मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

झाडाची पाने का गळतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🍂 *झाडांची पानं का गळून पडतात ?* 🍂 


निसर्ग मोठा काटकसरी आहे; आणि त्याचं नियोजनही बंदिस्त असतं. झाडांच्या पानांचं एक काम जसं प्रकाशसंश्लेषणाचं असतं तसंच ते झाडातलं अतिरिक्त पाणी बाहेर टाकून देण्याचं असतं. एक प्रकारे झाडांचा हा उच्छ्वासच असतो. जमिनीतीलं पाणी मू़ळं शोषून घेतात. त्याचा जो काही वापर आवश्यक असतो तो होत होत ते पाणी पानांपर्यंत पोहोचतं. तिथं त्याचा संयोग हवेतल्या कार्बनडायआॅक्साइडशी होतो. सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या मदतीनं या संयोगातून कर्बोदकं म्हणजेच पिष्टमय पदार्थ निर्माण होऊन ते झाडांमध्ये साठवले जातात. उरलेलं पाणी मग पानाकडून बाष्पाच्या रूपात हवेत सोडलं जातं. मात्र, हिवाळा आला की सूर्यप्रकाशही कमी होतो आणि जमिनीमधून शोषल्या जाणाऱ्या पाण्याच्या मात्रेतही घट होते. सहाजिकच उपलब्ध पाण्याच्या बचतीला महत्त्व येतं. त्यामुळं मग पावलांकडून ते हवेत टाकलं जाणार नाही, याची व्यवस्था करावी लागते. पानांवर सोपवलेल्या दोन्ही कामांमध्ये आता मंदी आल्यामुळे पानांची तेवढीशी आवश्यकता आता उरत नाही. तेव्हा ती गळून पडणंच सोयीचं ठरतं. शिवाय काही काळ सतत काम करत राहिल्यामुळं पानंही 'म्हातारी' झाल्यासारखी होतात. सहाजिकच ती काढून टाकून त्यांची जागा नवी कोरी पानं घेतील अशी व्यवस्था करावी लागते. त्यासाठी मग अशी अवस्था होण्यापूर्वीच पानाच्या देठाच्या मुळाशी मऊशार पेशींची गर्दी होते. त्यातून एक विशिष्ट विकर पाझरायला लागतं. ते त्या देठाच्या खुडण्याला मदत करतं आणि पान हळुवारपणे अलगद गळून पडतं.


वर्षाचे सहा सात महिने सतत काम करताना काही विषमय पदार्थही पानांमध्ये साचून राहतात. पानं गळून पडल्यानं या घातक पदार्थांचा निचरा व्हायलाही मदत होते; पण अशा प्रकारे सर्वच झाडांची पाने गळून पडत नाहीत. सदाहरित झाडांची अशी विशिष्ट ऋतूमध्येच पानगळ होत नाही. उलट त्यांच्या पानांचं नवीनीकरण सततच होत असतं. त्यामुळं वर्षभर सर्वच ऋतूंमध्ये ती हिरव्यागार पानांनी बहरलेली दिसतात.

 

*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?'या पुस्तकातून*

═══════════════════════

गणित आँलिम्पीयाडचा उत्सव


══════════════════

           *🤔 【 कुतूहल 】 🤔*  

______________________________

*🖥️✒️संकलन✒️💻*

_*श्री.गजानन गोपेवाड *_

_*श्री.अण्णासाहेब पांडूरंग राठोड (बीड)_TSS*_

~==========================~


*कुतूहल : गणित ऑलिम्पियाडचा उत्सव*


इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड (आय.एम.ओ.) ही केवळ एक स्पर्धा नाही तर दर वर्षी जुलै महिन्यात ११ दिवस चालणारा तो एक उत्सवच असतो. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी प्रश्ननिवडीची परंपरागत प्रक्रिया अतिशय रंजक आहे. ऑलिम्पियाडच्या सुमारे दोन महिने आधी सर्व देशांमधून प्रश्न मागवले जातात. या प्रश्नांमधून आयोजनकर्त्यां देशातील एक समिती सुमारे ३० ते ४० ‘शॉर्टलिस्टेड’ म्हणजे ‘निवडक’ प्रश्न निवडून त्यांची एक पुस्तिका बनवते. प्रत्येक देशाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना आगमनाच्या पहिल्याच दिवशी एका दूरच्या ठिकाणी नेऊन ठेवले जाते आणि त्यांच्याकडे निवडक प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली पुस्तिका सोपवली जाते. याचे कारण काय? तर, गोपनीयता! काही कायमचे पदाधिकारी आणि हे सर्व नेते यांच्या पंच समितीत चर्चा, मतदान अशा पद्धतीने शॉर्टलिस्टेड प्रश्नांपैकी ६ प्रश्नांची प्रश्नपत्रिका निवडली जाते. बीजगणित, भूमिती, फलांची (फंक्शनल) समीकरणे आणि काही कोडय़ांसारखे प्रश्न अशी साधारण विभागणी असते. प्रश्नांच्या अचूक शब्दरचनेबद्दल व अनेक प्रमुख भाषांमधील भाषांतराबद्दल बराच खल होतो व अंतिम स्वरूप ठरते. इंग्रजी, फ्रेंच व रशियन या ऑलिम्पियाडच्या अधिकृत भाषा समजल्या जातात. मागणी केली तर इतर भाषांमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाते. 


ऑलिम्पियाड प्रश्नांबद्दल एक अट अशी आहे की त्यातील प्रत्येक प्रश्न संपूर्णपणे नवीन हवा. तो त्याआधी संपूर्ण जगातील कोणत्याही स्पर्धेत कधीही विचारलेला असता कामा नये. अर्थातच तो कोणत्याही पुस्तकात किंवा अन्य स्वरूपात प्रकाशित झालेला असता कामा नये. ही अट पूर्ण करणे फार कठीण आहे. कारण आजपर्यंतच्या लक्षावधी प्रश्नांत नसलेला प्रश्न कसा काढणार? एखादा प्रश्न नक्की नवीन आहे हे कसे ठरवायचे? यासाठी पंच समितीतील शंभरएक सदस्यांच्या ज्ञानावर विसंबून राहिले जाते. त्यांपैकी कोणीही तो प्रश्न आधी पाहिलेला नसेल तर तो नवीन समजला जातो. अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम झाल्यानंतर ऑलिम्पियाडच्या मुख्य ठिकाणी स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा प्रशस्त सभागृहात आयोजित केला जातो. सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे स्पर्धकांचे संचलन. हे क्रीडा ऑलिम्पिकसारखेच असते. फरक इतकाच की ते एखाद्या बंदिस्त सभागृहात रंगमंचावर सादर होते. प्रत्येक देशाचे नाव पुकारल्यानंतर त्या देशाचा संघ आपल्या स्वयंसेवकाबरोबर मोठय़ा दिमाखात रंगमंचावर येऊन प्रेक्षकांना अभिवादन करतो व पुढे जातो. संघाबरोबर त्या देशाचा झेंडा असतो. तसेच स्पर्धकांचा पोशाखही एकसारखा, गणवेशासारखा असतो. नंतर कसरती, जादूचे प्रयोग इत्यादी करमणुकीचे कार्यक्रम होतात. त्यानंतरच्या दिवशी मुख्य परीक्षेला सुरुवात होते.


–डॉ. रवींद्र बापट

मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

Written By_लोकसत्ता टीम

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : 

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿


         *डाॕ.राममनोहर लोहिया*


            जन्म : २३ मार्च १९१०


      *मृत्यू : १२ ऑक्टोबर १९६७*


 भारतातील समाजवादी चळवळीतील एक अग्रगण्य नेते आणि विचारवंत. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर या गावी हिरालाल व चंद्रीबाई (चंदाबाई) या दांपत्याच्या पोटी झाला. चंद्रीबाई रोममनोहर लहान असतानाच वारली. तेव्हा आजी व चुलतीने त्यांचा सांभाळ केला. वडील हिरालाल हे व्यापर करीत असत. ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. अकबरपूर जवळील टंडन पाठशाळा व विश्वेश्वरनाथ हायस्कूल यांमधून राममनोहरांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. वडील व्यवसाया निमित्त मुंबईला राहू लागले, तेव्हा तेथूनच राममनोहर मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले (१९२५). त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते प्रथम बनारस हिंदू विश्वविद्यालयात दाखल झाले; पण ते सोडून त्यांनी कलकत्त्याच्या विद्यासागर महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि कलकत्ता विद्यापीठाची बी.ए. ही पदवी संपादन केली (१९२९). उच्च शिक्षणासाठी निधी जमा करून ते प्रथम इंग्लंडला  गेले; पण नंतर त्यांनी बर्लिन विद्यापीठात संशोधन करून अर्थशास्त्र विषयात सॉल्ट अँड सिव्हिल डिस्ओबीडिअन्स या विषयात पीएच्.डी. ही पदवी मिळविली (१९३२).


विद्यार्थिदशेतच १९२६ च्या गौहाती काँग्रेस अधिवेशनास ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांचा सुभाषचंद्र बोस आणि नेहरूंशी सहवास घडला आणि ते राष्ट्रीय चळवळीकडे आकृष्ट झाले; तथापि जर्मनीहून परतल्यानंतर (१९३३) त्यांनी सुरुवातीस बनारस विद्यापीठात अध्यापकाच्या नोकरीसाठी पयत्न केला आणि नाखुषीने रामेश्वरदास बिर्लांच्या स्वीय साहाय्यकाचे काही महिने काम पतकरले. जेव्हा काँग्रेसमध्ये काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन झाला (१९३४), तेव्हा त्यांनी राजकीय कार्याला वाहून घेतले. त्यांची कार्यकरिणीवर निवड झाली तसेच काँग्रेस सोशॅलिस्ट या नवीन साप्ताहिकाच्या संपादकत्वाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. लखनौच्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनात नेहरूंनी काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाचे त्यांना सचिव नेमून आणखी एक जबाबदारी सोपविली (१९३६-३८). त्यांनी आपले वास्तव्य कलकत्त्याहून अलाहाबादला हलविले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी प्रखर युद्धविरोधी आणि साम्राज्यशाही विरोधी भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना अटक झाली १९३९; पण न्यायालयात त्यांची सुटका करण्यात आली. त्यांना स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात एकोणीस वेळा तुरुंगावास घडला. तुरुंगात त्यांचा छळही करण्यात आला. अमेरिका, ग्रेट ब्रिटन, म्यानमार (ब्रह्यदेश), गोवा येथेही त्यांना विविध कारणांसाठी कारावासात डांबण्यात आले.


१९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी अच्युतराव पटवर्धन व जयप्रकाश नारायण यांच्या बरोबरीने चळवळीचे नेतृत्व केले. याच सुमारास जयप्रकाशांबरोबर ‘आझाद दस्तसाठी’ काही महिने ते नेपाळात गेले. तेथून आल्यावर २० मे १९४४ रोजी त्यांना अटक होऊन प्रथम लाहोर व नंतर आग्रा येथे तुरुंगात ठेवण्यात आले. लाहोरच्या तुरुंगात त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. पुढे ११ एप्रिल १९४६ रोजी त्यांची सुटका झाली. भारताच्या फाळणीला त्यांचा तीव्र विरोध होता, तरीसुद्धा १९४७ च्या हिंदु-मुस्लिम दंगलीत त्यांनी म. गांधीबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. काँग्रेस अध्यक्षांसह कोणीही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र भारताचे पंतप्रधान होऊ नये, अशी त्यांची धारण होती. अखेर काँग्रेसमधील समाजवादी विचारसरणीच्या गटाला घेऊन ते बाहेर पडले (१९४८). त्यांनी स्वतंत्र समाजवादी पक्षाचे नेतृत्व केले. हा समाजवादी पक्ष कृषक मजदूर प्रजा पक्षात विलीन करण्यात आला आणि त्याचे नाव प्रजा सोशॅलिस्ट पक्ष असे ठेवण्यात आले (१९५२). त्याचे ते महासचिव झाले; तथापि त्यातही त्यांचे मतभेद होऊन त्यांनी हैदराबाद येथे समाजवादी पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले (१९५५). ते या पक्षाचे अध्यक्ष व मॅन्काइंड या नियतकालिकाचे संपादक झाले (१९५६). पुढे हाही पक्ष पुन्हा प्रजासमाजवादी पक्षात विलीन होऊन (७ जून १९६४) त्याचे संयुक्त समाजवादी पक्ष असे नामांतर झाले. तत्पूर्वी १९६३ मध्ये ते फरूखाबाद मतदार संघातून लोकसभेवर निवडून आले. अखेरपर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते.


दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासूनच ते नेहरूंचे टीकाकार बनले होते. अखेरपर्यंत संसदेतील एक प्रमुख विरोधी नेते म्हणूनच त्यांनी नावलौकिक मिळविला. स्वातंत्र्योत्तर काळातील त्यांचे राजकीय जीवनही संघर्षपूर्ण होते. शेतकऱ्यांच्या चळवळी, आंग्रेजी हटाव आंदोलन, जाती तोडो आंदोलन, गोवा मुक्ती चळवळ, हिंदी राष्ट्रभाषेचा पुरस्कार, नेपाळमधील स्वातंत्र्य संघर्ष अशा अनेक चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले; तथापि आपल्या राजकीय जीवनात त्यांनी काँग्रेस वा कम्युनिस्ट यांबरोबर कधीच तडजोडीची भाषा वापरली नाही. लोहियांनी अनेक देशांचा या ना त्या निमित्ताने प्रवास केला. त्यात अमेरिका, जपान, श्रीलंका, इंडोनेशिया तसेच अनेक यूरोपीय व आफ्रिकी देशांचा सदिच्छा दौरा होता. १९५१ मध्ये फ्रँकफुर्ट (जर्मनी) येथील पहिल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेस ते उपस्थित होते. याशिवाय त्यांनी १९५३ च्या रंगून येथील आशियाई समाजवादी परिषदेचे आयोजन केले होते; पण त्या परिषदेस ते उपस्थित राहू शकले नाहीत. ते इंग्रजी, हिंदी या भाषांशिवाय फ्रेंच, जर्मन या परकीय भाषा आणि उर्दू-बंगाली या भारतीय भाषाही उत्तम प्रकारे बोलत. त्यांना कला-साहित्याची चांगली जाण होती. त्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र होते. आयुष्यभर त्यांनी अन्याय व भ्रष्टाचार यांविरुद्ध प्रखर लढा दिला. संसदीय लोकशाहीतील एक जबरदस्त विरोधी नेता म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. ३० सप्टेंबर १९६७ रोजी दिल्लीच्या विलिंग्डन नर्सिंग होम रुग्णालयात अष्ठीला ग्रंथीची शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात आली. त्यांनतर काही दिवसांतच त्यांचे देहावसन झाले. ते अखेरपर्यंत अविवाहित राहिले.


लोहियावाद: आपल्या बहुरंगी आणि विविधतापूर्ण सार्वजनिक जीवनात त्यांनी त्रिपदरी कार्यावर भर दिला. निवडणुकांद्वारे सत्तापालट घडवून आणण्यासाठी राजकीय कार्य, सत्याग्रह व संघर्षाद्वारे परिवर्तनासाठी लढा, आणि रचनात्मक कार्य, असा त्यांचा कार्यक्रम होता. मतपेटी, तुरुंग आणि फावडे या प्रतीकांच्या स्वरूपात त्यांनी ही त्रिसूत्री मांडली. विद्यार्थिदशेतच त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव पडला होता. त्यांचे विचार त्यांच्या अनुयायांमध्ये ‘लोहियावाद’ म्हणून ओळखले जातात. त्याचे प्रमुख घटक असे :

लोकांचा शासनांत अधिकाधिक सहभाग असावा, यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करून केंद्र, राज्य, जिल्हा आणि गाव या चार पातळ्यांवरील शासनयंत्रणांना स्वतंत्र अधिकार असावेत. यालाच त्यांनी ‘चौखंबा राज्य’ हे नाव दिले.

आर्थिक क्षेत्रात त्यांनी माफक यांत्रिकीकरणाचा पुरस्कार केला. यंत्र हे शोषणाचे साधन न बनता दारिद्र्य निवारणाचे साधन बनावे. माणूस यंत्रामुळे आळशी, परावलंबी आणि एकाकी बनू नये, या म. गांधींच्या विचारांचा स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच त्यांच्यावर प्रभाव पडला होता. त्यामुळे लघुउद्योग, त्यांना उपयुक्त अशी यंत्रसामग्री आणि स्वावलंबन यांवर त्यांनी भर दिला. या घोरणालाच त्यांनी ‘अल्पप्रमाण यंत्र’ असे म्हटले. औद्योगिक केंद्रीकरण, मोठे उद्योग आणि यांत्रिकीकरणावरील भर कमी केला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

लोहिया हे स्त्रियांच्या समस्यांची जाणीव असलेले एक विचारवंत होते. त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा तसेच आंतरजातीय विवाह, कुटुंब नियोजन आणि हुंडाबंदी इ. प्रागतिक विचारांचा हिरिरीने पुरस्कार केला. जातिसंस्था हा समाजवादाच्या मार्गातील मुख्य अडसर आहे, हे लक्षात घेऊन या सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी प्रखर संघर्ष उभा केला आणि अनुसूचित जातिजमातींची आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला. जातीवर आधारित राजकारणाला मूलगामी परिवर्तनाचे परिमाण लोहियांनी दिले.

स्वातंत्र्योत्तर काळातील इंग्रजी भाषेच्या वर्चस्वाचे ते कट्टर विरोधक होते. इंग्रजी भाषेचा अनुनय हे गुलामी मनोवृत्तीचे लक्षण असल्याची त्यांनी टीका केली. म्हणून राष्ट्रभाषा व भारतीय भाषा यांचा आग्रह त्यांनी सातत्याने धरला; परंतु पुढे इंग्रजी विरोधी आंदोलनातून दक्षिणेत हिंदी विरोधाचे आंदोलन उद्भवले.

१९६२ नंतरच्या काळात लोहियांनी काँग्रेसला सत्ताभ्रष्ठ करणे, हे मुख्य उद्दिष्ट मानले आणि काँग्रेस विरोधात डाव्या व उजव्या सर्वांनी एक व्हावे, यासाठी अथक प्रयत्न केले. ‘काँग्रेस हटाव’ आंदोलन आणि सर्व काँग्रेस विरोधकांची आघाडी करण्याचे हे प्रयत्न हा भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा असून या धोरणाचा १९६७ नंतरच्या भारतीय राजकारणावर फार मोठा ठसा उमटलेला दिसतो.

लोहियांनी आपले विचार व्याख्याने, स्फुटलेख व ग्रंथांद्वारे मांडले. त्यांचे सर्वच लेखन विचारप्रवर्तक असून त्यांच्या काही ग्रंथांचा मराठीत अनुवाद झाला आहे. काहींच्या आवृत्त्याही निघाल्या आहेत. त्यांच्या इंग्रजी-हिंदी प्रमुख व मान्यवर ग्रंथांपैकी मिस्टरी ऑफ सर स्टॅफर्ड क्रिप्स (१९४२), ॲस्पेक्टस ऑफ सोशॅलिस्ट पॉलिसी (१९५२), व्हिल ऑफ हिस्टरी (१९५५), विल-पॉवर अँड आदर रायटिंग्ज (१९५६), गिल्टी मेन ऑफ इंडियाज् पार्टिशन (१९६०), मार्क्स, गांधी अँड सोशॅलिझम (१९६२), इंडिया, चायना अँड नॉर्दर्न फ्राँटिअर्स (१९६३), द कास्ट सिस्टीम (१९६४), इंटरव्हल ड्यूअरिंग पॉलिटिक्स (१९६५), फ्रॅग्मेन्ट्स ऑफ वर्ल्ड माइंड (१९६६), वाल्मीकी और वसिष्ठ, क्रांती के लिए संघटन इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत. नियतंकालाकांतून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या बहुविध स्फुटलेखांची मराठी भाषांतरे श्रीमती इंदुमती  केळकर व श्रीपाद केळकर यांनी अन्तहीन यात्रा, ललित लेणी (१९६९), दोन हत्यारे सत्ताधाऱ्यांची : भाषा आणि जाति (१९७१) या शीर्षकांनी प्रसिद्ध केली आहेत. अलीकडे त्यांचे आणखी काही स्फुटलेख समता आणि समृद्धी (१९७७), भारतीय शिल्प (१९८१), मार्क्सवाद-समाजवाद (१०८१), अल्प प्रमाणयंत्र (१९८४), नर-नारी 

(१९८४), शेती-शेतकरी-भूसेना (१९८४), जातिप्रथेचा तुरुंग (१९८४) इ. मथळ्यांनी मराठीत प्रसिद्ध झाले आहेत.


लोहियांनी समाजवादी चळवळीचे नेतृत्व केले, पण मूलतः त्यांची  धारणा उदारमतवादी होती. त्यांनी मार्क्सवाद अथवा गांधीवाद पूर्णांशाने कधीच स्वीकारला नाही. भारतीय समस्यांच्या संदर्भात स्वदेशी समाजवाद विकसित केला पाहिजे, अशी त्यांची मूलगामी भूमिका होती.

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *शुभप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अश्विन मास,शुक्ल पक्ष, *सप्तमी*,मूल नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्द ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, १२ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


         *"काम के समान कोई रोग नहीं, मोह के समान कोई शत्रु नहीं है, क्रोध के समान कोई आग नहीं है तथा आत्मज्ञान से बड़ा कोई सुख नहीं है।”*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

जागतिक मानसिक आरोग्य दिन

 ************************************

*१० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन*

************************************


आज जागतिक मानसिक आरोग्य दिन.


मानसिक आजारातून पुन्हा लोकांना आपल्या पायांवर खंबीरपणे उभे राहता यावे यासाठी 'वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ' ही संस्था काम करते. याच संस्थेने १९९२ मध्ये जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाची (World Mental Health Day) सुरवात केली. 


अंपगत्व येण्यासाठी मानसिक आजार हे प्रमुख कारण असल्याचे ही संस्था सांगते. मानसिक आजाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ही संस्था मोठ्या प्रमाणात काम करते आणि यासाठीच दरवर्षी १० ऑक्टोबरला मनासिक स्वास्थ्य दिन साजरा केला जातो. 


हा दिवस साजरा करण्याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे कोणत्याही वयातील व्यक्तीला हा आजार होण्यापूर्वीच त्याला याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

************************************

आंतरराष्ट्रीय मुलगी दिवस

 *११ ऑक्टोबर*


*‘आंतरराष्ट्रीय मुलगी दिन'*


आज ११ ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मुलगी दिन’ म्हणून साजरा करण्याची सूचना संयुक्त राष्ट्रसंघाने (यूनो) केली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने त्याची दखल घेऊन ‘मुलगी दिना’चे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश राज्यातील सर्व शाळांना दिले आहेत. सर्व शाळांमध्ये मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे कार्यक्रम आज होत आहेत. ‘यूनो’कडून आलेले शिक्षण अधिकारविषयक राष्ट्रगानही शाळांमध्ये दाखविले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ३,५०० शाळा या उपक्रमात सहभागी होणार आहेत. पालक, शाळा समिती पदाधिकारी, शिक्षकांना यावेळी आवर्जून हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. उपक्रम सरकारी असला तरी मुलींच्या सबलीकरणाच्या दृष्टीने तो अतिशय चांगला आहे. या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक, स्वागत केले पाहिजे. चांगल्या उपक्रमांना विरोध होणारच, पण त्या विरोधाला न जुमानता, त्याकडे दुर्लक्ष करून जाणकार नागरिक उपक्रमात सहभागी होऊन तो नक्कीच यशस्वी करतील यात शंकाच नाही. दहावी, बारावी परीक्षांमध्ये मुलांपेक्षा मुलीच अव्वल असल्याचे दरवर्षीचे निकाल सांगतात. अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी आदी सर्वच शैक्षणिक शाखांमध्येही मुलींचाच बोलबाला आहे. मिळालेल्या संधीचा त्या पुरेपूर लाभ उठवून पालकांचे स्वप्न साकारत आहेत. हल्ली खेड्यापाड्यांतील मुलीही तालुक्याच्या ठिकाणी एसटीचा प्रवास करून शिक्षणासाठी जाताना दिसतात. अर्थात प्रगतीच्या विस्तीर्ण आकाशात चमकण्याचे भाग्य सर्वच मुलींच्या नशिबी नाही, हे वास्तव नाकारता येणार नाही. शिक्षणाला पारख्या झालेल्या मुलींचे प्रमाण आजही मोठे आहे. ग्रामीण भागांत गोरगरिबांच्या लेकी शाळेत दिसत असल्या तरी त्यांच्या शिक्षणाकडे वा आरोग्याकडे लक्ष पुरवायला पालकांना वेळ नसतो. इतर मुली शाळेत जातात म्हणून त्यांच्यासोबत आपलीही लेक पाठवायची, एवढेच त्यांना ठाऊक असते. तिने शाळेत गेलेच पाहिजे, शिक्षण घेतलेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो असे नाही. त्यामुळेच कधी लहान भावंडांना सांभाळण्यासाठी, घरकामासाठी त्यांना घरी ठेवून घेतले जाते. पुरोगामी राज्य म्हणून गणल्या जाणार्‍या महाराष्ट्रात स्त्री भ्रूणहत्येचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. मुलीचा गर्भ काढून टाकण्याची अमानुष प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आधुनिक तंत्रांचा गैरवापर त्यासाठी सर्रास होत आहे. बीडमधील डॉ. मुंडे दांपत्याने गर्भातच कोवळ्या कळ्यांचा गळाघोट करून त्यावर पैसे कमावण्याचे सोनोग्राफीचे दुकान थाटले होते. अशा प्रकारांतूनच मुलींंचे लोकसंख्येतील दरहजारी जन्मप्रमाण घटत आहे. मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून सरकारी पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘लेक वाचवा’ अभियान त्यापैकीच एक! विविध व्यासपीठांवरून स्त्री भू्रणहत्या रोखण्यासाठी समाजप्रबोधन केले जात आहे, ही चांगली बाब असली तरी अशा विचारांचा अंगिकार करण्याकडे अजूनही समाजाचा तेवढा कल दिसून येत नाही. प्रगत राज्यांतील काही जातींमध्ये तर जन्माआधीच मुलीचा गळा घोटला जातो. खाप पंचायतीसारख्या कुप्रथा मुलींच्या मुळावर आल्या आहेत. मुलाच्या विवाहासाठी गरीब कुटुंबांतील, जातीतील मुली विकत घेण्यासारखे वेगवेगळे मार्ग अवलंबले जात आहेत. मुलींच्या घटत्या संख्येचा प्रश्‍न भयानक स्वरुप धारण करू लागला आहे. यातून अनेक सामाजिक प्रश्‍न निर्माण होत आहेत. २०११ च्या जनगणनेत ते आणखी घटल्याचे दिसून आले आहे. गेल्या २० वर्षांत देशात सव्वा कोटीच्यावर स्त्रीभ्रूण हत्या झाल्याचे सांगितले जाते. २०११च्या जनगणनेतील आकडेवारी धक्कादायक आहे. राज्यात १९९१ साली दर हजार पुरुषांमागे ९३४ स्त्रिया असे प्रमाण होते. ते २००१ मध्ये ९१२ झाले. २००९ मध्ये ते ९०९ होते तर २०११ मध्ये हाच आकडा ८८३ वर घसरला. ही आकडेवारी स्त्री-पुरुष समतोल धोक्यात आल्याची निदर्शक आहे. १९९१ मध्ये ० ते ६ वर्षाच्या हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९४६ होते. २००१ मध्ये ते ९२७ वर आले. राज्यातील ३८ तालुक्यांमध्ये मुलींचे प्रमाण ११ टक्क्यांनी घटल्याचे आकडे बोलके आहेत. राज्याच्या आरोग्य सेवा विभागाच्या आकडेवारीनुसार ० ते ६ वयाच्या मुलींचे प्रमाण शहरी भागात झपाट्याने घटत आहे. आदिवासी व मागासबहुल जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर त्यापेक्षा जास्त आहे. मुंबईसारख्या शहरात मुलींचे प्रमाण दर हजार मुलांमागे ९२७ आहे. नाशकात ते ९२० इतके आहे. गर्भजल परीक्षणविरोधी कायदा कठोर असला तरीही सोनोग्राफी सेंटर्सवर मोठ्या प्रमाणात गर्भजल निदान होत असल्याच्या तक्रारी नेहमीच येतात. मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही तीव्र चिंता व्यक्त केली आहे. महिला दिन, मातृत्व दिन दरवर्षी साजरे होतात. ते साजरे होताना किती स्त्रिया मुलीच्या जन्माबाबत आनंद व्यक्त करतात? घराण्यासाठी ‘वंशाचा दिवा हवा’ म्हणून सासूच्या भूमिकेत आग्रह धरणारी आणि सुनेला गर्भपातासाठी प्रवृत्त करणारी स्त्रीच असते. देशात सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा होत आहे. देवीच्या रुपाने शक्तीची पूजा केली जात आहे. अनेक वेळा स्त्रियांचा मानसन्मान केला जातो. मात्र हल्ली स्त्रियांवर होणारे बलात्कार, अत्याचार, छळाच्या घटना वाढल्या आहेत. त्या पाहता या समाजाला अशी कोणती कीड लागली आहे, असा प्रश्‍न पडतो. हल्ली स्त्रियाच स्त्रियांच्या वैरी होत असल्याची उदाहरणे पाहावयास मिळत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. आजारी आईच्या सेवेसाठी गौरी त्रिवेदी यांनी सनदी अधिकारीपदाची नोकरी सोडली. गुजरातमधून पहिली आयएएस अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळविला होता. आई-वडिलांप्रती मुलींना अधिक माया असते असे म्हटले जाते, याचे हे ठळक उदाहरण होय. मुला-मुलींमधील तुलनात्मक प्रमाण दिवसेंदिवस घसरत आहे, ही चिंतेची बाब आहे. ती लक्षात घेता सुजाण नागरिक या प्रश्‍नाकडे निश्‍चितच गांभीर्याने पाहतील.


🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अश्विन मास,शुक्ल पक्ष, *षष्ठी*,ज्येष्ठा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, ११ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

          *"समय और परिस्थिति पर कभी किसी का वश नही रहा है, ये कभी भी बदल सकते है। इसलिए जब समय एवं परिस्थिति आपके अनुकूल हो तो कभी किसी का अपमान मत करो, कभी किसी को कम मत आंको। तुम महाशक्तिशाली एवं समृद्ध हो सकते हो, पर समय तुमसे कहीं अधिक शक्तिशाली है, समय ने बड़े बड़े सम्राटों को भी मिट्टी में मिलाया है। अतः सहज, सरल एवं सुलभ रहें। इसी में जीवन वास्तविक आनंद है।*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

शिंका का? येतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *शिंका का येतात ?* 📙


हिवाळ्यात किंवा गार वाऱ्यात फिरून आल्यावर तुम्हाला फटाफट शिंका आल्या असतील. काहीतरी बोलायला तोंड उघडावे आणि तेवढ्यात शिंका येऊन बोलता येऊ नये, असेही कधी झाले असेल. सर्दी पडसे झाल्यावर शिंका येतात. विशेषत: वावड्यामुळे सर्दी आली असेल, तर शिंका जास्तच येतात. धुळीत गेल्यास, विशिष्ट फूल हुंगल्यास, किंवा अत्तराचा, उदबत्तीचा वास आल्यास वावडे असलेल्या लोकांना शिंका येतात आणि सर्दी होते. काय म्हणता तुम्हाला शिंका येत नाहीत ? मग एक काम करा. आजोबांच्या कोटाच्या खिशातली तपकिरीची डबी घ्या आणि एक चिमूटभर नाकात सोडा! काय आता आल्या का शिंका ? शिंका येणे शुभ की अशुभ ? काहीजण म्हणतात एक शिंक येणे वाईट, पण दोन शिंका येणे चांगले. अर्थात या सर्व अंधश्रद्धा बरं का ! पण शिंका का येतात, ते पाहू.

खोकला आणि शिंका यात बरेच साधर्म्य आहे. आपल्या श्वसन नलिकेत काही त्रासदायक पदार्थ आला तर खोकला येतो. आपण खोकतो म्हणजे काय करतो ? सर्वात आधी आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर एपिग्लाॅटीस नावाचा पडदा श्वासनलिकेवर दाबला जातो. त्यानंतर आपण जोराने श्वास सोडतो. सहाजिकच खोकताना हवा दाबाखाली बाहेर पडते व श्वास नलिकेतील घाण, जिवाणू बेडक्याच्या रूपाने बाहेर टाकले जातात. आता शिंकेविषयी नाकातील हवा जाण्याच्या मार्गात जर काही अपायकारक, त्रासदायक असे पदार्थ आले तर शरीर खोकल्याप्रमाणेच प्रतिसाद देते. नाकातील ही संवेदना मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या नसेमार्फत मेंदुच्या मेड्युला या भागात जाते. येथील पेशींमध्ये संवेदनेचे विश्लेषण होऊन शिंक येण्याची प्रक्रिया होण्याचा आदेश दिला जातो. यात सुरुवातीचे दीर्घ श्वास, नंतर एपिग्लाॅटीसचे श्वासनलिकेवर येणे व नंतर जोरात उच्छवास हे खोकल्याप्रमाणेच असते, मात्र जोरात श्वास सोडताना पडजीभ खाली पडते व त्यामुळे हवा तोंडातून बाहेर न पडता नाकातून बाहेर पडते. नाकातील अपायकारक पदार्थ यामुळे बाहेर पडतो.


वावड्यामुळे वा जंतूसंसर्गामुळे नाकातील आवरण हुळहुळे होते व त्यामुळे वारंवार शिंका येतात. एव्हीलसारखी गोळी देऊन वावड्यामुळे येणाऱ्या शिंका कमी करता येतात. तसेच ज्या पदार्थांमध्ये आपल्याला वावडे आहे त्यापासून दूर राहून स्वतःचे संरक्षण करणे जास्त योग्य होय.


*- डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?' या पुस्तकातून*

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस

 *********************************

*७ ऑक्टोबर - जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस*

*********************************


*आज जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस..!*


गर्भधारणेच्या कालावधीत आईला काही इन्फेक्शन झाल्यास, रक्तदाब, मधुमेह असल्यास, श्वास घेण्यास किंवा थायरॉईड ग्रंथीचा त्रास असल्यास, वेळे आधीच प्रसूती झाल्यास, फार कमी वजनाचे बाळ असल्यास व इतरही काही कारणांमुळे जन्माला येणारे बाळ हे ‘सेरेब्रल पाल्सी’ (गतीमंद) राहू शकते.


भारतात प्रत्येक एक हजार मुलांपैकी तिघांना सेरेब्रल पाल्सी असल्याचे आढळते. महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त असून सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या अभ्यासा नुसार ३२३ मुलांपैकी एकात हा आजार आढळतो. 

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -)

गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

*********************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अश्विन मास,शुक्ल पक्ष, *प्रथम*,चित्रा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, ०७ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


*या देवी सर्वभूतेषु* 

               *शक्ति रूपेण संस्थिता,*

*नमस्तस्यै नमस्तस्यै* 

               *नमस्तस्यै नमो नम:।।*


भावार्थः- *हे माँ ! आप सर्वत्र विराजमान हैं, शक्ति का रूप हैं, माँ अम्बे, आपको मेरा बार-बार प्रणाम है।*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*शारदीय नवराञी आरंभ*

*छञधारी श्री अग्रसेन जयंती*


बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

पृथ्वी स्वताभोवती का फिरते


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

🌎 *पृथ्वी स्वतःभोवती गिरकी का मारते?* 

"""""""""""""""""""""""""""""""""""""


आपली पृथ्वीच नाही तर सगळे ग्रह अशी गिरकी घेत असतात. प्रत्येकाचा अशी एक प्रदक्षिणा करण्याचा 'वेग' वेगवेगळा असतो. ज्या प्रक्रियेतून ग्रहांचा जन्म होतो, त्याचाच हा परिणाम आहे. आकाशात इतस्तत: अनेक पदार्थ, वायू वेडेवाकडे पसरलेले असतात. त्यापैकी प्रत्येकाला इतर सर्वांच्या गुरुत्वाकर्षणाची ओढ जाणवत असते. कालांतराने त्या अोढीपायी त्यातले काही पदार्थ एकत्र येतात. त्यांचा जुडगा बनतो. साहजिकच त्याचं वस्तुमान जास्त असल्यामुळे त्यांची इतरांना वाटणारी ओढ जास्त होते. त्यामुळे पदार्थांचे आणखी काही कण त्याला येऊन चिकटतात. अशा साखळी पद्धतीने हळूहळू ग्रहाचा जन्म होतो. तो होत असताना त्या गुरुत्वाकर्षणाच्या सर्व बाजूंना सारख्याच वाटणाऱ्या ओढीपायी ते पदार्थ ओढले जात असताना त्यांना चक्राकार गती मिळते. तीच मग ते पदार्थ ज्याला चिकटतात त्या ग्रहांकुरालाही मिळते.

ग्रहांकुराच्या केंद्रस्थानात त्यातल्या पदार्थाची घनता साहजिकच जास्त असते. एखादा लाडू वळताना तो दाबला जात असतो. त्यामुळे त्याचा मध्यभाग जास्त घट्ट झालेला असतो तशातलाच हा प्रकार. त्यामुळं त्या ग्रहाच्या परिघावरच्या पृष्ठभागाला केंद्राच्या गुरुत्वाकर्षणाची जास्त ओढ वाटते. पण विखुरलेल्या पदार्थांपासून घन ग्रहाचा जन्म होताना त्याचा व्यास कमी होत जातो. त्यामुळे त्या वर्तुळाकार गतीचा वेगही वाढत जातो. कथक नृत्य करणारी नर्तकी जेव्हा गिरकी घ्यायला लागते तेव्हा त्या गिरकीची गती वाढवायची असेल तर ती आपले हात अंगासरशी ओढून घेते, म्हणजेच अंगाच्या गोलाचा व्यास कमी करते. तेच हा हात पसरलेले असले की त्या गिरकीचा वेगही कमी होतो. तशीच ग्रहाचीही अवस्था असते. त्याचा पसारा कमी होत जातो, तो अधिक घन बनतो तसा त्याचा वर्तुळाकार भ्रमणाचा वेगही वाढत जातो. त्यामुळे गिरकी घेणं हा प्रत्येक ग्रहाचा स्थायीभावच आहे. पृथ्वी ही त्याला अपवाद नाही.


मग चंद्र का गिरकी घेत नाही ? त्याचा एक भाग सतत आपल्या डोळ्यांसमोर राहतो ते का ? असे प्रश्न कोणीही विचारेल; पण चंद्र गिरकी घेत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. चंद्राचा स्वतःभोवती गिरकी घेण्याचा वेग हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या वेगाइतकाच असल्यामुळे त्याचा एक चेहरा आपल्याला सतत दिसत असतो एवढंच. एरवी आकाशातला इतर कोणत्याही गोल गोलासारखा तोही स्वतःभोवती गिरकी घेतच असतो.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

ऐपल संस्थापक स्मृतिदिन

 ********************************

*५ ऑक्टोबर - अॕपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचा स्मृतिदिन*

********************************


जन्म - २४ फेब्रुवारी १९५५ (अमेरिका)

स्मृती - ५ ऑक्टोबर २०११


अॕपलचा संस्थापक सदस्य, माजी अध्यक्ष स्टीव्ह जॉब्स यांचा आज स्मृतिदिन.


सिरीयाचा मुस्लिम विद्यार्थी अब्दुल फतेह जॉन जंदाली व जोआन शिबिल यांनी विवाहाआधी जन्मलेले मूल अनाथालयाला दिले होते. त्यासाठी त्यांची एकच अट होती. त्यांचे मूल दत्तक घेणारे कुटुंब हे सुशिक्षित असले पाहिजे. कॅलिफोर्नियातील पॉल व क्लरा जॉब्स या आर्मिनियन कुटुंबाने त्यांचे मूल दत्तक घेण्याचा प्रस्ताव मान्य केला. जॉन-जोआन यांचे मूल त्यांना दत्तक देण्यात आले. त्या मुलाला स्टिव्हन पॉल जॉब्स असे नाव मिळाले. 


जॉब्स यांचे कुटुंब मजुरी करणारे आहे हे समजल्या नंतर त्यांची आई जोआनने स्टीव्हला दत्तक देण्यास आक्षेप घेतला. सहा  महिन्यांच्या चर्चेनंतर जोआन दत्तक करारावर स्वाक्षरी केली. या ओढाताणीचा स्टीव्ह याच्या मनावर गंभीर परिणाम झाला. कुणालाच न आवडणारा मी एकमेव मुलगा आहे, असे त्याचे मत बनले होते. हायस्कूलमध्ये असताना स्टीव्हला ह्यूलेट पॅकर्डच्या कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली. येथेच त्याची स्टीव्ह व्होज्नियाक सोबत ओळख झाली. 


जॉब्स आणि रीड कॉलेज मधील त्यांचा मित्र स्टीव्ह व्होज्नियाकने शिक्षण अर्ध्यावरच सोडले होते. १९७१ मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा जॉब्स १६, तर व्होज्नियाक २१ वर्षांचा होता. तंत्रज्ञानाची आवड असलेल्या व्होज्नियाकने पहिल्या व्हिडिओ गेमचा टेलिटाईप व नंतर मायक्रोप्रोसेसर बनविला होता. मात्र, त्या वेळी हा गेम विकावा कसा, अशी अडचण होती. ७०च्या दशकात कॉम्प्युटर क्षेत्रात नवनवे प्रयोग व नवनिर्मिती होत होती. नेमकी हीच नस पकडत जॉब्स यांनी १९७६ मध्ये व्होज्नियाकवर कॉम्प्युटर निर्मितीची जबाबदार सोपवीत स्वत: मार्केटिंगमध्ये लक्ष घातले. अशा रितीने अॕपलची सुरुवात झाली. त्यांना ५० कॉम्प्युटर्सची पहिली ऑर्डरही मिळाली खरी, मात्र हे संगणक वेगवेगळ्या सुट्या भागांत न देता पूर्णपणे एका मशिनीच्या स्वरुपात मिळावे, अशी अट होती. आजचे वर्तमान आणि उद्याच्या भविष्याचा अचूक वेध घेत त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षीच कॉम्प्युटरच्या व्यवसायात शिरकाव केला.


तंत्रशिक्षणाची पदवी नसल्याने त्यांनी या क्षेत्रातील तरबेज सहकार्याने निवडले. बाजारपेठेच्या गरजेची नस पकडत जॉब्स यांनी एकापेक्षा एक अत्याधुनिक व सरस उत्पादने धूमधडाक्यात उतरवली. प्रख्यात कॉप्युटर कंपनी आयबीएमने पर्सनल कॉम्प्युटर आणण्याच्या चार वर्षे आर्धीच त्यांनी आपला अॕपल-१ हा पीसी लाँच केला. अॕपलच्या सहकाऱ्या सोबत मतभेद झाल्याने आपलीच कंपनी सोडली. 


१९८६ मध्ये स्टीव्हने नवा प्रयोग करण्याचे ठरवले आणि फिल्म निर्देशक जॉर्ज लुकास यांच्यासह १० मिलियन डॉलरची भागीदारी असणारी एक कंपनी स्थापन केली. तिला नाव देण्यात आले पिक्सार. येथे अॕनिमेशन फिल्म बनवण्यात आल्या. फाइंडिंग निमो सारख्या फिल्मने मोठे यश मिळाल्यावर त्याने ही कंपनी बाजारात आणण्याचे ठरवले. यासाठी वॉल्ट डिझ्नी सोबत करारही करण्यात आला होता. १९९७ मध्ये तोट्यात चालत असलेल्या अॕपलच्या सल्लागार पदावर ते परतले. २००७ मध्ये अॕपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. यानंतर त्यांनी बाजारात आयपॉड, आयफोन अणि आयपॅड सादर केला. त्यांच्या या नेतृत्व व दूरदर्शीपणास जगभराने सलाम ठोकला. 


२००१ साली अॕपलने ५ गिबाबाईट क्षमतेचा पहिला आयपॉड लाँच केला. हा सर्वांत लहान म्युझिक प्लेअर होता. यात एक हजार गाणे स्टोअर करता येतील, असे कंपनीने सांगितले होते. अॕपलच्या मार्केटिंगने सोनी वॉकमनला कडवे आव्हानच दिले नाही तर बाजारपेठेतून जवळपास बाहेरच रवानगी केली.


अॅपल कंपनीच्या घडामोडींवर पुस्तक लिहिणाऱ्या जिम कार्लटन यांनी अॕपल हे नाव कसे निवडण्यात आले या मागिल कहाणी सांगितली आहे. बिटल्स अॕपल रेकॉर्ड या कंपनीच्या लोगोमधून हे नाव घेण्यात आले आहे. स्टीव्हला हा त्या कंपनीचा हिरवेगार अॕपल असलेला लोगो फार आवडायचा म्हणून त्याने कंपनीचे नाव अॕपल ठरवले आणि लोगो म्हणून एक तुकडा तोडलेले अॕपल निवडण्यात आले. यामुळे या दोन कंपन्यांमध्ये कायद्याची लढाई रंगली.


२००७  वर्षात आयफोन लाँचही केला. टचस्क्रीन आणि सोप्या इंटरफेसमुळे हा मोबाईल अपेक्षेपेक्षा अधिक लोकप्रिय झाला. वर्षभरातच कंपनीने आयफोन थ्रीजीही सादर केला. याच्या वेगवान डाटा ट्रान्स्फरने मोबाईल वेड्यांना आणखीच वेड लावले. २०१० साली आलेला पहिला टॅब्लेट पीसीने पुन्हा जगभरातील गॅजेटप्रेमींना वेड लावले. हा टॅब्लेट हातोहात विकला गेला. टचपॅड तंत्रज्ञानावर आधारलेल्या या अतिशय छोट्या कॉम्प्युटरने अनेक उणीवा असतानाही इंटरफेस, वेगवान प्रोसेसर आणि चित्राच्या स्पष्ट गुणवत्तेमुळे लोकप्रिय झाला. नंतर आयपॅड थ्रीजी आणि आयपॅड-२ मध्ये अनेक उणीवा दुरुस्त करण्यात आल्या. 


जॉब्स अनेक वर्षांपासून अन्नाशयाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. या मृत्यूची चाहूल त्यांन आधीच लागली असावी. अॕपलचे सहसंस्थापक वॉल्टर आयजॅक्सन यांचे स्टीव्ह जॉब्स यांच्यावरील पुस्तक लिहिले आहे. 


स्टीव्ह जॉब्स यांचे निधन ५ ऑक्टोबर २०११ रोजी झाले.

🙏🙏शुभ प्रभात...🙏🙏


*************************************

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *चतुर्दशी*,उ.फा.नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, ०५ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


        *"दूसरों की प्रशंसा करने वाला मनुष्य बड़ी सोच और उत्तम हृदय वाला होता है। हीन भावना, अहंकार और ईर्ष्या से ग्रसित मनुष्य दूसरों की प्रशंसा करने में स्वयं को तुच्छ अनुभव करता है।*

          *स्मरण रहे कि कई बार किसी की प्रशंसा में बोले गए शब्द अमुक के लिए मरुस्थल में एक बूँद की तरह सहायक सिद्ध हो सकते हैं, किसी कार्य के लिए की गयी प्रशंसा उसे और अधिक उत्तम कार्य के लिए प्रेरित कर सकती है।"*

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

कान का? खाजतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📕 *कान का खाजतात ?* 


सार्वजनिक ठिकाणी कानात बोट घालून कान गदागदा हलवणारे किंवा कानात काड्या घालून तल्लीन कान कोरणारे महाभाग तुम्ही पाहिले असतील. कान कोरडा पडला २ थोडीफार खाज येऊ शकते. ही खाज आपोआपच कमी होते; परंतु कानाच्या रोगांमध्ये मात्र खाज सारखीच येत राहते व उपचार केल्याशिवाय कमी होत नाही. पावसाळ्यात, दमट वातावरणात किंवा पोहणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्णपथात (Auditory canal) बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. अॅस्परजीलस, नायगर व कँडीडा अल्बीकन्स या बुरशींमुळे होणाऱ्या संसर्गात कान खाजतात व बहिरेपणाही येतो. कानाची तपासणी केल्यास कर्णपथात काळपट वा विटकरी काळपट रंगाची घाण जमा झालेली दिसते. ओल्या वर्तमानपत्राच्या बोळ्यासारखा रंग त्या घाणीला येतो.


कानातील घाण वारंवार काढून टाकणे, पुसून घेणे, सॅलीसिलिक अॅसिड कर्णपथात लावणे, निस्टॅटीनसारखे बुरशीनाशक वापरणे अशा विविध उपायांनी हा रोग पूर्णपणे आटोक्यात येतो. कानावर अॅलर्जीमुळे किंवा जंतूसंसर्गामुळे फोड आले, तरीही कान सुरुवातीच्या काळात अथवा फोड फुटून खपली येण्याच्या काळात खाजतात. यावर अॅलर्जी व जंतुसंसर्गावरील उपचार करावे लागतात.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*

═══════════════════════

  

स्वामी रामानंद तीर्थ जयंती

 *************************************

*३ ऑक्टोबर - स्वामी रामानंद तीर्थ जन्मदिन*

*************************************


   *जन्म - ३ ऑक्टोबर १९०३* 

                  (विजापूर)

     स्मृती - २२ जानेवारी १९७२ 

                  (हैद्राबाद)


*हैदराबाद मुक्तिसंग्रामातिल मराठवाड्यासाठी योगदान देणारे नेतृत्व !*


स्वामी रामानंद तीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. रामानंद तीर्थ यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. 


उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले.


हैदराबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रझाकार’ या संघटनेने मराठवाडा जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहा साठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले.


‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. 


माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते.


तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले.


लोकसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकात गुलबर्गा व औरंगाबाद येथून रामानंद तीर्थ हे निवडून गेले होते. 


१९७२ साली त्यांचे हैदराबाद येथे निधन झाले.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

*संकलन* -) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

*************************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *द्वादशी*,मघा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु, युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, ०३ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तुलसी मीठे वचन ते,

               सुख उपजत चहुँ ओर !

वशीकरण एक मन्त्र है,

               तज दे वचन कठोर !!


भावार्थः- आवेश में कठोर वचन बोलकर मनुष्य न केवल दूसरों के ह्रदय को दुःख पहुचाने के पाप का भागी बनता है अपितु पग-पग पर अपने शत्रु पैदा कर लेता है। जबकि मीठा बोलकर सबको आनंदित करके अपने प्रेम के वशीभूत कर लेता है।

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

2 आँक्टोंबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती

 *************************************

*०२ ऑक्टोबर - लाल बहादूर शास्त्री जन्मदिन*

*************************************


   *जन्म - २ ऑक्टोबर १९०४*

     मृत्यू - ११ जानेवारी १९६६ 

                   (ताश्कंद)


भारताला 'जय जवान जय किसान' हा मंत्र देणाऱ्या भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती.


त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण शास्त्री झाले. त्यांच्या जन्मा नंतर लवकरच त्याच्या वडिलांचे देहांत झाले. त्यामुळे त्यांच्या आईने माहेरी जावून त्यांचे संगोपन केले. त्यांचे बालपण आजोळी मामाच्या आश्रयात झाले. महात्मा गांधीजींच्या विचारांचा जबरदस्त पगडा शास्त्री जींच्या मनावर होता. 


शास्त्री जेवढे मृदू होते तेवढे निश्चयी होते. महात्मा गांधींचे पहिले दर्शन त्यांना १९१६ साली झाले. त्यावेळी ते आफ्रिकेत सत्याग्रह करून नुकतेच भारतात आले होते. तेव्हा पांढरा काठेवाडी फेटा, अंगरखा व जोडा सर्वांच्या नजरेत भरेल असा त्यांचा पेहराव होता. साधा पेहरावां खाली दडलेल्या विचारांची श्रीमंती त्यांच्या भाषणा वरून दिसून आली. राजे महाराजाच्या समोर केलेल्या भाषणात गांधी म्हणाले होते, "भारतातील जनता दाळीद्र्यात मरत असताना एवढे अलंकार चढवून राजे महाराजे येथे आलेत. त्यांनी अगोदर आपले जडजवाहीर विकून टाकावे व मिळालेला पैसा गोरगरिबांना वाटावा." महाराजांच्या श्रीमंतीची घाणाघात करणारे शब्द ऐकून अनेक राजे भर सभेतून उठून गेले. पण सभा एकण्यासाठी आलेली जनता गांधीजींच्या या भाषणाने टाळ्या वाजवून यथोचित सन्मान केला. हे दृश्य शास्त्रीजींनी पाहिले. व ते देश प्रेमाने प्रेरित झाले. 


त्यांचे मन अभ्यासात लागे ना तेव्हा त्यांनी शाळेला राम राम ठोकला व ते स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाले. पण त्या नंतर ते पुन्हा शिक्षणाकडे वळले. त्यांना ज्ञान संपादनाची विशेष हौस होती कॉलेजला जाण्यासाठी त्यांना रोज ५ ते १० मैलाची पायपीट करावी लागायची. कॉलेज झाल्या नंतर त्यांचा एक निश्चय होता कि नोकरी न करता समाजसेवा करायची. त्या वेळी लाला लजपतरायांनी गोखल्यांच्या धर्तीवर ‘लोकसेवक समाज’ संस्था काढली व त्या द्वारे शास्त्रीजींनी अस्पृश्योध्दाराचे काम सुरु केले. स्त्रियांची स्वतंत्रता आणि स्वदेशी हि त्यांची व्रते होती. 


१९२७ साली ललितादेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आपला पती लोकसेवक आहे. त्याकरिता शास्त्रीजीचा वेळ संसाराच्या व्यापात जावू नये यासाठी त्या दक्षता घेत. ते देशासाठी ठिक ठिकाणी जावून आले तिथे तिथे आपल्या मृदू व निश्चयी शब्दांनी ती आपली छाप पाडीत. आणि आपल्या देशात काय उणे आहे, दुसऱ्या देशापासून काय घेण्या सारखे हे त्या प्रमाणे स्वदेशी परतल्या नंतर ते कामाला लागत. 


२७ मे १९६४ ला नेहरूजींचे निधन झाल्या नंतर देशाची सर्वस्वी जबाबदारी लाल बहाद्दूर शास्त्री यांचेवर आली. त्यांनी आपल्या कृतीने माणसाचे शील व निश्चय किती प्रभावशाली असू शकतात हे त्यांनी स्वत:वरून दाखविले. अठरा महिन्याच्या छोट्याशा कारकिर्दीत आपण पंतप्रधान पदाला किती लायक होतो हे शास्त्रींनी आपल्या कृतीने दाखवून दिले. 


शास्त्रीजी चे संपूर्ण जीवन हीच एक आदर्श आचार संहिता होय. त्यांच्या अंगच्या अनेक गुणांचा प्रत्यय आज पर्यंत अनेक वेळा आला असला तरी या वामन मूर्तीने अनेक धैर्यशाली मार्गदर्शन भारताला केले. त्याने सारे जग स्तिमित झाले आहे. भारताची मान जगात उंचावली. ”जय जवान जय किसान” या शास्त्रीजींच्या नव्या घोषणेत त्यांच्या देश विषयक खंबीर धोरणाचे पडसाद उमटले. 


लाल बहाद्दूर शास्त्री यांचे ११ जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे निधन झाले. 


*लाल बहाद्दूर शास्त्री यांना आदरांजली...!*

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏






संकलन -)गजानन गोपेवाड  

उमरखेड जिल्हा -यवतमाळ ४४५२०६

*************************************

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

भाद्रपद मास,कृष्ण पक्ष, *एकादशी*,अश्लेषा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,शरद ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

शनिवार, ०२ आॕक्टोबर २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


         *"इच्छा अथवा कामना पूरी करने के लिए पूजा करना, यह बात प्रलोभन भर है, तथ्यपूर्ण नहीं। ईश्वर को हमें अपनी इच्छानुसार चलाने में तभी सफलता मिल सकती है, जब हम पहले उसकी इच्छानुसार चलना सीखें।* 

         *प्रलोभन और प्रशंसा की कीमत पर भगवान् जैसी दिव्य चेतना को फुसलाकर अपना उल्लू सीधा करने में न तो आज तक किसी को सफलता मिली है और न भविष्य में किसी को मिलेगी।*


 

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भुक का लागते


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📙 *आपल्याला भूक का लागते ?* 📙 


आपलं शरीर सतत काम करत असतं. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो किंवा झोपेत असतो तेव्हाही श्वसन, रक्ताभिसरण, हृदयाची धडधड यांसारख्या प्रक्रिया चालूच असतात. त्यामुळे शरीराला सतत ऊर्जेची गरज भासते. हिचा पुरवठा अखंड असण्यासाठी शरीराला वेळोवेळी पोषण मिळणं आवश्यक असतं. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा हे पोषण मिळतं. ते साठवूनही ठेवलं जातं. पण तो साठा संपला की परत पोषक पदार्थ शरीराला मिळण्याची गरज असते. याचीच जाणीव आपल्याला करून देण्यासाठी भुक लागण्याची भावना निर्माण होते.


आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस या अवयवामध्ये भुकेवर नियंत्रण ठेवणारं केंद्र असतं. त्याला संदेश मिळाला की ते कार्यरत होतं आणि भुकेची भावना जागृत करतं. त्या केंद्राला मिळणारे संदेश विविध प्रकारचे असतात. त्यातले काही शरीराच्या आतून उत्पन्न होतात. म्हणजेच ते अंतर्गत असतात, तर काही बाहेरून येणारे असतात.

शरीराला ऊर्जा मिळते ते ग्लुकोजच्या ज्वलनातून. त्यामुळे रक्तात ग्लुकोजचं प्रमाण एका निर्धारित पातळीवर नेहमी राहील याची व्यवस्था केलेली असते. ते जर त्या पातळीपेक्षा फारच चढलं तर ते आरोग्याला बाधक असल्यानं इन्सुलीन या संप्रेरकाचा  पाझर सुरू होतो. ते संप्रेरक ग्लुकोजची निर्धारित पातळी राखण्यात मदत करतं. जर ग्लुकोजची पातळी या निर्धारित प्रमाणापेक्षा फारच घसरली तर तो संदेश मिळून भुकेचं केंद्र जागृत होतं. त्यावेळी आपण पुरेसं अन्न पोटात टाकलं तर मग भुक मिटल्याची भावनाही याच केंद्रातून निर्माण केली जाते.

आपल्या पोटाचं आकारमानही विशिष्ट पातळीवर ठेवण्याची व्यवस्था केली जाते. तसंच ते काही विविक्षित प्रमाणात भरलेलं असेल हेही बघितलं जातं. पोट जर रिकामं झालं तर ते आकुंचन पावून त्याचं आकारमान घटतं. भुकेचं केंद्र जागृत करायला तोही एक संदेश पुरतो. अशा वेळी पाणी पिऊन आकारमान वाढवलं तरीही भुक भागल्याची भावना निर्माण होते.


आज जरी आपल्याला हवं तेव्हा अन्न उपलब्ध होत असलं तरी आदिमानवाच्या काळात जेव्हा रानावनात कंदमुळे गोळा करून किंवा शिकार करून मनुष्यप्राणी आपली पोषणाची गरज भागवत होता. तेव्हा अन्न केव्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे असं ते मिळालं की प्रत्यक्ष पोषणाची आवश्यकता असो-नसो, त्याच्या दर्शनाने किंवा गंधानंही भुकेची भावना चाळवली जात असे. उत्क्रांतीच्या ओघात हा गुणधर्म टिकून राहिला आहे. त्यामुळे स्वादिष्ट अन्न दिसलं किंवा त्याचा दरवळ नाकपुड्यांना चाळवून गेला म्हणजेही आपल्याला भूक लागते.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*

*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' पुस्तकातून*


आपल्या ला पाच बोटे का असतात?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════             

📙 *आपल्याला पाच बोटे का असतात ?* 📙


खरं तर हा प्रश्न, आपल्याला पाचच बाटं का असतात, असा विचारायला जायला हवा. आपल्या हातांना तसंच पायांना पाच पाच बोटंच असतात. क्वचित काही जणांना एका किंवा दोन्ही हातांना वा पायांना सहावं बोट असतं. सहापेक्षा अधिक बोटं सहसा आढळत नाहीत; पण सहा बोटं असणंही अपवादात्मकच आहे. ती काही सामान्य स्थिती नाही. बरं, फक्त मनुष्यप्राण्याच्या बाबतीतच ही स्थिती आहे असं नाही. कोंबड्या, उंदीर, मांजर, कुत्रा, वाघ, सिंह, वानर अनेक प्राण्यांच्या पायांना पाच बोटं असतात. खुरं असणाऱ्या जनावरांना पाचापेक्षा कमी बोटं असतात. म्हणजेच त्यांची एकापेक्षा अधिक बोटं जोडली जाऊन त्यांचं एकच एक जाडजूड बोट तयार होतं. त्यामुळे त्यांच्या बोटांची संख्या पाचापेक्षा अधिक होत नाही. 

हे असं का होतं ? बोटांवर ही पाचाची मर्यादा का पडली ? असे प्रश्न मनात उमटायला लागतात. याला जसं उत्क्रांतीच्या प्रवाहाचं कारण आहे तसंच सर्व प्राणीमात्रांच्या वाढीला कारणीभूत असणाऱ्या जनुकांची प्रणालीही जबाबदार आहे. उत्क्रांतीच्या प्रवाहात ज्या एखाद्या गुणधर्मामुळे जीवनकलह सुसह्य़ व्हायला त्या विशिष्ट पर्यावरणात तगून राहायला मदत होते, त्या गुणधर्माचा जतन होतं. झाडाच्या फांदीवरची पकड घट्ट होण्यासाठी किंवा हातात पकडलेल्या वस्तूवरची पकड घट्ट होण्यासाठी पाच बोटांची मदत होते, हे स्पष्ट झाल्यावर त्या गुणधर्माच्या प्रकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जनुकांचं संवर्धन झालं. उत्क्रांतीच्या ओघात प्राण्यांच्या नवनवीन प्रजाती उदयाला येताना या गुणधर्मात बदल होण्याचं टळलं.

प्रत्येक प्राण्याची सुरुवात एकमेव फलित पेशीपासून होत असते. प्रथम त्या पेशीचं विभाजन होऊन दोन पेशी जन्माला येतात. याच प्रकारे केवळ विभाजन होऊन पेशींच्या संख्येत वाढ होते. या सर्व पेशी हुबेहुब एकसारख्या असतात. त्यानंतर विशिष्ट काळी या पेशींपासून वेगवेगळ्या अवयवांच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रचली जाते. ती होण्यासाठी त्याला कारक असणारी जनुकं कार्यान्वित होतात. त्यांना 'होमिओबॉक्स जीन्स' असं म्हणतात. त्याच्या प्रभावापोटी गर्भामधील अवयवांकुराचं पाच भागांमध्ये विभाजन होतं. त्यातील काही भाग शरीराच्या पुढच्या भागातील अवयवांच्या निर्मितीच्या कामाला लागतात, तर इतर पाठीमागील अवयवांच्या निर्मितीचं काम करायला लागतात. या अवयवांकुराचे असे पाचच भाग होत असल्यामुळं मग हातापायांना फुटणाऱ्या बोटांच्या संख्येवरही मर्यादा येते. शिवाय अशी पाच बोटं त्यांच्यावर सोपवल्या जाणार्‍या पकडीच्या कामासाठी पर्याप्त असल्यामुळं त्यांच्या संकेत काही बदल करण्याचं प्रयोजनच पडलं नाही. जेव्हा कधी या जनुकांमध्ये होणाऱ्या उत्परिवर्तनापायी पाचाहून अधिक बोटं तयार होतात त्या वेळीही ते अतिरिक्त बोट पाचांपैकी कोणत्या तरी एका बोटाला जोडलेलंच राहतं. हृतिक रोशनच्या डावीकडील हाताच्या अंगठ्याकडे पाहा म्हणजे याची खात्री पटेल.


*डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित*


Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...