शनिवार, ५ ऑक्टोबर, २०२४

इन्स्टंट नूडल्स सतत खाल्ल्याने पचन बिघडते, ५ दुष्परिणाम; आरोग्य धोक्यात का घालता.....?*

*इन्स्टंट नूडल्स सतत खाल्ल्याने पचन बिघडते, ५ दुष्परिणाम; आरोग्य धोक्यात का घालता.....?*

नूडल्स म्हणजे अनेकांच्या अतिशय आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. अगदी २ मिनीटांत होणारे आणि पोटभरीचे असे हे नूडल्स काही जण नियमित खातात. मोठमोठ्या कंपन्याही त्याची आकर्षक पद्धतीने जाहिरात करतात आणि आपले उत्पादन खरेदी करण्यास ग्राहकांना भरीस पाडतात. मॅगीसारखे नूडल्स तर अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने खातात. यामध्ये चीज, भाज्या, बटर असे घालून याची चव आणखी वाढवली जाते. तर चायनिज पदार्थ आवडणारेही आपल्या आजुबाजूला असंख्य जण असतात आणि हे लोक आवडीने शेजवान नूडल्स किंवा तत्सम वेगवेगळ्या फ्लेवरचे नूडल्स खातात. मात्र हे नूडल्स एकतर मैद्यापासून तयार झालेले असतात आणि त्यामध्ये इतरही हानिकारक घटक असल्याने ते आरोग्यासाठी म्हणावे तितके फायदेशीर नसतात. त्यामुळे नूडल्स खाणे टाळलेले केव्हाही चांगले. 

*पाहूयात नूडल्स खाणे का धोक्याचे असते याविषयी (How Bad are Instant Noodles to Your Health).....*

*१. सोडीयमचे जास्त प्रमाण...*
नूडल्समध्ये सोडीयमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. रक्तदाब वाढला की त्याचा हृदय आणि इतर अवयवांवर परीणाम होतो आणि परीणामी शरीराचे कार्य बिघडते. 

*२. प्रिझर्व्हेटीव्हचे प्रमाण जास्त...*
फळं, भाज्या, दूध, डाळी, धान्य यांसारख्या नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश असायला हवा असे वारंवार सांगण्यात येते. पॅकेट फूड म्हणजेच प्रिझर्वेटीव्ह असणारे पदार्थ शक्य तितके टाळायला हवेत असे सांगितले जात असताना आपण आहारात जास्तीत जास्त पॅकेट फूडचा समावेश करतो. मॅगी किंवा नूडल्स दिर्घ काळ टिकावेत यासाठी त्यामध्येही प्रिझर्वेटीव्ह जास्त प्रमाणात घालण्यात येतात. ते आरोग्यासाठी चांगले नसल्याने शक्यतो टाळायला हवेत.

*३. अनावश्यक फॅटचे प्रमाण जास्त...*
आपल्याला अन्नातून चांगले फॅटस आणि वाईट फॅटस असे २ प्रकारेच फॅटस मिळतात. नूडल्समध्ये वाईट प्रकारच्या फॅटसचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. कोलेस्टेरॉल वाढले तर हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो. 

*४. मेटाबॉलिक समस्या...*
नूडल्समुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, वजन वाढणे, रक्तदाब वाढणे अशा समस्या उद्भवतात. या समस्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने शक्यतो आहारात नूडल्ससारखे पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले. 

*५. पोषक घटकांची कमतरता...*
नूडल्समध्ये शरीराला आवश्यक असणारे विशेष कोणतेच घटक नसतात. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, मात्र यात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स, खनिजे यांचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे हे खाऊन शरीराला काहीच फायदा होत नसल्याने आहारात या घटकांचा समावेश टाळलेला चांगला. यामुळे फक्त पोट भरते बाकी काही नाही.

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

अन्नावर कधी राग काढू नये🙏🏻*

*🙏🏻अन्नावर कधी राग काढू नये🙏🏻*

🌸 ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान. एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच राहते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते.

🌸 घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खात-पीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही त्रास होतो.

🌸 गरिबीमुळे काहीजण भाकरी, ब्रेड, वडे, समोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात. मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूर पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात. अथवा हुसकावून लावतात. चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यांना काय समजणार ? एखाद्याचा तोंडचा घास काढून घेऊ नये 

🌸 मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत. तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये. घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात. यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्राहुती दिली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे. मंगलकार्याच्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते. अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी. संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो.

🌸 अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार,त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रुसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणे-पिणे करू नये.

🌸 मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. ‘अतिथी देवो भव’ ही म्हणही त्यासाठीचा वापरतात. कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घालणे चांगलेच त्यामुळे मनाला समाधान मिळते.  अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, स्वतःची अध्यात्मिक शक्तीही वाढते.
 

बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

भोपळ्याचे आश्चर्यकारक फायदे;* 'ही' भाजी प्रतिकारशक्ती आणि केसांसाठी आहे चमत्कारिकभोपळ्यातून खालील पोषक तत्वे मिळतात

*भोपळ्याचे आश्चर्यकारक फायदे;* 'ही' भाजी प्रतिकारशक्ती आणि केसांसाठी आहे चमत्कारिक
भोपळ्यातून खालील पोषक तत्वे मिळतात

कॅलरीज: 49
चरबी: 0.2 ग्रॅम
प्रथिने: 2 ग्रॅम
कर्बोदकांमधे: 12 ग्रॅम
फायबर: 3 ग्रॅम
व्हिटॅमिन ए: दैनंदिन गरजेच्या 245%
व्हिटॅमिन सी: दैनंदिन गरजेच्या 19%
पोटॅशियम: दैनंदिन गरजांच्या 16%
तांबे: दैनंदिन गरजेच्या 11%
मॅंगनीज: दैनंदिन गरजेच्या 11%

व्हिटॅमिन बी 2: 
दैनंदिन गरजेच्या 11%
व्हिटॅमिन ई: 
दैनंदिन गरजेच्या 10%
लोह: दैनंदिन गरजेच्या 8%

*फायबर समृद्ध*
भोपळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. एक कप शिजवलेल्या भोपळ्यामध्ये 3 ग्रॅम फायबर असते. जे तुमच्या दैनंदिन गरजांच्या 11 टक्के असते. भोपळ्याच्या बियांमध्ये फायबरही चांगले असते. सुमारे 28 ग्रॅम बियांमध्ये 1.1 ग्रॅम फायबर असते. तुम्ही उकडलेला किंवा भाजलेला भोपळा खाऊ शकता. याशिवाय तुम्ही सूप, ब्रेड आणि पाई बनवण्यासाठी भोपळ्याचा वापर करू शकता.

*शरीरातील विषारी पदार्थ स्वच्छ करते.*
भोपळ्याचे सेवन शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि शरीराला डिटॉक्स करण्यास प्रभावीपणे मदत करते. हे मूत्रपिंड आणि मूत्र प्रणालीद्वारे शरीरातील कचरा बाहेर टाकण्यास मदत करते. हे डिटॉक्सिफिकेशन शरीराच्या अनेक आरोग्य समस्या दूर करते.

*सुरकुत्या कमी करते*
भोपळ्याचा उपयोग वृद्धत्वाच्या लक्षणांसारख्या त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो कारण त्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए सारखे पोषक असतात. हे अत्यंत हायड्रेटिंग आहे जे त्वचेला आर्द्रता आणि चमक आणते. त्वचेच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी भोपळ्याचा रस पिणे हा एक प्रभावी उपचार आहे.

*प्रतिकारशक्ती वाढवा*
व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने, भोपळ्याचा रस शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. त्यात ओमेगा -3 आणि बीटा कॅरोटीन सारखे दाहक-विरोधी पोषक घटक असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

*केसांची वाढ होते*
भोपळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते जे केसांच्या वाढीस मदत करते. तसेच यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए टाळूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अशा प्रकारे, भोपळ्याचा रस पिल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते.

*रक्तदाब नियंत्रित करते*
भोपळा हा केवळ तुमच्या चवींसाठीच नाही तर तुमच्या हृदयासाठीही चांगला मित्र आहे. भोपळ्यामध्ये असलेले पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास आणि उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या कमी करण्यास मदत करतात.

*कर्करोगाचा धोका कमी होतो*
व्हिटॅमिन ए आणि सी, लोह, भोपळा यासारख्या पोषक तत्वांचा जादुई कॉम्बो असल्याने कर्करोगाच्या पेशींविरूद्ध नैसर्गिक ढाल मानले जाते. विशेषतः प्रोस्टेट, ब्रेस्ट आणि कोलन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी भोपळा फायदेशीर ठरतो. भोपळा, कॉर्न आणि बीन्स यांसारख्या पदार्थांमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स सेवन केल्याने ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. जो कर्करोगाचा एक प्रमुख घटक आहे.

 भोपळा ही भाजी वाढवताना कोणतीही फवारणी केली जात नाही त्यामुळे भोपळा हा नैसर्गिक रित्या आपल्याला मिळतो.
 

रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

ओले खोबरे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

ओले खोबरे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

  ओल्या खोबऱ्यात व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम, मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. गृहिणी स्वयंपाकात 
  खोबऱ्याचा वापर करतात नारळाचे उत्पादन मुख्यतः कोकणामध्ये होते नारळाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. 
  नारळाचं पाणी शरीरासाठी अतिशय पोषक असते 

 ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात जे आपल्या चेहऱ्यासाठी खूप आवश्यक 
 असतात. ज्यांची त्वचा निस्तेज आणि कोरडी आहे त्यांनी नारळाच्या दुधाने चेहऱ्याला मसाज केल्यास चेहरा 
 एकदम टवटवीत दिसतो.

  वजन कमी करण्यासाठी नारळ अतिशय उपयुक्त ठरतो. नारळाचे दूध हे भुकेवर नियंत्रण ठेवते त्यामुळे वजन 
 नियंत्रित राहते. खोबरे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. ओले खोबरे सोबत गुळ देखील खाऊ शकतो अथवा 
 बदामाची पूड खाल्ल्यानेही बराच फायदा होतो. खोबरे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.

 ओल्या खोबऱ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. जर तुमचे पोट साफ होत नसेल तर तुम्ही नित्य खोबरे खा 
 त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल. केस गळत असतील तर त्याचे पाणी केसांना लावू शकता 
  केसांसाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे या पाण्यामुळे तुमचे केस मुलायम 
 देखील होतील.
 

सकाळी चहा-कॉफी घेतल्याशिवाय पोट साफच होत नाही, तज्ज्ञ सांगतात- तुमचंही असं होत असेल तर.....*

*सकाळी चहा-कॉफी घेतल्याशिवाय पोट साफच होत नाही, तज्ज्ञ सांगतात- तुमचंही असं होत असेल तर.....*

भारतात सकाळी झोपेतून उठल्यावर लगेचच चहा किंवा कॉफी घेण्याची पद्धत बऱ्याच वर्षांपासून आहे. झोपेतून जागे होण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी अनेकदा हा चहा घेतला जातो. एकदा सकाळी चहा घेण्याची सवय लागली की ती मोडणे अवघड असल्याने असंख्य लोक हे रुटीन फॉलो करत असतात. अशा लोकांना एखादवेळी सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी मिळाली नाही तर अतिशय अस्वस्थ होते आणि पोट साफ व्हायला त्रास होतो. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तुमचे पोटाचे आरोग्य चांगले नाही हे तुम्ही वेळीच लक्षात घ्यायला हवे. कारण पोट साफ होणे ही नैसर्गिक क्रिया असून ती अशाप्रकारे कोणत्याही सवयीशी निगडीत असता कामा नये असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. तुम्हालाही अशी अडचण येत असेल तर नेमकी काय अडचण आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवे.

*यामागे कोणती ३ कारणे आहेत ते आहारतज्ज्ञ श्वेता पांचाळ-शहा सांगतात...*

*१. पाण्याचे कमी प्रमाण...*
कमी पाणी प्यायल्याने अनेकदा शरीरात कोरडेपणा किंवा शुष्कपणा निर्माण होतो. त्यामुळे पाणी आणि द्रव पदार्थांचे आहारातील प्रमाण योग्य असायला हवे. थंडीच्या दिवसांत हवेत कोरडेपणा जास्त वाढतो तसेच तहान कमी लागते त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त होण्याची शक्यता असते. पण असा त्रास होऊ नये म्हणून जास्तीत जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी केव्हाही जास्त चांगले. 

*२. आहारात प्रोसेस्ड पदार्थ जास्त असणे...*
आहारात प्रोसेस्ड पदार्थ जास्त प्रमाणात असतील तरीही पोट साफ होण्यात अडचणी येतात. कारण प्रोसेस केलेल्या पदार्थांमध्ये मैदा आणि साखर जास्त असते. तसेच या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे पोट वेळच्या वेळी नीट साफ होत नाही. अशावेळी आहारात धान्ये, कडधान्ये, डाळी, बिया, फळं, भाज्या यांचा समावेश वाढवायला हवा. जेणेकरुन पोट साफ होण्यास मदत होईल. 

*३. शरीराची हालचाल न करणे...*
दिवसभर आपण सतत बैठे काम करत असलो आणि अजिबातच हालचाल होत नसेल तरीही कोठा जड होण्याची समस्या निर्माण होते. कामाच्या नादात आपण बरेचदा तासनतास जागेवरुन उठत नाही आणि हालचालही करत नाही. यामुळे खाल्लेले अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. त्यामुळे दर काही वेळाने शरीराची किमान हालचाल करायला हवी. इतकेच नाही तर सकाळी किंवा संध्याकाळी चालणे, योगासने असा किमान व्यायाम करायला हवा.


पवनमुक्तासन

*पवनमुक्तासन*

पोटातील वायू 💨आणि अपचन यामध्ये पवनमुक्तासन कां गरजेचे आहे?
भारतात एक जुनी म्हण प्रचलित आहे, जर एखाद्याचा मेंदू 🧠 आणि पोट निरोगी असेल तर ती व्यक्ती ऐश्वर्यसंपन्न होय. थोडक्यात एखाद्याचे मन शांत असेल आणि पोट निरोगी असेल तर ती व्यक्ती तंदुरुस्त आणि समाधानी ☺️ असते. तेंव्हा हे दोन्ही संलग्न असल्याने पचन संस्था निरोगी आणि मजबूत असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पोटातील वायू सरण्यासाठी आणि पचन ठीक होण्यासाठी *पवनमुक्तासन* गरजेचे आहे.

*पवनमुक्तासनाचे फायदे*

हे आसन सहसा पोटातील 🫃🏻 हवा बाहेर काढण्यासाठी केले जाते. यासोबतच हे आसन शरीरात साचलेली अशुद्धता दूर करण्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. याशिवाय पवनमुक्तासन करण्याचे अनेक फायदे आहेत.

🔰 *गॅस दूर करण्यात फायदेशीर :*
 पवनमुक्तासन करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, हे आसन दररोज केल्याने पचनक्षमता तर सुधारतेच शिवाय, पोटातील गॅसेसची 💨समस्या ही दूर होते.
  
🔰 *महिलांसाठी लाभदायी :*
 हे एक असे आसन आहे की, जे महिलांनी 👩🏻जरुर करायला हवे. विशेष करुन गर्भाशयाची समस्या असलेल्या महिलांना हे आसन करण्याचा सल्ला 🗣️दिला जातो. हे आसन गर्भाशयाशी निगडीत असलेल्या समस्या दूर करण्यात मदत करते. शिवाय हे आसन स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे.

🔰 *कंबरदुखीवर सहाय्यक :*
 जर तुम्हाला सियाटिकाची  समस्या असेल किंवा तुमची कंबर दुखत असेल, स्लिप डिस्कचा त्रास 😖 जाणवत असेल तर तुम्ही पवनमुक्तासनचा सराव नियमितपणे करायला हवा.
  
🔰 *आर्थरायटिसमध्ये फायदेशीर :*
 हे आसन अ‍ॅसिडिटी, सांधेदुखी 🦵🏻 आणि हृदयाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर आहे. 

*पोटाची नको असलेली चरबी कमी करण्यासाठी पवनमुक्तासन देखील खूप उपयुक्त आहे.*

🔰 *आतड्यांसाठी फायदेशीर :* पवनमुक्तासन केल्याने आतड्यांची कार्ये अधिक सक्रिय होतात आणि हे आसन अनेक विकारांपासून 🦠 आतड्यांना दूर ठेवण्यात मदत करते. याशिवाय हे आसन केल्याने यकृतही आपले काम योग्य प्रकारे करते.

*पवनमुक्तासन कधी करू नये जर तुम्हाला खालील अवस्था अथवा आजार असतील तर पवनमुक्तासन करू नये:*

▪️उच्च रक्तदाब, हृदयविकार, पित्त, हार्निया, स्लीपडिस्क, वृषणविकार, मासिक पाळीचा त्रास, मानेचे व पाठीचे विकार आणि गरोदरपणातील दुसऱ्या तिमाहीपासून करू नये.


कोथिंबीरीचे आणि धणे फायदे.

कोथिंबीरीचे आणि धणे फायदे. 

धणे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते मधुमेह असलेल्या लोकांच्या परिणामांवर आधारित अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्यांनी एक महिना धणे खाल्ले होते: त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी अधिक स्थिर झाली. यावरून हे सिद्ध होते की रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कोथिंबिरीचा प्रभाव खूप चांगला आहे.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते धणे जीवनसत्त्वे A आणि C मध्ये समृद्ध आहे. हे जीवनसत्त्वे निरोगी रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करतात.
याव्यतिरिक्त, धणे बियांच्या अर्कामध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे जळजळ कमी करतात आणि कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करतात जसे की: स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग...

आरोग्यासाठी चांगले हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी एक प्राणी आणि चाचणी-ट्यूब अभ्यासात असे आढळून आले की धणे जोखीम घटक कमी करू शकतात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगासाठी. दररोज सकाळी कोथिंबीर घातल्याने ओलेइक अॅसिड, एस्कॉर्बिक अॅसिड आणि लिनोलिक अॅसिड मिळते, हे पदार्थ कोलेस्टेरॉलची पातळी अगदी खालच्या पातळीवर आणण्यास मदत करतात ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस आणि रक्तवहिन्यासंबंधी अडथळे यासारख्या आजारांपासून बचाव होतो. 
याव्यतिरिक्त, कोथिंबीरमध्ये असलेले फोलेट शरीरातील हानिकारक एन्झाईम्सचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकला प्रतिबंध होतो. कोथिंबीरीचा रस देखील लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ, रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.
मेंदूच्या आरोग्याचे रक्षण करा पार्किन्सन्स, अल्झायमर आणि मल्टिपल स्क्लेरोसिस सारखे मेंदूचे आजार जळजळीशी संबंधित आहेत. कोथिंबीरचे दाहक-विरोधी गुणधर्म या रोगांपासून संरक्षण आणि मदत करू शकतात.
पचनसंस्थेला आणि आतड्यांच्या आरोग्याला सहाय्य करते धणे बियाण्यांपासून काढलेले तेल पचनसंस्थेला लाभ देते. इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) असलेल्या 32 लोकांच्या 8 आठवड्यांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की प्लॅसिबो ग्रुपच्या तुलनेत कोथिंबीर असलेल्या हर्बल औषधाचे 30 थेंब दिवसातून तीन वेळा ओटीपोटात दुखणे, सूज येणे आणि अस्वस्थता कमी करतात. याव्यतिरिक्त, इराणमधील पारंपारिक औषधांमध्ये, धणे अर्क देखील भूक वाढवणारे उत्तेजक म्हणून वापरले जात

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

कंबर दुखी, पाठदुखि , मानदुखी, खांदेदुखि, स्पाँडिलायसिस, संधीवात, rheumatoid arthritis.**हे सर्व वातविकार प्रकार आहेत.*

*कंबर दुखी, पाठदुखि , मानदुखी, खांदेदुखि, स्पाँडिलायसिस, संधीवात, rheumatoid arthritis.*
*हे सर्व वातविकार प्रकार आहेत.*

*१.स्पाँडिलायसिस हा रोग नाही.*           
*२.ही शरीरातील (काही भागापुरती)* 
*झीज आहे.*
*३.एक प्रकारे वार्धक्य असही आपण म्हणू शकतो.*
*४.पाठीत ऊसण भरणे -* 
*हे स्पाँडिलायसासमुळे होऊ शकत.*
*५.मान तिरपावणे -*                   
*हे स्पाँडिलायसासमुळे होऊ शकत.*
*६. पाठीत ऊसण भरणे, मान तिरपावणे, स्पाँडिलायसीस, या सर्वासाठी पुढे सांगितलेली काळजी घेणे जरुर आहे. -----*

 *सकाळी कोवळ्या उन्हात उभे राहून रोज विटामिन डी नैसर्गिक रित्या  घ्या*

जिरे आणि ओवा चिमूटभर दिवसातून चार ते पाच वेळा खा. तसेच दिवसभरात केव्हाही पाणी गरमच प्या.

मेथी रात्री पाण्यात भिजत टाका.
सकाळी ते पाणी प्या, व भिजवलेली मेथी चावून खा.

मेथीची पाने वाटून पेस्ट करून सांध्यावर लावा अथवा मेथी दाणे पेस्ट करून दुखर्‍या जागेवर लावा.

मेथी  भिजवून मटकी ला मोड आणतात तसे आणा. तेल मीठ न घालता पांढरा कांदा घालून भाजी करा. ज्वारी भाकरी सोबत चपाती नाही फक्त एवढेच दोन तीन वेळा १५ दिवस खाणे दुसरे काही नाही. खाणे.

त्रिफळा चूर्ण व गूळ एकत्र करून रात्री झोपण्याच्या आधी गरम पाण्याबरोबर घ्या

डिंकाचा खडा चघळा
किंवा डिंकाचे लाडु करुन खा.

पारिजातकाची १०-११ पाने वाटून चटणी करा, ती पाण्यात ऊकळवा, थंड करुन प्या.
तीन महिने घ्या --- नंतर २० दिवस सोडून --- परत तीन महिने घ्या. 
अशा प्रकारे करा आराम वाटेल.

रोज एक किंवा दोन महायोगीराज गुग्गुळ गोळी घ्या.    किंवा
महारास्ना काढा घ्या.

१चमचा हळद+१चमचा पीठीसाखर+कणभर खायचा चूना+थोड पाणी घालुन एकजीव करा व तो लेप उसण भरली असेल तीथे लावा. ७ दिवस लावा.

दुखद बाव लेप लावा.

महानारायण तेलाने माॅलीश करणे.

दुखर्‍या भागावर शेक घ्या.
त्यासाठी गरम पाण्याची पीशवी
किंवा   ईलेक्ट्रीकची ऊशी
किंवा   विटेचा तुकडा शेगडीवर गरम करुन फडक्यात गुंडाळून शेकु शकता.
महत्वाचा ऊपाय शेक आहे. औषध फक्त वेदाना कमीकरण्यापूरतीच असतात. एकदा आखडलेला भाग सुटला कि दुखण आपोआपच बर होत असत.

*ही दक्षता घ्या.......*
जरुशिवय पुढे वाकायच नाही, वेळ आलीच तर काठी घ्या.
शक्यतो जड ऊचलायच नाही. कुठेही बसतांना पाठ ताठ राहील याची दक्षता घ्यायची. 
बॅकबेंडींगची आसने योगासन शिकवणार्‍याकडुन शिकून घेवुन करायची.          
झोपायला पातळ गादी व पातळ ऊशी घ्या. कुशिवर झोपतांना दोन ढोपरांमधे जाड ऊशी घ्या.

हाडमोडीवर  अर्जुन सादडा
अर्जुनसादडा - सालीचे चुर्ण + १ग्रॅमतुप +१ग्रॅम राखर घालुन सकाळ संध्याकाळ घ्याव
 *कोणतेही हाडाचे दुखणे व्यायाम केल्याशिवाय कायमचे  बसणार नाही. पेन किलर खाणे योग्य नाही. जास्त त्रास होत असल्यासच पेन किलर  घ्यावी*
            परंतु
 *
🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒💥🍓💥🍓💥🍓💥🍓💥🍓💥🍓💥🍓

दररोज सकाळी अंकुरलेले ‘मूग’ खा, मिळतील हे जबरदस्त फायदे* 🫘 🥗 🫒 🥙

*दररोज सकाळी अंकुरलेले ‘मूग’ खा, मिळतील हे जबरदस्त फायदे*
 🫘 🥗 🫒 🥙

*अंकुरित मुगामध्ये प्रथिने,* *जीवनसत्त्वे तसेच खनिजयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात आहे. जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. अंकुरलेल्या मूगामध्ये डायटरी फायबर्स, व्हिटॅमिन बी -6, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ई, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट्स, फॉलिक असिड , झिंक इ. असतात ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.*
*हे सर्व आपल्याला रोगांविरूद्ध लढण्याची शक्ती देतात. अंकुरलेले मूग खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर आणि प्रथिने मिळतात.चला तर जाणुन घेउयात अंकुरित मूग खाण्याचे अधिक फायदे. अंकुरित मुगामध्ये ग्लूकोजची पातळी कमी असते, म्हणूनच ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे ते सुद्धा अंकुरित मुग खाऊ शकतात.*
*सकाळी थोड्याश्या अंकुरित मुगाचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत होते. अंकुरित मुगाचे सेवन केल्याने चयापचय दर चांगला राहतो आणि शरीराला चांगली ऊर्जा मिळते.*
*आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास अंकुरित मुग खा. त्यात भरपूर फायबर आहे. जे पोटाच्या प्रत्येक समस्येपासून आपले संरक्षण करते. तसेच पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. अंकुरित मुगामध्ये लोहाचे चांगले प्रमाण असते. याच्या सेवनाने हिमग्लोबीनची पातळी सुधारण्यास मदत मिळते.*
*मोड आलेल्या मुगामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेट्री गुण असल्याने संधिवातात (अर्थारायटिस) उपयुक्त ठरतात. आपल्या शरीरात व्हिटॅमिन आणि प्रथिनेची कमतरता असल्यास आपण त्याची कमतरता दूर करण्यासाठी अंकुरित मूग खा.*
*अपचनाचा त्रास होत असेल तर आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये एक वाटी अंकुरलेल्या मुगाचा समावेश करा. मुगामध्ये असलेल्या फायबर मुळे आपली पचन शक्ती सुधारण्यास मदत मिळेल.*
*अंकुरलेल्या मूगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात भरपूर एंजाइम असतात, जे पचन सुलभ करण्यास मदत करतात. आपल्याला हे सेवन करून* *बद्धकोष्ठता येत नाही. तसेच, पोटाशी संबंधित सर्व रोग गायब होतात.*

*अंकुरित मुगामध्ये व्हिटामिन ए असते. याच्या सेवनाने नजर तीक्ष्ण होते. अंकुरलेल्या मूगामध्ये असलेले गुणधर्म मुरुम काढून टाकण्यास मदत करतात. तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.*
*जर आपण वजन कमी करण्याबद्दल विचार करत असाल तर अंकुरलेल्या मूगाचे सेवन सुरू करा. आपल्याला लवकरच एक फरक दिसेल. त्यातील फायबर वजन कमी करण्यास मदत करते.*


शरीरातील रक्त वाढवणे, हिमोग्लोबिन HEMOGLOBIN चे नियंत्रण व अशक्तपणा दुर करणारे काही उपाय.**

*शरीरातील रक्त वाढवणे, हिमोग्लोबिन HEMOGLOBIN चे नियंत्रण व अशक्तपणा दुर करणारे काही उपाय.**

१एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून त्यात एक चमचा मध घालून प्या.  हा उपाय दररोज केल्यास, रक्त लवकर वाढते.

 २. अशक्तपणाच्या त्रासात पालक औषधासारखे कार्य करते.  पालक अ, क, बी 9, लोह, फायबर आणि कॅल्शियम जीवनसत्त्वे भरपूर असतात.
 पालक एकाच वेळी वीस टक्के पर्यंत लोह वाढवू शकतो.  पालक भाजीपाला आणि सूप म्हणून वापरला जाऊ शकतो.

 ३ रक्त वाढवण्यासाठी टोमॅटो खूप उपयुक्त आहे.  दररोज एक ग्लास टोमॅटोचा रस प्याल्याने  रक्त लवकर बनते. याशिवाय आपण सफरचंद आणि टोमॅटोचा रस मिसळून  ही टोमॅटो सूप पिऊ शकता.

 ४ मक्याचे दाणे शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यासाठी देखील फायदेशीर आहे.  ते पौष्टिक आहेत आणि उकडून खाऊ शकतात.

 ५ एका ग्लास बीट  रसात थोडे मध मिसळून ते पिण्यामुळे शरीरात लोहाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते ज्यामुळे शरीरात रक्त तयार होते.

६सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे.  अशक्तपणाच्या रूग्णासाठी फायदेशीर ठरते.  आपण सोयाबीनचे उकळवून ते खाऊ शकता.

७डाळिंबाच्या रसामध्ये थोडासे सैंधव आणि थोडीशी मिरपूड मिसळून दररोज ते प्यायल्यास शरीरातील लोहाची कमतरता कमी होण्यास मदत होते.

८गुळा सोबत शेंगदाणा  खाल्ल्याने शरीरात लोह वाढते.

 ९हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, लसूणमध्ये थोडे सैधव मिसळा आणि चटणी बनवा. रोज खाल्यास हिमोग्लोबिनवर वाढण्यास मदत होते.

 १०. शरीरात रक्ताचा अभाव पूर्ण करण्यासाठी दूध आणि खजूर हा देखील एक चांगला उपाय आहे.  हा उपाय करण्यासाठी, दुधामध्ये खजूर घाला आणि निजायची वेळ आधी दूध प्या.  दूध प्यायल्यानंतर खजूरही खा.

*अशक्तपणाचा आयुर्वेदिक उपचार: अशक्तपणाचा आयुर्वेदिक उपचार ...*

 ११. रक्त वाढविण्यासाठी गुळवेलीचा रस सर्वोत्तम आहे.

  १२आवळा आणि जांभूळ रस समान प्रमाणात मिसळल्यास शरीरात हिमोग्लोबिनची पातळीही वाढते.

 १३ शिंगाडा  खाण्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते आणि शरीराला सामर्थ्य मिळते.

 १४आंब्याच्या रस दुधा बरोबर सेवन केल्यास शरीरात हिमोग्लोबिनही वाढते.

१५ दोन चमचे तीळ पाण्यात भिजवा आणि दोन ते तीन तासांनंतर त्यांना पाण्यातून उपसून घ्या आणि बारीक करून पेस्ट बनवा.आता एक चमचा मध मिसळा आणि दिवसातून दोनदा खा.  या मुळे शरीरात रक्ताची वाढ झपाट्याने होऊ लागते.

 शरीरात रक्ताची कमतरता भागवण्यासाठी बरेच डॉक्टर लोह आणि व्हिटॅमिन गोळ्या किंवा कोणतेही परिशिष्ट घेण्याची शिफारस करतात.
 औषध घेण्याव्यतिरिक्त, आपण आहारात काही निरोगी अन्न जोडून नैसर्गिक मार्गाने रक्त वाढवू शकतो.

 *हीमोग्लोबिन बूस्टिंग फूडः हेमोग्लोबिन बूस्टिंग फूड ...*

 १. आपल्या आहारात मोहरी, पालक, कोथिंबीर आणि पुदीनाची पाने घाला.

 २. फळांमध्ये सफरचंद, पपई, चिकू, लिंबू आणि पेरू खा.

 ३ पिस्ता आणि अक्रोड यासारखी ड्रायफ्रूट खाल्ल्याने रक्तातील लोहाचे प्रमाणही वाढते.

 ४आपल्या आहारात कोरडी द्राक्षे, मनुके, धान्ये, गाजर आणि डाळीचे सेवन करा.  दररोज ते खाल्ल्याने शरीरात रक्त वाढते.

 ५मुग, हरभरा, मठ आणि गहू मोड आलेले एकत्रित करून त्यात लिंबू व मध मिसळून सकाळी  दोन अडीच मुठ खा.  सकाळी रिकाम्या पोटी ते खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये मिळतात, जे अशक्तपणावर उपचार करण्यास मदत करते.

*शरीरामध्ये रक्त HEMOGLOBIN वाढवण्यासाठी काय करावे?* 

बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते
अशावेळी

👉 मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम.
👉 आहारात सिझनल फळांचा  समावेश करा.
👉 गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे,
👉🏻 राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे.
 👉 सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त वाढीसाठी गुणकारी आहे
👉 सुकामेवा शेंगदाणे खावे, 
अंजीर भिजवून खाणे, मक्याचे कणीस खाणे, दूध आणि खजूर, सोयाबीन खावे, पालक अंबाडी चुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून फळभाज्याचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा, नियमित खाव्यात.

निरोगी आयुष्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे आपण याआधी पाहिले आहे.

निरोगी आयुष्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे आपण याआधी पाहिले आहे.

आज आपण पाणी पिण्याच्या योग्य वेळा कोणत्या व त्याने काय फायदे होतात ते पाहू.

१. *सकाळी उठल्या उठल्या लगेच: १-२ ग्लास पाणी प्यावे*
याने आपला मेंदू आणि शरीर स्लिप मोड मधुन ग्रीड मोड मध्ये येतात. आपले अंतर्गत अवयव शुद्ध आणि स्वच्छ होतात. आतड्यांवर दबाव येऊन पोट साफ व्हायला मदत होते.

२. *जेवणाआधी ३० मिनिटे: १ ग्लास पाणी*.
यांनी आपली पचनक्रिया सुधारते आणि कॅलरी इंटेक कंट्रोल मध्ये राहतो.

३. *व्यायामाच्या आधी व नंतर १-१ ग्लास पाणी पिणे*.
व्यायामाच्या आधी प्यालेले पाणी आपल्या शरीराला व्यायामासाठी वॉर्मअप सारखे तयार करते.

व्यायामानंतर प्यालेले पाणी आपल्याला डीहायड्रेशन पासून वाचवते.

हेवी व्यायाम केल्यावर किंवा गर्म्याच्या दिवसात जास्त पाणी प्यावे.

४. *आंघोळीच्या आधी: १ ग्लास पाणी*.
कोमट पाणी प्याल्याने आपल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि आपले ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होते.

५. *झोपायच्या आधी: १ ग्लास पाणी प्यावे*.
झोपण्याआधी जर आपण हायड्रेटेड असलो तर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस कमी होतात. कारण घट्ट रक्त हार्ट अटॅकचे मुख्य कारण आहे.

६. *जेव्हा तुम्ही खूप थकलेले असाल: १ ग्लास पाणी*.
पाणी आपल्या मेंदूला पावर अप करते. Noggin's Fluids ची पातळी वाढते आणि आपल्या cognitive functions मध्ये सुधारणा होते.

जेव्हा तुम्हाला एखादे प्रेसेंटेशन द्यायचे असेल त्याआधी १ ग्लास पाणी प्या.

जेव्हा झोप येत असेल आणि झोपणे शक्य नसेल तेव्हा पण एक ग्लास पाणी प्या.

निसर्ग उपचार तज्ञ


गुडघेदुखीवर शेवगा शेंगाचे सूप*

*गुडघेदुखीवर शेवगा शेंगाचे सूप*

गुडघेदुखीचे अनेक प्रकार आहेत. सर्वांना वेगवेगळे इलाज आहेत. पण त्यातल्या त्यात अशक्तपणा व रज्जू क्षयाने येणारी गुडघेदुखी हि सामान्य आजार आहे. ती थांबवण्यासाठी बिन खर्चिक उपाय आहे. रसायन मिश्रित औषधे फार तर या आजारावर वेदनाशमणाचेच काम करतात.परंतु कायम स्वरूपी  गुडघे दुखी घालवायची असेल तर दररोज सकाळी शेवग्याच्या दोन शेंगांचे सूप एक आठवडा भर घ्यावे. कोणतीही गुडघेदुखी कंबर दुखी हात पाय संधिवात " हाडे दुखणे   त्यासाठी कॅल्शियमचे भरपूर प्रमाणात सेवन करणे हाच उत्तम उपाय.

*सूप करण्याची पद्धत*

शेवग्याचा दोन शेंगा कापून घ्या 
दोन ग्लास पाण्यात
दोन लसणाच्या पाकळ्या, किंचित गुळ, अर्धी हिरवी मिरची उकडून घ्याव्यात शेंगा पूर्ण उकडल्यानंतर त्यांचा गर देखील कुस्करून घ्या त्यात चवी पुरते काळे मीठ टाका. हे सारे मिश्रण स्वच्छ वस्त्राने गाळून घ्या. नंतर परत त्या पाण्याला एक उकळी येवू द्या. साधारण एक ग्लास सूप होईल इतके आटवा. चवी साठी वर कोथिंबीर टाकायची असल्यास टाका. आणि गरमागरम असतानाच हे सूप घ्या. नैसर्गिक रित्या कॅल्शियम मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मोरिंगा. मोरिंगा म्हणजेच शेवगा हप्त्यातून दोन वेळा भाजी खाल्ली तरी चालेल.

काकडी*

*काकडी*
🥒🥒🥒🥒🥒
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून दिले जाते आणि यामध्ये असलेले सॉल्युबल फायबर्स पोट साफ करतात. यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो तसेच अन्नपचन व्हायला खूप मदत मिळते. 
🥒🥒🥒🥒🥒🥒
यासोबतच यामध्ये इरेप्सिन नावाचे अ‍ॅन्झाइम असते जे पोटासाठी खूप चांगले असते. हे खाल्ल्यामुळे अल्सर, बद्धकोष्ठ, अपचन यासारखे पोटाशी संबंधित आजार होत नाहीत.
🥒🥒🥒🥒🥒🥒🥒
काकडीमध्ये पाण्यासह फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि पोटॅशिअम सारखी पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असता.
🥒🥒🥒🥒🥒🥒
याशिवाय काकडीमध्ये व्हिटॅमिन – बी, ए आणि ॲंटी-ऑक्सीडेंट्सही मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला अनेक लाभ मिळू शकतात. फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या समस्यांपासून ॲंटी-ऑक्सीडेंट्स शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.
🥒🥒🥒🥒🥒🥒


बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे.....*

*बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे.....*

आयुर्वेदात अशा अनेक वनौषधी आणि वनस्पती आहे, ज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे यातिल बाभळीच्या शेंगांना फार मौल्यवान मानले जाते. खुपच गुणकारी आहे तर बघू या फायदे...

  *(१)गुडघेदुखी कमी होते...*
बाभळीच्या शेंगांचे चूर्ण उपयुक्त आहे. व्रुध्दापकाळात सांधेदुखी, ही सामान्य समस्या आहे आणि गुडघेदुखी तर चाळीशीनंतर चालू होते. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे हे चूर्ण कोणत्याही आयुर्वेद शाॅपला नक्कीच मिळेल, याने काही दिवसांतच गुडघेदुखीला आराम मिळेल..

*(२)डोकेदुखी दूर होते.*.* वाढता ताण-तणाव, चिंता, धावपळ, यामुळे. सतत डोकेदुखी असणं ही समस्या घरोघरी आढळून येते, अशा वेळी बाभुळ शेंगाचि पावडर कोमट पाण्याबरोबर घ्यावी, लगेच आराम मिळतो..

*(३) स्त्रियांसाठी शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे...*
आजकाल बहुतेक महिलांना ल्यूकोरिया चा त्रास होतो, श्वेतप्रदर, पांढरे पाणी जाणे, अशा समस्या बहुतेक महिलांना होतात. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने आराम मिळतो नक्कीच.

*(४) पुरुषांसाठी या शेंगांचे चूर्ण फायदेशीर ठरते...*
बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पुरुषांना देखील फायदेशीर आहे. ज्यांना धातूक्षयाचा त्रास असेल. त्यांनी हि पावडर. नियमितपणे कोमट पाण्याबरोबर घेतल्यास फायदा होतो. वंध्यत्व दूर होते.

*(५) पाठदुखी कंबरदुखी...* या त्रासात आराम देण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे. एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यामुळे पाठदुखी कंबरदुखी चा त्रास होतो, आजकाल बहुतेक लोक बसून काम करतात त्यामुळे पाठदुखी देखिल सामान्य समस्या आहे, तेव्हा हि पावडर उपयुक्त ठरते, जेवणानंतर एक चमचा भरून चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने छान आराम मिळतो नक्कीच. जमल्यास हि पावडर दूधासोबत घेतल्यास स्नायू बळकट होतात.

*(6) जूलाबाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे...*
बरेच वेळा, बाहेरच्या खाण्यामुळे, पोट खराब होऊन पातळ जुलाब होतात, अतिसार होतो, गळल्यासारखे होते, यांच्यावर शेंगांचे चूर्ण हे रामबाण औषध आहे, थोडं चूर्ण पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो.

*(७) अशक्तपणा, कमजोरी वाटणे, यावर जर तुम्ही शारिरीक दृष्ट्या अशक्त असाल तर तुम्ही बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पाण्यात किंवा दुधात मिसळून रोज एक वेळा सेवन करू शकता आणि वाटलं तर मधात मिसळून चाटण म्हणून घ्या. 

.तेव्हा वरील फायदे बघता बाभळीच्या शेंगांचे चूर्ण अतिशय मौल्यवान औषध आहे आणि सहज आयुर्वेद दुकानात मिळतं. जरुर हि पावडर घरात असू द्यावी.


उजव्या बाजूला पोटात दुखणे याची कारणे*

*उजव्या बाजूला पोटात दुखणे याची कारणे* 

काहीवेळा आपल्या पोटात उजव्या बाजूला वेदना होऊ लागतात. या पोटदुखीची वेगवेगळी कारणे असू शकतात. कारण आपल्या पोटात उजव्या बाजूस यकृत, पित्ताशय, आतड्याचा उजवीकडील भाग, अपेंडिक्स, उजव्या बाजूची किडनी तसेच स्त्रियांमध्ये right ovary असे अवयव असतात, त्यामुळे विविध कारणांमुळे उजव्या बाजूला पोटदुखी होऊ शकते. पोटात उजव्या बाजूला दुखणे याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.

*पचनासंबधित गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता (Constipation) :*
◼️गॅस्ट्रोएन्टेरिटिस, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), IBD, अन्न विषबाधा अशा कारणांनी उजव्या बाजूस पोटात दुखू लागते.
◼️अपेंडिक्सला सूज आल्याने पोटात उजवीकडे दुखते.
◼️उजव्या किडनीत स्टोन किंवा इन्फेक्शन झाल्याने पोटात उजव्या बाजूला दुखते.
◼️हर्नियामुळे सुध्दा काहीवेळा उजव्या बाजूला पोटदुखी होते.
◼️यकृताला सूज येणे, यकृताचे आजार तसेच पित्ताशयातील खडे यामुळेही उजव्या बाजूला पोटात दुखू लागते.
◼️स्त्रियांमध्ये मासिक वेळी, तसेच गरोदरपणात Ectopic pregnancy मुळे उजव्या बाजूला पोटात दुखू शकते.

*कधी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे ? :*
खालील लक्षणे जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता, तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जावे.
◼️पोटात उजव्या बाजूला अतिशय वेदना होणे,
◼️छातीत दुखणे,
◼️ताप येणे,
◼️शौचावाटे रक्त पडणे,
◼️लघवीतून रक्त पडणे,
◼️उलट्या होणे,
◼️उलटीतून रक्त पडणे,
◼️ त्वचा पिवळसर होणे,
◼️पोटावर सूज येणे
अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जावे.

*पोटात उजव्या बाजूला दुखणे यावर घरगुती उपाय :*
◼️अर्धा कप पाण्यात लिंबू रस व काळे मीठ घालून ते मिश्रण प्यावे.
◼️गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे उजव्या बाजूला पोटात दुखणे थांबते.
◼️आल्याचे तुकडे पाण्यात घालून ते पाणी उकळावे. मिश्रण कोमट झाल्यावर ते पाणी अर्धा कप प्यावे.
◼️चहामध्ये आले टाकून काळा चहा प्यावा.
◼️डाळिंबाच्या दाण्यात थोडे काळे मीठ मिसळून ते दाणे खाल्याने उजव्या बाजूला पोटात दुखणे थांबते.
◼️पोटावर गरम शेक घ्यावा.
◼️हे घरगुती उपाय खानपान संबंधित गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता अशा कारणांमुळे पोटात उजव्या बाजूला दुखत असल्यास उपयोगी पडतात. मात्र जर इतर गंभीर कारणामुळे पोटात उजवीकडे दुखत असल्यास त्यावर घरगुती उपाय करीत वेळ वाया घालवू नये. अशावेळी तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.
✍️गजानन गोपेवाड

पचनसंस्थेसाठी काही घरगुती उपाय.* उत्तम औषध बडीशोप

*पचनसंस्थेसाठी काही घरगुती उपाय.*
 उत्तम औषध बडीशोप 

रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते ( जेवणानंतरच खावी. ). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते.

पोटात गॅस होऊ देत नाही व चिकटपणा/आमांश दूर करते.

अपचनाच्या सर्व तक्रारींत..
 बडिशेप, काढा वा अर्क वापरता येतो. उदा. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे इ. थोडक्यात, सर्व पचनसंस्थेसाठी उपयोगी आहे. जेवणानंतर एक चमचा बडिशेप रोज दोन वेळा खावी.

मुलांना दात येताना... जुलाबाचा त्रास होतो, त्यासाठी चुन्याच्या निवळीसह बडीशेप चूर्ण घ्यावे.
भूक लागत नसेल तर रोज बडिशेप खावी. त्यासाठी शक्य असेल तर एक चमचा बडिशेप चूर्णात दोन चमचे मध टाकून त्याचे चाटण रोज एक वेळा घ्यावे.

तापामध्ये अंगाची आग होत असेल.
जिभेला शोष पडत असेल तर बडिशेपेचा काढा खडीसाखर घालून प्यायला द्यावा.. 

 लघवी कमी होत असेल.
तसेच लघवीला जळजळ किंवा आग होत असेल तर एक चमचा बडिशेपेचा काढा करून प्यावा.


 कोरडा खोकला
 असेल तर, एक चमचा बडिशेप चूर्ण + एक चमचा पत्री खडीसाखर बरोबर घेणे.

सूज व वेदना.
असतील तर बडिशेप, सैंधव पूड व ओवा समभाग घेऊन तव्यावर गरम करून त्यांची रुमालात पुरचुंडी करून शेकावे.

बडीशेप सरबत.
बडिशेप ४ वा ५ चमचे घेऊन ती एका भांड्यात पाणी भरून त्यात टाकून रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी हे मिश्रण १० मिनिटे उकळावे व गाळून त्यात ४ वा ५ चमचे खडीसाखरेचा पाक करून घालावा. म्हणजे चांगले सरबत तयार होते.
उपयोग - या सरबतामुळे भूक वाढते, पचनशक्ती सुधारते, उष्णता कमी होते. शिवाय ते पौष्टिक आहे.

स्वादिष्ट विरेचन चूर्ण..
बडिशेप, ज्येष्ठमध व सोनामुखी प्रत्येकी १५० ग्रॅम एकत्र करून त्यांची पूड करावी. त्यात ३०० ग्रॅम खडीसाखर पूड करून मिसळावी म्हणजे हे विरेचन चूर्ण तयार होते. उपयोग - रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्यावे.
त्याने पोट साफ होते. तसेच मूळव्याध, तोंड येणे इ. उष्णताविकार व त्वचाविकार बरे होतात.
 बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस 

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रसदेखील पोटातील गॅस दूर करण्यासाठी उपयुक्त असते. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा बेकिंग मिसळा आणि ते प्याव. यामुळे पोटातील गॅसपासून त्वरित आराम मिळतो.जास्त वेळा चहा पिणे हे पोटात गॅस (Stomach Gas) तयार होण्याच्या लक्षणांपैकी एक आहे. ...

ओवा
ओव्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असते, जे गॅस्ट्रिक रस स्राव (Gastric Juice) करते आणि पचनास मदत करते. ...
जिऱ्याचे पाणी
गॅसच्या समस्येवर जिरे पाणी हा उत्तम घरगुती उपाय.

आले आणि लसूण:

 आले आणि लसूणमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म पोटातील गॅस कमी करण्यास मदत करतात.

जिरे पाणी 

एका ग्लास गरम पाण्यात थोडेसे जिरे मिसळून ते पिणे हा देखील एक चांगला घरगुती उपाय आहे.

धणे पाणी 
धणे पाण्यात भिजवून ते बारीक करून पाण्यात मिसळून प्यायल्यानेही गॅसपासून आराम मिळतो.

योगासन पवनमुक्तासन आणि वज्रासन यासारखे काही योगासन पोटातील वायू कमी करण्यास मदत करू शकतात.

नैसर्गिक चहा

 आल्याचा किंवा पुदिन्याचा चहा प्यायल्याने पोटातील वायू कमी होण्यास मदत होते

शक्य झाले तर सूर्य नमस्कार घालावे .

प्रत्येक अवयवाला व्यायाम होईल .

ताजे अन्न खा .

जड अन्न खाणे बंद करावे .

सकाळी उठून गरम पाण्यातून लिंबू घ्या .

सकाळी फिरायला जावे .

रात्री झोपताना चार थेंब एरंडेल तेल बेंबीत सोडा

याने संडास साफ होईल .

रोज पालेभाज्या खाणे उत्तम .

वडा पाव सामोसे असे पदार्थ कमी खायचे .

फारच त्रास होत असेल तर रात्री झोपताना अर्धा चमचा त्रि फळा चूर्ण घेऊन वर कोमट पाणी प्या .

तेव्हा भरपूर आणि काहीही खायची इच्छा असेल तर त्या प्रमाणात भरपूर व्यायाम देखील करा. गॅसेसचा त्रास होणार नाही.

व्यायाम करायची इच्छा नसेल किंवा विविध कारणांनी व्यायाम करणे शक्य होत नसेल तर जेवण साधे आणि सात्विक करा. लौकर पचणारे फळ आणि सॅलडसारखे पदार्थ जास्त प्रमाणात खा. गॅसेसची तक्रार येणार नाही. 

लेखन✍️ गजानन गोपेवाड

सतत झोप आल्या सारख वाटणे, काम करण्याची

*सतत झोप आल्या सारख वाटणे, काम करण्याची इच्छा नसणे, दिवसभर जांभळ्या येणे, अशक्त पणा वाटणे अश्या समस्यांना त्रासलेले आहेत तर ही पोस्ट तुमच्या साठी…* 

*झोप पूर्ण न होणे* 
                       आपल्या शरीराला किमान 7 ते 8 तास शांत झोपेची आवश्यकता असते. रात्री झोपताना मोबाईल, टॅबचा वापर केल्यानं लवकर झोप लागत नाही. काही वेळा झोपेत मध्येच आपण दचकून उठतो. भीतीनं किंवा टेन्शनमुळेही झोप पूर्ण होत नाही. मेंदू थकल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.

 *प्रमाणापेक्षा जास्त खाणे*
                          आपण आपला आहार हा थोडी भूक राखून घेतला पाहिजे म्हणजे आपण खाल्लेले अन्न व्यवस्तीत पचेल सुरवातीला जेवण कमी झालं असं वाटलं पण नंतर आपणास सवय लागून जाते.

 *पुरेसा व्यायाम न करणे* 
                          आपल्या शरीराला उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी किमान रोज सकाळी 30 मिनिटं वेगवेगळे व्यायाम करणं आवश्यक आहे. व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण चांगलं होतं. शरीरातील पेशी अधिक चांगल काम करतात तुम्ही दिवसभर उत्साही आणि आनंदी राहता.

 *आहारात प्रथिनांचं प्रमाण कमी* 
                                     तुमच्या आहारात भरपूर फळ, अंड, दूधाचा वापर करायला हवा. प्रथिनांचा वापर करायला हवा. चीज, मासे, दही, योगर्ट शेंगदाण्याचा वापर आहारात करा. फास्ट फूड पचनासाठी जड असतं. ते खाणं टाळा. वेळेवर आहार घ्या.

 *साखरयुक्त पदार्थांचं सेवन टाळा* 
                             साखरेचं प्रमाण अति असणारे गोड पदार्थ तुम्हा वारंवार खात राहिलात तर तुम्हाला आळस येऊ शकतो. त्यामुळे दिवसभर मरगळलेले किंवा थकलेलं वाटू शकतं. साखरेचं प्रमाण कमी असणारे पदार्थ खाण्यावर भर द्या.

 *शरीरात लोहाची कमतरता* 
                            आपल्या शरीरातील हिमोग्लोब्लीन किंवा रक्त कमी झालं तरीही आपण काहीही काम न करता आपल्याला दमल्यासारखं होतं. खूपदा डोकं दुखतं आणि चक्करही येते. त्यामुळे तुमच्या आहारात पालेभाज्या, हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी आवश्यक असणारी फळ, खाद्यपदार्थ खाणं आवश्यक आहे.

 *ताणतणाव* 
                        कामाच्या ठिकाणी किंवा घरातही काही वेळ तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. गाणी ऐकणं, चित्र कारणं, फिरणे काहीही जे तुम्हाला आवडतं ते. ज्यामुळे तुम्हाला आलेला ताण कमी होईल. किंवा कामाच्या टेन्शनपासून काही वेळ स्वत:ला लांब ठेवा त्यामुळे तुमचा मूड फ्रेश होईल आणि अधिक जोमानं काम करू शकाल. रागावर नियंत्रण ठेवा. राग येत असेल तर लक्ष दुसरीकडे ठेवून आनंदी राहण्याचा प्रयत्न  करा 


*लेखन. गजानन गोपेवाड*
🍑🍇🍒🍇🍒🍇🍒🍑🍒🍇🍒🍑🍒🍇🍒🍑🍓🍑🍓🍑🍓🍑🍒🍑🍒🍇🍒🍑🍒

*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*


सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

हे ४ पदार्थ आहेत सायलेंट किलर! खाताना चविष्ट वाटतात, पण खाणार तो पस्तावणार.....*

*हे ४ पदार्थ आहेत सायलेंट किलर! खाताना चविष्ट वाटतात, पण खाणार तो पस्तावणार.....*

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आतडे निरोगी आणि मजबूत ठेवणे आवश्यक आहे. आपण जे काही खातो - पितो ते आतड्यांमधून जाते. आतड्यांचे काम अन्नापासून पोषण वेगळे करणे, व हे पोषण शरीराच्या इतर भागापर्यंत पोहचवणे, यासह शरीरातील घाण बाहेर काढणे हे आहे. आतड्यांच्या कामावर परिणाम झाला तर, साहजिक पचनसंस्था बिघडू शकते. ज्यामुळे शरीरात गंभीर आजार उद्भवतात. आतड्यांमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात. काही पदार्थ चांगले बॅक्टेरिया मारतात, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

कधीकधी चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे आतड्यांवर गंभीर परिणाम होते. आतड्यांना झालेल्या नुकसानीमुळे बद्धकोष्ठता, क्रोहन रोग, कोलायटिस, कर्करोग यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. याबाबतीत पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी आतड्यांसाठी कोणते पदार्थ घातक ठरतात याची माहिती दिली आहे.

*साखर...*
पदार्थात गोडवा वाढवण्यासाठी साखर आवश्यक आहे. पण हीच साखर आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरत आहे. तज्ज्ञांचे मते, साखरेचे अतिसेवन केल्याने आतड्यांमधील निरोगी जीवाणू नष्ट होतात, ज्यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते. साखरेचे प्रमाणाबाहेर सेवन केल्याने कॅलरीज देखील वाढते.

*आर्टिफिशियल स्वीटनर...*
आर्टिफिशियल पदार्थ पचण्यास जड जातात. कृत्रिम स्वीटनर खाल्ल्याने आतड्यांमध्ये हानिकारक बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे शरीरात इतर रोगांची संख्या वाढू शकते. कृत्रिम स्वीटनर्स इम्यून रेस्पोंस वाढवतात, ज्यामुळे जळजळ होऊ शकते. शुगरचे पेशंट सर्रास  कृत्रिम सुगर वापरतात हे खूप हानिकारक आहे.

*अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड...*
मीठ, फॅट्स आणि साखर अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडच्या लिस्टमध्ये येतात. ज्यात मैदाचा देखील समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थाचे अति प्रमाणात सेवन केल्याने, आतड्यातील मायक्रोबायोटा बदलू शकते. ज्यामुळे खाल्लेले पदार्थ पचण्यास अवघड जाते.उदा. बिस्कीटचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास गंभीर आजार उद्भवतात.

*फ्राइड फूड्स...*
नव्या पिढीला तळलेले पदार्थ प्रचंड आवडतात, पण प्रमाणाच्या बाहेर हे पदार्थ खाल्ल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते. जर आपण तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खात असाल तर, आतडे खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हॉटेलमध्ये एकाच तेलामध्ये वारंवार तळले जाते त्यामुळे लहान आतड्याचे नुकसान जास्त प्रमाणात होते. वनस्पती तेलांमध्ये ओमेगा -6 पेक्षा ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आतड्यांवरील लाइनिंगचे नुकसान होऊ शकते.
  

*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*

कंबर दुखी, पाठदुखि , मानदुखी, खांदेदुखि, स्पाँडिलायसिस, संधीवात, rheumatoid arthritis.**हे सर्व वातविकार प्रकार आहेत.*

*कंबर दुखी, पाठदुखि , मानदुखी, खांदेदुखि, स्पाँडिलायसिस, संधीवात, rheumatoid arthritis.*
*हे सर्व वातविकार प्रकार आहेत.*

*१.स्पाँडिलायसिस हा रोग नाही.*           
*२.ही शरीरातील (काही भागापुरती)* 
*झीज आहे.*
*३.एक प्रकारे वार्धक्य असही आपण म्हणू शकतो.*
*४.पाठीत ऊसण भरणे -* 
*हे स्पाँडिलायसासमुळे होऊ शकत.*
*५.मान तिरपावणे -*                   
*हे स्पाँडिलायसासमुळे होऊ शकत.*
*६. पाठीत ऊसण भरणे, मान तिरपावणे, स्पाँडिलायसीस, या सर्वासाठी पुढे सांगितलेली काळजी घेणे जरुर आहे. -----*

 *सकाळी कोवळ्या उन्हात उभे राहून रोज विटामिन डी नैसर्गिक रित्या  घ्या*

जिरे आणि ओवा चिमूटभर दिवसातून चार ते पाच वेळा खा. तसेच दिवसभरात केव्हाही पाणी गरमच प्या.

मेथी रात्री पाण्यात भिजत टाका.
सकाळी ते पाणी प्या, व भिजवलेली मेथी चावून खा.

मेथीची पाने वाटून पेस्ट करून सांध्यावर लावा अथवा मेथी दाणे पेस्ट करून दुखर्‍या जागेवर लावा.

मेथी  भिजवून मटकी ला मोड आणतात तसे आणा. तेल मीठ न घालता पांढरा कांदा घालून भाजी करा. ज्वारी भाकरी सोबत चपाती नाही फक्त एवढेच दोन तीन वेळा १५ दिवस खाणे दुसरे काही नाही. खाणे.

त्रिफळा चूर्ण व गूळ एकत्र करून रात्री झोपण्याच्या आधी गरम पाण्याबरोबर घ्या

डिंकाचा खडा चघळा
किंवा डिंकाचे लाडु करुन खा.

पारिजातकाची १०-११ पाने वाटून चटणी करा, ती पाण्यात ऊकळवा, थंड करुन प्या.
तीन महिने घ्या --- नंतर २० दिवस सोडून --- परत तीन महिने घ्या. 
अशा प्रकारे करा आराम वाटेल.

रोज एक किंवा दोन महायोगीराज गुग्गुळ गोळी घ्या.    किंवा
महारास्ना काढा घ्या.

१चमचा हळद+१चमचा पीठीसाखर+कणभर खायचा चूना+थोड पाणी घालुन एकजीव करा व तो लेप उसण भरली असेल तीथे लावा. ७ दिवस लावा.

दुखद बाव लेप लावा.

महानारायण तेलाने माॅलीश करणे.

दुखर्‍या भागावर शेक घ्या.
त्यासाठी गरम पाण्याची पीशवी
किंवा   ईलेक्ट्रीकची ऊशी
किंवा   विटेचा तुकडा शेगडीवर गरम करुन फडक्यात गुंडाळून शेकु शकता.
महत्वाचा ऊपाय शेक आहे. औषध फक्त वेदाना कमीकरण्यापूरतीच असतात. एकदा आखडलेला भाग सुटला कि दुखण आपोआपच बर होत असत.

*ही दक्षता घ्या.......*
जरुशिवय पुढे वाकायच नाही, वेळ आलीच तर काठी घ्या.
शक्यतो जड ऊचलायच नाही. कुठेही बसतांना पाठ ताठ राहील याची दक्षता घ्यायची. 
बॅकबेंडींगची आसने योगासन शिकवणार्‍याकडुन शिकून घेवुन करायची.          
झोपायला पातळ गादी व पातळ ऊशी घ्या. कुशिवर झोपतांना दोन ढोपरांमधे जाड ऊशी घ्या.

हाडमोडीवर  अर्जुन सादडा
अर्जुनसादडा - सालीचे चुर्ण + १ग्रॅमतुप +१ग्रॅम राखर घालुन सकाळ संध्याकाळ घ्याव
 *कोणतेही हाडाचे दुखणे व्यायाम केल्याशिवाय कायमचे  बसणार नाही. पेन किलर खाणे योग्य नाही. जास्त त्रास होत असल्यासच पेन किलर  घ्यावी*
            परंतु
 
🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒💥🍓💥🍓💥🍓💥🍓💥🍓💥🍓💥🍓

ज्वारीच्या भाकरीचे महत्व* *!! रामबाण !!*

*ज्वारीच्या भाकरीचे महत्व* 
        *!! रामबाण !!*
“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन १४ किलोनी कमी झालं.” 

“माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स काढून फेकून दिले.”

“गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.”

“माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”

“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…” वगैरे सुधारले...

गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते.  काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात. 

*जेवणात का खावी ज्वारीची भाकरी… ?*

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. 

ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते. 

बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.

तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.

ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.

भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

*ज्वारीचे फायदे*

1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.

2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.

3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.

4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.

5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.

7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.

8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.

9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.

10) शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

11) काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.

*ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या, 
ज्वारीचा आहारामध्ये अपयोग करा ,रोग पळवा 



*विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून वाचावा व ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा*

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...