शनिवार, ३१ जुलै, २०२१

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी निमित्त विशेष लेख

 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’* अशी घोषणा करणारे *लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..*

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

पूर्ण नाव -)  बाळ गंगाधर टिळक

जन्म तारीख -) २३ जुलै १८५६

           रत्नागिरी, महाराष्ट्र

वडिलांचे नाव -) गंगाधर रामचंद्र टिळक

आईचे नाव -) पार्वती बाई गंगाधर

पत्नीचे नाव -) तापीबाई (सत्यभामा बाई) १८७१

मुलांची नावे -) रमा बाई वैद्य, पार्वती बाई केलकर,

विश्वनाथ बलवंत तिलक, रामभाऊ बलवंत तिलक,

श्रीधर बलवंत तिलक और रमाबाई साणे

शिक्षण -) बी.ए. एल.एल. बी

पुरस्कार -) ‘लोकमान्य’

मृत्यू -) १ ऑगस्ट १९२०

              मुंबई, महाराष्ट्र

पॉलिटिकल पार्टी -) इंडियन नॅशनल कॉंग्रेस


टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी मधील चिखलगांवी झाला.तर मृत्यू १ आॕगष्ट १९२० रोजी मुंबई,महाराष्ट्रात झाला स्वातंत्र्यसाठी लढणारी जी अनेक रत्ने होती. त्यांतील हे रत्नागिरीचे ‘रत्न’ होते. त्यांचे ‘केशव’ हे नांव ठेवण्यात आले होते. पण ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. वडील शिक्षण खात्यात सेवेस होते. लहानपणी आई वारल्याने संगोपन चुलतीनेच केले. वडिलांची पुणे येथे बढती मिळाल्याने बदली झाली. वडिलांचे छत्र १९ व्या वर्षी निवर्तले. १६ व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा झाल्याने टिळकांचे लग्न १७ व्या वर्षी झाले. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना पदवीधर होण्यासाठी पैशाची फारशी अडचण भासली नाही. १८७६ साली टिळक बी. ए. ची परीक्षा गणित घेऊन पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांचे गणित व संस्कृत हे दोन विषय उत्तम होते. पुढे टिळकांनी एल. एल. बी. पर्यंत मजल मारली. 


महाविद्यालामध्ये टिळक असतांना गोपाळ गणेश आगरकर या तरुण मित्राची मैत्री जमली. दोघेही एका विचाराची मने घेऊनी चर्चा करीत. देशात सामाजिक सुधारणा व राजकीय स्वातंत्र्य हे झाले पाहिजे. आगरकरांचा विषय तत्त्वज्ञान तर टिळक गणितवाले ‘जोडणारे तोडणारे’ पण मातृभूमीबद्दल खळबळ आंतरिक एकत्र आले की चर्चा असे विद्यार्थी हवे आहेत. असतीलही कदाचित. दोघांवर पाश्चात्य विचारवंत मिल व स्पेन्सर यांचा प्रभाव होता. यातूनच २ जानेवारी १८८० ला पुणमध्ये नू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. 




टिळक-आगरकर यांच्यासमवेत तिसरे सहकारी चिपळूणकर मिळाले व लोकशिक्षण प्रभावी करण्याच्या दृष्टीने ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू करण्याचे ठरले. ‘केसरी’ मधून टिळकांनी आपले जहाल विचार व्यक्त करणे सुरू केलने हे साप्ताहिक महाराष्ट्रात सर्वत्र परिचित झाले. सामाजिक प्रश्नावर आगरकर लिहू लागले. आधी सामाजिक की आधी राजकीय यावर आगरकर आधी सामाजिक तर टिळक आधी राजकीय असे विचार पर्यायाने मतभेद होऊ लागले. टिळक म्हणायचे सामाजिक प्रश्न ही हृदयाची जखम आहे तिला सावकाशपणे हाताळले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक प्रश्न सोडविणे सोपे जाते. यातूनच मतभेद विकोपाला गेला व आगरकरांनी केसरीचे संपादकत्व सोडले. आगरकरांनी सामाजिक प्रश्नासाठी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र काढले. त्यातून टिळकांकडे केसरीचे संपादकत्व आले. टिळकांनी शैक्षणिक संस्थांचा राजीनामा दिला व पूर्णवेळ केसरीकडे दिला. अल्पावधीत ‘केसरी’ प्रसिद्धीस आला.


टिळकांनी गणपती उत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले. ते एक लोकशिक्षणाचे प्रभावी वसपीठ निर्माण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. महाराष्ट्रात अनेक गावी सार्वजनिक गणपती उत्सव त्या अनुषंगाने व्याख्याने, मेळे, लेझीम, पथके आदींमुळे लोक एकत्रित येऊ लागले. त्यापुढे जाऊन ‘शिवजयंती’ सार्वजनिक स्वरूपात सुरू केली. हे महत्त्वाचे पाऊल टिळकांनी उचलले. आपली भूमिका या उत्सवाच्या रूपाने केसरीतून व्यक्त केली. ‘राष्ट्रपुरूषाचे स्मरण’ व त्यातून कृतज्ञता व्यक्त करणे. महापुरूषाचे चरित्र सर्वसामान्यार्पंत पोहोचवणे हा असा हेतू स्पष्ट केला. १८७६-७७ साली पडलेल्या दुष्काळानंतर सरकारने ‘फॅमिन रिलिफ कोड’ पास केला. त्याचे मराठी भाषांतर पुस्तिका रूपाने ‘कर्ज काढून सारा भरू नका’ या वाक्याने ठाणे-कुलाबा येथील कार्यकर्त्यांवर खटले भरले. काद्याच्या चौकटीत राहून सरकारवर दबाव आणणे हे कार्य टिळकांनी प्रभावीपणे केले. पुण्यात १८९७ मध्ये प्लेगची आपत्ती आली. सरकारने रँड या अधिकार्‍याची नेमणूक केली. पण हा अधिकारी म्हणजे कर्दन काळ ठरला. रँडचा खून चाफेकर बंधूंनी केला. टिळकांनी अग्रलेख लिहिला. ‘राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे’ याबद्दल टिळकांना १८ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली. 


१९०७ मध्ये सुरतला काँग्रेसचे अधिवेशन झाले. तिथे जहाल व मवाळ गट असे होऊन अधिवेशन उधळले गेले. टिळकांनी तरुणांना साहसी कृत्ये न करण्याची, किंग्ज फोर्डला धडा शिकविण्याचा सल्ला दिला. पुढे पां. म. बापट यांनी बॉम्बचे मॅनुअल बंगालमधील तरुणांना मिळाले. त्याचे पडसाद उमटले. शेवटी टिळकांवर राजद्रोहाचा खटला होऊन टिळकांना ६ वर्षे ब्रह्मदेशातील मंडाले येथे नेले. टिळकांनी कारागृहात रामायण, महाभारत, तुकाराम, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथांचे वाचन केले व ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ केवळ चार महिन्यांत पूर्ण केला. 


मंडाले येथून सुटल्यावर ‘पुनश्च हरी ओम्’ ची गर्जना करून टिळकांनी कार्य सुरू केले. लखनौ करार घडवून हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवून दिले. अशा जहाल विचारसरणीच्या देशभक्ताची १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबई येथील सरदारगृहात प्राणजेत मालवली. 


*‘दिव्यत्त्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती'*

**********************************

संकलन -) गजानन गोपेवाड 


उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *अष्टमी*,भरणी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, ०१ आॕगष्ट २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

           *"किसी व्यक्ति को प्रशंसा मिलने पर अहंकार तभी उत्पन्न होता है जब अमुक व्यक्ति यह भूल जाता है कि प्रशंसा वास्तव में उसकी नहीं अपितु उसके गुणों की हो रही है।"*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या प्रत्येक सूख दुःखात नेहमी खंबीर पणे साथ देणाऱ्या *माझ्या सर्व श्री कृष्णा सारख्या मित्रांना* माझ्या सारख्या सुदामा कडून कोटी कोटी शुभेच्छा,

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आपली मैत्री सदैव श्रीकृष्ण आणि सुदामा सारखी कायम राहो हिच मैत्री दिनाच्या शुभेच्छा...!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

31 जुलै क्रांतिकारी उधमसींह पुण्यतिथी

 ********************************

*३१ जुलै - क्रांतिकारक उधमसिंह पुण्यतिथी*

********************************


जन्म - २६ डिसेंबर १८९९ (पंजाब)

स्मृती - ३१ जुलै १९४० (लंडन)


सरदार उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एक महान सैनिक आणि क्रांतिकारक होते. लंडन मधील जालियनवाला बाग घटनेदरम्यान त्याने पंजाबचा गव्हर्नर जनरल मायकेल ओ'ड्वायर यांना गोळ्या घातल्या. बर्‍याच इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ही हत्या पंजाबवर नियंत्रण राखण्यासाठी पंजाबियांना धमकावण्यामागील ओ'ड्वायर आणि इतर ब्रिटीश अधिकाऱ्यांनी केलेली योजनाबद्ध योजना होती. इतकेच नाही तर जनरल डायर यांच्या पाठिंब्याने ओ'ड्वायर यांनी माघार घेतली नाही.


जालियनवाला बाग हत्याकांडासाठी उधम सिंगने जनरल डायर यांना ठार मारलेल्या समान नावामुळे सामान्य समज आहे, परंतु प्रशासक यांना असा विश्वास आहे की एका गोळ्यामुळे उधम सिंग यांचा मृत्यू झाला, तर गोळीबार करणार्‍या जनरल डायरचा अर्धांगवायू आणि विविध आजारांनी मृत्यू झाला.


उधम सिंगचा जन्म २६ डिसेंबर १८९९ रोजी पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील सुनम गावात झाला. १९०१ मध्ये उधम सिंगच्या आईचे आणि १९०७ मध्ये वडिलांचे निधन झाले. या घटनेमुळे त्याला आपल्या मोठ्या भावासोबत अमृतसर मधील अनाथाश्रमात आश्रय घ्यावा लागला. उधम सिंग यांचे बालपणीचे नाव शेरसिंह आणि त्याच्या भावाचे नाव मुक्तासिंग होते ज्यांना अनाथाश्रमात अनुक्रमे उधम सिंग आणि साधुसिंह असे नावे मिळाली. इतिहासकार मालती मलिक यांच्या मते, उधमसिंह हे देशातील सर्व धर्माचे प्रतीक होते आणि म्हणूनच त्यांनी आपले नाव राम मोहम्मदसिंग आझाद असे ठेवले जे भारताच्या तीन प्रमुख धर्मांचे प्रतीक आहे.


१९१७ मध्ये उधम सिंग अनाथ आश्रमात राहत होता नि त्याच वेळेस त्याच्या मोठ्या भावाचाही तेव्हा मृत्यू झाला. तो पूर्णपणे अनाथ झाला. १९१९ मध्ये त्यांनी अनाथाश्रम सोडले आणि क्रांतिकारकांसह स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. उधमसिंह अनाथ होते, परंतु असे असूनही तो विचलित झाला नाही आणि त्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी डायरची हत्या करण्याच्या वचनपूर्तीसाठी कार्य केले.


१३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियांवाला बाग हत्याकांडातील उधम सिंग हे प्रत्यक्षदर्शी होते. जालियनवाला बागेत ठार झालेल्या लोकांची नेमकी संख्या राजकीय कारणांमुळे कधीच उघडकीस येऊ शकली नाही. या घटनेने वीर उधमसिंह 'तिलमिला' येथे गेला आणि मायकल डायरला धडा शिकवण्या साठी जालियनवाला बाग हातात घेतला. 


आपले ध्येय पार पाडण्यासाठी उधमसिंग आफ्रिका, नैरोबी, ब्राझील आणि अमेरिकेच्या विविध नावांनी प्रवास केला. १९३४ मध्ये उधम सिंग लंडनला पोहोचला आणि तेथे ९, एल्डर स्ट्रीट कमर्शियल रोड येथे वास्तव्य केले. तेथे त्याने प्रवासाच्या उद्देशाने एक कार खरेदी केली आणि आपले अभियान पूर्ण करण्यासाठी सहा बुलेटसह एक रिवॉल्व्हर खरेदी केली. मायकेल डायरचा ठावठिकाणा स्थापित करण्यासाठी भारताच्या या वीर क्रांतिकारकाने योग्य वेळी प्रतीक्षा केली.


उधम सिंग यांना १९४० मध्ये शेकडो भावंडांच्या मृत्यूचा बदला घेण्याची संधी मिळाली. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या २१ वर्षांनंतर १३ मार्च १९४० रोजी रॉयल सेंट्रल एशियन सोसायटीची लंडनमधील कॅक्सटन हॉल येथे बैठक झाली जिथे मायकेल डायर हे देखील भाषक होते. उधम सिंग त्या दिवशीच सभास्थळी पोहोचला. त्याने आपली रिवॉल्व्हर जाड पुस्तकात लपविली. त्यासाठी त्यांनी पुस्तकातील पाने रिवॉल्व्हरच्या आकारात अशा प्रकारे कापली होती की, डायरचे जीवघेणे हत्यार सहज लपू शकेल.


बैठकीनंतर भिंतीच्या मागून उधम सिंगने मायकेल डायरवर गोळीबार केला. मायकल डायरला दोन गोळ्या लागल्या ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. उधम सिंगने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याला अटक केली. त्याच्यावर खटला चालविला गेला. 


४ जून १९४० रोजी उधमसिंग हत्येचा दोषी ठरला आणि ३१ जुलै १९४० रोजी त्याला पेंटनविले कारागृहात फाशी देण्यात आली.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६


प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *अष्टमी*,अश्विनी नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ३१ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


           *"हर व्यक्ति अपने जीवन मे किसी न किसी व्यक्ति को अपना आदर्श मानता है। किसी को अपना आदर्श बनाना कोई बड़ी बात नहीं है। बड़ी बात तो ये है कि जीवन में आप स्वयं ऐसे अनुकरणीय, सद्कार्य करो कि लोग आपको अपना आदर्श माने।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रात आंधळेपणा म्हणजे काय?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *'रातांधळेपणा म्हणजे काय ?* 📕


रात्रीच्या अंधारात कोणालाच नीट दिसत नाही. उजेडातून अंधारात गेल्यानंतर आपल्याला काही काळ काहीच दिसत नाही. त्यामुळेच सिनेमाला उशीरा येणारे लोक जेव्हा थिएटरमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ते अक्षरश: आंधळ्यासारखे, चाचपडत चालत असतात. थिएटरमध्ये आधीपासून बसलेल्या लोकांना मात्र त्याची गंमत वाटते, कारण त्यांना व्यवस्थित दिसायला लागलेले असते. डोळ्याच्या अंतर्भागात रेटीना किंवा दृष्टिपटल असते. त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. या पेशींना 'कोन व रॉड' असे म्हणतात. त्यापैकी कोन हे उजेडातील दृष्टीसाठी तसेच वस्तूचा आकार, रंग याचे ज्ञान होण्यासाठी आवश्यक असतात. रॉड हे अंधारातील दृष्टीसाठी आवश्यक असतात. रॉडमध्ये होडोप्सीन नावाचे रंगद्रव्य असते. याची निर्मिती जीवनसत्त्व 'अ' पासून होत असते. उजेडात होडोप्सीनचे रूपांतर जीवनसत्त्व 'अ' मध्ये, तर अंधारात जीवनसत्त्व 'अ' चे रूपांतर होडोप्सीनमध्ये होते. अंधारात दिसण्यासाठी होडोप्सीन निर्माण होणे महत्त्वाचे आहे. उजेडातून अंधारात आल्यावर हळूहळू होडाप्सीनची निर्मिती होते व आपल्याला दिसायला लागते. याला अंधाराला आपण सरावणे असे म्हणता येईल.


जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होडोस्पीनची निर्मिती कमी प्रमाणात होते व साहजिकच अंधारातील दृष्टीवर विपरीत परिणाम होतो. जीवनसत्त्व 'अ'चा अभाव विशेषेकरून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अशी मुले सायंकाळी चाचपडत चालतात. आवाजाचा कानोसा घेऊन चालायचा प्रयत्न करतात व वस्तूंना अडखळून पडतात. यालाच 'रातांधळेपणा' असे म्हणतात.


रातांधळेपणा येणे ही जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची फक्त सुरुवात असते. जीवनसत्त्व ‘अ’चा पुरवठा न झाल्यास डोळ्यातील आवरण कोरडे पडून त्यावर व्रण पडतो. शेवटी डोळ्यात फूल वा टीक पडू शकते. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आजारात डोळा पूर्णपणे खराब होऊन अंधत्व येते. आपल्याला नवल वाटते, पण आपल्या देशातील एकूण अंधांपैकी २ टक्के अंध जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे अंध होतात. हे टाळण्यासाठी सोपा उपाय म्हणजे जीवनसत्त्व 'अ' असलेला आहार घेणे. ज्यात शार्क व कॉर्ड माशांच्या यकृताचे तेल, गाजर, शेवग्याच्या शेंगा, पाने, हिरव्या पालेभाज्या, पपई, आंबे इ. पदार्थांचा समावेश होतो. असे पदार्थ खाल्ल्याने जीवनसत्त्व 'अ'चा अभाव निर्माण होणार नाही व पर्यायाने रातांधळेपणा, तसेच अंधत्वही टाळता येईल.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*


═══════════════════════

  

रामचंद्र गुप्ते भुशास्त्रज्ञ यांचा जन्म दिवस

 *रामचंद्र भालचंद्र गुप्ते*

🏔️⛰️🗻🌋🏔️🌋🗻⛰️🏔️

*🗻🏔️⛰️भुशास्त्रज्ञ⛰️🏔️🗻*


*जन्मदिन - ३० जुलै १९१९*


प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ.रामचंद्र भालचंद्र गुप्ते यांचा जन्म ऐतिहासिक सरदार घराण्यात झाला. तैल व चिकित्सक बुद्धी, त्याबरोबरच भूशास्त्रीय प्रश्‍नांची उकल करण्याची हातोटी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, यामुळे त्यांनी भूशास्त्रीय क्षेत्रात आदराचे स्थान मिळविले होते. डॉ. गुप्ते खऱ्या अर्थी निरीश्वरवादी होते. त्यांनी अनेक दु:खाचे प्रसंग धीराने पचविले. महाविद्यालयात शिकणाऱ्या त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे आकस्मिक दु:खद निधन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला मंत्रालयात झालेल्या ‘कोयना टेमर्स कमिटी’च्या बैठकीतील चर्चेत त्यांनी अविचल मनाने भाग घेतला होता.


पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी. पदवी मिळवली. त्यांना त्या परीक्षेत ‘दक्षिणा फेलोशिप’ मिळाली होती. संशोधन करून एम.एस्सी. पदवी प्राप्त केल्यावर काही महिने त्यांनी भारतीय भूशास्त्र संस्था (जी.एस.आय.) मध्ये काम केले. त्यानंतर १९६६ सालापर्यंत त्यांनी अहमदाबाद, नागपूर व पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत अधिव्याख्याता म्हणून काम केले. मार्च १९६६ पासून जुलै १९७७ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक व भूशास्त्रीय विभागप्रमुख म्हणून होते.


१९५० सालापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्राचा ८५ टक्के भूभाग व्यापणाऱ्या ‘डेक्कन टॅप’ खडकांविषयी त्यांनी मूलभूत संशोधन केले. त्यात खडकांचे विविध प्रकार, त्यांच्या क्षेत्रीय संरचना, त्यांचे विविध गुणधर्म याविषयी त्यांनी सखोल निरीक्षण व अभ्यास केला. त्यांच्या संशोधनामुळे या खडकांच्या बऱ्याच अज्ञात वैशिष्ट्यांविषयी नव्याने माहिती मिळाली. तसेच बऱ्याच जुन्या कल्पना चुकीच्या असल्याचे त्यांनी दाखवून दिले. संशोधनातील अप्रामाणिकपणा ते कधीच खपवून घेत नसत.


भूशास्त्र या विषयाचा अभ्यास प्रयोगशाळेपुरता मर्यादित न ठेवता, त्या संशोधनाचा उपयोग स्थापत्य अभियांत्रिकी कामात केला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. खडकांच्या विविध गुणधर्मांविषयी त्यांनी जी अचूक माहिती मिळविली होती, त्या माहितीचा अभियांत्रिकी भूशास्त्र समजण्यास फार उपयोग झाला. गेरू, ज्वालामुखी, ब्रेशिया, डाइक, भरितकुहरी, बेसॉल्ट या खडकांबद्दल अभियंत्यांच्या मनात चुकीच्या कल्पना असल्यामुळे धरणांचा पाया घेताना त्यांच्या मनांत काहीशी भीती असे. त्यामुळे प्रकल्पावर निष्कारण बराच खर्च केला जाई. डॉ. गुप्ते यांच्या संशोधनामुळे कोट्यवधी रुपये वाचू शकले. त्यामुळेच स्थापत्य अभियंते त्यांचा सल्ला शिरसावंद्य मानत.


१९६२ सालापासून महाराष्ट्र सरकारचे पाटबंधारे खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, मध्य रेल्वे, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स, टाटा इलेक्ट्रिसिटी कंपनीज, एम.आय.डी.सी., बृहन्मुंबई महानगरपालिका, न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन, इलेक्ट्रिसिटी टू लाओस यांसारख्या अभियांत्रिकी संघटनांसाठी अनेक धरणे, कालवे, बोगदे, रस्ते, लोहमार्ग, भूमिगत विद्युतगृहे व पूल यांसारख्या अनेक प्रकल्पांच्या ठिकाणी भूशास्त्रीय अभ्यास करून त्यांचे आराखडे व बांधकाम यांविषयी डॉ. गुप्ते यांनी मोलाचा सल्ला दिला. या प्रकल्पांव्यतिरिक्त बृहन्मुंबई पाणीपुरवठ्यासाठी भातसा, मध्य वैतरणा धरण,समुद्राखालील वसई खाडी बोगदा (क्रीक टनेल), केळशी बोगदा (अंडरक्रीक टनेल), सहार ते रेसकोर्स हा प्रमुख बोगदा व ५० कि.मी. लांबीचे पाण्यासाठीचे मुंबई शहरातील इतर बोगदे, वैतरणा जलविद्युत प्रकल्प, कोयना जलविद्युत प्रकल्पाचा तिसरा व चौथा टप्पा, पुण्याजवळील पानशेत,वरसगाव,टेमघर,भाभाआसखेड,चासकमान इत्यादी धरणांवर,तसेच मध्य रेल्वेच्या थळ आणि बोरघाटातील तिसरे रेल्वे मार्ग, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या अणुभट्टीच्या जागा, लाओसमधील सेसेल, सेलाबाम इत्यादी जलविद्युत प्रकल्पांवर त्यांनी तज्ज्ञ म्हणून काम केलेले आहे.


नर्मदा पाणी तंट्याविषयी लवादाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारचे भूशास्त्रीय सल्लागार म्हणून नवागाव व जलसिंधी येथील धरणांच्या जागेचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र सरकारला लवादांशी संबंधित बाबींविषयी मोलाचा भूशास्त्रीय सल्ला दिला.


महाराष्ट्र सरकारच्या ‘कोयना ट्रेमर्स कमिटी’ व ‘एक्स्पर्ट कमिटी ऑन सिस्मॉलॉजी’चे एक तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांनी काम केले. कोयना भूकंप कोयना धरणामुळे झाला नाही हे भूशास्त्राच्या आधारे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सखोल संशोधन केले. हा भूकंप धरणामुळे झाला असणे कसे शक्य नाही हे त्यांनी शोधनिबंध लिहून व विविध चर्चासत्रांत भाग घेऊन दाखवून दिले.


महाराष्ट्र सरकारच्या ‘सिंचन व जल आयोगा’चे सहयोगी तज्ज्ञ म्हणून त्यांनी आयोगाच्या अनेक कार्यशाळांत झालेल्या चर्चेत भाग घेतला व आयोगाला भूजलाच्या भूशास्त्रीय पैलूंविषयी टिप्पण्या तयार करण्यास सहकार्य केले.


भाषा संचालनालयाने मराठी भाषेत भूशास्त्रीय परिभाषा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. परिभाषा तयार करण्याच्या चर्चांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.


डेक्कन टॅप खडकांच्या मूलभूत स्वरूपाविषयी व त्यांच्या अभियांत्रिकी भूशास्त्रीय गुणधर्मांविषयी त्यांचे पंचवीसहून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांत प्रसिद्ध झालेले आहेत. ‘पी.डब्ल्यू.डी. हँड बुक प्रकरण क्र. ६’, तसेच ‘ए टेक्स्ट बुक ऑफ इंजिनिअरिंग जिऑलॉजी’ व ‘एजी सिरीज ऑफ जिऑलॉजिकल मॅप्स’ ही त्यांची पुस्तके भूशास्त्रातील आधारभूत ग्रंथ मानले जातात.


भूशास्त्रातील ज्ञानकोश असलेले डॉ. गुप्ते कालवश झाल्याने डेक्कन टॅप बेसॉल्ट खडकांच्या एका अभ्यासपर्वाचा अंत झाला, असेच म्हणावे लागेल.

— डॉ. बा. मो. करमरकर

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏


संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *सप्तमी*,रेवती नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ३० जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शूद्रो ब्राह्मणतामेति 

            ब्राह्मणश्चैति शूद्रताम।

क्षत्रियाज्जातमेवं तु 

            विद्या द्वैश्यात्तथैव च।


*अर्थात मनुस्मृति के अध्याय १०/६५  में महर्षि मनु कहते हैं कि कर्म के अनुसार ब्राह्मण शूद्रता को प्राप्त हो जाता है और शूद्र ब्राह्मणत्व को। इसी प्रकार क्षत्रिय और वैश्य से उत्पन्न संतान भी अन्य वर्णों को प्राप्त हो जाया करती हैं। विद्या और योग्यता के अनुसार सभी वर्णों की संतानें, अन्य वर्ण में जा सकती हैं।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, २९ जुलै, २०२१

गणिती कोडे

 गणितात कोणतीही संख्या 1 ते 10 पर्यंतच्या  सर्व संख्याने भागता येत नाहीत,   पण ही एक संख्या अशी विचित्र आहे की जगातले सर्व गणितज्ञ आश्चर्याने चकित झाले. ही संख्या भारतीय गणितज्ञांनी आपल्या अचाट बुद्धीने शोधली...!


ही संख्या - 2520 पहा. ही इतर अनेक   संख्यांपैकी एक आहे असे दिसते पण  वास्तव्यात मात्र तसे नाही, ही अशी संख्या आहे जगातील अनेक गणितज्ञांना थक्क करून सोडले...!!


ही विचित्र संख्या 1 ते 10 यापैकी प्रत्येक संख्येने भाग जाणारी आहे, ती संख्या सम वा विषम असली तरीही.

ह्या संकटाला 1 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी शून्याचे रहाते. खरोखरच ही अद्भूत व अशक्य अशी संख्या वाटते...!! 

आता पुढील टेबल पहा, वरील विधानाची सत्यता स्वतः अनुभवा.


2520 ÷ 1 = 2520

2520 ÷ 2 = 1260

2520 ÷ 3 = 840

2520 ÷ 4 = 630

2520 ÷ 5 = 504

2520 ÷ 6 = 420

2520 ÷ 7 = 360

2520 ÷ 8 = 315

2520 ÷ 9 = 280

2520 ÷ 10 = 252


2520 या संखेचे रहस्य [ 7 × 30 × 12 ] या गुणाकारात दडले आहे.


भारतीय हिंदू संवत्सरच्या अनुषंगाने या 2520 संखेचे कोडे उलगडते,जे या संखेचे गुणाकार आहे::

ऐक आठवड्यांचे दिवस (7), एका महिन्याचे दिवस (30) व एका वर्षाचे महीने (12)

[7×30×12=2520]

हेच आहे भारतीय कालगणनेचे वैशिष्ट्य व श्रेष्ठत्व!!


29 जुलै जे आर डी टाटा जन्म दिवस

 ********************************

✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️

*२९ जुलै - जे.आर.डी. टाटा जन्मदिन*

🚗🚕🚙🚌🚑🚒🚐🚚🚛🚗🚕

********************************

🏭🏥🏤🏨🏢✈️🏢🏨🏤🏥🏭

जन्म -  २९ जुलै १९०४ (फ्रान्स)

स्मृती - २९ नोव्हेंबर १९९३


जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी. टाटा हे भारतीय उद्योजक होते.ते पहिले भारतीय वैमानिक असून,भारतातील✈️ विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.


टाटांचा जन्म २९ जुलै १९०४ मध्ये पॅरिस,फ्रान्स येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले,पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्सातच गेले.काही कारणाने ते मॅट्रीक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत.


इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते.त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला.१९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.१९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली.पुढे १९४६ साली तिचे नाव बदलून एअर इंडिया ठेवले गेले.


वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन,वाहन,चहा,माहिती,हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. 


टाटांच्या पुढाकाराने १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली.त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.


टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय १९४१ साली मुंबईत सुरू केले.


टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाली. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना १९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर १९९२ साली त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

******************************

संकलन -) गजानन गोपेवाड 


उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

वडस म्हणजे काय?


══════════════════════

  संकलन

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *वडस म्हणजे काय ?* 📕


वडस हा डोळ्यांचा विकार आहे. तुम्ही काही लोकांच्या डोळ्यात पांढुरका पडदा पाहिला असेल. डोळ्यांच्या नाकाजवळच्या भागापासून बुबुळापर्यंत असणाऱ्या या पडद्याला वडस असे म्हणतात. वडस होण्याचे मुख्य कारण म्हणजे वयोमानानुसार डोळ्यातील श्लेष्मल आवरणाच्या खालील पेशी व उतींमध्ये होणारे हानिकारक बदल हे होय. सामान्यतः प्रौढ पुरुषांना हा रोग होतो.


वडस म्हणजे डोळ्यातील श्लेष्मल आवरणाची एक त्रिकोणाकृती घडीच असते. ती बुबुळापर्यंत व कधीकधी बाहुलीच्या वरच्या वाजूपर्यंत वाढते. बाहुलीवर या पडद्याची वाढ झाल्यास दिसायला त्रास होतो. डोळ्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्याने क्वचित एकाऐवजी दोन वस्तू दिसायला लागतात.


वडसाचा आकार जर वाढत नसेल व त्यामुळे दिसायला त्रास होत नसेल, तर उपचार करण्याची आवश्यकता नसते. वडसाचा आकार जर वाढत असेल वा दिसायला त्रास होत असेल, तर मात्र उपचार करणे गरजेचे असते. यात शस्त्रक्रिया करावी लागते. ही सोपी शस्त्रक्रिया असून यात वाढलेला पडदा कापून टाकतात. वडस उपचाराने नक्कीच बरे होते.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

  

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *पँचमी*,पू.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २८ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


षण्णामात्मनि नित्यानाम्

              ऐश्वर्यं योऽधिगच्छति।

न स पापैः कुतोऽनर्थै:

              युज्यते विजितेन्द्रियः॥


भावार्थः-  *जो व्यक्ति मन के अंदर रहने वाले काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार तथा ईर्ष्या नामक छह शत्रुओं को जीत लेता है, वह जितेंद्रिय हो जाता है। ऐसा व्यक्ति दोषपूर्ण कार्य एवं पाप-कर्मों में लिप्त नहीं होता।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, २८ जुलै, २०२१

रक्त गट कसे ओळखावे


══════════════════════

    संकलन ):

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

🌡 *रक्तगट कशावरून ठरवतात ?* 📊

_____________________________


*🔴तुमचा रक्तगट कोणता हे अनेकदा अनेकांनी तुम्हाला विचारले असेल. रक्तगट माहीत नसण, हे सुशिक्षित लोकांना कमीपणाचे वाटू लागले आहे. ही चांगली गोष्ट आहे. या रक्तगटांविषयी थोडक्यात माहिती करून घेऊ. सगळ्यांचे रक्त लाल असते व सगळ्यांच्या रक्तात लाल, पांढऱ्या पेशी, हिमोग्लोबिन, पाणी हे घटक सारखेच असले तरी रक्तगटाच्या बाबतीत मात्र ते सारखे नसते.*


*🔴लॅण्डस्टीनर या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावला. लाल रक्तपेशींवर A, B या घटकांच्या (अॅंग्ल्युटीनोजेन) असण्या वा नसण्यावर रक्ताचे चार गट करण्यात येतात. A व B या घटकांशी क्रिया करून लाल पेशी साकळवणाऱया घटकांना अॅग्लुटीनीन असे म्हणतात.*


*🔴A रक्तगट असणाऱ्या माणसाच्या रक्तात बीटा, B गटाच्या रक्तात अल्फा, O गटाच्या रक्तात अल्फा, बीटा दोन्ही अॅग्लुटिनीन उपस्थित असतात. AB गटाच्या रक्तात हे दोन्ही नसतात. A, B, O, AB अशा वरील वर्गीकरणाखेरीच रक्ताचे RH* *+ Ve आणि Rh - Ve असे वर्ग असतात. + Ve रक्त असेल तर त्यात D-* *अॅग्लुटोनोजेन असते व - Ve असेल तर ते नसते.*


*🔴त्यामुळे वरील वर्गीकरणावरून एकूण रक्तगट असे करता येतील :  A+, A-, B+, B-, AB+, AB-, O+, O-*

***यात कुणाचे रक्त कोणाला देता येते ? यासाठी एक* *विशिष्ट प्रकारचा चार्ट असतो.*


*यातही जर कुणाचा रक्तगट - Ve असेल तर त्यास + Ve रक्तगटांचे रक्त चालणार नाही. त्यास - Ve* *रक्तगटाचेच रक्त द्यावे लागते* *परंतु + Ve ला - Ve रक्तगटाचे रक्त चालू शकते.*


*या रक्तगटांचे महत्त्व आपल्याला रक्त स्वीकारण्याची वेळ येते तेव्हा लक्षात येते. तसेच जर मातेचा रक्तगट - Ve असेल आणि तिच्या गर्भात जर + Ve रक्तगटाचे मूल असेल तर त्या रक्तांमध्ये विरोधी क्रिया होऊ शकते आणि मातेवर व गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतात.*


*🔴रक्तगटाचा आणखी एक उपयोग म्हणजे यावरून पालकत्व सिद्ध करता येऊ शकते. लँडस्टीनरच्या या शोधामुळे रक्तदानाच्या क्षेत्रात खूप मोलाचा विकास झाला आहे.*


═══════════════════════

 

28 जुलै जागतिक कावीळ दिवस

 *२८ जुलै*

*जागतिक कावीळ दिवस*

(Hepatitis B Day)

💉💉💉💉💉💉💉💉💉💉

*Baruch Blumberg*

*कावीळ आजारावर लस शोधुन काढली*


*जन्मदिन - २८ जुलै १९२५*


संसर्गजन्य रोगांच्या उत्पत्ती आणि त्यांचा प्रसार याबद्दलचे संशोधन तसेच त्यावरील नवीन यंत्रणेसंबंधित शोधांसाठी ब्लॉम्बरग यांना नोबेल पारितोषिक प्राप्त झाले." ब्लंबर्गने हेपेटायटीस बी विषाणूची ओळख पटविली आणि नंतर त्याचे निदान चाचणी आणि लस विकसित केली .


कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते.

कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते.

आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ,ओकारी,भूक मंदावणे, गुबारा धरणे,शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो.

दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्‍हाॅसिस' असे म्हणतात. सिर्‍हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो.

अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते.

कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो.

शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *पँचमी*,पू.भा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २८ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


षण्णामात्मनि नित्यानाम्

              ऐश्वर्यं योऽधिगच्छति।

न स पापैः कुतोऽनर्थै:

              युज्यते विजितेन्द्रियः॥


भावार्थः-  *जो व्यक्ति मन के अंदर रहने वाले काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार तथा ईर्ष्या नामक छह शत्रुओं को जीत लेता है, वह जितेंद्रिय हो जाता है। ऐसा व्यक्ति दोषपूर्ण कार्य एवं पाप-कर्मों में लिप्त नहीं होता।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, २६ जुलै, २०२१

वेड्या माणसाच्या मेंदुत काय बीघाड होतो


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

🧠 *वेड्या माणसाच्या मेंदूत काय बिघाड होतो ?* 🧠 

**********************************

वेडा म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर कपडे फाडणारी, दगड मारणारी, असंबद्ध बडबड करणारी व्यक्ती उभी राहते. एक तर आपल्याला तिची भीती वाटते किंवा किळस वाटते. आपण पाहिलेल्या अशा व्यक्ती म्हणजे वेडातील एक प्रकार आहे.


मनोविकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही व्यक्तींनाच वरील लक्षणे असतात. इतर प्रकारांमध्ये भ्रमिष्टपणा, उन्माद, अतिनैराश्य हे गंभीर आजार; तर तणावग्रस्त मानसिकता, नैराश्य, हिस्टेरिया हे कमी गंभीर आजार यांचा समावेश होतो. याशिवाय सदोष व्यक्तिमत्त्व - जसे संशयी स्वभाव, घुमेपणा, आत्मकेंद्रीपणा, हट्टीपणा, परावलंबित्व, तसेच समाजविघातक कृत्य करण्याची प्रवृत्ती; हे देखील सौम्य प्रकारचे मनोविकार समजले जातात. काही व्यक्ती घराला कुलूप लावल्यानंतर तीन तीनदा ओढून तर पाहतातच, पण थोडे अंतर गेल्यावर परत येऊन पाहतात. हा सुद्धा एक प्रकारचा मनोविकारच आहे. अंगात येणे, लैंगिक विकृती व व्यसनाधीनता; हे देखील मनोविकारच आहेत.


वरील मनोविकार पाहिल्यावर आपल्याला साहजिकच असा प्रश्न पडतो की, या व्यक्तींच्या मेंदूत काही बदल होत असतील का ?


आपल्या मेंदूमध्ये कोट्यवधी पेशी असतात. त्या पेशी अनेक धाग्यांसारख्या तंतूंनी एक दुसऱ्याशी जोडलेल्या असतात. एका पेशीतील संदेश दुसऱ्या पेशीपर्यंत जाण्यासाठी तर तंतूत असणारे रासायनिक द्रव्य व त्यातून जाणारा विद्युतसंदेश यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या रासायनिक पदार्थांचे प्रमाण कमी जास्त झाले किंवा विद्युतसंदेशात बिघाड झाला, तर मेंदूचे कामकाज बिघडते. अर्थात मेंदूच्या रचनेत काही बदल होत नाही.


मानसिक विकारांची कारणे बघितल्यास त्यात अनुवांशिकता (विशेषत: गंभीर मानसिक विकार), मातापित्याचे प्रेम व वागणूक, घरातील वातावरण, सामाजिक आर्थिक परिस्थिती, व्यसने व शारीरिक आजार, मेंदूच्या आवरणाचा दाह, गुप्तरोग, अपघातात मेंदूला इजा होणे; यांचा समावेश होतो.



*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज


तंजावर भोसले घराण्याचे अपरिचित माहिती

 *तंजावरच्या भोसले राजे घराण्याविषयी अपरिचीत माहिती*


*१) छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधु व्यंकोजीराजांना १६७५ मध्ये आदिलशहाने तंजावरमध्ये राज्य करणाऱ्या त्रिची येथील नायकाला धडा शिकविण्यासाठी पाठविले होते. व्यंकोजीराजांनी त्रिचीच्या नायकाला खाली खेचुन आदिलशहाच्या मृत्युनंतर स्वतःला राजे घोषित केले.*


*२) दक्षिण दिग्विजयावेळी महाराजांनी तंजावरचे राज्य व्यंकोजींना परत केले आणि चांगले संबंध प्रस्थापित केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे तंजावरचे पहिले मराठा राजे होते.*


*३) चेन्नई जवळच्या जिंजीचा किल्ला हा मराठा साम्राज्याचा भाग होता. तंजावरच्या राजांनी कावेरी खोऱ्याच्या आजुबाजुच्या प्रदेशावर राज्य केले.*


*४) तंजावरचे मराठा साम्राज्य एकूण १८० वर्षे टिकुन होते. या १८० वर्षात एकुण १० राजे होऊन गेले.*


*५) सन १८३२ मध्ये तिसरे शिवाजी महाराज यांची सत्ता ब्रिटिशांनी बरखास्त केली. हे तंजावरचे शेवटचे मराठा राजे होय.*


*६) तंजावरच्या मराठा राजवटीतील सर्वात शुर व विद्वान राजा म्हणजे पहिले “सरफोजीराजे” होय. ते स्वतः उत्तम वैद्य व डोळ्यांचे डॉक्टर होते.*


*७) तंजावरचे मराठा साम्राज्य विद्वत्ता व कला संपन्न होते. तेथील मराठा राजांनी ५० हुन अधिक विविध विविध ग्रंथ लिहिले असुन त्यात १२ दर्जेदार नाटके आहेत. यातीलच एक मराठी नाटक रंगमंचावर तंजावर येथे सादर केले गेले, ते रंगमंचावरील पहिले मराठी नाटक होय.*


*८) राजा चोळ याने बांधलेल्या बृहदेश्वर राजराजेश्वर मंदिराच्या भींतीवर मराठा राजांनी मराठा साम्राज्याचा जगातील सर्वात मोठा मराठी शिलालेख कोरला आहे.*


*९) भारतातील पहिला छापखाना राजे सरफोजी यांनी तंजावर येथे सुरु केला.*


*१०) कवी परमानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार लिहिण्यास सुरुवात केलेला “शिवचरित्र” ह्या मुळ ग्रंथाची अस्सल प्रत येथे आजही आहे.*


*११) भारतातील मुलींची पहिली शाळा राजे सरफोजी यांनी तंजावर येथे काढली.*


*१२) मराठा राजांनी भरतनाट्यम या नृत्याला राजाश्रय दिला होता.*


*१३) मराठा राजांनी मराठी सण,उत्सव,व्रत,कला ई. तंजावर मध्ये रुजविले. तसेच सरफोजीराजे यांनी भव्य “सरस्वती महाल” हे ग्रंथालय उभारले आहे. त्यात युध्दशास्त्रापासुन वैद्यकशास्त्रापर्यंत पशु,पक्षी,आरोग्य,अर्थ,कला,ज्यातिषशास्त्र,वास्तुशास्त्र, बांधकामशास्त्र ईत्यादी १७ विषयावर हजारो ग्रंथ येथे जतन केलेले आहेत. एकुण ग्रंथसंपदा ३ लक्ष एवढी आहे.*


*१४) सरस्वती महाल ग्रंथालयात सुमारे ८० हजार ग्रंथ व हस्तलिखिते आहेत.  त्यात संस्कृतमधील ४० हजार हस्तलिखिते आहेत, तसेच अनेक तामिळ, तेलगु, मोडी, देवनागरी भाषेतील ग्रंथ आहेत.*


*१५) मोडी लिपीतील अडीच लाखांपेक्षा जास्त हस्तलिखितांचे ८५० गठ्ठे जतन करुन ठेवले आहेत.*


*१६) सरफोजीराजेंनी त्याकाळी लंडन, पॅरिस सारख्या शहरात चित्रकार पाठवुन त्या शहरांची चित्रे काढुन घेतली ती इथे पहायला मिळतात.*


*१७) तंजावरच्या या ग्रंथालयात एक ग्रंथ असा विस्मयचकित करणारा आहे, त्याच्या ओळी उजवीकडुन वाचल्या तर “रामायण”, डावीकडून वाचल्या तर “महाभारत” आणि वरुन खाली वाचल्या तर “श्रीमदभागवत” आहे.*


*१८) ताडाच्या, पामच्या झाडाच्या पानावर लिहिलेले पुरातन ज्योतिष शास्त्र व इतर ग्रंथ तंजावरच्या मराठा राजांनीच जतन करुन ठेवलेले आहेत.*


*१९) तंजावरच्या भोसले संस्थानने सन १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळी २००० किलो सोने भारत सरकारला मदत म्हणुन दिले होते.*


*२०) १९७१ च्या पाकिस्तान युद्धात भारत सरकारला मदत म्हणुन शस्त्रास्त्रे दिली होती.*


*२१) विनोबा भावे यांच्या भुदान चळवळीला १०० एकर जमीन दान दिली होती.*


*२२) तंजावरमध्ये आजही सुमारे ५ लक्ष मराठी लोक राहतात, ते तामिळी पेहराव घालत असले तरी त्यांच्या घरात तोडकी मोडकी का होईना मराठीच बोलली जाते.*


*२३) सातारा, कोल्हापुर प्रमाणे आजही तंजावर येथे भोसले संस्थानिक आहेत.*


*२४) तिथले विद्यमान छत्रपती बाबाजीराजे भोसले हे आहेत. बाबाजीराजे स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असुन त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे.*


*२५) १ मे २०१५ रोजी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने तंजावरच्या मराठा साम्राज्यवार एक स्पेशल रिपोर्ट देखील बनवला होता.*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

संकलन -) गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

11 वे भारताचे राष्ट्रपती डॉ कलाम सर यांची आज पुण्यतिथी

 


*ए.पी.जे. अब्दुल कलाम*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*🇮🇳🇮🇳भारताचे अकरावे राष्ट्रपती🇮🇳🇮🇳*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*स्मृतिदिन - २७ जुलै २०१५*


अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) 

जन्म -) १५ ऑक्टोबर १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.

कार्य

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ.कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ.कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

आषाढ मास,कृष्ण पक्ष, *चतुर्थी*,शतभिषा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,वर्षा ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, २७ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


पुनर्वित्तं पुनर्मित्रं 

            पुनर्भार्या पुनर्मही।

एतत्सर्वं पुनर्लभ्यं 

            न शरीरं पुनः पुनः॥


*भावार्थ :— धन, संपति, मित्र, स्त्री  बार-बार मिल सकते हैं; लेकिन मनुष्य-शरीर केवल एक ही बार प्राप्त होता है। एक बार नष्ट हो जाने के बाद पुनः प्राप्त करना असंभव है। इसीलिए इस मानव-देह को अधिकाधिक राष्ट्र व मानव कल्याण में लगाना ही मानव-देह की सार्थकता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तंबाखू, पान खाल्यांने दात खराब होतात का


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

*तंबाखू पान खाल्ल्याने दात खराब होतात का?* 

************************************

तंबाखू वा पान खाऊन रस्त्यावर व कोठेही थुंकणाऱ्या लोकांची कोणाला किळस येणार नाही ? दुसरे म्हणजे कार्यालयात वा शाळेत कोणी पानाचा तोबरा भरून तुम्हाला शिकवले व तुमच्याशी बोलू लागले तर बरे वाटणार नाही. तंबाखूची गोळी लोक तोंडात ठेवतात. तंबाखूतील निकोटीन हे द्रव्य लाळेत मिसळते व दाताभोवती जमा होते. तोंडात कायम तंबाखू असल्याने तोंडाची स्वच्छता नीट राखली जात नाही. या दोन्ही कारणांमुळे दात पिवळट होतात. कालांतराने किडतात. पान खाल्ल्याने जीभ रंगते, हे तुम्हाला माहीत आहेच. सुपारीमुळे दातांवरील आवरणाला चिरा पडतात, त्यातून दात किडण्याला सुरुवात होते. कधी कधी तर सुपारी खाताना दाताचा टवकाही उडतो ! अर्थात क्वचित पान खाल्ले व नंतर खळखळून गुळण्या भरल्या तर काही नुकसान होत नाही; पण वारंवार पान खाण्याने आणि त्याची सवय लागण्याने (विशेषत: तंबाखूयुक्त) दातांना पिवळट लालसर रंग येतो व दात कालांतराने किडतात.


बसमध्ये सीटच्या बाजूला, जिन्याच्या भिंतीवर, ऑफिसच्या कोपऱ्यात अशा अनेक ठिकाणी हे तंबाखू वा पान खाणारे लोक इतस्तत: थुंकून ठेवतात. त्यामुळे तो सर्व भाग अस्वच्छ दिसतो. "थुंकू नये" अशा सूचनेच्या भोवतीही थुंकून ठेवलेले दिसते. या व्यसनांनी दात तर खराब होतातच, पण परिसरही अस्वच्छ होतो. त्यामुळे या व्यसनांपासून दूर राहिलेलेच बरे !


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

26 जुलै कारगिल विजय दिवस

 ********************************

*२६ जुलै - 🇮🇳 कारगिल विजय दिन 🇮🇳*

********************************


कारगिल विजय दिवस. १९९९ साली आजच्याच दिवशी भारताने कारगिल मध्ये पाकीस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. ‘ऑपरेशन विजय’ नावाखाली भारताने ही मोहिम फत्ते केली होती. पाकने या युद्धात २७०० पेक्षा जास्त सैनिक गमावले होते. पाकिस्तानचे १९६५ आणि १९७१ च्या युद्धातही एवढे नुकसान झाले नव्हते.


कारगील हे जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ किलोमीटर अंतरावर आहे. या प्रदेशावर हिवाळ्यात बर्फाची चादर पसरते. ६० फुटांपेक्षा जास्त उंचीचे बर्फाचे थर सगळं गिळंकृत करतात. -६० अंश सेंटिग्रेडपर्यंत तापमान खाली घसरते. 


असाच १९९९ मधील हिवाळा. फेब्रुवारी १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले. पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या व थांगपत्ता लागू न देता पार पाडली. टायगर हिल, तोलोलोंग हिल आदी पर्वत शिखरांवरील लष्करी ठाणे खाली करून नियमा प्रमाणे भारतीय फौजा बेस कॅम्पला परत आलेल्या, कारण भारत-पाकिस्तान या दोन देशांतला सिमला करारच तसा होता, पण पाकिस्तानने डाव साधला. या सगळ्या प्रदेशावर आपले सैनिक घुसवले आणि आजूबाजूच्या छोट्या गावांमधील भारतीय नागरिकांना त्रास द्यायला सुरुवात केली. 


मे च्या दुसऱ्या आठवड्यात स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली आणि मग प्रतिचढाईच्या हालचाली सुरू झाल्या. भारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची माहिती अजिबात मिळाली नाही त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही चांगलीच टीका झाली. 


पाकिस्तानी लष्कर उंच पहाडावर तर भारतीय सैन्य जमिनीवर. श्रीनगर-कारगिल-लेह हा हायवे पाकिस्तानी लष्कराच्या माराच्या टप्प्यात आलेला. आणि हा जर त्यांनी काबीज केला तर भारतीय सैन्याच्या हालचालींवर मर्यादा येणार. अशी सगळी विपरीत परिस्थिती. वरची शिखरे काबीज करण्यासाठी चढाई करायची ती रात्रीच्या कीर्र अंधारात आणि प्रचंड थंडीत!.


अनेक कारणांमुळे कारगीलची घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झाला. त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवली. तिच्यावर हल्ला करण्यात आला व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले. 


भारतीय सरकारने 'ऑपरेशन विजय' या नावाखाली कारगीलच्या युद्धासाठी कार्यवाही चालू केली. २६ मे १९९९ रोजी भारताकडून पहिला हल्ला झाला. तोलोलिंगची लढाई व टायगर हिलची लढाई ही या युद्धातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. तोलोलिंगच्या लढाईनंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्‍न झाले. ४ जुलै रोजी टायगर हिल भारताच्या ताब्यात आली. टायगर हिलच्या या लढाईत भारताचे ५ सैनिक व पाकिस्तानचे १० सैनिक म्रुत्यूमुखी पडल्याचे कळते. 


भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोरांवर २.५ लाख रॉकेट डागले. म्हणजे दररोज पाच हजार रॉकेट डागण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर रॉकेट केवळ दुसऱ्या महायुद्धात डागण्यात आले होते. या युद्धात ३० हजार भारतीय जवान लढले त्यापैकी ५२७ शहिद, तर १३६३ जवान गंभीर जखमी झाले. यात पाकिस्तानचे ७०० सैनिक मारले गेले. भारतीय सैन्याने बोफोर्स तोफांचा यशस्वी मारा करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या युद्धात १० हजार कोटी रुपये खर्च झाले.


हवाई दलाने या युद्धात महत्वाची जबाबदारी पार पाडली. कारगिलची उंची समुद्र सपाटीपासून १६००० ते १८००० फूट उंच आहे. यामुळे विमानांना उड्डाण करण्यासाठी अडचणी येत होत्या. विमानांना जवळपास २०,००० फूट उंचावर उडावे लागत होते. अशा उंचीवर हवेचे घनत्व ३०% कमी असते. अशा परिस्थितीत पायलटचा जीव विमानातच गुदमरण्याची शक्यता असते आणि विमान दुर्घटना होऊ शकते. 


भारतीय हवाईदलाने कारगिल युद्धात पाकिस्तान विरुद्ध मिग-२७ आणि मिग-२९ चा वापर केला. या युद्धात हवाईदलाने जवळपास ३०० उड्डाणे केली. भारतीय हवाई दलाच्या कागदपत्रांमध्‍ये नवीन खुलासा झाला आहे. कारगिलच्या युध्‍दात भारत पाकिस्तानचा हवाईतळ पूर्णपणे उद्ध्‍वस्त करु शकत होता, असा त्यात उल्लेख आहे. १३ जून १९९९ रोजी भारतीय हवाई दलाचे फाइटर जेट हल्ला करण्‍यासाठी पाकिस्तानच्या हवाई तळापासून काही मिनिटांच्या अंतरावर होते.


मे १९९९ मध्ये सुरू झालेले आणि ७७ दिवस चाललेले कारगिल युद्ध भारतीय सैन्यदलाच्या विजयी अध्यायातील आणखी एक सोनेरी पान मानले जाते. कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. 


पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. १९९८ मध्ये हे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाले होते आणि त्यानंतरचे हे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होते. भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. 


याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. पाश्चिमात्य देशांनी युद्ध भडकवल्याचा ठपका पाकिस्तानवरच ठेवला. या युद्धात पहिल्यापासूनच "हे सैनिक आमचे नाही" असा पवित्रा घेतल्यामुळे काही पाकिस्तानी सैनिकांचे दफ़नविधी हिंदुस्तानने केले, म्हणूनच जागतिक पातळीवर हिंदुस्तानने या युद्धात लश्करी विजयाबरोबरच राजकारणी विजयही मिळवला.


कारगिल युद्धात मुजाहिदीन सहभागी होता. हे युद्ध पाकिस्तानच्या नियमीत सैनिकांनी लढले होते. या रहस्याचा उलगडा पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर विभागाचा माजी अधिकारी शाहिद अजीज याने केला होता. अनेक युद्धतज्ज्ञांचे म्हणणे आहे की कारगिल युद्ध हे वाटत होते त्यापेक्षा जास्त धोकादायक होते. तत्कालिन परिस्थिती पाहून मुशर्रफने अण्वस्त्रांचा वापर करण्याचीही तयारी केली होती.


२६ जुलै १९९९ या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला. कारगीलचे युद्ध हे भारतीय लोकसभा बरखास्त झाल्यानंतर झाले होते, तरीही युद्धाच्या सुरुवातीला विरोधी पक्षानेही सत्तारूढ पक्षाला लष्करी कारवाईसाठी चांगलाच प्रतिसाद दिला, त्यामुळे भारतीय राजकारणात फारशी न दिसणारी एकता कारगील युद्धाच्या निमित्ताने दिसली.

*🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳*

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...