शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,कृष्ण पक्ष,*अमावस्या*,अनुराधा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ०४ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अप्रशस्तानि कार्याणि

                 यो मोहादनुतिष्ठति,

स तेषां विपरिभ्रंशाद्

                 भ्रंश्यते जीवितादपि।।


*भावार्थ :-- जो व्यक्ति मोह-माया में पड़कर अन्याय का साथ देता है, वह अपने जीवन को नरक-तुल्य बना लेता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बोट मोडतांना आवाज का येतो


═════════════════════ संकलन गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *बोटं मोडताना आवाज का येतो ?* 📙


एखाद्यावर राग काढायचा असला, की त्याच्या नावानं बोटं मोडली जातात. त्या प्रत्येक वेळी आवाज का येत नाही हे नाही सांगता यायचं; पण बोटांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी तो मोकळा करण्यासाठी आपण बोटात ताणतो त्यावेळी मात्र हमखास कडकड असा आवाज येतो. कोणाच्या बाबतीत मोठ्यानं येतो, कोणाच्या बाबतीत ऐकू येईल न येईल असा येतो; पण येतो खरा. 


वास्तविक असा आवाज केवळ बोटांच्या बाबतीतच येतो असं नाही. कोणत्याही हाडांच्या सांध्याच्या बाबतीतही तो येत असतो. सांध्याच्या ठिकाणी दोन हाडं एकमेकांशी जोडलेली असतात; पण या सांध्यांची हालचाल होते तेव्हा ही हाडं निरनिराळ्या कोनांमधून फिरतात. ते सहजसाध्य व्हावं म्हणून जिथं ही हाडं जोडलेली असतात तिथे एक स्नायूंचा जाडसर थर असतो, अस्तरासारखा. तो नसला तर ती हाडं एकमेकांवर घासून त्यांची झीज होईल. शिवाय त्यांची मोडतोडही होण्याची शक्यता असते. तरीही ते थर एकमेकांवर घासतात ते घर्षणापायी उष्णता निर्माण होतेच. आपले तळवे आपण एकमेकांवर घासले तर ते गरम होतात. त्याचं कारणही हेच.


या उष्णतेचा त्या थरांवर अनिष्ट परिणाम होतोच. त्यांची हालचालही मोकळी होत नाही. तशी ती व्हावी म्हणून तिथं एक प्रकारचं वंगण असतं. एक तेलासारखा पातळ स्निग्ध पदार्थ असतो. त्या वंगणात ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन यांसारखे वायू विरघळलेल्या स्थितीत असतात.


बराच वेळ वापर झाला की ते सांधे थकल्यासारखे होतात. त्यांची मोकळी हालचाल होत नाही. कारण त्या हालचालीला मदत करणारे स्नायू जखडल्यासारखे होतात. त्या स्थितीत ते जरा ताणले तर सैलावतात. त्यांची परत मोकळी हालचाल होऊ शकते. पण तसे ते ताणले की त्या वंगणाच्या पिशव्याही फुगल्यासारख्या होतात. त्यांच्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत असलेले वायू मोकळे होऊन त्यांचे बुडबुडे तयार होतात. ते फुटतात आणि त्यांचाच तो आवाज होतो. किती वेगानं हे बुडबुडे तयार होऊन फुटतात तसंच किती बुडबुडे तयार होतात, त्यावर किती मोठा आवाज होणार हे अवलंबून असतं. 


कोणत्याही सांध्याच्या वंगणाच्या बाबतीत हीच परिस्थिती असते; पण बोटांच्या सांध्यामध्ये बुडबुडे लवकर तयार होतात आणि पटकन फुटतातही. त्यामुळे त्यांचा आवाजही सहजगत्या होतो. शिवाय बोटांना तीन पेरं असतात. त्या तिन्ही पेरांची स्वतंत्र हालचाल होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक बोटाला एकूण तीन सांधे असतात. ते जवळजवळही असतात. आपण जेव्हा बोटं ताणतो तेव्हा ते सगळेच सांधे ताणले जातात. सर्व ठिकाणच्या वंगणातल्या वायुंचे बुडबुडे तयार होऊन ते फुटतात. त्यामुळे बोटं ताणल्यानं नेहमीच कडकड असा आवाज होतो.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

  

ज्ञान विज्ञान सूर्यास्ताच्या वेळी लाल रंग का असतो


══════════════════════

    संकलन गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

*📙सूर्यास्ताचा रंग लाल शेंदरी का असतो?* 


चौपाटीच्या वाळूत मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून प्रेमाच्या आणाभाका घेण्याचा आपल्या कथा कादंबरीतील नायक नायिकांचा प्रघात आहे. अशा वेळी त्यासंध्यासमयीचा लालिमा आपल्या प्रेयसीच्या गालावर पसरलेला नायकानं पाहिला, असंही ललितलेखक आपल्याला सांगत असतात. यातल्या संध्यासमयीच्या लालिम्याचं त्यांचं वर्णन शंभर टक्के सत्य असतं, यात शंका नाही. आपणही मावळत्या सूर्याकडे पाहत असताना आकाश लाल, शेंदरी, पिवळ्या रंगाने उजळून गेलेलं पाहतो. सूर्योदयाच्या वेळीही असेच रंग दिसत असतात.


हे असंच का समजून घ्यायचं तर, इतर वेळी आकाश निळं दिसतं, याचा विचार करायला हवा. त्याचं उत्तर नोबेल पुरस्कारविजेते सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी देऊन ठेवलेलं आहे. त्यांच्या भाषेत सांगायचं तर याला 'रॅले स्कॅटरिंग' हा नैसर्गिक आविष्कार कारणीभूत आहे.


आपल्या धरतीच्या वातावरणात अनेक वायू आहेत. त्या वायूंचे रेणू प्रकाशकिरणांना विखुरत असतात. कारण जेव्हा प्रकाशकिरण हा या रेणूंवर पडतात तेव्हा त्यांच्यातील काही ऊर्जा या रेणुंकडुन शोषली जाते. त्यामुळे ते रेनो उत्तेजित होतात; पण काही काळ गेला की ते रेणू ती वाढीव ऊर्जा बाहेर फेकून परत मूळपदावर येतात. तसं करताना ते परत प्रकाशकिरणच बाहेर टाकत असतात. मात्र या किरणांची ऊर्जा मूळ ऊर्जेपेक्षा कमी असते. कारण मूळ ऊर्जेतल्या काहीचं उष्णतेत रूपांतर झालेलं असतं. हे होताना अर्थात ते प्रकाशकिरण मूळ दिशेपेक्षा वेगळ्याच दिशेला फेकले जातात. ते विखुरले जातात.


सूर्यप्रकाशात सात निरनिराळ्या रंगांचा प्रकाश असतो. त्यातल्या जांभळ्या किंवा निळ्या रंगाच्या प्रकाशात जास्त उष्णता असते. साहजिकच जास्त ऊर्जा असलेले किरण जास्त प्रमाणात विखुरले जातात. त्यामुळे आकाश निळं दिसतं. पण इतर रंगांचे किरणही विखुरले जात असतात, फक्त त्यांचं प्रमाण कमी असतं. ज्यावेळी सूर्य आपल्या डोक्यावर असतो तेव्हा त्याला वातावरणातून धरतीपर्यंतचा प्रवास करताना कमी अंतर पार करावं लागतं. त्यामुळे निळ्या रंगाचे किरणच जास्त विखुरलेले दिसतात; पण सूर्यास्ताच्या किंवा सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणांना वातावरणातून अधिक अंतर पार करावं लागतं. साहजिकच ते अंतर पार करेपर्यंत निळ्या किंवा हिरव्या रंगाचे किरण विखरून गेलेले असतात. लाल किंवा शेंदरी रंगाच्या किरणांचं विखुरणंच जास्त दिसतं. आकाश त्याच रंगांनी न्हाऊन निघतं.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

  

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

गाथा बलिदानाची मेजर शैतान सिंग भाटि

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳                                                    

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

💥💥🏅🎖️🇮🇳👨‍✈️🇮🇳🎖️🏅💥💥       

       

         *मेजर शैतान सिंह भाटी*

(भारतीय सेना अधिकारी एवं परमवीर चक्र से सम्मानित)

      *जन्म : १ दिसम्बर १९२४*

(जोधपुर, राजस्थान, ब्रिटिश भारत)

     *देहांत : १८ नवम्बर १९६२* (उम्र ३७)

(रेज़ांग ला, जम्मू और कश्मीर, भारत)

निष्ठा : भारत

सेवा/शाखा :  भारतीय सेना

सेवा वर्ष : १९४९-१९६२

उपाधि : मेजर

सेवा संख्यांक : IC-६४००

दस्ता : कुमाऊं रेजिमेंट

युद्ध/झड़पें : भारत-चीन युद्ध

सम्मान :  परम वीर चक्र

                मेजर शैतान सिंह भाटी भारतीय सेना के एक अधिकारी थे। इन्हें वर्ष १९६३ में मरणोपरांत परमवीर चक्र का सम्मान दिया गया। इनका निधन १९६२ के भारत-चीन युद्ध में हुआ था, इन्होंने अपने वतन के लिए काफी संघर्ष किया लेकिन अंत में शहीद हो गये तथा भारत देश का नाम रौशन कर गये। मेजर सिंह स्नातक स्तर की पढ़ाई पूरी करने पर सिंह जोधपुर राज्य बलों में शामिल हुए। जोधपुर की रियासत का भारत में विलय हो जाने के बाद उन्हें कुमाऊं रेजिमेंट में स्थानांतरित कर दिया गया। उन्होंने नागा हिल्स ऑपरेशन तथा १९६१ में गोवा के भारत में विलय में हिस्सा लिया था।                                                              १९६२ में भारत-चीन युद्ध के दौरान, कुमाऊं रेजिमेंट की १३ वीं बटालियन को चुशूल सेक्टर में तैनात किया गया था। सिंह की कमान के तहत सी कंपनी रेज़ांग ला में एक पोस्ट पर थी। १८ नवंबर १९६२ की सुबह चीनी सेना ने हमला कर दिया। सामने से कई असफल हमलों के बाद चीनी सेना ने पीछे से हमला कर किया। भारतीयों ने आखिरी दौर तक लड़ा परन्तु अंततः चीनी हावी हो गए। युद्ध के दौरान सिंह लगातार पोस्टों के बीच सामंजस्य तथा पुनर्गठन बना कर लगातार जवानों का हौसला बढ़ाते रहे। चूँकि वह एक पोस्ट से दूसरी पोस्ट पर बिना किसी सुरक्षा के जा रहे थे अतः वह गंभीर रूप से घायल हो गए और वीर गति को प्राप्त हो गए। उनके इन वीरता भरे देश प्रेम को सम्मान देते हुए भारत सरकार ने वर्ष १९६३ में उन्हें परमवीर चक्र से सम्मानित किया।


💁🏻‍♂️ *प्रारंभिक जीवन*

शैतान सिंह भाटी का जन्म 1 दिसम्बर १९२४ को राजस्थान के जोधपुर जिले के बंसार गांव के एक राजपूत परिवार में हुआ था। उनके पिता लेफ्टिनेंट कर्नल हेम सिंह थे जिन्होंने प्रथम विश्व युद्ध के दौरान फ्रांस में भारतीय सेना के साथ सेवा की और ब्रिटिश सरकार द्वारा ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (ओबीई) से सम्मानित किए गए थे l


सिंह ने जोधपुर के राजपूत हाई स्कूल में अपनी मैट्रिक तक की पढाई की । स्कूल में वह एक फुटबॉल खिलाड़ी के रूप में अपने कौशल के लिए जाने जाते थे। १९४३ में स्कूल की पढ़ाई पूरी करने के बाद सिंह जसवंत कॉलेज गए और उन्होंने १९४७ में स्नातक किया। १ अगस्त १९४९ को वह एक अधिकारी के रूप में जोधपुर राज्य बलों में शामिल हो गए।


👨‍✈️ *सैन्य जीवन*

जोधपुर की रियासत का भारत में विलय हो जाने के बाद उन्हें कुमाऊं रेजिमेंट में स्थानांतरित कर दिया गया। उन्होंने नागा हिल्स ऑपरेशन तथा १९६१ में गोवा के भारत में विलय में हिस्सा लिया था। उन्हें ११ जून १९६२ को उन्हें मेजर पद के लिए पदोन्नत किया गया था।


🔥 *भारत-चीन युद्ध*

हिमालय क्षेत्र में विवादित सीमाओं पर लंबे समय से भारत और चीन के बीच असहमति थी। विवादित क्षेत्र में बढ़ते चीनी घुसपैठ का सामना करने के लिए, भारत के प्रधान मंत्री जवाहरलाल नेहरू ने उनसे निपटने के लिए रणनीतियों के बारे में पूछा। हालांकि, भारतीय सेना द्वारा प्रस्तुत प्रस्ताव को खारिज कर दिया गया था। इसके बजाय उन्होंने "फॉरवर्ड पॉलिसी" नामक एक नौकरशाह द्वारा प्रस्तावित एक योजना को मंजूरी दी जिसमे चीनी सीमा के क्षेत्र में कई छोटी-छोटी पोस्टों की स्थापना के लिए कहा गया था। चीनी घुसपैठ के खिलाफ सार्वजनिक आलोचना में गंभीर वृद्धि के कारण नेहरू ने सेना की सलाह के खिलाफ "फॉरवर्ड पॉलिसी" को लागू कर दिया। चीन को भौगोलिक लाभ प्राप्त था और यह सेना के लिए चिंता का विषय था। अतिरिक्त चीनी हमले के समय कई छोटी-छोटी पोस्टों को बनाए रखना असंगत था। इस पर नेहरू ने यह मान लिया था कि चीनी हमला नहीं करेंगे। लेकिन चीन ने चीन-भारत युद्ध की शुरुआत कर दी।


💥 *रेज़ांग ला का युद्ध*

युद्ध के दौरान कुमाऊं रेजिमेंट की १३ वीं बटालियन को चूसुल सेक्टर में तैनात किया गया था। समुद्र तल से ५,००० मीटर (१६,००० फीट) की ऊंचाई पर, सिंह की कमान में सी कंपनी रेज़ांग ला में एक स्थान पर थी, और इस क्षेत्र को पांच प्लाटून पोस्टों द्वारा बचाव किया जा रहा था। १८ नवंबर १९६२ की सुबह चीनी सेना ने हमला कर दिया पर भारतीयों ने आक्रामक तरीके से तैयारी की थी क्योंकि उन्होंने चीनी सेना को सुबह ५ बजे के मंद प्रकाश में आगे बढ़ते हुए देखा था। जैसे ही भारतीयों ने दुश्मन को पहचाना, उन पर लाइट मशीन गन, राइफल्स, मोर्टार और ग्रेनेड से हमला कर दिया और कई चीनी सैनिक मार गिराए।


५:४० बजे चीनी सेना ने पुनः मोर्टार से हमले करने शुरू कर दिए और लगभग ३५० चीनी सैनिकों ने आगे बढ़ना शुरू किया। चीनी सेना द्वारा सामने से किए गए हमले असफल होने के बाद लगभग चार सौ चीनी सैनिकों ने पीछे से हमला किया। साथ ही ८ वीं प्लाटून पर मशीन गन और मोर्टार से पोस्ट के तार बाड़ के पीछे से हमला किया गया और ७ वीं प्लाटून पर १२० चीनी सैनिकों ने पीछे से हमला किया। भारतीयों ने ३ इंच (७६ मिमी) मोर्टार के गोले से मुकाबला किया और कई चीनी सैनिकों को मार दिया। जैसे ही आखिरी २० जीवित लोग बचे, भारतीयों ने अपनी खाइयों से बाहर निकल कर चीनी सैनिकों के साथ हाथ से हाथ से लड़ने लड़ने लग गए। हालांकि प्लाटून जल्द ही चीन के अतिरिक्त सैनिकों के आगमन से घेर ली गई और आखिरकार ७ वीं और ८ वीं प्लाटून में से कोई जीवित नहीं बचा।


युद्ध के दौरान मेजर सिंह भाटी लगातार पोस्टों के बीच सामंजस्य तथा पुनर्गठन बना कर लगातार जवानों का हौसला बढ़ाते रहे। चूँकि वह एक पोस्ट से दूसरी पोस्ट पर बिना किसी सुरक्षा के जा रहे थे अतः वह गंभीर रूप से घायल हो गए और वीर गति को प्राप्त हो गए। इस युद्ध में भारत के १२३ में से १०९ सैनिक शहीद हुए थे। वीरगति को प्राप्त होने के बाद इनके पार्थिव शरीर को जोधपुर लाया गया था और सैन्य सम्मान के साथ अंतिम संस्कार किया गया।


🎖️ *सम्मान*

मेजर शैतान सिंह भाटी के वीरता भरे देश प्रेम को सम्मान देते हुए भारत सरकार ने वर्ष १९६३ में उन्हें मरणोपरांत परमवीर चक्र से सम्मानित किया जो १८ नवम्बर १९६२ से प्रभावी हुआ।

 🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन*🌹🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

ज्ञान विज्ञान


══════════════════════

   * संकलन *

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *बोटं मोडताना आवाज का येतो ?* 📙


एखाद्यावर राग काढायचा असला, की त्याच्या नावानं बोटं मोडली जातात. त्या प्रत्येक वेळी आवाज का येत नाही हे नाही सांगता यायचं; पण बोटांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी तो मोकळा करण्यासाठी आपण बोटात ताणतो त्यावेळी मात्र हमखास कडकड असा आवाज येतो. कोणाच्या बाबतीत मोठ्यानं येतो, कोणाच्या बाबतीत ऐकू येईल न येईल असा येतो; पण येतो खरा. 


वास्तविक असा आवाज केवळ बोटांच्या बाबतीतच येतो असं नाही. कोणत्याही हाडांच्या सांध्याच्या बाबतीतही तो येत असतो. सांध्याच्या ठिकाणी दोन हाडं एकमेकांशी जोडलेली असतात; पण या सांध्यांची हालचाल होते तेव्हा ही हाडं निरनिराळ्या कोनांमधून फिरतात. ते सहजसाध्य व्हावं म्हणून जिथं ही हाडं जोडलेली असतात तिथे एक स्नायूंचा जाडसर थर असतो, अस्तरासारखा. तो नसला तर ती हाडं एकमेकांवर घासून त्यांची झीज होईल. शिवाय त्यांची मोडतोडही होण्याची शक्यता असते. तरीही ते थर एकमेकांवर घासतात ते घर्षणापायी उष्णता निर्माण होतेच. आपले तळवे आपण एकमेकांवर घासले तर ते गरम होतात. त्याचं कारणही हेच.


या उष्णतेचा त्या थरांवर अनिष्ट परिणाम होतोच. त्यांची हालचालही मोकळी होत नाही. तशी ती व्हावी म्हणून तिथं एक प्रकारचं वंगण असतं. एक तेलासारखा पातळ स्निग्ध पदार्थ असतो. त्या वंगणात ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन यांसारखे वायू विरघळलेल्या स्थितीत असतात.


बराच वेळ वापर झाला की ते सांधे थकल्यासारखे होतात. त्यांची मोकळी हालचाल होत नाही. कारण त्या हालचालीला मदत करणारे स्नायू जखडल्यासारखे होतात. त्या स्थितीत ते जरा ताणले तर सैलावतात. त्यांची परत मोकळी हालचाल होऊ शकते. पण तसे ते ताणले की त्या वंगणाच्या पिशव्याही फुगल्यासारख्या होतात. त्यांच्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत असलेले वायू मोकळे होऊन त्यांचे बुडबुडे तयार होतात. ते फुटतात आणि त्यांचाच तो आवाज होतो. किती वेगानं हे बुडबुडे तयार होऊन फुटतात तसंच किती बुडबुडे तयार होतात, त्यावर किती मोठा आवाज होणार हे अवलंबून असतं. 


कोणत्याही सांध्याच्या वंगणाच्या बाबतीत हीच परिस्थिती असते; पण बोटांच्या सांध्यामध्ये बुडबुडे लवकर तयार होतात आणि पटकन फुटतातही. त्यामुळे त्यांचा आवाजही सहजगत्या होतो. शिवाय बोटांना तीन पेरं असतात. त्या तिन्ही पेरांची स्वतंत्र हालचाल होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक बोटाला एकूण तीन सांधे असतात. ते जवळजवळही असतात. आपण जेव्हा बोटं ताणतो तेव्हा ते सगळेच सांधे ताणले जातात. सर्व ठिकाणच्या वंगणातल्या वायुंचे बुडबुडे तयार होऊन ते फुटतात. त्यामुळे बोटं ताणल्यानं नेहमीच कडकड असा आवाज होतो.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

कुतुहल गणित उपग्रहाचे

​🇸​🇸🔭

══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री.गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : गणित – उपग्रह प्रक्षेपकांचे!*


सध्याच्या अंतराळयुगात अग्निबाणाच्या साहाय्याने उपग्रह अंतराळात सोडतात. सर्व कृत्रिम उपग्रह एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करीत नाहीत, तर त्यांच्या कार्यानुसार कक्षा ठरवली जाते. कृत्रिम उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत स्थापित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकांचा (सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल) उपयोग केला जातो. १९८० साली रोहिणी हा ३५ किलोग्रॅम वजनाचा उपग्रह भारताने एसएलव्ही-३ या प्रक्षेपकामार्फत अवकाशात पाठविला. पीएसएलव्ही – ध्रुवीय (पोलर) आणि जीएसएलव्ही – भूस्थिर (जिओस्टेशनरी) असे उपग्रह प्रक्षेपण वाहकांचे आणखी दोन प्रकार आहेत. उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे. प्रक्षेपकात वापरलेल्या विशिष्ट प्रकारच्या इंधनाच्या ज्वलनाने निर्माण होणारा वायू शेपटाकडून प्रचंड वेगाने बाहेर पडतो. त्याची प्रतिक्रिया म्हणून प्रक्षेपकावर एक रेटा (थ्रस्ट) कार्य करतो, ज्यामुळे प्रक्षेपक अवकाशात झेपावतो. उपग्रहाचे वजन आणि तो प्रस्थापित करायच्या कक्षेची उंची यावर प्रक्षेपकाचा आराखडा व त्याचे टप्पे (कमीतकमी दोन ते चापर्यंत) ठरतात. उपग्रहाला भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर फिरते ठेवण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकामार्फत त्या उंचीपर्यंत नेण्यात येते. त्यानंतर उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी कक्षेच्या स्पर्शरेषेच्या दिशेने देण्यात येणाऱ्या कमीतकमी प्रक्षेपण वेगास (वक) क्रांतिक वेग (क्रिटिकल व्हेलॉसिटी) म्हणतात. हा वेग मिळताच उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागतो.पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्राच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी ज्या कमीतकमी वेगाने उपग्रह वरच्या दिशेने प्रक्षेपित केला जातो, त्या वेगास मुक्तिवेग (एस्केप व्हेलॉसिटी) (वम) म्हणतात.


मऊ वस्तुमानाचा उपग्रह, रप त्रिज्या आणि मप वस्तुमानाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ह उंचीवर म्हणजे र =(रप + ह) त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार कक्षेत फिरण्यासाठी, प्रक्षेपणाची गतिज (कायनेटिक) ऊर्जा = उपग्रहाची बंधनकारी (बाइंडिंग) ऊर्जा. यासंबंधीचा गणिती भाग चौकटीतील विवेचनावरून समजेल. प्रक्षेपणाचा वेग क्रांतिक वेगाइतका असल्यास उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरतो. प्रक्षेपणाचा वेग मुक्तिवेगापेक्षा कमी पण क्रांतिक वेगापेक्षा जास्त असेल तर उपग्रह लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. हे गणित आणि तंत्रज्ञान आत्मसून भारताने प्रक्षेपण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे.


–डॉ. सुनंदा ज. करंदीकर

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org


कुतुहल गणित उपग्रहाचे


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री.गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : गणित – उपग्रह प्रक्षेपकांचे!*


सध्याच्या अंतराळयुगात अग्निबाणाच्या साहाय्याने उपग्रह अंतराळात सोडतात. सर्व कृत्रिम उपग्रह एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करीत नाहीत, तर त्यांच्या कार्यानुसार कक्षा ठरवली जाते. कृत्रिम उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत स्थापित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकांचा (सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल) उपयोग केला जातो. १९८० साली रोहिणी हा ३५ किलोग्रॅम वजनाचा उपग्रह भारताने एसएलव्ही-३ या प्रक्षेपकामार्फत अवकाशात पाठविला. पीएसएलव्ही – ध्रुवीय (पोलर) आणि जीएसएलव्ही – भूस्थिर (जिओस्टेशनरी) असे उपग्रह प्रक्षेपण वाहकांचे आणखी दोन प्रकार आहेत. उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे. प्रक्षेपकात वापरलेल्या विशिष्ट प्रकारच्या इंधनाच्या ज्वलनाने निर्माण होणारा वायू शेपटाकडून प्रचंड वेगाने बाहेर पडतो. त्याची प्रतिक्रिया म्हणून प्रक्षेपकावर एक रेटा (थ्रस्ट) कार्य करतो, ज्यामुळे प्रक्षेपक अवकाशात झेपावतो. उपग्रहाचे वजन आणि तो प्रस्थापित करायच्या कक्षेची उंची यावर प्रक्षेपकाचा आराखडा व त्याचे टप्पे (कमीतकमी दोन ते चापर्यंत) ठरतात. उपग्रहाला भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर फिरते ठेवण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकामार्फत त्या उंचीपर्यंत नेण्यात येते. त्यानंतर उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी कक्षेच्या स्पर्शरेषेच्या दिशेने देण्यात येणाऱ्या कमीतकमी प्रक्षेपण वेगास (वक) क्रांतिक वेग (क्रिटिकल व्हेलॉसिटी) म्हणतात. हा वेग मिळताच उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागतो.पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्राच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी ज्या कमीतकमी वेगाने उपग्रह वरच्या दिशेने प्रक्षेपित केला जातो, त्या वेगास मुक्तिवेग (एस्केप व्हेलॉसिटी) (वम) म्हणतात.


मऊ वस्तुमानाचा उपग्रह, रप त्रिज्या आणि मप वस्तुमानाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ह उंचीवर म्हणजे र =(रप + ह) त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार कक्षेत फिरण्यासाठी, प्रक्षेपणाची गतिज (कायनेटिक) ऊर्जा = उपग्रहाची बंधनकारी (बाइंडिंग) ऊर्जा. यासंबंधीचा गणिती भाग चौकटीतील विवेचनावरून समजेल. प्रक्षेपणाचा वेग क्रांतिक वेगाइतका असल्यास उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरतो. प्रक्षेपणाचा वेग मुक्तिवेगापेक्षा कमी पण क्रांतिक वेगापेक्षा जास्त असेल तर उपग्रह लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. हे गणित आणि तंत्रज्ञान आत्मसून भारताने प्रक्षेपण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे.


–डॉ. सुनंदा ज. करंदीकर

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org


गाथा बलिदानाची खुदिराम बोस

 


➿➿➿➿➿➿➿➿➿➿

    *गाथा बलिदानाची*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

        *🇮🇳 खुदीराम बोस 🇮🇳*

*भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी*


     *जन्म : ३ दिसंबर १८८९*

   (बहुवैनी, मिदनापूर, प. बंगाल)


    *फांशी : ११ अगस्त १९०८*

            (मुजफ्फरपूर जेल)


युवा क्रान्तिकारी खुदीराम बोस  भारतीय स्वाधीनता के लिये मात्र १९ साल की उम्र में भारतवर्ष की आजादी के लिये फाँसी पर चढ़ गये। कुछ इतिहासकारों की यह धारणा है कि वे अपने देश के लिये फाँसी पर चढ़ने वाले सबसे कम उम्र के ज्वलन्त तथा युवा क्रान्तिकारी देशभक्त थे। लेकिन एक सच्चाई यह भी है कि खुदीराम से पूर्व १७ जनवरी १८७२ को ६८ कूकाओं के सार्वजनिक नरसंहार के समय १३ वर्ष का एक बालक भी शहीद हुआ था। उपलब्ध तथ्यानुसार उस बालक को, जिसका नम्बर ५०वाँ था, जैसे ही तोप के सामने लाया गया, उसने लुधियाना के तत्कालीन डिप्टी कमिश्नर कावन की दाढी कसकर पकड ली और तब तक नहीं छोडी जब तक उसके दोनों हाथ तलवार से काट नहीं दिये गये बाद में उसे उसी तलवार से मौत के घाट उतार दिया गया था। 


💁‍♂ *जन्म व प्रारम्भिक जीवन*


खुदीराम का जन्म ३ दिसंबर १८८९ को पश्चिम बंगाल के मिदनापुर जिले के बहुवैनी नामक गाँव में बाबू त्रैलोक्यनाथ बोस के यहाँ हुआ था। उनकी माता का नाम लक्ष्मीप्रिया देवी था। बालक खुदीराम के मन में देश को आजाद कराने की ऐसी लगन लगी कि नौवीं कक्षा के बाद ही पढ़ाई छोड़ दी और स्वदेशी आन्दोलन में कूद पड़े। छात्र जीवन से ही ऐसी लगन मन में लिये इस नौजवान ने हिन्दुस्तान पर अत्याचारी सत्ता चलाने वाले ब्रिटिश साम्राज्य को ध्वस्त करने के संकल्प में अलौकिक धैर्य का परिचय देते हुए पहला बम फेंका और मात्र १९ वें वर्ष में हाथ में भगवद गीता लेकर हँसते - हँसते फाँसी के फन्दे पर चढकर इतिहास रच दिया।


♻ *क्रान्ति के क्षेत्र में*


स्कूल छोड़ने के बाद खुदीराम रिवोल्यूशनरी पार्टी के सदस्य बने और वन्दे मातरम् पैफलेट वितरित करने में महत्वपूर्ण भूमिका निभायी। १९०५ में बंगाल के विभाजन (बंग-भंग) के विरोध में चलाये गये आन्दोलन में उन्होंने भी बढ़-चढ़कर भाग लिया।


⚛ *राजद्रोह के आरोप से मुक्ति*


फरवरी १९०६ में मिदनापुर में एक औद्योगिक तथा कृषि प्रदर्शनी लगी हुई थी। प्रदर्शनी देखने के लिये आसपास के प्रान्तों से सैंकडों लोग आने लगे। बंगाल के एक क्रांतिकारी सत्येंद्रनाथ द्वारा लिखे ‘सोनार बांगला’ नामक ज्वलंत पत्रक की प्रतियाँ खुदीरामने इस प्रदर्शनी में बाँटी। एक पुलिस वाला उन्हें पकडने के लिये भागा। खुदीराम ने इस सिपाही के मुँह पर घूँसा मारा और शेष पत्रक बगल में दबाकर भाग गये। इस प्रकरण में राजद्रोह के आरोप में सरकार ने उन पर अभियोग चलाया परन्तु गवाही न मिलने से खुदीराम निर्दोष छूट गये।


इतिहासवेत्ता मालती मलिक के अनुसार २८ फरवरी १९०६ को खुदीराम बोस गिरफ्तार कर लिये गये लेकिन वह कैद से भाग निकले। लगभग दो महीने बाद अप्रैल में वह फिर से पकड़े गये। १६ मई १९०६ को उन्हें रिहा कर दिया गया।


६ दिसंबर १९०७ को खुदीराम ने नारायणगढ़ रेलवे स्टेशन पर बंगाल के गवर्नर की विशेष ट्रेन पर हमला किया परन्तु गवर्नर बच गया। सन १९०८ में उन्होंने दो अंग्रेज अधिकारियों वाट्सन और पैम्फायल्ट फुलर पर बम से हमला किया लेकिन वे भी बच निकले।


☣ *न्यायाधीश किंग्जफोर्ड को मारने की योजना*


मिदनापुर में ‘युगांतर’ नाम की क्रांतिकारियों की गुप्त संस्था के माध्यम से खुदीराम क्रांतिकार्य पहले ही में जुट चुके थे। १९०५ में लॉर्ड कर्जन ने जब बंगाल का विभाजन किया तो उसके विरोध में सडकों पर उतरे अनेकों भारतीयों को उस समय के कलकत्ता के मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड ने क्रूर दण्ड दिया। अन्य मामलों में भी उसने क्रान्तिकारियों को बहुत कष्ट दिया था। इसके परिणामस्वरूप किंग्जफोर्ड को पदोन्नति देकर मुजफ्फरपुर में सत्र न्यायाधीश के पद पर भेजा। ‘युगान्तर’ समिति कि एक गुप्त बैठक में किंग्जफोर्ड को ही मारने का निश्चय हुआ। इस कार्य हेतु खुदीराम तथा प्रफुल्लकुमार चाकी का चयन किया गया। खुदीराम को एक बम और पिस्तौल दी गयी। प्रफुल्लकुमार को भी एक पिस्तौल दी गयी। मुजफ्फरपुर में आने पर इन दोनों ने सबसे पहले किंग्जफोर्ड के बँगले की निगरानी की। उन्होंने उसकी बग्घी तथा उसके घोडे का रंग देख लिया। खुदीराम तो किंग्जफोर्ड को उसके कार्यालय में जाकर ठीक से देख भी आए


 💣 *अंग्रेज अत्याचारियों पर पहला बम*


३० अप्रैल १९०८ को ये दोनों नियोजित काम के लिये बाहर निकले और किंग्जफोर्ड के बँगले के बाहर घोडागाडी से उसके आने की राह देखने लगे। बँगले की निगरानी हेतु वहाँ मौजूद पुलिस के गुप्तचरों ने उन्हें हटाना भी चाहा परन्तु वे दोनाँ उन्हें योग्य उत्तर देकर वहीं रुके रहे। रात में साढे आठ बजे के आसपास क्लब से किंग्जफोर्ड की बग्घी के समान दिखने वाली गाडी आते हुए देखकर खुदीराम गाडी के पीछे भागने लगे। रास्ते में बहुत ही अँधेरा था। गाडी किंग्जफोर्ड के बँगले के सामने आते ही खुदीराम ने अँधेरे में ही आगे वाली बग्घी पर निशाना लगाकर जोर से बम फेंका। हिन्दुस्तान में इस पहले बम विस्फोट की आवाज उस रात तीन मील तक सुनाई दी और कुछ दिनों बाद तो उसकी आवाज इंग्लैंड तथा योरोप में भी सुनी गयी जब वहाँ इस घटना की खबर ने तहलका मचा दिया। यूँ तो खुदीराम ने किंग्जफोर्ड की गाडी समझकर बम फेंका था परन्तु उस दिन किंग्जफोर्ड थोडी देर से क्लब से बाहर आने के कारण बच गया। दैवयोग से गाडियाँ एक जैसी होने के कारण दो यूरोपियन स्त्रियों को अपने प्राण गँवाने पडे। खुदीराम तथा प्रफुल्लकुमार दोनों ही रातों - रात नंगे पैर भागते हुए गये और २४ मील दूर स्थित वैनी रेलवे स्टेशन पर जाकर ही विश्राम किया।

 

🌀 *गिरफ्तारी*


अंग्रेज पुलिस उनके पीछे लग गयी और वैनी रेलवे स्टेशन पर उन्हें घेर लिया। अपने को पुलिस से घिरा देख प्रफुल्लकुमार चाकी ने खुद को गोली मारकर अपनी शहादत दे दी जबकि खुदीराम पकड़े गये। ११ अगस्त १९०८ को उन्हें मुजफ्फरपुर जेल में फाँसी दे दी गयी। उस समय उनकी उम्र मात्र १८+ साल थी।

 

📿 *फाँसी का आलिंगन*


दूसरे दिन सन्देह होने पर प्रफुल्लकुमार चाकी को पुलिस पकडने गयी, तब उन्होंने स्वयं पर गोली चलाकर अपने प्राणार्पण कर दिये। खुदीराम को पुलिस ने गिरफ्तार कर लिया। इस गिरफ्तारी का अन्त निश्चित ही था। ११ अगस्त १९०८ को भगवद्गीता हाथ में लेकर खुदीराम धैर्य के साथ खुशी - खुशी फाँसी चढ गये। किंग्जफोर्ड ने घबराकर नौकरी छोड दी और जिन क्रांतिकारियों को उसने कष्ट दिया था उनके भय से उसकी शीघ्र ही मौत भी हो गयी।


फाँसी के बाद खुदीराम इतने लोकप्रिय हो गये कि बंगाल के जुलाहे एक खास किस्म की धोती बुनने लगे। इतिहासवेत्ता शिरोल के अनुसार बंगाल के राष्ट्रवादियों के लिये वह वीर शहीद और अनुकरणीय हो गया। विद्यार्थियों तथा अन्य लोगों ने शोक मनाया। कई दिन तक स्कूल कालेज सभी बन्द रहे और नौजवान ऐसी धोती पहनने लगे, जिनकी किनारी पर खुदीराम लिखा होता था।


🗽 *स्मारक का उद्घाटन*


क्रान्तिवीर खुदीराम बोस का स्मारक बनाने की योजना कानपुर के युवकों ने बनाई और उनके पीछे असंख्य युवक इस स्वतन्त्रता-यज्ञ में आत्मार्पण करने के लिये आगे आये। इस प्रकार के अनेक क्रान्तिकारियों के त्याग की कोई सीमा नहीं थी।


💮 *लोकप्रियता*


मुज़फ्फरपुर जेल में जिस मजिस्ट्रेट ने उन्हें फाँसी पर लटकाने का आदेश सुनाया था, उसने बाद में बताया कि खुदीराम बोस एक शेर के बच्चे की तरह निर्भीक होकर फाँसी के तख़्ते की ओर बढ़ा था। जब खुदीराम शहीद हुए थे तब उनकी आयु १८+ वर्ष थी। शहादत के बाद खुदीराम इतने लोकप्रिय हो गए कि बंगाल के जुलाहे उनके नाम की एक ख़ास किस्म की धोती बुनने लगे।


उनकी शहादत से समूचे देश में देशभक्ति की लहर उमड़ पड़ी थी। उनके साहसिक योगदान को अमर करने के लिए गीत रचे गए और उनका बलिदान लोकगीतों के रूप में मुखरित हुआ। उनके सम्मान में भावपूर्ण गीतों की रचना हुई जिन्हें बंगाल के लोक गायक आज भी गाते हैं।

             🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳



*🙏🙏विनम्र अभिवादन🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,कृष्ण पक्ष, *चतुर्दशी*,विशाखा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, ०३ डिसेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


यस्य नास्ति स्वयंप्रज्ञा 

              शास्त्रंतस्य करोति किम्,

लोचनाभ्यांविहीनस्य 

              दर्पणः किं करिष्यति॥


*भावार्थ :- जिस प्रकार अन्धे व्यक्ति के लिए दर्पण कुछ नहीं कर सकता। उसी प्रकार जिसके पास अपनी बुद्धि एवं विवेक नही है, उसके लिए समस्त वेद और शास्त्र मिलकर भी उसका कोई भला नही कर सकते।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

ज्ञान विज्ञान थकवा का येतो


══════════════════════

    @ संकलन 

  श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

😰 *थकवा का येतो ?* 😰

"""""""""""""""""""""""""""""""""""""

काही काही शब्द आपण सहजपणे वापरतो. 'थकलो रे आज' असं म्हणणं त्याच जातकुळीतलं आहे. कारण काहीही न करता काही मंडळींना थकायला होत असतं. पण इथं आपल्याला ज्या थकव्याचा विचार करायचा आहे तो अंगमेहनतीचं काम केल्यानंतर येणारा. सकाळी जॉगिंग करणाऱ्याला काही विशिष्ट अंतरानंतर थकवा जाणवायला लागतो किंवा तालमीत जोर बैठका काढणार्याला किंवा वजन उचलण्याचा व्यायाम करणाऱ्यालाही थकवा जाणवायला लागतो. भर उन्हात शेतकी खेळ करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीलाही शतक पूर्ण करता करताच थकवा जाणवायला लागतो. तो का ? 


अंगमेहनतीचं काम करताना आपण आपल्या शरीरातल्या स्नायूंना कामाला लावत असतो. हे काम करण्यासाठी अर्थात स्नायूंना ऊर्जेची गरज भारत भासते. ती एटीपी या रसायनातून त्यांना मिळते. अंगातल्या ग्लुकोज या इंधनाचं ज्वलन झालं की त्या जीवारासायनिक प्रक्रियेतून एटीपीची निर्मिती होते; पण त्या ज्वलनासाठी सहाजिकच ऑक्सिजनची गरज असते. रक्तातून त्याचा पुरवठा होतो; पण आपण स्नायूंना अधिक वेगानं काम करायला लावलं की त्याची ऑक्सिजनची गरजही वाढते. ती हृदय, अधिक वेगानं काम करून पुरवतं. आपल्या श्वासोच्छवासाचा वेगही वाढवावा लागतो; पण याला मर्यादा असते. स्नायूंचा काम करायचा वेग त्या मर्यादेपलीकडे वाढला की मग या प्रक्रियेकडून होणारी एटीपीची निर्मिती पुरेशी पडत नाही.

तसं झालं की शरीर एटीपीचे उत्पादन करणाऱ्या पर्यायी ऑक्सीजनविरहित प्रक्रियेला चालना देतं. त्या प्रक्रियेत ग्लूकोज ऐवजी शरीरात साठवलेल्या ग्लायकोजेनचा इंधन म्हणून वापर केला जातो. त्या प्रक्रियेत ग्लायकोजेनचे ग्लुकोज आणि पायरुव्हिक आम्ल या दोन घटकांमध्ये विभाजन होतं. त्यातल्या पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर मग लॅक्टिक आम्लात होतं. आपल्या भाषेत याला दुधाचं आम्ल म्हणायला हरकत नाही.


हे लॅक्टिक आम्ल स्नायूंना विषासारखं असतं. त्यांच्या आकुंचन प्रसारणाच्या क्रियेत बाधा अाणतं. लॅक्टिक आम्ल जसजसं साठत जातं तसतसे जास्तीत जास्त स्नायू त्याच्या प्रभावाखाली येतात. त्यांची काम करण्याची क्षमता घटत जाते. त्या आम्लाचा निचरा करणारी यंत्रणा कामाला लागते. त्यामुळे ते आम्ल रक्तात उतरतं. त्यातून मग ते जे स्नायू प्रत्यक्ष काम करत नसतात त्यांच्यापर्यंतही पोहोचतं. तसं झालं की ते स्नायूही आखडल्यासारखे होतात.  आपल्याला थकवा जाणवायला लागतो.


उत्तम खेळाडू अर्थात नियमित व्यायाम करून आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढवत असतात. त्यामुळे स्नायूंना ऑक्सिजन पुरविण्याचे काम ते अधिक काळ करू शकतात. साहजिकच त्यांच्या शरीरात लॅक्टिक आम्ल जमायला वेळ लागतो. त्यांना लवकर थकवा जाणवत नाही. त्यांचा दम अधिक टिकतो.



*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

रतन टाटा

 *जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा*

🛫🛬🛩️✈️🛫🛬🛩️✈️🛫🛬

            *भारतीय उद्योजक*

      *पहिले भारतीय वैमानिक*

🏭🏭🏭🏭🏭🏭🏭🏭🏭🏭

*स्मृतिदिन - नोव्हेंबर २९ इ.स. १९९३*

 🏨🏨🏨🏨🏨🏨🏨🏨🏨🏨

जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी. टाटा (जुलै २९, इ.स. १९०४ - नोव्हेंबर २९ इ.स. १९९३) हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.

जीवन

टाटांचा जन्म जुलै २९, इ.स. १९०४ मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले, पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्सातच गेले. काही कारणाने ते मॅट्रीक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत.

उद्योजक पदभार

इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. इ.स. १९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. इ.स. १९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे इ.स. १९४६ साली तिचे नाव बदलून एर इंडिया ठेवले गेले.

वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे इ.स. १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. टाटांच्या पुढाकाराने इ.स. १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.

टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी इ.स. १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय इ.स. १९४१ साली मुंबईत सुरू केले.

पुरस्कार

टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाली. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना इ.स. १९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर इ.स. १९९२ साली त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले.


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,कृष्ण पक्ष, *दशमी*,उ.फा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, २९ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


निश्चित्वा यः प्रक्रमते 

                  नान्तर्वसति कर्मणः,

 अवन्ध्यकालो वश्यात्मा 

                  स वै पण्डित उच्यते।।


भावार्थः- जिनके प्रयास एक दृढ़ प्रतिबद्धता से शुरु होते हैं, जो कार्य पूर्ण होने तक ज्यादा विश्राम नहीं करते हैं, जो समय नष्ट नहीं करते हैं और जो अपने विचारों पर नियंत्रण रखते हैं, वह बुद्धिमान है।

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

ज्योतीराव फुले

 *जोतीराव गोविंदराव फुले*

📚📚📚📚📚📚📚📚📚📚

*स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे थोर समाजसुधारक*

📚📚📚📚📚📚📚📚📚📚

*स्मृतिदिन - २८ नोव्हेंबर १८९०*


महात्मा जोतीबा फुले 

     एप्रिल ११, इ.स. १८२७ 

     नोव्हेंबर २८, इ.स. १८९०

      हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.


सामाजिक कार्य

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -

     *“ विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।*

       *नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।*

       *वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”*

जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.

वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतक-र्याचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,कृष्ण पक्ष, *नवमी*,पू.फा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, २८ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *यह सत्य है कि संकल्प के अभाव में शक्ति का कोई महत्त्च नहीं है। उसी प्रकार यह भी सत्य है कि शक्ति के अभाव में संकल्प भी पूरे नहीं होते। केवल संकल्प करते रहने वाला निरुद्यमी व्यक्ति उस आलसी व्यक्ति की तरह कहा जाएगा, जो अपने पास गिरे हुए आम को उठाकर मुँह में भी रखने का प्रयास नहीं करता और इच्छा मात्र से आम का स्वाद ले लेने की आकाँक्षा करता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

अँडर्स सेल्सिअस गणितज्ञ

 *अँडर्स सेल्सियस*


*एक स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ*


*जन्मदिन - २७ नोव्हेंबर १७०१*

 

अँडर्स सेल्सियस (स्वीडिश: Anders Celsius; २७ नोव्हेंबर १७०१, उप्साला - २५ एप्रिल १७४४, उप्साला) हा एक स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता. सेल्सियस हे तापमान मोजणीचे एकक त्याने निर्माण केले व ह्या एककाला त्याचेच नाव देण्यात आले आहे.

स्वीडनच्या उप्साला शहरामध्ये जन्मलेला सेल्सियस १७३० ते १७४४ दरम्यान उप्साला विद्यापीठामध्ये खगोलशास्त्राचा प्राध्यापक होता.

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,कृष्ण पक्ष, *अष्टमी*,मघा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, २७ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


नाभिषेको न संस्कार:,

              सिंहस्य क्रियते मृगैः,

विक्रमार्जितराज्यस्य,

              *स्वयमेव मृगेंद्रता ...*


*भावार्थ - जंगल का साम्राज्य, सिंह को कभी अपना राजा, राज्याभिषेक का उत्सव मनाकर घोषित नहीं करता। सिंह अपना राज्य स्वयं अपने पराक्रम से अर्जित करता है !*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

26 नोव्हेंबर संविधान दिन

 *२६ नोव्हेंबर - संविधान दिन*

📖📖📖📖📖📖📖📖📖📖

             *भारताचे संविधान*

      *भारतातील सर्वोच्च कायदा*


    *भारतीय संविधान उद्देशिका*


घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्यघटना संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपुर्द करतांना, २६ नोव्हेंबर १९४९   (कृपया फोटो बघा)


भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब अांबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.


📜 *इतिहास*


भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीच्या इतर सदस्यांसमवेत. (बसलेल्या पैंकी डावीकडून) एन. माधवराव, सय्यद सदुल्ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष), अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, सर बेनेगल नरसिंह राव. (उभे असलेल्या पैंकी डावीकडून) एस.एन. मुखर्जी, जुगल किशोर खन्ना व केवल कृष्णन् (२९ जाने, इ.स. १९४७)

 (कृपया फोटो बघावा)


१९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of १९३५) वर आधारित आहे. १९३५ सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६ च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर  १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृह मध्ये पार पडली कि, जे आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते . १५ ऑगस्ट  १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते.


२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर  १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.


📖 *स्वरूप*


भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत ३९५ (डिसेंम्बर २०१८) कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते. भारताची घटना हि अतिशय लवचिक असून जगातील इत्तर घटनेपेक्षा जास्त प्रकारचे कायदे करता येतात. आपल्या घटनेने प्रत्येकाला एकाच नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. आपली घटना हि जगातील सगळ्यात मोठी घटना आहे.


📒 *तोंडओळख व महत्त्वाची अंगे*


भारतीय संविधानात अनेक पाश्चात्त्य देशांच्या उदारमतवादी राज्यघटनांचा व ब्रिटिश वसाहतवादी संविधानाच्या पायाभूत तत्त्वांशी मेळ घालण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन् भारताच्या व्हॉईसरायकडे असलेले प्रमुख पद नव्या व्यवस्थेत राष्ट्रपतीकडे सोपवण्यात आले व व्हाईसरॉयचे प्रशासकीय अधिकार पंतप्रधानांकडे देण्यात आले आहेत. राज्यघटनेच्या ७४ व्या कलमानुसार राष्ट्रपतींचे अधिकार मर्यादित असून ते केवळ मंत्रिमंडळास सल्ला देऊ शकतात. राष्ट्रपती हे तीनही सैन्यदलांचे प्रमुख असतात. ब्रिटिश व्यवस्थे प्रमाणे भारतीय संसदही द्विगृही (Bicameral) आहे.


📖 *उद्देशिका*


मुख्य पान: भारतीय संविधान उद्देशिका

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक (Republic) आहे. उद्देशिका फ्रेंच राज्यक्रांतीच्या आदर्शांना अनुसरून नागरिकांस -


सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय

आचार,विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य

आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवचन देते.

मूळ उद्देशिकेत समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या ४२व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.


🗳 *मूलभूत अधिकार*


भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी (liberal character) रूपाची प्रचिती विभाग ३ मधील मूलभूत अधिकारांच्या तरतुदीवरून येते. या अधिकारांमध्ये सामान्य मानवी अधिकारांचा समावेश आहे जसे - कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा धर्म, वंश, जात, लिंग वा प्रांत आदी मुद्द्यांधारे न केला जाणारा भेदभाव (कलमे १२ -१८) दलितांवरच्या अत्याचारा विरुद्धचे कलम १७ विशेष महत्त्वाचे आहे. अस्पृश्यता पाळणे हा या कलमाने दंडनीय गुन्हा आहे. घटनेत पाच मूलभूत प्रकारचे अधिकार ओळखण्यात आले आहेत.


स्वातंत्र्य (कलम १९-२२): भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य सभा वा संघटना स्थापण्याचे स्वातंत्र्य, पेशा निवडण्याचे स्वातंत्र्य (कलम १९)

कायदा (कलम २०), जीविताचा अधिकार (कलम २१), काही बाबींमध्ये अटक वा कैदेचे स्वातंत्र्य (कलम २२)

शोषणाविरूद्ध संरक्षण (कलम २३ व २४): बालमजूरी व मानवी तस्करी (human trafficking) पासून सं‍रक्षण

धर्मस्वातंत्र्य (कलम २५-२८) : पूजा व आचरणाचे स्वातंत्र्य

अल्पसंख्याकांचे अधिकार (कलम २९ व ३०): अल्पसंख्याकांना संरक्षण व स्वतःच्या शिक्षणसंस्था स्थापण्याचे स्वातंत्र्य

घटनात्मक तक्रारींचा अधिकार (कलम ३२-३५): मूलभूत अधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीस कलम ३२ अन्वये सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा हक्क आहे.

मालमत्ता बाळगण्याचा अधिकार देणारे कलम ३१ हे १९७८ साली वगळण्यात आले होते. ही वगळण वादग्रस्त ठरली होती.


📘 *सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे*


राज्यघटनेच्या चौथ्या विभागात राज्य व संघ स्तरावरील सरकारे तसेच संसदे/विधानसभा यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. यात सामाजिक अधिकार - जसे कामाचा अधिकार, शिक्षण व कल्याणाचा अधिकार, जीवनाचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठीची सरकारची सामाजिक दायित्वे, मनुष्यांना कामे करणे सुलभ होईल अशी कार्यालये (human working conditions and appropriate environment) आदी. कलम ४३ अन्वये समाविष्ट आहेत. कलम ४५ अन्वये १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण हे शासनाचे दायित्व आहे. कलम ४६ अन्वये समाजातील मागास घटकांच्या (विशेषतः आदिवासी व दलित घटकांना) उन्नतीस शासन बांधील आहे. वरील सामाजिक दायित्वांशिवाय चौथ्या विभागात न्यायालयीन (Judiciary) व प्रशासकीय (Executive) अधिकारांचा कलम ५० मध्ये व पंचायत स्थापण्याचा कलम ४०) मध्ये उल्लेख आहे.


निसर्गरक्षण (कलम ४८-अ), स्मारकांचे जतन (कलम ४९), आंतरराष्ट्रीय शांतता व परस्पर मैत्री संबंधांविषयीचे कलम (कलम ५१) आदी कलमे सरकारसाठीची इतर मार्गदर्शक तत्त्वे आहेत. इतरत्र अतिशय सुस्पष्ट व तपशीलवार असणारे भारतीय संविधानाचे रूप या कलमांमध्ये अतिशय ढोबळ (Vague) असे आहे. वरील पैकी कोणतीही कलमे सरकारसाठी सक्तीची नाहीत. किंबहुना तात्विक मूल्ये (Moral values) असेच त्याचे स्वरूप आहे.


📙 *सत्ता*


सत्तेचे भारतात तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे -


कार्यकारी (Executive)

कायदेकारी(Legislative)

न्यायालयीन (Judicial)

प्रशासकीय सत्ता पंतप्रधान/मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाकडे असते. प्रशासकीय सत्ता संसदीय अधिवेशन चालू नसताना कायदे करू शकते; परंतु त्यास संसदेची मान्यता मिळणे बंधनकारक असते. भारतात प्रशासकीय व न्यायालयीन अधिकारांच्या मर्यादा सुस्पष्टपणे आखून देण्यात आल्या आहेत. न्यायालयीन सत्तेचे सर्वोच्च केंद्र सर्वोच्च न्यायालय असते.


भारतातील संसद ही द्विगृही (Bicameral) आहे. कलम १६८ अन्वये राज्यांची विधिमंडळे एकगृही(Unicameral) वा द्विगृही(Bicameral) असू शकतात. द्विगृही व्यवस्थेत विधानसभा हे खालील सभागृह (Lower House) तर विधानपरिषद हे वरील सभागृह(Upper House) असते.


📔 *संघराज्य प्रणाली*


भारत हे संघराज्य आहे. भारतीय संविधानाने केंद्र सरकारला अधिकारांमध्ये झुकते माप दिले आहे. विभाग ६ अन्वये राज्यांच्या सत्ता, हक्क, कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. राज्य सरकारचे स्वरूपही केंद्राप्रमाणेच असते. राज्यात पंतप्रधानाप्रमाणे मुख्यमंत्री हा सरकारचा कार्यकारी प्रमुख तर राज्यपाल हा राष्ट्रपतीप्रमाणे घटनात्मक प्रमुख असतो. गरज पडल्यास राज्याचे शासन केंद्राद्वारे बरखास्त केले जाऊ शकते. भारताची फाळणी, हिंदू-मुस्लिम दंगे अशा कारणांमुळे केंद्रीय सरकार तुलनेने सशक्त ठेवण्याची गरज घटनाकारांस भासली. राज्ये संघराज्यापासून फुटू नयेत यासाठी केंद्रीय सरकारकडे जादा अधिकार देण्यात आले आहेत. गाव व तालुकास्तरांवरील स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्णतः स्वायत्तता देण्यास याच कारणास्तव उशीर झाला.


📗 *अधिकृत भाषा*


संघराज्याची अधिकृत भाषा कोणती असावी हा घटनासमितीतील सर्वाधिक वादाचा मुद्दा होता, असे डॉ.आंबेंडकरांनी आपल्या आठवणीत नमूद केले आहे. राज्यघटनेच्या कलम ३४३ अन्वये देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी भाषा ही संघराज्याची अधिकृत भाषा आहे. यासोबत इंग्रजी भाषेचा उपयोग सर्व अधिकृत कामांसाठी करण्यात येईल. हिंदी भाषेस घटनेने राष्ट्रभाषा नव्हे तर संघराज्याची अधिकृत भाषा असा दर्जा दिलेला आहे. या सोबत इतर २२ भाषा भारताच्या मान्यताप्राप्त भाषा आहेत. इंग्रजी भाषेच्या वापराविषयी दर १५ वर्षात पुनरावलोकन करावे अशी तरतूद घटनेत आहे.


कलम ३४५ अन्वये राज्यांना हिंदी वा एकाधिक प्रादेशिक भाषा वापरण्याचा पर्याय आहे. कलम ३४६ अन्वये केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे परस्परांशी व राज्यांचे परस्परांशी दळणवळण हिंदी वा इंग्रजीत असावे अशी तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाची भाषा इंग्रजी आहे. राष्ट्रपतीच्या अनुमतीने उच्च न्यायालयात हिंदी वा इतर प्रादेशिक भाषांच्या वापरास मुभा आहे. जर हिंदी व इंग्रजी भाषेतील कोणत्याही कायदेशीर दस्तात मतभेद/फरक दिसल्यास इंग्रजी भाषिक मजकूर ग्राह्य मानला जाईल असे कलम ३४८ सांगते


📙 *आणीबाणीविषयक तरतुदी*


भारताच्या राज्यघटनेत आणीबाणी विषयकच्या अनेक तरतुदींचा उल्लेख आहे. आणीबाणीचे तीन प्रकार सांगितले आहेत. यात -


राष्ट्रीय आणीबाणी - जेव्हा राष्ट्र वा त्याचा मोठा हिस्सा आपदकालीन स्थितीत असतो तेव्हा

प्रादेशिक आणीबाणी - जेव्हा एखाद्या राज्यातील स्थिती नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा

आर्थिक आणीबाणी - जेव्हा भारताचे आर्थिक स्थैर्य वा पत धोक्यात असते तेव्हा

अशा तीन आणीबाणींचा समावेश आहे


राज्यघटनेच्या ३५२व्या कलमानुसार भारताची अंतर्गत वा बाह्य सुरक्षितता धोक्यात आली असता राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकता. ३५३ व्या कलमानुसार आणीबाणीच्या परिस्थितीत सारे अधिकार संसदेकडे एकटवितात. राज्यघटनेच्या ३५९व्या कलमानुसार राष्ट्रपती विभाग ३द्वारे नागरिकांस दिलेल्या सर्व मूलभूत अधिकारांचा प्रत्याहार (काढून घेणे) करू शकतो. ३५८व्या कलमानुसार कलम १९मधील नागरिकांचे अधिकार आणीबाणीच्या काळात आपोआप समाप्त होतात. म्हणजेच व्यवस्थेचे इतर काळी उदारमतवादी असलेले रूप या काळात अनुदार बनते. राज्यघटनेच्या ३५६ व्या कलमानुसार राज्याची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास राज्याचा कारभार राष्ट्रपतींकडे देण्यात येतो. राज्याच्या विधिमंडळाचे काम या काळात संसद करते. या स्थितीस राष्ट्रपती राजवट असे म्हणतात.


📗 *कलमांचा गोषवारा*


 संविधानाच्या मूळ आवृत्तींचा गोषवारा -


भाग १ -

कलम १ संघाचे नाव आणि भूप्रदेश

कलम २ - प्रदेश किंवा नविन राज्यांची निर्मीती

कलम २(अ)-सिक्कीम हे संघाचे सहयोगी राज्य (रद्द केले)


कलम ३- नवीन राज्याची स्थापना, सिमा किंवा नावे बदलणे

कलम ४ -कलम २ आणि कलम ३ अंतर्गत केलेले बदल, कलम ३६८ अनुसार घटनादुरुस्ती समजली जाणार नाही

भाग २ - कलमे ५ - ११नागरिकत्व

भाग ३ - कलमे १२-३५ मूलभूत हक्क

कलमे १४-१८ समानतेचा हक्क,

कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,

कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,

कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,

कलमे २९-३0 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,

कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.

भाग ४ - राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलमे ३६ - ५१

कलम 40 -ग्रामपंचायतीचे संघटन

कलम 41 - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार

भाग ४(अ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये.

*भाग ५ -*

प्रकरण १ - कलमे ५२-७८

कलमे ५२-६३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत,

कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक

कलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी,

कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत

प्रकरण २ - कलमे ७९-१२२ संसदेबाबत.

कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत,

कलमे ८९-९८ संसदेच्या अधिकारांबाबत,

कलमे ९९-१००

कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत

कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे अधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत,

कलमे १०७-१११ (law making process)

कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत,

कलमे ११८-१२२

प्रकरण ३ - कलम १२३

कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत

प्रकरण ४ - कलमे १२४-१४७

कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत

प्रकरण ५ - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत.

कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे अधिकार व कर्तव्ये यांबाबत

भाग ६ - राज्यांच्याच्या बाबतची कलमे.

प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या

कलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मू आणि काश्मीर वगळून

प्रकरण २ - कलमे १५३-१६७ कार्यांबाबत

कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत,

कलमे १६३-१६४ मंत्रिमंडळावर,

कलम १६५ राज्याच्या ॲडव्होकेट-जनरल यांच्याबाबत.

कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत.

प्रकरण ३ - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित.

कलमे १६८ - १७७ सामान्य माहिती

कलमे १७८ - १८७ राज्यांच्या शासनाचे अधिकार

कलमे १८८ - १८९ कार्यकालाविषयी

कलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत

कलमे १९४ - १९५ विधिमंडळ सदस्यांचे अधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे

कलमे १९६ - २०१ कार्यकाविषयी

कलमे २०२ - २०७ अर्थिक विषयांसंबधी

कलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयांसंबधी

प्रकरण ४ - कलम २१३ राज्यपालांच्या अधिकारांबाबत

कलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके.

प्रकरण ५ - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.

कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.

प्रकरण ६ - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांबाबत.

कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत


📓 *भाग ७ - राज्यांच्या बाबतीतील कलमे.*


कलम २३८ -

भाग ८ - केंद्रशासित प्रदेशांशी निगडित कलमे

कलमे २३९ - २४२ मंत्रिमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांबाबत

भाग ९ - पंचायती पद्धतीबाबतची कलमे

कलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत

भाग ९ अ - नगरपालिकांबाबतची कलमे.

कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबत

भाग १० -

कलमे २४४ - २४४ अ

भाग ११ - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी

प्रकरण १ - कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी

कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी

प्रकरण २ - कलमे २५६ - २६३

कलमे २५६ - २६१ - सामान्य

कलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत.

कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध.

भाग १२ - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत

प्रकरण १ - कलमे २६४ - २९१ संपत्तीबाबत

कलमे २६४ - २६७ सामान्य

कलमे २६८ - २८१

कलमे २८२ - २९१ इतर

प्रकरण २ - कलमे २९२ - २९३

कलमे २९२ - २९३

प्रकरण ३ - कलमे २९४ - ३००

कलमे २९४ - ३००

प्रकरण ४ - कलम ३०० अ मालमत्तेच्या अधिकारांविषयक

कलम ३०० अ -

भाग १३ - भारताच्या व्यापार आणि वाणिज्यविषयक कलमे

कलमे ३०१ - ३०५

कलम ३०६ -

कलम ३०७ -

भाग १४ -

प्रकरण ५ - कलमे ३०८ - ३१४

कलमे ३०८ - ३१३

कलम ३१४ -

प्रकरण २ - कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम

कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम

भाग १४ अ - आयोगांच्या बाबत कलमे

कलमे ३२३ अ - ३२३ बी

भाग १५ - निवडणूक विषयक कलमे

कलमे ३२४ - ३२९ निवडणूक विषयक कलमे

कलम ३२९ अ -

भाग १६ -

कलमे ३३० -३४२

भाग १७ - अधिकृत भाषॆबाबतची कलमे

प्रकरण १ - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषॆबाबत

कलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषॆबाबत

प्रकरण २ - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषांबाबत

कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषांबाबत

प्रकरण ३ - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी

कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी

प्रकरण ४ - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देश

कलम ३५० -

कलम ३५० अ -

कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्यांकाविषयीचे कलम

कलम ३५१ - हिंदी भाषॆविषयक कलम

भाग १८ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे

कलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे

कलम ३५९ अ -

कलम ३६० - आर्थिक आणीबाणी

भाग १९ - इतर विषय

कलमे ३६१ - ३६१अ - इतर विषय

कलम ३६२ -

कलमे ३६३ - ३६७ - इतर

भाग २० -घटनादुरुस्ती पद्धत

कलम ३६८ -घटनादुरुस्ती

भाग २१ -

कलमे ३६९ -३७८ अ

कलमे ३७९ - ३९१ -

कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क

भाग २२ -

कलमे ३९३ -३९५


📝 *घटनादुरुस्त्या*


मुख्य पान: भारतीय संविधानातील दुरुस्त्या

राज्यघटनेच्या ३६८व्या कलमानुसार भारतीय संसदेस घटनेतील तरतुदी वाढवण्याचा, कमी करण्याचा वा बदलण्याचा अधिकार आहे. घटनादुरुस्तीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडले जाणे व २/३ बहुमताने मंजूर होणे बंधनकारक आहे. घटनेच्या काही कलमांमधील दुरुस्त्यांना संसदेशिवाय किमान निम्म्या राज्यांच्या संमतीची गरज असते. संसदेच्या मान्यतेनंतर राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यावर ही दुरुस्ती अंमलात येते. 

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६   


                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          

          🌞🙏शुभ प्रभात🙏🌞

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभ प्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

कार्तिक मास,कृष्ण पक्ष, *सप्तमी*,अश्लेषा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,हेमन्त ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शुक्रवार, २६ नोव्हेंबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


पिपीलिका अर्जितं धान्यं 

                 मक्षिका सञ्चितं मधु,

लुब्धेन सञ्चितं द्रव्यं 

                 समूलं हि विनश्यति।।


*भावार्थः- चींटी द्वारा इकट्ठा किया गया अनाज, मधुमक्खी द्वारा जमा किया गया शहद, और लोभियों द्वारा संचित किया गया धन... समूल ही नष्ट हो जाता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

कुतुहल ग्रह तारे


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री.गजानन गोपेवाड 

~==========================~


*कुतूहल : ग्रह-ताऱ्यांची स्थाने – निरपेक्ष पद्धत*


ग्रह वा ताऱ्याचे निरपेक्ष स्थान दर्शवण्यासाठी वैषुविक पद्धतीचा किंवा आयनिक पद्धतीचा वापर केला जातो. आकाशाच्या गोलावरचे आकाशस्थ वस्तूचे स्थान दर्शवणाऱ्या या पद्धती, वैषुविकवृत्त आणि आयनिकवृत्त यांवर आधारलेल्या आहेत. पृथ्वीच्या विषुववृत्ताचे प्रतल पृथ्वीबाहेर वाढवत नेले तर, आकाशात ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर तयार होणारे काल्पनिक वर्तुळ म्हणजे वैषुविकवृत्त. तसेच, ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवरील सूर्याच्या भासमान मार्गाचे वर्तुळ म्हणजे आयनिकवृत्त. ही दोन्ही वर्तुळे एकमेकांशी साडेतेवीस अंशांचा कोन करतात. या दोन वर्तुळांच्या छेदनबिंदूंपैकी एका बिंदूला वसंतसंपात बिंदू म्हटले जाते. हा बिंदू मीन तारकासमूहात वसलेला आहे.


वैषुविक पद्धतीत आकाशस्थ वस्तू विषुवांश आणि क्रांती या संदर्भाकांनी दर्शवली जाते. या पद्धतीत, वैषुविकवृत्त हे संदर्भवर्तुळ आणि वसंतसंपात बिंदू हा संदर्भबिंदू मानला जातो. विषुवांशांवरून एखादा तारा वसंतसंपात बिंदूपासून किती पूर्वेला आहे ते कळते, तर क्रांतीवरून तो तारा वैषुविकवृत्ताच्या किती उत्तरेला वा दक्षिणेला आहे ते कळते. वसंतसंपात बिंदूचे दोन्ही संदर्भाक शून्य मानले जातात. या पद्धतीत विषुवांश हे तास-मिनिट-सेकंद या वेळेच्या एककात दिले जातात. कारण विषुवांशांचा संबंध नाक्षत्रवेळेशी जोडण्यात आला आहे. नाक्षत्रवेळेचे घडय़ाळ सौरवेळेच्या म्हणजे आपल्या नेहमीच्या घडय़ाळापेक्षा चार मिनिटे जलद धावते. सौरवेळेनुसार प्रत्येक तारा रोज चार मिनिटे लवकर उगवत असला तरी, नाक्षत्रवेळेनुसार तो रोज ठरावीक वेळेलाच उगवतो. कोणत्याही ठिकाणी वसंतसंपात बिंदू जेव्हा उत्तरबिंदू-शिरोबिंदू-दक्षिणबिंदू यांना जोडणाऱ्या रेषेवर म्हणजे मध्यमंडलावर येतो, तेव्हा त्या ठिकाणी नक्षत्रवेळेनुसार ‘शून्य वाजता’ नाक्षत्रदिवसाला सुरुवात होते. समजा, एखाद्या ताऱ्याचे विषुवांश दोन तास आहेत आणि क्रांती तीस अंश आहे. जगात कुठूनही या ताऱ्याचे निरीक्षण केले, तर त्या ठिकाणच्या नाक्षत्रवेळेनुसार जेव्हा दोन वाजतील, तेव्हा हा तारा तिथल्या मध्यमंडलावर आलेला असेल. क्रांती तीस अंश असल्याने, हा तारा वैषुविकवृत्ताच्या नेहमीच तीस अंश उत्तरेला असेल. वैषुविकवृत्ताच्या दक्षिणेला असणाऱ्या ताऱ्याची क्रांती ऋण चिन्हाने दर्शवली जाते.


दुसरी निरपेक्ष पद्धत म्हणजे आयनिक पद्धत. या पद्धतीत वैषुविकवृत्ताऐवजी, आयनिकवृत्त हे संदर्भवर्तुळ असते व वसंतसंपात बिंदू हा संदर्भबिंदू मानला जातो. या पद्धतीत मात्र दोन्ही संदर्भाक अंशांच्या स्वरूपात दिले जातात. वैषुविकवृत्त किंवा आयनिकवृत्त, तसेच वसंतसंपात बिंदू, यांची आकाशाच्या पार्श्वभूमीवरील स्थाने स्थिर असल्यामुळे, या दोन्ही पद्धतींतील संदर्भाक निरपेक्ष ठरतात. मात्र ग्रह वा ताऱ्याचे, निरीक्षणाच्या जागेवरून दिसणारे, एखाद्या ठरावीक वेळचे प्रत्यक्ष स्थान शोधण्यासाठी, या संदर्भाकांचे गोलीय त्रिकोणमितीच्या साहाय्याने स्थानिक संदर्भ पद्धतीतील संदर्भाकांत रूपांतर करावे लागते. सरावाने हे गणित करणे सोपे आहे.


–डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org

~==========================~

ज्ञान विज्ञान


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *मुक्या माराचे वळ काळेनिळे का होतात?* 

***********************************

शरीरावर जेव्हा कोणत्याही हत्याराचा हल्ला होतो तेव्हा आपल्याला इजा होते. बहुधा या इजेमध्ये त्वचाच फाटते असं नाही, तर आतल्या मांसालाही जखम होते. अशा वेळी त्या स्ना च्या बनलेल्या मांसाला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्याही कापल्या जातात. साहजिकच त्यांच्यामधून सतत वाहणारं रक्त बाहेर सांडू लागतं. रक्तस्रावाला सुरुवात होते. कालांतरानं तो थांबतो किंवा जातो. रक्तवाहिन्यांची सुटी टोकं बांधली जातात. त्यांच्यामधून आणखी स्राव होणार नाही अशी व्यवस्था केली जाते किंवा नैसर्गिकरित्याच जर रक्तस्राव थांबला असेल तर झालेल्या रक्ताच्या गुठळीनं त्या वाहिन्यांची तोंड बंद केली जातात. मग त्या स्नायूंची दुरुस्ती आणि वरच्या त्वचेची भरपाई होत जखम भरून येते.


काही वेळा शरीरावर पडलेल्या घावानं त्वचा फाटत नाही पण त्या त्वचेखालच्या रक्तवाहिन्यांना मात्र तो आघात सहन न झाल्यानं त्या फाटतात. तुटतात. यालाच आपण मुका मार म्हणतो. म्हणजे इजा झालेली असते पण ती वर दिसत नाही. शरीराच्या आतच ती प्रकट झालेली असते. त्या आतल्या फाटलेल्या रक्तवाहिन्यांमधूनही रक्तस्राव होतो. ते रक्त साकळून आतच साचून राहतं. आपली त्वचा तशी पातळ असते आणि प्रकाशाला संपूर्ण अपारदर्शक नसते, म्हणून तर तळहातावर बॅटरीचा प्रकाशझोत टाकला तर आतल्या रक्तवाहिन्या लाल रंगाच्या दिसतात. तसंच हे न फाटलेल्या त्वचेच्या आत साचलेलं रक्त लाल रंगाच्या डागात दृग्गोचर होतं. कारण त्या रक्तात लाल पेशी असतात. त्यांचा रंग दिसतो. काही काळ गेल्यानंतर मात्र त्या रक्तपेशी सुकतात. त्यांच्यामधला ऑक्सिजन निघून जातो. त्यामुळं त्यांचा रंग बदलतो. तो निळसर दिसतो. काळ्या रंगाकडे झुकू लागतो. त्या काळ्या रंगाचा गडदपणाही हळूहळू कमी होत जातो. काही काळानंतर आतल्या त्या रक्ताचं विघटन होऊन संपूर्ण निचरा झाला की तो डागही दिसेनासा होतो.


दाराच्या फटीत सापडून बोट चिमटलं असलं तरी त्या चिमट्याचा आघात बोटाच्या त्वचेखालच्या

रक्तवाहिन्यांवर होतोच. त्या फुटतात आणि त्यांच्यातलं रक्त वाहून ते साकळून राहतं. त्या घावाचा डागही असाच काळानिळा दिसतो. त्या वेळी होणारी प्रक्रियाही अशीच असते.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?' या पुस्तकातून*

═══════════════════════


Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...