शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

अलेक्झांडर पेनीसीलीन आणि प्रतिजैविके

 *🧪🧪🧪अलेक्झांडर🧪🧪🧪🧪*

🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪

*पेनिसिलीन आणि प्रतिजैविक (antibiotics) चा शोध*

🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪🧪

*जन्मदिन - ६ ऑगस्ट इ.स. १८८१*


सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ होते. (जन्म ६ ऑगस्ट १८८१ - म्रुत्यु ११ मार्च १९५५). त्यांनी केलेल्या पेनिसिलीन च्या शोधाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या शोधाने वैद्यकक्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणे शक्य झाले. त्यांच्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांनी जीवाणूंचे ताटलीमध्ये कल्चर तयार केले होते. या कल्चरमध्ये चूकून पेनिसिलिन नामक बुरशी येउन पडली व त्यामुळे जीवाणूंचे संपूर्ण कल्चर मृत झाले. आपले श्रम वाया गेले म्हणून फ्लेमिंग ती ताटली फेकून देणार होते. परंतु त्याचवेळेस हे कल्चर का मृत झाले याबद्दल जीज्ञासा निर्माण झाली व पेनिसिलीन ही बुरशी जीवाणूंसाठी मरण आहे हे लक्षात आले व प्रतिजैविकांचा शोध लागला.

फ्लेमिंग यांनी जीवाणूशास्त्र, केमोथेरेपी यांवरती अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.    

➿➿➿➿➿➿➿➿➿➿                             

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *त्रियोदशी*,आद्रा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ०६ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                      *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"झूठे ज्ञान एवं अधूरे ज्ञान से अत्यधिक सावधान रहिये, क्योंकि यह अज्ञान होने से भी अधिक भयानक एवं हानिकारक है"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोरडा खोकला का येतो


══════════════════════

    संकलन ):गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📒 *कोरडा खोकला का येतो ?* 📒

************************************


एकदा सहज खोकून पाहा. आता सांगा तुम्ही काय काय केलेत ते? एवढे विचारात पडू नका. आधी तुम्ही दीर्घ श्वास घेतला. मग एपिग्लाॅटीस नावाचा घशातील पडदा श्वासनलिकेवर दाबला. त्यानंतर तुम्ही दाबाखाली हवा बाहेर सोडली. हे करताना आवाजही झाला (ज्याला आपण खोकला म्हणतो) व श्वासनलिकेतील चिकट पदार्थ व बेडकाही बाहेर आला, आपल्या लक्षातही न येता एवढ्या क्रिया आपण केल्या. श्वासनलिकेत काही गेले (धूळ, पाणी, अन्नकण इत्यादी), तर ते काढून टाकण्यासाठी खोकल्याचा उपयोग होतो. खोकला हे अशा प्रकारे शरीराचे प्रतिकाराचे शस्त्रच आहे. रोगांमध्ये मात्र जिवाणू व विषाणूच्या क्रियेमुळे व दाहामुळे वारंवार खोकला येतो. बेडके पडतात; पण खोकून खोकून छाती, घसा दुखायला लागतात, बेडक्यासहीत येणारा खोकला म्हणजे ओला खोकला. नुसताच येणारा खोकला म्हणजे कोरडा खोकला होय. कोरडा खोकला का येतो, ते आता पाहू. आपल्या इच्छेने आपण खोकू शकतो व आपल्या मनाविरुद्ध व इच्छेविरुद्धही आपल्याला खोकला येतो.


पोटात जंतू असतील, घशाचा व स्वरयंत्राचा दाह होत असेल किंवा कर्करोगाच्या गाठीमुळे किंवा फुगीर महारोहिणीमुळे जर श्वासनलिकेवर दाब येत असेल तर कोरडा खोकला येतो. काही मानसिक रोगातही कोरडा खोकला येतो. असा त्रासदायक खोकला थांबवण्यासाठी कोडेन व नोस्कापीनसारखे औषध उपयोगी

पडते. सोबत संबंधित रोगाचा उपचारही घेणे अगत्याचे ठरते. बेडके पडणाऱ्या खोकल्यात मात्र खोकलाविरोधी औषधे घेऊ नयेत. बेडके बाहेर आल्याने रोगजंतू शरीराबाहेर पडतात व ते आवश्यक असते. बेडक्याच्या तपासणीवरून रोगाचे निदानही करता येते. रोगाप्रमाणे उपाचार घेणेच श्रेयस्कर होय.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

अग्निपंख ई मासिक

 खुश खबर ❗खुश खबर ❗आनंदाची बातमी‼️


आदरणीय शिक्षकांना सुचित करण्यात येत आहे की, अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य परिवार आपले साठिच

 ई -मासिक घेऊन येत आहे. 

यामध्ये तुमचे शैक्षणिक उपक्रम व लेख,कविता,यशोगाथा,बालसाहित्य , सामाजिक विशेष कार्यक्रम, राष्ट्रीय विशेष कार्यक्रम जर आपण घेतले असेल तर फोटो सह सदर मेल वर पाठवावेत असे आव्हान करण्यात येत आहे, 

उपक्रमाची एका पेक्षा जास्त फोटो जर पाठवायचे झाले तर कोलाज मध्ये जास्तीत जास्तं तीन फोटो च पाठवा agnipankhfmhmasik@Yahoo.com

या ई मेल वर संकलन सुरू आहे, 

आपला ई मासिक दर महिन्याच्या एक तारखेस प्रकाशित होणार आहे याची नोंद घ्यावी 

काही अडचण असेल तर खालील नंबर वर संपर्क करा 


 संपर्क

गजानन गोपेवाड (मो नं 7378670283)वर थेट फोन करून विचारू शकाल

धन्यवाद  ‼️

राज्य पुरस्कार आँनलाईन फार्म

 https://forms.gle/2bJqAw1aQ5gMpwoJ6                                                                                                                             "अग्निपंख फौंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन- २०२०-२०२१ सूचना."


१. सदरील पुरस्कार हा फक्त नवोपक्रम शिक्षक/शिक्षिका यांच्या साठीच राहील. 

२. सदरील पुरस्कारा साठी लागणारे सर्व कागदपत्र हे हार्ड कॉपी (Hard Copy) मध्ये देणे अनिवार्य राहील. (हार्ड कॉपी चा बंच येताना सोबत घेऊन येणे. ) 

३. दिलेल्या लिंक मध्ये स्व-घोषित चारित्र्य प्रमाणपत्र दिलेले आहे. त्याला Download करून Print काढून आपली स्वाक्षरी व नाव पत्ता सह Upload करावे.

४. सदरील लिंक मध्ये ४ भाग (Section) आहेत.  (Section-1) पहिल्या भागामध्ये सूचना दिल्या आहेत.   (Section-2) दुसऱ्या भागामध्ये वैयक्तिक माहिती भरायची आहे.  (Section-3) तिसऱ्या भागामध्ये  "नवोपक्रम माहिती" भरावयाची आहे. (Section-4) चौथ्या भागामध्ये "नवोपक्रम यशस्वीते बाबत" माहिती भरावयाची आहे. 

५. (Section-4) चौथ्या भागामध्ये आपल्याला आपल्या   "नवोपक्रम बातम्या/ बातम्याचे कात्रण"  यांची 5 image : required size - 10mb  किंवा एकाच pdf  मध्ये एकत्र करूनआपले सर्व बातम्या व कात्रण टाकावे. 1pdf :  required size - 10mb 

  ६. वरील लिंक हि एक वेळच वापरता येईल (Link required only one Response) 

७. लिंक भरतांना चुका झाल्यास किंवा पुन्हा भरावयाची असल्यास दुसऱ्या E-Mail द्वारे भरावी. 

८. तसेच सदरील माहिती हि soft copy मध्ये तय्यार करून    "agnipankhfoundationmh@gmail.com"  या E-Mail वर टाकावी. (pdf file मध्ये तय्यार करून टाकावी.) 

९. Soft Copy ची प्रिंट करून त्यासोबत केलेले उपक्रमाचे  photos सोबतच्या बंच मध्ये आणावे. (पुरस्कार घेण्यास येतानां) 

१० वरील लिंक भरताना आपणास काही अडचणी आल्यास खालील नंबरवर संपर्क करावा.



- ७३७८६७०२८३

डॉ कलाम सरांच्या जीवनावर आधारित प्रश्न मंजुषा सन्मान

 *डॉ, ए पी अब्दुल कलाम सर यांचे पाचव्या पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या ऊपक्रमशील शिक्षक/शिक्षिका ,व विद्यार्थी यांची नावे व क्रमांक जाहिर करण्यात आनंद होत आहे. आपणाकडुन असेच नवोपक्रम दर्जेदार करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे 

                 धन्यवाद ❗


1)   *नरेश सिद्धार्थ रामटेके* 

       (विषय शिक्षक )

 शाळा : *जि प उच्च प्राथ.शाळा नांदळी* 

प स कोरची, जि गडचिरोली 


       ( प्रथम क्रमांक) 


2)  संदीप मधुकरराव कोल्हे

           (सहाय्यक शिक्षक )

 शाळा :: जि प प्राथ.शाळा सुकळी 

प स कळंब जि यवतमाळ 

     

        ( प्रथम क्रमांक) 



3)   अविनाश काशिनाथ पाटील


शाळा ::बापूसाहेब डी.डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता.धुळे जि. धुळे

    

        (प्रथम क्रमांक) 


 

4)   हेमराज फकिरा अहिरे 

 शाळा ::महादेव आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा अनेर डॅम 

तालुका. शिरपूर .जिल्हा धुळे 

     

           (प्रथम क्रमांक) 




5)  सिंधू महेंद्र मोटघरे

       (पदवीधर शिक्षक)

शाळा ::जी .प .व. प्रा. शाळा

  तुमखेडा बु. ता.गोरेगाव जि.  गोदिया 

     

         ( प्रथम क्रमांक) 



 

6)  .हुमेंद्र रमेश चांदेवार 

शाळा ::जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा परसोडी, 

पं स सडक अर्जुनी,             जिल्हा गोंदिया 


          (प्रथम क्रमांक) 



7)   दामोधर राजाराम डहाळे

शाळा::  जि प पुर्व माध्य,शाळा मांडवी 

     पं. स. - तुमसर

जिल्हा - भंडारा

            (प्रथम क्रमांक) 


8)    सुशांत प्रभाकर जगताप


शाळेचे नाव : सर्वोदय माध्यमिक विदयालय गुढे ,

 ता . भडगांव . जि . जळगांव

     

             (प्रथम क्रमांक) 




9)   निलेश दिवाकर गिरडकर 

(विषय शिक्षक )

शाळा ::जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मलेरा 

पं स मूलचेरा जिल्हा गडचिरोली 


          (प्रथम क्रमांक) 



10.)   भारती दिनेश तिडके (पदवीधर शिक्षिका) 

शाळा ::जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घुमराऀ, 

पंचायत समिती गोरेगाव जिल्हा गोंदिया.

      

      (प्रथम क्रमांक) 


11)  जयश्री विजय खोण्डे.

.(माध्यमीक शिक्षिका) .

शाळा ::धर्मराव कृषी विध्यालय .अहेरी ..

तालुका अहेरी .जिल्हा 

गडचिरोली   


       (प्रथम क्रमांक) 



12)  अविनाश रमेश खैरनार


शाळा ::सर्वोदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हेंदरुण मोघन 

ता.धुळे, जि .धुळे


        (प्रभम क्रमांक) 


 *खालील सहभागी विद्यार्थी क्रमांक प्राप्त आहे* 


1)  दिपाली लक्ष्मण गवळी (10वी) 

  ( प्रथम क्रमांक) 


2)  चेतन गोकुळ पाटील (10वी)

      (द्वितीय क्रमांक )



13)   रोशनी राजाभाऊ दाते

      (पद::प्राथ शिक्षिका )

 

शाळा ::जि प उ प्राथ शाळा भिमपूर,  

ता- कोरची, जिल्हा- गडचिरोली


         (प्रथम क्रमांक) 


14)   नारायण पुंडलिक भिलाणे (माध्यमिक शिक्षक)

 शाळा ::नूतन माध्य.विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय दोंडाईचा 

ता. शिंदखेडा जि. धुळे


           (प्रथम क्रमांक) 



15)    मंजुषा सिद्धार्थ नंदेश्वर  (पदवीधर शिक्षिका)

 शाळा:: जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव 

केंद्र देव सर्रा

 तालुका. तुमसर .जिल्हा भंडारा.


          (प्रथम क्रमांक )


*कुमारी संजीवनी बनकर*

         (तृतीय क्रमांक) 


 *कुमार अमर सात देवे* 

       (प्रथम क्रमांक )


 प्रिया , दिव्या, संजीवनी 

    (अनुक्रमे सहभागी प्रमाणपत्र)


  *कुमार वेदांत  चौधरी*

         (व्दितीय क्रमांक) 




      *कुमार गिरीश इठुले*

         (सहभागी प्रमाणपत्र) 



16)   राजेंद्र धर्मदास बन्सोड


शाळा ::जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा


पंचायत समिती गोरेगाव

जिल्हा परिषद गोंदिया


        (द्वितीय क्रमांक )




17)  दत्तात्रय जालिंदर गव्हाणे

(प्रभारी मु.अा.)

शाळा ::जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव ताड

तालुका.भोकरदन जिल्हा.जालना


            (प्रथम क्रमांक) 


18)   राजश्री दयानंद कांबळे. 

     (पद -उपशिक्षिका) 

शाळा ::जि. प. प्राथ. केंद्रशाळा अहिरे 

ता. खंडाळा जि, सातारा 


       (प्रथम क्रमांक) 


टिप ::नाव व शाळा नाव, व ईतर माहिती हि तपासून बघावी जेणेकरून प्रमाणपत्रावर चुका होणार नाही, नंतर एकदा प्रमाणपत्र दिले तर परत दुरूस्ती करून मिळणार नाही व नजरचुकीने कुणी राहिले असतील अशांनी लक्षात आणून द्यावी ही नम्र विनंती आहे 

→_→→_→→_→→_→→_

 *अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य*


1)गजानन गोपेवाड 

राज्य समन्वयक महाराष्ट्र 


निवड समिती सदस्य 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

शिक्षक दिन विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला

 [9/4/2020, 5:05 PM] 🇮🇳सत्यमेव जयते जय हिंद 🇮🇳: *शिक्षक दिन विशेष*

'आनंदाची पर्वणी व शिक्षक दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम'

       अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुरस्कार गृप मधील सर्व ऊपक्रमशील शिक्षकांना कळविण्यात येत आहे की, दिनांक 5/09/2020 ला आँनलाईन झूम द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. मिलिंद कुबडे सर,उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. दिपक चवणे मा. डहाके सर, मा. नितीन भालचक्र सर, मा. दिपक मेश्राम सर

 उपस्थित राहणार आहेत.

       दि. 27/07/2020 ला डॉ ए पी जे अब्दूल कलाम यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या शिक्षक /शिक्षिका यांना व विद्यार्थी यांना प्रथम क्रमांक /व्दितीय क्रमांक /तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र देण्यात येतील. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येणार आहे व या दिनाचे औचित्य साधून 

प्रमाणपत्र वितरण अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते  करण्यात येणार आहे 

कार्यक्रमाची प्रस्तावना आदरणीय सुवर्णा सातपुते जिल्हा समन्वयक करतील व तंत्र मार्गदर्शन व झूम सर्व आयोजन आदरणीय ऋतुजा कसबे करणार आहेत. कार्यक्रमाचे आभार आदरणिय अश्विनी वास्कर जिल्हा समन्वयक करणार आहेत याची सर्वानी नोंद घ्यावी व दिलेल्या झूम क्लाऊड मिटिंग ला आँनलाईन कार्यक्रमा साठी सर्व शिक्षकांनी न चुकता वेळेवर उपस्थित रहावे.


विशेष सुचना - *लिंक आपणास 5 सप्टेंबर ला 3 वाजे ग्रुपमध्ये पाठवली जाईल.

*सर्वांनी वेळेचे काटेकोरपणे पालन करावे.

*मोबाईल चार्जिंग करून घ्यावे.

*प्रत्येक जिल्ह्य़ातील एका शिक्षकाला प्रतिक्रिया व्यक्त करता येईल. तरी ज्यांना प्रतिक्रिया द्यायची तयारी असेल त्यांनी आपले नाव दि. 4 सप्टेंबर ला 4 वाजेपर्यंत आपले नाव गजानन गोपेवाड सर  7378670283

किंवा जयश्री सिरसाटे मॅडम 9423414686 या क्रमांकावर पाठवावे.

*प्रतिक्रिया 3 मिनिटात असावी.

*सर्वांनी आपण अप्रत्यक्ष रित्या सर्वांशी भेटत असल्याने आफिसियल कार्यक्रम समजून आपलं बैठक व्यवस्था इत्यादी असावी व गोंगाटापासून दुर असावे.

*जर चुकून जर का कुणी लेफ्ट झाले तर लगेच लिंक ला पुन्हा टच करून जाईन होता येईल. 


वेळ दुपारी 4 वाजता सुरू करण्यात येईल.


आयोजक 

श्री. गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

सौ. जयश्री सिरसाटे 

महिला राज्य समन्वयक महाराष्ट्र 

श्री. ओंकार चेके निवड समिती सदस्य 

अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य.



 🙏🏻सौ जयश्री निलकंठ सिरसाटे

राज्यसमन्वयक अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य

[9/4/2020, 5:10 PM] 🇮🇳सत्यमेव जयते जय हिंद 🇮🇳: *शिक्षक दिन विशेष*

'आनंदाची पर्वणी व शिक्षक दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम'

       अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुरस्कार गृप मधील सर्व ऊपक्रमशील शिक्षकांना कळविण्यात येत आहे की, दिनांक 5/09/2020 ला आँनलाईन झूम द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. मिलिंद कुबडे सर,उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. दिपक चवणे मा. डहाके सर, मा. नितीन भालचक्र सर, मा. दिपक मेश्राम सर

 उपस्थित राहणार आहेत.

       दि. 27/07/2020 ला डॉ ए पी जे अब्दूल कलाम यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या शिक्षक /शिक्षिका यांना व विद्यार्थी यांना प्रथम क्रमांक /व्दितीय क्रमांक /तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र देण्यात येतील. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येणार आहे व या दिनाचे औचित्य साधून 

प्रमाणपत्र वितरण अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते  करण्यात येणार आहे 

कार्यक्रमाची प्रस्तावना आदरणीय सुवर्णा सातपुते जिल्हा समन्वयक करतील व तंत्र मार्गदर्शन व झूम सर्व आयोजन आदरणीय ऋतुजा कसबे करणार आहेत. कार्यक्रमाचे आभार आदरणिय अश्विनी वास्कर जिल्हा समन्वयक करणार आहेत याची सर्वानी नोंद घ्यावी व दिलेल्या झूम क्लाऊड मिटिंग ला आँनलाईन कार्यक्रमा साठी सर्व शिक्षकांनी न चुकता वेळेवर उपस्थित रहावे.


विशेष सुचना - *लिंक आपणास 5 सप्टेंबर ला 3 वाजे ग्रुपमध्ये पाठवली जाईल.

*सर्वांनी वेळेचे काटेकोरपणे पालन करावे.

*मोबाईल चार्जिंग करून घ्यावे.

*प्रत्येक जिल्ह्य़ातील एका शिक्षकाला प्रतिक्रिया व्यक्त करता येईल. तरी ज्यांना प्रतिक्रिया द्यायची तयारी असेल त्यांनी आपले नाव दि. 4 सप्टेंबर ला 4 वाजेपर्यंत आपले नाव गजानन गोपेवाड सर  7378670283

किंवा जयश्री सिरसाटे मॅडम 9423414686 या क्रमांकावर पाठवावे.

*प्रतिक्रिया 3 मिनिटात असावी.

*सर्वांनी आपण अप्रत्यक्ष रित्या सर्वांशी भेटत असल्याने आफिसियल कार्यक्रम समजून आपलं बैठक व्यवस्था इत्यादी असावी व गोंगाटापासून दुर असावे.

*जर चुकून जर का कुणी लेफ्ट झाले तर लगेच लिंक ला पुन्हा टच करून जाईन होता येईल. 


वेळ दुपारी 4 वाजता सुरू करण्यात येईल.


आयोजक 

श्री. गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

सौ. जयश्री सिरसाटे 

महिला राज्य समन्वयक महाराष्ट्र 

श्री. ओमकार चेके निवड समिती सदस्य 

अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य.



 🙏🏻सौ जयश्री निलकंठ सिरसाटे

राज्यसमन्वयक अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य



Tr. RUTUJA KASBE CRAFT is inviting you to a scheduled Zoom meeting.


Topic: Tr. RUTUJA KASBE CRAFT's Zoom Meeting

Time: Sep 5, 2020 04:00 PM Mumbai, Kolkata, New Delhi


Join Zoom Meeting

https://us04web.zoom.us/j/75270756226?pwd=dU80TW1PMXY3S1BTbVg5UEJkMTZ4Zz09


Meeting ID: 752 7075 6226

Passcode: 8777

राज्य पुरस्कार माहिती

 राज्य स्तरीय नवोपक्र स्पर्धा सन 2020--2021


 *उपक्रमशील शिक्षकांची वैयक्तिक माहिती खलील प्रमाणे भरावी* 


 1) शिक्षकांचे नाव ::


2) आईचे नाव ::


 3)शाळेचे नाव व पत्ता ::


4) कायमचा पत्ता ::


5) पत्रव्यवहार पत्ता ::


6) ईमेल ::


7) बेबसाईट लिंक किंवा ब्लाँग लिंक येथे टाका::


8) वँटस ऐप नंबर::



........................................


 9) नवोपक्रमाचे शीर्षक / नाव  :-



10) नवोपक्रमाची गरज व महत्त्व :-

          


11) नवोपक्रमाची उद्दिष्टे :-


    अ) हा उपक्रम मी का? करतो, ?


आ)कोणत्या स्वरूपात ऊपक्रम ::


ई) कोणासाठी साध्य होणार आहे ::



12) नवोपक्रमाचे नियोजन :-

 

1)कार्यवाहिचे टप्पे (वेळापत्रक) 


2)ऊपक्रम स्थितीचे निरीक्षण :-


13 )ऊपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे :-


(टिप ईथे लिंक टाका) 


अ) युट्यूब चॅनल 

आ) ब्लाँग

इ) ट्विटर 

ई) वँटस ऐप गृप

उ) फेसबुक 

ऊ) टेलिग्राम 


14) नवोपक्रमाची कार्यपद्धती :-


अ) कार्यवाही दरम्यान निरिक्षणे व माहिती संकलित ::


इ) उपक्रम पूर्ण झाल्यानंतर निरीक्षण व त्यांच्या नोंदी, 


ई) कार्यवाही मध्ये आलेल्या अडचणी :-



ऊ)  अडचणी आल्या तर आपण काय? ऊपाय योजना केली? ::



उ) माहितीचे विश्लेषण :-



15 )नवोपक्रमाची यशस्वीता / फलनिष्पत्ती /ऊदिष्टानुसार, :-


16) ऊपक्रमाची प्रत्यक्ष कार्यवाही ::


17) ऊपक्रमात सहभागी विद्यार्थी संख्या ::


18) ऊपक्रमाची बातमी कात्रण /

टिव्ही वरील बातमी व्हिडिओ ::



19)ऊपक्रमाची फलनिष्पत्ती ::


20) ऊपक्रमाचे फोटो किमान व कमाल पाच निवडक फोटो :


21) ऊपक्रमाचे ठिकाण कोणते::



22) आपण आपल्या वतीने शिक्षणासाठी केलेले विशेष प्रयत्न /कार्य ::


23)आपल्या माध्यमातून शिक्षण प्रवाहात नवीन पॅटर्न तयार केले असल्यास थोडक्यात माहिती द्यावी ::


24) महिला सबलीकरण आणि  महिला साठी विशेष कार्यक्रम आयोजित केला असेल तर थोडक्यात माहिती द्यावी ::


25) गरिब होतकरू  विद्यार्थी साठी काहि खास ऊपक्रम राबविले असेल तर थोडक्यात माहिती द्यावी ::


26)पुस्तक प्रकाशित (कविता /आत्मचरित्र  ई) केले असेल तर त्या संबंधित माहिती द्यावी ::


27) सामजिक विशेष ऊपक्रम जर राबवित असेल तर माहिती थोडक्यात द्यावी. 


28 ) या अगोदर तुम्हाला प्राप्त पुरस्कार नाव व वर्षे लिहावे::


29)राष्ट्रीय विशेष योगदान असेल तर थोडक्यात नमुद करणे,


टिप ::सर्व माहिती मराठीत च लिहिले पाहिजे, योग्य ती फाईल पी डि एफ स्वरूपात तयार करून द्यावी 

व पुरस्कार निवड झाल्यानंतर तुमची फाईल हार्ड काँपी व साँफ्ट काँपी सोबत घेऊन यावे, 

सोबत, चारित्र्य प्रमाणपत्र प्रींट काढुन, मुख्याध्यापक स्वाक्षरी व गटशिक्षणाधिकारी स्वाक्षरी करण्यात आली तेच प्रिंट काढून सोबत जोडण्यात यावी




,,,,,,,,,,,,,,,,,,,समाप्त ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

पोलीओमुळे पाय का लंगडा होतो


══════════════════════

  @ संकलन @

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *पोलिओने पाय लुळा का होतो ?* 📕 



पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा एक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. या रोगाचे जंतू रुग्णाच्या विष्ठेतून पिण्याच्या पाण्यात मिसळले जातात व निरोगी लोकांना हा रोग होतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षित व्यवस्था व मलमूत्र विसर्जनाची विल्हेवाटीची व्यवस्था नसलेल्या देशांमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. भारतात या सुविधांचा अभाव असल्याने पोलिओ आढळून येतो. पाच वर्षांखालील मुलांना हा रोग प्रामुख्याने होतो. दरवर्षी दर लाख लोकसंख्येमागे १५ जण पोलिओमुळे लुळे होतात.


पोलिओचे विषाणू दूषित पाण्यातून तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. पचनसंस्थेत प्रवेश केल्यानंतर सौम्य प्रकारचा आजार होतो (यात ताप, उलट्या व जुलाब ही लक्षणे असतात) व बऱ्याचदा तो आपोआप बरा होतो. अशा रुग्णांपैकी क्वचित एखाद्याच्याच आतड्यातून हे विषाणू रक्तात जातात. रक्तातून स्नायूत व मग मज्जासंस्थेत रतात. मज्जासंस्थेच्या ज्या भागावर वा नसेवर विषाणू हल्ला करून तिला निकामी करतात, त्यानुसार त्या नसेशी संबंधित असे स्नायू लुळे पडतात. सामान्यपणे पाय लुळा पडतो, कधी कधी हात, तर कधी हात व पाय वा शरीर लुळे पडू शकते.


रक्तात वा स्नायूत विषाणू असल्यास रुग्णाला जर इंजेक्शन दिले गेले, तर हातपाय लुळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात व विशेषत: पोलिओची साथ चालू असल्यास ताप, हगवण झाल्यास चुकूनही इंजेक्शन देऊ नये.


पोलिओ टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे सर्व लहान मुलांना पोलिओची लस पाजणे. जन्माच्या


दिवशी पहिली लस दिली जाते. त्यानंतर दीड, अडीच, साडेतीन महिने वय असताना व नंतर दीड वर्ष वय


असताना परत ही लस पाजली जाते. ही लस दिल्यास पोलिओ होत नाही. दूरगामी प्रतिबंध करण्यासाठी


राहणीमानाचा दर्जा उंचावणे, सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे व मलमूत्र विसर्जन विल्हेवाटीसाठी सुयोग्य


व्यवस्था करणे, हे आवश्यक ठरते.


पोलिओने पाय लुळा पडल्यास भौतिकोपचार तसेच कॅलीपर (पायाचा आधार) वगैरे वापरून शक्ती परत आणण्याचा प्रयत्न करता येतो. काही वेळा शस्त्रक्रियेचाही उपयोग होतो. अर्थात, हे सर्व करण्यापेक्षा लसीकरण करून रोग टाळणे, हेच योग्य ठरेल.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*


चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव नील आर्मस्ट्राँग

 *👨‍🚀👨‍🚀नील आर्मस्ट्राँग👨‍🚀👨‍🚀*

👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀👨‍🚀

*चंद्रावर पाउल ठेवणारा जगातील पहिला मानव*

🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀

*जन्मदिन - ५ ऑगस्ट, १९३०*


नील आर्मस्ट्राँग (ऑगस्ट ५, इ.स. १९३० - ऑगस्ट २५, इ.स. २०१२) हा एक अमेरिकन अंतराळयात्री, अंतरीक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता. आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाउल ठेवणारा जगातील पहिला मानव होता.

नासाचे अपोलो ११ हे अंतराळयान आर्मस्ट्राँगने २० जुलै, इ.स. १९६९ रोजी २०:१७:३९ यूटीसी ह्या वेळेला चंद्रावर उतरवले व त्यानंतर काही तासांत (२१ जुलै, १९६९, २:५६ यूटीसी) त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाउल टाकले. आर्मस्ट्राँग हे दोन तास ३२ मिनिटे आणि आल्ड्रिन हे त्यांच्यापेक्षा १५ मिनिटे कमी काळ चंद्रावर होते. त्यांनी अमेरिकेचा ध्वज तिथे फडकावला. *"ते मानवाचे एक छोटे पाऊल, सर्व मनुष्यजातीसाठी मोठी झेप आहे,"* असे आर्मस्ट्राँग यांनी पृथ्वीवासीयांना रेडिओ संदेशाद्वारे सांगितले होते

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *द्वादशी*,आद्रा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, ०५ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"ईश्वर केवल उसी की परीक्षा लेता है, जो परीक्षा देने के योग्य होता है, तो हम क्यो विचलित होते हैं ?? ... विश्वास कीजिये, विचलित होने पर ही हम ईश्वर के सर्वाधिक निकट होते हैं। शाखों पर कोपल भी तभी आती हैं, जब पतझड़ आता है। बिना संघर्ष के जीवन का कोई अर्थ नही, इन संघर्षो के मध्य भी जो मुख पर सदैव मुस्कान रखता है, वही वास्तव में पूर्ण मनुष्य है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

गाथा बलिदानाची सदाशिवराव भाऊ

 *🚩🚩गाथा बलिदानाची🚩🚩*

🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺

*🚩🚩🚩सदाशिवराव भाऊ🚩🚩🚩*

जन्म -)         ४ ऑगस्ट १७३० 

मृत्यू  -)        १४ जानेवारी १७६१

सदाशिवराव भाऊ हे मराठा सैन्याचे जनरल होते. परदेशी आक्रमकांविरूद्धच्या लष्करी यशासाठी ते एक अपवादात्मक सेनानी मानले जात होते आणि पानिपतच्या मैत्रीपूर्ण स्वभावामध्ये महत्वाकांक्षी आणि स्पष्ट होते, भाऊंनी प्रशासनात विलक्षण कौशल्य प्राप्त केले. पण हेच भाऊ आणि पेशवे यांची मनस्थिती वाढवण्याचे कारण बनले. भाऊचे पहिले महत्वाचे कार्य म्हणजे पश्चिम कर्नाटकात मराठा वर्चस्व प्रस्थापित करणे (१७४६). मग, बंडखोर यमाजी शिवदेवचा पराभव करत त्याने सांगोला किल्ला (१७५०) काबीज केला. त्यांनी मराठा राजवटीत कायदेशीर क्रांती केली.


      सदाशिवराव भाऊ बाजीराव हे पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव रखमाबाई होते.


१७४६ मध्ये पश्चिम कर्नाटकात मराठा वर्चस्व प्रस्थापित करणे हे भाऊचे पहिले महत्वाचे कार्य होते. मग बंडखोर यमाजी शिवदेव यांचा पराभव करून त्यांनी सांगोला किल्ला (१७५०) काबीज केला. त्यांनी मराठा राजवटीत कायदेशीर क्रांती केली. पण भाऊंच्या काही कृत्यांना त्याच्या अधिकारांचे अपहरण समजल्याने पेशवा त्यांच्यावर आणि बाबांवर नाराज झाला. मग, बाबांनी प्रोत्साहन दिल्याने भाऊंनी पेशव्यांना राज्यकारभारासाठी पूर्ण अधिकार मागितला. पूर्वीच्या पेशव्यांच्या काळापासून तेच पद त्यांच्या वडिलांकडे होते. पेशव्यांच्या नकारावर भाऊंनी कोल्हापूरच्या राजाचे पेशवेपद ग्रहण करण्याची धमकी दिली. पण अखेरीस महादोवा पुरंदरेच्या त्यागमुळे दोघांनीही एक करार केला. यामुळे महाराष्ट्रातील गृहयुद्धाची भीती टळली.


१७५१ पासून १७५९ पर्यंत, भाऊ घेतला तरी काही यशस्वी लष्करी मोहिम भाग पेशवे , त्याच्या प्रमुख व्यवसाय प्रशासन होते. ज्यात त्याने पूर्ण क्षमता दाखवली. १७६० हा भाऊंच्या प्रसिद्धीचा कळस होता. उदगिरीच्या लढाईत जेव्हा त्याने निजामाचा पूर्णपणे पराभव केला, तेव्हा त्याने महाराष्ट्र राज्याचा विस्तार केला. पण तेव्हाच, महाराष्ट्राच्या भविष्यातील दुष्टतेचे पूर्वचिन्ह म्हणून , अहमद शाह दुर्रानी पेशव्यांना देण्यात आले.दत्ताजी सिंधिया यांच्या पराभव आणि मृत्यूची बातमी बरारघाट येथे मिळाली. मग पेशव्यांनी दुर्रानीला रोखण्यासाठी भाऊला त्याचा भाऊ रघुनाथरावांच्या जागी सेनापती म्हणून नेमले. २ ऑगस्ट रोजी भाऊने दिल्ली काबीज केली. १० ऑक्टोबर रोजी शाह आलमला दिल्लीचा सम्राट घोषित करण्यात आले. त्यानंतर, १७ ऑक्टोबर रोजी कुंजपुरा जिंकल्यानंतर, तो ३१ ऑक्टोबर रोजी पानिपतला पोहोचला. ४ नोव्हेंबरला विरोधी सेना समोरासमोर उभी राहिली. जवळजवळ अडीच महिन्यांच्या बॅरिकेडनंतर पानिपतची तिसरी लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी सुरू झाली, जी संपूर्ण भारतीय इतिहासातील सर्वात जड युद्धांपैकी एक आहे.


लष्करी गुणवत्तेत दुर्रानीपेक्षा कनिष्ठ असण्याव्यतिरिक्त, भाऊ प्रतिकूल परिस्थितीमुळे निःसंशयपणे सक्तीचे होते. या भीषण लढाईत नानासाहेब पेशव्यांचे पुत्र विश्वासराव आणि भाऊ वगळता अनेक मुख्य सरंजामदारांसह अनेकदा एक लाख मराठा सैनिक आणि नागरी शेत होते. काही इतिहासकार सदाशिव राव भाऊंना या युद्धातील पराभवाचे मुख्य कारण मानतात कारण विश्वास राव जे १ : ३० ते २ : ०० च्या सुमारास मरण पावले. १४ जानेवारी १७६१ रोजी सदाशिवराव भाऊ हत्तीवरून खाली उतरले आणि सैन्याच्या मध्यभागी जाऊन त्याला शोधले, त्याला विश्वास राव सापडला नाही. परंतु जेव्हा सैन्याने पाहिले की त्यांना मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते, आणि या कारणास्तव, केंद्रीय शक्ती किंवा केंद्राच्या ऑपरेशनच्या अनुपस्थितीमुळे मराठा सैन्यात अराजकता निर्माण झाली. याचा फायदा घेत अहमद शाहने मराठा सैन्यावर हल्ला करण्यासाठी ठेवलेले आपले १५००० राखीव सैनिक पाठवले, शेवटी तो मरण पावला, ज्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्व मराठा सैनिक परत धावले. भीषण लढाईत, मराठा सैन्यासह उत्तर भारतात तीर्थयात्रेसाठी गेलेल्या ४०००० हून अधिक लोकांचा शिरच्छेदही करण्यात आला आणि अनेक मुले आणि माताही मारल्या गेल्या. बालाजी बाजीरावांना काही बातमी पोहोचली की सदाशिव राव एका प्रचंड सैन्यासह मरण पावले आणि उत्तरेकडे गेले, पण दिल्लीजवळ त्यांना दुर्रानी अफगाणिस्तानला परतणार असल्याचा संदेश मिळाला आणि त्यांनी त्याबद्दल बोलले. त्यांचा शिरच्छेदही करण्यात आला आणि अनेक मुले आणि मातांनाही मारून ठार करण्यात आले. बालाजी बाजीरावांना काही बातमी पोहोचली की सदाशिव राव एका प्रचंड सैन्यासह मरण पावले आणि उत्तरेकडे गेले, पण दिल्लीजवळ त्यांना दुर्रानी अफगाणिस्तानला परतणार असल्याचा संदेश मिळाला आणि त्यांनी त्याबद्दल बोलले. त्यांचा शिरच्छेदही करण्यात आला आणि अनेक मुले आणि मातांनाही मारून ठार करण्यात आले. बालाजी बाजीरावांना काही बातमी पोहोचली की सदाशिव राव एका प्रचंड सैन्यासह मरण पावले आणि उत्तरेकडे गेले, पण दिल्लीजवळ त्यांना दुर्रानी अफगाणिस्तानला परतणार असल्याचा संदेश मिळाला आणि त्यांनी त्याबद्दल बोलले.बालाजी बाजीरावांना एक पत्र लिहिले ज्यात ते म्हणाले की " दिल्ली आता तुमच्या ताब्यात आहे आणि मी युद्ध घोषित केले कारण सदाशिवरावांनी मला युद्धासाठी प्रेरित केले आणि माझ्या सैन्याला खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि ते पुढे चालू ठेवायचे नाही". म्हणूनच पेशव्यांनी दिल्लीतून माघार घेतली.


पण बालाजी बाजीरावांसाठी आणि पुण्यातच जून १७६१ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. सदाशिव राव भाऊंनी आपल्या सैन्याला फ्रेंच पद्धतीने मोल्ड करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने मराठ्यांच्या दिशेने निजामाच्या सैन्यातील तोफखान्याचा प्रमुख असलेल्या मार्क्विस डी बससीमध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला. पण मार्केस बास्सीसोबत करण्यात अपयशी ठरला. या कारणास्तव, तो इब्राहिम गादीला सामील झाला, जो निजामाच्या सैन्यात आणखी एक तोफखाना हाताळत होता आणि त्याला तोफखान्याची कमांड दिली. त्याच्या सैन्यात जानकोजी शिंदे , महादजी शिंदे , नाना फडणवीस , पेशवे यांचे पुत्र विश्वास राव यांचा समावेश होता.आणि स्वतः सदाशिवराव भाऊ आणि इतर अनेक सरदारही त्याच्यासोबत या युद्धात सामील झाले. पण यातील अनेक सरदारांचा मृत्यू झाला. पण महादजी सिंधिया आणि नाना फडणवीस युद्धातून सुटले. इतर सर्व सरदार मरण पावले. हे युद्ध १८ व्या शतकातील सर्वात भयानक युद्ध ठरले आणि मराठ्यांचा पराभव भारतातील परकीय राजवटीसाठी खूप फायदेशीर ठरला.


सदाशिवरावांची पहिली पत्नी उमाबाई जिन यांना दोन मुलगे आणि दुसरी पत्नी पार्वतीबाई होत्या, जे त्यांच्यासोबत पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या यात्रेला गेले होते. आणि १७६३ मध्ये त्याचा मृत्यूही झाला. १७७० च्या सुमारास, एक माणूस जो स्वतःला सदाशिव राव भाऊ म्हणत असे, तिथे पोहोचला, पण नंतर जेव्हा तो कळला की तो नाही, तेव्हा त्याला ठार करण्यात आले. भारतीय इतिहासात एक महान म्हणून ओळखले जाणारे, त्यांनी देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण दिले आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मराठा सैन्याला जिंकण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सर्व सेनापती पळून गेले पण तरीही तो त्यात मरण पावला आणि अफगाणिस्तानात त्याच्या डोक्याचा शिरच्छेद करण्यात आला .दूर नेण्यात आले आणि त्याचा मृतदेह तेथेच ठेवण्यात आला आणि नंतर मराठी आणि हिंदू धार्मिक विधीनुसार ते जाळण्यात आले. तो भारतीय इतिहासासाठी खूप भयानक ठरला आणि शेवटी तो भारतीय इतिहासातील सर्वात काळा दिवस होता. या लढाईनंतर अहमद शाहने स्वतः भाऊंच्या शौर्याचे कौतुक केले आणि त्यांना खरा देशभक्तही म्हटले.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *एकादशी*,मृगशिरा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, ०४ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"शरीर" कभी भी पूरा पवित्र नहीं हो सकता, किन्तु फिर भी सभी इसकी पवित्रता का प्रयास करते रहते हैं।*

        *"मन"  पवित्र हो सकता है किन्तु आश्चर्य एवं दुःख की बात यह है कि कोई प्रयास ही नहीं करता।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


नारू म्हणजे काय?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *नारू म्हणजे काय ?* 📕


नारू, 'नारू निर्मूलन' या गोष्टी अनेकदा ऐकायला मिळतात. तसेच, नारूमध्ये शरीरातून धाग्यासारखे जंतू


चाहेर येतात असेही आपण कुठेतरी वाचलेले असते. नारू हा ड्रॅकन्क्युलस मेडीनेन्सीस नावाच्या जंतापासून होणारा रोग आहे. त्वचेखालच्या भागात हा जंत राहतो. या रोगामुळे रुग्ण मरत नसला, तरी हैराण मात्र होतो. नारूची प्रौढ मादी रुग्णाच्या शरीरात सामान्यपणे पायाच्या त्वचेखालील असते. तिची लांबी ५५ ते २२० सेंमी. एवढी असते. तर नर २ ते ३ सेंमी लांब असतो. फलन झालेली मादी रुग्णाच्या अंतः त्वचेत दाह निर्माण करते व परिणामी पायाच्या त्वचेवर फोड येतो. अशी व्यक्ती पाण्यात गेल्यास हा फोड फुटतो व मादी पाण्यात सुमारे १० लाख इतक्या सूक्ष्म अळ्या सोडते. पाण्यातील सायक्लोप नावाचे कीटक या अळ्यांना खातात सायक्लोपच्या शरीरात त्या अळ्यांचा विकास होतो. दुसऱ्या निरोगी व्यक्तीने हे पाणी प्याले, तर पाण्यातील सायवलोप्स त्याच्या पोटात जातात. जठरात सायक्लोपचे पचन होते व या अळ्या बाहेर पडतात. कालांतराने या अळ्या लहान आतड्यातून बाहेर पडतात. मजल दरमजल करत त्वचेखालच्या भागात पोहोचतात.


९ ते १२ महिन्यांत अळ्यांची पूर्ण वाढ होऊन त्यांचे मादी व नर तयार होतात व पुन्हा हे चक्र चालू राहते. नारू टाळण्याचे अनेक उपाय आहेत, पण परिणामकारक उपचार नसल्याने त्याचा प्रतिबंध करणेच जास्त महत्त्वाचे ठरते. पायऱ्या असलेल्या विहिरीमुळे याचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे विहिरींना पायच्या नसाव्यात. त्या पक्क्या बांधणीच्या असाव्यात. स्वत:चे संरक्षण करण्यासाठी वारंवार बाहेर खावेप्यावे लागणाऱ्या लोकांनी रुमालाची चौपदरी घडी पाण्याच्या ग्लासवर ठेवावी व पाणी गाळून प्यावे, त्यामुळे सायक्लोप्स पोटात जाणार नाहीत व नारू होणार नाही. पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा, सायक्लोप्स मारण्यासाठी किटकनाशकांचा वापर व लोकांना आरोग्यशिक्षण या तीन मार्गांनी हा रोग नियंत्रणाखाली आणता येईल. भारत सरकारने केलेल्या अविरत परिश्रमांमुळे पाच वर्षापूर्वी या रोगाचे आपण निर्मूलन करू शकलो आहोत. देवी नंतर देशातून निर्मूलन झालेला हा दुसरा रोग आहे.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*


गणितज्ञ रामानुज

 *गणितज्ञ रामानुजन यांना जवळचे मित्र नव्हते. कोणीतरी त्यांना त्याचे कारण विचारले.*


*त्यांनी उत्तर दिले की....* 👇


"जरी मला जवळचे मित्र हवे असले तरी कोणीही माझ्या अपेक्षांच्या कसोटीवर उतरू शकले नाही."


जेव्हा रामानुजन यांना तुमचा मित्र कसा असावा? याची विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले की, *"220 आणि 284 क्रमांकांप्रमाणे!"*


समोरील व्यक्ती गोंधळून गेली आणि विचारले की, "मैत्री आणि या संख्यांचा काय संबंध आहे का?"


रामानुजन यांनी त्याला 220 आणि 284 या संख्यांचे विभाजक शोधण्यास सांगितले!


बर्‍याच प्रयत्नाने त्या व्यक्तीने संख्यांचे विभाजक शोधले आणि त्यांची यादी केली.


*220 →* 1, 2, 4, 5, 10, 11, 20, 22, 44, 55, 110, 220.


*284 →* 1, 2, 4, 71, 142, 284.


त्यानंतर रामानुजन यांनी त्या व्यक्तीला 220 आणि 284 हे विभाजक वगळण्यास सांगितले आणि उर्वरित विभाजकांची त्या व्यक्तिला बेरीज किती होते ते विचारले.


ती व्यक्ती बेरीज पाहून थक्क झाली.....


 *220 →* 1 + 2 + 4 + 5 + 10 + 11 + 20 + 22 + 44 + 55 + 110= *284*


*284 →* 1 + 2 + 4 + 71 + 142= *220*


रामानुजन यांनी समजावून सांगितले की, *"एक आदर्श मैत्री या संख्यांसारखी असावी. एकमेकांना पूरक असावी.  एखादा गैरहजर असतानासुद्धा, दुसर्‍याने अनुपस्थित मित्राचे प्रतिनिधित्व केले पाहिजे!"*


माझ्या सर्व *220* आणि *284* सारख्या मित्रांना....

*'ग'* णि *'त'* विषयातील.....

*'गं'* म *'त'* शीर शुभेच्छा....🌷

संकलन ): गजानन गोपेवाड 



🙏🙏

सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

हिमोग्लोबीन म्हणजे काय


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *हिमोग्लोबीन म्हणजे काय ?* 📕


हिमोग्लोवीन म्हणजे जापल्या शरीराचा प्राणच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हिमोग्लोबीन रक्तातील लाल पेशींमध्ये असते. हिमोग्लोबीन हे हिम व ग्लोबीन या दोन घटकांचे बनलेले असते. ग्लोबीन हे एक प्रथिन असून हिंम या रंगद्रव्यात पॉफयरीन असते. पॉफयरीनमध्ये लोह असते व चार पायरॉल रचना असतात. हिमोग्लोबीनच्या या विशिष्ट रचनेमुळे ते ऑक्सिजन वा कार्बनडायऑक्साइडशी संयोग पावते व अनुक्रमे ऑक्सी व कार्बोक्सी हिमोग्लोबीन तयार होतात. या त्याच्या गुणधर्मामुळेच शरीराला ऑक्सिजन पुरविणे व शरीरात तयार झालेला कार्बन डाय ऑक्साइड फुफ्फुसापर्यंत पोहोचविणे, हे कार्य ते करू शकते. हिमोग्लोबीन लाल असते व त्यामुळे रक्ताला लाल रंग असतो. फुप्फुसामध्ये कार्बोक्सी हिमोग्लोबीनमधून कर्ववायू सोडला जातो व ऑक्सिजनशी हिमोग्लोबीनचा संयोग होऊन ऑक्सी हिमोग्लोबीन तयार होते. त्याद्वारे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. हिमोग्लोबीनच्या निर्मितीसाठी प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह यांची आवश्यकता असते. हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होण्यास रक्तक्षय असे म्हणतात. प्रौढ माणसाच्या रक्तात दर १०० मिलीला १३ ते १५ ग्रॅम इतके हिमोग्लोबीन असते.


हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यासाठी समतोल आहार, हिरव्या पालेभाज्या यांचे खूप महत्त्व आहे. गरज पडल्यास लोहाच्या गोळ्या देऊन वा औषध देऊन वा क्वचित प्रसंगी व्यक्तीस रक्त देऊन हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविता येते. माणूस गुदमरल्यास वा श्वसनास ऑक्सिजन न मिळाल्यास रक्तातील कार्बोक्सी हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते. माणूस निळसर दिसतो. त्याला श्वास घेता येत नाही, दम लागतो व मृत्यूही ओढवतो. असे हे हिमोग्लोबीन आहे की नाही आपला जीव की प्राण ?


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*


3 आँगष्ट नाना पाटील यांची जयंती

 *************************************

*३ ऑगस्ट - क्रांतिसिंह नाना पाटील जयंती*

************************************

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

जन्म - ३ ऑगस्ट १९०० (सांगली)

स्मृती - ६ डिसेंबर १९७६ (वाळवा)


    क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.


महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.


नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र या गावी झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.


*स्वातंत्र्य लढा :*


१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.


ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग.दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.


नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे "तुफान दलाचे" फील्ड मार्शल जी.डी. लाड होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली.


या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती.


ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.


नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकार्‍याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.


१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले.


यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.


स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर १९७६ वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले.


*स्वातंत्र्योत्तर काळ :*


देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *दशमी*,रोहिणी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, ०३ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         *"पेड़ कभी भी उसकी शाखा काटने से नहीं सूखता है। पेड़ हमेशा उसकी जड़ काटने से ही सूखता हैं…. वैसे ही मनुष्य किसी और के कुछ कहने से नही हारता है। मनुष्य की जड़ उसके कर्म, व्यवहार एवं वाणी होते हैं। इसलिए मनुष्य स्वयं अपने अनुचित कर्म, शुष्क अथवा दूषित व्यवहार एवं कटु वाणी से ही अप्रिय होकर समाज में हारता है।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अलेक्झांडर दुरध्वनी शोध

 *📞📞अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल📞📞*

☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️

*☎️☎️दूरध्वनी यंत्राचा शोध☎️☎️*

☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️☎️

*स्मृतिदिन - २ ऑगस्ट १९२२*


अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल

    जन्म -) ३ मार्च १८४७

    मृत्यू -) २ ऑगस्ट १९२२

      यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.

बालपण

बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी एडिनबरा, स्कॉटलंड येथे झाला. त्यांचे आजोबा, वडील - अलेक्झांडर मेलव्हिल बेल आणि भाऊ या सगळ्यांचा मूक-बधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध होता. तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही कर्ण बधिर होत्या. लहानपणी अलेक्झांडर हे नाव ठेवण्यात तरी वयाच्या ११ व्या वर्षी स्वतःच्या नावात ग्रॅहॅम नाव टाकून घेऊन मग अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या नावाने पुढे ते ओळखले जाऊ लागले. मूक-बधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे, त्यांना इतरांचे बोलणे कळावे यासाठी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल सतत प्रयत्नशील होते. त्यासाठी बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी नेमण्यात आले. तेथेच बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न बेल करीत होते. असे यंत्र बनविण्याच्या पयत्नात बेल असतांनाच ते मेबल ह्यूबर्ड नावाच्या कर्ण बधिर मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीला बेलच्या यंत्राविषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल वाचता येणे हाच बधिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितले. मग बेल यांनी तसे यंत्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचे कोडे उलगडले.

कार्य

बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दि. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसऱ्या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून दि. १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना दूरध्वनी यंत्राचे पेटंट मिळाले.

योगदान

बेल यांनी तयार केलेल्या आपल्या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जावू लागली. दि. २ ऑगस्ट १९२२ या दिवशी बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आले.

उल्लेखनीय

विज्ञान विषयक सर्व प्रकारची माहिती नियतकालिकारुपाने जगाच्या समोर यावी या हेतुने १८८२ साली बेल यांनी सायन्स नावाचे नियतकालिक सुरू करण्यात पुढाकार घेतला तसेच आपल्याजवळील पैसा लावून हे नियतकालिक आठ वर्षे सतत सुरू ठेवले. पुढे हे नियतकालिक अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिकृत नियतकालिक झाले.१८९८ ते १९०४ या काळात बेल नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचे अध्यक्ष होते.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन):  गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *नवमी*,कृतिका नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, ०२ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


मूढ़ैः प्रकल्पितं दैवं 

            तत परास्ते क्षयं गताः।

प्राज्ञास्तु पौरुषार्थेन

            पदमुत्तमतां गताः।।


*भावार्थः- भाग्य की कल्पना मूर्ख लोग ही करते हैं।  बुद्धिमान लोग तो अपने पुरूषार्थ, कर्म और उद्यम के द्वारा प्रत्येक उत्तम वस्तु को प्राप्त कर लेते हैं।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...