बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

आदरणीय विद्या नाईक विभागीय समन्वयक कोकण यांच्या कविता

 [9/16, 5:31 PM] विद्या नाईक वसई ( पालघर): जुन्या वहीची पानं चाळताना

मोरपीस हातात पडतं

मोरपीस गालावर फ़िरताना

आठवणींशी नातं जडतं


या आठवणींत बुडुन जाताना

आजचं नाही उरत भान

क्षण ते परत ना येतील आता

तीच होती सुखाची खाण


आठवणी असतात अनेकांच्या

तुमच्या, माझ्या, सर्वांच्या

प्रत्येकाची असते एकतरी आठवण

दु:खाची अथवा सुखाची साठवण


माझ्याही आहेत अशाच आठवणी

पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या

जीवन झाल्या त्याच आठवणी

सुवर्णरुपी गतकाळाच्या


ह्रुदयात या रुजुनि गेल्या

काही त्यातल्या बुजुनही गेल्या

मनात काहींनी घर केले

पण...

क्षण आता ते उडुन गेले


आठवणी आठवाव्या लागत नसतात

आपोआप त्या आठवत असतात

पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे

सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात

[9/16, 5:33 PM] विद्या नाईक वसई ( पालघर): पाणी या एका शब्दावरून  विविध अर्थनुरूप केलेलं काव्य

'पाणी'शब्द हा असे प्रवाही

वळवू तिकडे वळतो हा

जशी भावना मनात असते

रूप बदलते कसे पहा


नयनामध्ये येते'पाणी'

अश्रू तयाला म्हणती

कधी सुखाचे,दुःखाचे कधी

अशी तयांची महती


चटकदार तो पदार्थ दिसता

तोंडाला या'पाणी'सुटते

खाता खाता ठसका लागून

डोळ्यांतून मग 'पाणी' येते


धनाढ्याघरी लक्ष्मी देवी

म्हणती अविरत 'पाणी'भरते

ताकदीहूनी वित्त खर्चिता

डोक्यावरूनी 'पाणी'जाते


वळणाचे 'पाणी' वळणावरती

म्हण मराठी एक असे

बारा गांवचे 'पाणी' प्याला

चतुराई यातूनी दिसे


लाथ मारूनी'पाणी'काढणे

लक्षण हे तर कर्तृत्वाचे

मेहनतीवर 'पाणी' पडणे

चीज न होणे कष्टाचे


उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो

'पाण्या'त पाहणे गुण खोटा

'पाणी'दार ते नेत्र सांगती

विद्वत्तेचा गुण मोठा


शिवरायांनी कितीक वेळा

शत्रूला त्या 'पाणी'पाजले

नामोहरम करून अपुले

मराठमोळे 'पाणी'दाविले


टपोर मोती दवबिंदूचे

चमचम 'पाणी'पानावरती

क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे

अळवावरचे अलगद 'पाणी'


कळी कोवळी कुणी कुस्करी

काळजाचे'पाणी'होते

ओंजळीतूनी 'पाणी'सुटता

कन्यादान...पुण्य लाभते


मायबाप हे आम्हां घडविती

रक्ताचे ते 'पाणी'करूनी

विनम्र होऊन त्यांच्या ठायी

नकळत दोन्ही जुळती 'पाणि'


आभाळातून पडते 'पाणी'

तुडुंब,दुथडी नद्या वाहती

दुष्काळाचे सावट पडतां

सारे'पाणी..पाणी'करती


अंतीम समयी मुखात 'पाणी'

वेळ जाणवे निघण्याची

पितरांना मग 'पाणी' देऊन

स्मृती जागते आप्तांची


मनामनांतील भावनांचे

'पाण्या'मध्ये मिसळा रंग

प्रतिबिंबीत हे होते जेव्हा

चेहर्या‍वरती उठे तरंग

[9/16, 5:37 PM] विद्या नाईक वसई ( पालघर): एक विनंती आहे...

दूरच जायचे असेल तर...

 जवळच येऊ नको...!

busy आहे सांगुन टाळायचचं असेल तर ...

वेळच देऊ नको...!


एक विनंती आहे...

साथ सोडुन जायचचं असेल तर...

हाथ पुढे करुच नको ...!

मनातुन नंतर उतरवायचचं असेल तर...

मनात आधी भरुच नको...!


एक विनंती आहे....

चौकशी भरे,call,काळजी वाहू,sms यांचा कटांळाच येणैर असेल तर ...

कोणाला नंबर देऊ नको...!

Memory full झालिये सांगून delete च करायचा असेल तर...

नंबर save च करु नको...!


एक विनंती आहे...

मौनर्वत स्वीकारायचं असेल तर...

आधी गोडगोड बोलूच नको...!

Secrets share करायचीच नसतील तर...

मनाचं दार उघडूच नको...!


एक विनंती आहे...

माझ्या काळजी करण्याचा ञासच होणार असेल तर...

अनोळखी होऊनचं वागायचं असेल तर...

माझ्याबद्दल सगंळ जाणून घेऊचं नको...!


एक विनंती आहे...

अर्ध्यावर सोडून जायचचं असेल तर...

आधी डाव मांडूच नको...!

रागावून निघून जायचचं असेल तर...

आधी माझ्याशी भांडूच नको...!

एक विनंती आहे...

सवयीच होईल म्हणून तोडायच असेल तर...

कृपया नातं जोडून नको...!

फाडून फेकून द्यायचं असेल तर...

माझ्या मनाचं पान उलगडूच नको....!!


सौ विद्या नाईक

पालघर विरार

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

सहज सुंदर रचना.
पाणी ही रचना अतिशय सुरेख आहे.

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...