गुरुवार, २२ जुलै, २०२१

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *त्रियोदशी*,मूल नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

गुरुवार, २२ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


प्रयोजनेषु ये सक्ता

               न विशेषेषु भारत,

तानहं पण्डितान्मन्ये

               विशेषा हि प्रसङ्गिनः।


*भावार्थ:- जो लोग जितना आवश्यक है, उतने ही काम में लगे रहते हैं, वह अधिक काम हाथ में नहीं लेते, वे ही बुद्धिमान हैं। क्योंकि, अधिक काम हाथ में लेना, काम बिगाड़ देता है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, २१ जुलै, २०२१

बकरी ईद निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा

 *ईद *का दुसरा नाम ही इंसानियत है! मुस्कुराहट और दुआंए यही *अल्लाह* की  मर्जी होती है! हमारे *कर्म * हमारी सही पहचान है! और मै तहेदिलसे ये मानती हूं * जो लोग दुसरों को अपनी दुआओं मे शामिल करते है ,खुशियां सबसे पहले उनके दरवाजे पर दस्तक देती है! *ईद! सही मायनोमे सबको एकसाथ जोड़कर रखती है!* हम सब मिलकर इंसानियत बरकरार रख पाये तो एक दिन जरूर*अल्लाह की चेहरे पर की मुस्कुराहट अपने कर्म से वापस ला सके तो उस दिन हर दिल मे *ईद!* मनायी जायेगी! हम सबकी दुआंए बेहतरीन वक्त पर जरूर रंग लाएगी ! *खुद और खुदा! देखा जाये तो एक लकीर का अंतर है!हमारे कर्मोंसे यह हम एक बना सकते है!* अकेले हम बूॅंद है,मिल जाये तो सागर है!अकेले हम धागा है,मिल जाये तो चादर है!अकेले हम कागज है,मिल जाये तो किताब है!अकेले हम अल्फाज है ,मिल जाये तो जवाब है!अकेले हम पत्थर है,मिल जाये तो इमारत है! अकेले हम दुआ है,मिल जाये तो इबादत है!* मुस्कुराहट और दुआओं के साथ आप सबको *ईद मुबारक!*

गजानन गोपेवाड 




दात का किडतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *दात का किडतात ?* 📕


परवा शाळेत जाणारी दोन मुले पाहिली. इतकी गोंडस की कोणीही त्यांना उचलून घ्यावे. मी हसल्यावर दोघेही हसले आणि मग मला त्यांचे किडके दात दिसले. तुम्हालाही हा अनुभव कदाचित तुमच्याच नातेवाईकांच्या मुलांबद्दल आला असेल. इतका सुंदर चेहरा, पण काय ते दात.... अरेरे! मला अशा वेळी खूप वाईट वाटते. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, दात किडण्याची मक्तेदारी फक्त मुलांवर सोपवून चालणार नाही. सर्वच वयोगटाच्या लोकांमध्ये दात किडण्याचे प्रमाण भरपूर आहे. विश्वास बसत नसेल, तर आपल्या घरातील व्यक्तींचे आणि शेजाऱ्यांचे दात पाहा. दात का किडतात, त्याची आता माहिती घेऊ. 


दाताला कीड लागली की, दात दुखायला लागतात. दातांना कीड लागते त्यात थोडा भाग आनुवंशिकतेचा, काही पाण्यामध्ये फ्लोराईड कमी असण्याचा आणि बराच भाग दातांची काळजी न घेण्याचा असतो. दातांची निगा नीट न राखल्यास दातांच्या फटींमध्ये अन्नकण, साखर इ. साठून सूक्ष्मजंतू वाढतात. त्यांच्यामुळे हळूहळू दातांचे टणक कवच ठिसूळ होते व झीज होऊन दाताला खड्डे पडतात. हे खड्डे दाताच्या आतल्या पोकळीपर्यंत खोलवर पोहोचले, तर पोकळी उघडी पडते. दाताच्या किडीवर उपचार म्हणजे दंतवैद्याचा सल्ला. कारण दाताची कीड कोणत्या अवस्थेत आहे, त्या अनुषंगाने तिच्यावर सुयोग्य उपचार फक्त दंतवैद्यच करू शकतो.


दात किडू नयेत यासाठी काही पथ्य पाळायला हवीत. साखर व साखरेचे पदार्थ (मिठाई वगैरे...) कमी खावेत. चॉकलेट, कॅडवरीसारखे गोड आणि दाताला चिकटणारे पदार्थ खाऊ नयेत, जेवल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर, चुळा भराव्या. दिवसातून दोन वेळा (उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी) दात टूथपेस्ट आणि ब्रश किंवा कडूनिंबाच्या काडीने घासावे. काही पालकांना वाटते की, लहान मुलांचे दुधाचे दात तर काय पडणारच आहेत. मग चॉकलेट खाऊन ते किडले तरी काय? पण सावधान... कारण दुधाचे दात किडले, तर त्यांच्या खालून उगवणारे कायमचे दातही किडतात आणि हे दात पडले तर मात्र तोंडाचे बोळकेच होते! तेव्हा दात नीट सांभाळायला हवे, तरच आपण निरोगी राहू.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

  

गाथा बलिदानाची

 *🌹🌹🌹शत्-शत् नमन🌹🌹🌹*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची🇮🇳🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*२१ जुलाई/पुण्य-तिथि,एक विस्मृत विप्लवी : बटुकेश्वर दत्त ।*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

यह इतिहास की विडम्बना है कि अनेक क्रान्तिकारी स्वतन्त्रता के युद्ध में सर्वस्व अर्पण करने के बाद भी अज्ञात या अल्पज्ञात ही रहे। ऐसे ही एक क्रान्तिवीर बटुकेश्वर दत्त का जन्म १८ नवम्बर १९१० को ग्राम ओएरी खंडा घोष (जिला बर्दमान, बंगाल) में श्री गोष्ठा बिहारी दत्त के घर में हुआ था। वे एक दवा कंपनी में काम करते थे, जो बाद में कानपुर (उ.प्र.) में रहने लगे। इसलिए बटुकेश्वर दत्त की प्रारम्भिक शिक्षा पी.पी.एन हाईस्कूल कानपुर में हुई। उन्होंने अपने मित्रों के साथ‘कानपुर जिमनास्टिक क्लब’ की स्थापना भी की थी।


उन दिनों कानपुर क्रान्तिकारियों का एक बड़ा केन्द्र था। बटुकेश्वर अपने मित्रों में मोहन के नाम से प्रसिद्ध थे। भगतसिंह के साथ आठ अप्रैल, १९२९ को दिल्ली के संसद भवन में बम फेंकने के बाद वे चाहते, तो भाग सकते थे, पर क्रान्तिकारी दल के निर्णय के अनुसार दोनों ने गिरफ्तारी दे दी।


छह जून, १९२९ को न्यायालय में दोनों ने एक लिखित वक्तव्य दिया, जिसमें क्रान्तिकारी दल की कल्पना, इन्कलाब जिन्दाबाद का अर्थ तथा देश की व्यवस्था में आमूल परिवर्तन की बातें कही गयीं थीं। २५ जुलाई १९२९ को उन्होेंने गृहमन्त्री के नाम एक पत्र भी लिखा,जिसमें जेल में राजनीतिक बन्दियों पर हो रहे अत्याचार एवं उनके अधिकारों की चर्चा की गयी है। उन्होंने अन्य साथियों के साथ इस विषय पर ११४ दिन तक भूख हड़ताल भी की।


भगतसिंह, सुखदेव और राजगुरू को फाँसी घोषित हुई, जबकि दत्त को आजीवन कारावास। इस पर भगतसिंह ने उन्हें एक पत्र लिखा। उसमें कहा गया है कि हम तो मर जायेंगे, पर तुम जीवित रहकर दिखा दो कि क्रान्तिकारी जैसे हँस कर फाँसी चढ़ता है, वैसे ही वह अपने आदर्शों के लिए हँसते हुए जेल की अन्धकारपूर्ण कोठरियों में यातनाएँ और उत्पीड़न भी सह सकता है।


२३ मार्च १९३१ को लाहौर जेल में भगतसिंह आदि को फाँसी हुई और बटुकेश्वर दत्त को पहले अंदमान और फिर १९३८ में पटना जेल में रखा गया। जेल में वे क्षय रोग तथा पेट दर्द से पीड़ित हो गये। आठ सितम्बर, १९३८ को वे कुछ शर्तों के साथ रिहा किये गये, पर १९४२ में फिर भारत छोड़ो आंदोलन में जेल चले गये। १९४५ में वे पटना में अपने बड़े भाई के घर में नजरबंद किये गये। 


१९४७ में हजारीबाग जेल से मुक्त होकर वे पटना में ही रहने लगे। इतनी लम्बी जेल के बाद भी उनका उत्साह जीवित था। ३६ वर्ष की अवस्था में उन्होंने आसनसोल में सादगीपूर्ण रीति से अंजलि दत्त से विवाह किया। भगतसिंह की माँ विद्यावती जी उन्हें अपना दूसरा बेटा मानती थीं।


पटना में बटुकेश्वर दत्त को बहुत आर्थिक कठिनाई झेलनी पड़ी। उन्होंने एक सिगरेट कंपनी के एजेंट की तथा पत्नी ने एक विद्यालय में माञ १०० रु. मासिक पर नौकरी की।१९६३ में कुछ समय के लिए वे विधान परिषद में मनोनीत किये गये, पर वहाँ उन्हें काफी विरोध सहना पड़ा। उनका मन इस राजनीति के अनुकूल नहीं बना था। 


१९६४ में स्वास्थ्य बहुत बिगड़ने पर पहले पटना के सरकारी अस्पताल और फिर दिल्ली के सफदरजंग अस्पताल में उनका इलाज हुआ। उन्होंने बड़ी वेदना से कहा कि जिस दिल्ली की संसद में मैंने बम फेंका था, वहाँ मुझे स्ट्रेचर पर आना पड़ेगा, यह कभी सोचा भी नहीं था।


बीमारी में माँ विद्यावती जी उनकी सेवा में लगी रहीं। राष्ट्रपति, प्रधानमन्त्री और उनके कई पुराने साथी उनसे मिले। २० जुलाई,१९६५ की रात में दो बजे इस क्रान्तिवीर ने शरीर छोड़ दिया। उनका अन्तिम संस्कार वहीं हुआ,जहाँ भगतसिंह,राजगुरु और सुखदेव के शव जलाये गये थे। अपने मित्रों और माता विद्यावती के साथ बटुकेश्वर दत्त आज भी वहाँ शान्त सो रहे हैं।


--------------------------------------

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *द्वादशी*,ज्येष्ठा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

बुधवार, २१ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                        *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


हस्ती हस्त सहस्त्रेण 

               शत हस्तेन वाजिनः,

श्रृड्गिणी दश हस्तेन 

               देशत्यागेन दुर्जनः।।


*भावार्थः- हाथी से हजार गज की दूरी रखें, घोड़े से सौ की, सींग वाले जानवर से दस की.... परंतु जहाँ दुष्ट स्वभाव वाले दुर्जन रहते हो, उस स्थान अथवा क्षेत्र को ही पूर्णतः एवं अतिशीघ्र त्याग देना ही उचित है।*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मंगळवार, २० जुलै, २०२१

घोळाणा फुटल्यावर काय करावे?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *घोळाणा फुटल्यास काय करावे ?* 

**********************************

उन्हातून खेळून आल्यावर काही वेळा लहान मुलांच्या नाकातून रक्त येते. हा प्रकार तुम्हीही केव्हातरी अनुभवला असेल वा पाहिला असेल. यालाच घोळाणा फुटणे असे म्हणतात. • नाकाच्या पुढच्या भागात नाजूक केशवाहिन्या असतात. या ठिकाणी वेगवेगळ्या अशा रक्तवाहिन्यांतून रक्त येऊन या भागात अधिक रक्तपुरवठा होतो. या केशवाहिन्या उष्णतेने प्रसरण पावतात, प्रसरण पावून फुटतात व रक्त येते. या भागातच श्वसनावाटे घेतली जाणारी उष्ण हवा प्रथम संपर्कात येते. त्यामुळे या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांवर उपरोक्त परिणाम होतो.


नाकाला इजा, दुखापत होणे, सतत नाक कोरण्याची सवय, खूप जोरात नाक शिंकरणे अशा साध्या कारणांबरोबर बन्याच गंभीर कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातील वाढ, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयाच्या झडपेचे आजार, रक्ताचा कर्करोग, अॅस्पीरीन, क्वीनीन यांसारखी औषधे व रक्तश्राव होण्याची प्रवृत्ती यांचा समावेश होतो. अचानक कोणाचा घोळाणा फुटल्यास काय करावे? - ते आता आपण पाहू. मानेखाली उशी द्यावी आणि झोपवून ठेवावे, श्वासावर नियंत्रण करत नाकानेच श्वास घ्यायला सांगावा. तरीही रक्त थांबत नसेल तर रक्तस्राव होत असताना नाकाचा पुढचा भाग दोन बोटात घट्ट धरून ठेवावा. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब येऊन रक्तस्राव थांबवता येतो. तसेच ज्या नाकपुडीतून रक्त येत असेल, त्यामध्ये कापसाचा किंवा गॉझचा कपडा असल्यास तो नाकपुडीत पुढच्या भागात घालून थोडा वेळ दाबून धरावा व तरीही रक्त येत असेल तर लगेच डॉक्टरांकडे न्यावे. वारंवार असा त्रास होत असेल, तर योग्य निदान करून घेणे व त्यानुसार उपचार करणे हेच योग्य ठरेल. उच्च रक्तवावामुळे असे होत असल्यास रक्तदाब कमी करणारी औषधे व्यावीत. नाकात काही वाढ असेल, लहान मुलांनी नाकात काही घालून घेतले असेल, तर ते काढून टाकावे इत्यादी.


नाकातून रक्त येणे वा घोळणा फुटणे १९ टक्के वेळा एक सौम्य स्वरूपाचे लक्षण असले, तरी क्वचित प्रसंगी (वयोमानानुसार) गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे रक्तस्राव होताना घाबरून न जाता प्रथमोपचार करणे व नंतर तपासण्या करून जर काही आजार असेल, तर त्यावर उपचार करणे हेच श्रेयस्कर ठरेल. काही गंभीर आजार नसल्यास व बारंबार घोळाणा फुटण्याची सवय असल्यास आयुर्वेदातील अडुळसा व गुड़ या वनस्पतींचा चांगला उपयोग होतो. ताजी अडुळशाची पाने मिळाल्यास त्यांचा वाफवून रस काढून त्यात साखर घालून सकाळ-संध्याकाळ एक छोटा कप भरून प्यावा.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

  

सोमवार, १९ जुलै, २०२१

गुलीयोल्मो मार्कोनी नोबेल पुरस्कार विजेते

 *📬📬गुलियेल्मो मार्कोनी📬📬*

📧📧📧📧📧📧📧📧📧📧

*भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता*

⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡

*स्मृतिदिन - २० जुलै १९३७*


गुलियेल्मो मार्कोनीचा जन्म इटलीतील 'बोलोन्या' शहरात २५ एप्रिल १८७४ रोजी झाला. मार्कोनीच्या जन्माच्या आधी १८६८ मध्ये मॅक्‍सेल या शास्त्रज्ञाने विजेचा प्रवाह वातावरणात आहे,अशी कल्पना मांडली होती. या वीजप्रवाहाचे गुणधर्मही त्याने वर्णिले होते. पण बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

मार्कोनीला लहानपणापासूनच विजेच्या प्रवाहाबाबत कुतूहल होते. हाइनरिक हर्ट्‌‌‌झचे लेखही त्याने वाचले होते.१८९५ मध्ये मार्कोनी हर्ट्‌‌झच्या संशोधनावर आपल्या वडिलांच्या बोलोन्यातील मोठ्या वाड्यात काम करू लागला.तो आपला पहिला बिनतारी संदेश एक मैल लांब पाठवू शकण्यात यशस्वी झाला.२ जून १८९४ मध्ये इंग्लंडमधील मुख्य पोस्ट ऑफिसच्या छपरावरून मार्कोनीचे पहिले प्रात्यक्षिक करण्यात आले.सरकारी अधिकारी, पोस्टातील मान्यवर त्या वेळी उपस्थित होते.

सॅल्सबरीमध्ये दुसर्‍या प्रात्यक्षिकाला वायुदल व सेनादलातील बरेच अधिकारी आले.आता दोन मैलांवरून बिनतारी संदेश दहा मैलांपर्यंत पोचू शकत होता. हळूहळू मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचे जाळे सर्वत्र पसरत गेले. १९१४ मध्ये पहिले जागतिक युद्ध पुकारले गेले. मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचा इटालियन नौदल, वायुदलास फार उपयोग झाला.जगातील सर्वांत मोठे वायरलेस स्टेशन मार्कोनीने उभारले.मार्कोनीला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक व इतर अनेक पारितोषिके मिळाली.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन ):गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *एकादशी*,अनुराधा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

मंगलवार, २० जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *"संबंध कभी भी सबसे जीतकर नहीं निभाए जा सकते। संबंधों की प्रसन्नता के लिए झुकना होता है, सहना होता है, दूसरों को जिताना होता है और स्वयं हारना होता है। सच्चे सम्बन्ध ही वास्तविक पूँजी होते है, यही विषम परिस्थितियों में सहायक भी होते हैं।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*विठू माऊली तू*

*माऊली जगाची*

*माऊलीत मूर्ती विठ्ठलाची*


*आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.......*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

कान का खाजतात


══════════════════════

    संकलन ,संकलन गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *कान का खाजतात ?* 📕


सार्वजनिक ठिकाणी कानात बोट घालून कान गदागदा हलवणारे किंवा कानात काड्या घालून तल्लीन कान कोरणारे महाभाग तुम्ही पाहिले असतील. कान कोरडा पडला २ थोडीफार खाज येऊ शकते. ही खाज आपोआपच कमी होते; परंतु कानाच्या रोगांमध्ये मात्र खाज सारखीच येत राहते व उपचार केल्याशिवाय कमी होत नाही. पावसाळ्यात, दमट वातावरणात किंवा पोहणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्णपथात (Auditory canal) बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. अॅस्परजीलस, नायगर व कँडीडा अल्बीकन्स या बुरशींमुळे होणाऱ्या संसर्गात कान खाजतात व बहिरेपणाही येतो. कानाची तपासणी केल्यास कर्णपथात काळपट वा विटकरी काळपट रंगाची घाण जमा झालेली दिसते. ओल्या वर्तमानपत्राच्या बोळ्यासारखा रंग त्या घाणीला येतो.


कानातील घाण वारंवार काढून टाकणे, पुसून घेणे, सॅलीसिलिक अॅसिड कर्णपथात लावणे, निस्टॅटीनसारखे बुरशीनाशक वापरणे अशा विविध उपायांनी हा रोग पूर्णपणे आटोक्यात येतो. कानावर अॅलर्जीमुळे किंवा जंतूसंसर्गामुळे फोड आले, तरीही कान सुरुवातीच्या काळात अथवा फोड फुटून खपली येण्याच्या काळात खाजतात. यावर अॅलर्जी व जंतुसंसर्गावरील उपचार करावे लागतात.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *नवमी*,स्वाति नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

रविवार, १८ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                       *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

       *"कई बार हम व्यक्तिगत मधुर सम्बन्धों में व्यर्थ वाद विवाद द्वारा अपने तर्क वितर्क से तात्कालिक विजय तो अवश्य प्राप्त कर लेते हैं, किन्तु बहुमूल्य रिश्तों एवं प्रेम में खटास भी उत्पन्न कर लेते हैं।*

     *अतः अधिक बोलते समय सावधानी रखें, क्योंकि तात्कालिक विजय से अधिक, स्थायी सम्बन्ध महत्वपूर्ण होते हैं।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नेल्सन मंडेला यांचा जन्मदिवस

 ********************************

*१८ जुलै - दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष नेल्सन मंडेला यांचा जन्मदिन*

********************************


    *जन्म - १८ जुलै १९१८*

    *मृत्यू - ५ डिसेंबर २०१३*


 गांधीजींचा दक्षिण आफ्रिकेतील नागरी हक्कांचा लढा २० वर्षे चालू होता.तो १९१४ मध्ये संपला.त्यानंतर चार वर्षांनी मंडेला यांचा जन्म झाला.पीटरमारित्झबर्ग येथे महात्मा गांधींना ते कृष्णवर्णीय असल्याने रेल्वेतून फेकण्यात आले,त्या घटनेचा मंडेला यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता.मंडेला यांनी वर्णद्वेष विरोधी चळवळीत प्रेरणास्थान म्हणून नेहमी गांधीजींना समोर ठेवले होते. २७ वर्षे ते वर्णविरोधी लढय़ासाठी रॉबेन बेटांवर तुरुंगात होते. रिव्होनिया येथील खटल्यात त्यांना पन्नास वर्षांपूर्वी इतरांसमवेत दोषी ठरवण्यात आले होते. १९९९ मध्ये अध्यक्षपदाची एक कारकीर्द पूर्ण करून ते पायउतार झाले. 


महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवट उलथवून लावणारे शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले नेते व दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी नागरी हक्कांसाठी दिलेला लढा हा मार्टिन ल्यूथर किंग व अब्राहम लिंकन यांच्या तोडीचा होता. या लढ्यात मंडेला यांनी एवढा त्याग केला होता की संयुक्त राष्ट्र्संघानेही रोबेन बेटाला जागतिक वारशाचा दर्जा दिला आहे.जेथे मंडेलांना डांबले होते तेथे आजही टेबलवर लोखंडाचे एक ताट व कप ठेवलेला आढळतो.जगभरातील पर्यटक येथे गर्दी करतात. 


‘लाँग वॉक टू फ्रीडम’ या आत्मचरित्रात मंडेला म्हणतात, ‘कोठडी तीन पावलांचीच होती. झोपायचे म्हटले तर डोके आणि पाय भिंतीला लागत.१९९० मध्ये मंडेला यांना भारतरत्न देण्यात आले होते.मंडेला यांना शांततेचा नोबेल पुरस्कार ही मिळाला होता. 


२००० मध्ये त्यांनी टाइम नियतकालिकासाठी लेख लिहिला होता, त्यात त्यांनी गांधीजींना भारताच्या अहिंसक लढय़ाचे पिता म्हटले होते व गांधीजींच्या लढय़ाची मुळे आफ्रिकेत होती,असेही म्हटले होते.ते एके ठिकाणी लिहितात की,गांधीजींचा जन्म भारतात झाला पण आम्ही त्यांना दत्तक घेतले.ते भारतीय व दक्षिण आफ्रिकी नागरिक होते. 


दोन्ही देशांनी त्यांच्या बौद्धिक व नैतिक घडणीत मोठा वाटा उचलला होता.त्यांनी अनेक देशांतील वसाहतवादी राजवटीविरोधातील लढय़ांना आकार दिला.नेल्सन मंडेला वकील होते व बॉक्सरही होते. 


नेल्सन मंडेला यांचे ५ डिसेंबर २०१३ रोजी निधन झाले. त्यांना आदरांजली !

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

*******************************

संकलन, गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

गाथा बलिदानाची

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿➿➿➿                                        

   

    *साहित्यरत्न लोकशाहीर*   

          *अण्णाभाऊ साठे*


     *जन्म :  १ ऑगस्ट, १९२०*

(वाटेगाव,ता.वाळवा,जि. सांगली) 

        *मृत्यू :  १८ जुलै, १९६९*

                ( गोरेगाव, मुंबई )


जन्म नाव -) तुकाराम भाऊराव साठे

टोपणनाव -) अण्णाभाऊ साठे

शिक्षण -) अशिक्षित

राष्ट्रीयत्व -) भारतीय 

कार्यक्षेत्र -) लेखक, साहित्यिक

भाषा -) मराठी

साहित्य प्रकार -) शाहिर,कथा,कादंबरीकार

चळवळ -) संयुक्त महाराष्ट्र चळवळ

प्रसिद्ध साहित्यकृती -) फकिरा

प्रभाव -) बाबासाहेब आंबेडकर, 

            कार्ल मार्क्स

वडील -) भाऊराव साठे

आई -)  वालुबाई साठे

पत्नी -) कोंडाबाई साठे,

           जयवंता साठे

अपत्ये -) मधुकर,शांता आणि शकुंतला


            तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक,लोककवी आणि लेखक होते.साठे एका अस्पृश्य मांग समाजामध्ये जन्मलेले एक दलित व्यक्ती होते, त्यांची उपज आणि ओळख त्यांचे लेखन आणि राजकीय कृतीशीलतेचे केंद्रबिंदू होते.

       कथा,कादंबरी,लोकनाट्य,नाटक,पटकथा,लावणी,पोवाडे,प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. ब्रिटिशराज्यकर्त्यांनी ‘गुन्हेगार’ म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे,तर आईचे नाव वालबाई होते.त्यांचे मूळ नाव तुकाराम.जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा,जि.सांगली).त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले.१९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे,मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी,अशी मिळतील ती कामे त्यांनी केली.मुंबईत कामगारांचे कष्टमय,दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले.त्यांचे संप,मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला.१९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले.

        मुंबईत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली.पक्षाचे कामही ते करीत होतेच;तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर,पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले.तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले.पुढे १९४२ च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकडवॉरंट काढले.पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले.मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले.त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला.त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

         संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाटये आदींचा समावेश होता. ‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला;  त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ?  ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.

           अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा-कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी (१९६०), चिरानगरची भुतं (१९७८), कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह; त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा (१९४५) हीत्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर ३४ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांत फकिरा (१९५९, आवृ.१६– १९९५), वारणेचा वाघ (१९६८), चिखलातीलकमळ, रानगंगा, माकडीचा माळ (१९६३), वैजयंता ह्यांसारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकिरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे. सत्प्रवृत्तीचा, माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्यसूत्र होय. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले : वैजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता ), टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी आवडी ),डोंगरची मैना (१९६९, कादंबरी माकडीचा माळ ), मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी चिखलातील कमळ ), वारणेचा वाघ (१९७०, कादंबरीवारणेचा वाघ ), अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी अलगूज ), फकिरा (कादंबरी फकिरा ). या शिवायव इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन,सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.

         उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले, दलित आणि श्रमिक यांच्या समृद्घीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. ‘जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥’ हे त्यांचे गीतखूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत ‘माझी मैना गावावर राहिली’ आणि ‘मुंबईची लावणी’ या अजोड आणि अविस्मरणीय आहेत.

          अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती. ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे’,असे ते म्हणत; आणि हाच त्यांच्या लेखनाचा प्रेरणा स्रोत होता.मानवी जीवनातील संघर्ष,नाटय,दुःख,दारिद्र्य त्यांच्या साहित्यातून प्रकट होते.त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून त्यांनी उभ्या केलेल्या माणसांत जबरदस्त जीवनेच्छा दिसते.त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माणझाली.त्यात बाबूराव बागूल,नामदेव ढसाळ,लक्ष्मण माने,यशवंत मनोहर,दया पवार,केशव मेश्राम,शरणकुमार लिंबाळे आदींचा अंतर्भाव होतो.

        अण्णाभाऊंची निरीक्षणशक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्यांच्या लेखन शैलीला मराठमोळा,रांगडा पण लोभस घाट आहे.नाट्यमयता हाही त्यांच्यालेखनशैलीचा एक खास गुण.ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले, त्यांतील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवतो.लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखनावर त्यांनी जीव जडवला होता; त्यांनी ते विपुल केले.

         रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली रशियाला गेले. तेथील अनुभवांवर आधारित माझा रशियाचाप्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.

          पुढे पुढे मात्र दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला प्रकर्षाने आले मराठी साहित्यातील प्रतिष्ठितांकडून त्यांची उपेक्षा झाली. विपन्नावस्थेत गोरेगाव (मुंबई) येथे त्यांचे निधन झाले.


महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध प्रसिद्घ केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कथा लेखक गजानन गोपेवाड

 एक राजाला चार राण्या होत्या.


पहिली राणी इतकी सुंदर होती, कि तो तिला प्रेमाने बघतच रहायचा.


❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!



❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा .



❕पण चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!



❕राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला,


 "मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?"



❕राणी म्हणाली "नाही, मी तुम्हाला इथेच सोडून देणार आहे."



❕राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली,


 "मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईन.  त्यापुढे नाही.



❕राजाला अपार दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, 


"तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ?



❕तिसरी राणी म्हणाली, "नाही.  तुम्ही गेल्याबरोबर मी दुसऱ्या एका बरोबर जाणार आहे," 



❕आता मात्र राजाच्या दु:खाला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे पूर्ण जीवन घालवले! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ??



❕माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकट वेळ, पैसा, आयुष्य खर्च केले.



❕तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हते? तिच्या अंगावर दागिने नव्हते. तिला अंगभर कपडे देखील नव्हते की

मूठभर मांस नव्हते.  



❕ती म्हणाली, "तुम्ही जाल तिकडे मी येईन.  स्वर्गात असो की नरकात ..  कोणत्याही प्रकारचा जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हास वचन आहे."



❕राजा थक्क  होऊन समोर पहात राहिला, विचार करू लागला की, जिला मी प्रेम सोडा, साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, 

पूर्ण आयुष्यात जिची कधी एक क्षणभर देखील काळजी केली नाही, ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे?


 राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्याग केला.



❕कोण होता तो राजा? कोण होत्या त्या तीन राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला..?


❕त्या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही, पण तरीही राजासाठी एवढा त्याग का केला?



❕तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः आपणच आहोत.


🔸आपली पहिली राणी, जी आपल्याला जागेवरच सोडते ते म्हणजे आपले *शरीर*! ज्याला आपण आयुष्यभर बघत रहातो.


🔸आपली दुसरी राणी स्मशानापर्यंतच आपल्याला सोडण्यास येते, ती म्हणजे आपली मुले, आप्तेष्ट, मित्र व  *समाज.*


🔸आपली तिसरी राणी, जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते ती म्हणजे, *धन-पैसा* . आपल्या मृत्युनंतर  लगेच ती दुसऱ्याची होते.


🔸 आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे *पुण्यकर्म,माणुसकी धर्म* ! जे आपण सदभावनेने, निःस्वार्थीपणे, आणि विना अहंकाराने करावे, पण ते न करता,  जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ देत नसतो.  तरीपण जन्मोजन्मी आपल्याबरोबर येतच असते...!!!!

लेखन, गजानन गोपेवाड 




 *एक चांगला विचार....🙏🏻🙏🏻.*

प्रभात दर्शन

 🌳⛳ *सुप्रभात🌞वन्दे मातरम्*⛳🌳

🦋🦚🌹🌻🦢🛕🦢🌻🌹🦚🦋

अषाढ़ मास,शुक्ल पक्ष, *दशमी*,विशाखा नक्षत्र,सूर्य दक्षिणायन,ग्रीष्म ऋतु,युगाब्ध ५१२३,विक्रम संवत-२०७८, 

सोमवार, १९ जुलै २०२१.

🕉~~~~~~~~~~~~~~~~~~~🕉

                         *प्रभात दर्शन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

      *धन से कहीं अधिक मूल्यवान समय है। हम और अधिक धन कमा सकते हैं, किन्तु हम समय को और अधिक बढ़ा नहीं सकते।*

     *स्मरण रहे कि गया हुआ धन वापिस आ सकता है, किन्तु गया हुआ समय कभी वापिस नही आता।"*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🚩🐅आपका दिन मंगलमय हो🐅🚩*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गाथा बलिदानाची मंगल पांडे

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची🇮🇳🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

              *मंगल पाण्डेय*

            Mangal pandey 

जन्म -)     *१९  जुलाई १८२७*

              या ३० जनवरी १८३१

              नगवा,बलिया,भारत

(मंगल पांडेजी के जन्मदिन पर संभ्रम है.)

मृत्यु-)      *०८ अप्रैल १८५७*

                 बैरकपुर,भारत

व्यवसाय

बैरकपुर छावनी में बंगाल नेटिव इन्फैण्ट्री की ३४ वीं रेजीमेण्ट में सिपाही प्रसिद्धि कारण

भारतीय स्वतन्त्रता सेनानी

धार्मिक मान्यता हिन्दू


मंगल पाण्डेय एक भारतीय स्वतंत्रता सेनानी थे जिन्होंने १८५७ में भारत के प्रथम स्वाधीनता संग्राम में महत्वपूर्ण भूमिका निभाई। वो ईस्ट इंडिया कंपनी की ३४ वीं बंगाल इंफेन्ट्री के सिपाही थे। तत्कालीन अंग्रेजी शासन ने उन्हें बागी करार दिया जबकि आम हिंदुस्तानी उन्हें आजादी की लड़ाई के नायक के रूप में सम्मान देता है। भारत के स्वाधीनता संग्राम में उनकी महत्वपूर्ण भूमिका को लेकर भारत सरकार द्वारा उनके सम्मान में सन् १९८४ में एक डाक टिकट जारी किया गया।


मंगल पाण्डेय ने इसी एन्फील्ड राइफल का प्रयोग २९ मार्च १८५७ को बैरकपुर छावनी में किया था

जीवन परिचय संपादित करें

मंगल पाण्डेय का जन्म भारत में उत्तर प्रदेश के बलिया जिले के नगवा नामक गांव में *३० जनवरी १८३१* को एक "ब्राह्मण" परिवार में हुआ था।

हांलाकि कुछ इतिहासकार इनका जन्म-स्थान फैज़ाबाद के गांव सुरहुरपुर को मानते हैं।

इनके पिता का नाम सुदिष्ट पांडेय तथा माता का नाम जानकी देवी था। मंगल पाण्डेय, गिरिवर पांडेय एवं ललित पांडेय तीन भाई थे। छोटे भाइयों की संतानों में महावीर पांडेय एवं महादेव पांडेय हुए। जिसमें महावीर पांडेय के एक मात्र पुत्र बरमेश्वर पांडेय ने १९४२ के भारत छोड़ो आंदोलन में बलिया को आजाद करा कर स्वयं कप्तान बन गए थे। मंगल पाण्डेय ब्रह्मचारी "ब्राह्मण" होने के बाद भी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी की सेना में शामिल हो गए। इस प्रकार पूरा खानदान राष्ट्र की सेवा में लगा रहा।


१८५७ का विद्रोह संपादित करें

विद्रोह का प्रारम्भ एक बंदूक की वजह से हुआ। सिपाहियों को पैटऱ्न १८५३ एनफ़ील्ड बंदूक दी गयीं जो कि ०.५७७ कैलीबर की बंदूक थी तथा पुरानी और कई दशकों से उपयोग में लायी जा रही ब्राउन बैस के मुकाबले में शक्तिशाली और अचूक थी। नयी बंदूक में गोली दागने की आधुनिक प्रणाली (प्रिकशन कैप) का प्रयोग किया गया था परन्तु बंदूक में गोली भरने की प्रक्रिया पुरानी थी। नयी एनफ़ील्ड बंदूक भरने के लिये कारतूस को दांतों से काट कर खोलना पड़ता था और उसमे भरे हुए बारुद को बंदूक की नली में भर कर कारतूस को डालना पड़ता था। कारतूस का बाहरी आवरण में चर्बी होती थी जो कि उसे पानी की सीलन से बचाती थी। सिपाहियों के बीच अफ़वाह फ़ैल चुकी थी कि कारतूस में लगी हुई चर्बी सुअर और गाय के मांस से बनायी जाती है।


२९ मार्च १८५७ को बैरकपुर परेड मैदान कलकत्ता के निकट मंगल पाण्डेय जो नगवा बलिया(उत्तर प्रदेश) के रहने वाले थे रेजीमेण्ट के अफ़सर लेफ़्टीनेण्ट बाग पर हमला कर के उसे घायल कर दिया। जनरल जान हेएरसेये के अनुसार मंगल पाण्डेय किसी प्रकार के धार्मिक पागलपन में थे जनरल ने जमादार ईश्वरी प्रसाद ने मंगल पांडेय को गिरफ़्तार करने का आदेश दिया पर ज़मीदार ने मना कर दिया। सिवाय एक सिपाही शेख पलटु को छोड़ कर सारी रेजीमेण्ट ने मंगल पाण्डेय को गिरफ़्तार करने से मना कर दिया। मंगल पाण्डेय ने अपने साथियों को खुलेआम विद्रोह करने के लिये कहा पर किसी के ना मानने पर उन्होने अपनी बंदूक से अपनी प्राण लेने का प्रयास किया। परन्तु वे इस प्रयास में केवल घायल हुये। ६ अप्रैल १८५७ को मंगल पाण्डेय का कोर्ट मार्शल कर दिया गया और ८ अप्रैल को २६ वर्ष २ माह ९ दिन की अवस्था में फ़ांसी दे दी गयी।


विद्रोह का परिणाम संपादित करें


सन् १८५७ के सैनिक विद्रोह की एक झलक

मंगल पांडे द्वारा लगायी गयी विद्रोह की यह चिंगारी बुझी नहीं। एक महीने बाद ही १० मई सन् १८५७ को मेरठ की छावनी में बगावत हो गयी। यह विप्लव देखते ही देखते पूरे उत्तरी भारत में फैल गया जिससे अंग्रेजों को स्पष्ट संदेश मिल गया कि अब भारत पर राज्य करना उतना आसान नहीं है जितना वे समझ रहे थे। इसके बाद ही हिन्दुस्तान में चौंतीस हजार सात सौ पैंतीस अंग्रेजी कानून यहाँ की जनता पर लागू किये गये ताकि मंगल पाण्डेय सरीखा कोई सैनिक दोबारा भारतीय शासकों के विरुद्ध बगावत न कर सके।

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

जयंत विष्णू नारळिकर

 *🛰️🛰️जयंत विष्णू नारळीकर🛰️🛰️*

🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

*भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक*

🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭🔭

*जन्म - १९ जुलै  १९३८*


नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.

संशोधन

स्थिर स्थिती सिद्धान्त

चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

साहित्यातील भर

विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.

विज्ञानकथा पुस्तके

अंतराळातील भस्मासुर अभयारण्य टाइम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव वामन परत न आला व्हायरस

इतर विज्ञानविषयक पुस्तके

आकाशाशी जडले नाते गणितातील गमतीजमती युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी) नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर) विज्ञान आणि वैज्ञानिक विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप विश्वाची रचना विज्ञानाचे रचयिते सूर्याचा प्रकोप Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge) Seven Wonders Of The Cosmos

आत्मचरित्र

चार नगरांतले माझे विश्व

पुरस्कार

१९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.

२००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.

२०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम.पी.बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१४ साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ.वाय.नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. *"यक्षाची देणगी"* या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)

चरित्र

डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

शनिवार, १७ जुलै, २०२१

एन्टिबायटिक म्हणजे काय?


   संकलन:)  गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📕 *अँटीबायोटीक्स म्हणजे काय ?* 


अँटीबायेटीक्स अर्थात प्रतिजैविकांचे आजकालच्या औषधोपचारांत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोणताही डॉक्टर प्रतिजैविकांचा उपयोग केल्याखेरीज वैद्यक व्यवसाय करूच शकणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे.


अलेक्झांडर फ्लेमिंगने अपघाताने पेनिसिलीनचा शोध लावला व तेव्हापासून आजतागायत अनेक प्रतिजैविके विकसित करण्यात आली आहेत. बुरशीपासून ही प्रतिजैविके मिळतात. काही प्रतिजैविकांचे कृत्रिमरित्या तयार होणारे पर्यायही उपलब्ध झाले आहेत. प्रतिजैविके विविध मार्गांनी जंतूंचा नायनाट करतात. काही वेळा ती जिवाणूंचे पोषण त्याला मिळू देत नाहीत. कधी त्याच्या पेशीतील केंद्रकावर हल्ला चढवतात, तर कधी त्याला हानीकारक ठरणारे पदार्थ निर्माण करतात.


जिवाणूही हुशार असतात. प्रतिजैविक योग्य प्रमाणात दिले नाही वा कमी दिवस दिले, तर जिवाणूंमध्ये त्या प्रतिजैविकाविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होते. ही प्रतिकार शक्ती त्यांच्या पुढील पिढ्यांनाही आपोआप मिळू शकते. त्यामुळे त्या प्रतिजैविकांचा उपयोग त्या जिवाणूला मारण्यासाठी करता येत नाही. असे होऊ नये यासाठी प्रतिजैविके पुरेशा डोसमध्ये निदान ५ दिवस तरी द्यायला हवी. पेनिसिलीन, अँपीसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन, निओमावसीन, सेफलोस्पोरीन अशी प्रतिजैविके आजकाल औषधोपचारांत वापरली जातात. रोगी अत्यवस्थ असेल तर वा पचनसंस्थेतून प्रतिजैविकाचे शोषण होत नसेल तर ही प्रतिजैविके शिरेतून वा स्नायूमध्येही देता येतात. अशावेळी बावडे वा अंतर्जीची विशेष काळजी घ्यावी लागते.


प्रतिजैविके म्हणजे रुग्णांसाठी जणू वरदानच होय. क्षयरोग, कुष्ठरोग यांसारख्या असाध्य समजल्या जाणाऱ्या रोगांपासून कॉलरा, विषमज्वर, घटसर्प, डांग्या खोकला अशा सर्वच रोगांवर प्रतिजैविकांमुळे हुकुमी

उपचार करता येतात.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═════════════

किरणोपचार म्हणजे काय?


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📙 *किरणोपचार म्हणजे काय ?* 


अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसक अस्त्रामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गांपैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात.


क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही हे बघण्यासाठी होतो.


गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यत: शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते.


*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

गाथा बलिदानाची भारतरत्न अरूणा असफ अली

 ➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🇮🇳🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                                                                                                  

📰✍️⛓️🇮🇳👩‍🦰🇮🇳⛓️✍️📰

                  *भारतरत्न*                                                                                                             

         *अरुणा आसफ अली* 


   *जन्म - १६ जुलाई १९०९*

                (हरियाणा)

   *मृत्यु - २९ जुलाई १९९६*                                    पूरा नाम - अरुणा आसफ़ अली

अन्य नाम - अरुणा गांगुली                

पति - आसफ़ अली

कर्म भूमि - भारत

कर्म-क्षेत्र - स्वतंत्रता सेनानी,शिक्षक

भाषा - हिन्दी,अंग्रेज़ी

पुरस्कार-उपाधि -

 'लेनिन शांति पुरस्कार' (१९६४), 'जवाहरलाल नेहरू अंतर्राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार' (१९९१),

 'पद्म विभूषण' (१९९२),

 ‘इंदिरा गांधी पुरस्कार’, 'भारत रत्न' (१९९७)

विशेष योगदान - १९४२ ई. के ‘अंग्रेज़ों भारत छोड़ो’ आंदोलन में विशेष योगदान था।

नागरिकता - भारतीय

अन्य जानकारी - १९९८ में इनके नाम पर एक डाक टिकट जारी किया गया। उनके सम्मान में नई दिल्ली की एक सड़क का नाम 'अरुणा आसफ़ अली मार्ग' रखा गया।

अरुणा आसफ़ अली का नाम भारत के स्वतंत्रता आन्दोलन में विशेष रूप से प्रसिद्ध है। इन्होंने भारत को आज़ादी दिलाने के लिए कई उल्लेखनीय कार्य किये थे। भारत के स्वतंत्रता आंदोलन में अग्रणी भूमिका निभाने वाली क्रांतिकारी, जुझारू नेता श्रीमती अरुणा आसफ़ अली का नाम इतिहास में दर्ज है। अरुणा आसफ़ अली ने सन १९४२ ई. के ‘अंग्रेज़ों भारत छोड़ो’ आंदोलन में महत्त्वपूर्ण योगदान को विस्मृत नहीं किया जा सकता। देश को आज़ाद कराने के लिए अरुणा जी निरंतर वर्षों अंग्रेज़ों से संघर्ष करती रही थीं।

 ♦ *जीवन परिचय*

अरुणा जी का जन्म बंगाली परिवार में १६ जुलाई सन १९०९ ई. को हरियाणा, तत्कालीन पंजाब के 'कालका' नामक स्थान में हुआ था। इनका परिवार जाति से ब्राह्मण था। इनका नाम 'अरुणा गांगुली' था। अरुणा जी ने स्कूली शिक्षा नैनीताल में प्राप्त की थी। नैनीताल में इनके पिता का होटल था। यह बहुत ही कुशाग्र बुद्धि और पढ़ाई लिखाई में बहुत चतुर थीं। बाल्यकाल से ही कक्षा में सर्वोच्च स्थान पाती थीं। बचपन में ही उन्होंने अपनी बुद्धिमत्ता और चतुरता की धाक जमा दी थी। लाहौर और नैनीताल से पढ़ाई पूरी करने के बाद वह शिक्षिका बन गई और कोलकाता के 'गोखले मेमोरियल कॉलेज' में अध्यापन कार्य करने लगीं।

👫 *विवाह*

अरुणा जी ने १९ वर्ष की आयु में सन १९२८ ई. में अपना अंतर्जातीय प्रेम विवाह दिल्ली के सुविख्यात वकील और कांग्रेस के नेता आसफ़ अली से कर लिया। आसफ़ अली अरुणा से आयु में २० वर्ष बड़े थे। उनके पिता इस अंतर्जातीय विवाह के विरुद्ध थे और मुस्लिम युवक आसफ़ अली के साथ अपनी बेटी की शादी किसी भी क़ीमत पर करने को राज़ी नहीं थे। अरुणा जी स्वतंत्र विचारों की और स्वतः निर्णय लेने वाली युवती थीं। उन्होंने माता-पिता के विरोध के बाद भी स्वेच्छा से शादी कर ली। विवाह के बाद वह पति के पास आ गईं, और पति के साथ प्रेमपूर्वक रहने लगीं। इस विवाह ने अरुणा के जीवन की दिशा बदल दी। वे राजनीति में रुचि लेने लगीं। वे राष्ट्रीय आन्दोलन में सम्मिलित हो गईं।

🔷 *राजनीतिक और सामाजिक जीवन*

परतंत्रता में भारत की दुर्दशा और अंग्रेज़ों के अत्याचार देखकर विवाह के उपरांत श्रीमती अरुणा आसफ़ अली स्वतंत्रता-संग्राम में सक्रिय भाग लेने लगीं। उन्होंने महात्मा गांधी और मौलाना अबुल क़लाम आज़ाद की सभाओं में भाग लेना प्रारम्भ कर दिया। वह इन दोनों नेताओं के संपर्क में आईं और उनके साथ कर्मठता, से राजनीति में भाग लेने लगीं, वे फिर लोकनायक जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया और अच्युत पटवर्द्धन के साथ कांग्रेस 'सोशलिस्ट पार्टी' से संबद्ध हो गईं।


♦ *जेल यात्रा*

अरुणा जी ने १९३०,१९३२ और १९४१ के व्यक्तिगत सत्याग्रह के समय जेल की सज़ाएँ भोगीं। उनके ऊपर जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, अच्युत पटवर्धन जैसे समाजवादियों के विचारों का अधिक प्रभाव पड़ा। इसी कारण १९४२ ई. के ‘भारत छोड़ो आन्दोलन’ में अरुणा जी ने अंग्रेज़ों की जेल में बन्द होने के बदले भूमिगत रहकर अपने अन्य साथियों के साथ आन्दोलन का नेतृत्व करना उचित समझा। गांधी जी आदि नेताओं की गिरफ्तारी के तुरन्त बाद मुम्बई में विरोध सभा आयोजित करके विदेशी सरकार को खुली चुनौती देने वाली वे प्रमुख महिला थीं। फिर गुप्त रूप से उन कांग्रेसजनों का पथ-प्रदर्शन किया, जो जेल से बाहर रह सके थे। मुम्बई, कोलकाता, दिल्ली आदि में घूम-घूमकर, पर पुलिस की पकड़ से बचकर लोगों में नव जागृति लाने का प्रयत्न किया। लेकिन १९४२ से १९४६ तक देश भर में सक्रिय रहकर भी वे पुलिस की पकड़ में नहीं आईं। १९४६ में जब उनके नाम का वारंट रद्द हुआ, तभी वे प्रकट हुईं। सारी सम्पत्ति जब्त करने पर भी उन्होंने आत्मसमर्पण नहीं किया।


🌐 *कांग्रेस कमेटी की निर्वाचित अध्यक्ष*

दो वर्ष के अंतराल के बाद सन् १९४६ ई. में वह भूमिगत जीवन से बाहर आ गईं। भूमिगत जीवन से बाहर आने के बाद सन् १९४७ ई. में श्रीमती अरुणा आसफ़ अली दिल्ली प्रदेश कांग्रेस कमेटी की अध्यक्षा निर्वाचित की गईं। दिल्ली में कांग्रेस संगठन को इन्होंने सुदृढ़ किया।

       कांग्रेस से सोशलिस्ट पार्टी में

सन १९४८ ई. में श्रीमती अरुणा आसफ़ अली 'सोशलिस्ट पार्टी' में सम्मिलित हुयीं और दो साल बाद सन् १९५० ई. में उन्होंने अलग से ‘लेफ्ट स्पेशलिस्ट पार्टी’ बनाई और वे सक्रिय होकर 'मज़दूर-आंदोलन' में जी जान से जुट गईं। अंत में सन १९५५ ई. में इस पार्टी का 'भारतीय कम्यनिस्ट पार्टी' में विलय हो गया।

श्रीमती अरुणा आसफ़ अली भाकपा की केंद्रीय समिति की सदस्या और ‘ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस’ की उपाध्यक्षा बनाई गई थीं। सन् १९५८ ई. में उन्होंने 'मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी' भी छोड़ दी। सन् १९६४ ई. में पं. जवाहरलाल नेहरू के निधन के पश्चात् वे पुनः 'कांग्रेस पार्टी' से जुड़ीं, किंतु अधिक सक्रिय नहीं रहीं।

⭕ *दिल्ली नगर निगम की प्रथम महापौर*

श्रीमती अरुणा आसफ़ अली सन् १९५८ ई. में 'दिल्ली नगर निगम' की प्रथम महापौर चुनी गईं। मेयर बनकर उन्होंने दिल्ली के विकास, सफाई, और स्वास्थ्य आदि के लिए बहुत अच्छा कार्य किया और नगर निगम की कार्य प्रणाली में भी उन्हों ने यथेष्ट सुधार किए।


🌀 *संगठनों से सम्बंध*

श्रीमती अरुणा आसफ़ अली ‘इंडोसोवियत कल्चरल सोसाइटी’, ‘ऑल इंडिया पीस काउंसिल’, तथा ‘नेशनल फैडरेशन ऑफ इंडियन वूमैन’, आदि संस्थाओं के लिए उन्होंने बड़ी लगन, निष्ठा, ईमानदारी और सक्रियता से कार्य किया। दिल्ली से प्रकाशित वामपंथी अंग्रेज़ी दैनिक समाचार पत्र ‘पेट्रियट’ से वे जीवनपर्यंत कर्मठता से जुड़ी रहीं।


🏆 *सम्मान और पुरस्कार*

श्रीमती अरुणा आसफ़ अली को सन् १९६४ में ‘लेनिन शांति पुरस्कार’, सन् १९९१ में 'जवाहरलाल नेहरू अंतर्राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार', १९९२ में 'पद्म विभूषण' और ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ (राष्ट्रीय एकता के लिए) से सम्मानित किया गया था। १९९७ में उन्हें मरणोपरांत भारत के 'सर्वोच्च नागरिक सम्मान' भारत रत्न से सम्मानित किया गया। १९९८ में उन पर एक डाक टिकट जारी किया गया। उनके सम्मान में नई दिल्ली की एक सड़क का नाम उनके नाम पर 'अरुणा आसफ़ अली मार्ग' रखा गया।


👩‍💼 *एक संस्मरण*

अरुणा आसफ़ अली की अपनी विशिष्ट जीवनशैली थी। उम्र के आठवें दशक में भी वह सार्वजनिक परिवहन से सफर करती थीं। कहा जाता है कि एक बार अरुणा जी दिल्ली में यात्रियों से भरी बस में सवार थीं। कोई भी जगह बैठने के लिए ख़ाली न थी। उसी बस में आधुनिक जीवन शैली की एक युवा महिला भी सवार थी। एक व्यक्ति ने युवा महिला के लिए अपनी जगह उसे दे दी और उस युवा महिला ने शिष्टाचार के कारण अपनी सीट अरुणा जी को दे दी। ऐसा करने पर वह व्यक्ति बुरा मान गया और युवा महिला से बोला - 'यह सीट तो मैंने आपके लिए ख़ाली की थी बहन।' इसके उत्तर में अरुणा आसफ़ अली तुरंत बोलीं - 'बेटा! माँ को कभी न भूलना, क्योंकि माँ का अधिकार बहन से पहले होता है।' यह सुनकर वह व्यक्ति बहुत शर्मिंदा हुआ और उसने अरुणा जी से माफ़ी मांगी।


🔘 *निधन*

अरुणा आसफ़ अली वृद्धावस्था में बहुत शांत और गंभीर स्वभाव की हो गई थीं। उनकी आत्मीयता और स्नेह को कभी भुलाया नहीं जा सकता। वास्तव में वे महान् देशभक्त थीं। वयोवृद्ध स्वतंत्रता सेनानी अरुणा आसफ़ अली ८७ वर्ष की आयु में दिनांक २९ जुलाई, सन् १९९६ को इस संसार को छोड़कर सदैव के लिए दूर-बहुत दूर चली गईं। उनकी सुकीर्ति आज भी अमर है।

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

➖➖➖➖➖➖➖➖➖

संकलन-)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

एमिल हरमन फिशर रसायन शास्त्रज्ञ

 *⚗️⚗️⚗️एमिल हरमन फिशर⚗️⚗️⚗️*


*🧪🧪🧪रसायनशास्त्रज्ञ🧪🧪🧪*

⚗️🧪⚗️🧪⚗️🧪⚗️🧪⚗️🧪⚗️

*स्मृतिदिन - १५ जुलै १९१९*


जर्मन रसायनशास्त्रज्ञ कृत्रिम साखर आणि प्युरीनवर काम करण्यासाठी प्रख्यात


हर्मन एमिल लुई फिशर 

     ०९ ऑक्टोबर १८५२ 

     १५    जुलै     १९१९

जर्मन रसायनशास्त्रज्ञ (नोबेल पुरस्कार). त्याला फिशर एस्टरिफिकेशन सापडले. विकसित एक लाक्षणिक अर्थाने एसिमेट्रिक कार्बन अणू रेखांकन . त्याने आपले पहिले नाव कधीच वापरलेले नाही, आणि आयुष्यभर ते एमिल फिशर म्हणून ओळखले जात असे.


त्यांनी शॉनबर्ग विद्यापीठातील बॉन आणि केकल विद्यापीठात खरेदीदारांसह अभ्यास केला. 


१९०२ मध्ये त्यांनी रसायनशास्त्र आणि अनेक saccharides, अशा purines आणि polypeptides वर नोबेल पुरस्कार मिळवले. saccharides आणि purines वर कृत्रिम प्रयोग केले. पहिल्या जागतिक युद्धामध्ये,त्याने दोन पुत्र गमावले,परंतु ते संसाधन आणि अन्नाची समस्या सोडविण्यात सक्रिय होते आणि युद्धानंतरच्या पुनर्रचनेत प्रयत्न केले.बर्लिनमधील त्यांच्या प्रयोगशाळेत त्यांनी अभ्यास केला. त्यांचा मोठा मुलगा हरमन एक अग्रगण्य सेंद्रीय केमिस्ट म्हणून सक्रिय होता.

*🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏*

संकलन -)गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा- यवतमाळ ४४५२०६

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...