बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

शरीरातील रक्त वाढवणे, हिमोग्लोबिन HEMOGLOBIN चे नियंत्रण व अशक्तपणा दुर करणारे काही उपाय.**

*शरीरातील रक्त वाढवणे, हिमोग्लोबिन HEMOGLOBIN चे नियंत्रण व अशक्तपणा दुर करणारे काही उपाय.**

१एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून त्यात एक चमचा मध घालून प्या.  हा उपाय दररोज केल्यास, रक्त लवकर वाढते.

 २. अशक्तपणाच्या त्रासात पालक औषधासारखे कार्य करते.  पालक अ, क, बी 9, लोह, फायबर आणि कॅल्शियम जीवनसत्त्वे भरपूर असतात.
 पालक एकाच वेळी वीस टक्के पर्यंत लोह वाढवू शकतो.  पालक भाजीपाला आणि सूप म्हणून वापरला जाऊ शकतो.

 ३ रक्त वाढवण्यासाठी टोमॅटो खूप उपयुक्त आहे.  दररोज एक ग्लास टोमॅटोचा रस प्याल्याने  रक्त लवकर बनते. याशिवाय आपण सफरचंद आणि टोमॅटोचा रस मिसळून  ही टोमॅटो सूप पिऊ शकता.

 ४ मक्याचे दाणे शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यासाठी देखील फायदेशीर आहे.  ते पौष्टिक आहेत आणि उकडून खाऊ शकतात.

 ५ एका ग्लास बीट  रसात थोडे मध मिसळून ते पिण्यामुळे शरीरात लोहाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते ज्यामुळे शरीरात रक्त तयार होते.

६सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे.  अशक्तपणाच्या रूग्णासाठी फायदेशीर ठरते.  आपण सोयाबीनचे उकळवून ते खाऊ शकता.

७डाळिंबाच्या रसामध्ये थोडासे सैंधव आणि थोडीशी मिरपूड मिसळून दररोज ते प्यायल्यास शरीरातील लोहाची कमतरता कमी होण्यास मदत होते.

८गुळा सोबत शेंगदाणा  खाल्ल्याने शरीरात लोह वाढते.

 ९हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, लसूणमध्ये थोडे सैधव मिसळा आणि चटणी बनवा. रोज खाल्यास हिमोग्लोबिनवर वाढण्यास मदत होते.

 १०. शरीरात रक्ताचा अभाव पूर्ण करण्यासाठी दूध आणि खजूर हा देखील एक चांगला उपाय आहे.  हा उपाय करण्यासाठी, दुधामध्ये खजूर घाला आणि निजायची वेळ आधी दूध प्या.  दूध प्यायल्यानंतर खजूरही खा.

*अशक्तपणाचा आयुर्वेदिक उपचार: अशक्तपणाचा आयुर्वेदिक उपचार ...*

 ११. रक्त वाढविण्यासाठी गुळवेलीचा रस सर्वोत्तम आहे.

  १२आवळा आणि जांभूळ रस समान प्रमाणात मिसळल्यास शरीरात हिमोग्लोबिनची पातळीही वाढते.

 १३ शिंगाडा  खाण्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते आणि शरीराला सामर्थ्य मिळते.

 १४आंब्याच्या रस दुधा बरोबर सेवन केल्यास शरीरात हिमोग्लोबिनही वाढते.

१५ दोन चमचे तीळ पाण्यात भिजवा आणि दोन ते तीन तासांनंतर त्यांना पाण्यातून उपसून घ्या आणि बारीक करून पेस्ट बनवा.आता एक चमचा मध मिसळा आणि दिवसातून दोनदा खा.  या मुळे शरीरात रक्ताची वाढ झपाट्याने होऊ लागते.

 शरीरात रक्ताची कमतरता भागवण्यासाठी बरेच डॉक्टर लोह आणि व्हिटॅमिन गोळ्या किंवा कोणतेही परिशिष्ट घेण्याची शिफारस करतात.
 औषध घेण्याव्यतिरिक्त, आपण आहारात काही निरोगी अन्न जोडून नैसर्गिक मार्गाने रक्त वाढवू शकतो.

 *हीमोग्लोबिन बूस्टिंग फूडः हेमोग्लोबिन बूस्टिंग फूड ...*

 १. आपल्या आहारात मोहरी, पालक, कोथिंबीर आणि पुदीनाची पाने घाला.

 २. फळांमध्ये सफरचंद, पपई, चिकू, लिंबू आणि पेरू खा.

 ३ पिस्ता आणि अक्रोड यासारखी ड्रायफ्रूट खाल्ल्याने रक्तातील लोहाचे प्रमाणही वाढते.

 ४आपल्या आहारात कोरडी द्राक्षे, मनुके, धान्ये, गाजर आणि डाळीचे सेवन करा.  दररोज ते खाल्ल्याने शरीरात रक्त वाढते.

 ५मुग, हरभरा, मठ आणि गहू मोड आलेले एकत्रित करून त्यात लिंबू व मध मिसळून सकाळी  दोन अडीच मुठ खा.  सकाळी रिकाम्या पोटी ते खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये मिळतात, जे अशक्तपणावर उपचार करण्यास मदत करते.

*शरीरामध्ये रक्त HEMOGLOBIN वाढवण्यासाठी काय करावे?* 

बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते
अशावेळी

👉 मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम.
👉 आहारात सिझनल फळांचा  समावेश करा.
👉 गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे,
👉🏻 राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे.
 👉 सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त वाढीसाठी गुणकारी आहे
👉 सुकामेवा शेंगदाणे खावे, 
अंजीर भिजवून खाणे, मक्याचे कणीस खाणे, दूध आणि खजूर, सोयाबीन खावे, पालक अंबाडी चुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून फळभाज्याचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा, नियमित खाव्यात.

निरोगी आयुष्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे आपण याआधी पाहिले आहे.

निरोगी आयुष्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे आपण याआधी पाहिले आहे.

आज आपण पाणी पिण्याच्या योग्य वेळा कोणत्या व त्याने काय फायदे होतात ते पाहू.

१. *सकाळी उठल्या उठल्या लगेच: १-२ ग्लास पाणी प्यावे*
याने आपला मेंदू आणि शरीर स्लिप मोड मधुन ग्रीड मोड मध्ये येतात. आपले अंतर्गत अवयव शुद्ध आणि स्वच्छ होतात. आतड्यांवर दबाव येऊन पोट साफ व्हायला मदत होते.

२. *जेवणाआधी ३० मिनिटे: १ ग्लास पाणी*.
यांनी आपली पचनक्रिया सुधारते आणि कॅलरी इंटेक कंट्रोल मध्ये राहतो.

३. *व्यायामाच्या आधी व नंतर १-१ ग्लास पाणी पिणे*.
व्यायामाच्या आधी प्यालेले पाणी आपल्या शरीराला व्यायामासाठी वॉर्मअप सारखे तयार करते.

व्यायामानंतर प्यालेले पाणी आपल्याला डीहायड्रेशन पासून वाचवते.

हेवी व्यायाम केल्यावर किंवा गर्म्याच्या दिवसात जास्त पाणी प्यावे.

४. *आंघोळीच्या आधी: १ ग्लास पाणी*.
कोमट पाणी प्याल्याने आपल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि आपले ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होते.

५. *झोपायच्या आधी: १ ग्लास पाणी प्यावे*.
झोपण्याआधी जर आपण हायड्रेटेड असलो तर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस कमी होतात. कारण घट्ट रक्त हार्ट अटॅकचे मुख्य कारण आहे.

६. *जेव्हा तुम्ही खूप थकलेले असाल: १ ग्लास पाणी*.
पाणी आपल्या मेंदूला पावर अप करते. Noggin's Fluids ची पातळी वाढते आणि आपल्या cognitive functions मध्ये सुधारणा होते.

जेव्हा तुम्हाला एखादे प्रेसेंटेशन द्यायचे असेल त्याआधी १ ग्लास पाणी प्या.

जेव्हा झोप येत असेल आणि झोपणे शक्य नसेल तेव्हा पण एक ग्लास पाणी प्या.

निसर्ग उपचार तज्ञ


गुडघेदुखीवर शेवगा शेंगाचे सूप*

*गुडघेदुखीवर शेवगा शेंगाचे सूप*

गुडघेदुखीचे अनेक प्रकार आहेत. सर्वांना वेगवेगळे इलाज आहेत. पण त्यातल्या त्यात अशक्तपणा व रज्जू क्षयाने येणारी गुडघेदुखी हि सामान्य आजार आहे. ती थांबवण्यासाठी बिन खर्चिक उपाय आहे. रसायन मिश्रित औषधे फार तर या आजारावर वेदनाशमणाचेच काम करतात.परंतु कायम स्वरूपी  गुडघे दुखी घालवायची असेल तर दररोज सकाळी शेवग्याच्या दोन शेंगांचे सूप एक आठवडा भर घ्यावे. कोणतीही गुडघेदुखी कंबर दुखी हात पाय संधिवात " हाडे दुखणे   त्यासाठी कॅल्शियमचे भरपूर प्रमाणात सेवन करणे हाच उत्तम उपाय.

*सूप करण्याची पद्धत*

शेवग्याचा दोन शेंगा कापून घ्या 
दोन ग्लास पाण्यात
दोन लसणाच्या पाकळ्या, किंचित गुळ, अर्धी हिरवी मिरची उकडून घ्याव्यात शेंगा पूर्ण उकडल्यानंतर त्यांचा गर देखील कुस्करून घ्या त्यात चवी पुरते काळे मीठ टाका. हे सारे मिश्रण स्वच्छ वस्त्राने गाळून घ्या. नंतर परत त्या पाण्याला एक उकळी येवू द्या. साधारण एक ग्लास सूप होईल इतके आटवा. चवी साठी वर कोथिंबीर टाकायची असल्यास टाका. आणि गरमागरम असतानाच हे सूप घ्या. नैसर्गिक रित्या कॅल्शियम मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मोरिंगा. मोरिंगा म्हणजेच शेवगा हप्त्यातून दोन वेळा भाजी खाल्ली तरी चालेल.

काकडी*

*काकडी*
🥒🥒🥒🥒🥒
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून दिले जाते आणि यामध्ये असलेले सॉल्युबल फायबर्स पोट साफ करतात. यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो तसेच अन्नपचन व्हायला खूप मदत मिळते. 
🥒🥒🥒🥒🥒🥒
यासोबतच यामध्ये इरेप्सिन नावाचे अ‍ॅन्झाइम असते जे पोटासाठी खूप चांगले असते. हे खाल्ल्यामुळे अल्सर, बद्धकोष्ठ, अपचन यासारखे पोटाशी संबंधित आजार होत नाहीत.
🥒🥒🥒🥒🥒🥒🥒
काकडीमध्ये पाण्यासह फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि पोटॅशिअम सारखी पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असता.
🥒🥒🥒🥒🥒🥒
याशिवाय काकडीमध्ये व्हिटॅमिन – बी, ए आणि ॲंटी-ऑक्सीडेंट्सही मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला अनेक लाभ मिळू शकतात. फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या समस्यांपासून ॲंटी-ऑक्सीडेंट्स शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.
🥒🥒🥒🥒🥒🥒


बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे.....*

*बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे.....*

आयुर्वेदात अशा अनेक वनौषधी आणि वनस्पती आहे, ज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे यातिल बाभळीच्या शेंगांना फार मौल्यवान मानले जाते. खुपच गुणकारी आहे तर बघू या फायदे...

  *(१)गुडघेदुखी कमी होते...*
बाभळीच्या शेंगांचे चूर्ण उपयुक्त आहे. व्रुध्दापकाळात सांधेदुखी, ही सामान्य समस्या आहे आणि गुडघेदुखी तर चाळीशीनंतर चालू होते. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे हे चूर्ण कोणत्याही आयुर्वेद शाॅपला नक्कीच मिळेल, याने काही दिवसांतच गुडघेदुखीला आराम मिळेल..

*(२)डोकेदुखी दूर होते.*.* वाढता ताण-तणाव, चिंता, धावपळ, यामुळे. सतत डोकेदुखी असणं ही समस्या घरोघरी आढळून येते, अशा वेळी बाभुळ शेंगाचि पावडर कोमट पाण्याबरोबर घ्यावी, लगेच आराम मिळतो..

*(३) स्त्रियांसाठी शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे...*
आजकाल बहुतेक महिलांना ल्यूकोरिया चा त्रास होतो, श्वेतप्रदर, पांढरे पाणी जाणे, अशा समस्या बहुतेक महिलांना होतात. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने आराम मिळतो नक्कीच.

*(४) पुरुषांसाठी या शेंगांचे चूर्ण फायदेशीर ठरते...*
बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पुरुषांना देखील फायदेशीर आहे. ज्यांना धातूक्षयाचा त्रास असेल. त्यांनी हि पावडर. नियमितपणे कोमट पाण्याबरोबर घेतल्यास फायदा होतो. वंध्यत्व दूर होते.

*(५) पाठदुखी कंबरदुखी...* या त्रासात आराम देण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे. एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यामुळे पाठदुखी कंबरदुखी चा त्रास होतो, आजकाल बहुतेक लोक बसून काम करतात त्यामुळे पाठदुखी देखिल सामान्य समस्या आहे, तेव्हा हि पावडर उपयुक्त ठरते, जेवणानंतर एक चमचा भरून चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने छान आराम मिळतो नक्कीच. जमल्यास हि पावडर दूधासोबत घेतल्यास स्नायू बळकट होतात.

*(6) जूलाबाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे...*
बरेच वेळा, बाहेरच्या खाण्यामुळे, पोट खराब होऊन पातळ जुलाब होतात, अतिसार होतो, गळल्यासारखे होते, यांच्यावर शेंगांचे चूर्ण हे रामबाण औषध आहे, थोडं चूर्ण पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो.

*(७) अशक्तपणा, कमजोरी वाटणे, यावर जर तुम्ही शारिरीक दृष्ट्या अशक्त असाल तर तुम्ही बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पाण्यात किंवा दुधात मिसळून रोज एक वेळा सेवन करू शकता आणि वाटलं तर मधात मिसळून चाटण म्हणून घ्या. 

.तेव्हा वरील फायदे बघता बाभळीच्या शेंगांचे चूर्ण अतिशय मौल्यवान औषध आहे आणि सहज आयुर्वेद दुकानात मिळतं. जरुर हि पावडर घरात असू द्यावी.


उजव्या बाजूला पोटात दुखणे याची कारणे*

*उजव्या बाजूला पोटात दुखणे याची कारणे* 

काहीवेळा आपल्या पोटात उजव्या बाजूला वेदना होऊ लागतात. या पोटदुखीची वेगवेगळी कारणे असू शकतात. कारण आपल्या पोटात उजव्या बाजूस यकृत, पित्ताशय, आतड्याचा उजवीकडील भाग, अपेंडिक्स, उजव्या बाजूची किडनी तसेच स्त्रियांमध्ये right ovary असे अवयव असतात, त्यामुळे विविध कारणांमुळे उजव्या बाजूला पोटदुखी होऊ शकते. पोटात उजव्या बाजूला दुखणे याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.

*पचनासंबधित गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता (Constipation) :*
◼️गॅस्ट्रोएन्टेरिटिस, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), IBD, अन्न विषबाधा अशा कारणांनी उजव्या बाजूस पोटात दुखू लागते.
◼️अपेंडिक्सला सूज आल्याने पोटात उजवीकडे दुखते.
◼️उजव्या किडनीत स्टोन किंवा इन्फेक्शन झाल्याने पोटात उजव्या बाजूला दुखते.
◼️हर्नियामुळे सुध्दा काहीवेळा उजव्या बाजूला पोटदुखी होते.
◼️यकृताला सूज येणे, यकृताचे आजार तसेच पित्ताशयातील खडे यामुळेही उजव्या बाजूला पोटात दुखू लागते.
◼️स्त्रियांमध्ये मासिक वेळी, तसेच गरोदरपणात Ectopic pregnancy मुळे उजव्या बाजूला पोटात दुखू शकते.

*कधी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे ? :*
खालील लक्षणे जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता, तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जावे.
◼️पोटात उजव्या बाजूला अतिशय वेदना होणे,
◼️छातीत दुखणे,
◼️ताप येणे,
◼️शौचावाटे रक्त पडणे,
◼️लघवीतून रक्त पडणे,
◼️उलट्या होणे,
◼️उलटीतून रक्त पडणे,
◼️ त्वचा पिवळसर होणे,
◼️पोटावर सूज येणे
अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जावे.

*पोटात उजव्या बाजूला दुखणे यावर घरगुती उपाय :*
◼️अर्धा कप पाण्यात लिंबू रस व काळे मीठ घालून ते मिश्रण प्यावे.
◼️गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे उजव्या बाजूला पोटात दुखणे थांबते.
◼️आल्याचे तुकडे पाण्यात घालून ते पाणी उकळावे. मिश्रण कोमट झाल्यावर ते पाणी अर्धा कप प्यावे.
◼️चहामध्ये आले टाकून काळा चहा प्यावा.
◼️डाळिंबाच्या दाण्यात थोडे काळे मीठ मिसळून ते दाणे खाल्याने उजव्या बाजूला पोटात दुखणे थांबते.
◼️पोटावर गरम शेक घ्यावा.
◼️हे घरगुती उपाय खानपान संबंधित गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता अशा कारणांमुळे पोटात उजव्या बाजूला दुखत असल्यास उपयोगी पडतात. मात्र जर इतर गंभीर कारणामुळे पोटात उजवीकडे दुखत असल्यास त्यावर घरगुती उपाय करीत वेळ वाया घालवू नये. अशावेळी तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.
✍️गजानन गोपेवाड

पचनसंस्थेसाठी काही घरगुती उपाय.* उत्तम औषध बडीशोप

*पचनसंस्थेसाठी काही घरगुती उपाय.*
 उत्तम औषध बडीशोप 

रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते ( जेवणानंतरच खावी. ). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते.

पोटात गॅस होऊ देत नाही व चिकटपणा/आमांश दूर करते.

अपचनाच्या सर्व तक्रारींत..
 बडिशेप, काढा वा अर्क वापरता येतो. उदा. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे इ. थोडक्यात, सर्व पचनसंस्थेसाठी उपयोगी आहे. जेवणानंतर एक चमचा बडिशेप रोज दोन वेळा खावी.

मुलांना दात येताना... जुलाबाचा त्रास होतो, त्यासाठी चुन्याच्या निवळीसह बडीशेप चूर्ण घ्यावे.
भूक लागत नसेल तर रोज बडिशेप खावी. त्यासाठी शक्य असेल तर एक चमचा बडिशेप चूर्णात दोन चमचे मध टाकून त्याचे चाटण रोज एक वेळा घ्यावे.

तापामध्ये अंगाची आग होत असेल.
जिभेला शोष पडत असेल तर बडिशेपेचा काढा खडीसाखर घालून प्यायला द्यावा.. 

 लघवी कमी होत असेल.
तसेच लघवीला जळजळ किंवा आग होत असेल तर एक चमचा बडिशेपेचा काढा करून प्यावा.


 कोरडा खोकला
 असेल तर, एक चमचा बडिशेप चूर्ण + एक चमचा पत्री खडीसाखर बरोबर घेणे.

सूज व वेदना.
असतील तर बडिशेप, सैंधव पूड व ओवा समभाग घेऊन तव्यावर गरम करून त्यांची रुमालात पुरचुंडी करून शेकावे.

बडीशेप सरबत.
बडिशेप ४ वा ५ चमचे घेऊन ती एका भांड्यात पाणी भरून त्यात टाकून रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी हे मिश्रण १० मिनिटे उकळावे व गाळून त्यात ४ वा ५ चमचे खडीसाखरेचा पाक करून घालावा. म्हणजे चांगले सरबत तयार होते.
उपयोग - या सरबतामुळे भूक वाढते, पचनशक्ती सुधारते, उष्णता कमी होते. शिवाय ते पौष्टिक आहे.

स्वादिष्ट विरेचन चूर्ण..
बडिशेप, ज्येष्ठमध व सोनामुखी प्रत्येकी १५० ग्रॅम एकत्र करून त्यांची पूड करावी. त्यात ३०० ग्रॅम खडीसाखर पूड करून मिसळावी म्हणजे हे विरेचन चूर्ण तयार होते. उपयोग - रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्यावे.
त्याने पोट साफ होते. तसेच मूळव्याध, तोंड येणे इ. उष्णताविकार व त्वचाविकार बरे होतात.
 बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस 

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रसदेखील पोटातील गॅस दूर करण्यासाठी उपयुक्त असते. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा बेकिंग मिसळा आणि ते प्याव. यामुळे पोटातील गॅसपासून त्वरित आराम मिळतो.जास्त वेळा चहा पिणे हे पोटात गॅस (Stomach Gas) तयार होण्याच्या लक्षणांपैकी एक आहे. ...

ओवा
ओव्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असते, जे गॅस्ट्रिक रस स्राव (Gastric Juice) करते आणि पचनास मदत करते. ...
जिऱ्याचे पाणी
गॅसच्या समस्येवर जिरे पाणी हा उत्तम घरगुती उपाय.

आले आणि लसूण:

 आले आणि लसूणमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म पोटातील गॅस कमी करण्यास मदत करतात.

जिरे पाणी 

एका ग्लास गरम पाण्यात थोडेसे जिरे मिसळून ते पिणे हा देखील एक चांगला घरगुती उपाय आहे.

धणे पाणी 
धणे पाण्यात भिजवून ते बारीक करून पाण्यात मिसळून प्यायल्यानेही गॅसपासून आराम मिळतो.

योगासन पवनमुक्तासन आणि वज्रासन यासारखे काही योगासन पोटातील वायू कमी करण्यास मदत करू शकतात.

नैसर्गिक चहा

 आल्याचा किंवा पुदिन्याचा चहा प्यायल्याने पोटातील वायू कमी होण्यास मदत होते

शक्य झाले तर सूर्य नमस्कार घालावे .

प्रत्येक अवयवाला व्यायाम होईल .

ताजे अन्न खा .

जड अन्न खाणे बंद करावे .

सकाळी उठून गरम पाण्यातून लिंबू घ्या .

सकाळी फिरायला जावे .

रात्री झोपताना चार थेंब एरंडेल तेल बेंबीत सोडा

याने संडास साफ होईल .

रोज पालेभाज्या खाणे उत्तम .

वडा पाव सामोसे असे पदार्थ कमी खायचे .

फारच त्रास होत असेल तर रात्री झोपताना अर्धा चमचा त्रि फळा चूर्ण घेऊन वर कोमट पाणी प्या .

तेव्हा भरपूर आणि काहीही खायची इच्छा असेल तर त्या प्रमाणात भरपूर व्यायाम देखील करा. गॅसेसचा त्रास होणार नाही.

व्यायाम करायची इच्छा नसेल किंवा विविध कारणांनी व्यायाम करणे शक्य होत नसेल तर जेवण साधे आणि सात्विक करा. लौकर पचणारे फळ आणि सॅलडसारखे पदार्थ जास्त प्रमाणात खा. गॅसेसची तक्रार येणार नाही. 

लेखन✍️ गजानन गोपेवाड

सतत झोप आल्या सारख वाटणे, काम करण्याची

*सतत झोप आल्या सारख वाटणे, काम करण्याची इच्छा नसणे, दिवसभर जांभळ्या येणे, अशक्त पणा वाटणे अश्या समस्यांना त्रासलेले आहेत तर ही पोस्ट तुमच्या साठी…* 

*झोप पूर्ण न होणे* 
                       आपल्या शरीराला किमान 7 ते 8 तास शांत झोपेची आवश्यकता असते. रात्री झोपताना मोबाईल, टॅबचा वापर केल्यानं लवकर झोप लागत नाही. काही वेळा झोपेत मध्येच आपण दचकून उठतो. भीतीनं किंवा टेन्शनमुळेही झोप पूर्ण होत नाही. मेंदू थकल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.

 *प्रमाणापेक्षा जास्त खाणे*
                          आपण आपला आहार हा थोडी भूक राखून घेतला पाहिजे म्हणजे आपण खाल्लेले अन्न व्यवस्तीत पचेल सुरवातीला जेवण कमी झालं असं वाटलं पण नंतर आपणास सवय लागून जाते.

 *पुरेसा व्यायाम न करणे* 
                          आपल्या शरीराला उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी किमान रोज सकाळी 30 मिनिटं वेगवेगळे व्यायाम करणं आवश्यक आहे. व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण चांगलं होतं. शरीरातील पेशी अधिक चांगल काम करतात तुम्ही दिवसभर उत्साही आणि आनंदी राहता.

 *आहारात प्रथिनांचं प्रमाण कमी* 
                                     तुमच्या आहारात भरपूर फळ, अंड, दूधाचा वापर करायला हवा. प्रथिनांचा वापर करायला हवा. चीज, मासे, दही, योगर्ट शेंगदाण्याचा वापर आहारात करा. फास्ट फूड पचनासाठी जड असतं. ते खाणं टाळा. वेळेवर आहार घ्या.

 *साखरयुक्त पदार्थांचं सेवन टाळा* 
                             साखरेचं प्रमाण अति असणारे गोड पदार्थ तुम्हा वारंवार खात राहिलात तर तुम्हाला आळस येऊ शकतो. त्यामुळे दिवसभर मरगळलेले किंवा थकलेलं वाटू शकतं. साखरेचं प्रमाण कमी असणारे पदार्थ खाण्यावर भर द्या.

 *शरीरात लोहाची कमतरता* 
                            आपल्या शरीरातील हिमोग्लोब्लीन किंवा रक्त कमी झालं तरीही आपण काहीही काम न करता आपल्याला दमल्यासारखं होतं. खूपदा डोकं दुखतं आणि चक्करही येते. त्यामुळे तुमच्या आहारात पालेभाज्या, हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी आवश्यक असणारी फळ, खाद्यपदार्थ खाणं आवश्यक आहे.

 *ताणतणाव* 
                        कामाच्या ठिकाणी किंवा घरातही काही वेळ तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. गाणी ऐकणं, चित्र कारणं, फिरणे काहीही जे तुम्हाला आवडतं ते. ज्यामुळे तुम्हाला आलेला ताण कमी होईल. किंवा कामाच्या टेन्शनपासून काही वेळ स्वत:ला लांब ठेवा त्यामुळे तुमचा मूड फ्रेश होईल आणि अधिक जोमानं काम करू शकाल. रागावर नियंत्रण ठेवा. राग येत असेल तर लक्ष दुसरीकडे ठेवून आनंदी राहण्याचा प्रयत्न  करा 


*लेखन. गजानन गोपेवाड*
🍑🍇🍒🍇🍒🍇🍒🍑🍒🍇🍒🍑🍒🍇🍒🍑🍓🍑🍓🍑🍓🍑🍒🍑🍒🍇🍒🍑🍒

*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*


सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

हे ४ पदार्थ आहेत सायलेंट किलर! खाताना चविष्ट वाटतात, पण खाणार तो पस्तावणार.....*

*हे ४ पदार्थ आहेत सायलेंट किलर! खाताना चविष्ट वाटतात, पण खाणार तो पस्तावणार.....*

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आतडे निरोगी आणि मजबूत ठेवणे आवश्यक आहे. आपण जे काही खातो - पितो ते आतड्यांमधून जाते. आतड्यांचे काम अन्नापासून पोषण वेगळे करणे, व हे पोषण शरीराच्या इतर भागापर्यंत पोहचवणे, यासह शरीरातील घाण बाहेर काढणे हे आहे. आतड्यांच्या कामावर परिणाम झाला तर, साहजिक पचनसंस्था बिघडू शकते. ज्यामुळे शरीरात गंभीर आजार उद्भवतात. आतड्यांमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात. काही पदार्थ चांगले बॅक्टेरिया मारतात, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

कधीकधी चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे आतड्यांवर गंभीर परिणाम होते. आतड्यांना झालेल्या नुकसानीमुळे बद्धकोष्ठता, क्रोहन रोग, कोलायटिस, कर्करोग यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. याबाबतीत पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी आतड्यांसाठी कोणते पदार्थ घातक ठरतात याची माहिती दिली आहे.

*साखर...*
पदार्थात गोडवा वाढवण्यासाठी साखर आवश्यक आहे. पण हीच साखर आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरत आहे. तज्ज्ञांचे मते, साखरेचे अतिसेवन केल्याने आतड्यांमधील निरोगी जीवाणू नष्ट होतात, ज्यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते. साखरेचे प्रमाणाबाहेर सेवन केल्याने कॅलरीज देखील वाढते.

*आर्टिफिशियल स्वीटनर...*
आर्टिफिशियल पदार्थ पचण्यास जड जातात. कृत्रिम स्वीटनर खाल्ल्याने आतड्यांमध्ये हानिकारक बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे शरीरात इतर रोगांची संख्या वाढू शकते. कृत्रिम स्वीटनर्स इम्यून रेस्पोंस वाढवतात, ज्यामुळे जळजळ होऊ शकते. शुगरचे पेशंट सर्रास  कृत्रिम सुगर वापरतात हे खूप हानिकारक आहे.

*अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड...*
मीठ, फॅट्स आणि साखर अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडच्या लिस्टमध्ये येतात. ज्यात मैदाचा देखील समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थाचे अति प्रमाणात सेवन केल्याने, आतड्यातील मायक्रोबायोटा बदलू शकते. ज्यामुळे खाल्लेले पदार्थ पचण्यास अवघड जाते.उदा. बिस्कीटचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास गंभीर आजार उद्भवतात.

*फ्राइड फूड्स...*
नव्या पिढीला तळलेले पदार्थ प्रचंड आवडतात, पण प्रमाणाच्या बाहेर हे पदार्थ खाल्ल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते. जर आपण तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खात असाल तर, आतडे खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हॉटेलमध्ये एकाच तेलामध्ये वारंवार तळले जाते त्यामुळे लहान आतड्याचे नुकसान जास्त प्रमाणात होते. वनस्पती तेलांमध्ये ओमेगा -6 पेक्षा ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आतड्यांवरील लाइनिंगचे नुकसान होऊ शकते.
  

*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*

कंबर दुखी, पाठदुखि , मानदुखी, खांदेदुखि, स्पाँडिलायसिस, संधीवात, rheumatoid arthritis.**हे सर्व वातविकार प्रकार आहेत.*

*कंबर दुखी, पाठदुखि , मानदुखी, खांदेदुखि, स्पाँडिलायसिस, संधीवात, rheumatoid arthritis.*
*हे सर्व वातविकार प्रकार आहेत.*

*१.स्पाँडिलायसिस हा रोग नाही.*           
*२.ही शरीरातील (काही भागापुरती)* 
*झीज आहे.*
*३.एक प्रकारे वार्धक्य असही आपण म्हणू शकतो.*
*४.पाठीत ऊसण भरणे -* 
*हे स्पाँडिलायसासमुळे होऊ शकत.*
*५.मान तिरपावणे -*                   
*हे स्पाँडिलायसासमुळे होऊ शकत.*
*६. पाठीत ऊसण भरणे, मान तिरपावणे, स्पाँडिलायसीस, या सर्वासाठी पुढे सांगितलेली काळजी घेणे जरुर आहे. -----*

 *सकाळी कोवळ्या उन्हात उभे राहून रोज विटामिन डी नैसर्गिक रित्या  घ्या*

जिरे आणि ओवा चिमूटभर दिवसातून चार ते पाच वेळा खा. तसेच दिवसभरात केव्हाही पाणी गरमच प्या.

मेथी रात्री पाण्यात भिजत टाका.
सकाळी ते पाणी प्या, व भिजवलेली मेथी चावून खा.

मेथीची पाने वाटून पेस्ट करून सांध्यावर लावा अथवा मेथी दाणे पेस्ट करून दुखर्‍या जागेवर लावा.

मेथी  भिजवून मटकी ला मोड आणतात तसे आणा. तेल मीठ न घालता पांढरा कांदा घालून भाजी करा. ज्वारी भाकरी सोबत चपाती नाही फक्त एवढेच दोन तीन वेळा १५ दिवस खाणे दुसरे काही नाही. खाणे.

त्रिफळा चूर्ण व गूळ एकत्र करून रात्री झोपण्याच्या आधी गरम पाण्याबरोबर घ्या

डिंकाचा खडा चघळा
किंवा डिंकाचे लाडु करुन खा.

पारिजातकाची १०-११ पाने वाटून चटणी करा, ती पाण्यात ऊकळवा, थंड करुन प्या.
तीन महिने घ्या --- नंतर २० दिवस सोडून --- परत तीन महिने घ्या. 
अशा प्रकारे करा आराम वाटेल.

रोज एक किंवा दोन महायोगीराज गुग्गुळ गोळी घ्या.    किंवा
महारास्ना काढा घ्या.

१चमचा हळद+१चमचा पीठीसाखर+कणभर खायचा चूना+थोड पाणी घालुन एकजीव करा व तो लेप उसण भरली असेल तीथे लावा. ७ दिवस लावा.

दुखद बाव लेप लावा.

महानारायण तेलाने माॅलीश करणे.

दुखर्‍या भागावर शेक घ्या.
त्यासाठी गरम पाण्याची पीशवी
किंवा   ईलेक्ट्रीकची ऊशी
किंवा   विटेचा तुकडा शेगडीवर गरम करुन फडक्यात गुंडाळून शेकु शकता.
महत्वाचा ऊपाय शेक आहे. औषध फक्त वेदाना कमीकरण्यापूरतीच असतात. एकदा आखडलेला भाग सुटला कि दुखण आपोआपच बर होत असत.

*ही दक्षता घ्या.......*
जरुशिवय पुढे वाकायच नाही, वेळ आलीच तर काठी घ्या.
शक्यतो जड ऊचलायच नाही. कुठेही बसतांना पाठ ताठ राहील याची दक्षता घ्यायची. 
बॅकबेंडींगची आसने योगासन शिकवणार्‍याकडुन शिकून घेवुन करायची.          
झोपायला पातळ गादी व पातळ ऊशी घ्या. कुशिवर झोपतांना दोन ढोपरांमधे जाड ऊशी घ्या.

हाडमोडीवर  अर्जुन सादडा
अर्जुनसादडा - सालीचे चुर्ण + १ग्रॅमतुप +१ग्रॅम राखर घालुन सकाळ संध्याकाळ घ्याव
 *कोणतेही हाडाचे दुखणे व्यायाम केल्याशिवाय कायमचे  बसणार नाही. पेन किलर खाणे योग्य नाही. जास्त त्रास होत असल्यासच पेन किलर  घ्यावी*
            परंतु
 
🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒🍑🍒💥🍓💥🍓💥🍓💥🍓💥🍓💥🍓💥🍓

ज्वारीच्या भाकरीचे महत्व* *!! रामबाण !!*

*ज्वारीच्या भाकरीचे महत्व* 
        *!! रामबाण !!*
“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन १४ किलोनी कमी झालं.” 

“माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स काढून फेकून दिले.”

“गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.”

“माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”

“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…” वगैरे सुधारले...

गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते.  काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात. 

*जेवणात का खावी ज्वारीची भाकरी… ?*

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. 

ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते. 

बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.

तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.

ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.

भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

*ज्वारीचे फायदे*

1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.

2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.

3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.

4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.

5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.

7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.

8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.

9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.

10) शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

11) काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.

*ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या, 
ज्वारीचा आहारामध्ये अपयोग करा ,रोग पळवा 



*विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून वाचावा व ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा*

पहाटेची लवकर उठण्याची अमर्याद ताकद.....*

*पहाटेची लवकर उठण्याची अमर्याद ताकद.....*

*तुम्ही सकाळी किती वाजता उठता...?*
हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती.

पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?

“हेल, तु सकाळी लवकर उठ!” “बाकी सगळं आपोआप होईल”या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते, काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली, आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!

*पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का...?*
इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्नावर हेल ने एक कोडवर्ड सांगितला 

https://chat.whatsapp.com/G7SHhSXSekCFq3WmVKCDii

*ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत...*

*१) Silence (ध्यान)...* 
*शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!
*स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!
*मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान!
*मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!
*माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!
*अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान! 

*२) Affirmations (सकरात्मक स्वयंसूचना)...*
*अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद!
*स्वतः स्वतःला सुचना देणं,
*प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!
*येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!
*स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात.
*अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.
*एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे?
*वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!

*३) Visualize.(चांगल्या कल्पना मनात घोळवणे)...*
*तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन!
*कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.
*कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.
*दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.
*पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.
*ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे. 
*मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.
*प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, “यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!” 


*4) शरीरातून आळसाला पळवून  लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम...
*शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा!
*व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त बाबीकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.
*वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.  
*तो कशावरच एकाग्र होवू शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होवू शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.
*ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,प्राणायाम करा.  शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.

*५) Reading (वाचन)...* 
*पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.
*पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.
*वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.

*६) Scribing (लिहिणे)...* 
*लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.
*लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.
*लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.
*संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.
*लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे. लिहिल्याने विचार पक्के होतात.
*सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं.
*एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत.
*मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.
*ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,
*रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं.
*लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!
*जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.
*अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.

*ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे. वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत...?* 

 आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे. तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे.

कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत.
तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू. अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये.
वेळ आहे स्वतःवर काम करण्याची स्वतःसाठी जगण्याची आलेल्या परिस्थिती चा फायदा करून घेण्याची...


💥🍇💥🍇💥🍇💥🍇💥🍇💥🍇💥🍇💥🍇💥

सोमवार, २९ जुलै, २०२४

आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका.....*

*आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका.....*
आई - बाबा ज्याप्रमाणे मुलांच्या आरोग्याची काळजी घेतात (Parents Health Care). लहानपणी जसं आपलं आरोग्य त्यांनी सांभाळलं. त्याच प्रमाणे वय वाढल्यानंतर मुलांनी आपल्या आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी (Monsoon). आई वडिलांचं वय वाढल्यानंतर त्यांना स्वतःच्या अनेक गोष्टी करायला कमी नाही (Health Tips). खाण्या पिण्याकडेही त्यांचं पुरेसं लक्ष नसतं. ज्यामुळे आरोग्याच्या निगडीत अनेक आजार शरीराभोवती घेरतात. शिवाय तब्येतही वारंवार बिघडते.

लॉन्जेविटी एक्सपर्ट प्रशांत देसाई सांगतात की, 'आपल्या आई - वडिलांवर सतत प्रेम करत रहा , त्यांना घालून पाडून बोलू नका ते होते म्हणून आपण आहोत एवढे लक्षात ठेवा, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यांना ३ गोष्टी कधीही खायला देऊ नका. यामुळे आई वडील वारंवार आजारी पडतील. शिवाय गंभीर आजार शरीराभोवती विळखा घालतील'

*साखरेचा चहा आणि बिस्कीट...*
तज्ज्ञांच्या मते, बऱ्याच लोकांना चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय घातक ठरू शकतं. एक कप चहामध्ये ३६ ग्रॅम साखर असते. यामुळे त्यांना इन्शुलीन रेझिस्टन्स, लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्याऐवजी खाकरा, शेव मुरमुरा किंवा घरगुती नाश्त्यावर तूप घालून खाऊ शकता. यामुळे आरोग्याला फायदे मिळतील.

*व्हेजिटेबल ऑईल...*
बरेच जण आहारात व्हेजिटेबल ऑईलचा आहारात समावेश करतात. ज्यामुळे मेटाबॉलिक डिसऑर्डरची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे रक्तातील ट्रायग्लिसराईडची पातळी वाढते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याऐवजी त्यांना तूप आणि खोबरेल तेलाचा आहारात सामावेश करा.

*रेस्टॉरंटमधलं अन्न...*
वयस्कर पालकांना शक्यतो रेस्टॉरंटमधून किंवा बाहेरचं खायला देऊ नका. त्यात मीठ, साखर आणि पाम तेलाचा जास्त वापर होतो. त्यात आरोग्यदायी आणि पौष्टीक गोष्टी नसतात. त्याऐवजी घरातील अन्न खायला द्या. तसेच मास मच्छी देणे सुद्धा टाळावे.
 

*३ ते ५ वयोगटातील मुलांना महत्त्वाच्या ६ गोष्टी करता येतात का? कशी शिकणार ही कौशल्यं..

*३ ते ५ वयोगटातील मुलांना महत्त्वाच्या ६ गोष्टी करता येतात का? कशी शिकणार ही कौशल्यं.....*

मुलांना शाळेला सुट्टी लागली की कुठे फिरायला जायचं, कोणत्या समर कॅम्पला जायचं याचं नियोजन सुरू होतं. हे सगळं ठिक असलं तरी पालक म्हणून आपणही मुलांना थोडा वेळ द्यायला हवा. नुसताच वेळ नाही तर त्या वेळात मुलांना काही कौशल्ये जरुर शिकवायला हवीत.  दैनंदिन जीवनात उपयुक्त असणारी ही कौशल्ये तुम्ही मुलांना जेवढ्या लवकर शिकवाल तेवढ्या लवकर तुमच्या मुलांना त्या कौशल्यांची सवय लागेल, मुलं स्वतंत्र व्हायला त्याची निश्चितच मदत होईल. ही कौशल्ये आत्मसात केल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासही मदत होईल. साधारण ३ ते ५ वर्षापर्यंतच्या मुलांना काही किमान कौशल्ये कोणत्या पद्धतीने शिकवू शकता याविषयी...

*१. भाषा आणि संवाद कौशल्य...*
भाषेचं महत्व आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. या वयातील मुलं साधारणपणे खूप चीडचीड करतात, ओरडून बोलतात, किंवा खूप कमी बोलतात अशा प्रकारच्या तक्रारी पालक करताना दिसतात. मग या सुट्टीमध्ये मुलांच्या भाषा कौशल्यावर थोडं जास्त लक्ष द्या. नवीन गोष्टी वाचणं, एखाद्या स्थळाबद्दल माहिती घेणं, चित्र काढून त्याबद्दल बोलणं अशा वेगवेगळ्या पद्धती तुम्ही भाषा कौशल्य वाढवण्यासाठी करू शकता.

*२. स्वत: ची काळजी घेण्याची कौशल्ये...*
साधारण ३ वर्षानंतरची मुलं वेग वेगळ्या पद्धतीने स्वतःची काळजी घेऊ शकतात. कपडे घालणे, आंघोळ करताना साबण लावणे, अंगावर पाणी घेणे, शू-शी स्वत:ची स्वत: करता येणे. स्वतःच्या हाताने जेवण करणे, घरामध्ये लहानसहान कामात मोठ्यांना मदत करणे अशी कामं मुलं करू शकतात.

*३. संज्ञानात्मक कौशल्ये...*  मुलांच्या मेंदूचा विकास होत असताना त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे समस्या सोडवणे. आता, पालकांच्या दृष्टीने मुलांना कसली आलीये समस्या? तर, मुलांना घरामध्ये आणि बाहेर सुद्धा अनेक प्रश्न पडतात, त्या प्रश्नाचे उत्तर शोधणे म्हणजे समस्या सोडवणे. आता एक उदाहरण म्हणजे शाळेमध्ये पहिला दिवस असेल, तर कोणते मित्र असतील? कोणती शिक्षिका असेल? ही ३ ते ५ वर्षांच्या मुलांसाठी समस्या आहे. हळूहळू शाळेमध्ये जाऊन, मुलांच्या बरोबर रोज खेळून त्यांना मित्र बनवून मग ती समस्या सुटते. हेच अभ्यासाच्या बाबतीत, खेळ शिकण्याच्या बाबतीत वगैरे सुद्धा दिसून येत. 

*४. सामाजिक कौशल्य...*
काही वेळेस मुलं एकत्र असतात पण एकत्र खेळू शकत नाहीत. हे होण्यामागे मुख्य कारण म्हणजे सामाजिक खेळ ( ग्रुप प्ले ) कसे खेळायचे हे खूप वेळेस मुलांना माहीत नसतं. शेअरिंग, सूचना देणे आणि ऐकणे, खेळाचे वर्णन करून सांगता येणे वगैरे कौशल्ये वाढण्यासाठी मुलांना इतर मुलांशी खेळायची संधी उपलब्ध करून द्या. याशिवाय रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला पाहणे, रस्त्यावरती न पळणे, सिग्नल पाळणे, खेळताना स्वतःची काळजी घेणे इत्यादी. सामाजिक कौशल्ये पालक शिकवतील तेव्हाच मुलं शिकतील.

*५. शारीरिक कौशल्ये...* कोणतेही कार्य करण्यासाठी मुलांची शारीरिक कौशल्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात. साधारण ४ वर्षापर्यंत मुलांमध्ये डोळे आणि हात यांचा समन्वय, दोन्ही हाताचे समन्वय, मेंदू आणि शरीर यातील समन्वय असणं गरजेचं आहे. पोहायला जाणे, सायकल चालवणे, नाच करणे, एखादा खेळ शिकणे  अशा प्रकारच्या गोष्टी मुलांसोबत केल्याने त्यांची शारीरिक कौशल्ये विकसित व्हायला मदत होते. 

*६. भावनिक कौशल्य...* मुलांच्या भावना या वयानुसार आणि स्वभावानुसार बदलत असतात. त्यांना आजूबाजूच्या गोष्टीचा जसा अनुभव येत जातो त्याप्रमाणे मुलं भावना व्यक्त करतात. काही वेळेस तीव्र तर काही वेळेस सौम्य भावना व्यक्त करताना दिसतात. एखादी गोष्ट खरी आहे की खोटी हे सुद्धा मुलांना या वयामध्ये समजतं. म्हणजे एखादं कार्टून कॅरॅक्टर हे प्रत्यक्षात नसतं त्यामुळे आपल्याला कितिही त्याप्रमाणे वागावंस वाटलं तरी सत्यात मला तसं वागत येणार नाही. 

*©संकलन*
*गजानन गोपेवाड*

शनिवार, २७ जुलै, २०२४

छअसून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो.*

*छअसून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो.*


लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही छोटे+छोटे उपाय सांगत आहोत ज्यामुळे 7 दिवसात तुमचे वजन कमी होऊ लागेल....

1. पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

2. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.

3. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.

4. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.

5. आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.

6. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा.

7. जेवणात वरून मीठ घेऊ नये. परंपरागत मसाले अन्नाची केवळ चव वाढवत नाहीt तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट , एंटीऑक्सीडेंट आणि फायबरही असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की, हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नये.
 
8. वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.

9. दिवसभराच्या आहारात सर्वात जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. अनेकवेळा लोक वजन कमी करण्याचा नादात ब्रेकफास्ट करत नाहीत परंतु एका रिसर्चनुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये नेहमी एकसारखे पदार्थ सेवन करू नयेत.

10. सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसुतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.
11. सर्वात महत्त्वाचे नेहमी उपाशी राहिल्यानंतर लठ्ठपणा वाढतोच. त्यामुळे उपाशी राहू नये . पोटभर जेवण्यापेक्षा थोडे थोडे चार वेळा जेवण केले तरी चालेल. वेळ मिळत नसल्यास सकाळ दुपार संध्याकाळ खूप चांगले. समजा तुम्ही एकाच वेळी तीन पोळ्या खात असाल तर थोडेसे बदल करून सकाळी एक दुपारी एक आणि संध्याकाळी एक याप्रमाणे जेवण करावे.

गुरुवार, २५ जुलै, २०२४

मूळव्याधी (पाईल्स)वर सुटकारा मिळवण्यासाठी घरगुती उपाय.*

*मूळव्याधी (पाईल्स)वर सुटकारा मिळवण्यासाठी घरगुती उपाय.*

*एका अध्ययनात किमान 50 टक्के लोकांना 50 वर्षाच्या वयापर्यंत पाईल्स होण्याची शक्यता असते. ही एक सामान्य आजार आहे ज्याचा संक्रमण पसरत नाही. पाईल्सवर उपचार असतो पण लोकांना डॉक्टरकडे जाण्यास थोडी शरम वाटते.*

*हा आजारपण वाढल्याने त्यातून रक्त येऊ लागत आणि फार दुखू लागत ज्यामुळे बसायला त्रास होतो. यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगत आहोत, ते केल्याने नक्कीच आराम मिळेल.*

*1. कोमट पाण्याने स्नान : दिवसातून तीन वेळा गरम पाण्याने स्नान करावी किंवा पाण्यात थोड्यावेळासाठी बसावे. त्या जागेवरची त्वचा ठीक होईल आणि जळजळ देखील कमी होण्यास मदत मिळेल.*

*2. संतुलित आहार घ्या : पाईल्स बरे करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला संतुलित आहार घेणे सुरू केले पाहिजे. ज्यामुळे कब्‍ज व पोटदुखी इत्यादीची समस्या दूर होते. जेवणात हिरव्या भाज्या, पाले भाज्या, ब्राउन राईस, दूध, सुजी इत्यादीचे सेवन करा.*

*3. बर्फाचा शेक द्या : ज्या भागात जळजळ होत असेल, तेथे बर्फाचा तुकडा ठेवा, याने आराम मिळेल व सूज कमी होण्यास मदत मिळेल.*

*4. एलोवेरा: पाईल्स झाल्यावर एलोवेरेला कापून आतला गर त्या जागेवर लावल्याने फायदा होतो. याचे जेल, जळजळ शांत करतो आणि सूज देखील कमी करण्यास मदत करतो.*

*5. लिंबाचा रस : तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल, पण पाईल्स झाल्यावर लिंबाचा रस त्या जागेवर लावल्याने फार फायदा होतो. सुरुवातीत जळजळ होते पण थोड्यावेळाने आराम मिळतो.*

*6. जैतूनाचे तेल : जैतूनाचे तेल फारच उपयोगी असत. यात एंटीऑक्‍सीडेंट असत जे त्वचेची जळजळ शांत करत. पाईल्स झाल्यावर कॉटन बॉलमध्ये तेल घेऊन प्रभावित जागेवर लावायला पाहिजे. याने आराम मिळेल.*
 
*7. इतर प्राकृतिक उपाय: बर्‍याच वेळेपर्यंत ऐकाच मुद्रेत बसून राहणे टाळावे. व्यायाम करावा आणि रक्त आल्यावर लगेचच *डॉक्टरांना सल्ला* *घ्यावा.* 
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

*चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते?

*चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते?*

चिंच.. म्हटली की जिभेवर रेंगाळते ती म्हणजे आंबट गोड चव. पाणीपुरी, शेवपुरी .. चिंचेची आंबट-गोड आमटी.. असे एक ना अनेक भारतीय पदार्थ चिंचेच्या वापराशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. अगदी प्राचीन काळापासून भारतीय खाद्य संस्कृतीत चिंच हा अविभाज्य भाग आहे. चिंच हे भारतीय उपखंडातील सर्वात महत्त्वाच्या बहुउद्देशीय उष्णकटिबंधीय फळझाड प्रजातींपैकी एक आहे. चिंच हा बहुवर्षायू वृक्ष असून या झाडाचे मूळ ॲबिसिनियात आणि मध्य आफ्रिकेत असल्याचे अभ्यासक मान्य करतात. आज चिंच हे झाड उष्ण कटिबंधात सर्वत्र आढळते. भारतात विशेषेकरून कोकण व उत्तर कारवार येथील जंगलात चिंच मोठ्या प्रमाणात दिसते. चिंचेच्या झाडाचे मूळ आज आफ्रिकेतील असले तरी चिंचेचे फळ मोठ्या प्रमाणात प्रथम भारतात उत्पादित केले जात होते असे मानले जाते. 

उर्वरित भारतात हे झाड जगते परंतु कोकण आणि कारवार प्रमाणे चिंचेच्या फळाची गुणवत्ता तिथे मिळत नाही.. यामागील मुख्य कारण भारत आणि आफ्रिका सोळाशे लक्ष वर्षांपूर्वी एक भूभाग असल्याने हे साम्य आढळत असावे, असे अभ्यासक मानतात. किंबहुना काही अभ्यासकांच्या मते चिंचेचे बी हे समुद्रमार्गे कोकण आणि कारवार यांच्या किनाऱ्यावर रुजले गेले, आणि त्यानंतर ते उर्वरित भारतात पसरले. असे असले तरी उर्वरित जगाला चिंचेची ओळख झाली ती केवळ भारतामुळे. चिंचेला इंग्रजीत टॅमरिंड असे म्हणतात. चिंचेचे शास्त्रीय नाव ‘टॅमॅरिंडस इंडिकस’ आहे. हा शब्द मूलतः पर्शियन शब्दावरून आला आहे. पर्शियन भाषेत चिंचेला “तमार-इ-हिंद” असे म्हणतात. याचा अर्थ ‘हिंदचे खजूर’ असा आहे. संस्कृत मध्ये चिंचेला “अम्लिका” असे म्हटले जाते. तर संस्कृत ग्रंथांमध्ये चिंचेच्या वृक्षाला ‘तिन्त्रिणी वृक्ष’ असे संबोधले गेले आहे . चिंचेची पाने, बिया आणि साल अनेक आरोग्यविषयक आजार बरे करण्यासाठी उपयुक्त आहेत.

चिंचेशी संलग्न आख्यायिका
पौराणिक कथांमध्ये चिंचेच्या झाडाची सावली कृष्णासारखी पवित्र असल्याचे म्हटले आहे. राधेपासून विभक्त झालेला श्रीकृष्ण चिंचेच्या झाडाखाली बसला होता, अशी आख्यायिका आहे. चिंचेची पाने रात्रीची दुमडतात, यासंदर्भातील आख्यायिका शिव आणि भस्मासूर यांच्यातील संघर्षाशी सलंग्न आहे. शिव आणि भस्मासूर यांच्यातील युद्धाच्या दरम्यान जखमी भस्मासूर चिंचेच्या झाडावर लपला होता. शिवाने आपल्या अंतःचक्षूने भस्मासुराचा शोध घेतला त्यावेळेस भस्मासूर दिसावा म्हणून चिंचेच्या झाडाने आपली पाने दुमडून घेतली. अशा अनेक आख्यायिका चिंचेच्या झाडाशी संबंधित आहे. या पौराणिक आख्यायिका असल्या तरी एक दंतकथा विशेष करून चिंचेच्या झाडासंदर्भात प्रसिद्ध आहे, ती म्हणजे या झाडावर भूत, चेटकीण या सारख्या अमानवी शक्तींचा वास असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस या झाडाखाली झोपू नये किंबहुना जाऊही नये असे सांगितले जाते, असे केल्यास भूतबाधा होते असा समज आहे. परंतु अशा स्वरूपाची कथा, आख्यायिका का प्रसिद्ध झाली यामागे वैज्ञानिक कारण असल्याचे तज्ज्ञ मानतात. रात्रीच्या वेळी चिंचेच्या झाडाखाली का झोपू नये, यामागील शास्त्रीय कारण समजून घेणे नक्कीच महत्त्वाचे ठरणारे आहे.

चिंच इतर वनस्पतींना मारणारी वनस्पती
चिंच हे एक Allelopathic झाड आहे. अ‍ॅलेलोपॅथी हा शब्द ग्रीक शब्द अ‍ॅलेलॉन आणि पॅथी या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. अ‍ॅलेलॉन म्हणजे दुसऱ्यावर किंवा परस्पर आणि पॅथी म्हणजे सफरींग-वेदना. ज्या वनस्पतीमुळे दुसऱ्या वनस्पतींवर घातक परिणाम होतो त्यांना अ‍ॅलेलोपॅथी ही संज्ञा वापरण्यात येते. अ‍ॅलेलोपॅथी वनस्पती दुसऱ्या वनस्पतींवर घातक रसायनं सोडतात. ही रसायनं वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागांद्वारे सोडली जाऊ शकते किंवा नैसर्गिक विघटनाद्वारे सोडली जाऊ शकतात. अ‍ॅलेलोपॅथी या शब्दाचे श्रेय ऑस्ट्रियन प्राध्यापक ‘हॅन्स मोलिश’ यांना दिले जाते, त्यांनी १९३७ साली “द इफेक्ट ऑफ प्लांट्स ऑन इच अदर” या पुस्तकात हा शब्द सर्वात आधी वापरला. असे असले तरी या वनस्पतींच्या या गुणधर्माविषयी प्राचीन काळापासून मानवाला प्रचिती असल्याचे नोंदविले गेले आहे. प्राचीन ग्रीक आणि रोमन नोंदींमध्ये या वनस्पतींचा उल्लेख विषारी असा करण्यात आलेला आहे. केवळ चिंचच नाही तर काळया अक्रोडच्या झाडाचाही याच प्रकारात समावेश होतो म्हणूनच प्लिनी द एल्डरने इसवी सनाच्या पहिल्या शतकात काळया अक्रोडाच्या झाडाला विषारी म्हणून नोंदविले आहे.

अ‍ॅलेलोपॅथी म्हणजे काय?
अ‍ॅलेलोपॅथी ही एक जैविक प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी शेजारच्या वनस्पतीची वाढ पूर्णपणे थांबवते. अ‍ॅलेलोपॅथी ही एक जगण्याची यंत्रणा आहे. निसर्गात प्रत्येक सजीव हा जगण्याच्या स्पर्धेत असतो. चार्ल्स डार्विन याच्या ‘सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट’ या सिद्धांताप्रमाणे अ‍ॅलेलोपॅथी या गटात मोडणाऱ्या वनस्पती, झाडे स्वतःच्या वाढीसाठी आपल्या सभोवताली असणाऱ्या इतर वनस्पतींची वाढ थांबवितात. या वनस्पती मुख्यत्त्वे आपल्या मुळांद्वारे जमिनीत विषारी रसायनं सोडतात, त्यामुळे त्या झाडाच्या आजूबाजूच्या झाडांची वाढ खुंटीत होवून झाडे मरतात. त्याचमुळे चिंचेच्या आजूबाजूला इतर वनस्पती आढळत नाही. चिंचेप्रमाणे काळं अक्रोड ही अंगणात न लावण्याचा सल्ला दिला जातो. अक्रोडाच्या झाडाचे सर्व भाग हायड्रोजुग्लोन तयार करतात, जे ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर अ‍ॅलेलोटॉक्सिनमध्ये रूपांतरित होते. अक्रोडाच्या झाडांची मुळे, कुजणारी पाने आणि डहाळे हे सर्व आसपासच्या जमिनीत जुग्लोन सोडतात, ज्यामुळे इतर अनेक वनस्पतींच्या वाढीस प्रतिबंध होतो. नुकत्याच झालेल्या प्रयोगशाळा आणि ग्रीनहाऊस या दोन्ही प्रयोगांतून असे दिसून आले की ‘चिंचेच्या झाडाची पाने आणि मुळांमध्ये जैविक दृष्ट्या महत्त्वपूर्ण वाढ नियंत्रक असतात आणि ते अ‍ॅलेलोपॅथीद्वारे झाडाच्या खोडाजवळ तणमुक्त वातावरण तयार करण्यात गुंतलेले असतात (संदर्भ: Parvez, Syeda & Parvez, Mohammad & Fujii, Yoshiharu & Gemma, Hiroshi. (2003). Allelopathic competence of Tamarindus indica L. root involved in plant growth regulation. Plant Growth Regulation. 41. 139-148. 10.1023/A:1027387126878). म्हणूनच चिंचेचे झाड घराच्या आजूबाजूला किंवा अंगणात लावू नये असे सांगितले जाते. याच कारणामुळे चिंचेचे झाड नेहमीच एकांतवासात, एकाकी असते, त्याचमुळे या झाडाशी निगडित अमानवी कथा उत्त्पन्न झाल्या आहे.

*रात्री का झोपू नये या झाडाखाली?*
चिंचेच्या झाडावर भूत किंवा चेटकीण तत्सम वाईट शक्ती असल्याने या झाडाखाली रात्रीचे झोपू नये किंवा शक्यतो जाऊ नये असे म्हटले जाते. सर्वच झाडे रात्रीच्या वेळेस कार्बन डायऑक्साईड सोडत असल्याने रात्रीच्या वेळेस या झाडांखाली न झोपण्याचा सल्ला दिला जातो. या संदर्भात पुरावनस्पती अभ्यासक देवदत्त पोखरकर यांनी नमूद केले की ‘चिंचेच्या झाडापासून माणसाला भूतबाधा वगैरे होत नाही, इतर झाडांच्या तुलनेत चिंचेचे झाड अधिक कार्बन डायऑक्साईड सोडत असल्याने पक्षीही या झाडावर घरटी करत नाहीत, अपवादात्मक परिस्थिती वगळता. पक्षी चिंचेच्या झाडावरील फळे दिवसा खातात, त्या साठी त्या झाडावरही जातात, परंतु रात्रीच्या वेळेस पक्षीही चिंचेच्या झाडाजवळ भटकत नाहीत. दुसरं महत्त्वाचं कारण असं थंडाव्यासाठी साप-नाग -अजगर रात्रीच्या वेळेस चिंचेच्या झाडावर वास्तव्यासाठी जातात. त्यामुळे अज्ञानाने रात्रीच्या वेळेस या झाडाखाली झोपल्यास सर्प-विंचू चावण्याचा धोका असतो. इतर प्राण्यांच्या तुलनेत सापाची श्वसनक्रिया कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी अधिक प्रभावी असते त्यामुळे चिंचेच्या झाडावर साप रात्रीच्या वेळेस सहज वास्तव्य करू शकतो. बऱ्याच वेळा चिंचेच्या झाडावर घुबडाचा वावर असतो. जे काही मोजके पक्षी सापाला खातात, त्यात घुबडाचा समावेश होतो. त्यामुळे ‘जीवो जीवस्य जीवनम्:’ हे येथे अक्षरश: खरे ठरते. चिंचेचे झाड त्याच्या उपजत अ‍ॅलेलोपॅथी धर्मामुळे एकाकी असते. त्यात अधिक कार्बन डायऑक्साईड सोडणारे झाड, या झाडावर रात्रीच्या वेळेस साप, घुबड यांचा वावर, अक्राळ-विक्राळ फांद्या यासर्वांमुळे या झाडावर भूत असल्याच्या आख्यायिका प्रचलित झाल्या आहेत.

बुधवार, २४ जुलै, २०२४

आयुर्वेद health tips...Every one shud follow*

*आयुर्वेद health tips...Every one shud follow* 

1)तहान लागेल तेव्हाच पाणी प्या.
2)शाबुदाणा,शेंगदाणे,वरी,दही हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ खाऊन उपवास करू नयेत... खरा उपवास म्हणजे लंघन..पोटाला विश्रांती देणे..

3)जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात..दुपारी १२ पर्यंत आणि रात्री ८ पर्यंत जेवण करावे.
4)दोन्ही जेवणानंतर शत पावली( Actual १०० steps च अपेक्षित आहेत .व्यायाम नव्हे )घालावी. म्हणजे अन्न पुढे सरकण्यास आणि पचनाला मदत होते.

5)लोणचे,पापड,अति तिखट,तेलकट, खारट अन्न पदार्थ खाऊ नयेत.
6)रात्री च्या वेळी दही खाऊ नये.

7)रोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.
8)मधल्या भुकेच्या वेळेत त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ,राजगिरा लाडू,साळीच्या लाह्या,खजूर हे खावे...फरसाण,बिस्कीट,शेव हे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ आहेत.

9)आपण जिथे राहतो तिथे ज्या स्थानिक भाज्या पिकतात,फळे मिळतात ते खावे..फळे नुसतीच खावीत, दुधात घालून,दह्यात मिक्स करून खाऊ नयेत...फळांची मूळ चव आणि गुणधर्म बदलतात अशाने..

10)जेवणात २ चमचे तुपाचा समावेश जरूर  असावा.तुपाने कोलेस्टेरॉल वाढत नाही..तूप हे दुधावर अनेक संस्कार केल्यानंतर तयार होते त्यामुळे पचनासाठी चांगले असते..
11)संडास,लघवी ,उलटी ,शिंक या वेगांचे धारण कधीही करू नये..लागल्यास लगेच जावे.

12)पाळीच्या दिवसात स्त्रियांनी लोणचे खाल्ले तर रक्त स्त्राव वाढण्याची शक्यता असते कारण लोणच्यात तेल,मीठ,तिखट यांचा जास्त वापर असतो आणि त्यामुळे स्त्री शरीरातील पित्त वाढते पर्यायाने रक्त सुध्दा वाढते..म्हणून लोणचे खाऊ नये.

13)दूध आणि फळं एकत्र करून खाऊ नये..विरुद्ध आहार आहे..त्याचे पचन होत नाही.आणि अनेक आजारांची निर्मिती त्यातून होते.
14)कधीही पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नये..वायू च्या संचरणासाठी पोटात जागा ठेवावी.

15) शिळे अन्न, processed food, preservatives असलेले पदार्थ शक्यतो टाळावेत..जितका आहार ताजा खाल्ला जाईल  तितके शरीराचे पोषण चांगले होईल...आपल्या शरीराचा संपूर्ण डोलारा हा आपण खात असलेल्या आहारावर च अवलंबून असतो..

शनिवार, १३ जुलै, २०२४

*डेंग्यू झाल्यावर रूग्णानें काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या एक्सपर्ट्सचा सल्ला.

*डेंग्यू झाल्यावर रूग्णानें काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या एक्सपर्ट्सचा सल्ला.....*

पाऊस आला की, डासांचं थैमान वाढतं. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोकाही वाढतो. डेंग्यू डासांचं थैमानही वाढतं. डेंग्यूवर वेळीच उपचार केले नाही तर रूग्णाचा जीवही जाऊ शकतो. डेंग्यू झाल्यावर ताप, डोकेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना, हाडे आणि जॉईंट्समध्ये वेदना, मळमळ, उलटी, डोळे दुखणे, सूज आणि त्वचेवर लाल चट्टे अशी लक्षणे दिसतात. अशात रूग्णाची खूप काळजी घ्यावी लागते. डेंग्यूची लागण झाल्यावर रूग्णाची काळजी कशी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

डेंग्यू झाल्यावर या गोष्टींची घ्या काळजी

- *वेळीच ओळखा लक्षण...*
डेंग्यूची वेळेवर ओळख पटवणं फार गरजेचं आहे. जर कुणाला तापासोबत थंडी वाजत असेल, डोकेदुखी, कमजोरी किंवा थकवा जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका. योग्य वेळेवर उपचार करून डेंग्यूपासून बचाव केला जाऊ शकतो.

- *पोषक आहार घ्या...*
डेंग्यूच्या रूग्णांनी आपल्या आहारावर खूप लक्ष दिलं पाहिजे. संतुलित आहार घ्यावा. ज्यात ताजी फळं, भाज्या, कडधान्य, डाळी, नट्स, बीन्स यांचा समावेश असावा. यादरम्यान बाहेर, तेलकट, मसालेदार काहीच खाऊ नये. सोडा, कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करू नये. 

- *तरल पदार्थ जास्त घ्या...*
डेंग्यू झाल्यावर रूग्णाला जास्त लिक्विड दिलं पाहिजे. सूप, आल्या-पुदीन्याचा चहा यात फायदेशीर ठरतो. रूग्णाला भरपूर पाणी प्यायला द्यावं. कोमट पाणी द्यायला हवं.

- *दारू-सिगारेट ओढू नये...*
डेंग्यू झाल्यावर चुकूनही दारू किंवा सिगारेट ओढू नये. यामुळे डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. समस्या आणखी गंभीर होऊ शकते. 

- *डासांपासून बचाव...*
घरातील डासांपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे जसे की, मच्छरदानी, स्प्रे, क्रीम. पूर्ण कपडे घाला. घरात किंवा आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. थांबलेलं पाणी लगेच काढा

बुधवार, १० जुलै, २०२४

किडनी खराब होऊ द्यायच्या नसेल तर लगेच खाणं बंद करा 'हे' पदार्थ.....!*

*किडनी खराब होऊ द्यायच्या नसेल तर लगेच खाणं बंद करा 'हे' पदार्थ.....!*

किडनी आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. त्यामुळे किडन्यांची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. पण लोकांच्या काही चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किडनींचं मोठं नुकसान होतं. लोक अशा अनेक गोष्टी रोज खातात ज्यामुळे किडनी खराब होऊ शकतात. आज आम्ही अशाच काही पदार्थांबाबत तुम्हाला सांगणार आहोत.

*मेयोनीज...*
आजकाल सॅंडविच किंवा मोमोज किंवा इतर काही पदार्थांसोबत मेयोनीज खाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण केवळ एक चमचा मेयोनीजमध्ये १०३ कॅलरी असतात. तसेच यात सामान्य सॅच्युरेटेड फॅट अधिक प्रमाणात असतं. फॅट नसलेलं किंवा कमी कॅलरीच्या मेयोनीजची निवड करा. हेही बघा की, त्यात सोडिअम आणि शुगर जास्त नसेल.

*फ्रोझन फूड...*
फ्रोजन फूड आणि मायक्रोवेवमध्ये शिजवलेले पदार्थ खाऊन टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो. कारण यात पदार्थांमध्ये फॅट, शुगर किंवा सोडिअम भरपूर प्रमाणात असू शकतं. ताजे आणि पौष्टिक पदार्थ खाणं नेहमी चांगलं असतं. 

*सोडा...*
सोड्यामध्ये शुगरचं प्रमाण फार जास्त असतं. सोबतच यात कोणतंही पोषण नसतं. याने तुमच्या आहारात जास्त कॅलरी जोडल्या जातात. ज्यामुळे तुमचं वजन वाढतं. रिसर्चमधून समोर आलं की, सोड्याचं सेवन ऑस्टियोपोरोसिस, किडनीचे आजार, खराब पचनक्रिया आणि दातांच्या समस्यांना निमंत्रण देतं.

*प्रोसेस़्ड मीट...*
बेकन, सॉसेज, हॉट डॉग आणि बर्गर पॅटीजसारखे प्रोसेस्ड मीट किडनीचं आरोग्य खराब करू शकतात. यात हाय सोडिअम असतं. नेहमीच जास्त सोडिअमचं सेवन केलं तर ब्लड प्रेशरची समस्या वाढू शकते. ज्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो.

*डीप फ्राय पोटॅटो...*
जर तुम्ही फ्रेंच फ्राइजच्या रूपात चिप्ससारखे पॅकेज्ड फूड किंवा फास्ट फूडच्या रूपात बटाट्याचं सेवन करत असाल तर तुमच्या किडनीचं आरोग्य धोक्यात आहे. किडनी खराब होऊ द्यायची नसेल तर डीप-फ्राइड बटाटे खाणं टाळलं पाहिजे. बटाट्यामध्ये पोटॅशिअमचं प्रमाण जास्त असतं. जे कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
 

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...