेशी ब्राम्हणांच्या गुलामीतुन स्वतंत्र झाल्याशिवाय राहणार नाही.


मग मुलनिवासी बहुजनांनो वरील कोणत स्वातंत्र्य भोगत आहात तुम्ही?तर तुम्ही ब्राम्हणी व्यवस्थेतेचे "मानशिक गुलाम" आहात.त्यामुळे तुम्ही याच पारतंत्र्यात जगत आहात.तुम्हाला जेव्हा "मानशिक स्वातंत्र्य" मिळेल तेव्हाच तुम्ही खर्या अर्थाने स्वतंत्र असताल ब्राम्हणांच्या गुलामीतुन.तेव्हाच तुम्हाला नैसर्गिक नागरी राजकिय सामाजिक आर्थिक व राष्र्टिय स्वातंत्र्य मिळेल.



जय मुलनिवासी

गजानन गोपेवाड 

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

प्रवास अखंड भारत

*🇮🇳 "प्रवास अखंड भारताचा" 🇮🇳*



*भाग १ : "अखंड भारत"*


 अखंड भारत हा भारतीयांसाठी हळवा विषय आहे. ज्या ज्या वेळी अखंड भारताविषयी आपण वाचतो, ऐकतो, पाहतो, त्यावेळी भारताच्या सीमा, वैभव, समृद्धी पाहून आम्हा भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येतो.


अखंड भारताच्या भौगोलिक सीमेत *अफगाणिस्तान पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, भूतान, नेपाळ, इंडोनेशिया, थायलँड, जावा, सुमात्रा, मलेशिया, व्हिएतनाम, इ.* देशांचा समावेश होता. या देशांमध्ये भारतीय संस्कृतीच्या खाणाखुणा अजून सुद्धा आपल्याला दिसतात. उदाहरण द्यायचे झाल्यास बँकाॕक (थायलंड) येथील एका विमानतळाचे नाव *सुवर्णभूमी* असे आहे. अफगाणिस्तानातील  बुद्ध मूर्तींची विटंबना तालिबान्यांनी काही वर्षांपूर्वी केलेली आपण जाणतोच. तत्कालीन अखंड भारताचे क्षेत्रफळ जवळपास ७८ लाख वर्ग कि.मी. एवढे होते. आज खंडित होऊन जवळपास ते ३३ लाख वर्ग कि.मी. एवढा राहिले आहे. अखंड भारताच्या सीमेचा उल्लेख विष्णूपुराणात सुद्धा सापडतो. 


राजकीय व्यवस्था तसेच व्यवस्थापनाच्या दृष्टीने अखंड भारत १६ जनपदांमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे राजे होते. काही साम्राज्ये खूप मोठी, तर काही अगदी छोटे होती. खूप मोठे साम्राज्य असलेला  राजा, हे राजांचे राजा. त्यांना सम्राट म्हटलं जायचे.


अखंड भारतातील राजांमध्ये आपापसात लढाया व्हायच्या का? तर त्याचे उत्तर "होय" असे देता येईल. स्वतःचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने राजे लढायांचा मार्ग सुद्धा अवलंबित. ज्यामुळे  नवीन राज्ये, साम्राज्ये निर्माण व्हायची, त्यांच्या सीमा वाढायच्या, कमी व्हायच्या, तसेच नष्ट व्हायच्या. परंतु अखंड भारताच्या सीमेला धक्का सुद्धा लागायचा नाही. ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्या काळात एक व्यवस्था होती. *अखंड भारताच्या सीमेचे रक्षण* करण्याची जबाबदारी ही सीमांत प्रदेशातील राज्यांवर असायची. बाह्य क्षेत्रातून आक्रमण व्हायचे, तेव्हा तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांवरती असायची. सीमांत प्रदेशातील राजांना सर्वजण सहाय्य करायचे. ह्या व्यवस्थेच्या कारणाने भारताच्या सीमा सुरक्षित राहिल्या होत्या.


अखंड भारतात *"राष्ट्र"* ही संकल्पना होती का ? तर काहीजण होती, तर काहीजण नव्हती असे म्हणतात. परंतु राष्ट्राची सर्वप्रथम संकल्पना ही *विष्णुगुप्त (चाणक्य)* यांनी मांडली असे म्हणतात. "राष्ट्रापेक्षा मोठे कोणीही नाही."  *"राष्ट्र प्रथम"* ही संकल्पना आर्य चाणक्याची.


अखंड भारतात वेगवेगळे राजे होते, सम्राट होते. त्यांच्या आपापसात लढाया व्हायच्या. तरीही भारत अखंड राहिला. कारण येथील सर्वांची धर्म, संस्कृती एक होती. त्याचबरोबर येथे ज्ञाननिर्मिती सुद्धा व्हायची. *गुरुकुल पद्धती* सोबतच मोठमोठी विद्यापीठे त्याकाळी प्रसिद्ध होती. ज्यात *नालंदा, तक्षशिला* यांचा समावेश होता. ज्यांचा भर धर्म, संस्कृती, ज्ञाननिर्मिती, राष्ट्रभावना, मातृभूमी प्रेम यावर होता. गुरुकुल तसेच विद्यापीठाच्या प्रभावामुळे तसेच इथे शिकलेल्या ज्ञानामुळे *माॕ भारतीचे रक्षण करणे* आपले कर्तव्य आहे, याची जाणीव तत्कालीन अखंड भारतातील जनमानसांत होती.

*#प्रवास_अखंड_भारताचा*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~


*🔸 "प्रवास अखंड भारताचा6" 🔸*

       *भाग २: पहिले आक्रमण*


अखंड भारतावर बाह्य आक्रमणे पुष्कळ झाली, परंतु दखल घेण्याजोगे जे आक्रमण झाले ते सिकंदरचे. इ. पू. ३०० च्या आसपास संपूर्ण विश्व जिंकण्याच्या उद्देशाने *सिकंदर* निघाला होता. या अनुषंगाने सिकंदरचे भारताच्या सीमेवर आक्रमण सुरु झाले. सीमांत प्रदेशातील राजे सिकंदरशी लढत होते. सिकंदरची ताकद खूप जास्त होती. तत्कालीन व्यवस्थेनुसार या आक्रमणाला तोंड देण्यासाठी सीमांत प्रदेशातील राजांना इतर राजे आणि सम्राट यांनी  मदत करणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. बहुतांशी सम्राट तटस्थ राहिले. *गांधार नरेश अंभी* सिकंदरला मिळाला. या कारणाने अंभी हा पहिला गद्दार ठरतो.


तत्कालीन अखंड भारतात *मगध* हे साम्राज्य सर्वात मोठे आणि प्रबळ होते, परंतु मगध सम्राट धनानंद तटस्थ राहिला. त्या कारणाने सिकंदरने भारताचा बराचसा भूभाग जिंकून घेतला. बऱ्याच सम्राटांची उदासीनता पाहून तत्कालीन *विद्यापीठे* पुढे सरसावली. विद्यापीठातील शिक्षक संकटाशी सामना करण्यासाठी, तसेच राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते *आचार्य विष्णुगुप्त* यांचे, ज्यांना आर्य चाणक्य म्हणून देखील ओळखले जाते.


राष्ट्राची संकल्पना मांडणाऱ्या चाणक्यांनी, *"राजा म्हणजे राष्ट्र नाही आणि राष्ट्र म्हणजे राजा नाही." "राष्ट्र प्रथम"* सिद्धांताची आठवण तत्कालीन राजांना करून देण्यास सुरुवात केली. राष्ट्रावर आलेल्या संकटाशी लढण्यासाठी त्यांनी मगधनरेश धनानंदाला त्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली. परंतु मगधनरेश धनानंदाने त्यांचे न ऐकता, त्यांचा अपमान करून त्यांना राज्यसभेतून हाकलून दिले. त्यानंतर *आचार्य चाणक्य* यांनी चंद्रगुप्ताच्या सहाय्याने धनानंदाचा पाडाव केला व सिकंदरने जिंकलेला भूभागसुद्धा जिंकून घेऊन एकछत्री अंमल भारतावर निर्माण केला.


त्यानंतर युनानी आणि फारसी आक्रमणे होत राहिली. त्यांनी भूभाग जिंकले, संपत्ती लुटली, परंतु आक्रांतांनी आपली संस्कृती, धर्म येथे वाढवायचा प्रयत्न केला नाही. जे इथे राहिले, त्यांनी येथील *धर्म-संस्कृतीशी जुळवून घेतले.* ते इथे एकरूप झाले. या कारणाने या काळातील आक्रमणांचा अखंड भारतावर फारसा फरक पडला नाही. तसेच येथील संस्कृती अबाधित राहिली.


चंद्रगुप्ताने साम्राज्याचा पुष्कळ विस्तार केला. तसेच संस्कृतीचीसुद्धा त्याच्या काळात भरभराट झाली. या काळात *बौद्ध धर्म* तसेच *जैन धर्म* यांचा प्रभाव वाढायला लागला. चंद्रगुप्ताने आपल्या उत्तरकाळात राज्याची जबाबदारी आपला मुलगा बिंदुसार याच्यावर सोपवून जैन धर्म स्वीकारला व तो जैन मुनी झाला.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


संकलन -)गजानन गोपेवाड उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

14 आँगष्ट कुस्तीगीर खाशाबा जाधव स्मृतिदिन

 ************************************

*१४ ऑगस्ट - कुस्तीगीर खाशाबा जाधव स्मृतिदिन*

************************************

🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️

जन्म - १५ जानेवारी १९२६ (सातारा)

स्मृती - १४ ऑगस्ट १९८४


खाशाबा जाधव हे ऑलिंपिक पदक विजेते मराठी,भारतीय कुस्तीगीर होते.१९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.


जाधवांनी १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला.१९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.


खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यातील एका महार कुटूंबात झाला. त्यांची कुस्ती खेळात ख्याति होती. भारत देशातील ते ऑलिंपिक मध्ये पदक जिंकणारे पहिले खेळाडू होते. 


सन १९०० मध्ये नॉर्मन प्रीतचंद यांनी वैयक्तिक खेळात दोन सिल्वर पदंके जिंकली होती. त्यानंतर ऑलिंपिक मध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते. हा एकमेव ऑलिंपिक पदक विजेता होता की त्याला भारत सरकारने पद्म अवॉर्ड दिला नाही. तो स्वतःच्या हिमतीवर तयार झाला. याची दुरवस्था पाहून रीस गार्डनर या ब्रिटिश कोचने त्याला १९४८ चे ऑलिंपिक पूर्वी मार्गदर्शन केले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

************************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *षष्ठी*,चित्रा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, १४ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *अच्छे व्यक़्ति अवश्य बनें, किन्तु इसे सिद्ध करने में अपना बहुमूल्य समय नष्ट न करें*

       *बात छोटी सी है, किन्तु अर्थ बहुत बड़ा है। एक बार विचार अवश्य करें कि हम स्वयं को श्रेष्ठ दिखाने में कितनी ऊर्जा का क्षय करते हैं*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भारतीय स्वातंत्र्य 75 सिहावलोकन

 *भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी : सिंहावलोकन*


         *- इ. झेड. खोब्रागडे, भाप्रसे (नि.)*

 

     भारतीय स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव आता साजरा होऊ लागला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने  दि. 1ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2021 या काळात "व्यर्थ न हो बलिदान" कार्यक्रम सुरू केल्याचे मीडियात दिसले.  करायलाही पाहिजे. कारण देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होणेसाठी, राजकीय  स्वातंत्र्याची चळवळ काँग्रेसने चालविली होती. इतिहासाची उजळणी होणे आवश्यकच आहे. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. त्यापूर्वीच 1946 मध्ये कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार स्वतंत्र भारताचे स्वतंत्र संविधान  निर्माण करण्यासाठी संविधान सभा गठीत करण्यात आली. संविधान सभेत काँग्रेसचे प्राबल्य होते.  संविधान निर्माण कार्याचा प्रारंभ दि. 9 डिसेंबर 1946 ला सुरू झाला.  देशाची फाळणी होऊन ऑगस्ट 1947 मध्ये  भारत व पाकिस्तान हे दोन स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आले. भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. संविधान प्रारूप समितीचे अध्यक्षपद  संविधान सभेने एकमताने डॉ. बी. आर. आंबेडकर यांना  दिले. संविधान तयार  होऊन ते 26 नोव्हेंबर 1949 ला भारताच्या लोकांनी स्वतःप्रत अर्पण केले.  भारताच्या लोकांनी भारत देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष,  लोकशाही गणराज्य  घडविण्याचा  संकल्पपूर्वक निर्धार केला. नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, नागरिकांना समान वागणूक, समान दर्जा  व समान संधी  तसेच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनाचे स्वातंत्र्य दिले.   व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार केला. संविधानाची प्रास्ताविका (Preamble) वाचले तर आपले लक्षात येईल.  संविधान निर्माण करण्यात अतुलनीय  योगदानासाठी, डॉ. बी. आर. आंबेडकर यांचा संविधान सभेने संविधानाचे शिल्पकार म्हणून गौरव केला.  संविधान निर्मितीचा इतिहास समजून घेण्याची गरज आहे. 


2.    दि.  26 जानेवारी 1950 ला देश प्रजासत्ताक झाला. त्यावेळचे पुढारी यांनी देशभक्तीचा परिचय देत, भारताच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे दृष्टीने विकासाचे नियोजन करीत  विकास  कामे  सुरू केलीत. या 75 वर्षात  बरीच प्रगती झाली, देश विकसित होत आहे. महासत्ता होण्याचे, आत्मनिर्भर होण्याच्या वाटेवर आहे.  कोणीही म्हणणार नाही की मागील 70-75 वर्षात काहीच झाले नाही. बरेच काही झाले आहे. मात्र, शोषित वंचितांच्या जीवनात फार फरक पडला नाही. आजही मूलभूत गरजा व मूलभूत सुविधांपासून दुर्बल घटक वंचित आहे. लोकहिताच्या चांगल्या राज्यकारभारासाठी  संविधानिक तत्वे-मूल्ये समजून घेऊन त्यानुसार काम करण्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. आजचे चित्र काय सांगते ? संविधान  व कायदे राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्या  स्वार्थीपणामुळे, सत्ता व संपत्तीच्या लालसेपोटी तसेच नागरिकांच्या अलिप्ततेमुळे आणि उदासीनतेमुळे अनेक गंभीर  समस्या निर्माण झाल्या आहेत, असे बोलले जाते. मागील दोन दशकात काही  राज्यकर्ते, सनदी अधिकारी इत्यादींनी बराच गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. जवळपास सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांची शक्ती व वेळ एकमेकांचे उणेदुणे काढण्यावर खर्च होत आहे. सत्ताधारी आणि विरोधक पक्षनेते यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे स्वरूप हे मुख्यतः भ्रष्टाचाराचे व नाकर्तेणाचे असतात. तसेच  शब्द खालच्या पातळीवरील वापरले जातात. संविधानाच्या प्रास्ताविकेतील "व्यक्तीची प्रतिष्ठा" या तत्वाचा विसर लोकप्रतिनिधींना पडलेला दिसतो. ज्यांनी आदर्श वर्तन करून आदर्श घालून द्यायला पाहिजे त्यांचेकडून  समाजात दुफळी, भांडण,  द्वेष,  जातीयता, धर्मांधता, असहिष्णुता, इत्यादी निर्माण करण्याचा  प्रयत्न होत आहे. विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती वर अवाजवी निर्बंध घातले जात आहेत.  शब्द जपून वापरले पाहिजे ह्याचे भान नेते मंडळी विसरत चालले आहेत. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढणाऱ्या नेत्यांचा जयजयकार केला जातो मात्र त्यांचा त्याग, चारित्र्य,  वर्तन, देशाप्रती समर्पण ह्याचा सोयीस्कर विसर पडतो आहे. यामुळे अनेक समस्या व प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वसामान्यांचे, शोषित -वंचितांचे प्रश्न दुर्लक्षित  राहीले आहेत. बोलायचं खूप, घोषणा मोठ्या आणि काम मात्र छोटं. त्यामुळे, वंचित  समाजघटक अन्याय-अत्याचारापासून संरक्षण मिळावे, सामाजिक आर्थिक न्याय व्हावा यासाठी संघर्ष करतो आहे. मीडिया मध्ये मात्र राजकाय घटनांचीच चर्चा अधिक होत असते. सामाजिक, आर्थिक व  शैक्षणिक प्रश्नांना दुय्यम स्थान मिळत असल्याचे चित्र  दिसत आहे.


3.   सर्वांना माहीत आहे की,   स्वातंत्र्याच्या राजकीय चळवळीचे  नेतृत्व काँग्रेस व अर्थातच महात्मा गांधी यांचेकडे होते.  त्याच काळात, डॉ. बी. आर. आंबेडकर हे   सामाजिक स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व करीत होते. ब्रिटिश सरकारच्या साऊथबेरो कमिशन, सायमन कमिशन, गोलमेज परिषद, पुणे करार, संविधान निर्मिती इत्यादी ऐतिहासिक घटनांवरून ते प्रकर्षाने दिसून येते. सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याशिवाय  माणसाला  न्याय मिळणार नाही आणि   इतर प्रगत समाजासोबत येण्याची संधी सुद्धा नाही.  नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याची जबाबदारी कार्यकारी यंत्रणा व न्यायालयावर  सोपविण्यात आली. सर्वांना समान संधी देतांना जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, त्यांना संविधानाने विशेष संधीचे तत्व लागू केले. 


4.    भारताला स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे, ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झालो पाहिजे ही भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी घेतली. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "प्रत्येकाने स्वजनासोबतच देशाविषयीची जबाबदारी पार पाडली पाहिजे. देशास सर्वोच्च स्थान आहे. भारत स्वतंत्र झाला पाहीजे अशी आमची इच्छा व प्रयत्न आहे.  त्रिमंत्री योजनेत आमची उपेक्षा केली गेली असली तरी देशाला स्वातंत्र्य मिळविण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करायच्या नाहीत ही जाणीव ठेवूनच मी वागत आलो आहे. भारताला स्वातंत्र्य संपादन अधिक सुलभतेने करता आले पाहिजे याच भावनेने व जाणिवेने मी आतापर्यंत बरीच भाषणे केली आहेत". हे बाबासाहेबांचे स्वातंत्र्य प्राप्तीसाठीचे योगदान आहे. बालपणापासून बाबासाहेब यांचे वाट्याला  आलेले कटू अनुभव बोलके आहेत. शिक्षणासाठी  भोगलेले अपमानित जीवन व त्रास, भारतातील जातीव्यवस्था, अस्पृश्यता, अधिकार वंचितता, शोषण, माणूस म्हणून प्रतिष्ठा नाही, गुलामी, असहायता , अमानवीय वागणूक हे सगळं त्यांनी अनुभवलं. म्हणूनच, राजकीय स्वातंत्र्यासोबत  सामाजिक व आर्थिक  स्वातंत्र्याची चळवळ  भक्कमपणे व यशस्वीपणे चालविली आणि  परिवर्तन घडवून आणले. ब्रिटिशांशी व  स्वकीयांशी सतत संघर्ष केला. इतिहास साक्षी आहे.   म्हणूनच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे महानायक, युगपुरुष ठरलेत. ज्ञान, चारित्र्य, त्याग,  कर्तृत्व, स्वाभिमान, देशप्रेम इत्यादी मुळे जागतिक नेते म्हणून त्यांचा गौरव होतो आहे. भारतीय  स्वातंत्र्यांचे  75 वर्ष साजरे करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची व संविधानिक नैतिक मूल्यांची, सोबतच त्यांचे जीवन व कार्याची चर्चा होणे आवश्यक आहे. 


5.      स्त्रियांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले. कोणताही संघर्ष न करता मताधिकार मिळाला.  मात्र, स्त्रियांच्या सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न अजूनही  आहेच. जातीयतेमुळे, धार्मिकतेमुळे आंतरजातीय विवाहास विरोध होतोच आहे. जीवनाचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य मुलींना मिळत नाही. खरं तर, हे सामाजिक स्वातंत्र्य आहे, ते मिळालेच पाहिजे. परंतु यासाठी प्रोत्साहन तर नाहीच उलट विरोध होतो. अशा विवाहित जोडप्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, जीवही घेतला जातो. पुरुषसत्ताक पद्धत्तीचे वर्चस्व आजही आहे. स्त्रीला घरच्या निर्णयात अजूनही पुरेशे स्वातंत्र्य मिळत नाही.  घरघुती हिंसाचार थांबविण्यासाठी 2005 मध्ये कायदा करावा लागला. कशाचे लक्षण आहे हे? सामाजिक-आर्थिक गुलामीत आजही मोठा वर्ग आहे.  समानतेच्या अधिकारापासून वंचित आहे. संविधानाने दिलेल्या सामाजिक स्वातंत्र्यापासून वंचित आहे. राजकीय स्वातंत्र्य जरी लाभले तरी सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढण्याची गरज आहे.


6.       स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  देशाच्या विकासाचे नियोजन आणि अंमलबजावणी संविधानाच्या प्रास्ताविकेतील मूल्ये लक्षात घेऊन सुरू झाली.  या 75 वर्षातील प्रगतीचे, कामकाजाचे निरपेक्ष मूल्यमापन केले तर लक्षात येईल की, अलीकडच्या काळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झपाट्याने होत आहे. संसदेत, विधिमंडळात  गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकानांही प्रवेश  मिळू लागला आहे. सर्वच राजकीय पक्ष कमी-अधिक प्रमाणात, सत्ता-संपत्तीच्या प्राप्तीसाठी  अनेक भ्रष्ट, पैसेवाले-धनिक, भांडवलदार तसेच  गुन्हेगार -गुंड प्रवृत्तीच्या लोकांना  निवडणूकीत उभे करतात. सर्वच प्रकारच्या बळाचा वापर करून  निवडणूक जिंकतात, काही मंत्री सुद्धा होतात.  ज्यांना जेल मध्ये असायला पाहिजे ते लोकप्रतिनिधी व मंत्री झाले तर देशाचे भले कसे होणार?  कायद्यांचे राज्य (Rule of Law) कसा प्रस्थापित होईल? अशाच्या संरक्षणासाठी पोलीस  असतात. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधी-मंत्र्यास सर म्हणावे लागते,  सॅल्युट करावे लागते. पोलिस सर्वसामान्यांचे मित्र नाही होऊ शकले.  सिव्हिल सेवेतील बरेचसे अधिकारी - कर्मचारी हतबल होताना आपण पाहतो.  भ्रष्टाचार फोफावण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.  हे  थांबविता येणे शक्य आहे.  सर्व राजकीय पक्षांनी निर्णय करायचा व निवडणूक कायद्यात अपेक्षित दुरुस्ती करायची जेणेकरून भ्रष्टाचारी, गुन्हेगारी व्यक्ती लोकप्रतिनिधी होणार नाही.  संविधानिक नीतिमत्ता पाळावी लागेल. मात्र, राजकीय पक्ष हे करणार नाहीत. 


7.         काही अपवाद सोडले तर पूर्वी जे  सामान्य किंवा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत जीवन जगत होते ते राजकारणात आल्यावर, नेते झाले की,  अल्पकाळातच श्रीमंत झालेत, पॉवरफुल झालेत. भ्रष्टाचारी कृत्य केल्याशिवाय एवढी संपत्ती खरंच येईल का? सत्ता-संपत्तीसाठी काहीपणच्या वृत्ती व कृती मुळे संविधानिक व्यवस्था बिघडविण्यासाठी हेच नेते कारणीभूत ठरतात. असे म्हणतात, Power corrupts and absolute power corrupts absolulately. सत्तेचे केंद्रीकरण मंत्रालयात झाले  आणि अनियंत्रितपणे सत्तेचा वापर सुरू झाला. राजकारणाचे गुन्हेगारीकरण तर मोठ्या प्रमाणात झालेच, सोबतच सिव्हिल सर्विसेसचे ही राजकीयकरण मोठ्या प्रमाणात  होऊ लागले आहे. बदल्या, पदोन्नती,  लाभाची पदे, सेवानिवृत्तीनंतर सुद्धा पदे या लालसेपोटी मोठ-मोठे अधिकारी जे UPSC /MPSC च्या स्पर्धा परीक्षेतून मोठ्या मेहनतीने प्रशासनात आलेत ते लाचार  होऊ लागलेत, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्यासमोर शरणागती पत्करु लागलेत.  होयबा, येस्स सर, सांगकामे झाले. यामुळे भ्रष्टाचार, भाईभतीजावाद, जातीयवाद इत्यादी नवनवीन रुपात उफाळून येऊ लागला. प्रशासकीय सुधारणा, सिव्हिल सर्विस रिफॉर्मच्या अहवालात या बाबींचा उल्लेख केला गेला आहे. 


8.         जर  विभागाचा मंत्री, सचिव, जिल्ह्याचे कलेक्टर, सीईओ, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, म्युनिसिपल आयुक्त, विभागीय आयुक्त आणि राज्यस्तरीय विभागाचे आयुक्त, संचालक आणि विभाग प्रमुख-कार्यालय प्रमुख, एसडीओ, तहसीलदार, बीडीओ, ठाणेदार आपले कर्तव्य  आणि  संविधानिक जबाबदारी  इमाने इतबारे -नीटपणे  वेळेत पार पाडू लागले तर भ्रष्टाचाराला   नक्कीच आळा आणता येतो. मी प्रशासकीय सेवेत आलो 1982-83 ला, तेव्हा वाटायचे हे सर्व अधिकारी चुकीचे वर्तन करूच शकत नाही. कारण त्या त्या स्तरावर ते सरकार आहेत आणि सरकार अन्यायकारी कसे असू शकते?  काही वर्षांनी कळायला लागले की यापैकी काही इमानदार तर काही भ्रष्टाचारी आहेत.  माझ्या पाहण्यात  भ्रष्टाचारी  संख्येने कमी आहेत पण व्यवस्था बिघडविण्यास पुरेसे आहेत. सनदी अधिकारी भ्रष्टाचारी वर्तन करू शकतात यावर विश्वास बसत नाही. कारण हे तर देशसेवेसाठी प्रशासनात आलेत. परंतु, वास्तव हे आहे की  अनेक सनदी अधिकारी  आजही ब्रिटिश काळातील अधिकाऱ्यांसारखे जुलमी वर्तन करतात. हे सारे संविधानिक संस्था प्रभावहीन व खिळखिळ्या करण्यात,  देश बिघडविण्याचे कामात  भूमिका बजावत आहेत. नकारात्मकता बाळगणारे,   तटस्थ असणारे, निष्क्रिय राहणारे सुद्धा तेवढेच  जबाबदार  आहेत.  मंत्रालयात, विभागाचे मंत्री व सचिव यांचेकडे सर्व सत्ता एकवटली आहे.  कोणाला कुठे नेमायचे, कोणाला  संरक्षण द्यायचे,  कोणाला अडचणीत आणायचे हे मंत्रालयात ठरते.  ह्या सर्व गोष्टींची परिणीती म्हणजे  सामाजिक आर्थिक न्यायाचे तत्व  प्रथम प्राध्यान्य क्रमवारीत  कधीच आले नाही. राजकीय नेते, नौकरशाही, ठेकेदार, दलाल आणि गुन्हेगार यांची अभद्र युती शासन प्रशासनात  प्रभावी ठरत आहे. शासन - प्रशासनाचा  सामान्य माणसाशी नियमित संवाद नाही, कार्यालयात  सन्मान मिळत नाही. 


9.         सेवेत असताना वर्तनुकीच्या नियमाचे बंधन सांगून चूप राहणारे  सनदी अधिकारी आणि न्यायाधीश सेवानिवृत्तीनंतर मात्र  लोकशाही व्यवस्थेच्या वाईट कारभाराबाबत, भ्रष्टाचाराबाबत बोलू लागतात, चिंता व्यक्त करतात. पदांवर असताना जे अधिकारी चांगले घडावे, साफ व स्वच्छ पद्धतीने काम व्हावे, भ्रष्टाचार  व शोषण थांबावे, शोषित वंचितांना न्याय मिळावा यासाठी प्रामाणिकपणे, संविधानाचा उद्देश लक्षात ठेवून काम करतात, त्यांना त्रास सहन करावा लागतो, ते व्यवस्थेचे बळी ठरतात. माझा वैयक्तिक अनुभव असून  मी लिहिलेल्या "आणखी, एक पाऊल" आणि "प्रशासनातले समाजशास्त्र" या पुस्तकात  काही अनुभव लिहिले आहे. हे मान्य करावेच लागेल की समतेसाठी, न्यायासाठी,  सामाजिक प्रतिनिधित्वाची संधी संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आली.  सामाजिक-आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. चिंता ह्या गोष्टीची वाटते की संविधानाने दिलेली  सामाजिक प्रतिनिधित्वाची संधी घेऊन  लोकप्रतिनिधी झालेले आणि  प्रशासनात आलेले- शासनकर्ती जमात शोषणकर्ती झाली तर कसे होईल ? संविधानाचा पराभव आणि संविधानाला धोका यांच्यामुळेही आहे हे ही समजून घेऊन, त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. 


10.         स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेकांनी बलिदान दिले, शहिद झालेत. इतिहास आपलेसमोर आहे. देशभक्ती- देशप्रेम हाच जजबा होता. आता, त्याची जागा  सत्ता संपत्ती  घेवू लागली आहे आहे.  ऑल इंडिया सर्विस -IAS/IPS चे अधिकारी हे निस्पृहपणे देश घडविण्याचे काम करतील असा दृढ विश्वास सरदार वल्लभभाई पटेल यांना होता. म्हणूनच त्यांनी  संविधान सभेत यासाठी आग्रह धरला होता. या सेवेतील अधिकारी यांना संविधानिक संरक्षण देण्यात आले, सोयी-सुविधा, सन्मान, सामाजिक प्रतिष्ठा व ओळख मिळाली. तेव्हा, किती अधिकारी सचोटी-इमानदारी,  कर्तव्यनिष्ठ,  स्वाभिमानी आणि कमकुवत समाजघटकांसाठी तळमळीने काम करणारे आहेत, ह्याचे सोशल ऑडिट झाले पाहिजे. लॉबी, गट-तट  करणे IAS/IPS यांना शोभत नाही. किती सनदी अधिकारी यांचा पाठीचा कणा ताठ आहे ? कशासाठी लाचारी व हुजरेगिरी ? कशाची कमी आहे? सरकार सगळंच तर देते, बंगला, गाडी ,सुविधा, चांगला पगार सुद्धा.  तरीपण भ्रष्ट्राचार ? भ्रष्टाचार मुक्त कार्यालय असे अभियान सरकारने राबवावे. शासकीय काम होण्यास विलंब लागणार नाही. वर्षानुवर्षे  केसेस चालू राहतात, निर्णय होत नाही, यात सुधारणा होईल.  प्रतिष्ठित व प्रभावशाली यांच्यासाठी लोकशाहीच्या संस्था जसे तत्परतेने काम करतात तसे सामान्य माणसासाठी - मागासवर्गासाठी का करीत नाही?  जोपर्यंत या देशातील कायदेमंडळ, कार्यापालिका, न्यायपालिका मधील लोक  संविधान व कायद्यास  एकनिष्ठ होऊन, कोणत्याही प्रकारच्या, कोणाच्याही दबावास बळी न पडता, आपली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडणार नाहीत तोपर्यंत  राजकिय लोकशाहीचे  सामाजिक  व आर्थिक लोकशाहीत रूपांतर होणार नाही.  मीडियाचे काम ही याच दिशेने झाले पाहिजे. 


11.         भारत हा आमचा देश आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. संविधानाने ही ओळख दिली आहे.  लोक सार्वभौम आहेत. लोकांनीच निवडून दिलेले राज्यकर्ते झालेत. आमच्यातीलच  काही समाजसेवेने-देशसेवेने प्रभावित होऊन सनदी अधिकारी झालेत. आमच्यातील काही न्यायाधीश झालेत. संविधानाने दिलेल्या संधीमुळे हे शक्य झाले आहे .भविष्यातही होत राहतील कारण ही संविधानाची व्यवस्था आहे.  तेव्हा, संविधानानुसारच काम हाच निर्धार पूर्णत्वास नेला पाहिजे. देश हितास सर्वोच्च स्थान न दिल्यास व त्यासाठी नीटपणे कार्य न केल्यास  देश पुन्हा पारतंत्र्यात जाऊ शकतो असा इशारा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 25 नोव्हेंबर1949 च्या, संविधान सभेतील भाषणात दिला आहे.  भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - 75 वी साजरी करताना, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आजाद इत्यादी नेत्यांचे स्मरण व गुणगान करित असताना, वर उपस्थित केलेल्या वास्तवाकडे दुर्लक्ष होऊ नये हीच अपेक्षा.  लोकशाही बळकट व समृद्ध करणे, शोषण मुक्त,  भ्रष्ट्राचार मुक्त, जातियता मुक्त भारत देश,  विकसित समृद्ध व सामर्थ्यशाली देश घडविणे आपले सर्वांचे, नागरिक म्हणून कर्तव्य आहे.  देशाला स्वातंत्र्य मिळावे आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकून राहावे  म्हणून देशासाठी   बलिदान दिलेल्या, शहिद झालेल्या सर्वांनाच ही आदरांजली ठरेल.  ज्यांनी ही जी दुरावस्था निर्माण केली आहे त्यांनीच  ती नीट करावी  म्हणजे "बलिदान व्यर्थ जाणार नाही".  1857 चा जसा उठाव झाला होता तसा  उठाव संविधानिक मार्गाचा अवलंब करून शोषकर्त्यांविरुद्ध होण्याची गरज आहे. स्वातंत्र्य टिकविण्यासाठी सरकारच्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध नागरिकांना बोलावे लागेल, लढावे लागेल. आवाज करावा लागेल. 


12.        सामाजिक स्वातंत्र्य प्राप्तीसाठी, बंधनातून मुक्तता, गुलामीतून मुक्तता, जातीयवादातून मुक्तता, अनिष्ट रूढी परंपरेतून मुक्तता,अंधश्रद्धेतून मुक्तता मिळणे आणि मिळवून घेणे आवश्यक आहे. संविधानाने सहा फ्रीडम दिले आहेत. तेव्हा, जात, धर्म, वंश, लिंग, भाषा, प्रांत असा कोणताही भेदभाव न करता हे स्वातंत्र्य विधायकपणे उपभोगता आले पाहिजे. तरच व्यक्तीचा विकास व प्रगती होईल. स्त्री स्वातंत्र्यासाठी खूप काम करण्याची गरज आहे. व्यक्तीचा आत्मसन्मान, प्रतिष्ठा, खूप महत्वाचे आहे.   देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे यासाठी ज्यांनी आंदोलने केलीत, जेलमध्ये गेले, बलिदान दिले, शहिद झालेत, त्यांना आपला भारत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणतंत्र भारत,  विकसित, शक्तिशाली, समृद्ध भारत घडवायचे होते. हेच आपले ध्येय आहे.


13.         अनुभव असा आहे की प्रत्येक क्षेत्रात-प्रशासनात सत्यासाठी, न्यायासाठी, समतेसाठी लढणारे लढवय्ये  आजही आहेत. संसदीय लोकशाही  व्यवस्थेतील राज्यकर्ते- सत्ताधाऱ्यांनो,  तुम्ही त्यांना लढू द्या, साथ द्या, नाउमेद करू नका. त्यांना मोकळीक द्या, हस्तक्षेप करू नका, सन्मान करा.  चांगले करताना  काही चुकलेच तर समजून घ्या, माफ करा, मनोधैर्य वाढवा म्हणजे  चांगलेच करून दाखवतील. कारण ते वैयक्तिक स्वार्थात  गुरफटले नाहीत. सत्ता -संपत्तीचा  मोह नाही तर समाजहितासाठी, व्यक्तीचे कल्याणासाठीचा त्यांना ध्यास आहे, त्यासाठी त्यांची धडपड व प्रयत्न आहे. अशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. जे वाईट हेतूने स्वतःच्या स्वार्थासाठी  पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करतात त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे परंतु  अपवाद वगळता असे होताना दिसत नाही. जिल्ह्याचे अधिकारी  महिन्यातून 8-10 दिवस तरी दौऱ्यावर गेले पाहिजे,  गावागावात गेले पाहिजे , विकास कामांची तपासणी केली पाहिजे, लोकांशी बोलले पाहिजे.  असे पुन्हा आदेश सरकारने जारी करावे.  पूर्वी होते. दौऱ्या बाबत वरिष्ठ विचारायचे.  प्रलंबित कामांचा आढावा होत असे. संवाद व्हायचा.  हे सगळं शक्य आहे. आम्ही प्रशासनात असताना हे केले आहे.  आता, व्हिसी वर सगळं चाललं आहे. आपत्ती विषयक परीस्थिती वगळता,   नियमितपणे गावात जाणारे  सनदी अधिकारी किती आहेत?  मागासवर्गीयांच्या वस्तीला भेट देऊन त्या लोकांशी संवाद साधणारे अधिकारी किती आहेत?  संवाद कमी झाला आणि प्रश्नांचे गांभीर्य हरपले. अनास्था निर्माण झाली. म्हणूनच Good  Governance दिसत नाही.  फक्त बोलून होणार नाही, करून दाखवावे लागेल.


14.         हे ही मान्य केले पाहिजे की सगळंच चांगलं नसलं तरी सगळंच वाईट नाही. आजची स्थिती  प्रतिकूल व गंभीर आहे हे  माहीत असूनही, देशभक्तीची प्रबळ भावना असणारे ,  संविधानाने दिलेल्या संधीचा उपयोग समाजसेवा आणि देशसेवा घडावी यासाठी  निस्पृहपणे, स्वाभिमानाने, हिंमतीने  कार्य  करीत आहेत. अशा सर्व  सनदी अधिकारी- कर्मचारी,  न्यायाधीश, नेते व नागरिक यांचे  या निमित्त्य मनापासून अभिनंदन आहे.


(Note: Malice to None)


*स्वातंत्र्य दिनाच्या  देशवासियांना शुभेच्छा !!!*


संकलन,,,,, गजानन गोपेवाड 

13 आँगष्ट राजमाता आहिल्या बाई होळकर यांची आज स्मृतिदिन

 ***********************************

*१३ ऑगस्ट - राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिन*

***********************************

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

जन्म - ३१ मे १७२५ (चौंडी,नगर जिल्हा)

मृत्यू - १३ ऑगस्ट १७९५ (इंदूर)


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज स्मृतिदिन.


मराठय़ांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्यादेवींचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. अहिल्यादेवींना ‘पुण्यश्लोक’ असेही म्हणतात. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे.


राजे-रजवाड्यांचे इतिहास जगभर घडले आहेत. पुरुष-प्रधान व्यवस्थांत केवळ भारतातच नव्हे तर जगभर स्त्रीयांचे दमनच झाले असल्याचे आपल्याला दिसते. जगात राण्या-महाराण्या झाल्या असल्या तरी त्या शेवटी कर्तुत्वाने म्हणा कि कोणा महाराजाची पत्नी होती म्हणुन म्हणा प्रसिद्ध आहेत पण त्या इतिहासावर स्वत:चा असा स्वतंत्र ठसा उमटवू शकलेल्या नाहीत. यच्चयावत जगात अपवाद असणारी एकमेव महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर. यात कसलीही अतिशयोक्ती नाही. 


होळकर घराण्याचा कट्टर शत्रू माल्कम आपल्या मध्यप्रदेशातील आठवणींत म्हणतो, "सर्व प्रकारच्या मर्यादा पेशव्यांपासून ते हिंदू सनातन्यांनी घातलेल्या असुनही अहिल्यादेवींनी ज्या पद्धतीने २८ वर्ष प्रजेच्या हिताचे उत्कृष्ठ प्रशासन केले त्याला जगात तोड सापडनार नाही. माळव्यातीलच नव्हे तर जिथे तिचा प्रत्यक्ष कारभारही नव्हता अशा हिंदुस्थानातील सर्वच प्रजा तिला दैवी अवतार मानते. याचे कारण म्हनजे अहिल्यादेवींची प्रजानिष्ठा, आत्मशुद्धता आणि सर्व कल्याणासाठीची अविरत धडपड होय!" 


प्रख्यात इंग्रजी कवयत्री जोआना बेलीने तर अहिल्यादेवींवर नितांत सुंदर कविताच लिहिली. एक लक्षात घ्यायला हवे कि एकोणिसाव्या शतकात युरोपात स्त्रीमुक्तीची जी चळवळ सुरु झाली तिला अहिल्यादेवींपासून प्रेरणा मिळाली. याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा.


मल्हारराव होळकर हे रत्नपारखी. मल्हाररावांची गाठ पोरसवदा अहिल्यादेवींशी पडली. त्यांच्या उत्तम संस्काराकडे बघून त्यांनी आपला पुत्र खंडेरावासाठी तिचा हात नि:संकोचपणे मागितला. खंडेराव होळकरांशी अहिल्यादेवींचा विवाह झाला. सासरा बनलेल्या मल्हाररावांनी आपल्या सुनेला हौसेने लिहा-वाचायला शिकवले. खंडेराव हे मल्हाररावांचे म्हनजेच मराठ्यांचे दिल्ली दरबारातील राजकीय मुत्सद्देगिरीला सांभाळत राज्यकारभारही पहात असत. मोहिमांतही भाग घेत. कुंभेरीच्या वेढ्याच्या बिकट प्रसंगी खंडेरावांचा तोफेचा गोळा लागुन मृत्यु झाला. अहिल्यादेवींनी तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन सती जायची तयारी केली. त्या प्रसंगी मल्हाररावांनी जो विलाप केला तो वाचुन कोणाही सहृदय माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्यावाचुन राहणार नाही. अहिल्यादेवींनी सती जायचा विचार रद्द केला.


अहिल्यादेवींची राजकीय कारकीर्द तेंव्हापासुनच सुरु झाली. खंडेरावाची जागा अहिल्यादेवींनी घेतली. मल्हारराव देशभर मोहिमांत व्यस्त असत. सासरा-सुनेतील पत्रव्यवहार हा अहिल्यादेवींच्या राजकीय विचारीकतेचा उत्कृष्ठ नमुना होय. अहिल्यादेवींना मल्हारराव तोफा-दारुगोळ्याची मागणी ते ज्या मार्गाने ते मोहिम चालवणार आहेत त्याच्या रक्षणाच्या सुचना अहिल्यादेवींना जसे देतांना दिसतात तसेच अहिल्यादेवी आपल्या सासऱ्याला सल्ले देतांनाही दिसतात. सासरा सुनेचे ऐकेल हा तो काळ नव्हता, आताही फारसा नाही. परंतू मल्हाररावांसारखा मुत्सद्दी अहिल्यादेवींचे सल्ले अंमलात आणत होता यावरुनच अहिल्यादेवींची योग्यता लक्षात येते.


१७६६ साली मल्हाररावांचा वृद्धापकाळाने मृत्यु झाला. दरम्यानच्या काळात अहिल्यादेवींनी स्त्रीयांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालय सुरू केले होते. घोडेस्वारी ते शस्त्रास्त्र प्रशिक्षण या विद्यालयात दिले जात असे. तत्कालीन स्थितीत ही एक जागतीक क्रांतिकारी घटना होती. घराबाहेर पडायला जेथे बंदी तेथे महिला शस्त्रचालक बनणार ही कल्पनाही त्या काळात कोणी करु शकत नव्हते. स्वत: अहिल्यादेवी उत्कृष्ठ योद्धा होत्या. महिला अबला नाहीत हे त्यांनी स्वकर्तुत्वातून सिद्ध केले असले तरी सर्व महिला शक्तीवर त्यांचा विश्वास होता. त्यांची स्वत:ची ५०० महिला सैन्याची पलटन उभी होती. अहिल्यादेवींचे प्रशासन हे ब्रिटिशांनाही आदर्शभुत ठरले. 


सर्व देशात जेंव्हा दांडगाईचे राज्य होते, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता त्या काळात अत्यंत सुरळीत चालणारे एकमेव राज्य म्हणजे माळवा होते. सर जदुनाथ सरकार म्हणतात, "सर्व मुळ कागदपत्रे व पत्रव्यवहार पाहिल्यानंतर माझी अशी खात्री बनली आहे कि अहिल्यादेवींखेरीज महादजी शिंदे उत्तरेत कसलेही स्थान निर्माण करु शकले नसते, एवढ्या उच्च दर्जाची राजकीय धोरण असलेली ही महिला होती." 


अहिल्यादेवींनी शेतसारा असो कि शेतीसाठीचे पाणी वाटप, यासाठी नुसते बंधारे घालुन दिले नाही तर एक उत्कृष्ठ प्रशासकीय व्यवस्था घालुन दिली. राज्यात तीर्थयात्री येत. भिल्लादि समुदाय उपजिविकेसाठी नाईलाजाने वाटमा-या करत. अहिल्यादेवींनी त्यांना शिक्षा देण्यापेक्षा विधायक मार्ग निवडला. त्यांच्या गुन्ह्यांमागील कारण शोधले आणि "भिल्लाडी" ही अभिनव पद्धत सुरु केली. या पद्धतीत यात्रेकरुंना संरक्षण देण्याचे काम भिल्लांवरच सोपवले आणि यात्रेकरुंकडुन त्यासाठीचा कर घ्यायची अनुमती दिली. यामुळे यात्रेकरुही निर्धास्त झाले व भिल्लांनाही उपजिविकेचे साधन मिळाले. हा क्रांतीकारी निर्णय फक्त प्रजाहितदक्ष व्यक्तीच घेवू शकत होती. आणि तो अहिल्यादेवींनी घेतला. जगातील हे पुन्हा पहिले उदाहरण आहे.


हैदराबादचा निजाम म्हणतो, "Definitely no woman and no ruler is like Ahilyabai Holkar." अहिल्यादेवींबद्दल लिहावे तेवढे कमीच असते. त्या महान शिवभक्त होत्या. पण धर्माच्या पलीकडेही मानवी जग असते याचे भान त्यांना होते. मोरोपंत (केकावलीप्रसिद्ध) ते अनंत फंदी यासारख्यांच्या जीवनात एका शब्दाने बदल घडवून आणण्याचे नैतीक सामर्थ्य त्यांच्यात होते. स्त्रीयांना शक्ती द्यायची तर त्यांना शस्त्रही चालवता आले पाहिजे असा क्रांतिकारी विचार करणाऱ्या त्या पहिल्या पुरोगामी महिला होत्या. स्वत: त्या लिहा-वाचायला शिकलेल्या होत्याच, सर्व स्त्रीयांनाही लिहा-वाचायला यायला हवे हा त्यांचा हट्ट होता. पुढे क्रांतिज्योति सावित्रीबाइंनी त्यांची परंपरा अविच्छिन्न ठरवली.


उत्कृष्ठ नागरी व लश्करी प्रशासक, नैतीकतेची आदर्श बिंदू, देशव्यापक विचार करत प्रत्यक्ष कृती करणारी, तुलनेने अल्प भुभाग स्वत:चा असुनही, एकमेव शासिका, विस्कळीत झालेल्या, अवमानित झालेल्या हिंदू धर्मात पुन्हा प्राण ओतणारी दुर्गा म्हणुन अहिल्यादेवींचे भारतीय इतिहासातील स्थान एकमेवद्वितीय महिला म्हणुन कायमच राहील.


पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरणी विनम्र अभिवादन.....!

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

**********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *पँचमी*,हस्त नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, १३ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


उत्सवे व्यसने चैव

             दुर्भिक्षे राष्ट्र विप्लवे।

राजद्वारे श्मशाने च

            यतिष्ठति स वान्धवः।।


*भावार्थः- सच्चा मित्र वही होता है, जो अच्छे समय, बुरे समय, सूखा, दंगा, युद्ध, राजा के दरबार में और मृत्यु के बाद भी साथ खड़ा हो ।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🐍🐍🐍श्री नाग पँचमी🐍🐍🐍*

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

गालफुगी कशामुळे होतो


══════════════════════

    @ संकलन @गजानन गोपेवाड 


══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *गालफुगी कशामुळे होते ?* 📕


तुमच्या एखाद्या मित्राचा वा तुमचा गाल अचानक सुजला असेल. शाळेत यायची तुम्हाला लाजही वाटली असेल, कारण हनुमानासारखे गाल फुगलेले असतील. याला गालफुगी असे म्हणतात; पण ती का होते ते आपण पाहू.

गालपुगी अर्थात मम्स हा एक रोग असून तो मिक्झो या विषाणूमुळे होतो. हा विषाणू लाळ तयार करणाऱ्या गालातील ग्रंथीवर आक्रमण करतो. मज्जासंस्थेवरही आक्रमण करू शकतो. यात गालावर सूज, तोंड उघडायला त्रास, वेदना, कानात दुखणे, ताप अशी लक्षणे बघावयास मिळतात. हा रोग ५ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये होतो. तसा हा रोग आपोआप ८-१० दिवसांत बरा होतो. त्यामुळे तापासारख्या लक्षणासाठी औषध देता येते. या विषाणूंना मारण्यासाठी विशिष्ट औषध नाही. या आजारात फारशा गंभीर गुंतागुंती होत नाहीत, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसते..


हा रोग होऊ नये, यासाठी एक ते दीड वर्षांच्या मुलांना प्रतिबंधक लस देता येते. गालफुगी हा एक सौम्य प्रकारचा विषाणूजन्य रोग आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. तो आपोआप बरा होतो. गालफुगी झालेल्या मुलामुळे दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये व गुंतागंती होऊ नयेत म्हणून मुलाला शाळेत न पाठवणेच योग्य. श्वासांद्वारे हा रोग पसरतो. गाल सुजण्याआधी ४ ते ६ दिवस व नंतर आठ दिवस रुग्णापासून हा रोग दुसऱ्याला होऊ शकतो.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

खुदिराम बोस बलिदान दिवस

 *************************************

                    *११ ऑगस्ट*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*खुदिराम बोस बलिदान दिवस*

*************************************


जन्म - ३ डिसेंबर १८८९ (बंगाल)

स्मृती - ११ ऑगस्ट १९०८ (मुझफ्फरपुर)


भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतिकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात ३ डिसेंबर १८८९ ला झाला.


त्याच्या लहानपणीच आई लक्ष्मीप्रियादेवी आणि वडील त्रैलोक्यनाथ यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्यांचे पालनपोषण केले.


बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले होते. त्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणार्‍यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणार्‍या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.


यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. ३० एप्रील १९०५ या दिवशी खुदीरामचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याने किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बॉंब फेकला, परंतु तो चुकून दुसर्‍याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला. या घटनेच्या दुसर्‍या दिवशी खुदीराम पकडले गेले तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीराम यांच्यावर खटला भरण्यात आला. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११ ऑगस्ट १९०५ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बॉंबचा उपयोग करणारे खुदीराम बोस हे पहिले क्रांतिकारक ठरले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *चतुर्थी*,उ.फा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, १२ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

            *"हम माने या न माने किन्तु उत्तम जीवन हेतु सफलता का सूत्र यही है कि दूसरों पर ध्यान केंद्रित करके, अपनी महत्वाकांक्षाएं बढ़ाकर, स्वयं के लिए समस्याएं उत्पन्न करने से अधिक उचित है कि स्वयं पर ध्यान केंद्रित करके, उपलब्ध साधनों से ही जीवन को श्रेष्ठ व् सुंदर बनाया जाये।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

12 आँगष्ट विक्रम साराभाई जन्मदिवस

 ***********************************

*१२ ऑगस्ट - विक्रम साराभाई जन्मदिन*

***********************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

जन्म - १२ ऑगस्ट १९१९ (अमदाबाद)

स्मृती - ३० डिसेंबर १९७१ (कोवालम)


विक्रम अंबालाल साराभाई हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.


विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात १२ ऑगस्ट १९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्यांना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते.


आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोर मधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.


१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी ११ नोव्हेंबर १९४७ ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. 


विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.


विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातुनच उभी राहिली. 


भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखिल त्यांनी उभारली.


३० डिसेंबर १९७१ साली केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने विक्रम साराभाई यांचे निधन झाले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

*************************************

कर्माचा सिध्दांत लेखन गजानन गोपेवाड

 #कर्माचा_सिद्धांत


कोणाची ही हाय लावून घेऊ नये, त्याचे भयंकर परीणाम भोगावे लागतात.


काही लोकांना नाही पटणार हा विषय, 

पण ज्यांनी  अनेकांचा तळतळाट घेतलाय आणि त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल, ....


अनेकांनी अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ...


जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक,.....

अपमानास्पद वागणूक,...

कोणांचे मन दुखावले असू शकते....,कोणावर अन्याय केला गेलेला असतो, .....

कोणाची सामाजिक बदनामी केलेली असते,.....

छळ केलेला असेल, शारीरिक दुखापत केलेली असेल, .......

किंवा प्रेमात गैरफायदा घेतला गेलेला असेल, ......

त्रासाचे कुठलेही कारण असो...


वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खूप दु:खी होतो ,त्याचे मनोबल कमकुवत होत असते,  पर्यायाने तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकतो, 

जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल कां? 


 पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही,किंवा  देव देखील शाप देत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून  अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमधे शोषली जाते,मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळटळाट असं म्हटलं जातं.,


मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचेही कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही,  सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, अशा काहीही घटना घडू शकतात,....


आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे जगात फक्त दोनच व्यक्तिंना माहित असते,एक म्हणजे 


"आंतरात्मा"


दुसरा 


"परमात्मा"


समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परत फेड याच जन्मात करावी लागते. 


 तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा अगर नका ठेऊ  तुम्ही अस्तिक असा किंवा नास्तिक,


 चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो,


मी  एका पुस्तकात वाचले होते,


राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले,

तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावं?

माझ्या सबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही,

की ज्याच्या परिणाम स्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यु  आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दु:ख सोसणे माझ्या नशिबी  यावे? 


तेंव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व जन्म पाहाण्याची दिव्य दृष्टि दिली, 


धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टिद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापुर्वी  तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले  मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लाहान पिल्ले  उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली, धृतराष्ट्र राजाची त्या वेळची ती क्रिया होती. त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले. 


कर्म हे फल देऊनच शांत होते,


प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, 

हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. 

चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते, वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते.  फक्त वेळ आणि काळ पुढे मागे होऊ शकतो,

हाच कर्माचा सिद्धांत आहे,


आता आपण ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे, 


"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ 


क्षणिक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट".

संकलन) :-गजानन गोपेवाड 

     🙏धन्यवाद 🙏

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

सिफीलस हा रोग कसा होतो


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *सिफीलीस हा रोग कसा होतो? त्यावर उपाय काय ?* 📕


सिफीलीस हा एक लिंगसांसर्गिक रोग आहे. ट्रेपोनेमा पॅलीडम नावाच्या जिवाणूंमुळे हा रोग होतो.

झालेल्या व्यक्तीबरोबर शरीरसंबंध ठेवल्यास १० दिवसांनंतर केव्हाही याची लक्षणे दिसायला लागतात. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे पुरुषामध्ये शिश्नावर किंवा त्यावरच्या त्वचेखाली आणि स्त्रियांमध्ये योनिमार्गात किंवा गर्भाशयाच्या तोंडावर पुळी तयार होते. ही फुटून नंतर व्रण तयार होतो. हा व्रण वेदनारहित असतो

 त्यानंतर जांघेत एका वा दोन्ही बाजूच्या रसग्रंथी सुजतात. मात्र वेदना होत नाही.

उपचार न झाले तरी हा व्रण महिन्याभरात दुरुस्त होतो. या व्रणाला हात लावल्यास व नंतर हात डेटॉलने स्वच्छ न केल्यास स्पर्श करणाऱ्याला हा रोग होऊ शकतो. गरमी व सिफीलीसच्या दुसऱ्या अवस्थेत अंगावर न खाजणारे चट्टे येतात. शरीरात ठिकठिकाणी अवधाण येते, तोंडात व्रण येतात. तिसऱ्या अवस्थेत मेंदू, हृदय व हाडे यांवर या रोगाचा परिणाम दिसून येतो. हृदयाच्या झडपा निकामी होतात, महारोहिणीला कुमार देतो व ती कमकुवत होते. तसेच मेंदू व मज्जासंस्था खराब होतात. स्त्रिला सिफीलीस झाला असेल, तर वारंवार गर्भपात होतात व मूल जन्माला आलेच, तर त्यात व्यंगे असतात.


सिफीलीसच्या निदानासाठी प्राथमिक अवस्थेमध्ये जंतूंचा शोध घेता येतो. त्यानंतर मात्र VORL या तपासणीने शरीराने या जंतूंच्या विरोधात तयार केलेल्या प्रतिद्रव्यांची मोजणी केली जाते व रोगाचे निदान केले जाते.

या आजारावर पेनिसिलीनची इंजेक्शने फारच उपयुक्त ठरतात. दररोज एक असे १० ते १५ दिवस

पेलिसिलोनची इंजेक्शने वा एकच मोठा डोस दिल्यास रोग बरा होतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे  सिफीलीस असेल, तर पत्नीलाही उपचार द्यावे लागतात. दुसरे म्हणजे सिफीलीसवर इतर कोणतेही उपचार करू नयेत. काही समाजात असे गैरसमज आहेत की, कुमारिकांशी वा प्राण्यांशी शरीरसंबंध ठेवल्याने हा रोग बरा होतो. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. उलट त्यामुळे रोगप्रसार आणि विकृती निर्माण होतात. गुंतागुंतीचे संसर्ग होऊन मृत्यू येतो.


नैतिकता ठेवून वर्तन करणाऱ्याला सिफीलीससारखा रोग होणारच नाही. त्यामुळे केवळ एकमेकांशीच प्रामाणिकपणे शरीरसंबंध ठेवणाऱ्या पती-पत्नींना हा रोग कधीच होऊ शकणार नाही.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*


9 आँगष्ट जागतिक आदिवासी दिवस

 ********************************

     *९ ऑगस्ट - क्रांती दिन*

********************************


घटना : ९ ऑगस्ट १९४२


मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी ‍केलेली 'छोडो भारत'ची गर्जना ‍आणि दिलेला ''करेंगे या मरेंगे'' हा मंत्र नऊ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणातच मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे पाच वाजताच मुंबईत बिर्ला हाऊस मधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला, ''आता प्रत्येकजणच पुढारी होईल.''


ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. त्यांना सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. बाकीच्यांना पुढे नेण्यात आले. सरकारने गुप्तता पाळली तरी बातमी फुटलीच. गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किल्यात ठेवण्यात आल्याचे समजले.


नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागोजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली. पण लोक आता आदेश मानायला तयार नव्हते. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.


जणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध युद्ध पुकारले होते. संपूर्ण देश पेटला होता. दंगल, जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करत होती. सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता.


सरकारने या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवले. गांधीजींना याचा इन्कार करून याच्या निषेधार्थ २१ दिवसांचे उपोषणही केले. पण जगभरातील परिस्थितीही बदलत होती. युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकत होते. अमेरिका नावाची सत्ता उदयास येत होती. तिने युद्धाचे पुढारीपण घेतले होते. या साऱ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर क्रांती संग्रामाची तीव्रता ओसरली.

********************************

संकलन -)गजानन गोपेवाड

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

श्रावण मास,शुक्ल पक्ष, *प्रथमा*,अश्लेषा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, ०९ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"रिश्ते और मित्र बनाना इतना ही सरल है, जैसे मिटटी से, मिट्टी के ऊपर, मिट्टी लिखना.... किन्तु रिश्ते और मित्रता निभाना इतना ही कठिन है, जैसे पानी से, पानी के ऊपर, पानी लिखना।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

 *👨‍🔬👨‍🔬👨‍🔬विष्णू गणेश भिडे👨‍🔬👨‍🔬👨‍🔬*

👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬👨‍🔬

*भौतिकशास्त्रज्ञ, विज्ञानप्रसारक*

🗻🌋🗻🌋🗻🌋🗻🌋🗻🌋🗻

*जन्मदिन - ८ आॅगस्ट १९२५*


घनस्थिती भौतिकी आणि सौरऊर्जा या क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हणून मान्यता पावलेले डॉ. विष्णू गणेश भिडे यांचा जन्म दर्यापूर येथे झाला. नागपूर विद्यापीठाची भौतिक- शास्त्रातील एम.एस्सी. पदवी त्यांनी प्रथम क्रमांकाने, अनेक बक्षिसे आणि शिष्यवृत्त्यांसह पटकावली आणि लगेच तेथेच ते व्याख्याते म्हणन रुजू झाले. त्यांच्या ‘इलेक्ट्रिकल डिस्चार्जेस’ या विषयावरील प्रबंधास नागपूर विद्यापीठाने १९५३ साली डॉक्टरेट दिली. ‘ऑप्टिकल अ‍ॅण्ड इंटर फेरोमेटिक स्टडीज ऑफ सम आस्पेक्ट्स ऑफ क्रिस्टल ग्रोथ’ या विषयावरील त्यांच्या प्रबंधावर लंडन विद्यापीठाची डॉक्टरेट त्यांनी १९५६ साली मिळवली. पुढे मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक व नंतर विभागप्रमुख या नात्याने ते काम पाहू लागले.


इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे फेलो, इंडियन फिजिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष, १९७१ साली बंगळुरू येथील इंडियन सायन्स काँग्रेसच्या भौतिकशास्त्र विभागाचे अध्यक्ष अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषवली आहेत.


१९६६ साली ते दिल्लीच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीत उपसंचालक या नात्याने काम पाहू लागले. मध्ये काही वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. घनस्थिती भौतिकीच्या क्रिस्टल ग्रेथ, फेरो इलेक्ट्रिसिटी, फेरोमॅग्नेटिझम, लिक्विड क्रिस्टल, मॉसबॉअर आणि एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी वगैरे बऱ्याच शाखांत त्यांनी संशोधन केलेले आहे.


शंभरहून अधिक संशोधनपर निबंध आणि अर्धे शतक पीएच.डी. विद्यार्थी त्यांच्या कर्तृत्वाची ग्वाही देत आहेत. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, झेकोस्लोव्हाकिया, रशिया, इस्रायल, जपान इत्यादी प्रगत देशांनीही त्यांना वेळोवेळी सन्मानाने बोलावून त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेतलेला आहे. कित्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिक संस्थांचे ते पदाधिकारी हेाते. १९७४ साली ते सौरऊर्जेसंबंधी एका राष्ट्रीय समितीचे कार्याध्यक्ष होते. त्या अधिकारात त्यांनी युनोला भेट दिली. ‘यू.एन. इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशन’ या संस्थेचेही ते उपाध्यक्ष होते. सौरऊर्जेवर एक उत्तम गट त्यांनी तयार केला आहे. या सौरऊर्जेचा खेड्यांच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल, यासंबंधीचे संशोधन त्यांनी चालू केले. पुणे विद्यापीठामध्ये ऊर्जा विभाग स्थापन करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. या विभागाच्या भरभराटीत त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. पुणे विद्यापीठात आल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत चांगले निर्णय घेतले गेले.


प्रा. वि.ग. भिडे यांनी आपल्या प्रावीण्याचा ठसा सर्वत्र उमटविला. पुणे विद्यापीठातील अनेक तरुण संशोधकांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यानंतर प्रा. वि.ग. भिडे यांना पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी आरूढ होण्याची संधी मिळाली. या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला. पुणे विद्यापीठाचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक नवीन योजना अमलात आणल्या. संशोधनाला चालना मिळावी, यासाठी त्यांनी ‘आयुका’ (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्टॉनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्टॉफिजिक्स), तसेच एन.सी.आर.ए. (नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी) यांसारख्या संस्था पुणे विद्यापीठाच्या आवारात आणण्यासाठी पुढाकार घेतला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले. त्यांच्या कुलगुरुपदाच्या कारकिर्दीमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रश्‍न खूप मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले. सरकारी महाविद्यालये व नवीन सरकारमान्य खाजगी महाविद्यालये यांच्यामध्ये असणारा दुरावा प्रा. वि.ग. भिडे यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणात कमी केला.


कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्यानंतर प्रा. वि.ग. भिडे यांनी २००० साली इंडियन सायन्स काँग्रेसचे अधिवेशन, पुणे विद्यापीठात भरले. त्या अधिवेशनात मुलांच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी प्रा. सी.एन. राव यांनी प्रा. वि.ग. भिडे यांच्यावर टाकली होती. त्यांनी आपल्या कार्याची दिशा ही विज्ञान प्रसार व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याकडे वळविली. या कार्यात त्यांनी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले. विज्ञान शोधिका स्थापन करण्याची त्यांची कल्पना ही अभिनव अशीच होती. शालेय व महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना विज्ञान हे अत्यंत अयोग्य पद्धतीने शिकवले जाते, याची त्यांना खंत होती. प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान शिकता यावे, यासाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा त्यांनी संकल्प केला. ‘भारतीय विज्ञान भवन’ या संस्थेच्या सहकार्याने त्यांनी हा उपक्रम प्राथमिक स्तरावर सुरू केला. प्रा. वि.ग. भिडे यांना मानणारे शिक्षक, प्राध्यापक, तसेच विज्ञानाची आवड असणाऱ्या व्यक्ती यामध्ये सामील झाल्या. अगदी कमी आर्थिक मदतीत उपक्रम कसे राबवावेत, याची प्रा. वि.ग. भिडे यांना चांगलीच कल्पना होती. किंबहुना त्यांचे याबाबतचे वर्तन हे आदर्श होते.


प्रा. वि.ग. भिडे यांच्यासाठी काम करताना कोणीही कधीही पैशाची मागणी करीत नसे. प्रा. वि.ग. भिडे यांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही, हेच धोरण त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये होते. विज्ञान शोधिका त्यांनी अशा प्रकारे चालवून तिचा विकास केला. या प्रयोगासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडून विनामूल्य जागा मिळविली. याच जागेवर आज विज्ञान शोधिकेची भव्य वास्तू उभी आहे.


कार्यमग्न राहणे हे प्रा. वि.ग. भिडे यांचे वैशिष्ट्य होते. निवृत्तीनंतर त्यांच्या कामाचा झपाटा अधिकच वाढला, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. या काळात त्यांनी महाराष्ट्रात व नागपूरमध्ये ठिकठिकाणी अनेक व्याख्याने दिली. यांतून त्यांनी ‘बाल विज्ञान चळवळी’ची कल्पना पुढे मांडली. महाराष्ट्रात विज्ञान प्रसार करणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु या संस्था स्थानिक पातळीवर त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे कार्य करतात. या सर्व संस्थांना एकत्रित करून चळवळ निर्माण करावी, असे प्रा. वि.ग. भिडे यांना वाटले. त्यांनी या सर्व संस्थांना एकत्र आणले आणि ‘बाल विज्ञान चळवळी’ची स्थापना केली. या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रमांची आखणी केली व ते त्यांनी यशस्वीपणे राबविले.डॉ.अब्दुल कलाम यांनी या कार्यात सहभाग घेतला.


प्रा. वि.ग. भिडे यांच्या या महत्त्वपूर्ण कार्यात प्रा. यशपाल, डॉ. बालसुब्रमण्यम,डॉ.जयंत नारळीकर,डॉ.विजय भटकर,डॉ. अशोक कोळस्कर,डॉ.पंडित विद्यासागर या आणि अशा अनेक गणमान्य व्यक्तींनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांसाठी विज्ञानावरील उत्कृष्ट पुस्तके आणावीत,असा त्यांचा मानस होता. त्यातून विज्ञान शोधिका अंतर्गत पुस्तकांची निर्मिती केली गेली. या प्रयोगात अनेक दर्जेदार पुस्तकांची निर्मिती झाली. काही कारणांमुळे ही योजना पुढे चालू राहिली नाही, तरी दर्जेदार पुस्तकांच्या निर्मितीचा वस्तुपाठ यामधून घातला गेला.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *अमावस्या*,पुष्य नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, ०८ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"अधिक मीठा बोलने वाला कभी-कभी हानिकारक हो सकता है, सचेत रहें। नीम की तरह कड़वा ज्ञान देने वाला ही अधिकांशतः सच्चा मित्र होता है। विज्ञान एवं आयुर्वेद के अनुसार भी यही शास्वत सत्य है कि नीम परम् औषधि है और नीम में कीड़े नहीं पड़ते। किन्तु मिठाई में कीड़े के साथ बीमारी भी होती है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

गाथा बलिदानाची गुरूदेव रवींद्रनाथ टागोर

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची🇮🇳🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿


*🇮🇳🇮🇳रवींद्रनाथ टागोर🇮🇳🇮🇳*


 जन्म   -) ७ मे १८६१

 मृत्यू    -)  ७ ऑगस्ट १९४१


      जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक. रवींद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे पिरालीनामक ब्राह्मणांच्या ठाकूर उपनावाच्या कुटूंबात झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ (१८१७–१९०५) आणि आई शारदादेवी (१८२६/२७–१८७५). त्यांच्या एकूण पंधरा अपत्यांपैकी रवींद्रनाथ चौदावे. ठाकूर कुटुंबाचे मूळ आडनाव कुशारी. वर्धमान जिल्ह्यातील ‘कुश’ हे त्यांचे मूळ गाव. तेथून यशोहर गावी स्थलांतर. जातिबहिष्कारामुळे आपले यशोहर (जेसोर) गाव सोडून महेश्वर व शुकदेव हे त्यांचे पूर्वज कलकत्त्याच्या दक्षिणेला गोविंदपूर गावी स्थायिक झाले. पुढे पंचानन कुशारी ह्या पूर्वजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचे ठेके घ्यायला सुरुवात केली. त्या काळी ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणांना ‘ठाकूर मोशाय’ अशा बहुमानार्थी नावाने संबोधीत. इंग्रज कप्तानांनी ‘ठाकूर’ चा ‘टागोर’ असा उच्चार केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या बरोबर टागोर कुटुंबाचीही भरभराट झाली. इंग्रज व्यापारी, राज्यकर्ते आणि ज्ञानोपासक ह्यांच्यात वावर असणाऱ्‍या नव्या सरंजामदारांत टागोर घराण्याचाही अंतर्भाव झाला. त्यांपैकीच राजा राममोहन रॉय (१७७२–१८३३) यांनी बंगालच्या सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यांच्या भूमिकेशी रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ एकरूप झाले. सार्वजनिक कार्याला त्यांनी केवळ आर्थिकच नव्हे, तर स्वतः उत्तम कायदेपटू आणि व्यासंगी असल्यामुळे वैचारिक परिवर्तनाच्या कार्यातही भाग घेऊन साहाय्य केले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र देवेंद्रनाथ हे रवींद्रनाथांचे तीर्थरूप. बंगाली ब्राह्मसमाजाच्या स्थापनेत आणि प्रसारात त्यांचा फार मोठा वाटा आहे. ब्राह्मसमाजाचे अनुयायी त्यांचा महर्षी देवेंद्रनाथ असा उल्लेख करीत. सर्व प्रकारच्या ऐहिक सुखसंपत्तीची अनुकूलता असूनही उपनिषदांतील तत्त्वज्ञानाच्या गाढ व्यासंगामुळे आणि जन्मजात ईशप्रेमामुळे देवेंद्रनाथांच्या अंगी विरक्ती बाणलेली होती.

रवींद्रनाथांचे बंधू द्विजेंद्रनाथ (१८४०–१९२६) हे कवी आणि तत्त्वचिंतक; सत्येंद्रनाथ (१८४२–१९२३) हे पहिले भारतीय आय्. सी. एस्. अधिकारी व व्यासंगी लेखक; ज्योतिरिंद्रनाथ (१८४९–१९२५) हे नाटककार, संगीतरचनाकार व भाषांतरकार; भगिनी स्वर्णकुमारी (१८५५–१९३२) ह्या कादंबरीकर्त्या. जोडासाँको भागातील वाड्यात पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खिडकीतून बाहेरची निसर्गशोभा पाहत बसणे, हा रवींद्रनाथांचा बालपणीचा विरंगुळा होता. ‘जॉल पॉडे पाता नॉडे’ (पाणी पडे-पान झुले) ह्या लहानशा ओळीतल्या छंदाने व यमकाने त्यांच्या बालमनात शब्दांचे नृत्य सुरू झाले. घरात काव्य, शास्त्र, विनोद, नाट्य, संगीत यांचे अप्रत्यक्ष संस्कार घडत होते. त्यामुळे पाठशाळेतील आनंदशून्य शिक्षण त्यांना रुचेना. १८७४ साली कलकत्त्याच्या सेंट झेवियर्स स्कूलमधील परीक्षा ते उत्तीर्ण झाले नाहीत. त्यानंतर त्यांचे शिक्षण त्यांचे बंधू हेमेंद्रनाथ (१८४४–८४), द्विजेंद्रनाथ आणि ज्योतिरिंद्रनाथ यांच्या देखरेखीखाली मातृभाषेतून सुरू झाले. रवींद्रनाथांना निसर्गतः लाभलेल्या रूपसौंदर्याइतकीच मधुर आवाजाचीही उपजत देणगी होती. ‘मला कधी गाता येत नव्हते असे आठवत नाही’, असे त्यांनी म्हटले आहे. आदी ब्राह्म समाजाचे गायक विष्णुचंद्र चक्रवर्ती (१८०४–१९००) हे त्यांचे पहिले गायनगुरू. यदुभट्ट यांच्याहीपाशी त्यांचे संगीतशिक्षण झाले. मात्र संगीताच्या कुठल्याही विशिष्ट प्रणालीत त्यांनी स्वतःला बांधून घेतले नाही. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी रचलेल्या शेकडो गीतांत चालींची विविधता आढळून येते. तिचे मूळ ह्या चोहोकडून मिळवलेल्या गाण्यांत आहे. जे संगीतात तेच साहित्यात. ज्येष्ठ बंधूंच्या ग्रंथसंग्रहातील थोर लेखकांचे ग्रंथ, अबोधबंधु, वंगदर्शन यांसारखी नियतकालिके, बालवयात वाचीत असताना नोकरचाकरांच्या सहवासात चाणक्य श्लोक, कृत्तिवासाचे रामायण, महाभारातांतील कथा, विद्यापती, चंडिदास यांची काव्ये यांचेही श्रवण चालत असे. लहानपणी त्यांना इंग्रजी शिकवायला येणाऱ्‍या अघोरबाबू नावाच्या शिक्षकामुळे साहित्याइतकीच रवींद्रनाथांना विज्ञानाचीही गोडी उत्पन्न झाली आणि ती आयुष्याच्या अखेरीपर्यत टिकली.


बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलपूरजवळ एक विस्तीर्ण माळ रायपूरच्या जमीनदाराकडून देवेंद्रनाथांनी विकत घेऊन तेथे एक कुटिर बांधले. पुढे त्याचीच दुमजली इमारत केली. तिचे नाव ‘शांतिनिकेतन’. जवळच असलेल्या सप्तपर्णीच्या विशाल वृक्षाखाली महर्षी देवेंद्रनाथ ध्यानाला बसत. रवींद्रनाथांचा संस्कृत, इंग्रजी भाषांचा अभ्यास स्वतः देवेंद्रनाथांनी इथल्या वास्तव्यात करून घेतला. ज्योतिर्विद्येची त्यांना गोडी लावली. रवींद्रनाथांचे काव्यलेखन बालवयातच सुरू झाले होते.तत्त्वबोधिनी पत्रिका नावाच्या नियतकालिकात त्यांची ‘अभिलाष’ ही कविता प्रसिद्ध झाली. त्या वेळी ते बारा वर्षाचे होते. देशप्रेम, सामाजिक सुधारणांचा प्रचार यासाठी टागोर कुटुंबियांच्या साहाय्याने नवगोपाळ मित्र, राजनारायण बसू वगैरे समाजसुधारक कलकत्त्यात ‘हिंदु मॅला’ नावाने एक उत्सव साजरा करीत. त्याच्या नवव्या अधिवेशनात रवींद्रनाथांनी वयाच्या चौदाव्य वर्षी (१८७४) देशप्रेमाने प्रेरित होऊन लिहिलेली ‘हिंदु मॅलाय उपहार’ ही कविता वाचली. ह्याच सुमाराला त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले. नंतर बंधू ज्योतिरिंद्रनाथ आणि वहिनी कादंबरी देवी यांचे छत्र त्यांना लाभले.


बंगालमध्ये ब्रिटिश विरोधी चळवळींनी जोर धरला होता. अशा वेळी इटालियन देशभक्त मॅझिनी याच्या ‘कार्बोनारी’ सारख्या क्रांतिकारकांच्या ‘संजीवनी सभा’ नावाच्या गुप्त मंडळात ते दाखल झाले. राजनारायण बसू ह्या मंडलाचे सूत्रचालक होते. हे मंडळ फार काळ टिकले नाही. इथून पुढे रवींद्रनाथांच्या लेखनाने खूप वेग घेतला. १८७६ सालापासून ज्ञानांकुर ओ प्रतिबिंबह्या नियतकालिकातून त्यांच्या कथा, कविता, निबंध तसेच भाषांतरित लेख प्रसिद्ध होऊ लागले. आठ सर्गांचे बनफूल(१८८०) हे खंडकाव्यही याच काळातले. वैष्णव संत कवींच्या धर्तीवर ‘भानुसिंह’ ह्या टोपणनावाने ब्रजबुलीत त्यांनी गीत लिहिली. मात्र कुमारवयातील आपल्या या साहित्यरचनेतील अपरिपक्वतेची रवींद्रनाथांना जाणीव होती. भारती ह्या टागोर कुटुंबातर्फे प्रसिद्ध होणाऱ्‍या मासिकातून १८७३ नंतर त्यांनी पुष्कळ लेखन केले. १४ ते १६ वर्षे वयातील त्यांच्या कविता त्यानंतर बऱ्‍याच वर्षांनी शैशव-संगीत (१८८४) ह्या नावाच्या संग्रहात प्रसिद्ध झाल्या. भारतीतून प्रसिद्ध झालेल्या साहित्यातकविकाहिनी नावाचे काव्य-नाट्य होते. १८७८ साली ते ग्रंथरूपाने छापून प्रसिद्ध झाले. रवींद्रनाथांचा हा पहिला मुद्रित ग्रंथ. याच सुमाराला त्यांचे बंधू सत्येंद्रनाथ यांनी रवींद्रनाथांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवायचे ठरविले. विलायती रीतिरिवाज आणि इंग्रजी भाषेतील संभाषणात अधिक सफाई येण्यासाठी त्यांनी रवींद्रनाथांना अहमदाबादेतील आपल्या प्रासादतुल्य सरकारी बंगल्यात मुक्कामासाठी आणले. वाचन, लेखन, गीतरचना, त्या गीतांना चाली देणे ह्या कार्यासाठी रवींद्रनाथांनी येथील निवांततेचा उपयोग करून घेतला. ‘क्षुधित पाषाण’ ह्या त्यांच्या सुप्रसिद्ध कथेचे बीज ह्या ऐतिहासिक वास्तूवरून त्यांच्या मनात रुजले. उत्तम इंग्रजी ग्रंथांचे अध्ययन आणि कालिदासाच्या काव्याचा त्यांचा अभ्यास येथेच झाला.


सत्येंद्रनाथांनी त्यानंतर इंग्रजी रीतिरिवाजाच्या अभ्यासासाठी त्यांची सोय मुंबईला डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खड यांच्या बंगल्यात सधन, सुशिक्षित आणि पाश्चात्त्य धाटणीची रहाणी असलेल्या कुटुंबात केली. तत्कालीन बंगालमधील श्रीमंत घराण्यातील स्त्रिया अंतःपुरातच असत. स्त्रियांच्या बाबतीत पुरुषातही एक प्रकारचा संकोच असे. तर्खडांच्या घरातील मोकळ्या वातावरणाने आणि विशेषतः डॉ. तर्खड यांची कन्या अन्नपूर्णा (आन्ना) हिच्या सहवासाने रवींद्रनाथांचा हा बुजरेपणा गेला. ह्या स्नेहबंधनातून निर्माण झालेली अनेक गीते शैशष–संगीत ह्या संग्रहात आहेत. १८७८ साली ⇨ सत्येंद्रनाथ टागोरांच्या बरोबर रवींद्रनाथ इंग्लंडला गेले. तेथे लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये हेन्री मॉर्ली यांच्यापाशी त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. तेथून भारतीमध्ये त्यांची ‘यूरोपयात्री कोनो वंगीय तरुणेर पत्र’ ह्या शीर्षकाखाली यूरोपीय जीवन आणि संस्कृतीसंबंधीची पत्रे प्रसिद्ध होऊ लागली. इंग्लंडमधील समाजजीवनासंबंधी त्यांत प्रतिकूल टीका असल्यामुळे इंग्रज धार्जिण्या उच्चभ्रू बंगाली समाजाचा त्यांच्यावर रोष झाला. १८८० साली त्यांना परत बोलावून घेण्याचे हेही एक कारण असावे असे म्हणतात. मात्र इंग्लंडमधील वास्तव्यात तेथील स्त्रीवर्गाला मिळणाऱ्‍या सामाजिक व्यवहारातील स्वातंत्र्याचा त्यांच्या मनावर अनुकूल परिणाम झाला. यूरोप प्रवासातील पत्रे १८८१ साली युरोप प्रवासीर पत्र नावाने प्रसिद्ध झाली. बंगालीच्या लोकव्यवहारातील (चलित) भाषेतील हा पहिला ग्रंथ मानला जातो. त्यानंतरच्या काळात रवींद्रनाथांनी बंगाली ग्रांथिक (साधू) भाषेला सहज भाषेचे वळण देण्यात फार मोठे यश मिळविले. इंग्लंडमधून रवींद्रनाथ कोणतीही शैक्षणिक पदवी न मिळवता परतले. मात्र तिथल्या वास्तव्यात चौतीस प्रवेशांचे व चार हजार ओळींचे भग्नहृदय (१८८१) हे अपुरे नाट्य-काव्य त्यांनी लिहिले. भारतात आल्यावर ते पुरे केले. पौगंडावस्थेतील बुजऱ्‍या रवींद्रनाथांचे, पाश्चात्त्य जगातील गतिशीलता, स्वतंत्रता यांसारख्या सद्‌गुणांच्या प्रभावामुळे एका धीट, स्पष्टवक्त्या तरुणात रूपांतर झाले होते. १८८१ साली त्यांनी वाल्मिकी प्रतिभा ही पहिली संगीतिका लिहून तिचा जोडासाँको येथील टागोर वाड्यात पहिला प्रयोग केला. त्या संगीतिकेतील गीतांत भारतीय मार्गी व देशी संगीताप्रमाणे यूरोपीय ललित संगीताचाही वापर केला होता. जे सूर भावनेच्या अभिव्यक्तीला अधिक परिणामकारक वाटतील, त्यांचा गीतगायनात मुक्तपणाने उपयोग करण्याच्या ह्या प्रवृत्तीतूनच ⇨ रवींद्रसंगीत निर्माण झाले.


रवींद्रनाथांची साहित्य, संगीत, कलासाधना उत्साहाने चालू असताना त्यांना पुन्हा एकदा इंग्लंडला पाठवून बॅरिस्टर करण्याचा कुटुंबातील वडील मंडळींनी प्रयत्न केला; परंतु विलायतेच्या बोटीत चढण्यापूर्वी मद्रास बंदरातूनच ते परतले आणि कलकत्त्याला आपले बंधू ज्योतिरिंद्रनाथ आणि वहिनी कादंबरी देवी यांच्या बिऱ्‍हाडी राहू लागले. येथे त्यांच्या कलासाधनेला अधिक पोषक वातावरण लाभून त्यांच्या निर्मितिक्षम प्रतिभेचे उन्मेश जोमाने प्रकट होऊ लागले. स्पेन्सरच्या ‘द ऑरिजिन अँड फंक्शन ऑफ म्यूझिक’ ह्या निबंधाने प्रभावित होऊन त्यांनी ‘संगीताची उत्पत्ती आणि उपयोगिता’ ह्या विषयावरचा निबंध लिहिला. भारतीय संगीतातील रागप्रधान संगीत भावनाशून्य झाल्याची चिंता त्यात व्यक्त झाली आहे. त्या विवेचनात त्यांचा ओढा गीतगायनाकडे अधिक असला, तरी त्यानंतर तीस वर्षांनी त्यांनी स्वरप्रधान संगीताचे ऐश्वर्य व स्वयंसिद्ध स्थान मान्य केले. त्या काळी त्यांच्या काव्यरचनेचा मूलस्त्रोत संगीत हाच होता. त्यांच्या तत्कालीन काव्यसंग्रहांची नावेदेखील संध्या संगीत(१८८२), प्रभात संगीत (१८८२), शैशवसंगीत, छबि ओ गान (१८८४), कडि ओ कोमल (१८८६, म. शी. तीव्र आणि कोमल) अशी संगीताशी नाती सांगणारी आहेत. बंधू ज्योतिरिंद्रनाथांच्या बंगल्यात रहात असताना आलेल्या साक्षात्कारासारख्या एका विलक्षण अनुभवातून त्यांची ‘निर्झरेर स्वप्नभंग’ ही अप्रतिम कविता निर्माण झाली. जीवनस्मृति(१९१२) ह्या ग्रंथात त्या अनुभूतीचे सविस्तर वर्णन त्यांनी केले आहे. इथून पुढे त्यांच्या काव्यजीवनातील विषादपर्व संपून आनंदपर्व सुरू झाले.


सत्येंद्रनाथांबरोबर काही काळ कारवारलाही ते राहिले. तिथल्या निसर्गरम्य आणि शांत वातावरणात त्यांच्या प्रतिमेला खूप बहर आला. प्रकृतीर प्रतिशोध (१८८४) ही नाटिका त्यांनी येथील मुक्कामात लिहिली. १८८३ साली कारवारहून कलकत्त्याला परतल्यानंतर, महर्षी देवेंद्रनाथांच्या जमीनदारीची व्यवस्था पाहणाऱ्‍या कारकुनांपैकी वेणीमाधव रायचौधुरी ह्या सामान्य परिस्थितीतील पिराली ब्राह्मण गृहस्थाची मुलगी भवतारिणी (जन्म १८७३) हिच्याशी त्यांचा विवाह झाला. नूतन वधूचे नाव ‘मृणालिनी’ असे ठेवण्यात आले. देवेंद्रनाथांनी तिच्या शिक्षणाची व्यवस्था लॉरेटा हाऊस ह्या विद्यालयात केली. मृणालिनी देवींनी रवींद्रनाथांच्या जीवनात एक अत्यंत कर्तव्यपरायण गृहिणी होऊन त्यांच्या संसाराचा भार वाहिला. १८८४ साली ज्योतिरिंद्रनाथांच्या पत्‍नी कादंबरी देवी यांनी आत्महत्या केली. रवींद्रनाथांच्या मनावर ह्या घटनेचा फार मोठा आघात झाला. रवींद्रांच्या तरुण काळात झालेले हे दुःख त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांना जाणवत राहिले होते; पण त्यांनी आपल्या जीवनात कुठलीही अवस्था अखेरची मानली नाही. म्हणून ह्या मृत्युशोकानेही त्यांना आपल्या कर्तव्यापासून परावृत्त केले नाही. त्याच वर्षी ते आदी ब्राह्म समाजाचे कार्यवाह झाले आणि ज्येष्ठ बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र चतर्जी यांच्याशी हिंदू धर्मातील आदर्शांबद्दल त्यांचा जाहीर वादविवाद झाला.


१८८५ साली ठाकूर परिवारातर्फे निघणाऱ्‍या बालक ह्या मासिकाच्या संपादिका ज्ञानदानंदिनी देवी (सत्येंद्रनाथांच्या पत्नी) यांना त्यांनी संपादनात साहाय्य करायला सुरुवात केली. त्याच वर्षी रविच्छाया हा त्यांचा गीतसंग्रह प्रसिद्ध झाला. १८८६ साली त्यांची ज्येष्ठकन्या माधुरीलता (बेला) हिचा जन्म झाला. डिसेंबर महिन्यात कलकत्त्याला राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन भरले. ह्या प्रसंगी ‘आमरा मिले छि आज मायेर डाके’ (आईच्या हाकेच्या आज आपण जमलो आहोत) ह्या त्यांच्या कवितेच्या गायनाने अधिवेशनाला जमलेले प्रतिनिधी अत्यंत प्रभावित झाले होते. त्यांचा कडि ओ कोमल हा संग्रहही याच काळातील. आदी ब्राह्म समाजाच्या कार्यातही त्यांनी उत्साहाने भाग घेऊन समाजाच्या माघोत्सवासाठी धर्मसाधकाच्या अंतरातील व्याकुळ भाव व्यक्त करणारी सव्वीस नवीन गाणी रचून त्यांना चाली दिल्या होत्या.


ह्या वर्षीच्या इतर रचनांमध्ये धार्मिक आणि सामाजिक कालबाह्य आचार विचारांचा पाठपुरावा करणाऱ्‍याचे विडंबन करणाऱ्‍या काही विनोदी नाटिका लिहून त्यांनी विरोधकांचा रोषही ओढवून घेतला. साहित्यदृष्ट्या ह्या नाटिकांना विशेष महत्त्व नसले, तरी तरुण रवींद्रनाथांची धर्मसुधारणेच्या बाबतची तडफ यांतून प्रत्ययाला येते. १८८७ ते १८९० ह्या काळातील मानसी (१८९०) हा काव्यसंग्रह, मायार खेला (१८८८) ही संगीतिका आणि राजा ओ रानी (१८८९) हे नाटक अशासारखी रचना पाहिल्यानंतर त्यांच्या साहित्यनिर्मितीत एक निराळे परिवर्तन आढळते.


ही कलासाधना चालू असताना सामाजिक परिवर्तनासाठी बंगालमध्ये चालू असलेल्या चळवळीशी त्यांनी संबंध ठेवला होता. १८८८ साली त्यांचे ज्येष्ठ पुत्र रथींद्रनाथ यांचा जन्म झाला. १८८९ साली सोलापुरातील आपले बंधू सत्येंद्रनाथ यांच्या घराचा मुक्काम आटोपून परतताना त्यांनी पुण्याला पंडिता रमाबाईंचे व्याख्यान ऐकले. पुराणमतवादी लोकांनी आरडाओरडा करून ते व्याख्यान बंद पाडलेले पाहून ते अत्यंत व्यथित झाले. त्यांनी स्त्री स्वातंत्र्यासंबंधीच्या विचारांना चालना देणारा लेख लिहिला. नंतरच्या काळात स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्याचाही त्यांनी पुरस्कार केला. नव-वंग-आंदोलनावरही एक निबंध याच सुमाराला लिहिला आणि लॉर्ड क्रॉस ह्याच्या भारतविरोधी धोरणाचा समाचार घेतला. १८९० साली इंग्लंडचा तीन महिन्याचा दौरा आटपून ते परतले. याच वर्षी जोडासाँको येथील वाड्यात त्यांनी लिहिलेल्या विसर्जन (१८९०) नाटकाचा प्रयोग झाला. त्यातील रघुपतीची भूमिका त्यांनी स्वतः केली होती. देवेंद्रनाथांनी उत्तर बंगालमधील तीन परगण्यांत पसरलेल्या जमीनदारीची व्यवस्था आता त्यांच्यावर सोपवली. जमिनदारीची कामे पाहताना रवींद्रनाथांनी रयतेच्या हिताची नवीन कामे सुरू केली. १८९० ते १९०० अशी दहा वर्षे त्यांनी ग्रामीण विभागात काढली. १८९१ साली शिलाइदह ह्या गावी त्यांची दुसरी कन्या रेणुका हिचा जन्म झाला. जमिनदारीच व्यवस्था पाहण्याच्या कामामुळे बंगालच्या ग्रामीण जीवनाशी त्यांचा खूप जवळून परिचय झाला. त्या अनुभवातूनच त्यांच्या उत्कृष्ट कथांचा जन्म झाला. हितवादी नावाच्या साप्ताहिकातून त्या दर आठवड्याला प्रसिद्ध होत गेल्या. १८९१ साली त्यांनी साधना मासिक सुरू करून आपला पुतण्या सुधींद्रनाथ याला संपादक नेमले. त्यातूनशोनार तरी (१८९४), पंचभूतेर डायरी (पंचभूत–१८९७) यांसारखे त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले, १८९४ साली त्यांनी संपादनाची सूत्रे स्वतःकडे घेतली आणि ती १८९५ साली ते मासिक बंद पडेपर्यंत सांभाळली. आपली पुतणी इंदिरा देवी हिला लिहिलेली आणि त्यानंतर छिन्नपत्र (१९१२) या नावाने संगृहित झालेली त्यांची अप्रतिम पत्रे ह्याच मासिकातून प्रथम प्रसिद्ध झाली.


मीरा हिचा १८९३ साली आणि कनिष्ठ पुत्र शमींद्र याचा १८९४ साली जन्म झाला. १८९३ साली बंकिमचंद्र चतर्जींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका जाहीर सभेत ‘राष्ट्रीय विकासाचा मूलभूत पाया ग्रामीण विकास हा आहे’ हा विचार त्यांनी ‘इंग्रज ओ भारतवासी’ ह्या आपल्या लिखित भाषणातून मांडला. मातृभाषेतून शिक्षण, स्वावलंबन आणि स्वाभिमान हा स्वदेशी चळवळीचा कणा आहे, हा विचार त्यांनी या प्रसंगी सांगितला. कथा ओ काहिनी (१९०८) मध्ये भारतीय इतिहासातील वीरकथा त्यांनी कवितेत गुंफल्या. बंगाली ‘शब्द व छंद’ ह्या संबंधातील त्यांचे बहुमोल लेखनही ह्याच काळातील आहे. १८९६ च्या डिसेंबर महिन्यात कलकत्त्याच्या काँग्रेसच्या अधिवेशनात बंकिमचंद्राच्या ‘वंदेमातरम्’ ह्या गीताला रवींद्रनाथांनी चाल दिली व ते गीत स्वतः म्हटले. राष्ट्रीयसभेत ‘वंदेमातरम्’ गायिले जाण्याचा हा पहिला प्रसंग. पुढल्याच वर्षी नटोर येथे काँग्रेसचे प्रादेशिक अधिवेशन भरले असताना रवींद्रनाथांनी बंगालीतून भाषण करून प्रतिनिधींना आश्चर्याचा धक्का दिला.


मुक्त वातावरणात, निसर्गसान्निध्यात आणि गुरुजनांबरोबर राहून उपनिषदांच्या काळात जसे शिक्षण चालत असे, त्या पद्धतीचा प्रयोग करण्याच्या विचारातून महर्षी देवेंद्रनाथांनी बोलपूरजवळ बांधलेल्या ‘शांतिनिकेतन’ बंगल्यात १९०१ साली त्यांनी आश्रमशाळेची स्थापना केली. ती इमारत व सारी जमीन महर्षींनी एक विश्वस्त निधी स्थापून शाळेला देऊन टाकली. नैवेद्य(१९०२) ह्या कविता संग्रहातील त्यांच्या कवितांतून हा मुक्त मनाने सारे जीवन समजून घेण्याचा ध्येयवाद प्रकट झाला आहे (‘चित्त जेथा भयशून्य उच्च जेथा शिर’ ही सुप्रसिद्ध प्रार्थना ह्याच संग्रहात प्रसिद्ध झाली). ह्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनीवंगदर्शन ह्या बंकिमचंद्रांनी स्थापन केलेल्या नियतकालिकांचे संपादकत्व स्वीकारले. चोखेर बाली (१९०३) ही त्यांची भारतीय भाषांतली पहिली म्हणता येईल अशी मनोविश्लेषणात्मक कादंबरी वंगदर्शनातूनच क्रमशः प्रसिद्ध झाली. चिरकुमार सभा(१९२६) हे विनोदी नाटकही याच वर्षी लिहून त्यांनी भारतीतून प्रसिद्ध केले. ऑक्टोबर महिन्यात ते शिलाइदहहून सहकुटुंब शांतिनिकेतनात आले आणि तपोवन पद्धतीची शाळा सुरू करण्याच्या कार्याला अधिक नेटाने लागून २२ डिसेंबर १९०१ ह्या दिवशी वडिलांचा आशिर्वाद घेऊन त्यांनी आश्रमशाळेची स्थापना केली. त्यांच्या बरोबर आलेल्या पहिल्या शिक्षकांत ब्रह्मबांधव उपाध्याय, रेवाचंद, जगदानंद राय, शिवधन विद्यारण्य आणि लॉरेन्स हे इंग्रज गृहस्थ होते.


नवीन आश्रमशाळा सुरू झाल्याच्या काळात त्यांना अनेक आर्थिक आणि कौटुंबिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. १९०२ मध्ये नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या पत्नींना गंभीर दुखणे झाले आणि २३ नोव्हेंबर रोजी वयाच्या अवघ्या एकोणतिसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. पुढल्याच वर्षी त्यांची कन्या रेणुका वारली (१९०३). सतीशचंद्र राय ह्या बुद्धिमान आणि त्यागी सहकारी मित्रालाही तरुण वयात मृत्यू आला. ह्या साऱ्‍या आपत्तींना तोंड देत असताना देशातील राजकीय चळवळींत त्यांचे सहकार्य चालू होते. ‘स्वदेशी समाज’ हा ग्रामीण पुनर्रचनेसंबंधीचा सुप्रसिद्ध निबंध याच वर्षी त्यांनी लिहिला. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून ‘शिवाजी उत्सव’ सुरू केला आणि ‘शिवाजी’ ही देशभक्तीला प्रेरणा देणारी स्फूर्तिदायक दीर्घ कविताही लिहिली. विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी पुस्तके लिहिली. नौकाडुबी (१९०६) ही कादंबरीही ह्याच काळात क्रमशः प्रसिद्ध होत होती. १६ मार्च १९०५ रोजी महर्षी देवेंद्रनाथांचे निधन झाले.


लॉर्ड कर्झन यांनी १९०५ मध्ये केलेल्या वंगभंगाच्या निर्णयाविरुद्ध देशभर प्रतिकाराची चळवळ सुरू झाली होती. बंगालच्या अभेद्यतेचे प्रतिक म्हणून रवींद्रनाथांनी ‘रक्षाबंधना’चा विराट कार्यक्रम हाती घेतला. याच वर्षी ‘प्रिन्स ऑफ वेल्स्’ यांनी भारताला भेट दिली. त्यांच्या स्वागत समारंभावर कठोर टीका करणारे लेखही त्यांनी लिहिले.


वंगभंगाच्या चळवळीला घातपाताचे स्वरूप येऊ लागल्यामुळे त्यांनी त्यातून लक्ष काढून घेऊन ग्रामीण भागातील विधायक कार्य व शांतिनिकेतनातील जीवनशिक्षणकार्याकडे ते केंद्रित केले. १९०७, साली वंगीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ह्या काळात सुप्रसिद्ध बंगाली संपादक रामानंद चतर्जी यांच्याशी त्यांचा स्नेह वाढत गेला आणि प्रवासी ह्या त्यांच्या मासिकातून त्यांची गोरा (१९१०) ही पुढे जागतिक लौकिक मिळवलेली कादंबरी प्रसिद्ध होऊ लागली. याच वर्षी त्यांचा कनिष्ठ पुत्र शमींद्रनाथ वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी कॉलरा होऊन वारला. १९०९ साली लिहिलेल्या प्रायश्चित ह्या नाटकात धनंजय बैरागी ह्या पात्राकरवी त्यांनी असहकार आणि अहिंसात्मक प्रतिकाराचे जे तत्त्वज्ञान सांगितले आहे, ते नंतरच्या काळातील गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी जुळणारे आहे. राजा (१९१०) हे रुपकात्मक नाटकही त्यांनी याच वर्षी लिहिले. ज्येष्ठपुत्र रथींद्रनाथ १९१० साली अमेरिकेहून परतल्यावर त्याचा प्रतिमा देवी ह्या बालविधवेशी विवाह केला.


शांतिनिकेतनातील रहिवाशांनी त्यांचा पन्नासावा वाढदिवस १९११ साली साजरा केला. प्रवासीमधून त्यांच्या जीवनस्मृती क्रमशः प्रसिद्ध होत होत्या आणि गीतांजलीतून (१९१२) संगृहीत झालेल्या मूळ कविता व डाकघर (१९१२) हे नाटकही याच काळात लिहिले गेले. २७ डिसेंबर १९११ रोजी कलकत्त्यात राष्ट्रीय सभेचे सव्विसावे अधिवेशन भरले असताना ‘जणगणमन-अधिनायक जय हे भारत-भाग्यविधाता’ हे त्यांनी रचलेले आणि संगीतबद्ध केलेले गीत पहिल्या प्रथम गायले गेले. त्यानंतर माघोत्सवांत हे गीत ब्रह्मसंगीत म्हणून गात असत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ह्या गीताचा ‘राष्ट्रगीत’ म्हणून अधिकृतपणे स्वीकार झाला.


इंग्लंडमधील स्नेह्यांकडून त्यांना समानशील इंग्रज साहित्यप्रेमी लोकांना भेटण्याविषयी आग्रहाची निमंत्रणे येत होती. त्यांनी जाण्याचे ठरवले; परंतु ऐनवेळी आजारी पडल्यामुळे बेत रद्द केला व ते शिलाइदह येथे हवापालट करण्यासाठी गेले. ह्या ठिकाणी त्यांनी गीतांजलीत आलेल्या बंगाली कवितांचे स्वतः इंग्रजीतून भाषांतर केले. १९१२ च्या मे महिन्यात ते इंग्लंडला गेले. तेथे सुप्रसिद्ध चित्रकार रोदेन्‌स्टाइन यांनी ते वाचायची इच्छा प्रकट केल्यावरून ते त्यांच्या हाती दिले. त्यांनी श्रेष्ठ कवी डब्ल्यू. बी. येट्स ह्यांच्याकडे त्या रत्नाची पारख सोपवली. येट्स कविता वाचून मुग्ध झाले [बंगाली साहित्य]. पुढे अनेक नामवंत इंग्रज साहित्यिकांशी त्यांचा परिचय झाला. दीनबंधू सी. एफ्. अँड्र्यूज यांची पहिली भेट याच वेळी झाली आणि पुढे ते त्यांचे आजन्म स्नेही आणि सहकारी झाले. रॉयल आल्बर्ट हॉल ह्या प्रख्यात नाट्यगृहात त्यांच्या ‘दालिया’ नावाच्या कथेवरून इंग्रजीत रचलेल्या ‘महारानी ऑफ आराकान’ ह्या एकांकिकेचा प्रयोग झाला.


लंडनहून ते अमेरिकेत गेले. गीतांजलीच्या इंग्रजी आवृत्तीचे उत्तम स्वागत झाल्याची वार्ता त्यांना कळली. येट्सनी त्या संग्रहाला प्रस्तावना लिहिली होती. १९१३ च्या नोव्हेंबरात शांतिनिकेतनला ते परतले. १३ नोव्हेंबरला त्यांच्या गीतांजलि ह्या काव्यसंग्रहाला स्वीडिश अकॅडेमीने नोबेल पारितोषिक दिल्याची वार्ता कळली. साहित्यासाठी हे पारितोषिक मिळवलेले रवींद्रनाथ हे पहिले आशियाई लेखक होत. रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळण्यापूर्वीच कलकत्ता विद्यापीठाने डी. लिट्. ही सन्मानदर्शक पदवी देण्याचा ठराव केला होता. प्रत्यक्ष समारंभ २६ डिसेंबरला झाला. त्यांच्या पुस्तकांची यूरोपातील महत्त्वाच्या भाषांतून तसेच भारतीय भाषांतूनही भाषांतरे होऊ लागली. आंद्रे झीद (फ्रेंच), झेनोबिया येमेनेझ (स्पॅनिश) यांच्यासारखे श्रेष्ठ यूरोपीय लेखक त्यांना भाषांतरकार म्हणून लाभले.


यूरोपात ४ ऑगस्ट १९१४ रोजी पहिल्या जागतिक महायुद्धाचा वणवा पेटला. ५ ऑगस्टला ‘मा मा हिंसी :’ ह्या विषयावर जगावर कोसळत असलेल्या ह्या द्वेषमूलक विध्वंसासंबंधी त्यांनी तळमळीने भाषण केले. त्यानंतरच्या सेहेचाळीस दिवसांत त्यांनी गीताली (१९१४) साठी एकशेआठ गाणी रचून ती स्वरबद्ध केली. शबूज पत्र (हिरवी पाने) ह्या नियतकालिकाचे ⇨ प्रमथ चौधुरी यांच्या संपादकत्वाखाली प्रकाशन सुरू झाले. येथून बंगाली साहित्याला नवीनच वळण लागले. रवींद्रनाथांच्या प्रतिभेचा एक नवीनच आविष्कार शबूज पत्र ह्या नियतकालिकातून प्रसिद्ध होणाऱ्‍या बलाका (१९१६) ह्या काव्यसंग्रहात नंतर ग्रथित झालेल्या कवितांतून व ‘सबूजेर अभियान’ सारख्या काव्यातून; चतुरंग (१९१६), घरे बाइरे (१९१६) सारख्या कादंबऱ्‍यांतून व अनेक निबंधांतून प्रकट होऊ लागला.


त्यांना ब्रिटिश सम्राटाकडून १९१५ साली ‘सर’ (नाइटहुड) हा किताब देण्यात आला आणि याच वर्षी सी. एफ्. अँड्र्यूज यांनी शांतिनिकेतनात त्यांची आणि गांधीजींची भेट घडवून आणली. या वर्षीच्या परदेश दौऱ्‍यांत युद्धाची आसुरी धुंदी चढलेल्या जपान व अमेरिकेतील जनसमुदायांपुढे त्यांनी विश्वशांतीच्या प्रचाराची भाषणे केली. त्याबद्दल अवहेलनाही सहन केली. भारतात परतल्यानंतर ॲनी बेंझट ह्या भारताच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्‍या थोर आयरिश महिलेच्या अटकेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षपद ॲनी बेंझटना मिळावे, यासाठी प्रचार केला. ह्या अधिवेशनात केलेल्या ‘कर्ताय इच्छाय कर्म’ ह्या त्यांच्या ओजस्वी देशभक्तिपर भाषणामुळे स्वदेशी युगातील राष्ट्रप्रेमी रवींद्रनाथांचे दर्शन जनतेला घडले. ह्या अधिवेशनात उत्साहाने भाग घेत असताना त्यांनी डाकघर ह्या नाटकाचा प्रयोग बसवून तो आपल्या वाड्यात, आमंत्रित सदस्यांपुढे करून दाखवला. हा प्रयोग पाहण्यासाठी लो. टिळक, पं. मदन मोहन मालवीय, गांधीजी प्रभृती थोर पुढारी हजर होते.


त्यांची सर्वांत थोरली कन्या माधुरीलता (बेला) हिचे १९१८ साली निधन झाले. त्यानंतर सु. चार महिने शांतिनिकेतनातील शिक्षणकार्यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. ‘यंत्र विश्वं भवत्येक नीडम्’ ह्या भावनेने स्थापन केलेल्या ‘विश्वभारती’ ह्या संस्थेंची २२ डिसेंबर १९१८ रोजी पायाभरणी झाली. ‘भारतवर्षातील शिक्षणपद्धतीने वैदिक, पौराणिक, बौद्ध, जैन, मुसलमान इ. सर्व विचार एकत्र आणले पाहिजेत व ही विचारसंपत्ती एका ठिकाणी संगृहीत करायला पाहिजे’, हा विचार ह्या स्थापनेच्या मुळाशी होता. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील संस्कृतींच्या अभ्यासाचे आणि संशोधनाचे ते केंद्र व्हावे आणि देश, राष्ट्र इ. मर्यादांचे उल्लंघन करून भूत, वर्तमान आणि भविष्यकाळातील मानवाची प्रगती ही त्या केंद्राच्या विकासाची दिशा रहावी, हे त्यामागील ध्येय होते.


ब्रिटिश सरकारने १९१९ साली पंजाबातील जालियनवाला बागेत केलेल्या अमानुष हत्याकांडामुळे ‘दहशतीच्या धसक्याने मूक झालेल्या माझ्या कोट्यवधी देशबांधवांच्या निषेधाला वाचा फोडण्यासाठी’ आपण हा किताब परत करीत आहोत असे व्हाइसरॉयना कळवून ‘सर’ हा किताब त्यांनी परत केला. विश्वभारतीला आर्थिक साहाय्याची मागणी करण्यासाठी त्यांनी भारताचा दौरा सुरू केला. देशातील प्रमुख शहरांतून व्याख्याने दिली, नाट्यप्रयोग केले, वयाची साठी उलटली असतानाही स्वतः त्यातून भूमिका केल्या. २० सप्टेंबर १९२२ रोजी पुण्यातील किर्लोस्कर नाट्यगृहात ‘भारतीय प्रबोधना’वर त्यांचे भाषण झाले आणि सार्वजनिक जाहीर सभेत त्यांनी लो. टिळकांना श्रद्धांजली वाहिली. विश्वभारतीच्या कार्यासाठी काढलेल्या यूरोप-अमेरिकेच्या दौऱ्‍याप्रमाणे आग्नेय आशियातील देशांतही त्यांनी दौरा काढला व जाव्हा, बाली वगैरे बेटांपर्यंत जाऊन तेथील नृत्य, नाट्य, गायन, धार्मिक पूजाविधी यांतून लाभलेले सांस्कृतिक धन त्यांनी गोळा करून आणले. तेथील ‘बाटिक’ कला रवींद्रनाथांनी आपल्या बरोबरचे चित्रकार सुरेंद्रनाथ कार यांना शिकायला लावून शांतिनिकेतनात त्या कलेचे शिक्षण देणारा विभाग उघडला. तो अद्यापही चालू आहे.


विश्वभारतीत फ्रेंच प्राच्यविद्यापंडित सिल्व्हँ लेव्ही, श्रीलंकेतील बौद्ध तत्त्वज्ञानविशारद धर्माधार राजगुरू महास्थविर, विधुशेखर भट्टाचार्य (संस्कृत पंडित), दिनेंद्रनाथ टागोर (रवींद्रसंगीतज्ञ), भीमराव शास्त्री हसूरकर (अभिजात हिंदुस्थानी संगीतज्ञ), ⇨नंदलाल बोस (चित्रकार), रवींद्रनाथ टागोर (कृषितज्ज्ञ) यांच्यासारख्यांनी कला आणि ज्ञानाच्या विविध शाखांचे नेतृत्व स्वीकारले. तिबेटी, चिनी यांसारख्या आशियाई भाषांचा अभ्यास सुरू झाला.


अहमदाबादला १९२० साली गुजराती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. त्या रात्री त्यांचा मुक्काम साबरमतीला गांधीजींच्या आश्रमात होता. १९२१ साली गांधीजींनी असहकाराची चळवळ सुरू केली. जनतेच्या आंदोलनाला जर तितक्याच प्रबळ विधायक कार्याची जोज नसली, तर त्या आंदोलनाला अनिष्ट वळणे लागतात, अशी रवींद्रनाथांची धारणा होती. ह्या बाबतीत त्यांचा गांधीजींशी मतभेद होता. बोलपूर जवळील सुरूल गावी ‘श्रीनिकेतन’ ही शेतकी शिक्षणाचे कार्य करणारी संस्था १९२२ मध्ये सुरू केली. सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या कार्याबरोबर श्रीनिकेतनात ग्रामीण विकासाचे विधायक कार्य पिअर्सन आणि लेओनार्ड एल्महर्स्ट ह्या ध्येयवादी इंग्रज शेतकी तज्ज्ञांच्या साहाय्याने त्यांनी सुरू केले होते. खेड्यापाड्यांत पसरलेल्या मलेरिया रोगाच्या उच्चाटणापासून तो जपानी तज्ज्ञांच्या साहाय्याने चर्मोद्योग, कुटिरोद्योग चालवण्यापर्यंत ग्रामीण जनतेच्या स्वास्थ्य आणि सुखासाठी आवश्यक असणाऱ्‍या अनेक कार्यांचे प्रयोग श्रीनिकेतनात रवींद्रनाथांच्या देखरेखीखाली चालू होते. त्याचबरोबर मुक्तधारा (१९२२), रक्तकरवी (१९२४) यांसारख्या नवीन नाटकांचे प्रयोग, निरनिराळ्या ऋतूंच्या उत्सवांचे आयोजनही ते करीत होते. एवढेच नव्हे, तर आत्मसंरक्षणार्थ शांतिनिकेतनातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना जपानी तज्ज्ञांकडून ⇨जूदो ह्या कुस्तीचे शिक्षणही सुरू केले होते. रवींद्रनाथांनी होमिऑपथी आणि जीवरसायनशास्त्र यांचा उत्तम अभ्यास करून स्वतः रोगनिवारणाच्या कार्यात भाग घेतला होता. जीवनातील मानवहिताचे कुठलेही अंग त्यांनी गौण मानले नाही. १९३० साली ऑक्सफर्डला ‘मानवाचा धर्म’ ह्या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्याच वेळी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरविले गेले. उतार वयात त्यांनी चित्रकलेची आराधना सुरू केली. त्यातूनही रंगरेषांतील अभिव्यक्तीचे त्या कलेच्या क्षेत्रात त्यांनी नवीन दालन उघडले. हे प्रदर्शन यूरोपातील फ्रान्स, इंग्लंड, जर्मन, सोव्हिएट रशिया आणि अमेरिकेतील अनेक प्रमुख शहरांतून भरवले गेले.


कलकत्यातील अनेक संस्थांतर्फे १९३१ साली त्यांचा सत्तरावा वाढदिवस साजरा झाला. पुढल्याच वर्षी त्यांनी इराण व इराकचा दौरा केला. तेथून परतल्यानंतर कलकत्ता विद्यापीठाच्या रामतनू लाहिरी अध्यासनाच्या प्राध्यापक पदावर त्यांची नियुक्ती होऊन विद्यापीठाने ६ ऑगस्ट रोजी त्यांना मानपत्र दिले. याच सुमारास बंगाली कवितेत त्यांनी नव्यानेच मुक्तछंदाचा प्रयोग सुरू केला होता. त्या कवितांचा पुनश्च (१९३२) हा संग्रह होय. देशातील अल्पसंख्यांकांचे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याच्या ब्रिटीश सरकारच्या निर्णयाविरुद्ध गांधीजींनी वीस सप्टेंबरपासून येरवड्याच्या तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. इतर राजकीय नेतेही बंदिवासात होते. रविंद्रनाथांनी गांधीजींच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. त्यांना गांधीजींच्या उपोषणाची चिंता वाटून ते पुण्याला गेले. त्याच वेळी येरवडा तुरुंगात पंतप्रधान मॅक्डॉनल्ड यांनी वाटाघाटी करण्याचे मान्य केल्याची बातमी आली. गांधीजींनी उपोषण सोडले त्या प्रसंगी रवींद्रनाथ तेथे हजर होते. दुसऱ्‍या दिवशी तिथीप्रमाणे गांधीजींचा जन्मदिन होता. पुण्यातील शिवाजी मंदिरात पंडित मालवीय ह्यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अभिनंदनपर प्रचंड सभेत रवींद्रनाथांचे ‘जातीयता आणि अस्पृश्यतेचे निर्मूलन’या विषयावर भाषण झाले.


संगीत-नृत्य आणि मूकाभिनय ह्या तिन्ही कलांच्या एकत्रीकरणातून चित्रांगदा (१८९२) नाटकाचे पुनर्लेखन करून त्यांनी प्रयोग केला (१९३३). ‘परिशोध’ कवितेला संगीत-नाट्यरूप दिले आणि श्यामा (१९३९) हे नवीन नृत्यनाटक लिहून त्याचा कलकत्त्याच्या रंगमंचावर प्रयोग केला. कठोर राज्यशासनामुळे माणसाचे आवडीनिवडीचे स्वातंत्र्य जाऊन त्याचे जीवन शुष्क होते. माणसे अल्पसंतुष्ट आणि भित्री होतात. जीवनाला अवकळा येते. हा विचार सांगणाऱ्‍या ताशेर देश (१९३३, म. शी. पत्त्यांचा देश) ह्या त्यांच्या प्रयोगदृष्ट्या यशस्वी अशा संगीत नाटकाचा प्रयोगही याच वर्षी कलकत्त्यात झाला. १९३७ साली कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या प्रवक्तेपदावरून, तोपर्यंतची इंग्रजीतून भाषण करण्याची प्रथा मोडून, त्यांनी बंगालीतून भाषण केले. १९३६ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या विनंतीवरून, माणसाचे जन्मसिद्ध हक्क जतन करण्यासाठी स्थापन केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्य संघाचे त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले.


हिटलरने १९३८ साली चेकोस्लोव्हाकियावर हल्ला केला. प्राग येथील आपले मित्र व्ही. लेस्नी यांना पत्र पाठवून रवींद्रनाथांनी ह्या आक्रमणाचा कडाडून निषेध केला. जपानेही चीनवर हल्ला केला होता. त्यासंबंधी तीव्र निषेध व्यक्त करणारी पत्रे त्यांनी जपानमधील श्रेष्ठ कवी नोगुची यांना पाठवली.


दुसऱ्‍या महायुद्धाने १९४० सालापासून अतिशय उग्र स्वरूप धारण केले. विश्वशांतीच्या आणि मानवतेच्या कल्पनांचा वृद्ध रवींद्रनाथांना त्यांच्या डोळ्यापुढे विध्वंस होताना दिसत होता. याच वर्षी गांधीजींनी शांतिनिकेतनला भेट दिली. गांधीजींना निरोप देताना रवींद्रनाथांनी त्यांच्या हाती एक पत्र दिले. ‘माझ्या आयुष्यातल्या अमोल धनाचा साठा वाहून नेणाऱ्‍या जहाजासारख्या असणाऱ्‍या विश्वभारतीचा भार माझ्यामागून आपण सांभाळा’ अशी त्या पत्रात गांधीजींना विनंती केली होती. गांधीजींनी ते पत्र मौलाना अबुल कलाम आझाद यांना दिले. १९५१ साली मौलाना अबुल कलाम आझाद स्वतंत्र भारतातील केंद्रीय शिक्षणमंत्री झाल्यानंतर विश्वभारतीचा आर्थिक भार भारत सरकारने स्वीकारला. १९४० च्या ऑक्टोबरात ऑक्सफर्ड विद्यापीठाने शांतिनिकेतनात आपले प्रतिनिधी पाठवून सर मॉरिस ग्वियर (तत्कालीन सरन्यायाधीश) यांच्या हस्ते त्यांना ‘डॉक्टरेट’ची सन्माननीय पदवी देण्याचा खास समारंभ घडवून आणला.


त्यांचा ऐंशीवा वाढदिवस १४ एप्रिल १९४१ रोजी शांतिनिकेतनात साजरा झाला. मूत्रपिंडाच्या विकारामुळे प्रकृती खूपच ढासळली होती. तरीही ह्या प्रसंगी आपला संदेश म्हणून ‘सभ्यतार संकट’ (संस्कृतीवरील गडांतर) ह्या शीर्षकाखाली त्यांनी एक निबंध लिहिला. ऐंशीव्या वर्षी प्रकृती आणि भोवतालची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही रुग्णशय्येवरील रवींद्रनाथांनी आपल्या बालपणाच्या स्मृतींचा छेलेबेला (१९४०, म. शी. बालपण) हा अत्यंत हृदयंगम असा छोटेखानी ग्रंथ लिहिला. ‘ऐकतान’ ही त्यांची सुप्रसिद्ध कविता त्याच काळातील आणि जन्मदिने (१९४१) हा शेवटला कवितासंग्रहही याच काळातील होय.


त्यांची प्रकृती १९४१ च्या जून अखेरीला फारच ढासळली. डॉक्टरांनी कलकत्त्याला उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. ३० जुलैला शस्त्रक्रिया होण्याच्या काही तास आधी त्यांनी आयुष्यातील शेवटची कविता लिहून घ्यायला सांगितली. आपल्या जीवनदेवतेला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेले हे शेवटचे अर्घ्य. कृती आणि उक्ती यांतील अद्वैत आचरणातून सिद्ध करणाऱ्‍या, उपनिषदांच्या अभ्यासाला अनुसरून पिंडी ते ब्रह्मांडी पाहणाऱ्‍या, साहित्य, संगीत, कला, आणि विचारांचे बहुविध आणि बहुमोल भांडार अवघ्या मानवतेला देणाऱ्‍या, ह्या विश्वकवीची प्राणज्योत ७ ऑगस्ट १९४१ रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी मालवली.


त्यांच्या जन्मशताब्दीचा उत्सव १९६१ साली जगभर साजरा झाला. त्या प्रसंगी देशोदेशींच्या तत्त्वज्ञांनी, कवी-कलावंतांनी आणि राष्ट्र धुरीणांनी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे लेख लिहिले. त्या प्रसंगी जवाहरलाल नेहरूंनी म्हटले आहे, ‘प्राचीन काळातील ज्ञानातून स्फूर्ती घेऊन अर्वाचीन काळाला उपयुक्त असा साज देणारे आणि ते ज्ञान सार्थ करणारे असे भारतीय द्रष्ट्यांच्या परंपरेतील ते एक ऋषी होते. त्यांनी अस्सल भारतीय परंपरेतील संदेश आजच्या युगधर्माला अनुरूप असणाऱ्‍या नव्या भाषेत दिला. हा थोर आणि उत्कट संवेदनाशीलता असणारा माणूस केवळ भारताचाच कवी नव्हता, तर साऱ्‍या मानवतेचा व सार्वजनिक स्वातंत्र्याचा कवी होता. त्याचा संदेश आपण सर्वांसाठी आहे’. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संकलन -गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवातमाळ ४४५२०६



Good morning

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *चतुर्दशी*,पुनर्वसु नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ०७ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"जब आप प्रातः जगें तो अपने माता-पिता को हृदय से धन्यवाद दें एवं शुभाशीष लें, क्योंकि माता-पिता के श्रेष्ठ लालन-पालन के कारण ही आप इस संसार में हैं एवं उत्तम जीवन जी रहे हैं। स्मरण रहे कि जो व्यवहार आपका अपने माता-पिता के लिए है, वही आपको अपने बच्चों से मिलेगा।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...